जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Gopal chim
20-04-2021
gopalchim@gmail.com

नमस्कार सर
माझे बाबा, काका, व मोठे बाबा ,याचे नावे मलकापूर येथे दोन गुंठे प्लॉट आहे. 7/12 वरती तिघांची नावे आहे . .वाटणी पत्रासाठी काका सही द्यायला तयार नाही, तर बाबांच्या नावाने वेगळा 7/12 कसा मिळेल
१. २ गुंठे क्षेत्र हे बिगर शेती जमीन वापर विभागात असणे आवश्यक आहे . अथवा नगर पालिका हद्दीत असणे आवश्यक आहे . जर नसेल तर जमीन वाटपामुळे जमीनीचा तुकडा निर्माण होणार असेल तर अश्या जमीनीचे वाटप पत्र होणार नाही .
२. मात्र जर मिळकत बिगर शेती जमीन वापर विभागात असेल तर , आपण न्यालयात आपले हिस्से निश्चित करून त्याचे वाटप करण्याचे आदेश देणे व हिस्स्यानुसार , जमिनीचे वाटप जिल्हाधिकरी यांनी दिवाणी संहिता कलम ५४ प्रमाणे वाटप करून मिल्ने , या बाबतचा हुकूम /आदेश मिळण्यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा ..

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by आदेश
19-04-2021
aadiraut93@gmail.com

आजोबांनी गावातील बखळ जागा वडिलांच्या नावे केली आहे. त्या जागेच्या कागदपत्रांवर सिटी सर्व्हे नंबर आहे, पण त्या कागदपत्रांवर कुठेही ग्रामपंचायत मिळकत क्रमांक नमूद केलेला नाही, यावर काय करावे लागेल?
एखाद्या गावाचा कलम १२२ खाली सर्वेक्षण झाले कि त्यास सिटी सर्वे नम्बर मिळतो व त्याचे मिळकत पत्रिका तयार होते . त्यावर ग्राम पंचायत क्रमांक नमूद नसतो .
आपण ग्राम पंचायतीकडे आपल्या मिळकतीचे आकारणी ( घरपट्टी ) केली आहे का ? केली असल्यास , मालमत्ता आकारणी नोंदवही मध्ये मिळकत क्रमांक नमूद असतो .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Prakash munde
16-04-2021
mundep6@gmail.com

आमचे नाव पीक पाहणी लागले आहे तर आम्हाला मालकी हक्क साठी काय करता येईल
पीक पाहणीला नाव लागले म्हणजे आपण त्या जमिनीचे मालक होऊ शकत नाही
पीक पाहणी म्हणजे त्या पीक हंगामात आपण दुसऱ्याची जमीन कसली
सध्या ७/१२ सदरी नाव लावले जात नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Sir mi 26 Varshancha aahe. Majhe vadil Mi 2 Varshancha Astana Gharatun Nighun gele aahet. Tya veles FIR dakhal kele navhte. Tyanchya navavar gavakade ek plot aahe. To Varsa hakkane Milavnyasathi kay karave lagel. Ani tya sathi kiti kalavadi lagel?
भारतीय पुरावा कायदा १०८ नुसार एखादी व्यक्ती बद्दल ७ वर्ष काहीच माहित नसेल तर , ती व्यक्ती मयत आहे असे मानण्यात यावे ,
मात्र एखादी व्यक्ती मयत ( अश्या कारणांमुळे ) आहे , हे न्यायालयाने जाहीर करणे आवश्यक आहे .
पुरावा म्हणून missing complaint दाखल के;लेली असणे आवश्यक आहे .
आता दाखल करा . ७ वर्षांनी आपणास न्यायालयाकडून declaration घेता येईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Gopal chom
11-04-2021
gopalchim@gmail.com

नमस्कार सर
माझे बाबा, काका, व मोठे बाबा ,याचे नावे मलकापूर येथे दोन गुंठे प्लॉट (NA36)आहे. 7/12 वरती तिघांची नावे आहे .बाबाना आपल्या हिश्याची जमीन विकायची आहे .वाटणी पत्रासाठी काका सही द्यायला तयार नाही, तर ती जमीन विकू शकतो का ?
किंवा वेगवेगळे 7/12 बतील का ?

Question by Ashfaque Patel
10-04-2021
patelashfaque@gmail.com

वर्ग 2 ची ज़मीन जी 6 ब मध्ये मोडते मात्र महार वतन नाही व त्याला आकारणीच्या 3 पट कब्जेहक्काची रक्कम घेऊन पुनरप्रदान केलेले आहे.अता ती ज़मीन उर्वरीत रक्कम आकारणीच्या 10 पट घेऊन शेतीपरियोजना साठीच वर्ग एक किंवा जुनी शर्तीने केली जाऊ शकते का?
नमस्कार , सर माझा प्रश्न असा आहे की , दुय्यम निबंधकांकडे धाव न घेता सख्या भावाची जमीन त्याच्या संमतीने व राजीखुने आपल्या नावावर करता येते का? कारण दुय्यम निबंधक कार्यालयाकडे जावून बयनामा / जमीन नावावर करून घेण्याची आमची ऐपत नाही.
महाराष्ट्र मुंद्रणक अधिनियम १९५८ च्या कलम ३ अन्वये दस्त हा योग्य त्या शुल्काणे मुन्द्रांकित असणे आवश्यक आहे . तसेच नोंदणी कायदा कलम १७ अन्वये नोंदणीकृत करणे आवश्यक आहे . या प्रक्रयेतून जावे लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. महोदय साहेब
माझ्या वडिलांचे अल्पशा आजाराने मयत झाले आहे . एक जमीन आहे २६ गुंठे ची भातशेती आहे. गेली २५-२६ वर्षे माझे वडील भातशेती करून राबत आहेत. ती भातशेती जमीन भावहिस्सा म्हणून माझे वडिलांना देण्यात येणार होती, परंतु ती जमीन वडिलांच्या काकाचे नावे आहे. ते वडिलांचे काका मयत असून ती जमीन सध्या त्या वडिलांचे काकाच्या वारसाचे नावे आहे. तर ती जमीन मला भावहिस्सा म्हणून माझ्या नावे कशी कशी मिळवता / करता येईल ?
काही करता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर.
माझ्या वडिलांचे नावे एक जमीन आहे तर त्या जमिनीच्या 7/12 खातेउताऱ्यावर एका अज्ञात व्यक्तीचे नाव लागले आहे त्या नावाची व्यक्ती कोणीही नाही तर त्यांचे नाव कमी करण्यासाठी काय करावे
अज्ञात व्यक्ती मयत असल्याकजे सिद्ध झाले तर जमीन शासनाकडे जाणार .
आपण काही करून उपयोग नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार,
एकतर्फी विभागीय चौकशी दरम्यान कर्मचा-यास सुनावणी तारखा कळविणे व बडतर्फ केल्याबाबतचे आदेश तामील करणेबाबतची कार्यपध्दति बद्दल मार्गदर्शन करणेस विनंती आहे.
धन्यवाद
नमस्कार सर ७/१२ वरील इतर अधिकारात कुल कायद्याने प्राप्त जमीन कु.का.क्र ४३ प्रमाणे नियंत्रित सत्ताप्रकार जमीन मालक यांना रु.१०८२ हे १२ हप्त्यात मिळणेचे आहे असा शेरा आहे तरी सदर शेरा कमी करण्यासाठी काय करावे लागेल
हि जमीन कुल कायद्या अंतर्गतची आहे
कुळाचे नावे ३२ग किंमत झाली आहे . मात्र अजून कुळाने पैसे भरले नसल्याने तो शेरा अजून राहिला आहे
पैसे जमा केली कि आपणास ३२म प्रमाणपत्र मिळेल . त्या आधारे इतर हक्कातील शेरा कमी होईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार माझे आजोबांना कुळ कायद्यात 5 एकर जमीन मिळालेली आहे..माझे वडिल एक काका आणी एक आत्या अशी तिघे भावंडे खुप लहान असतांनाच आजी मयत झाली. त्यामुळे आजोबांनी दुसरे लग्न केले त्यानंतर त्यांना सावत्र आजीपासुन 3 मुले व 3 मुली अशी सहा अपत्य झाली. नंतर आजोबा वारल्यामुळे वारसाने 1पत्नी 5मुले व 4मुली अशी एकुण वारसनावे लागलेली आहेत... आता सावत्र आजी मयत झाली...त्यानंतर माझी सख्खी आत्या ही मयत झाली ..सख्खे काका तर जवळपास 25 वर्षापासून बेपत्ता आहेत त्यामुळे वडील एकटे पडलेत आणी सावत्र 3 काकाचा जमीनीवर कब्जा आहेत सावत्र असल्याने त्याच्यांशी नेहमी वाद होत असतो वडीलांचे म्हणण्यानुसार वडिल पहिल्या आईचे असल्याने त्यांना जमिनीचा 50% हिस्सा मिळाला पाहिजे..तसे असेल तर तो कायदेशीर कसा मिळु शकतो याबाबत कृपया मार्गदर्शन करावे ..
हिंदू विवाह कायदा १९५५ च्या कलम १६ नुसार , अनौरस मुलानांही मिळकत मध्ये पहिल्या लग्नापासून झालेल्या मुलांइतकाच हक्क आहे . सर्व मुलाना सामान हक्क आहे . आपले म्हणणे चुकीचे आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर
मृत्युपत्र असताना मृत्युपत्र करणाऱ्या अगोदर जर ज्याच्या नावाने मृत्युपत्र आहे तो मरण पावला व मृत्युपत्र मध्ये काहीच बदल केला नाही.आणि तो नातलग पण नाही तर काय करावे
मृत्यपत्राला काही उपयोग नाही . मृत्युपत्राप्रमाणे जमिनीची विल्हेवाट होणार नाही . वारस कायद्यप्रणे वाटप होईल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Avinash kasar
01-04-2021
Avinashkasar1978@gmail.com

सर 1941 साली माझे आई चे आजोबा वारलेत त्या नंतर वारस म्हणून आई चे 2 मामा व अपाक आई चे म्हणजे आजी चीम उताऱ्यावर नोंद झाली. तसेच 1 मामा वारला म्हणून त्याचे 2 मुली व1 मुलगा अशी नोंद मामी ने केली 2 मामा हा परगणदा आहे आणि मामी ने 1 मामा चा मृत्यू नंतर दुसरे लग्न केले परतू त्या मुलाची जन्म तारीख व बापाची मृत्यू तारीख शंका आहे तो13 महिने12 दिवस इतका फरक आहे व त्या मुलांना आमची आजी अजून पर्यंत अपाक म्हणून आहे परंतु आजी अनपड असल्या मुळे आमच्या आई ची नोंद केलीच नाही ही बाब आम्हला आता लक्षात आली आमची आई वारली असून तिच्या मृत्यू दाखल्यावर व पॅन कार्ड वर आजी आजोबांचे नाव आहे।आम्ही वारस नोंद साठी तहसिल कडे व आजू बाजूकडीलआजी चे भाऊबंद यांचे जवाब घेवून अर्ज100 च्या बॉण्ड करून सादर केलं आहे तर आमच्या आई ची व आमची वारस नोंद होईल का आमच्या आई चे वारस म्हणून मामी ने लपवले आहे तसेच त्या मुलाचे नाव कमी होईल का आम्ही लेट झालो तरी लेट फी भरण्यास तयार आहोत कृपया मार्गदर्शन करावे

केवळ आपले आई ची नोंद होऊ शकते . उशीर झाला म्हणून आई चा हक्क कोणी हिरावून घेउ शकत नाही , आपण प्रांताधिकारी यांचेकडे अपील करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या आईचे वडील 2017 ला मयत झाले आहेत आणि माझी आई पण 2007 ला मयत झाली आहे माझ्या आईला दोन भाऊ आणि एक बहीण आहे सातबाऱ्यावर इतर अधिकार मध्ये माझ्या आईचे व तिच्या बहिणीचे पण नाव नमूद नाही तर नवीन कायद्यानुसार आईच्या वडिलोपार्जित जमिनीचा हक्क मागता येतो का
२००५ च्या सुधारणा कायद्याने मुलींना मुलांइतकाच मिळकतीत समान हक्क दिला .. आपली मिळकत २००५ पूर्वी तिचे वाटप झालेले नाही . वारसा कायद्याने आपली आई व मावशी हिचे नाव लागलेले नाही .
त्या दोघींचे म्हणजे त्याचे वारसांचे नाव लागू शकते .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Pruthvi Takale
30-03-2021
Pruthvi Takale2@gmail.in

सर आमच्या आजोबांनी 1998 साली चार एकर दोन गुंठे जमीन घेतली होती तर ती वर्ग दोनची जमीन आहे ती महार वतन जमीन आहे सदरची जमीन 1998 साली खरेदी केली होती त्याचा सातबारा उतारा सर्व माझ्या वडिलांच्या नावावर आहे आणिआजोबं‌नि जमीन विकत घेतली होती त्या माणसाने आमच्यावर केस दर्ज केली आहे की यांनी आमची जमीन फसवून घेतलेली आहे तर आता मी काय करावे सांगा
जर अशी वस्तुस्थिती नसेल तर घाबरण्याचे कारण नाही . खरेदी खत न्यायालयाने रद्द करावे लागते .
केस केली म्हणजे त्याने फौजदारी दावा न्ययालयात केला आहे का ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

पत्नी च्या नावाने सात बारा असेल तर पतीचे नाव सहहिससेदार म्हणून दाखल करता येईल का
सर आमचे अत्याचे 2016 साली हक्कसोड पत्र झाले आहे पण अजून नोंद झाली नाही तर आपण अजून किती वर्षापर्यंत नोंद करून घेऊ शकतो, किंवा त्याला काही मुदत असते का
नोंद केव्हाही होऊ शकते . नोंदणीकृत हक्कसोड पत्रकास मुदत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

पत्नी च्या नावाने सात बारा असेल तर पतीचे नाव सहहिससेदार म्हणून दाखल करता येईल का

Question by Shrikant Thakare
30-03-2021
svthakare74@gmail.com

आई वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या नावावर असलेले शेअर सर्टिफीकेट माझ्या नावावर झाले असून आता मला घरपट्टी माझ्या नावावर करायची आहे. त्यासाठी मला काय करावे लागेल.
आपण ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात राहता , त्या ठिकाणी अर्ज करा . शेर सर्टिफिकेट छायाप्रत जोडा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझा एक प्रश्न आहे की सन 1988 मध्ये खरेदी विक्री व्यावहार झाला आहे पण ती जमीन पहिल्या मालकाला वारस हक्का मधुन आलेली आहे व ते 2 भाऊ 4 बहीणी पण आहेत व त्यानी जमीन 1988 मध्ये विकली आहे . पण आज 7 / 12 वर ईतर अधिकारात फेर क्रमाक लिहला आहे व त्या क्रंमाक वरून जर फेरफार काढला असता त्यात वारसाचे नाव दाखात आहे पण आज मला ती जमीन विक्री करायाची आहे व खरेदीदाराला वारसने पुढे काही प्रोब्लम येऊ शकतो क्यकरून ते नावे वारस हक्कातुन कमी कसे करता येतील क्रुपाया माहीती द्या सर
ज्या इसमाकडून आपण जमीन खरेदी केली आहे , त्याला त्याच्या हिस्स्याची जमीन मिळालाय असेल व ती त्याने विकली तर कोणतीही अडचण अन्य वारस यांनी करण्याचा प्रश्न उद्भवत नाही .
मात्र विक्रेता हा ए कु पु होता व त्याने सर्वांची जमीन आपणास विकली असेल तर , त्या अन्य वारसांचा हक्क त्या मिळकतीत आहे .
मालमत्ता हस्तांतरण कायदा अन्वये मिळकत विक्रेत्याला विक्री करण्याचा हक्क आहे , त्याचे title वाद विरहित आहे हे सांगण्याची जबाबदारी , विक्रेत्याची आहे . title defective असून हि आपण घेणाऱ्यास न सांगता विक्री केली तर , वारसांनी न्यायालयात दावा दाखल केल्यास , घेणाऱ्यास काही प्रॉब्लेम येणार नाही मात्र आपणाकडून जमिनीचे मूल्य ( वारसांच्या हिश्य्याचे ) , व्याजासह वारस यांना परत करावे लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sijauddin r muja
27-03-2021
Sijauddinm786@gmail.com

मुस्लिम कुटुंबामध्ये joint family system येत नाही.
परंतु revenue record ला 7/12 सदरी एकुप अशी नोद आहे . कुळ कायदा 32ग दाखला कुटुंबातील elder person च्या नावे देण्यात आले . सर माझा प्रश्न असा की revenue record व muslim law मध्ये तफावत का दिसुन येते ?




सर एक गरीब अपंग व दारीर्द्यरेशे खालील कुटुंब झोपडीवजा घरात 1952 पासून रहात आहे आज मितीस ते घरपट्टी भरत आहे.परंतु ते मोडकळीस आलेले घर त्यांना बाधावयाचे आहे पण सदर जागा दुसर्या च्या मालकीची निघाली आहे त्या कुटुंबात कोणतीही गावात दुसरी जागा नाही. तरी मार्गदर्शन व्हावे. सदरचे जागा मालक आपल्याच महसुल विभागाचे सेवानिवृत्त सर्कल आहे.
ज्या घरास बांधकाम परवानगी दिलेली असेल त्याच घरास दुरुस्तीची परवानगी मिळेल . नियोजन प्राधिकरी , ज्याचे नावे जमीन असेल त्यालाच , नवीन बांधकाम परवानगी अथवा दुरुस्थी परवानगी देऊ शकतात
मिळकतीचे /जमिनीचे मालकी हक्क जो पर्यंत झोपडीधारकाचे नावे नसतील तो पर्यंत परवानगी मिळू शकणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

साहेब, पुनर्मोजणी योजने अंतर्गत नकाशा चुकीचा आहे .
वडिलोपार्जित लगतचे 2 सर्वे न सामुहिक असताना शेतातील पाण्याचा ओढा निघण्याकरिता सोयीनुसार बांध बांधला पण पुनर्मोजणी मध्ये त्याच बांधा ला शेतीची हद्द दाखवून नकाशा बनविला व बांधाच्या दुसऱ्या बाजूची जमीन दुसऱ्या सर्वे न मध्ये दाखवली . आता तो सर्वे न जमीन वाटणी मध्ये आजोबांच्या भावाला मिळाला व कमी आकराच्या सर्वे न अजोबला मिळाला. अधिकार अभिलेक मध्ये आराजी 4.20 हे आ आहे पण मोजणी मध्ये 3.53 हे आ भरते. सध्या शेतमोजनी पुनर्मोजणी योजने चा नकाशा ग्राह्य धरून करण्यात येते तर पुनर्मोजणी नकाशा दुरुस्ती साठी काय करावे लागेल.
सर,माझ्या शेता ला लागुन असनारे आठ एकर शेती पैकी एक एकर विकत घेता येईल का . त्या करिता उपल्बद शासन निर्नय कोनता तो शक्यतो कळवा किंवा द्या ही विनंती
जमीन विकणे हा त्या संबंधित व्यक्तीचा अधिकारी आहे त्यामुळे त्याने जमीन विकावी किंवा नाही ही याबाबत शासन कोणताही आदेश देऊ शकत नाही . अशा प्रकारचा शासन निर्णय नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.35 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3400
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3