जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Shankar pawar
27-11-2025
shankarp454@yahoo.com
साहेब, 7 oct 2025 मंत्री मंडल निर्णय बैठक क्रमांक 40. तुकडे बंदी कायदा नगरपंचायत क्षेत्र मधील सर्व जमिनी साठी लागू होणार आहे असे दिसत आहे. म्हणजे याअगोदर झालेले 1 ते 13 गुंठे जिरायत शेतजमीन व्यवहार नियमित होणार आहे काय ? मार्गदर्शन करावे ही विनंती
Question by Siddhesh Kudtarkar
18-11-2025
kudtarkar.sid.siddhesh@gmail.com
तहसीलदार कार्यालयातील अभिलेखाची नक्कल प्रत पुरविताना आकारण्यात येणारी लिहिणावळ फी बाबतचा शासन निर्णय कोणता आहे, प्रतिपृष्ठ आकारण्यात येणारी फी बाबत शासन निर्णय कृपया मिळणेस विनंती आहे.
Question by अजय जयसिंग चव्हाण
13-11-2025
ajayjchavan@yahoo.com
श्री पानबुडे साहेब, धन्यवाद, माझ्या दि २८.१०.२०२५ च्या प्रश्नाबाबत आपण मला तहसीलदार यांना लेखन प्रमाद दुरुस्ती अर्ज करायला सांगितले आहे. साहेब मी तसा अर्ज केला आणि त्यांनी मला तरीही उप विभागीय अधिकारी यांना अपील करावे असे पत्र दिले आहे. अपील करणे त्रासदायक व खर्चिक आहे. आम्ही वरिष्ठ नागरिक असून हतबल झालो आहोत.
आपण प्रांताधिकारी यांचेकडे सध्या कागदावर लिहून हि अपील दाखल करू शकता .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Milind
09-11-2025
milind.kshirsagar94@gmail.com
नमस्कार सर,माझा प्रश्न खालील प्रमाणे
आजोबा १९८० साली वारलेत.
ते वारले तेव्हा एक जमीन त्यांनी गहाण ठेवली होती.त्यांनी
माझ्या वडिलासह तीन मुले आहेत.
ती गहाण जमीन नंतर सोडवून घेतली पण चुलत्यांनी फक्त स्वतः च नाव लावलं.वडिलांच व अजून एका चुलत्यांच नाव ते बाहेरगावी असल्याने लावलं नाही.
आजोबांच्या बाकी सर्व जमिनीवर तिघांची नावे आहेत.पण गहाण जमीन सोडवली त्यावर फक्त एकाच नाव आहे.पैसे तिघांनी दिले होते.
ती जमीन आता त्यांनी परत मुदत गहाण ठेवली आहे.
जर माझ्या वडिलांच व अजून एका चुलत्याच नाव लावायची असेल तर काय प्रोसेस असेल??
जर आता त्यावर
गहाणाचे विमोचन( redemption) झालेवर , ज्या फेरफाराने केवळ आपल्या एकाच सन्मानीय चुलत्यांचे नाव दाखल करण्यात आले त्याविरुध्द प्रांत अधिकारी महोदय यांचेकडे अपील करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by N g dharpale
09-11-2025
navnathdharpale@gmail.com
नमस्कार सर दोन भूमापन क्रमांक आहे 115व 116 भुनकशा नुसार दोन्ही भूमापन क्रमांक मधील हादद रेषा दक्षिण उत्तर आहे व जागेवर पुर्व पछीम आहे आज पर्यंत दोन्ही भूमापन क्रमांक ची कोणतीही सरकारी मोजणी झालेली नाही गटबुकाची प्रमाणित नक्कल काढली आसता त्यामधे भुनकशा स्केल प्रमाणे आहे दोन्ही गटनंमबर त्या खाली दोन्ही गटनंबर चा कच्चा विनासकेल चा नकाशा आहे त्यावर भगवान व नारायण नावे लिहलेली आहे तो जागेवरील वहीवाटीशी जुळतो पण तो विनासकेल चा आहे सध्या आपडेट आसलेला भुनकशा 1965 साली झालेल्या सर्वे नंबर च्या वाटनीपञाचा आहे नंतर 1970ते 1971 एकत्रीकरण योजनेंतर्गत दोन्ही गटातील आरधी आरधी जमीन एकमेकांना जोडण्यात आली परंतु 1965 bhunksha तसाच ठेवून नकाशावर विनासकेल नकाशा काढण्यात आला योग मार्गदर्शन आपेकशा
.
मुल जमाबंदी / बंदोबस्त मोजणीच्या आधारे , हद्द/ सीमा निछिती करून , नवीन भूमापन नकाशा मिळणेबाबत आपण उप-अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे अर्ज करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by SOHAM
01-11-2025
sohamzambre20@gmail.com
सातबारा वरील अज्ञान पालक फेर कमी करण्यासाठी काय करावे लागेल.
हिंदू अज्ञानत्व व पालकत्व अधिनियम , १९५६ नुसार - अज्ञान व्यक्तीची जमीन मा . न्यायालयाच्या परवानगीशिवाय विक्री करता येत नाही . १८ वर्ष पूर्ण झाल्यावर जन्म दाखला व अर्ज सादर करून अशी अज्ञान व्यक्तीची नोंद कमी होईल .व्यक्ती अज्ञान असेपर्यंत केवळ न्यायालयाच्या परवानगीने अश्या जमिनीची विल्हेवाट अज्ञान व्यक्तीच्या कल्याणासाठी लावता येते .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Abhishek Keshav Masurkar
29-10-2025
abhishekmasurkar219@gmail.com
सर , माझा प्रश्न असा आहे की , उत्पन्नाचा दाखला ( Income certificate) (तहसिलदार) हे फक्त वडिलांच्याच नावाने तयार होते का ?
आपले वय १८ वर्षे पूर्ण झाले असेल व आपले काही उतपन्न असेल तर आपणालाही असा उत्पन्न दाखला मिळू शकतो . मात्र उन्नत व प्रगत गटात मोडत नाही यासाठी आपल्या वडिलांच्या उप्त्पन दाखल्याची आवश्यकता आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Abhishek Keshav Masurkar
29-10-2025
abhishekmasurkar219@gmail.com
माझ्या जन्म प्रमाणपत्रावर ( Birth certificate) वर माझे व माझ्या आई -वडीलांचे फक्त आडनाव चुकविलेले आहे , तर मला जन्म प्रमाणपत्रातील आडनाव दुरूस्तीसाठी काय करावे लागेल ?
आपणाला राजपत्रात आपले बरोबरचे नाव प्रसिध्द करावे लागेल. व त्याआधारे आपल्या सरकारी अभिलेखात बदल करता येतील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अजय जयसिंग चव्हाण
28-10-2025
ajayjchavan@yahoo.com
धन्यवाद श्री पानबुडे साहेब , माझ्या दि १३-१०-२०२५ च्या खालील प्रश्नाचा खुलासा केला . माझ्या प्राशन मध्ये नमूद केल्या प्रमाणे साहेब मी सदर लेखन प्रमाद चूक कलम १५५ अन्वये रद्द करण्यासाठी अर्ज केला असता तहसिलदार यांनी मंडल अधिकारी यांच्या अहवालाचा संदर्भ देऊन मला उप विभागीय अधिकारी यांना अपील करावे असे पत्र दिले आहे. मी वरिष्ठ नागरिक मुंबई येथे रहात असून या बाबत काय करावे. मंडल अधिकारी यांनी त्या प्रमाणे अहवाल दिला आहे. अपील करणे म्हणूजे वकील करणे, कार्यालयाच्या फेर्या मारणे, तहसिलदार कार्यालयाच्या चुकीची शिक्षा आम्हाला होत आहे. काय करावे?
आपण तहसीलदार यांचे कडे लेखन प्रमाद दुरुस्ती अर्ज करा . आणि त्यांचेकडून लेखी उत्तर मागा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Chetan Shinde
22-10-2025
chetanbshinde@gmail.com
वासोळे तालुका वाई येथील सातबारा नोंद करायची आहे तर कुठे करावी
जर वारस नोंद असेल तर आपणाला आपल्या गावच्या तलाठी यांचेकडे जावे लागेल . मात्र जमीन खरेदीची नोंद असेल तर , दस्त नोंदणी झाल्यावर सबंधित तलाठी यांचे दुय्यम निबंधक यांचेकडून online पद्धतीने जातो .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गजेंद्र
16-10-2025
gajendrabansod111@gmail.com
ग्रामपंचायत ला शासकीय योजनेसाठी महसूल विभागाची जमीन मागणी करावयाची असल्यास मोजणी फी भरावी लागेल काय?
Question by saga patil
15-10-2025
sp109391@gmail.com
माझा प्रश्न असा होता की तहसीलदार यांनी काढलेल्या आदेशाप्रमाणे मंडळ अधिकाऱ्यांनी व तलाठ्यांनी स्वतः येऊन अगोदर नोटीस काढून करून दिलेला रस्त्याची नोंद सातबारा वरती इतर हक्कात किंवा ग्रामपंचायतीकडे किती दिवसात तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्यांनी करणे आवश्यक आहे
आणि तो अहवाल मंडळ अधिकाऱ्यांनी तहसीलदार किंवा प्रांतांच्याकडे किती दिवसात सादर करणे आवश्यक आहे
Question by अजय जयसिंग चव्हाण
13-10-2025
ajayjchavan@yahoo.co
२०१७ मध्ये मंडल अधिकारी यांनी संगणकीकृत आणि हस्तलिखित ७/१२ तंतोतंत जुळण्यासाठी शासन परीपत्रक चा संदर्भ देऊन ४५ पानांचा फेरफार अन्वये गावातील ७९ गटांच्या ७/१२ मधील भिन्न प्रकारचे चुका दुरुस्ती केल्या. त्या अन्वये माझ्या ७/१२ मध्ये इनाम व वतन चा शेरा मारला जो पहिला कधीच नव्हता. मला लक्षात आले नाही. आता मी जून हस्तलिखित ७/१२ जोडून कलम १५५ किंवा तहसीलदार स्तरावर त्यांनी त्यांच्या कार्यालयाच्या चुकीची दुरुस्ती करावी व शेरा कमी करावा ही विनंती केली असता मंडल अधिकारी यांच्या अहवालानुसार तहसीलदार यांनी प्रांत कार्यालयाकडे अपील करावे असे सुचविले . आमची चूक नसताना मनस्ताप दिला. वकील करावा लागेल. काही मार्ग आहे का?
आपण अर्ज केला आहे का ? अर्ज केला असल्यास , तहसीलदार यांनी आपण अपील दाखल करावे असे लेखी उत्तर दिले आहे का ?
निर्देशित केलेली चूक हि लेखन प्रमाद चूक आहे . तहसीलदार कलम १५५ खाली ती दुरूस्त करू शकतात . त्यांनी दुरूस्त करणे त्यांचे कर्तव्य / जबाबदारी आहे . या शिवाय तहसीलदार महसूल संहितेच्या कलम २५८ खाली , पुनर्विलोकन कार्यवाही चालवून ही , आढळून / निदर्शनास आणून दिलेली चूक दुरूस्त करू शकतात
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रोहित पंढरीनाथ शिवशरण
13-10-2025
roc28391@gmail.com
अपील करण्यासाठी 20 वर्ष झाले आहे तरी अपील करता येते का व त्यासाठी वीस वर्षाचा विलंब माप होतो का
महसूल संहितेच्या कलम २५१ अन्वये, आपली दाखल करण्यास जो कालावधी दिलेला आहे त्या कालावधीमध्ये जर अपील दाखल करता आले नाही व त्याबाबत अपील करणारा या कडे सबळ कारण असेल व त्याबाबतची खात्री, अपील प्राधिकार्याची झाली तर असे अपील विहित मुदतीनंतरही दाखल करून घेता येते .
विलंब माफीच्या मुद्द्यावरती विविध उच्च न्यायालय व माननीय सर्वोच्च न्यायालय यांचे विविध निर्णय आहे. या निर्णयांमध्ये मुख्यतः दोन प्रवाह दिसून येतात.
१. पहिल्या प्रकारात- प्रत्येक दिवसाचा विलंब अपील करणाऱ्या व्यक्तीने कारणांसह स्पष्ट केला पाहिजे.
२. दुसरा प्रवाह म्हणजे, प्रकरणात गुणवत्ता असे तर विलंब माफीचा मुद्दा गौण ठरतो.
विलंब माफ करणे ही थोडीशी व्यक्तीसापेक्ष बाब आहे. आपणाला ज्या अपील प्राधिकार्याकडे अपील दाखल करावयाचे आहे त्यांना झालेल्या विलंबाबाबत योग्य ते स्पष्टीकरण द्यावे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vikas sanap
13-10-2025
vikassanap1993@gmail.com
सर नमस्कार
1. माझा प्रश्न असा आहे की 1981 ला पाझर तलाव साठी क्षेत्र भूसंपादन झाले पण भूसंपादन नकाशा बघितल असता त्यामध्ये हद्दीच्या खुणा चुकलेल्या आहेत तर त्या भूसंपादन नकाशा मधे दुरुस्ती होऊ शकते का?
2. भूसंपादन पुढच्या बाजूने झाला आणि पाझर तलावाची भिंत शेवटच्या टोकाला बांधलेली आहे त्यामुळे पाणी सगळा मालकीच्या क्षेत्रात जमा होत काय करावे लागेल
3. काही क्षेत्रात भूसंपादन झाले नाही तरी त्यात पाझर तलाव ची भिंत आणि पाणी जाण्याची सांड काढलेली आहे त्यामुळे आमच शेतीच नुकसान होत आहे तर त्यामध्ये काय करावे लागेल
4. ग्रामपंच्यांत ने पाझर तलाव क्षेत्र समजून कोणती ही मोजणी न करता माझ्या क्षेत्रातून माती आणि मुरूम उत्खनन करून माझे नुकसान केले आहे
मार्गदर्शन करावे
ही विनंती
१. भू संपादन नकाशा यात आता दुरुस्ती करता येणार नाही .
२. मात्र आपण जलसंपदा विभागाकडे अर्ज करून , होणार्या नुकसानीबाबत , मोबदला मागणी करावा .
३. जमीन संपादन न करता , आपल्या जमिनीतून पाण्याचा सांडवा काढला असेल तर , जमीन संपादन करणे बाबत जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करावा .
४. जलसंपदा विभागाने याबाबत आपणास , दाद न दिल्यास आपणास , न्यायालयात जाता येईल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Anand Mole
10-10-2025
anandmole7337@gmail.com
ई- मोजणी व्हर्जन २ ची संपूर्ण माहिती मिळणेबाबत
Question by Mahesh Kadam
07-10-2025
maheshkadam8199@gmail.com
शासकीय जमीन मालकी हक्काने देताना 1961 व 1962 च्या कबुलायती अटी मिळण्याबाबत
शासकीय जमीन मालकी हक्काने दिली जात नाही . अशी शासकीय जमीन केवळ वापरण्यासाठी व तिचा उपभोग घेण्यासाठी दिली जाते . तिच्या हस्तांतार्नावर निर्बंध असतात .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Mahesh Kadam
07-10-2025
maheshkadam8199@gmail.com
सर जमीन भोगवटादार 2 मध्ये जमीन स्वतः करण्याचा अटीवर दिलेली असेल आणि जमीन दुसरा कसत असेल 12 वर्षे त्याची कागदोपत्री नोंद असेल तर त्याला कूल कायदा लागु होईल काय? ती जमीन आता सरकार हक्क असेल तर जमीन 12 वर्षे करणारा व्यक्ति नावावर करू शकतो का? ही जमीन दुसर्या व्यक्तीने खरेदी करण्याचा प्रयत्न केलेने जमीन शर्त भंग झाली आहे त्यामुळे सध्या सरकार हक्क आहे.
प्रतिसाद :
शासनाने प्रदान केलेली जमीन ही भोगवटादार वर्ग दोन म्हणून तिचा धारणाधिकार असतो. शासनाने जमीन प्रदान केल्यावर त्याच व्यक्तीने ते जमीन कसणे आवश्यक आहे. व जमीन प्रदान आदेशामध्ये या अटी व शर्तीचा उल्लेख असतो. जर ती व्यक्ती स्वतः जमीन करत नसेल तर सदर जमीन शासन जमा केली जाते.
नवीन प्रश्न मी सशस्त्र दलात कार्यरत आहे तर ती जमीन मला मागणीसाठीचा अर्ज फॉरमॅट मिळावा मिळेल काय याची माहिती मिळावी
अर्जाचा असा नमुना विनिर्दिष्ट केलेला नाही . आपण सध्या कागदावर अर्ज तयार करून जिल्हा कार्यालयात जमा करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राहुल झिंगुसिंग राजपूत
06-10-2025
rauhlrajput48@gmail.com
सर, माझे आजोबा यांनी 60/65 वर्षे पुर्वी शेतजमीन खरेदी केली होती. आजुबाजुला पडिक जमीन असल्याने शेत रस्ता असेल परंतु वापर केला नाही.पडिक क्षेत्रातुन वापर केला , परंतु आता सर्व शेतकरी शेती करु लागले. कुणासही ठाऊक नाही कि, वहीवाट रस्ता कुठे आहे . शेतात येणे,जाणे . माल बाहेर काढने यास त्रास होत आहे. काय करावे
आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४३ खाली रस्ता इतर शेतकऱ्यांच्या बांधावरून जाण्यासाठीचा अर्ज , आपले तहसीलदार यांचेकडे करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अजय जयसिंग चव्हाण
04-10-2025
ajayjchavan@yahoo.com
वर्ग 2 जमिनीचा 32 म झाल्यानंतर वर्ग 1 करण्यासाठी 40% आकारणी रक्कम फक्त रु 31 आहे. ही रक्कम अती अल्प असल्याने नियमानुसार त्याचे चलन ची किमान रक्कम किती आहे.
Question by Abhishek Keshav Masurkar
02-10-2025
abhishekmasurkar219@gmail.com
माझ्या नावावर वडिलोपार्जित शेतजमीन आहे , आणि मी आता सज्ञान झालो परंतु , माझे वडील सध्या कौटुंबिक वादातून स्वतः माझी जमीन मला कायदेशीर हक्क असतांनाही मला शेतवहिती करण्यास प्रतिबंध निर्माण करीत आहेत. तरी त्यासाठी मला कोणती कायदेशीर पद्धत वापरावी लागेल ?
आपणाला अश्या वडिलोपार्जित जमिनीमधील हिस्सा वाटप करून मिळणेबाबत न्यायालयात दावा दाखल करावा लागेल . न्यायालय , आपला जमिनीतील हिस्सा निच्छित करेल , नंतर महसूल यंत्रणेकडून सरस निरस वाटप होऊन आपल्याला जमिनीचा ताबा देतील . मात्र हि खूप लांबलचक व किचकट प्रक्रिया आहे . वडिलांशी सौदार्हाय पूर्ण / प्रेमळ वागून , त्यंचे मन जिंकून घ्या व त्यांचे कडून जमीन दान करून घ्या .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अजय जयसिंग चव्हाण
26-09-2025
ajayjchavan@yahoo.com
1963 चा ७/१२ मध्ये क्षेत्र 35 गुंठे आहे. त्यामध्ये 6,6,7,15 अशी फक्त आणेवारी असून सामंजस पणे वहिवाट आहे. वाटप पत्र नाही. 1963 साली 35 गुंठे क्षेत्र असल्याने तुकडा असे नमूद केले आहे. परंतु आता जिरायत किमान क्षेत्र २० असल्याने तुकडा शब्द कमी होईल का?
तत्कालीन राजपत्र नुसार तुकडा म्हणून जाहीर केलेले क्षेत्र आहे प्रमाणभूत क्षेत्र आता जरी कमी झाले तर पूर्वलक्षी प्रभावाने कमी झालेले नाही त्यामुळे आपले गटावरील तुकडा कमी होणार नाही तथापि आज रोजी तुकडा कमी /नियमाकुल करणेसाठी नियमानुसार अर्ज तहसिल कार्यालयात सादर करावा
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by शैलेश बाबासाहेब खरात
25-09-2025
skharat2242@gmail.com
नमस्कार सर
सर माझ्या आजोबांनी 1990 साली महार वातानाची 4 एकर जागेपैकी 5 गुंठे खरेदी केली होती त्यावेळी त्यांनी 7/12 वर नाव नोंदीवलं नाहीं पण आत्ता आजोबा expire झालेत मग वडिलांचे नाव पण 7/12 वर नोंदवले नाहीं तलाठी साहेबांनी सर मला कर्ज काढण्यासाठी bank noc मागत आहे तहसीलदार कडून ते equitable mortguage करनार आहेत त्या साठी मला सहकार्य करावे
सदर व्यवहार तुकडे बंदी कायद्या विरुद्ध आहे तसेच आपण सक्षम अधिकारी यांची परवानगी खरेदी खत मध्ये आहे का ते तपासावे तदनंतर काही कायदेशीर मार्ग सांगता येईल
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by Bhushan vartak
23-09-2025
shilparaut35@gmail.com
नमस्कार सर मी भूषण वर्तक वसई येथे राहत असून आमच्या कुटुंबाची सामायिक जमीन आहे ज्यामध्ये माझ्यासह माझे चुलत भाऊ तसेच चुलत भावांची मुलं असे सर्वांचे नावे आहेत. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर सदर जमिनीवर माझ्या आईचे आणि आम्हा तिन्ही भावांचे नावे चढलेली आहेत सदर जमिनीवर माझ्या चुलत भावांची किंवा चुलत भावांच्या मुलांची जमिनीवर नाव आहेत अशा सर्वांनी काही जमिनीवर जर माझ्या आईच्या नावाने विना मोबदला हक्क सोडा केला तर त्यावर स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल का किंवा किती स्टॅम्प ड्युटी लागेल.
Question by Abhishek Keshav Masurkar
15-09-2025
abhishekmasurkar219@gmail.com
गायराण /गावठाण जमीन ही ग्रामपंचायतीच्या ठरावाने /संमतीने एखाद्या धार्मिक शिक्षण संस्थेस देता येऊ शकते का ? आणि तशी जमिन देण्याबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी प्रतिबंध निर्माण केलेले आहेत का ?
महसूल संहितेच्या कलम २२- अ अन्वये , केवळ राज्य शासन / केंद्र शासन यांना सार्वजनिक उद्देशासाठी गायरान जमीन वळती करता येते . खाजगी प्रकल्पाही अशी जमीन देता येते त्यासाठी , जेवढी जमीन वळती करण्यात आली आहे त्याच्या दुप्पट जमीन गायरान यासाठी द्यावी लागते .
उपरोक्त गायरान जमीन वळती तेंव्हा केली जाते ज्यावेळेस गावामध्ये अन्य जमीन शिल्लक नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3400 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
