जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by somnath Lokhande
26-07-2016
somnathLokhanderx@gmail.com
सर माझ्या चुलतयाचे ए कु मॅ म्हणून आमच्या सामाईक जमिनीत नाव होते ए कु मॅ च्या फेरफार नुसार आमची वारसनोंद केली त्यानुसार पाच आत्या व वडिल आणि चुलते आशी नोंद झाली वडील मयत असल्याने आमची वारसनोंद झाली आतया मयत आहे त्यांची वारसनोंद झाली आहे त्यांच्या वारसांकडून आम्ही जमीन खरेदी केली आहे तर त्यांचा हिस्सा किती असेल आजोबा 1962साली मयत झाले आमचे वाटणीपत्र झाले नाही कृपया मार्गदर्शन करावे
आपला प्रश्न अत्यंत त्रोटक आहे. जमीनीचे क्षेत्र, जमिनीचे स्वरूप याबाबत काहीच माहिती दिलेली नाही. त्रोटक माहितीवर सल्ला् देता येणार नाही. आपण कागदपत्रे दाखवून वकीलाचा सल्ला घेणे उचित ठरेल.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by श्री डी. डी. लोखंडे
25-07-2016
nikysweet1@gmail.com
माननीय सर शासकीय कर्मचारी याना सेवेत असताना अपंगत्व आल्यास शासनाचे PWD ACT, 1995
THE PERSONS WITH डिसॅबिलिटीएस या नियमानुसार मिळणाऱ्या सवलती बाबत खालील मुद्द्यावर मार्गदर्शन करावे.
मी महसूल विभागात अव्वल कारकून पदावर कार्यरत असताना सण 2008 मध्ये मला कायमचे 100 टक्के अपंगत्व आले आहे. व अद्यापही मला कुठल्याच प्रकारची शारीरिक हालचाल करता येत नाही. सदर अपंगत्वामुले मला शासनाने दि 01/10/2010 रोजी वैद्यकीय कारणास्तव रुग्णता सेवानिवृत्त केले आहे. माझे सेवानिवृत्तीच्या दिवशी सहा वर्ष नियत वयोमानानुसार सेवा शिल्लक राहिली होती एकीकडे शासनाचे PWD ACT, 1995
THE PERSONS WITH डिसॅबिलिटीएस या नियमानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना अपंगत्व आल्यास बऱ्याच सवलती मिळतात मात्र मला शासकीय सेवेत असताना 100 टक्के कायमचे अपंगत्व आले असताना मला शासनाचा कोणत्याही नियमानुसार सवलती / फायदे मिळणार नाहीत काय ? कृपया मार्गदर्शन व्हावे.
Question by गणेश शिंदे
25-07-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,ग्रामपंचायत हद्दीत निवासी झोनमधील दिड आर जमीन खरेदी केली आहे.तर तुकजोड तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार होईल का?तलाठी गावदप्तरी नोंद घेण्यास तयार नाहीत.कृपया मार्गदर्शन होणेस विनंती....
नियमा नुसार सक्षम प्राधिकारी/अधिकारी यांचे पुर्वपरवानगी न घेता झालेला व्यवहार हा तुकडेबंदी कायदे विरुद्ध होईल.
Reply by कामराज बसवंन्ना चौधरी | तलाठी
Question by दिनेश दाभोलकर
24-07-2016
dabholkar.dinesh@gmail.com
नमस्कार सर ,
मला खालील प्रश्नवर मार्गदर्शन करावे हि विनंती .
1) आमची जमीन सामायिक आहे आणि अनेक खाते क्रमांक जमिनीत आहेत आणि जमीन प्रत्यक्ष आमचे खातेक्रमांक कसत आहे तर पीक पाहणी सादरी आमचे खातेक्रमांक लागण्यासाठी काय करावे लागते किंवा सध्या आमच्या जमिनीत पीक पाहणी सादरी कोणाचे नाव किंवा खातेक्रमांक लागले आहे हे कसे पाहावे .
2) जर पीक पाहणीला सर्व खातेक्रमांक चे नाव लागले असेल तर जमीन आम्ही कसत असल्याचा कोणता पुरावा दिल्याने फक्त आमचेच नाव पीक पाहणी सादरी लागेल . कारण इतर खातेक्रमांक आज रोजी जमीन कसतच नाही .
जमीन सामाईक असेल तर त्यात वेगवेगळी खाते असता कामा नये......व जर खाते वेगवेगळी असेल तर जमिन सामाईक होणार नाही. एकाच स.नं मध्ये जर वेगवेगळे खाते नुसार खातेदार असेल तर त्यांची पिक पाहणी ही वेगवेगळी लागेल आणी जर एकाच स.नं मध्ये सामाईक एकच खातेे असेल तर सामाईक पिक पाहणी लागेल वयक्तीक पिकपाहणी लागणार नाही.
Reply by कामराज बसवंन्ना चौधरी | तलाठी
Question by दिनेश दाभोलकर
24-07-2016
dabholkar.dinesh@gmail.com
प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय आणि ते मिळण्यासाठी कोणाकडे अर्ज करावा आणि त्यासाठी लागणारी कोणकोणती कागतपत्रे दिली तर आपल्याला ते मिळते
भुमी अभिलेख कार्यालयातील कार्यक्षेत्रात (शहरी किंवा नागरी)असलेले भुखंड/प्लाॅॅट संबंधी संंपुर्ण माहीती दर्शविणारी'आखीव पत्रीका'म्हणजे प्रॉपर्टी कार्ड. तालुकाभुमी अभिलेख कार्यालयाशी संपर्क साधावा.
Reply by कामराज बसवंन्ना चौधरी | तलाठी
Question by दिनेश दाभोलकर
24-07-2016
dabholkar.dinesh@gmail.com
नमस्कार सर ,
मला खालील प्रश्नवर मार्गदर्शन करावे हि विनंती .
1) जर आम्हाला जुने मोडी लिपी मध्ये रेकॉर्ड चेक करायचे आहेत पण आकारफोड पत्रे भूमिअभिलेख मधून आणा असे सांगितले आहे , आकारफोड पत्र भूमिअभिलेख मध्ये अर्ज केला तरीहि ते जुना रेकॉर्ड मिळत नाही असे लिहून देण्यात आले आहे . तर आत्ता आम्ही काय करावे
2) मोडी लिपी मधले रेकॉर्ड हे किती जुने असू शकतात
Question by सचिन सोनारे
23-07-2016
Sachinsonare160@gmail.com
सर आमदार निधीतून खाजगी जागेत सार्वजनिक कामासाठी सभामंडप बांधता येतो का? येत असल्यास त्यासाठी कायदेशीर कोणत्या गोष्टीची पूर्तता करावी लागते.(उदा.जागेचे दानपत्र,प्रशासकीय मंजुरी वगैरे)
Question by विनायक patil
23-07-2016
Vbpatil96@gmail.com
Mahoday ,माझे aajoba1954 पासून संरक्षित kulआहेत पण जर कलम 32p (1)लागू असेल ani ajun jamin 32g pramane kharedi keli nasel tar kul kadhle jau shakte ka
Question by सविता शिंदे
23-07-2016
savishinde1@gmail.com
Namaskar sir मागील माझ्या प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल कुटेकर साहेब पाणबुडे साहेब व फाळके मॅडम यांचे आभार। सर वडील मयत झाल्यावर माझ्या आईचे नाव इतराधिकार सदर होते आता तिची आई 1992 साली मयत झाल्यावर आजीची वारस नोंद केली नाही ती आता 2016 मध्ये करत आहे , माझे तलाठी ना म्हणणे आहे कि तिची वारस नोंद करताना माझा आईचे नाव भोगवटदार सदरी करा ,तर तलाठी सो म्हणतात कि इतर अधिकार मध्ये असताना आता ते भोगवतदार सादर येणार नाही ,
तर सर मी काय करू शकते माझी आईचा हक्क डावलला जाईल , माझ्या आईला मी एकाच मुलगी आहे , माझे लेडीज म्हणून तलाठी ऐकत नाही , आणि समोरचे तलाठी हाथी धरत आहे तर मी काय करू जेणे करून माझ्या आईचे नाव भोगवतदार सादर दाखल होईल।
वडील मयत झाल्यावर आईचे नाव वारस म्हणून इतराधिकारात लावले असेल तर ते योग्य नाही. वारस महिलांची नावे कब्जेहक्कातच दाखल होणे आवश्यक आहे. आपण तहसिलदारांची किंवा प्रातांची भेट घ्यावी.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
वडील मयत झाल्यावर माझ्या आईचे नाव वारस म्हणून इतराधिकारात लावले असेल तर ते योग्यं नाही. वारस महिलांची नावे कब्जेहक्कातच दाखल होणे आवश्य क आहे. आपण तहसिलदारांची किंवा प्रातांची भेट घ्यावी.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by दत्तू गुंजाळ
23-07-2016
dngunjal18@gmail.com
नमस्कार सर मंडळ निरीक्षकांनी केलेल्या नोंद प्रमाणित केल्याबद्दल आम्ही त्यावर प्रांत साहेब याकडे अपील केले आहे ती केस प्रलंबित आहे तर त्याच उताऱ्यावर दुसरा फेरफार घेता येईल का ?
Question by टिंगरें निखील निळकंठ
23-07-2016
ganeshrajetingare@gmail.com
सर माझ्या वडिलांच्या नावावर एक शेत जमीन आहे त्याच्या जाणाऱ्या रस्त्याची खरेदी पत्र केले होते ते नोंद घालण्यास दिलेहोते पण गेली 1 वर्ष होऊन गेले अद्याप नोंद झाली नाही काय करावे विचारणा केल्यास अपेक्षित उत्तर मिळत नाही काय करावे
Question by सोमनाथ खैरनार
22-07-2016
somkhairnar@gmail.com
सर, एखादा शासकीय कर्मचाऱ्याने एकूण सेवा 19 वर्ष 7 महिने 20 दिवस झाल्या नंतर स्वेच्छा निवृत्तीची नोटीस दिली व त्यांचा 3 महिन्यांच्या नोटीस पिरियड संपल्यावर 20 वर्षाची अहर्ताकारी सेवा पूर्ण होते. म्हणजे त्यांचा नोटीस पिरियड अहर्ताकारी सेवेत गणला जाईल का ?, त्यांना पेन्शन मंजुरीत काही अडचण येईल का ?
Question by महेश थोरात
22-07-2016
mahesh123@gmail.com
सर मी एक जमीन ग.न .२१ क्षेत्र ३ एकर या जमीन मिळकतीवर एकुण ५ नावे आहेत पैकी २ लोकांनी त्यांच्या हिस्याचे क्षेत्र 1 एकर विकले आहे व त्याची आणेवारी नसल्याने नोंद करता येणार नाही असे तलाठी सांगतात तर ती नोंद करण्यासाठी कायदेशीर तरतूद आहे का?
मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२, कलम ४४ अन्वये अनेक सहधारकांपैकी एक सहधारक आपल्या हिस्याचे क्षेत्र विकू शकतो. अशा विक्रीमुळे ते क्षेत्र खरेदी घेणार्या व्यक्तीला सहहिस्सेदाराचा दर्जा प्राप्त होतो. आणेवारी नसल्याने नोंद करता येणार नाही हे म्हणणे चुकीचे आहे.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by विनायक बुवाजी patil
20-07-2016
Vbpatil96@gmail.com
आदरणीय sar, आमचेकडे 1948 पासून शेतजमीन आहे त्या जमिनीमध्ये माझे आजोबा 1954 साली संरक्षित कुल झाले पण आम्ही अजून वारस नोंद केली नाही पण पीक पाहणी सादरी वडिलांचे नाव आहे तसेच इतर हक्कात जनरल ट्रस्ट 1954 पासून आहे tari ती जमीन आमच्या नावावर होईल का , त्या साठी काय karave
आपण आधी वारस नोंद करावी. आपल्या प्रश्नाचे उत्तर कागदपत्रे पाहिल्याशिवाय देणे अवघड आहे. आपण एखाद्या वकीलाचा सल्ला घेणे उचित ठरेल.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by रोहिदास सखाराम पाबळे
20-07-2016
rohidaspable@yahoo.in
एखाद्या व्यक्तीचे 50 आर क्षेत्र आहे त्यामधील 18 आर त्याने विकासकाला रजिस्टर दास्ताने अग्रीमेंट करून दिले परंतु विकासकाने सदर व्यक्तीस कोणतीही माहिती न देता 50 आर क्षेत्र बिगरशेती करून घेतले नगर रचना व प्रांत कार्यालयाने 18 आर दिलेल्या क्षेत्राचा विचार ना करता संपूर्ण क्षेत्राचा बिनशेती आदेश दिला गेला मंजूर नकाशावर मूळ मालकाच्या सह्या नाही .तरी सदर बिनशेती आदेश रद्द करण्यासाठी काय करावे लागेल
बिन शेती आदेश दुरुस्त करण्यासाठी ज्या अधिकाऱ्याने आदेश दिले आहेत त्याचे कडे अर्ज करा . जर त्याने दुरुतीस नकार दिला तर , आपण अपील करू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रोहिदास सखाराम पाबळे
20-07-2016
rohidaspable@yahoo.in
7/12 च्या इतर अधिकारात पुनर्वसनासाठी राखीव शेरा आहे सदर पुनर्वसनसची अधिसूचना अपव्यक्त होऊन 10 वर्षे झाली आहे तरी सदर शेरा कायम ठेवून जमीन विक्रीची परवानगी मिळू शकेल काय
Question by गावीत मथुवेल मालू
20-07-2016
mathuvelgavit@gmail.com
नमस्कार सर, जिल्हा निवड समिती नंदुरबार तलाठी भरती 2015 अंतर्गत पदवीधर अंशकालीन या समांतर आरक्षण गटातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग दि.19 सप्टेंबर 2013 च्या शासन परिपत्रकाअन्वये सर्वसाधारण उमेदवारामधून गुणवत्तेनुसार आमची सर्वसाधारण प्रतीक्षा यादीतील उमेदवारामधून निवड करण्यात आलेली आहे ,परंतु नियुक्ती आदेश निर्गमित करण्याअगोदर जिल्हाधिकारी यांची बदली झाल्याने नवीन आलेले जिल्हाधिकारी नियुक्ती आदेश देण्यास तयार नाहीत ,तरी आम्हाला पाठवलेल्या पत्राअन्वये आम्ही चरित्रयापडताळणी प्रमाणपत्र सुद्धा जमा केलं असून 3 महिने झाले असून तरी आत्तापर्यंत नियुक्ती आदेश दिले गेले नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन तपास केला असता आस्थापना सरचिटणीस म्हणाले की,जिल्हाधिकारी साहेब बोलले की ,प्रतीक्षा यादीतील एकाही उमेदवाराला नियुक्ती आदेश मी देणार नाहीत आणि सुरवातीला निवड झालेल्या सर्वसाधारण उमेदवारामधून 2 उमेदवारांनी joining केलंच नाही. तर ते सुरवातीचे 2 अंशकालीन 3 अशा 5 उमेदवारांची निवड करण्यात अली आहे.तरी सरांनी याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती! (संदर्भ सामान्य प्रशासन विभाग gr date: 19/sept./2013)
Question by विनायक बुवाजी patil
19-07-2016
Vbpatil96@gmail.com
रेस्पेक्टड sir, आमच्या एकत्रित कुटुंबाची सं 1975 साली तोंडी 1985 साली लेखी पण रेजिस्टरेड नाही 2002 साली रेजिस्टरेड दस्ताने वाटणी झाली आहे 2002 सालच्या वाटणीपत्राने आम्हाला समान वाटणी झालेली नाही सर्व जमीन वडिलोपार्जित आहे तसेच वाटणीपत्रामध्ये संपूर्ण मालमत्तेचा तपशील नाही vatni पत्रावर हरकत घेता येते ka
आपले वाटणीपत्र नोंदणीकृत नाही म्हणून त्याला कायदेशीर महत्व नाही.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by arjit
18-07-2016
àrjit12@gmail.com
sir gavthanamadhe mazi 1guntha जागा आहे.त्याचा 7/12 मिळू शकतो का
Question by रोहिदास सखाराम पाबळे
18-07-2016
rohidaspable@yahoo.in
शेतीत बांधलेले घर विकता येते का त्याचा रजिस्टर दस्त होतो का
परवानगी असो व नसो आपणास घर नोंदणीकृत विकता येईल . मात्र परवानगी घेतलेले घर विकत घेणे/ विकणे हितावह .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
शेतीत बांधलेले घर जर रितसर परवानगी घेऊन बांधले असेल तर विकता येते आणि त्याचा रजिस्टर दस्त होतो.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by sadik
18-07-2016
sadikmullaa@gmail.com
1)शेतजमिनीची मिळकत पत्रिका असते का
2)घराचा जमिनीचा 7/12 असतो का
3) ड्युअल ओनरशिप म्हणजे काय
प्लिझ उत्तरे द्या
1.शेत जमीन जर , सर्वे झालेल्या गावात /नगरपालिका क्षेत्रात असेल तर , मिळकत पत्रिकाच असते .
2.होय. घर जर शेत जमीन म्हणजे सर्वे नम्बरमध्ये बांधले असल्यास , घराचे खालील जमिनीचा 7/12 असतो .
3. Duel Ownership म्हणजे , जागा एकाचे मालकीची व त्या वर सौरचना ( बांधकाम ) दुसऱ्याचे मालकीचे . आपले देशात Duel ownership प्रचलित आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
1) शेतजमिनीची मिळकत पत्रिका नसते, 7/12 असतो
2) घराचा जमिनीचा 7/12 नसतो मिळकत पत्रिका असते
3) ड्युअल ओनरशिप म्हणजे सह मालकी
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
18-07-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,नगरपरिषद हद्दीत मा.उपविभागीय अधिकारी साहेब,यांचेकडून 0-07 आर क्षेत्राची बिगरशेती परवानगी घेऊन राहण्यासाठी घराचे बांधकाम 75%झालेले आहे.तसेच बिनशेती मोजणीही झालेली असून नगरपरिषदे कडून जोते तपासणी दाखलाही मिळाला आहे.तरीहीअतिक्रमण करून भिंत बांधलेबाबत(वास्तविक कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण झालेले नाही) तिऱ्हाईत इसमाने कु.मु.पत्राद्वारे बिनशेती परवानगी रद्द करणेकामी मा.उपविभागीय अधिकारी साहेब यांचेकडे अर्ज दाखल केला आहे.तरी सदरची परवानगी रद्द होऊ शकते का?किंवा कसे कृपया मार्गदर्शन होणेस विनंती..
तिऱ्हाईत इसमाचे म्हणणे जर अतिक्रमण केले आहे अशे असेल तर , त्याने आपण अतिक्रमण केले आहे हे दाखवून देणे आवश्यक . त्यासाठी मोजणी प्रतहाम करणे आवश्यक. मोजणी त्याने करणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
अनधिकृत बांधकाम केले बाबत नगरपालिकेकडून आपणास नोटीस प्राप्त झालेली आहे का ?
उत्तर नाही असेल तर , आपली परवानगी रद्द होणार नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
उपविभागीय अधिकारी सर्व पुरावे बघुनच निर्णय देतील. सुनावणीच्याकवेळेस तुम्हीम तुमच्याचकडील पुरावे सादर करा.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
18-07-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर मा.उपविभागीय अधिकारी साहेब यांनी दिलेला बिनशेती आदेश रद्द करण्याचे अधिकार कोणास आहेत ? कृपया मार्गदर्शन होणेस विनंती...
उपविभागीय अधिकारी यांच्या कोणत्याही निर्णयाविरुध्द मा. अप्पर जिल्हाधिकारी यांचेकडे मुदतीत अपील करावे लागते.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by मजिद सौदागर
18-07-2016
latif.saudagar@gmail.com
साहेब नमस्कार...माझे वडील मयत झाल्यानंतर त्यांच्या नावे असलेल्या जमीनीच्या पट्टयाचे दिवाणी न्यायालयाच्या आदेशान्वये आम्हा आठ भावंडांमध्ये वाटण्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सदर जमिनीच्या 7/12 वर आम्हा सर्व आठही भावंडांची नावे प्रत्येकास मिळालेल्या जमिनीच्या क्षेत्रफळासहित दाखल करण्यात आली आहेत. आता मला माझा हिस्सा विकायचा असुन त्यासाठी माझ्या नावावर स्वतंत्र 7/12 होणे आवश्यक आहे. यासाठी कोणाकडे व कसा अर्ज करावा याबद्दल कृपया मार्गदर्शन व्हावे, ही विनंती.
तुम्हाला तुमचा हिस्सा विकायचा असल्यास स्वतंत्र 7/12 होणे आवश्यक नाही. तुम्ही तुमचे क्षेत्र विकू शकता. मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२, कलम ४४ अन्वये अनेक सहधारकांपैकी एक सहधारक आपल्या हिस्याचे क्षेत्र विकू शकतो. अशा विक्रीमुळे ते क्षेत्र खरेदी घेणार्या व्यक्तीला सहहिस्सेदाराचा दर्जा प्राप्त होतो.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by संजय रा. कोकरे
18-07-2016
S.r.kokare1992@gmail.com
माझ्या गावामध्ये माझे २५ वर्षापुर्वी खरेदी हक्काने विकत घेतलेले घर आहे. परंतु तेथे कोणीही राहत नसल्यामुळे व माझ्या अद्न्यानामुळे मी त्या घराची नोंद करायची नाही. मात्र आता मला त्या घराची नोंदणी करायची आहे. माझ्याकडे त्या घराची खरेदीखत आहे. परंतु सरपंच नोंदणी करण्यास नकार देत आहे. मी काय करावे
सरपंचांनी नोंदणी करण्यास नकार देण्याचे कारण नाही. सरपंच नोंदणी अधिकारी नाहीत. तुमची कागदपत्रे कायदेशीररित्या नोंदणीकृत असतील तर ती कोणीही नाकारू शकत नाही. तुम्ही योग्य ती कागदपत्रे ग्र.पं. कार्यालयात सादर करा. त्याची रितसर पोहोच घ्या. जरूर तर गट विकास अधिकारी यांच्याशी संपर्क करा.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
