जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Vishal Dnyanoba Shinde
02-09-2022
vishalrajeshinde143@gmail.com
*साल 1971-72 या वर्षी एकत्रीकरण योजना गावात राबवण्यात आली आहे, एकत्रीकरण योजने मध्ये सर्व्हे चे गट नंबरचे क्षेत्र कमी झाले आहे.
*चालू स्थिती 7/12
सर्व्हे नं 118/1 यांस गट नंबर 503 यांस क्षेत्र 3 हेक्टर 55 आर तर
सर्व्हे नं 118/2 यांस गट नंबर 502 यांस क्षेत्र 1 हेक्टर 02 आर
असे नोंद आहे.
*सदर एकत्रीकरणी योजनेची कागदपत्र काढली असता असे लक्षात येते की, एकत्रीकरण पत्रक 9(3) व 9(4) यांस
सर्व्हे नंबर 118/1 यांस 3 हेक्टर 55 आर व
सर्व्हे नंबर 118/2 यांस 1 हेक्टर 02 आर नोंद दाखवण्यात आली आहे,
*मुळात पूर्वीचे सर्व्हे नंबर चे 7/12 पाहिले असता त्यावर
सर्व्हे नंबर 118/1 यांस क्षेत्र हे 3 हेक्टर 77 आर व
सर्व्हे नंबर 118/2 यांस 0 हेक्टर 80 आर असे नोंद आहे.
*योजनेत एकत्रीकरण पूर्वीची नोंद च कमी दाखवली आहे, 22 आर क्षेत्र हे सर्व्हे 118/1 मध्ये कमी दाखवले आहे तर सर्व्हे 118/2 मध्ये जास्त .
*एकत्रीकरण पत्रक मध्ये कमी जास्त शेरा नोंद नाही.
Question
1)एकत्रीकरण योजनेची चूक दुरुस्ती होईल का?
2)वेळ चे बंधन चुकदुरुस्ती साठी आहे का? सध्या परिस्थितीत 50 वर्षी उलटले आहेत?
3)दुरुस्ती कुठे होईल?
सल्ला मिळावा
संपूर्ण एकत्रीकरण योजना हि चुकीची असेल तरच ती दुरुस्त करण्याचे /पूर्णता रद्द करण्याचे अधिकार जमाबंदी आयुक्त यांना आहेत . केवळ जमिनीच्या एका parcel बाबत दुरुस्त करण्याचे कायद्यात तरतूद नाही . तद्वतच अशी चूक दुरुस्त करता येणार नाही .
एकत्रीकरण योज्नेन्बाबत , महसूल अधिकारी ( तहसीलदार , प्रांताधिकारी ) यांना कोणतेही अधिकार नाहीत .
आपणास या बाबत आर्थिक क्षमता , धैर्य व इच्छा असल्यास , रीट याचिका दाखल करावी .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vishal Dnyanoba Shinde
02-09-2022
vishalrajeshinde143@gmail.com
*शिवरस्त्याला सर्व्हे नंबर 118/ब हा लागून असून सर्व्हे नंबर 118/ब च्या उत्तरेस 118/अ लागून आहे.
( 118/अ
118/ब
शिवरस्ता ).
*शिवरस्ता वरून सर्व्हे नं 118/अ मध्ये जाण्यास सर्व्हे नं 118/ब मधून जावे लागते, दुसरी सोय नाही, सदर चे मालक जाण्या येण्यास अडचण देत आहे.
*( 118/अ मूळ मालक यांचाकडून विक्री होऊन पोटहिस्सा 118/ब पडला आहे )
सदर सर्व्हे नं 118/अ मध्ये जाण्यास सरबांधावरून किंवा गाडीरस्ता मार्ग यांची नोंद कोणत्या कागदपत्रात मिळेल???
व तशी सदर नोंद नसेल तर काय करावे लागेल??
सर्वे नंबर ११८/ब हा सर्वे नंबर ११८ च्या काही क्षेत्राची विक्री झाल्यामुळे तयार झाला आहे त्यामुळे नवीन सर्वे नंबरला परंपरागत वहिवाटीचा रस्ता असण्याचा प्रश्न उद्भवत नाही . त्यामुळे माम्लेतदार अधिनिअयम १९०५ अंतर्गत कोणतही न्याय मिळण्याचा मार्ग नाही .
मात्र आपण महाराष्ट्र जमीन अधिनियम १९६६ च्या कलम १४३ अंतर्गत बांधावरून जाण्यासाठी मार्ग मिळवा याकरिता तहसीलदार यांचेकडे अर्ज करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vishal Dnyanoba Shinde
02-09-2022
vishalrajeshinde143@gmail.com
मा. तहसीलदार साहेबांनी 143 अंतर्गत रस्ता दिला तर त्याचा फेरफार नोंदीला जातो का? व 712 वर नोंद काय म्हणून होती?(इतर अधिकारात किंवा रस्त्याचा अधिकार)
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 148 अन्वये प्रत्येक गावांमध्ये अधिकार अभिलेख ठेवण्याबाबत तरतूद आहे.
आहे या तरतुदीनुसार भोगवटादार, मालक, ज्याच्याकडे जमीन गहाण ठेवली आहे अशी व्यक्ती, कुळ कायदा अंतर्गत असलेली कुळे, सरकारी जमिनीच्या बाबतीतील भाडेपट्टी धारक
कुळ व सरकारी भाडेपट्टा धारक यांनी जमीन मालकाला द्यावयाचा खंड किंवा भाड्याची रक्कम
कूळ व मालक यांच्यातील परस्पर हितसंबंध
शासन व सरकारी भाडेपट्टा धारक यांच्यातील परस्परांच्या अटी व शर्ती
या बाबींचा तपशील अधिकार अभिलेख आम मध्ये नमूद करण्याची तरतूद आहे.
राज्य शासन कलम 148 च्या उपकलम इ अन्वय, नियमाद्वारे काही बाबींचा अधिकार अभिलेखा मध्ये उल्लेख करावयाची आहे, याबाबत तरतूद करू शकते.
राज्य शासनाने उपकलम इ द्वारे अद्यापही रस्त्याची नोंद ठेवण्याबाबत नियम तयार केले आहेत अशी बाब वाचनात नाही.
एकूणच कलम 148 व अधिकार अभिलेख तयार करणे व सुस्थितीत ठेवणे नियम 1971 यांचा विचार करता, तहसीलदार यांनी कलम 143 अन्वये दिलेल्या रस्त्याची नोंद अधिकार अभिलेख सदरील म्हणजे फेरफार अथवा सातबारा द्वारे ठेवण्याची तरतूद नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vishal Dnyanoba Shinde
02-09-2022
vishalrajeshinde143@gmail.com
1980 वर्षी गट नंबर 111 यास क्षेत्र 1 हेक्टर होते,
पुनर्वसन अंतर्गत 111अ यांस क्षेत्र 0.80आर (खातेदार मुळमालक) तर
111ब यांस क्षेत्र 0.20 आर ( जिल्हाधिकारी )
असे दोन 712 पत्रक तयार झाले.
पण आज तागायत सदर क्षेत्र जिल्हाधिकारी यांचाच नावे आहे
सदर क्षेत्र पुनर्वसनाचा अंतर्गत कोणाचे ही पुनर्वसन नवीन खातेदार कडे वर्ग झाले नाही.
तर हे क्षेत्र मुळमालकास परत मिळवता येईल का? योग्य सल्ला मिळावा.
पुनर्वसनासाठी राखीव असलेली जमीन , भू संपादन कायदा १८९४ च्या कायद्याखाली संपादन झालेली आहे . जुन्या भू संपादन कायद्यात , जमिन जर ज्या कारणाकरिता /वापराकरिता भू संपादन झाली होती त्यासाठी झाला नसेल तर , ती परत मुल मालकास करण्याची तरतूद नाही . मात्र अन्य सार्वजनिक वापरासाठी अश्या विना वापर पडून राहिलेल्या जमिनीची अंश्याक्ता नसल्यास , त्याचा लिलाव करण्याची तरतूद आहे . मुल मालक लिलावात सहभागी होऊन , जमीन उच्च बोली लाऊन खरेदी करू शकतो .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by श्रेयस रा. जोशी
02-09-2022
shreyasrjoshi26@gmail.com
अ शेतकरी आहे त्यांच्या नावे २२ गुंठे शेतजमीन आहे यामधील २ गुंठे जमीन ब यांना रजिस्टर बक्षीसपत्राद्वारे द्यायची आहे तर सदर बक्षीसपत्र रजिस्टर होईल का ? सातबारा मध्ये ब यांचे नाव दाखल होऊन त्याच्या समोर त्याचे २ गुंठे क्षेत्र असा उल्लेख येईल का? किंवा त्या संदर्भात माहिती मिळावी हि विनंती.
शिल्लक राहणारे क्षेत्र हे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र राहत असल्याने , अश्या जमिनीचे हस्तांतरण (महाराष्ट्र तुक्देबंदी व तुकडे जोड कायदा च्या तरतुदी विरुद्ध असल्याने ) होऊ शकत नाही . पर्यायाने अश्या हस्तांतरण दस्ताचे /बक्षीस पत्राचे नोंदणीकरण होणार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रताप शामराव चौगुले
01-09-2022
pratapchougule@gmail.com
मा.सर वडिलांना रजिस्टर मृत्यू पत्र केलेले आहे पण ते मृत्यूपत्र हे तलाठ्यांना नोंदणीसाठी दिले होते परंतु त्यावर भाऊ आई यांनी हरकत घेतली त्यावर मंडलाधिकारी तक्रार केली परंतु निकाला आमच्या बाजूने लागला त्यावरआईने प्रांताकडे अपिल केली तिथं ही आमच्या बाजूने निकाल दिला आहे आता आईने जिल्ह्याअधिकार कडे अपिल केले आहे. माझ प्रश्न असा आहे की रजिस्टर केलेले जमीन चे कागदावर महसूल कोर्टाला दावा चालवण्याचा अधिकार आहे काय?
तुमच्या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे . मात्र
मंडळ अधिकारी यांचेकडे , नोंदणीकृत मृत्य पत्राबाबत /मृत्य पत्राचे वैधतेबाबत हरकत घेतली असेल , मंडळ अधिकारी मृत्य पत्र probate करण्यास सांगू शक्तात्त . मात्र मुंबई सोडून अन्य ठिकाणी केलेल्या मृत्य पत्रास , probate ची आवश्यकता नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by SACHIN BOKAD
01-09-2022
s.bokad007@gmail.com
सर माझ्या काकांचे नुकतेच निधन झाले आहे काकांना मुलबाळ नाही व पत्नी पण हयात नाही, काकांची एक बहीण आहे म्हणजे माझी आत्या हयात आहे ,माझ्या वडिलांचे पण पूर्वी निधन झाले आहे . माझ्या वडील व काकांना वारसा हक्काने जमीन व घर वाट्याला आले आहे ,शेतजमिनीत आत्याचे नाव नाही , फक्त घरावर आत्याचे नाव लागले आहे .वारस म्हणून माझे काकांच्या मालमत्तेवर नाव लागेल का ? आत्याचा पण जमिनीवर हक्क दाखवेल का , वारस नोंद करताना कोणाची नोंद होईल?
हिंदू वारसा कायदा 1956 च्या कलम 88 अन्वये, हिंदू पुरुष मयत झाल्यावर त्याची मिळकत वारसाहक्काने अनुसूचीमध्ये नमूद
वर्ग-1 च्या नातेवाईकांना जाते
वर्ग एकचे नातेवाईक नसतील तर वर्ग दोन च्या नातेवाईकांना जाते
वर्ग दोन च्या नातेवाईकांमध्ये, बहिण व भाऊ यांचा समावेश आहे.
त्यामुळे जसा आपल्या वडिलांचे नाव शेती मिळकती सह घराला लागले, तसेच आत्याची ही नाव शेती मिळकतीला लागणे आवश्यक आहे तद्वतच तिचा शेती मिळकतीमध्ये हिंदू वारसा कायदा कलम 8 व कलम 9 प्रमाणे तिचा हक्क आहे. आत्याचा हक्क डावलून जरी मिळकतीची विक्री केली, तरी भविष्यात आत्या ने जर न्यायालयात दावा दाखल केला, तर त्या मिळकतीच्या विक्री पासून प्राप्त होणारी रक्कम व्याजासह आपणाला आत्याला द्यावी लागेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रणव देशमुख
31-08-2022
pdesh08@gmail.com
मी "अ" या व्यक्ती कडून मालमत्ता खरेदी करून घ्यायचा आहे. प्रॉपर्टी कार्ड हे "अ" नावे 1994 ला झाले आहे. "अ"ला 4 बहिणी आहेत पण त्यांचे नाव प्रॉपर्टी कार्ड मध्ये नाही.1987 त्यांचे हक्कसोड घेतले होते पण ते नोंदणकृत नाहीत.फेरफार मध्ये "अ" चा उलेख उत्तराधिकारी म्हणून केला आहे. मला भेटलेल्या माहिती नुसार त्या बहिणी काही कायदेशीर कारवाही करू शकतात.
प्रश्न असा आहे की
१)"अ" कडून मालमत्ता खरेदी करण्यात त्याच्या बहिणी कोणती अडचणी निर्माण करू शकतात का?
2) त्यासाठी आपण कोणत्या कोणत्या गोष्टींची चाचपणी करावी.?
३)या परिस्तीत खरेदी केल्यास फेरफार मध्ये अडचण येऊ शकते का?
योग्य मार्ग सांगा व पुढील मार्गदर्शन करा.
धन्यवाद.
प्रणव राव,
हिंदू पुरुषाच्या मृत्यूनंतर त्याची मिळकत हिंदू वारसा कायदा 1956 च्या कलम 8 अन्वये, अनुसूचित नमूद प्रथम वर्ग-1 च्या नातेवाईकांना ही मिळकत जाते. वर्ग एकचे नातेवाईक नसतील तर वर्ग दोन च्या नातेवाईकांना मिळकत जाते.
वर्ग १ नातेवाईकांमध्ये , मुलींचा म्हणजे पर्यायाने बहिनांचा समावेश आहे . प्रस्तुत प्रश्नातील बहिणींनी हक्क सोडला आहे असे आपण नमूद केले आहे तथापि , सदरचे हक्कसोड पत्र हे नोंदणीकृत नाही . त्यामुळे भविष्यात बहिणी मिळकतीत त्यांचा हक्क सांगू शकतात .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by असद अली
30-08-2022
aasayyed88@gmail.com
नगर परिषदेच्या रेकॉर्ड वरील अतिक्रमित मिळकतीचे हस्तांतरण साठी दस्त नोंदणी अवश्यक आहे का ?
Question by Vishal Dnyanoba Shinde
29-08-2022
vishalrajeshinde143@gmail.com
1980 वर्षी गट नंबर 111 यास क्षेत्र 1 हेक्टर होते,
पुनर्वसन अंतर्गत 111अ यांस क्षेत्र 0 हेक्टर 80आर (खातेदार मुळमालक) तर
111ब यांस क्षेत्र 0 हेक्टर 20 आर ( जिल्हाधिकारी )
असे दोन 712 पत्रक तयार झाले.
पण आज तागायत सदर क्षेत्र जिल्हाधिकारी यांचाच नावे आहे .
सदर क्षेत्र पुनर्वसनाचा अंतर्गत कोणाचे ही पुनर्वसन नवीन खातेदार कडे वर्ग झाले नाही.
तर हे क्षेत्र मुळमालकास परत मिळवता येईल का? योग्य सल्ला मिळावा.
शिंदे साहेब नमस्कार
आपले आपले प्रश्नावरून, जी पुनर्वसनासाठी जमीन संपादित झालेली आहे ती जमीन भूसंपादन कायदा 894 अन्वये संपादित झालेली आहे. या जुन्या संपादन कायद्यानुसार, जमीन संपादन झाल्यानंतर तिच्या उद्देशासाठी संपादन झालेली आहे, त्या उद्देशासाठी त्याचा वापर झालेला नसेल किंवा संबंधित संपादन संस्थेकडे ती अतिरिक्त म्हणून शिल्लक असेल, तरीही अशी जमीन मूळ मालकाला परत देण्याची तरतूद नाही.
केरळ राज्य शासन विरुद्ध एम भास्कर पिल्ले, या दाव्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने खालील निर्देश दिले आहेत.
विनावापर शिल्लक राहिलेली संपादित जमीन अन्य सार्वजनिक प्रयोजनासाठी वापरण्यात यावी अन्यथा अशा जमिनीचा जाहीर लिलाव करावा. त्यामुळे आपणास ही जमीन परत हवी असल्यास जर या जमिनीचा जाहीर लिलाव झाला तर त्यामध्ये आपण भाग घेऊ शकता. अन्यथा मूळ मालकांना अशी जमीन परत करावी अशी तरतूद जुन्या भूसंपादन कायद्यामध्ये नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sagar patil
29-08-2022
sp109391@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे की माझ्या आजोबांची वडीलपार्जित सामाईक जमीन एकूण 10 एकर त्या पेकी त्याचा भावाने 5 एकर 1667 ला इतर दोन लोकांना विकली आमच्या आजोबांना किवा त्याच्या मुलांना कोणतीही कल्पना न देता तर आज त्या जमिनीवर आमच्या आजोबांचा कोणता अधिकार पोहचतो का
सागर पाटील साहेब,
वडिलोपार्जित मिळकतीमध्ये , आपले वडील, आपण स्वतः व आपल्या अपत्ये यांचा हक्क असतो. आपले आजोबा यांना केवळ एकच भाऊ असेल व त्या भावाने जर त्याचा हिस्सा विकला असेल, तर त्या आयुष्यामध्ये आपल्याला कोणताही हक्क नाही.
तसेच आपल्या चुलत आजोबांनी 1967 ला विक्री केलेली आहे. आज या गोष्टीला पन्नास वर्षाहून अधिक काळ लोटलेला आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Abhijeet
26-08-2022
amitpatole123@gmail.com
जर 7/12 वर एका खातेदाराचे 6 गुंठे क्षेत्र आहे आणि त्यातले 2 गुंठे क्षेत्र NA आहे ते 2 गुंठे क्षेत्र 2 वक्तीच्या नावाने मंजूर आहे . तर 7/12 वरती नोंद 4 गुंठे आणि 2 गुंठे NA ची नोंद वेगवेगळी असती की एकत्र असती .
नमस्कार अभिजित साहेब,
केवळ दोन गुंठे क्षेत्र एकूण सहा गुंठे क्षेत्रापैकी कसे बिनशेती झाले याचा फेरफार अथवा काही परवानगी असेल तर ती तपासून घ्या.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 42 ड च्या तरतुदीनुसार कदाचित दोन गुंठे क्षेत्र पुरतेच, बिनशेती धार याची रक्कम मेहरबान तहसीलदार यांच्या नोटीस प्रमाणे जमा केलेले असेल व त्याचा परिणाम म्हणून दोन गुंठे क्षेत्र बिनशेती दाखवलेले गेलेली असेल.
हेही पडताळणी करणे आवश्यक आहे की ही दोन्ही क्षेत्रे एकाच व्यक्तीच्या नावे आहेत की बिनशेती क्षेत्र एका व्यक्तीच्या नावे व उर्वरित क्षेत्र दुसऱ्या व्यक्तीच्या नावे ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रताप शामराव चौगुले
26-08-2022
pratapchougule@gmail.com
ग्रामीण भागातील घरामध्ये मुलगी चा हक्क असतो काय? तसेच मला वडीलांनी खरेदी केलेले जमीन चे मुत्यपत्र करता येते काय?
प्रतापराव शामराव चौगुले साहेब,
ग्रामीण काय किंवा शहरी काय सर्वच क्षेत्रांमध्ये, वडलोपार्जित मिळकतीमध्ये मुलांसह मुलींचाही हिस्सा असतो. वडिलांच्या नावे असलेल्या मिळकतीचे मृत्युपत्र आपणाला करता येणार नाही. वडिलांना जे वारस असतील जसे की आपण आपणास बहिण असल्यास तिचाही हक्क या मिळकतीमध्ये आहे. आपण आपल्या रत्या हिश्श्याचे मृत्युपत्र करू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vishal kakde
25-08-2022
b9604876863@gmail.com
मा. महोदय....... Sir मा. दिवाणी न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तसेच अपील सुनावणी साठी प्रलंबीत असेल विवादित मालमत्ता विक्री केली असेल तर मा. तहसीलदार साहेब फेर फार मंजूर करू शकतात का....
विशाल काकडे साहेब नमस्कार,
मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 कलम 52 अन्वये, एखाद्या मिळकती संदर्भात न्यायालयामध्ये दावा चालू असेल, व सदरचा दावा हा एकमेकांच्या संमतीने ( collosive ) दाखल केलेला नसेल, तर अशा दाव्यातील पक्षकारांनी, जमिनीची विक्री केल्यामुळे अन्य पक्षकारांच्या हक्कावर गदा येत असेल, तर संबंधित न्यायालयाच्या परवानगीशिवाय अशा जमिनीची विक्री करता येत नाही.
मालमत्ता हस्तांतरण कायद्यातील ही तरतूद lis pendens या तरतुदी वर आधारित आहे.
या तरतुदीचा आधार घेऊन जमिनीचे हस्तांतरण रोखायचे असेल, तर दावा प्रलंबित असल्याबाबत दुय्यम निबंधक यांच्याकडे नोंदणी पत्र करणे आवश्यक आहे. जेणेकरून मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी जो मालमत्तांच्या हक्कान संदर्भातला अन या हक्क तपासणी केली जाते ( title search ) त्यावेळी खरेदीदाराला, अशा प्रलंबित दावा जर नोंदणी केलेला असेल तर त्याची त्याला माहिती मिळेल कोणत्या जोगे तो जमिनीची खरेदी करणार नाही व पर्यायाने त्याची फसवणूक होणार नाही. कारण ज्या व्यक्तीने अथवा ज्या पक्षकाराने जमिनीची विक्री केली आहे त्याच्या विरोधात जर भविष्यात न्यायालयाचा निर्णय गेला तर खरेदीदाराला कोणताही मालकीहक्क अशा मिळकतीमध्ये प्राप्त होत नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Abhijeet Patole
23-08-2022
abhijeetspatole@gmail.com
जर 7/12 वर खातेदाराचे 6 गुंठे क्षेत्र आहे आणि त्यातले 2 गुंठे क्षेत्र NA आहे ते 2 गुंठे क्षेत्र 2 वक्तीच्या नावाने मंजूर आहे . तर 7/12 वरती नोंद 4 गुंठे आणि 2 गुंठे NA ची नोंद वेगवेगळी असती की एकत्र असती .
Question by प्रशांत गुरव
23-08-2022
prashant.gurav69@gmail.com
गावाकडे आमच्या आजोबांची वडिलोपार्जित जमीन आहे. थोडी शेती आहे, एक घर आहे आणि घराभोवती थोडीशी जागा आहे. आजोबांच्या निधनानंतर गावातील पंचांकडून त्या जमिनीचे तीन हिस्से करण्यात आले. परंतू ते आम्हाला मान्य नाहीत. जमीन वाटप करताना समान वाटप झालेले नाही. असे असूनही हिस्सेदारांपैकी एकाने घरालगत असलेल्या जागेत स्वतःचे घर बांधले. तसेच पंचांनी आमच्यासाठी राखीव ठेवलेल्या जागेत सुद्धा अतिक्रमण केले. ग्रामपंचायत जमिनीच्या विषयात हस्तक्षेप करत नाही, असे ग्रामपंचायत ने आम्हाला कळविले आहे. कुठे दाद मागता येईल? आमची हरकत असूनही जे घर बांधले गेले, त्याला हटवण्यासाठी काही करता येईल का??
Question by Anshuman Nikam
23-08-2022
anshumumol2007@gmail.com
माझ्या आजोबांनी 1960 ते 1968 या सालामधे आमच्या एकूण 6 एकर जमीनीतील 30 गुंठे जमीन 3-3 गुंठे खरेदी खताने 10 लोकांनी विक्री केलेली आहे, या सर्वांनी त्यामधे घरे बांधली असून. बाकी जमीन आमचे ताबेवहिवाटीस असून आम्ही त्यामधे पिके घेतो. आमचा गट नंबर एकच आहे. प्रश्न असा आहे की, सदर 30 गुंठे जमीनाचा 7/12 वेगळा करता येईल का ? यासाठी कोणाकडे अर्ज करावा लागेल व प्रक्रिया काय आहे ?
अंशुमन निकम साहेब नमस्कार
प्रत्येकी ३ गुंठे क्षेत्र आपल्या आजोबांनी विक्री केले आहे . त्यामुळे ७/१२ स्वतंत्र करण्यासाठी , तुकडे बंदी कायद्याची बाधा येईल . पर्यायाने या क्षेत्राची मोजणी होणार नाही ही अक्वा मोजणी जरी झाली व त्याप्रमाणे आकारफोड पत्रक जरी तयार झाले तर तुकडेबंदी कायद्याप्रमाणे त्यावर अंमल होणार नाही.
मात्र आपण , याचा अभिन्यास व बांधकाम नियामानुकुल करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अथवा तेथील स्थानिक नियोजन प्राधिकरण या कडे अर्ज करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Bhushan bhaurao mhaisane
22-08-2022
bhushanmhaisane5083@gmail.com
Sir mazya sheti madhun rasta ahe to mi bandhawarun deu shakto ka tyabaddal mala mahiti dyawi
भूषण साहेब नमस्कार,
आपल्या शेतांमधुन जर रस्ता जात असेल व आपली इच्छा असेल की तो रस्ता त्या वहिवाटदार आणि आपल्या बांधावरून वापरावा, निश्चितच आपण तो जो वहिवाटदार आहे त्याच्या संमतीने आपल्या बांधावरून रस्ता देऊ शकतात.
जर तो संमती देण्यास तयार नसेल व त्याचा आग्रह जो पारंपारिक रस्ता आहे त्यावरून जायचं असेल, तर आपणाला दिवाणी न्यायालयात जाऊन त्याला बांधावरून रस्ता देण्यास आपण तयार आहात त्याप्रमाणे त्याने बांधावरून रस्ता वापरावा अशा प्रकारचा हुकूमनामा घ्यावा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रविण पाटभाजे
22-08-2022
pravinpatbhaje12@gmail.com
माझ्या शेताची मोजणी 2018 साली झाली असून माझ्या शेतातिल बांधालगत आंब्याचे झाड क प्रतीत गटाच्या सिमेत आहे. याच आंबा झाडालगत बांध कोरून प्रतिवादी ने 3 फुट खोल नाली खोदली, परंतू या नालीतील पाणी जाण्यासाठी मार्ग नाही, त्यामुळे पाणी मुरुण माझ्या शेतात पाझरते, त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान होत आहे. नाली खोदण्यापुर्वी या शेतातील पाणी लगत गटाच्या बांधाशेजारुन नाल्यात जात होते . परंतू नाली खोदकाम
करतांना त्या जागी बांध टाकण्यात आला. याबाबत मा. तहसीलदार यांना जमिन महसुल कायदा कलम 138 नुसार अर्ज केला, परंतु कारवाई करण्यात आली नाही. नंतर मी मामलेदार कोर्ट नुसार पूर्वस्थिती करण्यासाठी अर्ज केला. परंतु सदर प्रकरणी आपण दिवाणी न्यायालयात दाद मागावी असे पत्र मा. तहसीलदार यांनी दिले. या प्रकरणी, आणखी कोणा कडे. व कोणत्या नियमाने दाद मागावी. क्रुपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
प्रवीण साहेब नमस्कार,
मेहेरबान तहसीलदार साहेब यांनी जे काही उत्तर आपल्याला दिलेला आहे ते बरोबर आहे. याशिवाय आपणाकडे अन्य कोणताही मार्ग मला तरी दिसत नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by कवडू दौलत गेडाम
21-08-2022
kdgedam721@gmail.com
नमस्कार सर, कुळ, सिलींग, भूदान भोगटदार वर्ग ०२ च्या जमीनी भोगवटदार ०१ करता येईल का? करता येत असेल तर कोणाकडे अर्ज करावा.
नमस्कार कवडू साहेब
भूदान जमीन हि ज्या कुणाला प्रदान केलेली असते ही त्याच्याकडे बाहेर पट्ट्याने असते. या या मिळकतीवर ग्रामदान मंडळ यांचा मालकीहक्क आहे तद्वतच ते या मिळकतीचे मालक आहेत. त्यामुळे या मिळते तिच्या हस्तांतरणास परवानगीची तरतूद संबंधित कायद्यामध्ये नाही.
कुळ कायद्यांतर्गत प्राप्त झालेल्या जमिनी या वर्ग दोन म्हणून धारण केलेले असतात. त्याची विक्री किंमत निश्चित होऊन जर दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला गेलेला असेल, तर ती जमीन आपसूकच वर्ग-1 होते. जर अशा जमिनीचे हस्तांतरण करायचे असेल अथवा तिचे रूपांतर वर्ग एकमध्ये करावयाचे असेल तर संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा.
कमाल शेत जमीन मर्यादा धारण कायद्यापेक्षा अतिरिक्त ठरलेल्या जमिनी वाटप केल्यानंतर त्याचा भूधारणा प्रकार हा वर्ग-2 असतो. अशा जमिनीचे हस्तांतरण करण्यासाठी आपणाला जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे अर्ज करावा लागतो व त्या ठिकाणाहून आपणाला परवानगी मिळू शकते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by श्यामसुंदर खंकरे
21-08-2022
khankaresm5477@gmail.com
25 वर्षे अखंडीत झाले जमीन माझ्या कब्जात आहे, मी जमीन स्वतः कसतो, शेतमाल माझ्या घरी नेतो, पण मूळ मालक आतापर्यंत मला काही बोलला नाही.... शांतीपूर्ण कब्जा आहे... कब्जा आधारे शेत कोणाच्या नावे होईल
श्याम सुंदर साहेब
निश्चित शांत पूर्ण कब्जा तत्वा खाली दिवाणी न्यायालयामार्फत या मिळकतीमध्ये आपणाला मालकी हक्क मिळू शकतो.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Aniket patil
18-08-2022
ADPATILARVI@GMAIL.COM
काकाच्या नावने असलेले प्रकल्प ग्रस्त पुतण्याच्या नावाने करता येते का
Question by Navanath Patil
15-08-2022
9nathpatil21@gmail.com
सर मा तहसीलदार साहेबांनी आमच्या विरुद्ध निकाल दिला आहे, त्याचे आसे म्हणणे आहे की सदर ची जमीन ही महार वतन 6ब ची आसल्याने तूम्ही सक्षम प्राधिकारी ह्यांची पूर्व परवानगी घेतली नसल्याने तुमचा फेरफार रद्द करत आहे . परंतु सर आम्ही खरेदीच्या वेळेस तेव्हाच्या मा तहसीलदार साहेबांना अर्ज केला असता तेव्हा मा तहसीलदार साहेबांनी आम्हाला पत्र दिले की सदरचा गट हा सन 1968 च्या मुंबई हलके गाव नोकरांची वतने रद्द करणेबाबतच्या कायदा वतन इनाम 01/05/1959 खालसा करण्यात आलेली आसल्याने याकामी शासन निर्णय क्रमांक/वतन/1099/प्र.क्र.223/ल-4 दिनांक 09/07/2002 व शासन निर्णय क्रमांक/2002/प्र. क्र.100/ल -4 दिनांक 17/07/2008अन्वये आणि कंसामधे (महार वतन आणि देवस्थान इनाम जमीन वगळून) सदर जमिनीवरील भोगवटदार वर्ग 2 ही अट कमी न hota जमीन वाटप/ खरेदी विक्री करणेस परवानगीची आवश्यकता नाही. असे आम्हास पत्र दिले होते . आणि आता नवीन मा तहसीलदार साहेबांनी महर वतन 6ब ची जमीन आसल्याने तूमचा फेरफार रद्द करत आहे असे म्हंटले आहे, तरी आता मी काय करू सर
Question by अमोल वाघ
14-08-2022
amolwagh6828@gmail.com
नमस्कार सर,
मामलेदार न्यायालय १९०६ कलम ५(२) अन्वये अर्जदार यांचे अर्जाची सविस्तर चौकशी होऊन केलेला अडथळा दुर करण्यांसंबंधी निर्णय पारीत झाला आहे. नंतर प्रतिवादी यांनी उपविभागीय अधिकारी यांचेकडे २३(२)रिव्हीजन अर्ज दाखल केलेला होता. त्यांत रिव्हीजन नामंजूर करण्यात आले. कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य असुन त्यांत फेरबदल करण्यांची आवश्यकता नाही. असा निर्णय निर्णय दिलेला आहे. परंतू त्यांनी परत उपविभागीय अधिकारी यांचेकडे रिव्हु अर्ज दाखल केलेला असुन त्यांचे नोटीस आम्हाला प्राप्त झाले आहे.
१) मामलेदार कोर्ट अॅक्ट नुसार रिव्हीजन अर्जातील निर्णय नंतर रिव्हु दाखल करता येते का?
२) मामलेदार कोर्ट अॅक्ट मध्ये तशी तरतूद आहे का?
Question by Manoj
14-08-2022
sagarkandekar1990@gmail.com
एकाच गटातील आपल्या पोटहिस्सा ची मोजणी करण्याची प्रक्रिया काय आहे ? बरेच जण बोलता की सह हिस्सेदार यांची समती लागते पण सह हिस्सेदार तर कधीच समंती देणार नाही कारण जमीन जास्त त्याच्कडे निगते. कृपया आपला पोट हिस्सा मोजणी करून व आपली जमीन ताब्यात घेण्यासाठी काय करावे?
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
