जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Sir mazi dukan 21 varsha pasun grampanchayat chya jaget aahe aata kahi grampanchayat sadasya te atikraman aahe mhanun kadhnyas saangat aahet tari mi dukan vachvnyasathi kahi karu shakto ka? Aani ti jaga legally mazi hou shakti ka
नमस्कार सर!
सर मी राजन फडकले रत्नागिरी येथून आहे. मी MPSC साठी तयारी करत आहे.
MPSC ने नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र मध्ये तीनही परिच्छेदात अर्जदाराचे नाव असले पाहिजे अशी अट घातलेली आहे. ही त्यांच्या नवीन GR नुसार 2021. तर मी माझे नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र हे 7-8 महिन्यांपूर्वीच काढलेले आहे महा ई सेवा केंद्रातून. ते ही तीन वर्षा साठी. तर मग मी आता वर उल्लेख केल्याप्रमाणे तीन परिच्छेदात नाव असलेले नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र कसे काढावे किंवा अपडेट करावे. तसेच माझा जातीचा दाखला हा 20 वर्षा पासून चा आहे.
तरी आपण मला योग्य ते मार्गदर्शन लवकरात लवकर करावे.
धन्यवाद सर!
1989 साली दस्त झाला असून सिटी सर्वे ला नोंद करण्यात आलेली नाही परंतु त्या मालमत्तेवर बांधकाम करण्यात आले होते सलग 10 वर्षे 8 अ ला नोंदी होत्या नंतर त्या फिरवून मूळ मालकाच्या नावाने करण्यात आल्या व आता ती मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीने खरेदी केली आहे तरी ती कशी मिळवली पाहिजे.
Who is prior in time is prior in Law या तत्वानुसार , आपले दस्त पहिले असल्याने आपणच या मिळकतीचे मालक आहेत . SLR यांचे कडे अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर, आम्ही 2019-20 साली गावाकडे घर बांधून रहात आहोत.पण ती जमीन महाराष्ट्र शासन या नावाने सिटी सर्वेला नोंद आहे. तरी आता हे घर बांधकाम अधिकृत करण्यासाठी काय करावे लागेल.

Question by Shekh juned
22-08-2021
shekhjuned1294@gmail.com

ग्रामपंचायत ला शेत सर्वे मधिल नविन प्लाटींग चा ले आऊट मंजुर करायच अधिकार आहै का
नाही
ग्राम पंचायत केवळ , गावठाणातील जागेवर बांधकाम परवानगी देण्यास सक्षम आहे . सर्वे नम्बर मधील लेऊट ला परवानगी देण्यास जिल्हाधिकारी /प्रांताधिकारी सक्षम आहेत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या आजीच्या नावे तालुका परतूर जिल्हा जालना येथे 1992 पासून 5 हे 97 आर संपूर्ण कोरडवाहू जमीन आहे 1993 ला स्टॅम्प पेपरद्वारे तलाठी मार्फत समान वाटणी पत्रानुसार दोन मुलींना समान वाटून दिले वाटणी पत्रात माझ्या दोन मुलींना जमीन प्रत्येकी 2हे समान वाटून देत आहे उरलेली माझ्यासाठी आहे असा उल्लेख आहे 1996ला 2हे 14आर जमीन पाझर तलावात एकूण जमिनीच्या मधली जमीन गेली त्यानुसार 7/12 वर आजीच्या नावे 1 हे 25 आर एका मुलीच्या नावे 1 हे 29 आर व दुसऱ्या मुलीच्या नावे 1 हे 29 आर जमीन राहिली 2017 ला एका मुलीने एका दिशेची चांगली जमीन तिची समजून खरेदीखत द्वारे विकली खरेदी खतात चुकीच्या चातूर्सिमीचा उल्लेख आहे परंतु त्यासबंधी कोणतेही कागद पत्रे खरेदी खताला जोडलेली नाहीत तरी तुकडेजोड तुकडेबंदी नुसार महसूल न्यायालयात कोणाकडे दाद मागता येईल किंबहुना खरेदी खतात चुकीच्या नोंदी बदलण्यासाठी कोणाकडे दाद मागता येईल दाद मागण्यासाठी काही कालावधीची मर्यादा आहेत काय कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद
केवळ चतुरसीम चुकल्या आहेत . त्यामुळे दुरुस्त दस्त नोंदणीकृत करा .
वाटपामुळे तुकडेबंदी कायद्याचं भंग होत आहे का ?
जालना जिल्ह्यात प्रमाणभूत क्षेत्र किती आहे ? त्यावर अवलंबुन आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

विठ्ठल या इसमास 2 मुले व 2मुली 1पत्नी आहेत.
रामकिसन व राधाकिसन मुले,राधा व अनुसया मुली .कुसूम पत्नी.2002 ला विठ्ठल चा मृत्यूनंतर 2015 ला रामकीसन याने वारस हक्कने 5 हि वारसाची नोद केली .तलाठी यानी 60 आर पैकी 12 -12 सर्वात विभागणी करून 7/12वर नोद केली.रामकिसन ने आई कुसूम व अनुसया या बहिनीची जमीन विकत घेतली .अशी रामकिसन ची 36आर जमिन 2015 मधे तयाने विकली.2021मधे राधाने तिची 12आर जमिन विकली.आता राहिली राधाकिसन याची .राधाकिसन च्या मुलाने राधा ने विकलेल्या जमिनीच्यानोदीस अडथळा आनला आहे.तयाची तक्रार चालते का.तो वाटपावरुन कोर्टात जावू शकतो का?तसे झाल्यास 2015 ला झालेली व 2021 ला झालेली खरेदी रद्द होऊ शकते का.फेर नुसार सामाईक शेत्र नाही विभागणी करून नोदले आहे.
पाच वारासदारांचे नावे स्वतंत्र ७/१२ झाले होते का ? ७/१२ स्वतंत्र झाले असल्यास कोणतीही अडचण असण्याचा प्रश्न नाही .
जर ७/१२ स्वतंत्र झाले नसतील तर , जमीन विक्री करताना , अन्य हिस्सेदारांची संमती /सही दस्तांवर घेतली होती का ? ७/१२ स्वतत्र नसल्यामुळे सामायिक जागेमध्ये वहिवाट वरून प्रश्न निर्माण होतो .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी मुंबई येथे राहणार असून, माझ्या वडिलांचे निधन झाले आह. त्यांच्या मागे आई, मी आणि माझा भाऊ असे वारस आहोत. माझ्या वडिलांना म्हाडा गिरणी कामगार सोडत मध्ये सदनिका मिळाली आहे. मृत्यूपूर्वी ही सदनिका माझ्या नावे करावी असे वडिलांचे मत होते, आई सुद्धा त्यासाठी सहमत आहे. परंतु वडिलांच्या निधनानंतर माझा भाऊ लग्न करणार आहे असे सांगून स्वताच्या इच्छेने घर सोडून निघून गेला. त्याला घर सोडून ७ महीने झाले आहेत, त्याचा काहीही पत्ता नाही. आता ती सदनिका माझ्या नावे करावे असे आई चे ही मत आहे कारण आई माझ्यासोबत राहत असून तिची पूर्ण जबाबदारी माझ्यावरच आहे, परंतु मला वारसा हक्क नुसार खूप अडथळी येत आहेत. म्हाडाच्या पत्रा नुसार मला दुय्यम निबंधाकडे पंजीकृत केलेले हक्क सोड लेख (Deed of Relinquishment) आणि वारसा प्रमाणपत्र (Heirship Certificate) सादर करणे बंधनकारक आहे.
कृपया मला मार्गदर्शन करावे.
आवश्यक कागदपत्रे सादर करावी

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सामाईक शेती क्षेत्रातील स्वतः चा हिस्सा विकता येतो ❓उदा. 87 आर मध्ये 4 हिस्सेदार असून तिघांची इच्छा स्वतः चा हिस्सा तिघांच्या सहमतीने एकत्र विकायची आहे. चौथ्या ला स्वतः चा विकायचा नाही.
शेतजमीन असल्यास तुकडेबंदी कायद्याचा भंग होतो का पहा ?
जमिनीची स्वरूप काय आहे ?
बागायत /जिरायत कि एकपिकी
कोणत्या ठिकाणी जमीन आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मला मी स्वतः प्लॉट घेऊन घर बांधले आहे ते मला माझे पत्नी ला बक्षीस देताना काय करावे लागेल व काही खर्च येयेल काय.
बक्षीस पत्र करा व नोंदणीकृत करा
निवासी मिळकत असल्याने व पत्नीच्या नवे करत असल्याने केवळ २०० रुपये मुंद्रणक शुल्क lagel .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Shailendra
13-08-2021
Shailendra9944@gmail.com

नमुना 8अ वर नवीन मालकाचे नाव आहे आणि 7/12 वर जून्या मालकाचे नाव आहे ..ताबा नवीन मालकाचाच आहे ..भू संपादनाची नोटिस ही नवीन मालकाच्या नावे आहे..आणि जुना मालक त्यास संमती देत नाही आता तर काय करावे तो मोबदला मिळण्या साठी
काही चिंता नसावी
नवीन मालकासच नुकसान भरपाई मिळेल
जुम्ल्या मालकाची संमती आवश्यक नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by C.K. Sarode
12-08-2021
sarodeck@gmail.com

Please send a PDF copy of your Circular dated 21/11/1957 to regularise the defaulter members in co-op. Housing Society. महाराष्ट्र शासन परिपत्रक दिनांक 21/11/1957

Question by kuldip patil
12-08-2021
kuldee8360@gmail.com

माझा प्रश्न गावठाण वाढ विस्तार योजनेमध्ये सन 1993 मध्ये मंजूर भुखंड सन 1999 मध्ये तक्रारी झाल्या म्हणूण प्रदद करता येतो का आणी याबाबत अपिल कोणाकडे व किती कालावधीत करावे

ताबा घेतला असेल तर अश्या कोणत्या तक्रारी झाल्या म्हणून , प्रदान आदेश रद्द करावा लागेल ?
ताबा घेतला असल्यास आता काही उपयोग होणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आजोबा हयात असताना जर रजिस्टर वाटणी करून दिली असेल तर त्या जमिनी मध्ये मुली हक्क मागू शकतात का,,वाटणी पत्र हे 80च्या नियमाखाली झाले आहे पण कुठल्याही मुलीचे हक्क सोड घेतले नाही,,,तर त्यांना हक्क मिळू शकतो का
आजोबांची वडिलोपार्जित मिळकत असेल व या पूर्वीच जमिनीचे वाटप झाले असेल तर , आता काही करता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर ,
औरंगाबाद जिल्ह्यामध्ये माझ्या आज्जीच्या नावे 1.44 आर जमीन होती
माझी आज्जी मयत झाल्यानंतर सदरील जमीन माझ्या वडिलांच्या (72 गुंठे) नावे व काकांच्या नावे (72 गुंठे) वाटणी प्रमाणे झाली.
व सदरील (72 गुंठे) जमीन माझ्या वडिलांनी व माझ्या दोन भावांनी आम्हाला माहिती न होऊ देता 2012 ला परस्पर दुसऱ्यांना विक्री केली
असे की सदरील जमिनीचे वाटणी पत्रक झालेले नसून वडिलांनी व माझ्या दोन भावांनी आम्हास माहिती न देता सदरील जमीन परस्पर विकली
हि जमीन मला व माझ्या बहिनींला कशी परत मिळेल व योग्य मोबदला कसा मिळेल कृपया करून मार्गदर्शन करावे.
दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा आपणास नुकसान भरपाई मिळेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आम्ही 40 वर्षापासून गावठाण जमिनीमध्ये राहतो , घरपट्टी भरतो , त्या जागेवरून आम्हाला कोणी काढू शकत का, आणि ते जागा नावावर होऊ शकते का आणि होत असेल तर कशी?
जागा कोणाच्या मालकीची आहे ? त्याची हरकत नसेल तर हरकत नाही
नावावर होण्यासाठी मालकास संपर्क करा व विकत घ्या
मालक तयार नसल्यास Adverse -possession चा दावा दिवाणी न्यायालयात दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Datta putwad
09-08-2021
dattaputwad@gmail.com

नमस्कार सर १९७९ मध्ये ग्रामपंचयतीमार्फत ८० फ्लोट वाटप केले गेले आहेत. त्या मध्ये आमच्या वडीलाला फ्लोट भेटला आहे. आणि आमच्या लगत चुळत्याला पण भेटला आहे .चुलता चा फ्लोट आमच्या वडिलांनी २००१ मध्ये विकत घेतला आहे. त्या ठिकाणी आम्ही राहतो. पण त्याचा फेरफार झाला नाही. ग्रापंचायतीला नोंद झाली नाही आता चुलता मयत आहे त्याची मुले विकल्ले नाही मानतात त्या फ्लोट ची खरेदी विक्री होत नाही मानतात. तर काय करायचं सर



वास्तविक ग्रामपंचायतीस शासनामार्फत जागा दिली जाते . त्यामुळे अश्या जमिनीची विल्हेवाट ग्राम पंचायतीस लाव्हता येत नाही . त्यामुळे आपण जरी प्लॉट विकत घेतला असला तरी आपले नावे होणार नाही तद्वत नोंद करता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझ्याकडे वडिलोपार्जित शेती होती ती मी 2010 ला आत्याला हक्क सोड करून दिले आणि बाकीची शेती विकली तर आता मला नवीन शेती घायची आहे तर मी घेऊ शकतो का?
सध्या आपण शेतकरी नाही
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ नुसार बिगर शेतकरी व्यक्तीस जमीन खरेदी करता येत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर आमच्या गावात एका व्यक्तीने त्याच्या मिळकती मधील 40 एकर जमीन देवस्थान ला बक्षीस पत्राने बक्षीस दिली परंतु देवस्थान मधील ट्रस्टी लोकांनी ती document तलाठी कार्यालयात सादर केली नाही परिणामी जमिनी अजून मूळ व्यक्तीच्या नावे राहिली आणि आता गावातील अनेक लोक त्या जमिनी ना कुळ लावून कुळ खरेदी करून घेत आहेत या वर मार्गदर्शन करावे
जरी जमीन ७/१२ ला देवस्थानाचे नावे झाली नसली तरी जमीतील मालकी देवस्थानचे नावे हस्तांतरण झाली आहे . अश्या मिळकतीस कुल लागू शकतो मात्र त्याची विक्री कुळाच्या लाभात होऊ शकत नाही
तसेच हि बाब तहसीलदार यांचे निदर्शनास आणून द्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Surekha Tupe
07-08-2021
surekhatupe03@gmail.com

सुरेखा तुपे - surekhatupe03@gmail.com

Feedback : शिक्षण संस्था 1960साली संस्थापक यांनी आजाेबांना ताेंडी 20 गुंठे जागा वहिवाटीस दिली 1992साली संस्थेने अनेक लाेकांना वाणिज्य कारणासाठी 99 वर्ष भाडेकरारांने जागा दिली आहे. आजाेबांना ही दिली त्यामध्ये 20 गुंठेचा उल्लेख नाही. ग्रामपंचायत 1966 सालापासून नाेंद आहे. आज ही जागा आम्ही वहिवाट आहे. ग्रामपंचायत आम्हाला अतिक्रमण नाेटिस देत आहे.वहिवाटीस मज्जाव करत आहे.काही गांवगुंड दमदाटी करत टपरी वडापाव भाजीपाला फळे विक्रते यांना आमच्या दारात बसवित आहे.कुंटुबाल मानसिक टाँवर्च करत आहेत. न्याय कसा मिळेल.7/12 नाेंद कशी हाेईल .प्लीज मार्गदर्शन करा.
२० वर्षाहून अधिक काळ आपल्याकडे जमिनीचा ताबा आहे . वहिवाटीस अडथळा करू नये म्हणून दिवाणी दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर
आमच्या गावात एका व्यक्तीने 40 एकर स्वतःच्या मालकीची जागा देवस्थान ला बक्षीस पत्राने बक्षीस दिली परंतु देवस्थान मंडळ यांनी बक्षीस पत्र आणि संबंदीत कागद स्वतः कडे ठेवले ते कोणत्याही कार्यालायत पुढील प्रक्रिये साठी सादर केले नाहीत परिणामी काही वर्षांनी त्या जमिनीवर कुळांची नावे लागली आणि कुळ खरेदी विक्री करायला लागली या वर काय करता येईल ती जागा पुन्हा देवस्थान ला मिळेल का ?
सर आमच्या गावातील मातंग समाज मंदिरासाठी असलेली जागा हि ग्रामसेवक व माजी सरपंच यांनी परस्पर हि जागा त्यांनी त्यांच्या हितधारकां च्या नावाची नोंद केली आहे आणि त्या ठिकाणी मातंग समाज मंदिर असा उल्लेख अहतानाही त्याला गोल करुन त्याच्या खाली त्या खाली या हितचिंतक का ची नावे लिहिली आहेत. या वरती आपण काय योग्य ती कारवाई करु शकतो
ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांना जमीन वाटप करण्याचा अधिकार नाही . आपण प्रांतअधिकारी यांचेकडे अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

१) दुय्यम निबंधक कार्यालयात मिळकत दस्त नोंदणी विरुद्ध हरकत अर्ज स्विकारला जातो का ?
२) उप अधीक्षक भूमीअभिलेख कार्यालय यांना हरकत अर्ज मिळाल्यास चौकशी नोंद वही किंवा मिळकत पत्रिकेवर पेन्सिलने हरकत आहे म्हणून नोंद करुन शकतात का ?
३) फेरफार विरुद्ध अपिल करण्यासाठी किती कालावधीची कायद्यात तरतूद आहे ? कालावधीनंतर पुढील मार्ग काय ?
१. कायद्या मध्ये हरकत घेण्याची /मागवण्याची तरतूद नाही . मात्र एखादी नोंदणी कायद्याविरुद्ध होत असेल तर हरकत तपासली जाते
२. उपाधीक्षक यांचे कामकाज जमीन महसूल कायद्याप्रमाणे चालते त्यामुळे आपल्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर काही अंशी होय असे आहे
३. ६० दिवस

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर, आमचे राहते घर हे आजोबाच्या नावे आहे.आजोबा मयत झाले आहेत. मला ते राहते घर वडिलांच्या नावे करायचे आहे. पण वडिलांना 3 भाऊ आणि 6 बहिणी आहेत त्याची संमती घ्यावी लागेल का? चुल्याचा नावे करून देंण्यास विरोध आहे. आणि ग्रामपंचायत त्याचे संमती पत्र मागते आहे. तर ह्या साठी मला मार्गदर्शन करावे की घर नावे कसे होईल.
आजोबांचे घर आहे त्यामुळे त्यावर सर्वांचा अधिकार आहे . इतरांची संमती असली तरी नोंदणीकृत दस्ताद्वारे हक्क सोडणे आवश्यक आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Ganesh Pingale
05-08-2021
pingala.g07.gp@gmail.com

सर दुसरयास अकॉउंट ने उसनवार दिलेले पैसे परत मिळण्यासाठी कायदेशीर मार्ग सूचवने
वकिलांचा सल्ला घ्यावा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.52 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3400
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3