जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

न्यायलयीन प्रकरण प्रंलबीत असल्याने मंडळ अधिकारी यांना तात्पुरते निवृत्ती वेतन प्रदान करण्यात आले परंतू दरम्यान कोरोना कालावधीमध्ये कर्मचाऱ्याचा मृत्यु झाला त्यामुळे न्यायालयाने प्रकरणात आरोपी म्हणून वगळलेले आहे. त्यामुळे त्यांचे कुटूंबीयांना कुटूंब निवृत्ती वेतन प्रदान करण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाची मंजूरी घ्यावी लागेल किंवा कसे?
गायरान जमिनीमध्ये ग्रामपंचायतीने 11 महिने करार करून दिलेली आहे.हे जमीन देण्याचे अधिकार ग्रामपंचायतीस आहे का?सदरची जमीन 11 महिने करारावर दिलेली जमीनिवरील कबजेदार यांना कोणत्या कायद्या अन्वेय काढावी व याबाबत कोणाकडे अर्ज करावी.
गायरान किंवा गुरूचरन जमीन ही शासनाच्या मालकीची असते. ती केवळ गावातील गुरांना चरण्यासाठी ग्रामपंचायतीला दिलेली असते. मात्र ती जमीन ग्रामपंचायतीकडे निहित होत नाही. (vest)
आपण जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे याबाबत तक्रार करू शकता.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Rahul
13-06-2022
jadhav.rahul111@yahoo.com

माझ्या चुलत काकांची व आमची जमीन एकाच गटात आहे. सन 2004 साली माझ्या चुलत आजोबांचे निधन झाले त्यानंतर काकाने केवळ स्वतःच्याच नावाची वारस नोंद केली यावर त्याच्या 4 सावत्र बहिणींनी हरकत घेतली व प्रांतांकडे अपील केले. प्रांतांनी असा निकाल दिला की बहिणींचीपण वारसांमधे नोंद करावी या आदेशाविरोधात त्याने अपर जिल्हाधिकारी यांचेकडे अपील केले ते फेटाळले गेले व प्रांतांचा आदेश कायम ठेवला, त्याने यावरही नाराज होउन अपर आयुक्तांकडे अपील केले त्यांनीही अपील फेटाळून आदेश कायम ठेवला. यावर त्याने महसुल मंत्रलायाकडे फेरतपासणी करीता अपील केले आहे व त्यासोबतच मा. आयुक्तांच्या आदेशाच्या अंमलबजावणीस स्थगिती मिळावी असा अर्ज केला. या अर्जावर मा. महसुल मंत्री यांचा स्थिगीती आदेश (स्टे ऑर्डर) झाला आहे. सदर आदेश वरिल केस मधे देण्यात आला आहे.

माझ्या काकाने आम्हाला नोटीस पाठवली व आपल्या गटाच्या वहिवाटीवर महसुल मंत्र्यांनी स्टे दिला असून कुणीही जमीन वहिवाटायची नाही असे त्यामधे नमुद केल परंतू आम्हाला स्टे ऑर्डर ची प्रत दिली नाही. आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले आणि नेहमीसारखी आमची आमच्या क्षेत्रात वहिवाट चालू ठेवली. तर काकाने पोलिसात आमचे विरुध्द तक्रार केली की, महसुल मंत्र्यांचा स्टे असताना वहिवाट करतात. पोलीसांनी आम्हाला बोलावले व तक्रार अर्ज व सोबतची स्टे ऑर्डर दाखवली. ती वाचल्यावर आमच्या लक्षात आले की, त्याच्या वारसाहक्काच्या बाबतीत चाललेल्या अपीलाच्या संदर्भातील ती स्टे ऑर्डर असून आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. आम्ही तसा जबाब लिहून दिला.

माझा प्रश्न असा आहे की, पोलीसांची दिशाभूल करुन खोटी तक्रार केली असेल तर त्याविरोधात गुन्हा दाखल करता येईल का ? तसेच मा. महसुल मंत्र्यांच्या आदेशाचा आम्हाला त्रास देण्यासाठी जाणिवपुर्वक गैरवापर केला गेला असेल त्याची तक्रार करता करता येईल का ? आणि ती कोणाकडे करावी.
भारतीय दंड संहितेच्या कलम 182 अन्वये, लोकसेवकला खोटी माहिती देणे व त्याप्रमाणे लोकसेवकला खोट्या माहितीच्या आधारे त्याच्या अधिकाराचा वापर करण्यास लावून त्रयस्थ व्यक्तीला नुकसान पोहोचवणे हा गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी सहा महिने कारावासाची शिक्षा अथवा एक हजार रुपये दंड अथवा दोन्ही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

A चे वारस
अ आणि ब
त्यांची वारस नोंद झालेली आहे.
पण मालमत्ता पत्रकावर फक्त अ
चे नाव नोंदवले आहे. हे दोघे अडाणी होते. त्यांना ह्याबद्दल काहीच माहीत नाही . त्यानंतर अ आणि ब वारले . त्यांच्या मृत्यू होऊन अंदाजे ३० वर्ष झाले. मालमत्ता पत्रकावर अ चे नाव अजून धारणधिकार अ म्हणुन आहे. तर आता ब च्या वारसांनी मालमत्तेवर वारस नोंद करण्यासाठी काय करावे कृपया महिती द्यावी.
अ व ब याच्या दोन्ही वारसांना मिळून एकत्रित शपथपत्र द्वारे,A चे सर्व वारसदार असल्याबाबत कथन करावे. व शपथ पत्र व अर्ज नगर भूमापन अधिकारी यांना द्यावा. जर वारस अशाप्रकारे शपथपत्र करण्यास तयार नसतील तर Bombay Regulation अंतर्गत दिवाणी न्यायालयाकडून वारस प्रमाणपत्र द्यावे व नगर भूमापन अधिकारी यांना सादर करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, माझ्या काकांनी 25 वर्षापूर्वी 2 गुंठे जागा त्यांच्या मित्राकडून खरेदी केली त्याची दुय्यम निबंधक यांच्या कार्यालात नोंद केली आहे त्याचा दस्त आमच्याकडे आहे, परंतू त्याची नोंद तलाठी कार्यालयात करणे राहून गेले. दरम्यान माझ्या काकांचे मित्र वारले व त्यांच्या वारसांचे नाव जमीनीला लागले. गेल्या वर्षी माझे काकांचेही निधन झाले. त्यांचे निधनानंतर माझी काकू व चुलत भाउ वारस आहेत त्यांनी इतर जमीनीची व घराची वारसनोंद केली. परंतू वर उल्लेख केलेल्या 2 गुंठे जागेची नोंद करायला गेले असता काकांच्या मित्राच्या वारसांनी हरकत घेतली आहे की, आमच्या वडीलांनी जागा विकलेली नाही व सदर दस्त खोटा आहे व खोट्या सह्या करुन दस्त नोंदणी केली आहे.

तलाठ्याकडे नोंद करणेसाठी काय करावे
सदर व्यवहारांमध्ये तुकडे जोड तुकडे बंदी कायद्याचा भंग होतोय होत आहे. दुसरे म्हणजे आपण ज्या फेरफार अन्वय मयत व्यक्तीच्या वारसांची नावे अभिलेखात दाखल झाली आहेत त्या फेरफार विरुद्ध उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करावे

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

कोर्टाने दिलेले आदेश, महसूल अधिकाऱ्यांनी दिलेले आदेश दुय्यम निबंधक कार्यालयाकडे नोंदविणे आवश्यक आहे का? आवश्यकता असल्यास त्याबाबतच्या नियम / परिपत्रक /शासन निर्णयाची माहिती देण्यात यावी तसेच आवश्यकता नसल्यास त्याबाबतच्या नियम / परिपत्रक / शासन निर्णयाची माहिती देण्यात यावी
भारतीय नोंदणी कायद्याच्या कलम 17 अन्वये, ज्या दस्तांची नोंदणी करणे क्रमप्राप्त आहे त्याचा तपशील दिलेला आहे. त्यानुसार आपल्या समोर असलेला दस्त नोंदवणे बंधनकारक आहे का हे तपासून घ्या.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Namskar sir majhy आजोबा ची जमीन होती आणि ती ektrikaran मधे त्यांचं नाव वगळण्यात आले but nantr tyni apil krun चुकीची दुरुस्ती या योजने मार्फत tyni आपली नावावर फेरफार करून घेतला आणि 100 बांड पेपर वर समती पत्रक घेतल आणि ताबा करून घेतला आणि आज ty goshti la 20 vrsh hot ahe tr je ty gatamdhe सामाईक हिस्सेदार आहेत tyni अपील केली की माझे आजोबाची नावाने जमीन च न्हिय आणि अमी असच करून घतली म्हणून टीनी sdo la apil keli ani tyncha vilamb maff kel but jy sarve number ch ektrikaran jhal tyt majhy आजोबाची जमीन आहे आणि त्यातील काही हिसादर नी आम्हला विकली आम्ही घेतली आणि त्याचं 100च stamp paper vr ahe with notari tr tynchy vilamb maf houne ani ferfar tyna radd krata yeil ka yavr konakde dada मागावी आणि यांबद्दल कागदत्रांची पुरवणी कोणी करत nhi amchy kde nhiy mante तहसील कार्यालय भूमी अभलेख mdhe pn tr yavr ksa marg kadhav margdarshan kra sir please
नोटरी समोर केलेल्या कोणत्याही खरेदी विक्री दस्ताला पुरावा म्हणून महत्त्व नाही

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

प्रलंबित फेरफार, मंडळअधिकारी यांना किती दिवसात प्रमाणित करण्याचे अधिकार असतो.
तक्रार नसेल तर 25 दिवसात फेरफार नोंद प्रमाणित करता येईल

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Manoj
03-06-2022
dhamanoj20@gmail.com

नमस्कार मी जालना जिल्ह्यातील असून मला सन 2020 चा फेरफार हवा आहे परंतु ऑनलाइन वर जालना जिल्हा दिसत नाही तरी मला माहिती अधिकारात फेरफार ची नक्कल मिळू शकेल का त्यासाठी कशा प्रकारे माहिती अधिकार अर्ज दाखल करावा लागेल कृपया माहिती द्या तसेच हे प्रकरण वादग्रस्त असून तलाठी याच्यात फेरफार देत नाही कृपया मार्गदर्शन करावे
संबंधित फेरफार हा जुना असल्यामुळे तलाठी यांच्याकडे नव्हे तर तहसील कार्यालयात अभिलेख कक्षात उपलब्ध असेल. आपण संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करावा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

माझ्या शेताची मोजणी 2018 ला झाली असून आंबा झाड मोजणी नुसार माझे हद्दीत आहे व नंतर दोन मीटरवर बांध आहे परंतु माझे अनुपस्थितीत संबंधित शेजारी शेतकर्याने आंब्याच्या झाडा पासुन 3 फुट खोल ल नाली काढली व झाडाच्या मुळे तोडुन टाकली याच झाडाखालुन माझ्या शेतात येण्यासाठी स्थायी पायवाट आहे याबाबत कोणाकडे दाद मागावी
तहसीलदारकडे तक्रार अर्ज द्यावा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

महोदय..*
मी वरील अर्ज dharchi मुलगी, माझे वडील माहित मसणापू कदम मुंबईतील येथे नोकरीसाठी व छोटा व्यवसाय करण्यासाठी मुंबई येथे राहण्यास असताना ते सन 1995 व सन 1993 साली मौजे फगरे वाडी. मढुर पोस्ट सोनार. येथील गट नंबर .६०१/ब . क्षेत्र 70.8 आकार रू.8.44 पैसे ची जमीन खरेदी केलेले आहे सदर जमीन करार पत्राने आम्हास येथील . वसंत रामचंद्र राणे. दिनकर भुजंगा राणे. (सध्या मयत)याचे कडून खरेदी केलेली आहे . सदर जमिन त्यावेळी जमीन वर्ग दोन असल्याकारणाने खरेदी पूर्व करार पत्र आम्ही केले होते जमिनीचे वर्ग 2 चे वर्ग 1 झाल्यानंतर मूळ मालकाने आम्हास खरेदी पूर्ण करून देण्याचे ठरलेले होते. सदर ठरले कराराप्रमाणे आम्ही यांना सर्व पैसे दिलेले आहेत. यातील काही हिस्सेदार यांनी आम्हास त्यांच्या हिष्याचे खरेदीपत्र पूर्ण करून दिले आहे . परंतु काही व्यक्तींनी दिलेले नाही त्यापैकी. अशोक दिनकर राणे .एकनाथ दिनकर राणे. नामदेव दिनकर राने. पांडुरंग शंकर राणे .शिवाजी दिनकर राणे. वसंतराव रामचंद्र राणे. निर्मला पांडुरंग राणे . लक्ष्मीबाई दत्तू राणे. इत्यादी लोक आम्हास खरेदिपत्र करून देणार यांचे मयत वारस आहेत सदर व्यक्ती यांनी करार पत्रात केलेल्या अटींची व शर्तींचे पालन केलेले नाही तसेच सध्या जमीन वर्ग १ झाल्यानंतर त्यांच्या नावावर झाल्यानंतर ते आम्हास खरेदी पत्र पूर्ण करून देण्यास आज काल वेळोवेळी टाळाटाळ करत आलेले आहेत सदर जमिनीची परवानगी आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चाने काढलेले आहेत परवानगी निघाल्यानंतर आम्ही त्यांना खरेदी पत्र पूर्ण करून देण्यास वेळोवेळी बोलवत आहे तरी ही लोक जाणून-बुजून आमची फसवणूक करून सध्या जमिनीत आमचे गेली ३० वर्ष असलेले कब्जा वहिवाटीत हरकत अडथळा करून जमिनीत घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे व आम्हास जमिनीत आला तर तुम्हाला जिवंत मारिन असे बोलून.sir please provide which law can be apply to make sale deed registered.

Sweta sameer nikam
आपले प्रश्नावरून मिळतही कोकणातली असावी असे प्रथमदर्शनी दिसून येते. असोत. मिळकती संदर्भात जो करार करण्यात आलेला होता त्यावर योग्य मुद्रांक शुल्क जर भरलेले असेल तर तो आपणास पुरावा म्हणून वापरता येईल कोणत्या आधारे ज्या गावांमध्ये आपली जमीन आहे त्या गावाच्या तालुक्याचे ठिकाणी असलेल्या दिवाणी न्यायालयामध्ये, संबंधित व्यक्तींनी खरेदी पूर्व कराराच्या अनुषंगाने, जमिनीची विक्री आपल्याला भात करून देण्याबाबत निर्देशीत करणे बाबत न्यायालयाने हुकूम द्यावा असा दावा दाखल करा.
दिवाणी दावा ही ही वेळखाऊ प्रक्रिया आहे याशिवाय आपले कष्ट व पैसेही त्यामध्ये खर्च होणार आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा सांगोपांग विचार करून दावा दाखल करण्याच्या दृष्टीने निर्णय घ्यावा.
प्रकरणांमध्ये गुणवत्ता आहे व न्यायालयाकडून आपल्या लाभा मध्ये निर्णय होण्याची शक्यताही आहे.
You can file a suit under the Specific Relief Act in the Civil Court. However following prerequisites needs to be e complied.
The agreement to sale should have been executed or registered or are properly stamped.
the payment of money should have been by way of cheque or some other evidence.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आपण नमूद केलेले करारपत्र जर नोंदणीकृत नसेल तर त्याला पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही तथापि आपण याबाबत दिवाणी न्यायालयात दाद मागणे उचित राहील

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

माझा प्रश्न असा आहे की माझ्या पंजोबा ना एक भाऊ होता . माझ्या पंजोबा यांनी कूळ कायद्या मध्ये 1957 सालि कसत असलेली 30 एकर शेजमीन ठरलेल्या रकमे प्रमाणे पैसे सरकारी कार्यालयात भरून 32ग certificate प्राप्त केलं सदर certificate 1970 सली प्राप्त केलं आहे . सर्व पैसे पजोबा यांनी व काही पैसे आजोबा यांनी भरले .. 32ग certificate वरती कुठेही एकत्र कुटुंब मॅनेजर असा कुठेही उल्लेख नाही .. पूर्णपने पंजोबा यांनी खरेदी घेतली असा उलेक आहे .तर आता 2022 आली पंजोबा यांच्या भावाचे वारस एकत्र कुटुंब मॅनेजर अशी नोंद का नाही झाली व नोंद करून द्यावी व अर्ध्या शेत जमिनी साठी कोर्ट केस करणार आहेत तर आम्ही काय केले पाहिजे कृपया मार्गदर्शन करावे.
त्यांनी केलेल्या अर्जावर सक्षम अधिकारी योग्य तो निर्णय घेतील आपणास सदर प्रकरणी नोटीस प्राप्त झाल्यास आपण आपले म्हणणे सक्षम अधिकार्‍याकडे सादर करावे

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

माझा प्रश्न असा आहे की माझ्या पंजोबा ना एक भाऊ होता . माझ्या पंजोबा यांनी कूळ कायद्या मध्ये 1957 सालि कसत असलेली 30 एकर शेजमीन ठरलेल्या रकमे प्रमाणे पैसे सरकारी कार्यालयात भरून 32ग certificate प्राप्त केलं सदर certificate 1970 सली प्राप्त केलं आहे . सर्व पैसे पजोबा यांनी व काही पैसे आजोबा यांनी भरले .. 32ग certificate वरती कुठेही एकत्र कुटुंब मॅनेजर असा कुठेही उल्लेख नाही .. पूर्णपने पंजोबा यांनी खरेदी घेतली असा उलेक आहे .तर आता 2022 आली पंजोबा यांच्या भावाचे वारस एकत्र कुटुंब मॅनेजर अशी नोंद का नाही झाली व नोंद करून द्यावी व अर्ध्या शेत जमिनी साठी कोर्ट केस करणार आहेत तर आम्ही काय केले पाहिजे कृपया मार्गदर्शन करावे.
त्यांनी केलेल्या अर्जावर सक्षम अधिकारी योग्य तो निर्णय घेतील आपणास सदर प्रकरणी नोटीस प्राप्त झाल्यास आपण आपले म्हणणे सक्षम अधिकार्‍याकडे सादर करावे

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार सर आमच्या आजोबाची जमिनीची वाटनी दोन भावा मध्ये झाली होती परंतु ति जमिन त्याच्या भावाच्या नावे होती़ आजोबाच्या भावाने आमची जमीन विक्री केली आहे त्या जमीनीवर ताबा आमचा आहे ति जमीन आमच्या नावाने लावण्यासाठी काय करावे लागेल
ज्या फेरफार नुसार जमीन विक्री झाली आहे त्या फेरफार विरुद्ध अपील दाखल करावे आणि संबंधित अधिकाऱ्यास पुराव्यासह योग्य त्या बाबी निदर्शनास आणून द्याव्यात

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर, सोनबा हा आदिवासी आहे, त्याला सन १९५६-१९५७ ला सं कुळ लागले आहे. नंतर सं. प असा शेरा आहे व गैर आदिवासी मूळ शेत मालकाने १९५९ ला शेत दुसऱ्या व्यक्तीला विकले आहे याबाबत मार्गदर्शन करावे.
आपण संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करावा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Vilas misal
24-05-2022
vilasmisal1992@gmail.com

मी औरंगाबाद कर मी 2000 साली 600qr फूट प्लॉट दुय्यम निबंधक कार्यालय नोंद करून घेतला. ज्या व्यक्ती कडन घेतला त्या व्यक्तीच 7/12 नाव नाही व मी जे खरेदीखत केल आहे त्या मध्ये (र. डे. बुक नंबर 6534 व दिनांक 5-6-89) अशा प्रकारे नोंद आहे व मी 6534 हा दस्त क्रमांक आधारे दुय्यम निबंध कार्यालय मध्ये गेलो असता तिथे मला दुसऱ्या इसमा च्या दस्त क्रमांक आहे हे दिसले हे कस खरं असु शकत माझा दस्त क्रमांक आणि वर्ष व इतर इसमाचा दस्त क्रमांक व वर्ष एक सारखं आसू शकतो का. क्रुपया सहकार्य करावे
असे होणे सर्वसाधारणपणे शक्य नाही तथापि याबाबत दुय्यम निबंधकांकडे विचारणा करणे उचित ठरेल

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

माझ्या आजोबांनी 1968 साली 6 गुंठे जागा रजिस्टर दस्ताने खरेदी केली होती. परंतू त्या दस्ताची आज पर्यंत नोंद केली गेली नाही व फेरफार पण झाला नाही त्यामुळे माझ्या आजोबांचे नाव 7/12 वर आलेच नाही. माझे वडील व चुलते यांनीही नोंद केली नाही. पण जागा आमचे ताबेवहीवाटीस असून माझ्या चुलत्याने 1 गुंठ्यामधे घर बांधले आहे व त्याची ग्रामपंचायत मधे नोंद केली आहे व कर पण भरत आहे. जमीन घेणारा व देणारा दोघेही हयात नाहीत. आता आम्ही तलाठी कार्यालयात दस्त नोंद करण्यासाठी गेलो असता जमीनीच्या मालकाचे वारस हसकत घेत आहेत तसेच ग्रामपंचायत मधे नोंद केलेल्या घराची नोंद रद्द करणेसाठी अर्ज केला असून जमीन नावावर नसताना घर कसे बांधले व त्याची नोंद कशी केली असे विचारत आहेत.
जमीन घेणारा व देणारा दोघेही हयात नसताना दस्ताची नोंद होत नाही का ? काय करावे लागेल?
जमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार हा नोंदणी कृत दस्तावर आधारित असतो व्यक्तींवर नव्हे. खरेदी-विक्रीचा नोंदणीकृत दस्त जोपर्यंत सक्षम न्यायालय रद्द करत नाही तोपर्यंत तो अस्तित्वात असतो आणि त्याची पत (value) ही कमी होत नाही. त्यामुळे आपला खरेदी दस्त नोंदणी कृत असेल तर तलाठी यांनी त्याची नोंद घेणे आवश्यक आहे. खरेदी देणार घेणार दोघे मयत असतील तर त्यांच्या वारसांना नोटीस देता येईल

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

मा.श्री.किरण पानबुडे सर आपल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद.
माझा प्रश्न - 7/12 वर खरेदी क्षेत्रापेक्षा जादा क्षेत्र लावणेत आले बाबत होता. आपण सांगितले प्रमाणे उपविभागीय अधिकारी यांचेकडे आपील दाखल केल्यास विलंबाचा दोष लागून अपील अमान्य होईल का ?
विलंब माफी वर निर्णय घेणे हा संबंधित अधिकाऱ्याचा स्वेच्छाधिन अधिकार आहे आपण मा. सरांनी सांगितल्यानुसार अपील दाखल करावे. सक्षम अधिकारी योग्य तो निर्णय घेतील

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

विषय--*आमचे जमिनीत बेकायदेशीर कब्जा करणेचा प्रयत्न करून शिवीगाळ करून जिवे मारणेची धमकी देत असले बाबत ..*

*महोदय..*
मी वरील अर्ज dharchi मुलगी, माझे वडील माहित मसणापू कदम मुंबईतील येथे नोकरीसाठी व छोटा व्यवसाय करण्यासाठी मुंबई येथे राहण्यास असताना ते सन 1995 व सन 1993 साली मौजे फगरे वाडी. मढुर पोस्ट सोनार. येथील गट नंबर .६०१/ब . क्षेत्र 70.8 आकार रू.8.44 पैसे ची जमीन खरेदी केलेले आहे सदर जमीन करार पत्राने आम्हास येथील . वसंत रामचंद्र राणे. दिनकर भुजंगा राणे. (सध्या मयत)याचे कडून खरेदी केलेली आहे . सदर जमिन त्यावेळी जमीन वर्ग दोन असल्याकारणाने खरेदी पूर्व करार पत्र आम्ही केले होते जमिनीचे वर्ग 2 चे वर्ग 1 झाल्यानंतर मूळ मालकाने आम्हास खरेदी पूर्ण करून देण्याचे ठरलेले होते. सदर ठरले कराराप्रमाणे आम्ही यांना सर्व पैसे दिलेले आहेत. यातील काही हिस्सेदार यांनी आम्हास त्यांच्या हिष्याचे खरेदीपत्र पूर्ण करून दिले आहे . परंतु काही व्यक्तींनी दिलेले नाही त्यापैकी. अशोक दिनकर राणे .एकनाथ दिनकर राणे. नामदेव दिनकर राने. पांडुरंग शंकर राणे .शिवाजी दिनकर राणे. वसंतराव रामचंद्र राणे. निर्मला पांडुरंग राणे . लक्ष्मीबाई दत्तू राणे. इत्यादी लोक आम्हास खरेदिपत्र करून देणार यांचे मयत वारस आहेत सदर व्यक्ती यांनी करार पत्रात केलेल्या अटींची व शर्तींचे पालन केलेले नाही तसेच सध्या जमीन वर्ग १ झाल्यानंतर त्यांच्या नावावर झाल्यानंतर ते आम्हास खरेदी पत्र पूर्ण करून देण्यास आज काल वेळोवेळी टाळाटाळ करत आलेले आहेत सदर जमिनीची परवानगी आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चाने काढलेले आहेत परवानगी निघाल्यानंतर आम्ही त्यांना खरेदी पत्र पूर्ण करून देण्यास वेळोवेळी बोलवत आहे तरी ही लोक जाणून-बुजून आमची फसवणूक करून सध्या जमिनीत आमचे गेली ३० वर्ष असलेले कब्जा वहिवाटीत हरकत अडथळा करून जमिनीत घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे व आम्हास जमिनीत आला तर तुम्हाला जिवंत मारिन असे बोलून.sir please provide which law can be apply to make sale deed registered.


Sweta sameer nikam
या प्रश्नाचे उत्तर वर दिले आहेच. स्वतःच्या जमिनीचे अतिक्रमणापासून संरक्षण करणे हे संबंधित जमीन मालकाचे कर्तव्य आहे अतिक्रमण काढण्यासाठी योग्य त्या बाळाचा वापरही करता येईल असे माननीय सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयात नमूद केले आहे. आपण धमकी दिल्याबाबत संबंधितांविरुद्ध पोलिसात तक्रार करावी तसेच अतिक्रमणाचा संदर्भात दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Vijay Lanjekar
13-05-2022
vijaylan@rediffmail.com

नमस्कार साहेब,
माझा प्रश्न आहे प्रांतांच्या आदेशानंतर तलाठी फेरफार वरती इतर कोण कोण हरकत घेऊ शकत का?
आणि फेरफार झाल्या नंतर किती दिवसात हरकत घ्यावी लागते.?
हित सबंधित व्यक्ती वर्दी नोटीस चावडीवर प्रसिद्ध केल्यापासून १५ दिवसात हरकत घेऊ शकतात .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर, माझे वडील यांच्या नावे सात बारा उताऱ्यावरती 1.79हेक्टर एवढे क्षेत्र आहे. त्यामध्ये 0.44हेक्टर लागवडीलायक व 1.35हेक्टर पोट खराबा (ब)असे क्षेत्र आहे. परंतु सध्या आंम्ही 1.35हेक्टर पोट खराबा पैकी 1.16हेक्टर एवढे क्षेत्र लागवडीयोग्य बनविले आहे व त्यामध्ये आम्ही सध्या पिकांची लागवड घेत आहोत.
१. आमच्या शेतात 19 गुठे आकाराचे ओढा/नाला आहे , त्यामूळे पूर्ण 1.35हे श्रेत्र पोट खराब ब मध्ये येते
तरी सदर 1.16हेक्टर हे क्षेत्र आम्हाला सात बारा उताऱ्यावरती लागवडीयोग्य क्षेत्र असे नोंदवून घ्यायचे आहे. तरी त्याबाबत माहिती द्यावी.
२. सदर 1.16हेक्टर हे क्षेत्र आम्हाला सात बारा उताऱ्यावरती लागवडीयोग्य क्षेत्र असे नोंदवून घेता येईल का?

Thanks &regard
कल्पेश पाटील
8888363273
krp889@gmail.com
होय . आपण मेहेरबान तहसीलदार महोदय यांचे कडे अर्ज करा . या बाबतीत शासन निर्णय आहे . मात्र माझ्याकडे नाही . आपण महारष्ट्र शासनाचे संकेत स्थळावरून घ्यावा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
माझा प्रश्न - 7/12 वर खरेदी क्षेत्रापेक्षा जादा क्षेत्र लावणेत आले बाबत.
सर माझ्या पंजोबांनी 1960 रोजी कायदेशीर दस्ताद्वारे एका व्यक्तीस 0.6 गुंठे जागा विकली. त्यानंतर अशाच प्रकारे कुणाला 0.4 गुंठे कुणाला 0.2 गुंठे जागा विकल्या. त्याच्या एकूण मिळकती पैकी (6 एकर 21 गुंठे) केवळ 0.29 गुंठे जागा विकली. राहिलेली सर्व आजही आमच्या ताबेवहीवाटीस आहे.
1960 साली ज्या एका व्यक्तीस 0.6 गुंठे जागा विकली त्याची आणेवारी लावताना तलाठी यांनी बेकायदेशीरपणे आठआणे आणेवारी लावली. ही बाब माझे आजोबा लष्करातून निवृत्त होऊन गावी परतल्यानंतर त्याच्या ही बाब लक्षात आली व त्यांनी तसे तलाठी कार्यालयास कळविले परंतू त्यांना वरिष्ठांकडे तक्रार अर्ज करण्यास सांगण्यात आले 1981 पासून ते 2003 पर्यंत त्यांनी वेळोवेळी सर्व संबंधित कार्यालयास अर्ज करुन सदर चुकीची आणेवारी दुरुस्त करणेबाबत कळविले परंतू त्याबाबत कोणताच निर्णय झाला नाही.
जमीनीची ताबेवहीवाट जरी आमचेकडे असली तरी चुकीची दुरुस्ती झालेशिवाय आम्हाला गत्यंतर नाही हे लक्ष्यात आल्यानंतर आम्ही वकिलांमार्फत विभागीय आयुक्त यांचेकडे 2020 साली पुन्हा योग्या त्या कागदपत्रांच्या आधारे अर्ज केला तो चौकशीसाठी मंडलाधिकारी यांचेकडे आला, त्यांनी आम्हा दोन्ही पक्षांना जबाबासाठी बोलावले. आम्ही सादर केलेल्या दस्ताप्रमाणे त्यावर ɕ 6 असा उल्लेख असल्याने ɕ हे आणेचे चिन्ह असून 6 आणे खरेदी असल्याचा युक्तीवाद केला त्यावर आम्ही त्याच साली झालेल्या इतर दस्तांचा पुरावा देवून त्यांच्या खरेदीमधे सुध्दा ɕ हेच चिन्ह असून ते पै असून ती खरेदी गुंठ्य़ामधे असल्याचे सांगितले तसेच त्यावर झालेल्या फेरफारवर सुध्दा विक्री करुन राहिलेले क्षेत्राचा उल्लेख आहे.
खरेदीजर 6 आणे ची असती तर खरेदी तारखेपासून आजरोजी पर्यंत सदर खरेदीदार अथवा त्यांचे वारस यांनी 6 गुंठेव्यतिरिक्त त्यांची वहीवाट कधीच नव्हती.
त्यांच्या युक्तीवादाला कोणताही ठोस पुरावा व संदर्भ नाही तरीही मंडलाधिकारी म्हणतात त्यांचा युक्तीवाद योग्य वाटतो.
याबाबत आम्ही पुढे काय करावे याबाबत मार्गदर्शन करावे.
आपण इतर ठिकाणी अर्ज करत बसण्यापेक्षा, जो फेरफार झालेला आहे ज्याद्वारे केवळ सहा गुंठे क्षेत्राची विक्री केली असताना ज्यादा क्षेत्राची विक्री बाबतचा अंमल सातबारा सदरी देण्यात आलेला आहे, त्याविरुद्ध उपविभागीय अधिकारी यांचेकडे आपली दाखल करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी औरंगाबाद कर मी 2000 साली 600qr फूट प्लॉट दुय्यम निबंधक कार्यालय नोंद करून घेतला. ज्या व्यक्ती कडन घेतला त्या व्यक्तीच 7/12 नाव नाही व मी जे खरेदीखत केल आहे त्या मध्ये (र. डे. बुक नंबर 6534 व दिनांक 5-6-89) अशा प्रकारे नोंद आहे व मी 6534 हा दस्त क्रमांक आधारे दुय्यम निबंध कार्यालय मध्ये गेलो असता तिथे मला दुसऱ्या इसमा च्या दस्त क्रमांक आहे हे दिसले हे कस खरं असु शकत माझा दस्त क्रमांक आणि वर्ष व इतर इसमाचा दस्त क्रमांक व वर्ष एक सारखं आसू शकतो का. क्रुपया सहकार्य करावे
आदरणीय मोहदय,

श्री किरण पाणबुडे साहेब कृपया आपल्याकडून उत्तराची अपेक्षा आहे, कृपया मार्गदर्शन करा.

सन १९३६-३७ साली कसत असलेल्या जमिनीवर पणजोबा हे संरक्षित कुळ होते. नंतर त्यांचा मोठा मुलगा (चुलत आजोबा) यांचे नाव साधे कुळ म्हणून लागले. माझे आजोबा हे मुंबई ला एकत्र कुटुंबातील दुकान संभाळत होते. तर चुलत आजोबा हे गावी शेती संभाळत होते. पणजोबा चें निधन (१९५० ला) झाल्यावर शेतीचे चे सर्व अधिकार हे चुलत आजोबा (ए कु म्या) यांचा कडे होते. पुढे १९६४ साली चुलत आजोबा यांनी वर्दी देऊन माझ्या आजोबांना कुळ हक्का ने कसत असलेली जमीन सोडून बाकीच्या जमिनीचे वाटप करून दिले. (पणजोबा पासून कुळ हक्काने कसत असलेली जमिनीची केस चालू होती म्हणून ती जमीन चुलत आजोबा यांनी वाटप करून नाही दिली) पुढे सन १९७१ साली चुलत आजोबा यांनी पणजोबा पासून कुळ हक्का ने कसत असलेली जमिनीचे खुश खरेदी करून जमीन मालक यांच्याकडून जमीन खरेदी केली व ७/१२ सदरी त्यांचे नाव लागले. माझे आजोबा यांचे १९७७ साली निधन झाले. तरी पुढे हि गावी असलेल्या जमिनीचे सर्व अधिकार हे चुलत आजोबा यांच्या कडे होते व त्यांच्या बरोबर माझे काका हे त्यांना जमिनी कसण्यासाठी मदत करत होते. पुढे चुलत आजोबा यांनी कुळ हहक्काने खरेदी केलेली जमिनीचे त्यांच्या पुतण्यां ना (माझ्या वडिलांना) त्या जमिनीचे आर्धी वाटप करून दिले पण ७/१२ वर नोंद नाही केली. सन १९९७ साली चुलत आजोबा यांचे निधन झाले व त्या नंतर आज रोजी त्यांच्या नातवांचे नाव ७/१२ आहे.

माझे प्रश्न: असे आहेत

१) पणजोबा पासून कुळ हक्काने कसलेली जमीन त्यांच्या नंतर मोठा मुलगा (चुलत आजोबा) खरेदी करतात तर त्यावर पणजोबा चा लहान मुलगा (माझे आजोबा) यांचा हक्का आहे का ?
२) चुलत आजोबा यांचे नातू आज कुळ हक्कातील जमीन नवा वर करून देण्यास तयार नाहीत व सांगत आहे तुमचा हक्का नाही आहे हे बरोबर आहे का ?
३) चुलत आजोबा यांनी हयात असताना स्वतः माझ्या वडिलांना कुळ हक्कातील खरेदी केलेल्या जमिनीचे प्रत्येक्षात अर्धे वाटप करून दिले पण ७/१२ नोंद केली नाही. तर ७/१२ सदरी नाव नोंद करण्या साठी काय करावे लागेल ?

सर कृपया मार्गदर्शन करावे.
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 हा कोकण महसूल विभाग, नाशिक महसूल विभाग व पुणे महसूल विभाग यांना लागू आहे. औरंगाबाद महसूल विभागाला औरंगाबाद विभागाशी निगडीत( हैदराबाद) हा कुळ कायदा लागू आहे तर अमरावती व नागपूर महसूल विभागासाठी महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम( विदर्भ विभाग) लागू आहे. आपण आपली शेतजमीन नक्की कोणत्या महसूल विभागात आहे याचा तपशील नमूद केला नसल्याने त्याला कोणता कायदा लागू होईल हे मला सांगता येणार नाही. मात्र आपलीच शेतजमिनीला मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 जो पूर्वी मुंबई राज्याला म्हणजे आत्ताच्या कोकण, पुणे व नाशिक महसूल विभागाला लागू आहे त्या कायद्याच्या तरतुदी च्या अनुषंगाने मी या प्रश्नाचे उत्तर खालील प्रमाणे देत आहे. हे
आपल्या पंजोबा यांचे निधन सन 1950 मध्ये झालेले आहे. महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 हा 16 डिसेंबर 1948 पासून अमलात आला. कायद्याच्या कलम 40 अन्वये कुळाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे वारस हे या अटी व शर्ती वर वारसांचा मृत पूर्वज जमीन कसत होता त्याच अटी व शर्ती वर जमीन कसण्याचा हक्क आहे. त्यामुळे पणजोबा यांच्या पश्चात, त्यांचे वारस म्हणजे आपले आजोबा व चुलत आजोबा यांच्यामध्ये जमिनीचे वाटप होऊन अथवा या दोघांची नावे वारस म्हणून या जमिनीला लागणे आवश्यक आहे / होते. मात्र आपले आजोबा मुंबईस्थित असल्याने, आपल्या चुलत आजोबांनी जमिनीची , विक्री किंमत आदेश त्यांच्या लाभात करून घेऊन जमिनीला त्यांचे नाव म्हणून लावले व त्यांच्या पश्चात त्यांच्याच वारसांची नावे लावण्यात आलेली आहे.
आपण पणजोबा यांच्या मृत्यूपश्चात केवळ चुलत आजोबांचे नावासह आपल्याही आजोबांचे नाव लावण्यात यावे यासाठी मामलेदार यांच्याकडे अर्ज करावा. सदरचा अर्ज हा कुळवहिवाट कायद्यांतर्गत दाखल करावा.
( आपण दिलेल्या माहितीनुसार, आपले पण जॉब आहे संरक्षित कुळ असल्याचे दिसून येते व त्यांचा मृत्यू जर 1950 आली झालेला असे तर त्याला 1948 च्या कायद्याच तरतुदी लागू होती ही माझी धारणा आहे. जर आपली जमीन मराठवाडा अथवा विदर्भ विभागात असेल तर आपणाला त्या-त्या संबंधित कायद्याच्या तर तुम्ही तपासाव्या लागतील)

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, आदिवासी
सोनबाला सन १९५६-१९५७ ला सं. कुळ लागले आणि सं. प. असा शेरा आहे आणि मुळमालकाने सन १९५९ ला शेत दुसऱ्या व्यक्तीला विकले आहे
याबाबत मार्गदर्शन करावे.
जमीन मालक आदिवासी आहे की कुळ आदिवासी आहे याचा बोध आपल्या प्रश्नावरून होत नाही. कृपया प्रश्न विस्तृत स्वरूपात मांडा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.28 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3