जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

फक्त स्वकष्टित मिळकतीचे मृतुपत्र करता येते कि? वडिलोपार्जित व स्वकष्टित मिळकतीचे दोन्हीचे मृतुपत्र तयार करता येते ?
donhiche करता येयील.परंतु वडिलोपार्जित एस्तते मध्ये जितका share असेल त्या शहरे तितकेच भाग purta

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

donhiche करता येयील.परंतु वडिलोपार्जित एस्तते मध्ये जितका share असेल त्या शहरे तितकेच भाग purta

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

वडिलोपार्जित मिळकती मधील अविभक्त हिस्सा मृतुपत्राने तबदील करता येतो का ? मिळकती मधील अविभक्त हिस्सा व पोटाहीस्सा म्हणजे काय ?
सर,
आमची जमीन १८ गुंते आहे. माझा एक प्रश्न आहे के जमीन नावावर करण्यासाटी ७/१२ ची गरज लागते का? कारण आमच्या जमिनीवर तुकड्या विरोधी कायदा असा उल्लेख आहे म्हणून. जमीन नावावर करण्यासाटी कोणाला भेटायला लागेल ? आणि खरेदी खात कुटे बनवून मिळेल. खरेदी खात मुंबई ला बनवून गावी सदर केंल तर चालत का? खरेदी खत करताना दोन्ही बाजुकाडाचे आसने जरुरीचे आहे का?
१) होय
२) दुय्यम निबंधक कार्यालय
३)होय
४)होय

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

सर मला खरवते तालुका चिपळूण येथील कृषी सहायक यांची ऑफिस मधून त्यांच्या मस्टर ची माहिती/ त्यांनी घेतलेल्या रजा, त्यांची झालेली सेर्विचे, त्यांचावर असलेल्या काही तक्रारी, त्यांना बाहेरील असणार्या कामाचा भत्ता , त्यांच्या झालेल्या बदल्या व त्याचा कालावधी ई. माहिती माहितीच्या अधिकारात कृषी अधिकारी चिपळूण यांचाकडे मागवली तर चालेल का ? नाहीतर कानाकडे व कशी मागवावी ?.
दुसर्‍याची वैयक्तीक माहिती मिळणार नाही

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

मा. महोदय,
माझ्या मागील प्रश्नास उत्तर दिल्या बद्दल धन्यवाद. माझे गावातील घर हे गावाच्या मध्य भागात आहे. मला घराचा व् लागूं असलेल्या जागेचा सर्वे करायचा झाल्यास कोणकोणती कागतपत्रे जमवायला लागतील. कृपया मार्गदर्शन करावे.
घराखालील जमीनीचा उतारा आणि रिकाम्या जागेचा ७/१२/ प्रॉर्पर्टी कर्ड सह भुमी अभिलेख कार्यालयास भेट द्या

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

एखाद्या व्यक्तीला शेतजमिन विकत घ्यायची असून सदर व्यक्तीच्या नावे मालकीची इतर कुठेही जमीन नाही. तर त्या व्यक्तीला शेतजमीन विकत घेण्यासाठी शेतकरी दाखल्याची आवश्यकता आहे की नाही ? आणि सदर दाखल्याची आवश्यकता असल्यास कोणती कागदपत्रे सादर करावी लागतील ?
तसेच, एखादी त्रयस्थ व्यक्ती त्या व्यक्तीला बक्षिसपत्राने जमीन नावे करुन देऊ शकते का ? असल्यास, त्या बाबत मागदर्शन मिळणेस विनंती आहे.
मुंबई कुल वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ च्या कलम ६३ , अन्वये शेतजमीन खरेदी करण्यासाठी , व्यक्ती शेतकरी असणे आवश्यक .
शेतकरी दाखला, हा ती व्यक्ती सावाताचे मालकाची जमीन कसत असेल तर मिळतो
१. ७/१२ उतारा
२. ८ आ उतारा
३. तलाठी अह्व्हाल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Sir,
आम्ही सन २००६ मध्ये आसुर्डे चिपळूण येथे जमीन विकत घेतली . ती जमीन आता नावावर करायची आहे त्यासाटी कोणते कागद पत्र लागतील आणि जमीन नावावर करायची पद्धत काय आहे ते जरा सांगा . जेणे करून जमीन नावावर करायला कोणताही त्रास होणार नाही . सर एक , जी जमीन घेतली त्या 7/12 असे लिहिले आहे कि तुकड्या विरोधी कायदा . त्यामुळे काही प्रोब्लेम होयल का ते पण सांगा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पाहत आहे. लवकरात लवकर उत्तराची उपेक्षा आहे.
महाराष्ट्र तुक्देबंदी व जोड कायदा कलम , ८ , ८अ प्रमाणे , प्रमाणभूत क्षेत्र पेक्षा कमी शेत्राची विक्री करता येत नाही
बागायत - ५ गुंठे
एकपिकी - १५ गुंठे
वर्कस - २० गुंठे
विक्रीमुले , मुल क्षेत्राची , विभागणी होऊन , प्रमाणभूतक्षेत्र पेक्षाकमी क्षेत्र निर्माण झाले तर त्यास , तुकडा निर्माणझाला असे सभोडले जाते .
आपला व्यवहार या सदरातील आहे
या कायद्याच्या कलम ९ प्रमाणे, अशी जमीन , शासनाचे मालकीची होते वअसते .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार,

प्रश्न : सात बारामधून कुटुंबा बाहेरील व्यक्तीचे नाव कमी करावयाचे आहे. माहिती खालील प्रमाणे आहे.

सात बारा मधील कुटुंबा बाहेरील व्यक्तीचे निधन झालेले आहे तसेच वारस तपास पूर्ण झालेला आहे आणि ज्याचे नाव कमी करावयाचे आहे त्यांच्या कुटुंबाची काही हरकत नाही आहे. तसेच मयत व्यक्तीची पत्नी , त्यांची मुले आणि त्यांच्या पत्नी जमिनीवरील हक्क सोडण्यास तयार आहेत. तर काय करणे उचित ठरेल. हक्क सोड पत्र का बक्षीस पत्र ? त्याची प्रक्रिया काय आहे ? का अजून काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल काय ? हक्क सोड पत्र किंवा बक्षीस पत्र कुठे व कसे करावे ? त्याचे मुद्रांक शुल्क किंवा अजून कुठले शुल्क असेते का ? जर ती जमीन अविकसित किंवा पड जमीन असेल तर एकरी काय शुल्क असेल. कृपया मार्गदर्शन करावे.
हक्क सोड पत्र करावे
जमीन ज्या ठिकाणी आहे , त्या तालुक्याचे दुय्यम निबंडक कार्यालयात , आपणास हक्क सोडपत्रकरता येयील
नोंदणी व मुंद्रंक शुल्क माहिती तेथे मिळेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by जयसिंग
16-10-2015
jaybanne@gmail.com

सावत्र भावामध्ये वडिलोपार्जित जमिनीचे वाटणी / हिस्सा कसा केला जातो .
हिंदू विवाह कायदा नुसार , सावत्र भाऊ अथवा , दुसर्या पत्नीचे मुलास , वडिलांचे मिळकतीत हिस्सा आहे .
कलम 16

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

शशिकांत सुबराव जाधव सर आपल्या उत्तराबद्दल खूप आभारी आहे. सर आपण जसे आपल्या उत्तरा मध्ये विचारले आहे त्या प्रमाणे १) अतिक्रमित जागेचे रस्त्याच्या मध्यापासून अंतर ६० फुट आहे २) जागेसामोरील रस्ता हा राज्य मार्ग आहे ३) सध्या जमिनीचा ७/१२ उतारा महाराष्ट्र शासन या नावाने निघतो ४) शहराची कुठलीही विकास योजना मंजूर नाही. तरी हे माझे अतिक्रमित जागेवरील दुकान नियमित होऊ शकते का . मार्गदर्शन करावे हि विनंती.
सर्व महिती पाहता आपण शासकीय जमीनीवर अतिक्रमण केले आहात, याबबत कधीपासुन अतिक्रमण केला आहे तेव्हा पासुन आजपर्यत दंड भरावे लागेल आणि त्यानंतर सदर अतिक्रमण नियमानुकुल करणेसाठी प्रकरण तहसील कार्यालयामार्फत मा. जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करावे.

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

आदरणीय सर,७/१२ सदरील इतर अहस्तांतरनीय शर्त असा शेरा दाखल त्याचा अर्थ व तो कमी करणेबाबत काय करावे लागेल?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
अहस्तान्तार्नीय म्हणजे जमिनीची विक्री , सक्षम अधिकार्याच्या परवानगी शिवाय विक्री करता येत नाही .
आपण सक्षम अधिकारी यांची परवानगी घ्यावी
शासनाने प्रदान केलेल्या जमिनीचे बाबतीत , परवानगी घेऊन हि असा शेर कमी होत नाही . केवळ विक्री करण्यास परवानगी मिळते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Sir,
Amhi san 2006 madhe aasurde chiplun yethe jamin vikat khetali. Ti jamin aata navar karayachi aahe tyasati konte kagad patra lagtata aanhi tyachi procedure kay aahe te jara sanga. jene karun jamin navar karayala konta tras honar nahi. sir ek, ji jamin ghetali tya 7/12 ase lihale aahe ki tukadya virodhi kayada. tyamule tyache hi uttar dya.
आपण खरेदी खत, अनुसूची क्रमांक २ ची प्रत सह तलाठी यांचे अर्ज करा
अन्य कायद्याने जमीन हस्तांतारानास निर्बंध नसतील तर , जमीन आपले नावावर , अर्ज केले पासून १५ दिवसात होईल

बागायत जमीन- ०.५ र
एकपिकी जमीन- ०.१५ र
वर्कस जमीन- ०.२० र

वर नमूद एवढे क्षेत्र्स कमीत कमी असल्या शिवाय , जमिनीची विक्री करता येत नाही
त्या पेक्षा कमी क्षेत्राची विक्री केल्यास , असा व्यवहार तुकडे बंदी कायदे विरुद्ध ठरतो

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
माझा प्रश्न असा आहे,
माझ्या आजोबांना दोन पत्नी होत्या. माझ्या आजोबांचे 2006 साली त्यांचे निधण झाले.
त्यापैकी एक पत्नीची 7/12 वर वारस नोंद झाली आहे व दुस-या पत्नीची 7/12 वर वारस नोंद झालेली नाही.
पहिल्या आजीला 1 मुलगा व 1 मुलगी आहे. व दुसरीला 4 मुलगे आहे. पहिल्या आजीचा मुलगा नोकरीला नाही व दुस-या आजी चे 4 ही मुलगे नोकरीला आहेत. त्यापैकी 3 जनाचे निधण झाले आहे.
आमची जमिन आदीवासी कुळाची आहे.
माझे आजोबांच्या निधना नंतर माझ्या पहिल्या आजीचे नाव 7/12 लागले आहे. माझी पहिल्या आजीचे 2011 मध्ये निधण झाले. व पहिल्या आजीच्या निधना नंतर माझे चुलत चुलते व आत्या (पहिल्या आजीचा मुलगा व मुलगी) यांचे 7/12 ला वारस नोंद झाली आहे.
माझे आजोबांच्या निधणा नंतर दुस-या आजीचे 7/12 वारस नोंद झालेली नाही तर त्यासाठी काय करावे लागेल. दुस-या आजीची वारस नोंद करण्याकरीता कोठे अर्ज सादर करावा लागेल, व कोणकोणते कागदपत्रे सोबत जोडावे लागतील, व दुस-या आजीचे वारस नोंद करण्याकरीता किती दिवसामध्ये अर्ज करायला हवे हयाबाबत कृपया मार्गदर्शन करावे.
ज्या फेर्फाराने , केवळ पहिल्या पतीनीच्या वारसांची नोंद झाली त्या फेर्फार्विरुद्ध , अपील करा .

Hindu Marriage Act च्या कलम १६ (३) अन्वये , दुसर्या पत्नीच्या , वारासानही , मिळकतीत हिस्सा आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी रजिस्ट्रेशन केला होता.पण माझा पासवर्ड चा मेल डिलीट झाला.कृपया माझा पासवर्ड पाठवण्यात यावा.
Your password sent on your mail...But one can use "forgot password?" option to get his/her password. So please remember your username to get your password if forgotten. Thanks.
MCS.

Reply by MCS Maharashtra | इतर

नमस्कार सर, गावठाण हद्दीतील मुख्य रोड लगत माझे गेली १५ ते २० वर्षापासून अतिक्रमित जागेवर दुकान आहे, त्या वेळी या संबंधी परवानगी ग्रामपंचायत (आता नगरपालिका आहे) , बांधकाम विभाग या कडे घेतली होती. आता मला हि जागा नियमित माझ्या नावे करून घेता येईल का ? आणि कोणत्या पद्धतीने. ख्रुपया मार्गदर्शन करावे.
सदर जागा रस्र्तापासुन किती अंतरावर आहे, रस्ता कोणता आहे, जमीनीची मालकी कोणाची आहे, आपल्या गावासाठी / शहरासाठी विकास योजना मंजुर आहे का इ. सर्व गोष्टी समजलेस त्याबाबत सांगता येईल............ शासकीय जागेत असेल तर नियमनुकुल करता येणार नाही.........

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

pls forward chokkalingam commitee report on paisewari
मोबदला देऊन बहिणींकडून हक्कसोड पत्र केल्यास मुद्रांक शुल्क भरावे लागेल का?
आपणास २ % मुन्दारांक शुल्क ( जमीन किमतीच्या )
१ % नोंदणी फी ( जमीन किमतीच्या )
१ % जी प सेस भरावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझ्या आजोबाच्या नावने असलेली शेत जमीन डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड कॉलेज साठी जमीन संपादित केलेली आहे तर मला नोकरी मिळण्यासाठी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळत नाही.
मी काय करू सांगा सर
आपली जागा केव्हा संपादित झाली आहे ?

जर आपली जागा २००६ पूर्वी संपादित झाली असेल व त्यास पुनर्वसन कायदा लागू केला असेल तर , आपणास प्रकल्प ग्रस्त मिळेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा.सर दि.3-10-15 रोजी मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही.कृपा करून मार्गदर्शन करा.खूप उपकार होतील.
सरकारी कर्मचारीला पत्‍नीच्‍या प्रसृतीवेळी पतीला काही विशेष रजा मिळण्‍याची तरतूद आहे काय असल्यास त्याबाबत माहिती मिळावी व शासन परिपत्रक बाबत माहिती मिळावी
पोट हिस्सा मोजणीत हद्दी खुणा दाखवता येतात का त्याबाबत चे शासन निर्णय / परिपत्रक मिळावे
पोट हिस्सा मोजणीत , खुणा दाखवल्या जातात .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

अंतर विभाग बदली मध्‍ये अपंग व्‍यक्‍तीसाठी जागा रिक्‍त असेल तर त्‍या ठीकाणी अपंग व्‍यक्‍तीची सदर ठीकाणी बदली करता येते का ?
मिळकत जमीन वर्ग १ व मिळकत जमीन वर्ग २ या बाबत सविस्तर माहिती द्या.
वर्ग १ जमीन म्हणजे - या जमिनीचे विक्रीस कोणतेही निर्बंध नसतात

वर्ग २ जमीन म्हणजे - या जमिनीचे विक्री करण्या साठी , सक्षम अधिकारी यांची परवानगी आवश्यक
उदा शासन प्रदान जमीन, कुल वहिवाट कायद्याखाली प्राप्त झालेली जमीन ( विक्री किंम्मत निच्छित होऊन १० वर्ष कालावधी झालेला नाही )

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by सुभाष
09-10-2015
rajmudra123@gmail.com

सर,
माझे वडीलांची जमीन पाझर तलावामध्येत १९७२ ला संपादीत झाली. काही संपादीत जमीन पैसे २००/- मिळाले व काही नोडीसवर पैसे देणे बाकी असा शेरा आहे. वडील हयात असताना मी माझे नावे प्रकल्पवग्रत प्रमाणपञ घेतले आहे. मला त्या जमिनाची मोबदला किंवा नवीन जमीन मिळेल काय आणि त्या‍साठी काय करावे लागेल.
आपले प्रश्नावरून , आपल्या संपादित जमिनीपैकी , काही जमिनीची नुकसान भरपाई रक्कम मिळाली आहे , तथापि , काही जमिनीचा मोबदला मिळालेला नाही असे दिसून येते .
जरी नोटीस वर , मोबदला देणे बाकी असा शेर असला तरी , पैसे मिळाले नाहीत याची खात्री , साम्भंधित भू संपादन कार्यालयाकडून करून घ्या . जर पैसे मिळाले नसतील , तर आपणास पैसे मिळतील .
आपली जमीन 1972 साली संपादित झाली आहे , त्या वेळी पुनर्वसन कायदा अस्तित्वात नव्हता . त्या मुले लाभ क्षेत्रात पर्यायी जमीन मिळणार नाही
मात्र त्या वेळेस , कार्यकारी आदेशाने , पुनर्वसन योजना लागू केली होती का , या बाबत , ओउनर्वसन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय यांचे कडून माहिती घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

श्री. किरण पानबुडे साहेब नमस्कार
माझा प्रश्न असा कि आम्ही गावठाणातील जागेवर ग्रामपंचायतीचे नाव कमी करून आमचे नाव लावले व तसा चुकीची दुरुस्ती होऊन मिळणेसाठी सातारा जिल्हा भूमी अभिलेख यांच्याकडे अपील दाखलहि केले आहे कि ग्रामपंच्यायती चे नाव चुकीने लागले आहे व ग्रामपंच्यायती ने आमच्या नावाची नोंद केली आहे तर त्या चुकीची दुरुस्ती होऊन मिळावी त्यासाठी आम्ही तालुका भूमी अभिलेख यांना व सध्या त्या जागेवर असणार्या एकाला पार्टी केले आहे पण अजून ते अपील बोर्डावर यायला २ ते ३ महिने लागतील. आता ग्रामपंच्यायत विरोधकांच्या कडे आहे मग आता ग्रामपंच्यायत आमचे नाव कमी करू शकते का ? किवा त्यांना तसे करायचे असल्यास काय कोणत्या नियमाने व आम्हाला न कळवता त्यांना आमचे नाव कमी करता येईल का ? व आमचे नाव कमी करू नये म्हणून आम्हाला काय करावे लागेल ? कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
ग्राम पंचायातीस , परस्पर आपले नाव कमी करता येणार नाही .
याही उप्रोक्षा ग्राम पंचायतीने नाव कमी केल्यास , आपण गट विकास अधिकारी यांचे कडे अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.26 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3433
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3