जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Jayesh N Nair
30-11-2022
jayeshkumarnair29@gmail.com
सर, मी सन २००७ साली १/३ अविभक्त हिस्सा शेतजमीन, खरेदीखताने घेतला होता. जमीन खरेदीखतापूर्वी तीनही भावांचे वाटणीपत्र झाले होते. सरकारी मोजणी झाल्यानंतर सदर जागेवर क्षेत्र कमी भरले आहे. तसेच सदर जागेवर आम्ही काम चालू केले तेव्हा बाकी दोन भावांनी त्यांच्यामध्ये आपआपसात वाटप झालेले नसून आम्ही आमचे जागेवर चालू केलेल्या कामाला अडथळा निर्माण करत आक्षेप घेत दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल केला होता. सदर दाव्याचे कामकाज पूर्ण होऊन त्याबाबतचे न्यायनिर्णय आमच्या बाजूने लागला असून सदर आदेशामध्ये "आमचे दावा मिळकतीतील शांततामय कब्जेवहिवाटीस प्रतिवादी यांनी स्वतः अगर इतरांमार्फत हरकत अडथळा करू नये अशी निरंतर ताकीद देणेत येत आहे." असे नमूद केले आहे. सदर निर्णयानाविरुद्ध कोणीही अपील केलेले नाही.
सदर जमीन आम्ही राहत असलेल्या ठिकाणाहून खूप लांब असल्यामुळे तेथे येणे जाणे सहसा होत नाही. परंतु अलीकडे आम्ही आमच्या मालकीच्य क्षेत्रात गेलो असता आमच्या जमिनीच्या चारही बाजूकडील जमीन मालकांनी ( दोन भाऊ व इतर जण ) बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून बराचसा भाग त्यांच्या ताब्यात घेतले असल्याचे आढळून आले. तरी माझ्या जमिनीवरील बेकायदेशीर अतिक्रमण हटविणेकरीता कायदेशीर मार्ग सुचवावे तसेच सदर गटाची पोटहिस्सा मोजणी (१/३ भागात) करण्यासाठी काय करावे, कारण इतर दोन्ही जमीन मालक संमत्ती देत नाही. मला माझ्या क्षेत्रावरील अतिक्रमण हटवून वेगळा ७/१२ उतारा करण्यासाठी मार्गदर्शन करावे ही विनंती.
न्यायालयाने अडथळा करणाऱ्या इतर सह धारक यांचे विरुद्ध मनाईहुकूम आदेश दिलेला आहे. आपण सह -धारकांनी आपल्या जागेवर केलेल्या अतिक्रमणाबाबत त्याच न्यायालया त निदर्शनास आणून द्या की दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आलेले आहे. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झालेला आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सचिन उगले
30-11-2022
sachinugale14@gmail.com
आमच्या आजोबांनी मुलगी नोकरांची सोसायटी गाव मुकींदपूर तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी 28 वर्षांपूर्वी चार गुंठ्याचा प्लॉट खरेदी केला होता. ही सोसायटी मुलकी नोकरांसाठी ते तात्कालीन कलेक्टर साहेब यांनी मंजूर केली होती. वन खात्याची क्लास टू जमीन होती. आजोबांचे वय आता 85 वर्षे आहेत ते हयात आहेत. आजोबांनी ही चार गुंठे जागा रीत सर खरेदी केली होती 1992 ला. परंतु त्यांनी कलेक्टर परमिशन जी काढावी लागते ते पत्र त्यांच्याकडे नाही. म्हणून माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर व तहसीलदार नेवासा तिकडून शरथभंगाची नोटीस आलेली आहे. ही रक्कम 23 लाख रुपये आहे. आम्ही नेवासा कोर्टामध्ये देखील अपील केलेले आहे. मात्र आता आठ डिसेंबर पूर्वी फायनल नोटीस आलेली आहे. नियम कुल करण्याचा नवा जीआर देखील एक टक्का घेण्याचा आलेला आहे. सोलापूरला अशा केसेस माननीय मुंडे साहेबांकडे देखील होत्या. आपलं मार्गदर्शन मिळावे ही विनंती
जमीन जर वनखात्याची असेल तर अशी जमीन निर्वणीकरण झाल्याशिवाय नागरिकांना घरे बांधण्यासाठी अथवा रहिवासासाठी दिली जात नाही. अशा जमिनीचे प्रथम निर्वनीकरण होणे आवश्यक आहे.
आपण आपल्या उत्तरामध्ये शर्तभंग झाल्यामुळे रक्कम रुपये 23 लाख इतका दंड झाल्याचे नमूद केले आहे. आहे त्यामुळे ही जमीन कदाचित वनखात्याची नसावी. सातबारा/ मिळकत पत्रिका याचे अवलोकन करून जमिनीचे स्वरूप कोणते आहे ते निश्चित करून घ्या. तसेच शर्तभंग झाल्याबाबत जी नोटीस आपणाला जिल्हाधिकारी/ तहसीलदार यांच्या कडून प्राप्त झालेली आहे त्याचे शांतपणे वाचन करून आपण आपला पुनर प्रश्न विचारू शकता.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ankush Ghadi
30-11-2022
rupeshghadi481985@gmail.com
मी अंकुश पांडुरंग घाडी, राहणार जोगवल वाडी, नारीग्रे, ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग .मी 2019 पासुन तलाठी साहेंबाकडे अर्ज करतो की माझ्या वडीलांच्या मुत्यु नंतर माझे व माझ्या भाऊ /बहिणींची नावे 7/12 उताऱ्यावर नोंदविण्यात यावी. परंतु अद्याप पर्यंत माझ्या अर्जावर काहीही कार्यवाही करण्यात आली नाही आहे.
आपण देवगड तहसीलदार यांच्या निदर्शनास सदरची बाब आणून द्यावी. अथवा संबंधित तलाठी यांना वारस नोंद का करत नाही याबाबत आपण लेखी उत्तर मागावे. तसेच आपले सरकार या वेब पोर्टल द्वारे ही आपण तक्रार दाखल करू शकता.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राजेंद्र कोळी
29-11-2022
koli02604@gmail.com
वस्तीपड जमीन म्हणजे काय
Question by KANTA AIYAR
29-11-2022
kvaiyar@gmail.com
1) Immovable property bearing CT survey no. G509 to 11 of village Bandra got converted as plot no. 28 under town planning scheme no. IV of Santacurz w.e.f 1965. The same got varied and plot no. 28 became 204.
2) In the 1970 pursuant to the application made by the owners, the final plot no. 28 was divided into 28A and 28B.
3) When the said town planning scheme was varied the plot no. 204 was shown as plot 28 and not as plots 28A and 28B.
4) On the said plot there are 2 different owners and 2 different societies standing.
5) On plot no. 28B the conveyance is also given showing whereas plot no. 28A has no conveyance till today.
6) Town planning department as also the city survey department are not showing the correct sub divided plot numbers. Atleast they should continue to show the sub divided old plot numbers 28A and 28B. How to rectify this mistake?.
7) We have noted that even property cards issued after the sub division post 1970 also does not reflect the correct plot numbers and because of the mistakes done by the town planning department of not recording sub division of plot 28A and 28B in there records and subsequently not giving effect to new no. 204 in place of plot 28 while varying the town planning scheme, even varied plot is shown as plot no. 204 in town planning but not in official records. Due to this issue the Society is stuck and unable to take conveyance. Please advise to resolve this issue.
A better solution would be to apply the Superintendent of Land Records, Mumbai Suburb, to measure the entire old CTS NO/TPS No 28 according to the existing possession and amend the record according to the subsequent divisions.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by RIzwan Sajjad Kanji
29-11-2022
riz3@hotmail.com
my father has removed my mother from the property by providing a fraudulent documents and fraud power of attorney, and my father has transferred the piece of land on which the house has been build in his name in all the goverment office and in the goverment records too.
Could you file the complaint in court, assailing the forged documents based on which the father got the mother's name deleted from the government record?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sameer Mayekar
28-11-2022
sameer.mayekar@gmail.com
माननीय महोदय.
माझी स्वतःच्या मालकीची शेत जमीन आहे व स्वतंत्र सात बारा आहे . हि शेत जमीन रत्नागिरी असून ती ३४ गुंठे आहे . शेत जमीन हि वरकस क्षेत्रात मोडते. हि जमीन मी विकू इच्छितो परंतु विकत घेणाऱ्यांचे वकील सांगत आहेत कि कलेक्टर परमिशन घ्यावी लागेल कारण हि जमीन जुन्या काळी एका मोठ्या होती व हा स्वतंत्र सात बारा असला तरीही कॉलेक्टर परमिशन घ्यावी लागेल. सादर जमीन मी २०२० साली विकत घेतली व माझे नाव सात बारा वर चढले आहे , तेव्हा मला अश्या कोणत्याच कलेक्टर परमिशन ची गरज भासत नाही. तसेच नुकतेच माझ्या निदर्शनास गव्हर्नमेंट चे नोटिफिकेशन आले जे स्पष्टपणे सांगत आहे कि वरकस जमीन रत्नागिरी जिल्हा २० गुंठे च्या वर असेल तर जमिनीचे व्यवहार होऊ शकतात.
तेव्हा कृपया मार्गदर्शन करावे.
समीर मयेकर
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वर्कस जमिनीसाठी प्रमाणभूत क्षेत्राचे प्रमाण किती आहे आहे याची पडताळणी तलाठी यांच्याकडून करून घ्या. आपल्या म्हणण्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वर्कस जमिनीसाठी प्रमाणभूत क्षेत्राची मर्यादा 20 गुंठे एवढी असेल आणि आपल्याला विकावयाची शेत्र 34 गुंठे असेल तर निश्चितच आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नाही. आपण आपला विक्री दस्त तयार करून सब रजिस्टर यांच्याकडे सादर करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by suresh shivalkar
28-11-2022
sujay@podar.org
Rules for renewal of lease of land in Mumbai city if it has expired
You apply to the Collector Mumbai City for renewal of the lease. Could you request a copy of the Government Resolution for lease renewal to the Collector Office? Or GRs are available on the Government website.
New Rules have been framed by the Government of Maharashtra, which provides for converting leasehold property into freehold property.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विवेक के कोंडावर
28-11-2022
vkkondawar@gmail.com
१९८१ साली आम्ही 'टेनंट कोपार्टनरशिप' हौसिंग सोसायटी रजिस्टर केली (Under Maharashtra Cooperative Societies Act 1960)
१९८४ मध्ये १२ फ्लॅट्स बांधून १२ सभासदांना allot केलेत.
१९९८-९९ मध्ये घेतलेल्या कर्जाची व्याजासह परतफेड केली त्यानंतर फक्त इमारतीची देखभाल हेच काम होते सोसायटीकडे
२०१४-१५ च्या सुमाराला माहितीच्या अधिकारात केलेल्या प्रश्नावर 'हि संस्था कार्यालयाचे appendix मध्ये नसल्याचे' उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाने कळविले. Apeal केल्यनंतरही अधिक माहिती मिळाली नाही
आमचे नाव आखीवपत्रावर येण्याकरिता आम्ही 'अपार्टमेंट ऍक्ट' प्रमाणे संस्था रजिस्टर करून विक्री-पत्र register करू शकतो काय? आणि विक्रीपत्र करून देण्याचा अधिकार कुणाकडे राहील?
आम्ही सर्व कर्ज फेडले आहे. आखीवपत्रावर नाव आल्याशिवाय आम्हाला फ्लॅट विकता येणार नाही म्हणून हि विचारणा.
आम्ही बहुतेक सर्व सभासद वेगवेगळ्या व्याधींनी ग्रस्त वृद्ध आहोत. आपल्या मार्गदर्शनाबद्दल अत्यंत आभारी राहू.
संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याखाली नोंदणीकृत झाली आहे पण अद्याप सोसायटीचे नाव मिळकत पत्रिकेवर आले नाही असे आपल्याला म्हणायचे आहे का ? आपण मानीव अभिहस्तांतरण करून मिळण्यासाठी निबंधक सहकारी संस्था यांचेकडे अर्ज करा . निबंधक सुनावणी घेउन , संस्थेच्या नावे , बांधकाम ज्या जागेवर उभे आहे , ती जागा करण्यासाठी , आदेश देतील . त्याप्रमाणे दस्त तयार करून , दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करा . संस्थेचे नाव जागेला लागेल .
या शिवाय हि आपण Maharashtra Apartment Owner's Act नुसार Declaration करून नोंदणीकृत केल्यावरही सोसायटीचे नाव जागेला लागेल .
दोन्हीपैकी एक पर्याय आपण निवडू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by BALKRISHNA GAVJI DEVRE
28-11-2022
b.devre2005@gmail.com
माझ्या शेतजमिनीवर अतिक्रमण झाले असून त्या संदर्भांत कोर्ट केस चालू आहे कोर्ट रिसिव्हर कडून मोजणी चे आदेश होऊन मोजणी पण झाली आहे .मोजणी कर्मचारी यांची साक्ष झाल्यानंतर मला खात्री आहे कि निकाल माझ्या बाजूने होणार तरी निकाल लागल्या नंतर मला जमिनीचा ताबा घेण्यासाठी तहसील कार्यालयाची मदत घ्यावी लागेल का. ताबा घेते वेळी पोलिसांची मदत घ्यावी लागणार का. कृपया मार्गदर्शन करावे
कोर्ट या बाबत आदेश देईल . ज्याने तुमच्या जागेवर अतिक्रमण केले आहे त्यालाच ताबा देण्यास कोर्ट फार्मावावते . नाही ऐकले तर बेलीफ मार्फत अथवा कोर्ट कमिशनर मार्फट ताबा दिला जातो
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by K.V.Aiyar
28-11-2022
kvaiyar@gmail.com
Howto use your website? Is there are option to change language from Marathi to English
There is no option to convert the website's content, which is already in the Marathi Language, into English. But you can ask a question in English; we will endeavour to reply.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दिनेश दाभोळकर
28-11-2022
dabholkar.dinesh@gmail.com
आमच्या सातबारा मध्ये ( A ) याचे नाव पूर्वी सामायिक जमिनीत होते ,आणि इतर हक्क मध्ये पण दिसत आहे , पण सन १९५८ मध्ये मंजूर फेरफार प्रमाणे ( A ) नाव इतर हक्क मधून निघून गेले . आज आमची वहिवाट असून सुद्धा ( A ) यांच्या पुढील पीडीने भोगवटा नाव कशी दाखल करू शकतात , म्हणजे जर आम्ही इतर हक्क मधून नाव निघून गेले आहे हा फेरफार जोडून तहसीलमध्ये
( A ) यांच्या पुढील नाव वर हरकत किंवा केस दाखल करू शकतो का ??
Question by BALKRISHNA GAVJI DEVRE
28-11-2022
b.devre2005@gmail.com
मौजे - अंजप ,तालुका - कर्जत ( रायगड ) येथे आमची ४ एकर बिनशेती ( २०१६ रोजी ) जमीन असून भोगवटादार सदरी एकूण ४ भागीदारांची नावे आहेत व त्यांचा प्रत्येकी समान हिस्सा आहे त्या पैकी एका भागीदाराने आपली १ एकर जमीन एका कंपनीला विकली असून त्या भागीदाराचे नाव जाऊन ७/१२ वर आता कंपनी चे नाव लागले आहे . आम्हाला व कंपनी ला सुद्धा परस्पर संमतीने कंपनी ने विकत घेतलेल्या १ एकर क्षेत्राचा पोटहिस्सा करून कंपनी ला स्वतंत्र वेगळा ७/१२ करून द्यायचा आहे .तरी जमीन बिनशेती असल्या कारणाने मा. जिल्हाधिकारी - रायगड व उप संचालक नगर रचना कार्यालय - अलिबाग यांची पूर्व परवानगी आवश्यक आहे कि उप अधीक्षक - भूमि अभिलेख ( कर्जत ) यांच्या स्तरावर सदर पोटहिस्सा मोजणी करता येईल या बाबत कृपया मार्गदर्शन करावे
बिनशेती आदेशात मध्येच एक शर्थ असते ती म्हणजे जमिनीचे हस्तांतरण जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय करता येत नाही . एका भागीदाराने जमीन विकली कशी काय ? त्याचे हस्तांतरण अवैध आहे . आपणाला जिल्हाधीकारी यांची परवानगी आवश्यक आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vaibhav
27-11-2022
vaibhavband444@gmail.com
नमस्कार सर....
तुम्ही सांगितल्याप्रमाणे...ग्रामपंचायत नी 60 दिवस च्या आत दोन्ही बांधकाम परवनगीसाठी दिलेल्या अर्जांचे उत्तर दिले नाही त्यामुळे मी सेवा हमी कायदा अंतर्गत ग्रामपंचायत नी 60 दिवसाच्या आत परवानगी न दिल्यामुळे मला बांधकाम परवानगी मिळाली असं मी समजून बांधकामाला सुरुवात करतो असा अर्ज दिला.... परंतु लगेच दोन तीन दिवसांनी ग्रामपंचायतनी ठराव घेतला आणी त्यांनी नाकारण्यासाठी कारण म्हणून गावात पहिलेच तीन शाळा आहेत असे सांगून बांधकाम परवानगी नाकारली.... परंतु सर मला नवीन शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे....मी ग्रामपंचायत ला बांधकाम परवानगी मागितली होती.... आनी त्यांनी ठराव दोन दिवसापूर्वी होउन त्यांनी त्यामधे तारीख ही 60 दिवसांमधील टाकलेली आहे.... सर माझ्याजवळ वेळ खूप कमी आहे यासाठी मी काय उपाय करू शकतो मला कळवा हि विनंती....
Question by Jayesh N Nair
26-11-2022
jayeshkumarnair29@gmail.com
इनाम वर्ग ६ब महार वतन जमीन खरेदी करताना सक्षम अधिकारी यांची परवानगी लागते. सदर परवानगी मिळण्यासाठी बराचसा कालावधी जातो. सदर जमीनीचे व्यवहार करताना जमीन मालकास काही रक्कम दिल्याशिवाय व्यवहार होत नाही.
१) तरी त्यासाठी नोंदणीकृत बिनताबा साठेखत करता येईल का? असे केल्याने नियमांचे उल्लंघन / शर्त भंग होतो का ?
२) तसेच नोंदणीकृत बिनाताबा साठेखत व कुलमुखत्यारपत्र करून पुढील परवानगी मिळविण्याची कारवाई जमीन मालकांऐवजी जमीन खरेदी घेणारी व्यक्ती आपल्या नावाने अर्ज करू शकतो का ? कृपया याबाबत मार्गदर्शन करावे. धन्यवाद
Question by prakash c kharat
25-11-2022
sayalicreation2013@gmail.com
sir mala sat bara(7/12) adnyan palak che nav sadnyan palak mhanun karayache asel tar kai karave lagel kahi madat hoile kai dhanyawad
ज्याच्यासाठी अ.पा. क असा शेरा आहे त्याचे वय १८ वर्ष पूर्ण झाले असेल , तर तहसीलदार यांचेकडे अर्ज करा . सबंधित तलाठी यांना निर्देश देतील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by BALKRISHNA GAVJI DEVRE
25-11-2022
b.devre2005@gmail.com
७/१२ च्या भोगवठादार सदरी LLP कंपनी चे नाव असून त्यामध्ये दोनच भागीदार असून काही कारणास्तव त्यांना सदर ७/१२ हा कंपनी मधीलच भागीदार असलेल्या त्याच भागीदारांच्या वैयक्तिक नावे करावयाचा आहे म्हणजेच देणार आणि घेणार दोन्ही एकच असून अशा व्यवहाराला मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक आहे का ?
मुन्द्रांक शुल्क लागेल . LLP हि कायदेशीर व्यक्ती आहे . LLP कडून भागीदारांकडे हस्तांतर होत आहे . त्यामुळे दस्ताद्वारे हस्तांतर करावे लागेल . दस्तावर मुंद्र्रांक शुल्क् भरावे लागेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vaibhav Band
25-11-2022
vaibhavband444@gmail.com
सर मी ग्रामपंचायत मध्ये नवीन शाळा बांधकाम परवानगी साठी अर्ज दिला... पहिला अर्ज दिल्यावर काहीच उत्तर दिले नाही नंतर दुसरा अर्ज दिला तरी ही ग्रामपंचायत नी उत्तर दिल नाही... आज अर्ज देऊन दोन महिने होऊन गेले तरी पण ग्रामपंचायत नी अजूनपर्यंत काहीच उत्तर आणि निर्णय दिला नाही.... तर मी बांधकाम परवानगी कशी घेऊ शकतो.... जर त्यांनी लिखित परवानगी दिली नाही तर मला बांधकाम साठी लागणार कर्ज पण मिळणार नाही तर सर मी यावर काय स्टेप घेऊ शकतो.... आणि मी कर्जासाठी जर परवानगी पत्र नाही जोडलं तर मला कर्ज पण नाही भेटणार तर मी काय उपाय करू शकतो .... जेणे करून ग्रामपंचायत नी नंतर कारवाई करायला नको...
वैभव साहेब , आपण जे ग्रामपंचायातीस अर्ज दिले आहेत , त्याच्यासह गटविकास अधिकारी यांचेकडे सेवा हमी कायदा खाली अपील दाखल करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दत्तात्रय त्रिंबक सोनवणे मो.नंबर 9870767328
25-11-2022
sonavanedt7@gmail.com
सर नमस्ते एखाद्या शेत जमिनीचा किंवा पडीत जागेचा किँवा बिनशेती जागेच्या वारस नोंद फेरफार तहसील कार्यालय कडून मंजूर झालेवर त्याची नोंद भूमी अभिलेख कार्यालायास कोण कळवितो ? की भूमी अभिलेख ऑफिस मधील अधिकारी स्वतः येवून ही माहिती घेवून त्यांचे अभिलेकात नोंद करतात .? याबाबत काय नियम आहे ते कृपया खुलासा करावा ही विनंती.
Question by Ajay Philip
25-11-2022
ajayphilip75@gmail.com
विषय :- माझ्या नावे असलेल्या जमीनीवरील भविष्य निर्वाह निधी पी.एफ आणि ई.एस.आय.सी. चा बोजा कमी करणे बाबत.
महोदय,
माझ्या वडिलांनी सन १९९२ मध्ये ज्यांच्याकडून जमीन खरेदी केली होती. त्या व्यक्तीच्या नावे त्या जमिनीवर जी कंपनी होती त्या कंपनीच्या नावे प्रांत कार्यालयाकडून दि.१५/११/१९८५ पासून प्रॉव्हीडंट फंड (रु.२७,९३५/-) आणि ई.एस.आय.सी. (रु. ३७०३.३०/-) चा बोजा सदरहू जमीनीवर थकबाकी असल्याचे दिसत आहे. माझ्या वडिलांनी जेव्हा जमीन खरेदी केली तेव्हाच्या करार पत्रकात (अॅग्रीमेंट) मध्ये त्या व्यक्तीने म्हटले होते की, मी प्रॉव्हीडंट फंडाची आणि ई.एस.आय.सी. ची रक्कम सदर कार्यालयात भरणा करेन, त्यांनी ती पी.एफ. आणि ई.एस.आय.सी. च्या बोजाची रक्कम भरली परंतु आमच्याकडे भरलेल्या रक्कमेची पावती प्रत आढळत नाही.
आम्ही पी.एफ आणि ई.एस.आय.सी कार्यालयात जाऊन माहितीच्या अधिकारा अंतर्गत चौकशी सुद्धा केली परंतु आम्हाला त्यावर समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. माझ्या नावे असलेल्या ७/१२ उता-यावर तो बोजा कायम राहीला असून मला तो बोजा कमी करावयाचा आहे. त्याकरीता आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे.
आपण त्या कार्यालयात जाऊन , त्यांचेकडून त्या व्यक्तीने रक्कम भरली असल्याची खात्री करावी व तसे पत्र घ्या कि बोजा ठेवलेली रक्कम जमा केलेली आहे . ते पत्र तलाठी यांना सादर करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
आपण त्या कार्यालयात जाऊन , त्यांचेकडून त्या व्यक्तीने रक्कम भरली असल्याची खात्री करावी व तसे पत्र घ्या कि बोजा ठेवलेली रक्कम जमा केलेली आहे . ते पत्र तलाठी यांना सादर करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
आपण फेरफार पहा . कोणत्या फेरफाराने बोजा ठेवला आहे . बोजा म्हणजे lien . जर शासकीय देणी दिली नाही तर असा बोजा मिळकतीवर ठेवला जातो . मात्र जी रक्कम वसूल करावयाची त्याचे परतफेड त्याच व्यक्तीने करणे आवश्यक होते . मात्र तुमच्या मिळकतीच्या पूर्व हक्कदाराने शासकीय देणे दिले नाही म्हणून मिळकतीवर बोजा ठेवण्यात आला होता . हि बाब आपण तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून द्या . अर्ज करून अशी बोजाची नोंद कमी करून घ्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Abhilash Chavan
24-11-2022
abhilashstylecracker@gmail.com
आमची प्रॉपर्टी पनवेल मधे आहे. २०१० मध्ये एक कंपनी ने ती प्रॉपर्टी एका बँक कडे गहाण ठेवली.आम्हाला या बाबतीत काही कल्पना नव्हती. ती कंपनी fraud होती. त्या कंपनी चा मालक देश सोडून गेला. आयकर विभागाने त्याची सर्व प्रॉपर्टी जप्त केली. त्या सर्व प्रॉपर्टी मधे आमची पण प्रॉपर्टी जप्त झाली. आश्चर्य हे आहे ही आमची प्रॉपर्टी बँक कडे गहाण ठेवल्याचा एक गहाणखत पण आहे जो रजिस्टर झाला होता. तो गहाणखत registrar नी कसा रजिस्टर केला हे आम्हाला अजून समजलं नाही. आता आम्ही ही प्रॉपर्टी विकू नाही शकत. आयकर विभाग च म्हणणं आहे की हा fraud आहे आणि आम्हाला कोर्टात केस लढावी लागेल. आम्ही साधारण माणसं आहोत. हे सर्व कस करणार. आपणास विनंती आहे की कृपा करून काही मार्ग दाखवा.
प्रश्न असा आहे कि , कोणतीही कंपनी दुसर्याची मालमत्ता गहाण कशी ठेवू शकेल ? आपल्या कुटुंबातील व्यक्तीने कंपनीला विकली असेल . ७/१२ / मिळकत पत्रिका काढा . त्यावर कंपनीचे नाव कशे लागले याचा शोध , कंपनीच्या नावाखाली असलेल्या फेरफार क्रमांकावरून घ्या . गहाणखत , जर आपले मते खोटा , बोगस असेल तर , त्याला न्यायालयात अह्वणीत करा . गहाणखत जर कोर्टाने रद्द केले तरच हा व्यवहार रद्द होऊ शकतो .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Harshal Patil
24-11-2022
harshalpatil2012@gmail.com
Varg 2 te Varg 1 Jaminisathi mobdala 50© ahe ki 75%?
जमिन कृषिक कारणासाठी वापरली जात असेल तर हस्तांतरणासाठी ५० % अर्नाजीत रक्कम जमा करावी लागेल व जर अकृषिक कारण असेल तर ७५ % रक्कम .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sanjay roundhal
24-11-2022
sanjay.roundhal99@gmail.com
please advice 7/12 removing name other person
It depends upon the nature of the right and interest of the person (whose name exists in the other right column). You can go through the 7/12 extract; you will notice in the bracket, a number is written. The number represents the mutation entry number. The mutation entry tells us how that person's name appeared on the 7/12 extract. By knowing the nature of mutation entry, you can decipher his rights and interest and decide whether his name can be removed.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vaibhav
24-11-2022
vaibhavband444@gmail.com
सर मी शिक्षण विभागाकडून माझ्या गावामध्ये नवीन शाळा सुरू करण्याची परवानगी भेटली पण ग्रामपंचायत बांधकामाला परवानगी देत नाही आहे... याचावर दुसरा काय उपाय केल्या जाईल
आपण बांधकाम परवानगी साठी अर्ज केला आहे का ? ग्रामपंच्यातीस परवानगी देत नाही या बद्द;ल लेखी उत्तर मागा . गटविकास अधिकारी , जिल्हा परिषद यांना हि ग्रामपंच्यातीचे हे कृत्य निदर्शनास आणून द्या .
तत्पूर्वी सेवा हमी कायदा अंतर्गत , अपील अधिकारी यांचे कडे विहित वेळेत सेवा दिली नाही म्हणून अपील दाखल करा . त्याचा काहीही परिणाम झाल नाही तर रीत याचिका उच्च न्यायालयात दाखल करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रदीपसिंग ठाकुर
24-11-2022
Thakurpradeep2015@gmail.com
क्र.एम-30/2001/प्र.क्र.४०/ल-3 महसूल व वन विभाग मंत्रालय, मुबंई 32 दिनांक 5.7.2004 निर्णय प्रत पाहिजे व मूळ संचिका बाबत
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3400 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
