जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

सर कूळ कायद्याची जमीन विक्री करण्याचा अर्ज नमुना असल्यास पाठवा. Whatsapp no -9049473624
आपण आपल्या प्रांताधिकारी कार्यालयात जा . आपणास नमुना मिळेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Balaji Solnar
19-09-2021
balajisolnar35@gmail.com

आदरनिय सर
सर माझ्या वडीलाच्य नावे वर्ग 2 ची जामीन आहे त्या जमिनीचा 7/12 आहे,8 अ, आहे सर्वे नंबर माहिती आहे. हिस्सा क्रमांक माहिती आहे .पण त्या सर्वे नंबर मध्ये इतर शेतकऱ्यांनी अधिक जमीन धरल्या मुळे आमची जमीन नेमकी कुठे आहे हे माहिती नाही . जमीन मोजणी साठी भूमी अभिलेख विभागात विचारले असता ते म्हणाले की आम्हाला गायरान जमीन मोजता येणार नाही. काय करावे लागेल सर मार्गदर्शन करावे विनंती
आपणास शासनाने प्रदान केलेली जागा आहे . ती जागा गायरान असू शकत नाही . अश्या जागेवर ( गायरान ) शासनाचीच मालकी असते . आपणास
दिलेली जागा /प्रदान केलेली जागा हि अन्य शासकीय जागा असेल अथवा शासनाने /जिल्हाधिकारी विहित कायदेशीर प्रक्रिया पार पडून आपणास दिलेली असेल . जर अशी जागा आपले नावावर असेल तर , जागेची मोजणी होऊ शकते . मात्र भूमी अभिलेख खाते मोजणी करण्यास तयार नसल्यास , जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर गायरान जमीन मोजणीसाठी काय करावे लागेल
गायरान /गुरुचरण जागा हि ग्रामपंच्यातीस दिलेली जागा आहे . मात्र त्यावर मालकी हि शासनाचीच असते . त्यामुळे त्याची मोजणी करणे हि बाब मा जिल्हाधिकरी /शासन यांचे अखत्यारीतील आहे .
आपण अर्ज करून गायरान जागेची मोजणी होऊ शकत नाही अथवा मोजणी केली जाणार नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sanket durgude
18-09-2021
Sanketdurgude54@gmail.com

सर मी बिगर शेती च्या 5 गुंडे प्लॅट घेतला असून त्यावर मी 1000 sq foot घराचे बांधकम चालू केले आहे पण त्या बांधकामत कडू लिबाची फांदी येत आहे तो लिब हद्दी लगत बांदा वर आहे म्हणून त्याला विचारले तर तो शेतकरी नाही तोड्याचे बोलतो तर मी काय करू तो जीवे मारण्याची धमकी देतो तर काय करू आता त्याची जमीन ही वर्ग 2 ची जमीन आहे खंड ची जमीन आहे..
https://indiankanoon.org/doc/1732448/
https://www.casemine.com/judgement/in/5767b11be691cb22da6d36d3

जर बाजूच्या शेतकऱ्याच्या शेतातील झाडाच्या फांद्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या मिळकतीवर overhang झाल्या असतील तर , अश्या बाजूच्या शेतकऱ्यास नोटीस द्यावी व फांद्या काढण्यास सांगावे .
नितीस देऊन हि फांद्या काढून टाकल्या नाही तर , आपण फांद्या काढून टाकावयात . त्यास बाजूच्या शेतकऱ्याने अडथळा केला अथवा करत असल्यास , न्यायालयाकडून आदेश घ्यावेत .
उपरोक्त न्यायालयाचे संदर्भ आपले सुलभ माहितीसाठी आहेत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझा प्रश्न असा आहे की मुद्रांक शुल्क विभागाने प्रमाणभूत shetra पेक्षा कमी shetracha एकत्रीत सातबारा होणार नाही व रजिस्ट्रेशन होणार नाही असा आदेश 12.07.2021 रोजीच्या आदेशात नमूद आले आहे मला mandangad Ratnagiri येथे 88 गुंठे शेतजमीन एकत्रित 8 जणांमध्ये खरेदी करायची आहे तरी त्या बाबत मार्गदर्शन व्हावे PRAMOD DEREPATIL
८८ गुंठे शेतजमीन ८ जणांमध्ये खरेदी करावयाची आहे म्हणजे प्रत्येकाचे नावे ११ गुंठे क्षेत्र खरेदी केले जाईल . सदर क्षेत्र प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी होत आहे . त्यामुळे खरेदी दस्त नोंदवला जाणार नाही .
आपण सदर जागा जर बिनशेती वापरविभागात ( रत्नागिरी प्रादेशिक योजनेनुसार ) येत असेल तर , दस्त नोंदवयण्यस काही अडचण येणार नाही . अन्यथा जागेची विकास परवानगी घ्या म्हणजे जमीन आपोआप बिनशेती होईल व प्रमाणभूत क्षेत्राची बाधा खरेदीसाठी येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्ते सर, माझे आजीचे 7/12 रेकॉर्डला इतर हक्कात नाव दाखल आहे. माझी आजी मयत असुन 7/12 रेकॉर्डला तिचे वारसांनी नावे दाखल न होता वारसांचे प्रतिज्ञापत्रावरुन आजीचे मयत भावांचे लाभात विनामोबदला हक्कसोडपत्र लिहुन दिले आहे. तसा दस्त दुय्यम निबंधक यांचेकडे नोंदविलेला आहे. त्यानंतर गावकामगार तलाठी यांचेकडे सदरचा हक्कसोडपत्राचा दस्त नोंदीसाठी दिल्यावर त्यांनी 7/12 रेकॉर्डला वारस नोंद नसताना हक्कसोडपत्राचा दस्त करता येत नाही व त्यानुसार मी 7/12 रेकॉर्डला नोंद करणार नाही असे सांगीतले आहे. तरी विनंती की सदरील वारसांनी लिहुन दिलेला हक्कसोडपत्राचा दस्त वैध असेल का किंवा प्रतिज्ञापत्रानुसार 7/12 रेकॉर्डला वारसांची नावे दाखल करुन दुय्यम निबंधक यांचेकडे नोंदविलेल्या हक्कसोडपत्रानुसार नावे कमी करता येतील का त्याबाबत मार्गदर्शन करावे
हक्कसोडपत्र नोंदणीकृत असल्यास त्याची नोंद ७/१२ सदरी घेण्यास गाव कामगार तलाठी नाकारू शकत नाही .
मात्र आजीचे इतर हक्कात ती हयात असताना नाव असन्याचे काही कारण नव्हते , आजीचे नाव भोगवटादार सदरी असणे आवश्यक होते . असोत . आजीस जमिनीची विल्लेवाट लावण्याचा हक्क होता का ? हे तपासून पहा . जर आजीस केवळ मर्यादित अधिकार होते ? इतर हक्कात नाव केवळ या कारणासाठी होते कि , हयात असे पर्यंत , उदर्निर्वाहासाठीचा हक्क होता का ?
जत आजीस हक्क सोड पत्र करण्याचा अधिकार न्हवता अथवा फसवून हक्क सोड पत्रक करून घेतले असेल सर्व, अश्या हक्कसोड पत्रकाची वैधता आपण न्यायालयात अहवाणीत करू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की ग्रामपंचायत च्या हद्दितील गावठाण्यातील जमीन घर बांधण्यासाठी नावावर करण्याची प्रक्रिया काय आहे व त्यासाठी काही फीस द्यावी लागते का?
गावठाणातील जमिनीचे सर्वेक्षण झाले असेल तर , अश्या जमिनीची मिळकत पत्रिका असते . मिळकत पत्रिका असलेली जमीन नावावर करावयाची असल्यास , नगर भूमापन अधिकारी / उप अधीक्षक भूमी अभिलेख यांचे कडे अर्ज करावा . अर्जासमवेत आपला जमिनीमध्ये हक्क कसा प्राप्त झाला , जसे वारसाने / खरेदीने या बाबत माहिती देणे आवश्यक .
वारसाने हक्क प्राप्त झाला असल्यास , मयत व्यक्तीचे वारसांचे प्रतिज्ञापत्र . खरेदीनि हक्क प्राप्त झाला असल्यास , खरेदी दस्त .
जर मिळकतीचे सर्वेक्षण झाले नसल्यास , अश्या जमिनीचे अधिकार अभिलेख नसतात . मात्र ग्रामपंच्यात प्राधिकरणाचे अखत्यारीतील गावठाणात अशी जमीन असल्यास , ग्राम पंचायतीकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Rahul Desai
14-09-2021
desai.rahul86@gmail.com

नमस्कार सर माझ्या वडिलांना व माझ्या आत्या याच्या साह्य न घेता आमच्या वेगवेगळ्या जमिनेचे विक्री झाली आहे काय करावे .काही विक्री करताना माझ्या वडिलांना मृत दाखवलं आहे तरी बहुतेक मध्ये लहान मुलगा दाखवलं आहे मी कश्या पदतीने माझ्या वडिलांचं नाव व आत्या च नाव पुन्हा सातबाऱ्यावर आणू शकतो .माझ्या वडिलांनी ९वर्ष कोर्ट केस लढवली आहे परंतु काहीच उप्या झाला नाही मला मार्गदर्शन करावे
राहुल देसाई
महोदय
न्यायालयात हि आपल्या बाजूने निकाल झाला नसेल तर , अपील वरिष्ठ न्यायालयात करा . या पेक्षा वेगळे काही करता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

अनुसूचित क्षेत्रातील नदिपात्रातून सरकारी अधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्य संगनमताने अवैध वाळू उपसा करत आहेत,तर त्या गौण खनिजावर आदिवासींचा हक्क किती आणि शासनाचा हक्क किती?जर आदिवासींचा हक्क असेल तर अशा लोकांविरुद्ध अॅट्रोसीटीचा गुन्हा नोंदविता येतो का?
नमस्कार सर , भोगवटादार २ ची जमीन भोगवटादार १ मधे कशी आणि कोणत्या पद्धतीने करावी ?
२०१८ मध्ये , नवीन नियम प्रसिद्ध झाले आहेत . त्या नियमनांतर्गत जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

2003 मध्ये वडिलोपार्जित जमीनीचे (वाटप झाले नव्हते) तलावासाठी जमीन भूसंपादन केली, त्यावेळी गट नं. 401 असा एक होता , त्यामध्ये माझे वडील आणि 2 चुलते वारस होते, भूसंपादनाच्या वेळी माझे वङिल कामानिमित्त पुण्यामध्ये होते. भूसंपादनाच्या वेळी गावी 2 चुलते होते , त्याने 401/1, 401/2 ,401/3 मध्ये असे वेगवेगळे गट सांगून 8 एकर जास्त क्षेत्र लावून घेतले होते. माझ्या वडीलाच्या नावावर 401/4 मध्ये 3आर लावले गेले. आज पण चालू घडीला 401 गट नं. निघतो.वरील वेगवेगळ्या गटाची व क्षेत्राची नोंद निवाडा मध्ये नोंदविले गेले त्यांना जास्तीचा मोबदला पण मिळाला पुढील येणारी नुकसान भरपाई त्यांना मिळणार .भूसंपादनानंतर कोर्टात वाटपाचा दावा 2008 मध्ये दाखल झाला. 2018 मध्ये कोर्टाने भूसंपादनानंतर शिल्लक राहिलेल्या जमीनीचे 1/4 प्रमाणे वाटप केले पण भूसंपादन झालेल्या जमीनीचा विचार केला नाही, दोन्ही चुलते 8 एकर जमीनीचा पुढील येणारा मावेजा निवाड्याच्या आधारे घेणार आहेत. निवाडा होऊन 16 वर्षे झाली . पुढे काय करावे , कलेक्टर साहेब आम्हाला येणाऱ्या नुकसान भरपाई मध्ये पार्टी करुन घेतील का? पुढे कोर्टात आपील चालू आहे ... पुढे किय करावे..
कोणतीहा हक्क बजावयाचा असेल तर तो विहित मुदतीत बजावणे आवश्यक असते . एकदा मुदत संपली केली , हक्क हि संपुष्टात येतो हे न्यायिक तत्व आहे . भू संपादन निवाडा २००३ साली झाला . आज या गोष्टीला १७ ते १८ वर्षे झाली .
असोत भू संपादन अधिनियम १८९४ च्या कलम ३१ च्या तिसऱ्या परंतुकानुसार , पात्र व्यक्तीशिवाय अन्य व्यक्तीने भू संपादन नुकसान भरपाई स्वीकारली असल्यास , अशी निवाडा रक्कम स्वीकारलेली व्यक्ती ,पात्र व्यक्तीस निवाडा रक्कम परत करण्यास/ देण्यास जबाबदार असते .
या तरतुदीच्या आधारे , आपला हिस्सा /हक्क संपादित जमिनीत असेल , तर आपण दावा दाखल करू शकतात . मात्र झालेला विलंब न्यायालयाने माफ करणे आवश्यक आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Ghanshyam
10-09-2021
rathodghansham24@gmail.com

My question is . I purchased one farm form one seller but seller had already taken loan from the bank and He hid from us .now there is problem of registration of my farm on my name , please suggest
Dear Ghanshyam
If the land cannot be registered as the land to be purchased is encumbered , better not to purchase the same .
However the Registration Authorities cannot refuse to register the property for the reason that the land to be purchased is encumbered . If the loan is not paid by the vendor , you will have to pay the debt amount in case you purchase the encumbered property

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

बिगर येणे प्लॉट मधून जर रोड गेला तर त्याचे पैसे मिळतात का किंवा जेवढा रोड गेला आहे तेवढी जागा दुसरीकडे नगरपालिका देते का???
जागा जरी नगरपालिका हद्दीत असेल तरीही जमिनीची नुकसान भरपाई मिळते . नुकसान भरपाई पैस्याच्या स्वरूपात किंवा TDR स्वरूपात दिले जाते . संपादित झालेल्या जागेच्या बदल्यात जागा देण्याची तरतूद नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर जमिनीवरील वारसा हक्क सोडण्याविषयी माहिती मिळावी म्हणजे ( हक्क सोडने) व सदर प्रक्रिया ही onnline करता येते का? किंवा प्रत्यक्ष संबधित विभागात जाऊन करावी लागेल. कृपया आपण माझ्या संबधित विषयावर योग्य ते मार्गदर्शन करावे धन्यवाद.
श्री . अनिल चौधरी
महोदय

हक्क सोडपत्रक ज्याचा हक्क सोडवायचा आहे त्याचे इच्छेवर अवलंबून आहे .
हक्क सोड online पद्धतीने सोडता येत नाही
संबंधित निबंधक कार्यालयात जावे लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

ऑनलाईन 7/12 च्या तांत्रिक अडचणी मुळे एका व्यक्तीची जमिनीची खरेदी होत नाही म्हणून आम्ही त्या व्यक्तीकडून साठेखात करून घेतले व त्या व्यक्तीला त्याचा पूर्ण मोबदला दिला आणि त्या व्यक्तीने जमिनीचा पूर्ण ताबा आम्हाला साठेखता मध्ये दिला आणि नंतर सातबारा दुरुस्ती नंतर त्या व्यक्तीने आम्हाला न कळवता ती जमीन एका तिसऱ्या व्यक्तीला विक्री केली त्या व्यक्तीची सातबाऱ्यावर नोंद झाली . तर आम्हाला ती जमीन साठेखताच्या पुराव्यांवर पुन्हा मिळू शकते का ? आणि त्यासाठी काय करावे ?
दिवाणी न्यायालयात दाद मागावी

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

दिवाणी न्यायालयात दाद मागावी

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर माझे वय 27. आजोबांनी माझ्या वडिलांच्या नावारील जमीन 1988 साली विकली. परंतु वडिलांचा येरवडा हॉस्पिटल पुणे येथे उपचार चालू होता. वेडेपणात सही घेऊन हा व्यवहार झाला. जमीन विकत घेणार्‍यांनी परत दुसर्‍या व्यक्तीस विकली . तर मी त्या खरेदी विरुद्ध अपील करू शकतो का? वडील मयत आहे.
वडील वेडे असताना आपल्या आजोबांनी , वडिलांची सही घेउन जमीन विकली अशे आपण कथन करत आहेत . आपणाकडे वडील वेडे होते याचे वैद्यकीय पुरावे आहेत का ? हे पुरावे हे बाब सिद्ध करू शकतात का , वडील वेडे असताना त्यांना , निबंधक कार्यालयात घेउन अथवा निबंधक यांचे समोर त्यांची सही घेतली ?
अशे पुरावे असतील व झालेला विलंब न्यायायलायाने माफ केला तर खरेदी दस्त आपण अहवानीत करू शकता . अपील करून उपयोग होणार नाही . ज्या दस्ताचे आधारे जमीन विक्रीची नोंद करण्यात आली तो दस्त न्यायालयाने रद्द करणे आवश्यक आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर मी आचेगाव ता दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथिल रहिवासी असून माझा असा प्रश्न आहे की - मी बिनशेती न झालेल्या एका शेतजमीन गटातील 5 घुंटे जागा नोटरी द्वारे खरेदी केलेली आहे. रजिस्टर ऑफिस मध्ये 5 घुंटाची खरेदी किंवा विक्री होत नाही आणि 7/12 नाव येत नाही. मग मला 7/12 वर नाव कसे लागेल किंवा 7/12 च्या इतर अधिकारात मला नाव लावता येईल का? नाव लावता आले तर कशा पद्धतीने नाव इतर अधिकारात लावता येईल ? या बाबत मार्गदर्शन व्हावे.
कोणताही दस्त यथोचित मुन्द्रांकित असल्याशिवाय , दस्तास पुरावा - मूल्य नाही . त्यामुळे अश्या मिळकतीतील हक्क दस्त मुन्द्रांकित असल्याशिवाय हस्तांतरित होत नाहीत . नोंदणी कायदा १९०८ च्या कलम , १७ अन्वये खरेदी दस्त नोंदवणे बंधन कारक आहे .
५ गुंठे शेतजमीन क्षेत्र विक्री दस्त नोंदवता येत नाही त्यास निर्बंध आहेत . नोटरी केलेल्या दस्ताद्वारे मिळकतीतील हक्क हस्तांतरित होत नाही . त्यामुळे आपल्या ला ५ गुंठे क्षेत्र नोटरी द्वारे खरेदी करून काही उपयोग नाही . आपले नाव मिळकतीस लागू शकत नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Dattatry Sonavane
07-09-2021
sonavanedt7@Gmail.com

वावी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक इथे 6 गुंठे जागा ही शेती सत्ता प्रकारात आहे व ती माझे मयत आजीचे नावे आहे. सन 2018 मध्ये सिटी सर्व्हे ऑफिस सिन्नर इथे वारस नोंदी साठी अर्ज केला पण ते ऑफिस ने पत्र दिले की सदर जागा आधी बिनशेती. करून तसा दाखला द्या. मग वारस नोंद होईल . हे कोणत्या नियमात आहे .
तसेच म.ज.म.अधि.1966 कलम 42 क आणि ड प्रमाणे अकृषिक आकारणी व परवानगी साठी लागणारा अर्ज व त्यासाठी कोणते उतारे जोडावे लागतील यासाठी कृपया मला मोबाईल नंबर 9870767328 यावर किँवा sonavanedt7@gmail.com यावर कृपया कळवावे ही विनंती
वारस नोंद करणे आवश्यक आहे . नगर भूमापन अधिकारी वारस नोंद करणे नाकारू शकत नाही .
४२ क अन्वये , जमीन नगर पालिका क्षेत्रात असल्यास अथवा प्रादेशिक योजनेत असल्यास , विकास परवानगी नियोजन प्राधिकरणाकडून घेणेची आहे . विकास परवानगी घेण्यासाठी चे आवश्यक कागदपत्र दाखल करावे .
४२ d नुसार गावठाणापासून २०० मी आतील जागा मानीव बिनशेती असल्याचे मानण्यात येते . या साठी कोणतेही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही . केवळ बिन शेती आकार भरणे आवश्यक आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

साहेब
गाव नमुना सात बारा मधील वारस नोंद दुरुस्तीसाठी तहसील कार्यालयात सादर केलेल्या अर्जावर निर्णय घेण्यासाठीची कार्यपद्धती व कालमर्यादा किती असते यासंबधी माहिती द्यावी.
ती सविस्तर माहिती आहे. तहसीलदार कार्यालयात विचारणा करणे उचित

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर, आदिवासी जमिनीवर 7/12 मध्ये इतर हक्कात ३६ व ३६अ ची नोंद घेतांना अनुसूचीत जमातीचे प्रमाणपत्र लागते का. कृपया उत्तर ढ्यावे
होय . तलाठी यांनी मागणी केल्यास लागेल . या पेक्षा वैधता प्रमाणपत्र सुद्धा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आपणास या उपक्रमाबाबत कृतज्ञतापूर्क नमस्कार. अलिबाग तालुक्यातील मल्याण गावात माझ्या मालकीच्या गट क्र. २९४ वर माझी आजी व वडिल यांची नावे आजोबांच्या मृत्युपश्चात सातबारासदरी लागली आहेत. १९७० मध्ये माझ्या आत्याने आपला हक्क आजीच्या लाभात सोडला म्हणून तिचे नाव सातबारा सदरी लागले असे फेरफार क्रमांक १६६२ सांगतो. माझे वडिल व आजी हयात नाहीत. वारसनोंंद करताना वडिलांच्या जागी आम्हा भावडांची नावे लागतील. आजीच्या जागी आत्याचे नाव लागेल का की फेरफार उल्लेखितो त्याचा विचार करून आत्याची तत्कालीन हक्कसोड ग्राह्य धरली जाईल. कृपया मार्गदर्शन व्हावे. धन्यवाद
आजोबांचे मृत्युननंतर वारस म्हणून आजी(१/३/) , वडील(१/३) व आत्या (१/३)आहेत . आत्या ने तिचा हक्क आजीचे लाभत सोडला .(१/३+१/३=२/३) मात्र आजी मयत झाल्यावर आजीचे वारस म्हणून तिचे नाव लागणे आवश्यक आहे . (२/३ भागिले २ = १/३ क्षेत्रास )

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Ravi Warghade
06-09-2021
raviwarghade405@gmail.com

सर नमस्कार माझे वडिल व आमचे शेजारी राहणारे शेतकरी एक गटातील शेती अर्धी अर्धी जमीन कसत होते कालांतराने कसेल त्याची जमीन व राहील त्याचे घर हा कायदा अस्तित्वात आला. दोन्ही शेतकर्‍यांनी पूर्ण मिळकतीसाठी आपले दावे तहसिलदारांकडे दाखल केले. त्यावेळी तहसिलदारानी दोन्ही शेतकर्‍यांची बाजू ऐकली तसेच मिळकती वरील वस्तुस्थितीचा पंचनामा करून दोन्ही शेतकर्‍यांना कुळकायदा अन्वये अर्धी अर्धी जमीन वाटून दिली आणि मिळकतीची होणारी रक्कम ३ वर्षात हफ्त्याने भरण्याचे आदेश दिले. दोन्ही शेतकर्‍यांनी रक्कम भरून टाकली त्यामधील एकाने ३२ म चे प्रमाणपत्र घेतले तर दुसर्‍याचे राहून गेले त्या शेतकर्‍याने उशीराने म्हणजे वीस वर्षानंतर हे प्रमाणपत्र घेतले त्यामुळे पहिल्या शेतकर्‍याचा असा समज झाला की ह्याने रक्कम उशीरा भरल्याने त्यांना जमिन मिळवण्याचा कोणताही अधिकार राहिला नाही. सदर गैरसमजातून त्याने प्रांतांकडे आदेश रद्द होणेबद्दल दावा दाखल केला आहे. सर तुम्हाला काय वाटते ह्या प्रकरणा मध्ये काही तथ्य आहे का ?
प्रांताधिकारी योग्य तो निर्णय घेतील

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार साहेब
मी 2020 मध्ये उरण जिल्हा रायगड येथे 2 गुंठे जमीन infratek प्रॉपर्टी यांच्या कडून घेतली खरेदीखत झाले आहे त्या मध्ये 20 लोकांची नावे आहे कंपनी नि खरेदीखत ची प्रत अजून दिली नाही. 7/12 नमुना 6,8, पण नावा वर झाला आहे पण खरेदीखत ची प्रत अजून दिली नाही ती ऑनलाइन मेल वर दिली आहे पण मला प्रमाणित प्रत हवी आहे , कृपा करून मार्गदर्शन करावे
दुय्यम निबंधक कार्यालयातून प्राप्त करून घ्यावी

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आम्ही आमची जागा काही वर्ष्यापूर्वी एका व्यक्तीला विकत होतो परंतु संपूर्ण पैसे न मिळाल्या मुळे आम्ही त्यांना कन्व्हेन्स दिला नाही, समोरची व्यक्ती 3 वर्ष्यापूर्वी मयत झाली, सदर जागेचा सातबारा अजूनही आमच्याच नावाने आहे परंतु त्या मयत माणसाची मुलगी जबरदस्ती करून जागा कब्जा करत आहे, ती जागा आम्हाला परत मिळण्यासाठी आम्ही काय करावे?? कृपया मार्गदर्शन करावे
दिवाणी न्यायालयातून मनाई आदेश घ्यावा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

The area of 72 sq.ft. has been erroneously shown in property card instated of 41.4 sq.ft. In fact the area of 41.4 was to be divided among two successors as 20.2 sq. ft. for each, but revised property card shows it as 36.0 sq. ft. for each successor. I want to rectify this error, because the sum of holdi of land of all holder exceeds the total area of City Survey No.
Please guide me. Thanks.

This page was generated in 0.36 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3