जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Khilari balu sudam
26-07-2015
bkhilari@ymail.com

sir
mi takali haji .taluka-shirur.Dist-pune ya gavcha rahivashi hahe maza adilana maza pahunayni rahanay sathi bigar bhojachi jaga dili hothi attha thy jagevar ghar asun te vadilanchy navavar hahe pan jaga navavar nahi va te jage vale ghar padun taku aase manath hahe yachy sathi kay karava lagel
जागे वर जर घर २० वर्षापूर्वी पासून असेल , तर आपण दिवाणी न्यायालाय्त adverse - possession तत्वानुसार जागा , मालकी आपले नावावर करून मिळण्यासाठी , दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

शासन परिपत्रक क्र. टीएनसी-३००९/९७३/प्र,क्र.३४४/ल-९ दिनांक २७ ऑक्टोबर २००९ (महसूल व वनविभाग) मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम १९४८ चे कलम ८४ (क) नुसार करावयाची कारवाई याची प्रत मिळावी

Question by narshing
26-07-2015
narshingtugave@gmail.com

Sir mazakde yk aarj aala aahe tyamadhe tyanni dongri dakhlyababt jbab panchname sathi aarj aslyas konte kagdpatr bgayche v dongri dakhala sathi talathi panchnama lagte ka ? Dongri dakhlyasathi kontya g.r.aahe ka ? V rhivasi purava mhnun konte kagdpatr bgayche ? Shidhspstrika ha rhivasi purava nahi mhnun yk g.r.pn aahe tyasathi r rhivasi dakhlyasathi kontya g.r.aahe tyancha no dya.
किरण साहेब
मागे दिलेल्या उत्तरासाठी धन्यवाद साहेब मेळा ची फाईल म्हणजे kay
Sir maja sister ch validity kraych ahe but amcha kde 67 ch maratha asa proof ahe kunbi proof nahi tr yasati kay krav lagel
वैधता समिती , अश्या प्रकरणात , प्रत्यक्ष ग्रह भेट अव्हालावर , विचार करून वैधता प्रमाण पत्र देणे बाबत विचारकरते .

गृह भेटीत

१. आपले सन , व्यासाय - agriculture
2 geneology

yacha abhyas करते

please read Madhuri Patil vs State of Maharashtra

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

respected sir,
भू संपादने १९६९ त्या नंतर २००६ मध्ये जमीन चे पूर्वीचे मालक यांही तालुका जिल्हा मंत्रालय हि कोर्ट याचे सर्व निकाल भू संपादन कायम ठेवलेला आहे , तरी पण मुल मालकांनी ती जमीन गावातील एका व्यक्तीस राजीस्त्री करून दिली आहे व कलेक्टर साहिबानी त्या वाकातीचा फेर रद्द केला आहे ,पण तरी तो व्यक्ती त्या जमिनीवरील ताबा सोडण्यास तयार नाही. सात बारा वर महाराष्ट्र शाषण याची नोंद असून पोलिस व तहसील कार्यालय याचा सोबत संगनमत करून तो व्यति जमीन सोडण्यास तयार नाही , या साठी आम्ही काय करावे लागेल व तहसीलदार यांचे अधिकार त्या व्यातीस जमिनीतून काढण्यास कलम कोणते वापरण्यात यावे ,या दोन प्रश्नाचे उत्तर मिळावे हि नम्र विनंती .
Tahsildar under section 53 of MLRC can summrarily evict such person

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझे आजोबा यांच्या नावे वडीलोपार्जीत 10 एकर एवढी शेतजमीन आहे. माझे आजोबा ति जमीन माझे वडिल यांच्या नावे न करता थेट माझ्या नावे करण्यास इच्छुक आहेत व माझ्या वडीलांची सुद्धा यास सहमती आहे. मला चुलते वगैरे कोणी नाही.
1. सदर जमीन माझ्या नावावर कशी घेता येईल.
2. त्यासाठी किती खर्च येईल.
3. जमीन किती दिवसात माझ्या नावे करता येईल.

Question by Sunil Ghevade
24-07-2015
ghevade.sun@gmail.com

करारनामा आणी मुखत्यारनामा यातील फरक काय?
आपला प्रश्न/सूचना ...इनाम जमीन ट्रस्ट च्या विक्री केल्यास त्या वर काय कार्यवाही होईल.
नमस्कार,

माझ्या पहिल्या प्रश्नांची उत्तरे दिल्या बद्दल धन्यवाद!

माझ्या चुलत आजी ने चुलत आजोबा वारल्या नंतर तिची वडलोपार्जित मिळकत तिने आणि तिच्या मुली ने (म्हणजेच चुलत आत्त्याने) १९८९ मध्ये स्वताच्या वा चुलत आत्त्या च्या नावे न करता माझ्या काकांच्या नावे करून दिली होती. त्यानंतर २०११ मध्ये आम्हीही तिच्या वडलोपार्जित मिळकतीत सहहीशेदाराची नावे लावण्यासाठी तलाठी कडे प्रतिज्ञा पत्रा सहित अर्ज केला, त्यावर तलाठ्याने आजी आणि चुलत आत्त्याला तसेच काकांना, माझ्या वडिलांना, सख्या आत्यां ना सहहीशेदारा च्या नोटिसा पाठवल्या त्यावर फक्त माझ्या काकांनी हरकत घेतली. माझ्या काकांनी हरकत घेतल्यावर पुन्हा तलाठ्याने सगळ्यांना नोटीसी पाठवून त्याची सुनावणी मंडळ अधिकारी कडे केली. माझ्या काकांनी हरकती वर काकदी पुरावे न दिल्याने मंडळ अधिकारी ने आमच्या नावांची सहहीशेदार म्हणून नोंद केली. त्यावर काकांनी पुन्हा अपील केले परंतु काकदी पुराव्या अभावी उप विभागीय अधिकारी, कणकवली यांनीही काकांचे अपील फेटाळले.

चुलत आजी आमच्या कडेच राहत होती, आता चुलत आजी वारल्या नंतर चुलत आत्त्याला आणि तिच्या मुलींना त्यांच्या आजी ची मिळकत मिळू शकते का ? त्यांची आजी चे हिशेदार म्हणून नोंद होऊ शकते का? त्यांचे त्याच्या आजीच्या वडलोपार्जित मिळकतीवर त्यांचे हक्क आहेत का? चुलत आत्त्या वा तिच्या मुली फक्त काकांना मृत्युपत्र/बक्षीस पत्र/खरेदी पत्र कायदेशिररित्या देऊ शकते का?

आम्ही कसलेही मृत्युपत्र केलेले नाही. अजूनही चुलत आत्याचे तसेच तिच्या मुलींची नावे ७/१२ वर नोंद नाही.
एका गांवी गट नं.12 चे क्षेत्र 0 हे 48 आर एवढे आहे त्यांनी त्यांचा कुटूंबिक अडचणीसाठी 0 हे 10 आर जमिन एका व्यक्तीस खरेदीने विकली गावच्या तलाठीकडे संबंधित खरेदीदाराने दस्तऐवज सादर केले व तलाठीने सदर खदेरी क्षेत्रा बाबत सामाईक खातेदार म्हणून नोंद करणे बाबत फेरफार नोंदविला व त्या आधारे फेरफारचा कालावधी पूर्ण झाल्यावर मंडळ अधिकारीने सदर सामाईक नोंद जमिन खरेदीदाराचा नांवे नोंदण्यासाठी नोंद मंजूर केली ही बाब योग्य आहे व कसे ? या बाबत तुकडे जोड कायदयाचा भंग होत कसे . कृपया विवेचन करावे
आम्ही १९५५ पुर्वीचे संरक्षीत कुळ आहोत. आमच्या जमिनीचे दोन हिस्से होते. एक मुलाच्या नावाने व एक आईच्या नावाने. आम्हा दावा दाखल केल्यानंतर मुलाच्या हिश्श्याच्या जमीनीचे मालकी प्रमाणपत्र आम्हाला मिळाले व ७/१२ वर आमचे नाव मालकी रकान्यात लागले. मात्र आईच्या हिश्श्याच्या दाव्यामध्ये १९६३ मध्ये सदर महीला विधवा असल्यामुळे त्यांच्या हयातीत कुळाला मालकी प्रमाणपत्र देता येत नाही असे कळवुन अर्ज निकाली काढला होता. सदर महीला मयत झालेली आहे व जमिन आमच्याच कब्ज्यात आहे. दरम्यानच्या काळात सदर महीला व तिचे कुटूंब गावातुन स्थलांतरीत झाले. त्यांचा कोणालाही ठावठीकाणा नाही. आता आम्हाला अर्ज करायचा असेल तर सदर महीलेचे मृत्युप्रमाणपत्र व वारसप्रमाणपत्र जोडावे लागेल. परंतु ते कुठे मिळेल हे कोणालाही माहीत नाही. अश्या परीस्थितीत काय करावे. ?
एका कुटुंबामध्ये आपसी वाटणीने जमिनी तीन भाऊ व आई यांचे नांवे वाटणी फेरफाराने जमिन नावे झाल्या आहेत. त्यापैकी एक भाऊ मयत झाल्याने त्याच्या वाटणीच्या जमिनीमध्ये आई व पत्नी असे वारस दाखल झाले आहे. पंरतु आजरोजी आई मयत झाली आहे. तर मुलाच्या वाटणीच्या जमिनीत आई चे नांव कमी करुन आईचे वारस दाखल करावे अगर फक्त आईचेच नांव कमी करावे लागेल काय? अगर कसे व कोणत्या कायदयाने. कृपया मार्गदर्शन करावे.

Question by narshing
23-07-2015
narshingtugave@gmail.com

Sir Namaste
Maza asa prashn aahe ki Jr varsacha ferfar mndlatil yak sazet mnjur zalyas tyach mndlatil dusrya sazet mnjur ferfar vrun nond mnjur Krta yet ka ? Kontya niymanve mnjur Krta yet yabddl sanga

Question by samadhan
22-07-2015
iamsamg19@gmail.com

नमस्कार सर,
जुने (४० ते ५० वर्षे ) दत्तक विषयीचे दस्त रेकॉर्ड शोधायचे असतील तर शासनाच्या कोणत्या विभाग अथवा कार्यालयाकडे मिळतील.
दत्तक घेतलेल्या कुटुंबाच्या जमिनीचे वारस फेरफार नोंदीवरून काही माहिती मिळू शकेल का?
एका इसमाने आमच्या शेत जमिनीवर १/७ हिस्सा नोंद करून घेतला आहे.हा इसम माझे आजोबांचे अपत्यापैकी (४ मुले पैकी १ मुलगा दत्तक दिला गेला + ३ मुली) दत्तक दिला गेलेल्या मुलाचा मुलगा आहे.ज्या कुटुंबात दत्तक दिले गेले त्या कुटुंबाचे जमीन विकून टाकली आहे व आता आमच्या जमिनीवरपण हिस्सा लावला आहे. तरी कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.

Question by Vinayak patil
22-07-2015
rachnavinay123@gmail.com

Namaste Sir,

मी अलिबाग येथे राहत असून माझा प्रश्न खालील प्रमाणे.

माझ्या आजोबांची १०० गुंठे जमीन आहे. चार मुलांमध्ये सर्वसंमत्तीने खालील प्रमाणे वाटप झाले. वाटप रजिस्टर झाले आहे व सर्व भावंडांना मान्य आहे. सर्वांनी रजिश्टर ऑफिस मध्ये जाऊन सह्या केल्या आहेत.

अ (भाऊ) - २५ गुंठे + "५ गुंठे (घराची जागा )"
ब (भाऊ)- ३० गुंठे
क (बहिण) - २० गुंठे
ड (बहिण) - २० गुंठे

आता प्रश्न असा आहे कि दस्त नोंद करताना असे लक्ष्यात आले कि "अ" च्या वाट्याला आलेली "५ गुंठे (घराची जागा )" हीच उल्लेख वाटप पत्रात झाला नाही. सर्व भावंडे खूप दूर दूर अंतरावर राहत असल्यामुळे आम्ही तलाठी तसेच प्रांत अधिकारी यांस कडे उपाय मागितला त्यांनी सुचवलेला उपाय खालील प्रमाणे.

१) सदर वाटप पत्राची नोंद "५ गुंठे (घराची जागा )" सोडून वरील प्रमाणे होऊ शकते व ५ गुंठे जागा सामायिक चारही भावंडाच्या नावावर राहील.
२) ५ गुंठे (घराची जागा) :- हिस्सेदार "अ" ह्यांच्या नावावर करण्यासाठी वेगळे रजिश्टर (हक्कासोड पत्र ) करून, त्यावर सर्व भावंडांची सही घेता येऊ शकते.

माननीय साहेब,

वरील बाब लक्ष्यात घेता १ व २ हे समाधान बरोबर आहे का ?
भविष्यात हे वाटप कायद्यानुसार वैध मानले जाईल का ?

कृपया मार्गदर्शन करावे.

आपला विश्वासू,
विनायक पाटील.

Question by G.W sawale
22-07-2015
savalegaganan@gmail.com

सवॅप्रकारचयामहसु मागनया निशचित करने याचि माहिती
महोदय
आम्ही १९५५ पूर्वीचे संरक्षित कुळ आहे,आमचा तहसीलदार कार्यालय येथे “३२ग” दावा चालू असताना परराज्यस्थित मूळ मालकांचे वारसदार यांनी सदर जमिनीचे तिऱ्हाईत इसमास जमिनीची विक्री केली आहे,त्याचवेळी “कुलमुखत्यार पत्र” खरेदीदारास मूळ मालकांचे वारसदार यांनी करून दिले आहे, सदर “३२ग” चा दावा निकाल आमच्या नावे झाला असून निकालाची समज उभय पक्ष यांना देण्यात आली आहे, निकालाची समज “तिऱ्हाईत इसमास-खरेदीदार” यांना देण्यात आलेली नाही, खरेदीखताची नोंद हि मंडल अधिकारी यांनी फेटाळली असून तसा निकाल आम्हला मिळाला आहे.
“३२ग” दाव्याच्या निकालात मूळ मालकाने केलेळे खरेदीखत हे “कुळकायद्याचे कलम ८४ चे तरतुदीविरुद्ध बेकायदेशीर झाल्याचे दिसून येत आहे”.असे तहसीलदार यांनी निकालात नमूद केले आहे.
“३२ग” दाव्याची विहित निकालाची ६० दिवसाची मुदत संपल्यानंतर, ७ दिवसानंतर आम्ही तहसील कार्यालयात “३२म” प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला असता तो पर्यत कुठलेही अपील झाले नाही असे आम्हाला सांगण्यात आले आणि आमचा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी स्विकारण्यात आला असताना आम्हाला १५ दिवसानंतर अपील दाखल झाले आहे असे पत्र आले आहे, सदर अपील हे “तिऱ्हाईत इसम-खरेदीदार” यांनी “कुलमुखत्यार पत्र” धारक असल्यामुळे केले आहे,परंतु मूळ मालकांच्या वारसदाराने खरेदीखत करून देताना सदर क्षेत्राचा “हक्क” खरेदीदार इसमास खरेदीखताद्वारे दिल्यावर त्याच क्षेत्राचे “कुलमुखत्यार पत्र” त्याच “इसमास-खरेदीदार” यास करून दिले आहे, हे “कुलमुखत्यार पत्र”बेकायदेशीर आहे असे मला वाटत आहे त्यामुळे हे अपील महुसुल नियम प्रमाणे नाही असे वाटते आहे तरी, या अपिलाचा जो पर्यत निकाल लागत नाही तो पर्यंत आम्हाला “३२म” प्रमाणपत्र मिळणार आहे/अथवा नाही, तसेच अपील फेटाळण्यासाठी कुठली कागदपत्रे सादर करावी,पुढे आम्ही काय करावे याचे मार्गदर्शन कृपया करावे
३२ ग दावा निकाल आपले बाजूने लागला आहे . त्या विरुद्ध , कुल मुक्त्यारीने अपील केले आहे . अपील मध्ये , प्रांत अधिकारी यांनी स्थगिती आदेश दिला नसेल तर , आपणास ३२ म प्रमाणपत्र मिळणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

प्रति,
श्री. किरण पाणबुडे

धन्यवाद साहेब, मी दि. १७/७/२०१५ रोजी विचारलेल्या प्रश्न्या चे उत्तर दिल्या बद्दल.

१. घरा संबधित माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकारात कोणाकडे अर्ज करू. (तलाठी कि तहसीलदार कार्यालय)
२. तालुका लोकशाही दिनी अर्ज करा - म्हणजे काय ते समजले नाही?

धन्यवाद!

Question by Sanchita More
21-07-2015
sanchitamore56@gmail.com

माननीय किरण पाणबुडे सर

माझे जुने नाव संगीता असे होते ते बदलून मी संचिता असे केले आहे व त्याबाबत मी शासन राजपत्रामध्ये सूचना प्रसिद्ध केली होती व सदर राजपत्र मला प्राप्त झाले आहे.
1. मी माझे बॅकेच्या खात्यामधील माझे नाव संगीता ऐवजी संचीता असे बदलण्यासाठी अर्ज दाखल केला होता पण तो त्यांनी स्वीकारला नाही अर्जासोबत मी राजपत्र सादर करून सुध्दा त्यांनी माझ्या नावात बदल केला नाही तरी मी काय करावे.
2. मी सदर राजपत्राच्या सहाय्याने माझे आधार कार्ड मधील व रेशनकार्ड मधील नाव दुरूस्त करू शकते का.
3. शाळेच्या दाखल्यावर माझे नाव संगीता असे आहे आता ते मी बदलविल्यामुळे मला भविष्यात कोणती अडचण येणार नाही ना.

आपण मला योग्य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
आमचे चुलत काका आणि त्यांचे पूर्ण कुटुंब आम्हाला हक्क सोड पत्र देण्यासाठी तयार आहेत पण आमची जमीन सामायिक आहे आणि घर हे आजीचा नावावर असून ती मयत आहे तसेच या सामायिक जमिनीमध्ये पूर्वीपासूनची सर्वाची नावे आहेत .
तर हक्क सोड पत्र कोणाच्या नावाने देले पाहिजे किवा हक्क सोड पत्रासाठी कोणत्या गोष्टीची गरज आहे .
हक्क्सोद्पात्र नोंद्निद्कृत हवे
सह्धारक असावा

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

सर
बेकायदेशिर अकृशक आदेशाच्या नोंदी बाबत ऊपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपिल चालू आहे , सदर आदेशातील काही भूखंडधारक वरिल वस्तूस्थिती माहीत असतानाही सदर भूखंडाची बेकायदेशिरपने खरेदी- विक्री करतात, सदर भूखंडात बेकायदेशिर पने बांधकामे करतात अशी वस्तूस्थिती असताना...........
मला खालील प्रश्नांची ऊत्तरे हवी आहेत
१. सदर वादातील अकृशक भूखंडामध्ये कोनतीही बाधंकामे न करनेबाबत. व सदर भूखंडांची खरेदी विक्री नकरनेबाबत प्रांत साहेब स्टे आडर देतील का? सदर प्रकरनाबाबत स्टे आडर कोन देऊ शकतील ?
२ स्टे आडर देन्याचा कोनाला-कोनाला अधिकार आहे

Question by samadhan
20-07-2015
iamsamg19@gmail.com

नमस्कार सर,
जुने (४० ते ५० वर्षे ) दत्तक विषयीचे दस्त रेकॉर्ड शोधायचे असतील तर शासनाच्या कोणत्या विभाग अथवा कार्यालयाकडे मिळतील.
दत्तक घेतलेल्या कुटुंबाच्या जमिनीचे वारस फेरफार नोंदीवरून काही माहिती मिळू शकेल का?
नमस्कार सर,
माझ्या वडिलांनी स्वत शेत घेतले विकत आहे. वडील मरण पावले त्यांचे माझी आई , चार मोठे मुले त्यापैकी एक मुलगा मरण पावला आहे . मरण पावलेला मुलाचे पतनि व दोन मोठे मुले आहे. मी चार मुलापैक्य असून माझा नावाने ७/१२ नोदनि कराची आहे त्य्कारिता मुंद्राक शुल्क
लागते काय ? तसेच नोटरी केली तर चलते काय? वरील वारसदार कोणकोण आहे? कुपया माहिती द्यावी. हि विनंती
आपले वडिलांचे पशचात , आई , आपण चार भाऊ ( एक भाऊ मयत असल्यास , त्याची पत्नी/मुले यांना सर्वांना भावाचा १/५ हिस्सा ) असे वारस आहात .
त्यामुळे आपणास १/५ मिळकतीचा हिस्सा मिळेल . त्यासाठी मुन्द्रंक शुल्क भरण्याची गरज नाही .
मात्र आपल्या तीन भावांची मिळकत हि आपले नावावर करण्यासाठी , त्यांनी हक्क सोड पत्रक करून दिले पाहिजे .
हक्क सोड पत्रक नोब्दानी करणे आवश्यक . तसेच आपल्याला मुन्द्रंक शुल्क भरावा लागेल . नोटरी केलेल्या दस्तावरून , अधिकार अभिलेख सादरी आपले नाव लागणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद आपण दिलेल्या माहितीप्रमाणे ताबे साठेखाताची नोंद ईतर अधिकारात घेता येत नाही परंतु अशी नोंद घेतली गेली असल्यास काय करावे याबाबत आपण माहिती सविस्तर माहिती द्यावी
प्रांत अधिकारी यांचे कडे अपील करा व नोंद कमी करून मिळण्याची मागणी करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.26 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3433
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3