जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

सर्व महसूल अधिकारी वर्गाला दिवाळीच्या हार्दिक शुभेछया
माझ्या ०३.११.१५ प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल श्री पाणबुडे साहेबाना मनापासून धन्यवाद,
सर मला १) माझ्या आई कडे असलेले क्षेत्र कसे घेता येईल(बक्षीस पत्राने कि खरेदीने )किवा कुटल्या मार्गाने व त्याला भावाची संमती लागेल का? तलाठी साहेब म्हणतात कलम ८५ खाली घ्या ते शक्क आहे का?(वडिलाकडून व माज्याकडून भावाने वहीती जमीन जास्त घेतलेली
आहे मला माळरान धीलेले
आहे) २)पोट हिस्स्याची मोजणी लगेच करावी का? किंवा आईची जमिनीला माझे
नाव लागे पर्यंत थांबावे.३)घरासाठी बक्षिसपत्र होईल का, मी उपनिबंधक साहेबाकडे घरच ८ चा उतारा घेऊन गेलो होतो परंतु ते म्हणाले त्याचे इथे काहीही करता येणार नाही कारण घराखालची
जमीन तुमच्या नावे आहे व घर शेतजमिनीत आहे ते जर
बिगरशेती असते तर जमले असते.आपण ग्रामसेवक यांचे कडे जावे. तरी सर काही मार्ग आहे का?
४) आईच्या जमिनीला भाऊ च्यालेंज करू शकतो का?
(भाऊ व वहिनी खूप त्रास देतात आईला व वडिलांना)
आपलेकडे DUAL OWNERSHIP हि संकल्पना आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

उप निबंडक यांनी , आपले दस्त नोंदणीकृत करणे आवश्यक आहे . जर ते दस्त नोंदीकृत करून देत नसतील तर , त्यांना तसे लेखी द्यावे असे त्यांना सांगा
त्यांनी दिलेले उत्तराविरूढ , अपील दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मला एका ठिकाणी जमीन खरेदी करावयाची आहे. त्यासाठी ३० वर्षापासून सर्व फेराफार नोंदी तपासून घावायाच्या आहे ते बघण्यासाठी कोणत्या अधिकारीकडे जावे लागेल. ती जमीन त्या माणसाच्या नावावर कशी झाली. या बाबतीची खात्री कोणाकडे करता यईल. जमिनीमध्ये नाव न नोंदविलेले परंतु जमिनीत हिस्सा मागू शकतील असे काही कायदेशीर हिस्सेदार कसे शोधावे. जमिनीच्या इतर हक्का मध्ये बँकेचा किंव्हा अन्य वित्तीय संस्थेचा बोजा आहे काय? हे कसे शोधावे . खरेदीच्या व्यवहारामुळे प्रस्थापित कोणकोणत्या कायद्याचा भंग होतो का? हे कसे शोधावे कोणत्या अधिकार्यांकडे जावे लागेल या बाबत उचित मार्गदर्शन व्हावे हि विनंती.
What you are asking is a title search report of the property .
You need to visit the office of Sub Registrar ( Assurance/Registration ) . Search the register of the past transaction.
beside that give public notice inviting if any one have objection .
as suggested in earlier reply , local lawyer can do all this

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

शोध अहवाल स्थानिक वकील कडून देतील

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

आदरणीय श्री.शेखर गायकवाड साहेब, श्री.प्रल्हाद कचरे साहेब, श्री.किरण पाणबुडे साहेब, श्री.चंद्रकांत पूलकुंदवार साहेब, श्री.डुबे पाटील साहेब, श्री.व्ही . आर. थोरवे साहेब, श्री.संजय भागवत साहेब, श्री.श्रीधर जोशी साहेब, श्री.तरुण खत्री साहेब, श्री.कामराज चौधरी साहेब, श्री.शशिकांत जाधव साहेब, श्री. कुंडेटकर संजय साहेब, श्री.मगर विनायक साहेब, मोहसीन शेख साहेब व इतर महाराष्ट्र सिविल सर्व्हिस संकेत स्थळावरील महसुल अधिकारी,
सर्वाना दिवाळीच्या शुभेछ्या !
महसूल संवार्गातर्फे आपले आभार

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

८ एकरच्या वरी जमींन असेल तर त्याचा हककसोड होतो का?
उदा.१२ आणि १३ असे दोन गट नंबर आहे.त्यांचे एकूण क्षेत्र ६.८६ आहे.गट नंबर १२ वरुन सहा व्यक्तीचे व् गट नंबर13वरुण सहा व्यक्तीचे हककसोड करुण घ्यायचे आहे.तर हककसोड होउ शकतो का?
हक्क सोड पत्रामुळे , महाराष्ट्र तुक्देबंदी व तुकडे जोड कायद्याचा भंग होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

वन हक्काने मिळालेली जमिन आहे.इतर अधिकार मधे तसि नोंद पण झाली आहे.परंतु ८ अ अजुन बनला नाही.८अ तयार करुण घ्या साठी काय कराव लागेल?
मंडळ अधिकारी यांना भेटाव तसा अर्ज करा ................काम झाले नाहीतर तहसीलदार यांना अर्ज करा

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

तलाठी यांनी राजीनामा दिला आहे . तलाठी हे एक वर्षापासून परवानगी न घेता गैरहजर आहेत . तर राजीनामा मंजूर करता येईल का ? कोणत्या नियम आधारे ? कृपया मार्गदर्शन व्हावे .
माझ्या वडिलांनी आमची वडिलोपार्जित शेतीची कौटुंबिक वाटणी करून दिलेली आहे (भाऊ आणि मी) परंतु भावांनी त्याच्या हिस्स्यात नवीन घर बांधून त्याची नोंद ग्रामपंचायत ला केलेली आहे,परंतु वडिलांचे घर(शेतजमिनीवरील)
मला आलेले आहे(वडिलांच्या नावावर जमीन अजिबात नाही घराच्या खालील जमीन माझ्या नावावर आहे),त्याची नोंद अजून वडिलांच्या नावावर आहे ते माझ्या नावावर नोंद करायची आहे त्यासाठी काय करावे लागेल ,वडिलांनी अर्ज केला होता,त्याला भावाची सहमती होती परंतु ग्रामसेवक यांनी सांगितले आहे असे करता येणार नाही,आणि मी घराचा नमुना ८ घेऊन
उप निबंधक साहेबाकडे गेलो होतो तर त्यांनी सांगितले कि
तुमची जमीन हि बिगरशेती नाही त्यामुळे ,ते काम ग्रामसेवक यांच्याकडूनच करावे लागेल ,तरी आपण मला
मार्ग सांगावा.
धन्यवाद
खुल्या प्रवर्गातील महिला कर्मचारी (वर्ग 3) यांची निवड नंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्ग २ च्या पदावर झाली आहे. त्यानंतर सदर महिलेने ३०% महिला आरक्षणाचा दाखला मिळावा म्हणून तहसीलदार कार्यालयात अर्ज केला आहे. परंतु, पती पत्नीचे एकूण उत्पन्न ५ लाखांपेक्षा जास्त आहे. तरी, सदर व्यक्ती ३०% महिला आरक्षणासाठी पात्र ठरते का ?
पत्नीच्या वदिलांचे उत्पन्न गृहीत धरले जाईल.........

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

प्रश्न:सर्वोच्छ न्यायालयाने नुकताच असा निर्णय दिला की,सन 2005 पूर्वी जर वडीलांचा मूर्त्यू झाला असेल तर मुलींना वडीलोपार्जीत संपत्तीमध्ये वाटा मिळणार नाही;या निर्णयाची काॅपी/प्रत कोठे मिळेल,वेबसाईट व ईतर माहीती कृपया कळविण्याची तसदी घ्यावी ही नम्र विनंती.माहीती दिल्यास सर्वांना उपयोग होईल.धन्यवाद
न्यायालयीन निर्णय सदरी, मा. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय upload करण्यात आला आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय श्री. मगर भाऊसाहेब मी दि. ३१/१०/२०१५ रोजी माझा प्रश्न मांडला होता. त्यास आपण प्रतिसाद दिलेला असून मला दिलेले उत्तर समजले नाही. मी पुन्हा माझा प्रश्न मांडतो कि, वडिलांनी वडिलोपार्जीत जमिनीचे मृतुपत्र केले आहे. त्यात त्यांनी फक्त मुलांना जमिनी मध्ये हिस्से दिले असून, मुलीना काहीच जमीन हिस्से दिले नाही. वडिलांचे निधन झाले असून मुलांना मृतुपत्र प्रमाणे वाटणी करावयाची आहे परंतु वडिलांच्या मुलींची ७/१२ वर वारस नोंद झाली आहे. आता मुलांना वाटणी करताना त्यांच्या बहिणीचे हक्क सोडपत्र घ्यावे लागेल का ? या बाबत मार्गदर्शन द्यावे हि विनंती.
होय.नोंदणीकृत हक्कासोद्पात्र करावे lagel

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

सर्वाना दिवाळीच्या शुभेछा

भोगवटदार वर्ग 1 नविन शर्त च्या जमिनिवर राष्ट्रीयकृत बँक कडून कृषि कर्ज व इतर कर्ज मिळते का?

क़र्ज थकित झाल्यास बँक लिलाव करून सदर जमिन हस्तांतरित करू शकते का?

संबंधित शासन निर्णय वा नियम/कायदा कोणता
१. होय
२. होय
३. जमिनीचे विक्री वर निर्बंध असेल तर , बँक सक्षम अधिकारी यांची परवानगीचा कर्ज देण्या पूर्वी अग्ग्रह धरतात
बँकेचे देणे थकल्यास , बँक कर्ज रक्कम वसुलीसाठी , जमिनीची विक्री करते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार माझा प्रश्न असा आहे की, बिनशेती करताना बाजुच्या शेतकर्यांनी बिनशेती साठी तहसिलदार यांचेसमोर समंतीपत्र करून दिलेले आहे पण संमती दिल्यानंतर एका शेतकर्याने बिनशेती करण्यास हरकत घेतली आहे तसा अर्ज त्याने प्रांत अधिकारी यांचेकडे केला आहे त्यामुळे सदर प्रकरणी प्रांत अधिकारी कुठलीही कार्यवाही करताना दिसत नाहीत सदर बिनशेती हि शैक्षणीक कारणाने असल्याने काय उपाय योजना करावी लागेल सविस्तर मार्गदर्शन व्हावे हि विनंती
बिन शेती करण्यासाठी , बाजूचे शेतकर्याची साम्म्मातीची आवश्यकता नाही . तथापि , मिळकतीत जाण्यासाठी रस्ता असणे आवश्यक आहे .
आपण रस्त्या बाबत बाजूचे शेतकर्याचे संमती बाबत कथन करत असाल तर , ज्या शेतकर्याने हरकत घेतली आहे , त्याने आपणास त्याचे मिळकतीतून आपलमिळकतीत जानेसाठी रस्ता देणे आवश्यक .
जर रस्त्या बाबत संमती देत नसेल तर , त्यास compel करता येत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by bhrat borude
03-11-2015
bharatborude69@gmail.com

माझ्या आजोबांची व वडिलांची शेतजमीन १४.६५ हे होती, परंतु २/४१९९० मध्ये आजोबांनी व वडिलांनी तलाठी दफ्तरी अर्ज केला कि आमच्या वयो मानानुसार आमची जमिनीची देखभाल होत नाही म्हणून जमीन आमच्या मुले,सून ,नातू यांचे नावें करण्यात यावी नंतर तलाठी साहेबांनी खाते फोड केली (फेरफार नोंद-अर्जावरून व जंगल वहिवाटवरून नोंद केली)
१.सावत्र (मोठा)भाऊ २.० हे +पो ख १.१४ हे
२. सावत्र (मोठा)भावाची बायको २.० हे +पो ख १.१४ हे
३.मी स्वत(अ प क माझीआई):२.० हे +पो ख १.१४ हे
४.माझी आई १.० हे
५.आमचे वडील १.९९ हे +पो ख१.१६ हे
६. आमची आत्या १.०८ हे
असे विभागले असून नंतर आजोबा २.११.१९९० ला वारले नंतर वडिलांनी २००४ ला तलाठी दफ्तरी अर्ज केला कि माझ्या नावावर असलेले क्षेत्र पत्नीच्या नावें करण्यात यावे(फेरफार नोंद- तहसीलदार वाटप रजिस्टर २४८/२००४ प्रमाणे नोंद मंजूर) आता आईच्या नावावर २.९९+१.१६,माझ्या २.०+१.१४,भाऊ २.०+१.१४,वाहिनी २.०+१.१४,आत्या १.०८,असे क्षेत्र असून माझ्या वाट्यास कमी क्षेत्र आले आहे.
कब्जे वहिवाट प्रमाणे भावाकडे त्याचे व वाहिनीचे क्षेत्र(जमीन)त्याच्याकडे आहे व आईचे,आत्याचे व माझे क्षेत्र (जमीन)माझ्याकडे(आई,वडील व मी एकत्र राहतो)आहे,भाऊ विभक्त राहतो १९९० पासून.माझ्या वडिलांना पहिल्या पत्नीपासून
१ मुलगा
३ मुली आहेत
(पत्नी वारली आहे ~१९७०)नंतर माझ्या आई शी विवाह झालेला आहे ,एक मुलगा(मी) व २ बहिणी आहेत
माझा प्रश्न तुम्हाला असा आहे
१) आमची ७/१२ ,८ अ ला नोंद आहे परंतु भूमिअभिलेख ला नाही ,२०१४ लि मी पूर्ण गट मोजणी करून घेतलेली(भूमिअभिलेख) आहे
२) मला माझे क्षेत्र कसे घेता येईल (आई देण्यास तयार आहे परंतु भावाची संमती
लागेल का)
३) भाऊ आत्याची जमीन आत्या कडून(फसवणूक
करून) घेण्याच्या तयारीत आहे व मला कब्जा मागत आहे
.(आत्याला कोणीही वारस नाही)
५)भावाने त्याच्या हिश्यात नवीन घर बांधून त्याची नोंद ग्रामपंचायत
ला केलेली आहे माझ्या हिस्शात जुने घर वडिलांचे नावें आहे परंतु ते मोडकळीस आल्याने मी शेजारीच दुसरे नावें
घर बांधले आहे तेथे आई वडील राहतात मी नोकरी निमित दुसऱ्या गावी आहे,मला वडिलांचे नाव कमी करून माझे
नाव ग्रामपंचायत ला लावता येते का? ते कसे.
१.आपण मोजणीसाठी भूमी अभिलेख खात्याकडे अर्ज करा . मोजणी अंती वाहिवती प्रमाणे , भूमी अभिलेख येथे क्षेत्राची नोंद होईल
२. आत्या तिचे नावाची जमीन , आपले नावावर करून देण्यास तयार असल्यास , आपण तिचे कडून बक्शिश पत्र करून घ्या
३. आपणास कमी शेत्र आले आहे असे म्हणता येणार नाही
४. घराबाबत , आपण वादिलाकडून बक्षीस पत्र घेऊन , त्यास आपले नाव लाऊ शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by J. P. Bhopale
03-11-2015
medsto.darwha@gmail.com

मला माझ्या ७/१२ मध्ये भावाचे नाव टाकावयाचे होते आम्ही एकत्र कुटुंबात राहणारे असल्यामुळे तेव्हा आमच्या वडिलांनी माझ्या नावे शेत घेतले होते त्यामुळे मी शासकीय नियमानुसार चालान भरून माझ्या अर्ध्या शेती वरचा हक्क सोडून दुय्यम निबंधक कडे रजिस्टर केले व जमिनीचा तुकडा न पाडता सामाईक वाहितीत नोंदणी केली माझे काही चुकले का / चुकीची दुरुस्ती कशी करू
स्वतंत्र ७/१२ असला म्हणजे तुकडे निर्माण होतो असा नाही
उदा . आपले नावावर २५ गुंठे वर्कस क्षेत्र आहे . त्या पैकी अर्धे क्षेत्र आपण , भावाचे नावावर केले आहे
म्हणजे अप्क्ले नावावर १२.५ गुंठे व भाव्वाचे नावावर १२.५ गुंठे
जरी आपले डोंघांची नवे ७/१२ वर सह धारक म्हणून असली तर त्या मुळे तुकडा निर्माण झाला आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आपल्या रक्ताच्या नातेवाईकाला स्थावर मालमत्तेची मालकी हस्तांतर करतांना आता स्टम्पशुल्क द्यावे लागणार नाही असा जी .आर निघाला आहे काय ?
सर्व मुद्रांक शुल्क माफ केले नाही ... कायद्यातील नाते असेल तर २०० भरावे लागतात....इतरांना पूर्ण मुद्रांक शुल्क भरावे लागते .

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

२४ एप्रिल २०१५ रोजी मुद्रांक शुल्क कायद्यात तसा बदल केला आहे , पण तो ठराविक नात्यानाच आहे याची कृपया नोंद घ्यावी.

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

Question by राहुल
02-11-2015
rahhul_111@yahoo.com

अतिरिक्त कार्यभार देल्यास आणि तो आपल्याला नको असेल तर त्यासाठी महाराष्ट्र सेवा नियमात कोणती तरतूद केलेली आहे व तो नाकारल्यास होणारी कारवाई काय आहे
आपणास अतिरिक्त कार्यभार नाकर्त येणार नाही
नाकारल्यास , शिस्तभंग कारवाई होईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार
१९७४ चा जमिनीसंबधित फेर फार वर लबाडीने मुळ मालकाची नावे बदली करून दुसऱ्याची नावे तलाढ्यानी करून आज त्या जमिनीवर त्यांच्या वारसांची नावे आहेत तरी त्या जमिनीवर मुळ मालकांच्या वारसांची नावे करू शकतो का? माझे वय ४० आहे तरी अपिल कुढे व कसा करावा
आपले प्रांत अधिकारी यांचे कडे अपील दाखल करा .
अपील दाखल करण्यास झालेलेल्या विलंब बाबत सबळ कारण दया

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

वडिलांचे वडिलोपार्जित जमिनीचे मृतुपत्र असून त्यात त्यांनी मुलीना जमिनी मध्ये काहीही हिस्सा दिलेला नाही. परंतु त्यांची नावे ७/१२ वरती वारस नोंद लागली आहे. मृतुपत्र प्रमाणे वाटणी करताना बहिणीचे हक्क सोड पत्र घ्यावे लागेल का ? किंवा बहिणींनी हक्क सोड पत्र नाही दिले तर चालेल का.
मालमत्ता हस्तांतरण कायद्या नुसार केवळ आपल्या हिस्स्या इतक्या वाट्या चे मृत्यूपत्र करता येयील.हक्क्सोद्पात्र करावे लागेल.

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

माझ्या वडिलांच्या मुत्यूनंतर वारस तपासानुसार सात बारामध्ये नाव टाकण्यासाठी अर्ज करताना कोणकोणत्या माझ्या वडिलांच्या मुत्यूनंतर वारस तपासानुसार सात बारामध्ये नाव टाकण्यासाठी अर्ज करताना कोणकोणत्या ( आईच्या नावाचे प्रतिज्ञापत्र (100 च्या बाँडवरती). इतर वारसांची ओळखपत्रे, सरपंच पोलीस पाटिल दाखले , मुत्यू दाखला आदि पैकी कोणती कागदपत्रे तसेच दाखल्यांची निकट आवश्यकता असते. आणि जर का पोलीस पाटिल तसेस सरपंच दाखला देण्यासाठी वेळ काढूपणा करत तसेच नाही देत असतील काय करावे. कुठे तक्रार करावी.
कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाही . आपणास फक्त वडिलांचा मृत्य दाखला, अर्ज समवेत जोडावा लागेल

तलाठी स्थानिक चौकशी करून , वारस पंचनामा करतात .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

कुळवहीवाट शेतजमीन ४३ ची विक्री परवानगीसाठी ४० पट नजराणा रक्कम भरली असता सदर जमिनीवर निसप्र ची नोंद राहते का?
आदरणीय सर,अ व्यक्ती १९३० पूर्वी मयत झाल्यास सदर व्यक्तीस मुले नव्हती.3 मुली होत्या.पत्नीही पूर्वीच मयत झाल्याने ७/१२ च्या कब्जेदार सदरी १९३० सालच्या उताऱ्यास फक्त एका मुलीचे नाव असून अपाक.म्हणून चुलत्याचे नाव आहे.आज रोजी सदर जमीन तिऱ्हाईत व्यक्तीच्या नावे असल्यास वारसा हक्काच्या अधिनियम २००५ नुसार १९३० सालातील मुलीच्या वारसांना आता सदर जमिनीत हक्क सांगून हिस्सा मागता येईल का?त्यासाठी काय करावे लागेल ?
हिंदू वारसा कायदा १९५६ , अमलात येणे पूर्वी , मुलीना मिळकतीत हिस्सा नव्हता
माझे मते , हक्क मागता येणार नाही
तज्ञाचे अभिप्राय घ्यावेत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

७/१२ सदरील इतर हक्कात बंडिंग तगाई असा शेरा दाखल असल्यास तो कमी करणेबाबत कोठे अर्ज करावा?त्याबाबत शासन निर्णय असल्यास कृपया मार्गदर्शन होनेस विनंती.
तगाई पूर्वीच माफ झालेली आहे . कृपया तहसील कार्यालयात संपर्क साधा . किंवा तगाई हि हजार रुपयेच्या वर सहसा नसते , जी असेल ती भरा व शेरा काढून घ्या.

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

Question by Mahesh More
31-10-2015
mr.moremahesh@gmail.com

सर , ७/१२ उताऱ्यावर पोटखराब जमीन लावलेली नाही तर पोटखराबा लावता येतो का ? जमिन वडिलोप्राजित आहे व शेजारी डोंगर आहे
पोट खराबा , लागवडी लायक झाले वर त्या प्रमाणे , क्षेत्र दुरुस्ती करता येते
मात्र मुल जमाबंदी मध्ये न लावलेला , पोट खराबा , ७/१२ सादरी लावणे बाबत तरतूद नसावी
अर्ज करावा . जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

औद्योगिक क्षेत्रात शेतकऱ्यांच्या जागेत निवासी इमारती बांधावयाच्या असल्यास कोणाची परवानगी लागेल?त्याबाबत काय करावे लागेल?कृपया मार्गदर्शन होनेस विनंती.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांची परवानगी घेणे आवश्यक .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर मला काही प्रश्न आहेत जे तुम्हाला विचारायचे आहेत जर जमीन मालक हा मृतू झाला असेल आणि त्याची जमीन हि नावावर केलेली नसेल आणि त्याच्या मृतुनंतर जर त्याची वाटणी झाली तर त्याचा वाटणी चा हिस्सा हा त्याचा वारसाला मिळाला आणि त्या वारसांनी जर ती जमीन दुसर्या ला विकली तर त्या जमीन खरेदी करणाऱ्या वक्तीला खरेदी खात बनवताना त्या वारसाचा वडिलांचे मृतूचा दाखला द्यावा लागतो का आणि तो जर नाही दिला तर खरेदी खात बनू शकते का आणि जर मृतूचा दाख्लायाशिवाय खरेदी खात बनवले तर काय होऊ शकते मला या प्रश्नाचे उत्तर द्यावे हि आपल्या कडे विनंती
जमीन मालक मयत झाला आहे . वारस यांची नवे ७/१२ सादरी दाखल आहेत . त्या मुले वारसांकडून जमीन खरेदी करण्यासाठी , मुल मालकाचे मृत्य दाखल्याची आवश्यकता नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.40 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3