जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by दिनेश बडगुजर
18-06-2021
dineshpbadgujar@gmail.com
ड पत्रक नोंद मध्ये नमूद असलेली बाब ७ / १२ उताऱ्यावर तहसीलदार नोंद घेण्यास मनाई करत आहेत ? सदर बाबीत कलेक्टर च्या notice वर पण कारवाही होत नाही आहे ?
Question by ramrao walke
13-06-2021
ramraobapuwalke66@gmail.com
Sir 2011roji majhya jaminiver shejaryane 20-22 gunthe atikraman kele junior hadda jcp be todali yachi mahiti meet Tehsildar aani DC yana arjadware dili tehsildarachi arjachi nakkal office shikka majyakade aahe parantu DC SP yanche postachi rashid aahe jun2020 roji doghanchi sarkari MOJNI jhali donhihi mojnit jevadhe atikraman jhale note tevdhe nighale .aaj atikraman karnara tya jagevar vahivat karit aahe .mala tarcampound karu det nahi.Tehsildar DC yanchyakadun aajparyant kuthlihi karvayi jhali naahi doghanchyahi mojnit atikran sidh jhale mahitichya adhikaratun meet tyachya gatacha k patrak nakasha milavila aahe bhumiabhilekh yani molni arjdararachya magninusar falni nakasha durusti sathi prakaran nikali Ashe ASA shera Nov 2020 roji tyachya k patrak nakashaver lihila aahe Kay karave
आपला हद्दीबाबत वाद असता तर कलम १३५ अन्वये आपण जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करून तो सोडवू शकला असता . मात्र पण पाळ्या प्रश्नात नमूद केले आहे कि , जमिनीची मोजणी झाली आहे . आपल्या जागेत त्याने अतिक्रमण केले आहे .
आपणास दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by ANANT KANGRALKAR
12-06-2021
akangralkar@rediffmail.com
अवैध पध्दतीने जमिनीवर नाव दाखल झाल्यानंतर कोणत्या कायद्याअंतर्गत सातबारावरील अवैध नाव कमी करता येईल. आमचे नाव करण्यासाठी अवैध रित्या नाव दाखल केलेल्या व्यक्तीची संमती आहे.तसेच आम्ही दिवाणी न्यायालयामधून खरे वारस म्हणून वारसा प्रमाण पत्र मिळविले आहे. वारसा प्रमाण पत्र व त्या व्यक्तिचे संमती पत्र जोडून सातबारा, व इतर हक्कात नाव दाखल करणेसाठी तहसीलदाराकडे अर्ज करता येऊ शकते का?
ज्या फेरफाराने अवैध वारसाचे नाव ७/१२ सादरी लागले आहे तो फेरफार , प्रांताधिकारी यांचेकडे अहवानीत करा . फेरफार रद्द झाल्यावर आपले नाव वारस प्रमाणपत्राचे आधारे आपले नाव लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vijay Kondaji Pokharkar
09-06-2021
sandippokharkar2007@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे कि,
सन १९६८ पासून आमचे वडिलोपार्जित घर शेतात आहे. पुढे सन १९९० ला घराचे नूतनीकरण केले. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या आवश्यक परवानगी घेतलेली आहे.ग्रामपंचायतीस नियमितपणे घरपट्टीच्या पावत्या आणि घरपट्टी देखील भरलेली आहे. परंतु सदर जागा हि आमची वडिलोपार्जित असून त्या जागेची किंवा शेतीचे क्षेत्र वडिलांच्या नावावर नाही. सदर क्षेत्रातील घरपड किंवा ७/१२ ला घराची नोंद करण्याबाबत मार्गदर्शन करावे.
Question by Dhananjay ghodekar
07-06-2021
dhananjayghodekar8@gmail.com
दोन गावच्या शिव रस्ता करायचा असल्यास काय करावे लागेल? चालू रस्ता पूर्णपणे माझ्या व आमच्या गावच्या हद्दीतून आहे . तरी काय व कसे करावे कोणाकडे अर्ज करावा अणि कसा लवकरात लवकर हा रस्ता होईल?
आपण कलम १३५ (MLRC १९६६ ) खाली जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Pankaj Nandurkar
07-06-2021
p.nandurkar03@gmail.com
ग्राम पंचायत क्षेत्रतील वडिलोपार्जित गावठान जमीन आपल्या नावावर करता येते का ❓ करता येत असेल तर कशी करावी?
गावठाण हद्दीतील जमीन आपले नावावर करण्यासाठी ग्राम पंचायतीकडे अर्ज करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Shekhar davane
05-06-2021
9112389199
1 boar mazy vatanit ani maze nave ahe pan maza chulata mahnto tya boar madhe maza pan hissa ahe tar kay karave
जर आपले काका , त्या विहिरीतून /बोरमधून पूर्वीपासून पाणी घेत असतील तर त्यांचा हक्क आहे . आपण काही करू शकणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vaishali Pavankumar Pawar
04-06-2021
vaishalipawar01985@gmail.com
नमस्कार माझे पती श्री. पवनकुमार शिवाजी पवार रा. तडसर, ता. कडेगांव, जि. सांगली यांनी दिनांक ३०/०३/२०२१ रोजी तडसर येथील गट नं. ७७९ मधील सामाईक क्षेत्र असलेल्या जमिनीपैकी २५ गुंठे जमिनीचा विक्री व्यवहार श्री. भास्कर संपत पाटील यांच्याशी दारूच्या नशेत केलेला आहे, त्या गटामध्ये माझे पती श्री. पवनकुमार शिवाजी पवार यांच्यासोबत माझे दीर व माझाही बरोबरीचा हिस्सा असून घेणाऱ्या व्यक्तीने माझी कोणतीही पूर्व कल्पना, परवानगी, संमती घेतलेली नाही.तसेच माझी नणंद व सासूबाई यांचाही इतर हक्कामध्ये हिस्सा आहे त्यांचीही घेणाऱ्या व्यक्तीने कोणतीही पूर्व कल्पना, परवानगी, संमती घेतलेली नाही. तसेच गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत माझेही नाव दि. ०३.०३.२०२१ पासून सर्व खाते उताऱ्यावरती लावलेले असून मा. दुय्यम निबंधक यांनी हा दस्त माझ्या व इतर हक्कातील कोणाच्याही पवानगीशिवाय केलेला आहे. तरी तो व्यवहार बेकायदेशीर ठरवून रद्द करता येतो का? आमच्या वडिलोपार्जित जमिनीच्या वाटण्या झालेल्या नसताना चतुःसीमा निश्चित नाहीत. सध्या कोरोना मुळे लॉक डाऊन असलेने आम्हांस कोणतीही शासकीय कागदपत्रे मिळालेली नाहीत तरी मला माझी जमीन मिळेल का? त्यासाठी मला काय करावे लागेल ?
जे २५ गुंठे क्षेत्र आपल्या पटीने नशापाणी करून विकले आहे , त्या क्षेत्रासाठी आपले पती , आपण स्वतः व आपले दीर यांची नावे ७/१२ सादरी दाखल होती का ? जर असतील तर , आपले पटीने करून दिलेल्या दस्ताचे आधारे , फेरफार मंजूर होणार नाही .
आपण मेहेरबान तलाठी/ मंडळ अधिकारी साहेब यांचेकडे फेरफारास हरकत घ्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by समीर अनिल शेळके
04-06-2021
Samir.A.shelke@gmail.com
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 36 व 36 अ मालकी हक्काच्या पत्रात 7/12 नोंद करायचे असल्यास जात पडताळणी ची आवश्यकता आहे का? जमिनीची विक्री होऊन फसवणूक झालेली पुरावे सादर केले आहेत. महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रस्थापित करण्यासाठी अधिनियम 1974 अन्वय सुरू करण्यात आलेल्या चौकशी विरुद्ध कोणत्या सक्षम प्रांत अधिकाऱ्यांसमोर अपील दाखल करावी?
जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे .
कलम ६ खाली अपील , महाराष्ट्र महसूल प्राधिकरणाकडे करण्याचे आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सिद्धेश्वर नारायण गावंडे
02-06-2021
siddheshowar12@gmail.com
आदरणीय साहेब व्येसनाधीन नवर्याला शेत विक्री पासून कसे थांबवता येईल.
Question by अमोल काळूराम धसाडे
01-06-2021
dhasadeamol04@gmail.com
जर नगरक्षेत्रातील जमीन विक्रीस काढावयाची असेल पण जमिनीची ओरिजिनल कागदपत्रे हरवली असतील तर त्यावर काही उपाय आहे का?
Question by विश्वनाथ मोरे
01-06-2021
more.vish111@gmail.com
नमस्कार सर,
आमची जमीन खरेदी असून खरेदी पत्रा मध्ये विहिरीच्या पाणी उपसा हक्कासह आहे.खरेदी पत्रास १० वर्ष झालेली आहेत. परंतू ७/१२ मध्ये विहिरीची नोंद झालेली नाही. सदर ची विहीर भांडे सह्हिसेदारच्या क्षेत्रफळात आहे मोटार, लाईट सामाईक आहे. पण गेले वर्षभरापासून ते पाणी उपसा करू देत नाही. तरी ७/१२ सदरी नोंद कशा प्रकारे करता येईल.
केवळ ७/१२ सादरी नोंद झाली म्हणजे आपला सहहिस्सेदार आपल्याला त्या विहिरीतून पाणी उपसा करण्यास परवानगी देईल अशे नाही . आपणास तो पाणी देत नसेल तर आपण न्यायालयात दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by तुषार विलास कुरकुरे
31-05-2021
tushar.kurkure@gmail.com
सर, माझ्या आजोबांनी सन 1982 ला शेती विकली आहे. मी आता शेत जमीन घेऊ शकतो का
आपण शेतकरी नाही . त्यामुळे शेतजमीन खरेदी करता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विजय माळी
30-05-2021
vijaysmali92@gmail.com
नमस्कार सर/मॅडम
एखादी जागा सोसायटी अंतर्गत असेल याचा अर्थ काय होतो? तसेच ती जमीन पद्धती मध्ये कुठल्या वर्गात मोडते?तसेच हि जमीन भोगोटादार वर्ग 1 करता येते का? तसेच ह्या जमिनीला भोगाटोदार वर्ग 1 मध्ये जर केले तर फायदे?
कृपया कळावे. धन्यवाद!
Question by अभय काळे
27-05-2021
Kaleabhay9696@gmail.com
माझ्या वडिलांना आजोबाकडून मिळालेल्या जमीनीची विक्री माझ्या समंती शिवाय करता येईल का? मार्गदर्शन करावे
आजोबांकडून मिळालेली जमीन , केवळ वडिलांच्या हिस्सापूर्ती विकता येईल . आपला हिस्सा विकत येणार नाही . शिवाय त्यांचे हिस्स्याची जमीन विकताना आपली संमती आवश्यक यासाठी कि , आपणाला खरेदी करावयाची असल्यास .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by भावना प्रदीप पाटील
27-05-2021
patilpm1@gmail.com
सर,
आम्ही 2016 साली एका कडून त्यांची वडिलोपार्जित, वर्ग 1 ची जमीन योग्य मोबदला देऊन दस्त नोंदणी करून खरेदी केली. 7/12 वर फक्त त्या इसमाचे नाव होते. विकणाऱ्या इसमास 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. मुलीचे लग्न झालेले आहे आणि आता तिचा पती वारला आहे. आता त्या इसमाची मुलगी आम्ही खरेदी केलेल्या जमिनीवर हक्क सांगू पहात आहे आणि जबरदस्तीने जमिन कसण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे भानगडी टाळण्यासाठी, आपण कृपया मार्गदर्शन करावे.
जमीन खरेदी करताना आपण , title - search व paper notice दिली होती का ?
या दोन गोष्टी केल्या असतील तर घाबरण्याचे कारण नाही . आपण bonafide purchaser आहेत
मात्र जरी या दोन गोष्टी केल्या नसल्या तरी , जबरदस्तीने ती जागा ताबा घेऊ शकत नाही . न्यायालयाकडून तिला जमीन परत मिळवून घ्यावी लागेल . ती तिला मिळेल याची शाश्वती नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Reshma tayde
25-05-2021
reshmitaude07@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे की ती एकाच शेती क्षेत्रफळात दोनदा वारस म्हणून नाव ठेवू शकते काय?
Question by Pradip Prabhakar Jadhav
24-05-2021
pradipj500@gmail.com
नमस्कार सर,आम्ही म्हणजे एकूण 24 कुटुंबांनी सर्व्ह नंबर मध्ये घर बांधली आहेत ,त्यावेळी सारबांधवरून रास्ता होता पण तो आत्ता आढवला आहे , त्याला काय करावे लागेल,ग्रामपंचायत लक्ष्य देत नाही?
जो रस्ता अडवला आहे त्याचा वापर , शेतीसाठी होतो का ?
होत असेल तर आपण मामलतदार याजकडे , अर्ज करा . मामलतदार महोदय , मनाई हुकूम , मामलतदार कोर्ट कायदा खाली काढतील
मात्र जर शेतीसाठी वापर होत नसेल व आपण घरासाठी नियोजन अधिकारी यांची परवानगी घेतली नसेल तर , आपले घर अनधिकृत आहे . आपणस न्यायालयात जाऊनही काही उपयोग होणार नाही
ज्याने रस्ता अडवला आहे , त्याचेशी चर्चा करून , त्यास भरपाई देऊ करून , रस्ता हक्क लिहून घ्यावा . दस्त नोंदणीकृत करावा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Prabhakar Sonawane
23-05-2021
prabhakarsonawane.ps@gmail.com
भोगवटा वर्ग २ (महार वतन) हक्क सोड पत्र कसे करावे
Question by अमोल ठाकरे
18-05-2021
sonuamol1982@gmail.com
सर मी आदिवासी जमातीचा असून मला आदिवासी व्यक्ती कृषी जमीन (1966 36 अ) विकण्यास तयार आहे तर त्यासाठी
1)कोणाचीपरवानगी घ्यावी लागेल?
2) त्यासाठी काही नजराणा रक्कम भरावी लागेल का?
3) ती कृषी जमीन घेतल्यास ती बिनकृषी (NA) करता येईल का?
कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती.
१. आपणास जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागेल .
२. नजराणा नाही मात्र , खरेदी किंमत ( मिळकतीचे बाजार मूल्य ) भरावे लागेल .
३. जमीन बिन शेती करता येईल . मात्र बिन शेती केली म्हणून अन्य बिगर आदिवासी व्यक्तीस विक्री करता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by निलेश थोरात
05-05-2021
nilesh3thorat9@gmail.com
नमस्कार सर,
सर माझा प्रश्न असा आहे की , एखादी गायरान जमीन 35 वर्षापासून एखादा व्यक्ती वापरतो आणि ती त्याला नावावर करण्यासाठी के करावे लावेल?
काही करत बसू नका . गायरान जमीन हि गावातील गुरांसाठी चरण्यासाठी शासनाने दिलेली जमीन आहे . ती प्रत्येक गावात , लागवड्डीलायक क्षेत्राच्या कमीत कमी ५ % असण्याचे बंधन आहे .
जरी एखाद्या व्यक्तीचा त्यावर ताबा असेल अथवा कसत असला तरी तो अनधकृत ताबा /अतिक्रमण आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by निलेश थोरात
05-05-2021
nilesh3thorat9@gmail.com
नमस्कार सर,
सर माझा प्रश्न असा आहे की , एखादी गायरान जमीन 35 वर्षापासून एखादा व्यक्ती वापरतो आणि ती त्याला नावावर करण्यासाठी के करावे लावेल?
Question by अजिंक्य नारळीकर
01-05-2021
naralikarajinkya32@gmail.com
सर आमच्या सामाईक 7/12 मध्ये महाराष्ट्र वन आहे त्यात माझ्या चुलत भावाने कोणाचीही परवानगी न घेता बोरवेल व घरभाट नोंद करून घेतली आहे.
1)महाराष्ट्र वन जमिनीत अशी नोंद करता येते का?
2)ती नोंद अथवा फेरफार कसा रद्द करावा?
अश्या जमिनीत वनेतर कामास बंदी आहे . फेरफार रद्द करण्यासाठी प्रांतधिकारी यांचेकडे अपील करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दत्तात्रय साठे
01-05-2021
dattasathe10@gmail.com
माझ्या आजीला फसवूण कुलमुख्तारपत्र बनवून तिच्या वाट्यावरील संपूर्ण जमिन एका इसमाने स्वःताहाच्या मुलाच्या नावे २५/१२/२०२० रोजी नोंदणीकृत दस्ताने केली आहे. आम्हास जमिन विकायचीच नव्हती. तर आम्हास काय करावे लागेल? कोणाकडे अर्ज करावा लागेल?
जर कुलमुखत्यारपत्र फसवणूक करून घेतले आहे तर ते व त्या आधारे करण्यात आलेलं खरेदी दस्त न्यायालयाकडून रद्द करणे आवश्यक आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by उपेश सोनटक्के
23-04-2021
Upeshlaxman@gmail.com
माझ्या काकाला 1 एकर शेती आहे व ती शेती त्यांना विकायची आहे पण शेती विकले तर ते भूमिहीन होणार मग गावचे तलाठी म्हटले की कोणत्याही शेतकरी ला भूमिहीन करता येणार नाही असा कायदा आहे। पण त्याच्या दोन्ही किडनी खराब झाली असून त्यांना आपल्या उपचार साठी पैसे नाहीत व शेती ते काम करू शकत नाहीत। मग शेती विकायची कसे क्रुपया सांगा
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3400 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
