जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

आदरणीय सर, नवीन वारस फेरफार घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांचेकडे अपील करावयाचे आहे . परंतु तीन वर्ष वेळ मध्ये गेला आहे . त्यामुळे अपील आर.टी. एस अपील उपविभागीय अधिकारी स्वीकारतील कींवा नाही. नाही स्वीकारले तर काय करावे लागेल.
अपील करण्यासाठी लागलेला विलंब हा योग्य कारणामुळे लागला आहे याची खात्री पटल्यास अपिलीय अधिकारी विलंब माफी करून केस चालवू शकतात.

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

सर आमची ३ एकर जमिन आहे आम्हाला जमिनीत जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही नॕशनल हायवे पासुन ३००फुट अंतरावर आहे तर आम्हांला शेती उपयोगी औजारे आणी वाहने घेउन जाण्यासाठी रस्ता मिळू शकतो का ? कसा ?कुठुन ते सांगावे
atulpawar438@gmail. या ईमेल वरती कळवावे
नवीन रस्त्यासाठी तहसीलदार कार्यालयात अर्ज करा .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

Question by satish jadhav
31-05-2016
s.jadhav231@yahoo.com

आदरणीय सर वाटप पत्र सर्व सहधारकात नोंदनीकृत झाले आहे परंतु नतर एका सहधरकस वगळले गेले असे समाजले तर नोंद टाकवि की नाही ,,,,,
सहधरकास वगळले गेले असेल तर वाटपपत्र अवैध ठरते. फेर वाटप आवश्यक

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by anand salve
30-05-2016
salveanand@89gmail.com

नमस्कार सर, १) ०.०९ पोट खराबा, ००.४ आर २) ०.४१ पोट खराबा, ००.४आर ३) १ हेक्टर,०.९ आर, ०.१६ पोट खराबा हे एकूण क्षेत्र एकर प्रमाणे किती होइल.
३ एकर १ गुंठा आणि ८९ पोइंत

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

आदरणीय सर
मी सुमारे १३ वर्ष अगोदर एक जमीन विकत घेतली होती. जमीन हि रामोशी वतनआतील होती त्यावर राखीव वन अशा शेरा होता. सदर जमीन हि सक्षम अधिकार्याच्या परवानगीशिवाय खरेदी केली आहे आणि आता शर्तभंग झाला म्हणून जिलाधिकारी यांनी जमीन सरकार जमा करण्याचे असेश दिले आहेत . तरी आता काय करता येईल पिलीज माहिती द्यावी
जमिनीचा watan दर्जा संपला आहे असे वाचावे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

या जमिनीवर राखीव वन असा शेरा आहे . त्यामुळे ती जमीन आता नियमानुकूल करता येणार नाही. जमीन वन आहे . जमिनीचे वन जमीन हा दरजा संपलेला आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

शर्तभंग नियमित करावा म्हणून अर्ज करा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर, आर.टी.एस अपिले बाबत माहिती टाकल्यास त्यातून महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियमातील कलमांची बरीच माहिती मिळते. व अनेक प्रश्नांची उतरे मिळतात कृपया आर.टी.एस अपिले बाबत माहिती आपल्या साईट वर कोठे मिळेल
आर.टी.एस अपिले अनेक प्रकारची असतात. याबाबत अशी माहिती देत येणे अवघड आहे

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

मी माझ्या गावी अलिबागला १७.५ गुंठे शेतजमीन ९ वर्षांपूर्वी विकत घेतली आहे. त्या जमिकडे जाण्यासाठी १ truck जावू शकेल एवढी रुंद पायवाट आहे.
माझ्या जमिनिसमोर एक घर हि आहे त्यांचा स्वताचा टेम्पो हि जातो.
आता मला माझ्या जागेवर घर बांधायचे आहे.
पण माझ्या जागेकडे जाण्यासाठी main रस्त्यालगत जो वहिवाटीचा रस्ता आहे त्यावरील पहिल्या शेताचा मालक मला सामानाचा truck किंवा टेम्पो नेवू देत नाही. त्यामुळे मी घर किंवा विहीर बांधू शकत नाही. ती वहिवाट आज वर्षानुवर्षे तेवढीच आहे.
तरीही मला फक्त पाय वाटच वापरता येईल असे सांगितले जाते.
माझ्या जमिनिसमोर असलेली घरातील लोक टेम्पो ची ने आन करत असतानाही.
ह्या संदर्भात मला सहकार्य करावे.
मी नेमके काय करू कुणाकडे तक्रार करू





आपल्या १७.६ गुंठे क्षेत्राचा वापर शेतीसाठी करत असाल तर , या पूर्वी दिलेल्या उत्तराप्रमाणे आपण मामालेतदार ज्कोर्त कायद्याखाली , तहसीलदार यांचे कडे अर्ज दाखल करू शकता .
मात्र जागेचा वापर शेतीसाठी नसेल तर , आपणास दिवाणी न्यायालयात , समोरच्या व्यक्ती विरुद्ध मनाई हुकुम मिळण्यासाठी दावा दाखल करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आपली पाय वाट बंद नाहीय . पण तरीही आपल्या शेत कडे जाणारा दुसरा जुना वहिवाटीचा रस्ता उपलब्ध असेल आणि तो तुमच्या साठी बंद केला असेल तर असा रस्ता बंद केल्याच्या तारखेच्या ६ महिन्याच्या आत आपण माम्लेतदार court अधिनियम १९०६ अंतर्गत तहसीलदार यांचे कडे अर्ज करावा . मोका चौकशी करून नियमाप्रमाणे आदेश करून जुनी वहिवाट खुली करून दिली जाते .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

सध्या वडील हयात नाहीत .७/१२ वरती माझे व माझ्या भावाचे नाव आहे ,तर मला व माझ्या भावाला स्वतंत्र उतारे करून घ्यावयाचे आहेत .तर ते स्वतंत्र उतारे करून घेण्यासाठी किती खर्च करावा लागेल याची कृपया माहिती द्यावी .
तहसीलदार कार्यालयात अर्ज करा . प्रोसेस फी लागेल म्हणजे नोटीस काढणे ,त्याच्या पोस्टतिकीट ई. साठी . अर्ज प्रोसेस झाल्यावर रीतसर तारखेला हजर राहावे . आदेश घ्यावा व त्या प्रमाणे उपाधीक्षक ,भूमी अभिलेख कार्यालयात जागेची मोजणी मोजणी फी भरून करून घ्यावी . त्या प्रमाणे फेरफार होऊन ७/१२ चा अंमल दिला जाईल . मोजणी फी ची चौकशी तुमच्या भूमी अभिलेख कार्यालयात करावी .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

Question by VIKRAM YADAV
27-05-2016
vikram.vy11135@gmail.com

नमस्कार सर, माझा प्रश्नाची उतरे तुम्ही वेळचा वेळी देले आहेत त्या बदल धन्यवाद , पुडे माझा प्रश्न असा आहे कि अम्मचा गावी काही पडीक जागा अह्हे .आमच्या आजोबांनी खारेधी खत दोरे ८ आणायचा स्तम्पापेर वरठी माझाकुर ळीलेला अह्हे पुन त्याची ग्रामसेवक दप्तरी नोड नाही हि बाब लक्षात आल्यावर त्या नोधी साठी गरम सेवक काकडे गेलेअस्त ते नोड धरत नाही कारण तोपेपर खूप जुना अह्हे म्हणून त्याची नोड धरावी ह्यासाठी मला काय्कार्वे लागेल क्रुपय मार्ग दर्शन करा.
१०० रु च्या अधिक किमतीची मालमत्ता नोंदणीकृत दस्त असलेली पाहिजे .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

Question by Umesh bodake
27-05-2016
Umesh89bodake@gmail com

आदरणीय सर / मैडम , माझे वडील आणि 4 भाऊ तसेच 3 बहिण असे आमचे कुटुंब असून तीनही बहिणींचे लग्न झालेले आहे , आमची जमीन वाडीलोपार्जित असून माझे वडील आणि काकानी जमिनीचे 5 हिस्सात वाटप केले ,,, त्यात बहिणींची नावे 2 बहिनीनी हक्कासोड केले आहे , परंतु एका बहिनीचे नाव आम्ही सर्व गटांवर इतर अधिकारत कायम ठेऊन सरस व नीरस वाटप केले , वाटपाचा दस्त दुय्यम निबंधक याचेकडे यांकडे मंजूर केला त्या वेळी एक बहिण गैरहाजिर होती । परंतु आम्ही तिचे नाव इतर अधिकार सदरी तसेच ठेवले आहे । परंतु ती बहिन अता मला हिस्सा दिला नाही म्हणून तलाठी कड़े अर्ज करात आहे ,तिने हरकत घेतली आहे ।।।।।आम्ही तिचे नाव कमी केलेले नाही तरी तिने वाटपसाठी न्यायालयात जानें योग्य आहे कारण नोंदनीकृत दस्त न्यायालयात रद्द होतो ।। तरी तिने नोंदिस हरकत घेतली आहे ,,,,नोंद मंजूर होईल का ?
पाच हिस्स्यात जर जमिनीचे वाटप केले असेल तर , बहिणीस तिचा हिस्सा देणे आवश्यक आहे . त्या बहिणीचे नाव भोग्वातदार सादरी घेणे आवश्यक .
न्यायालयात जाने आवश्यकता नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by ssk
27-05-2016
ssk_8796@yahoo.com

माझा वय ८५ वर्ष आहे...माझ्या नावे वडिलोपार्जित जमीन होती... ती मी विकली ...मला २ मुले व २ मुली आहेत सर्वांची लग्न झाले आहेत..... मला आलेल्या रकमे मधून दोन मुलांना पैसे दिले... पण दोन मुलीना जास्त पैसे मागतात.... जर मी त्यांना जास्त सोडाच पण काहीच नाही देईले तर ते माझ्या वर कायदेशीर काही हरकत घेऊ शकतात का..... कारण जमीन वाद्लोपार्जीत आहे...
आपले वय 85 वर्षे आहे . आपण संगणक वापर , इंटरनेट या वयात करता या बद्दल आपले अभिनंदन .
आपण जर जमीन 20 डिसेंबर 2004 पूर्वी विकली असेल तर , मुलींना हक्क नाही.
मात्र जर त्या नंतर जमीन विकली असेल तर , आलेल्या रकमेतील ( व्याजासह ) 1/5 हिस्सा द्यावा लागणार .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Prakash adhav
27-05-2016
Jprakash.adhav@gmail.com

माझे नाव जयप्रकाश असे असून आधार कार्ड , इलेक्शन कार्ड वर सुधा जयप्रकाश आहे पण 7/12 उतारा वर प्रकाश झाले आहे , माझे उतरा वरील नाव कसे बदलाव ,,,
आपण संबंधित तहसील कार्यालयात उपरोक्त कागदपत्रे जोडून अर्ज करा.

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

मुलगी/बहीणीचे नाव 7/12वर वारसा मध्ये नाही ते लावण्या साठी काय केले पाहीजे?
वारस चढ वतांना फेरफार घेतला असेल आणि त्याचा अंमल झाल्यावर ७/१२ दुरुस्त झाला असेल . तो जुना फेरफार रद्द करण्यासाठी प्रांत कडे अपील करावी लागेल आणि त्यांच्या आदेश नंतर मुलगी / बहिण वारस सिध्द झाल्यास नवीन वारस फेरफार चा आदेश होईल आणि त्या प्रमाणे वारस फेरफार घेऊन ७/१२ वर त्याचा अंमल येईल .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

आदरणीय सर,नगरपरिषद हद्दीत बिगरशेती परवानगी घेऊन नियमानुसार बांधकाम सुरु केले असून जोते तपासणी प्रमाणपत्र मिळाले आहे.परंतु काही क्षेत्रात शेजारील व्यक्तीने भिंत बांधलेली असून अतिक्रमण केले असल्याने नियमानुसार जागा सोडण्यास अडचण निर्माण होत आहे.तरी सदर भिंत तोडता येईल का?त्यासाठी कोठे दाद मागावी लागेल?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदाराने मागितलेली माहिती स्वतः नेणार असे अर्जात नमूद केल्यानुसार अर्जदारास उपलब्ध असलेली माहिती फीचा भरणा करून माहिती घेवून जाण्याबाबत पत्राने कळविण्यात आले.परंतु अर्जदाराने अद्याप फीचा भरणा केलेला नाही व माहिती नेलेली नाही.ह्याला महिन्याचे वर कालावधी झालेला आहे अश्या वेळी अर्ज निकाली काढण्या साठी काय करावे.कृपया मार्गदर्शन करावे.
माहिती करिता लागणारे शुल्क भरण्य बाबत अर्जदाराला पत्राने कळवितो त्या पत्रातच वाजवी मुदत द्यावी अन्यथा मागितलेल्या माहितीत स्वारस्य नसल्याचे समजून अर्ज निकाली काढण्यात येयील असे नमूद करता येयील

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

आदरणीय सर माझ्या आजोबांनी १ हेक्टर जमिन माझी सावत्र आई व भाऊ यांच्या नावें नोँदनिकृत व्यवस्था पत्राने करून दिली आहे (न्यायालयातील पोटगीची केस काढुन घेण्याच्या बदल्यात ) व राहिलेली सर्व जमीन वडिलांच्या सोडपत्राने काकांच्या नावे केली आहे सध्या मी काकांकडे राहतो
१ मला १ हेक्टर मध्ये हिस्सा मिळेल का?
२ काका अवीवाहित आहे त्या जमीनीला माझे नाव लावायचे आहे मॄत्यु पत्र केलेतर चालेल का
३ व्यवस्था पत्र रद्द होउ शकते का
आजोबांची जर ती स्वकष्टार्जित जमीन असेल तर त्यांना त्या जमिनीची विल्हेवाट त्यांचे पद्धतीने लावण्याचा अधिकार आहे .
मात्र आजोबांची वडिलोपार्जित मिळकत असेल तर ,व्यवस्थापत्र व हक्कसोड आव्हानात करू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

ग्रामपंचायत हदीतील आमचे घराचे दक्षिण बाजूस खुली सामायिक जागा आहे.त्या खुल्या जागेविषयी आमचे खरेदी खतात 'आमची जागा' असा स्पष्ट उल्लेख आहे.परंतु त्या जागेचा सिटी सर्वे उतारा पाहिला असता आम्ही व दक्षिणेकडील दोन शेजारी असे तिघांची सामायिक नावे आहेत.सदर खुली जागा गेली ५० वर्शेपासून आमचे वापरात आहे.त्या खुल्या जागेची स्वच्छता ,झाडलोट,डागडुजी,निगराणी व वहिवाट हि आम्ही एकटे करीत आहोत.सदर खुल्या जागेतून परंपरेनुसार आमची वहिवाट आहे.फक्त आमचे खरेदी खतात त्या खुल्या जागेतून वहिवाटीचा उल्लेख नाही.सदर खुल्या जागेतून आमची वहिवाट कायदेशीर करणेकरिता काय करावे?
जर 50 वर्षे आपली वहिवाट असेल तर , आपण न्यायालयाकडून आपण adverse - possession मालक झाल्याचे जाहीर करून घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मृत्युपत्राद्वारे झालेली वाटणी हि जमीन वाटपाचा कोणता प्रकार असतो नोंदणी कृत वाटणी, म.ज.म.अ.कलम ८५ अन्वये वाटप कि, वाटप दरखास्त
७/१२ चे वाचन कसे करावे
आपण मा.शेखर गायकवाड सरांचे शेत्कार्यानो जमीन सांभाळा हे पुस्तक वाचावे. आपल्या ७/१२ संबंधीत सर्व संकल्पना व अडचणी बाबत मागदर्शन होईल .

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

Question by P M Jadhav
25-05-2016
ldchr6230@gmail.com

R/s/m
Pls guide
एखाद्या वाक्तीच्या नवे गावठाण अंतर्गत कोठेही जमीन
नसताना गम्पंचायत घरपट्टी आकारू शक्तेका? व
गम्पंचायतने घरपट्टी आकारणी केलेने अशा वाक्तीस
सदर जमिनीची मालकी प्राप्त होतेका ?
केवळ घर पट्टी आकारणी मालकीचा पुरावा होऊ शकत नाही .

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

Question by P M Jadhav
25-05-2016
ldchr6230

R/s/m
Pls guid us
Q 1 Satta prakar "G" (Goverment) Kasa
badalta yeil / Procedure.
Q 2 City Serve uttarya varil nav nond व 8-अ
varil nav nond veg veglya vaktinchi nond
aahe. sadar durusti kashi karavi ,
procedure & require Documents.
pls guid.


आदरणीय किरण सर
विचारलेल्या सदर प्रश्नांचे "आम्ही ३ भाऊ असून वडील हयात नाहीत. आमची एकूण ३ एकर शेती आहे. जमीन अजूनहि वडिलांच्या नावावर आहे. वडिलांनी जमिनीत विहीर खोदलेली आहे मात्र त्याची नोंद ७/१२ वर नाही. त्या वेळी वडिलांनी जमिनीचे हिस्से प्रत्येकाला वाटून दिले होते. सदर विहीर माझ्या हिस्यात आहे. आम्ही तिघेही त्याच विहिरीतून पाणी भरतो. मात्र विहिरीमुळे माझे जवळ जवळ २ गुंठे क्षेत्र बाधित होत आहे तसेच त्रासही होत आहे. सदर विहिरीची नोंद ७/१२ वर नसल्यामुळे मी ती विहीर गाडून त्या ठिकाणी माझ्या हिस्स्यापुरते बोरिंग करू इच्छित आहे. तेव्हा सदर विहीर मी गाडू शकतो का ? जर गाडू शकतो तर इतर २ भाऊ माझ्या विरुद्ध काय करू शकतात ? कृपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती" आपण उत्तर दिले "The well is dug by your father. The water from the well is supplied to the entire Land. So the well is common well and everybody has a right to draw water from it. You cannot unilaterally close the well. They may sue you for depriving them from the use of water."
त्याबद्दल धन्यवाद. पुढे मी असे विचारू इच्छितो कि खातेफोड झाल्यानंतर म्हणजे तिघांचेही ७/१२ वेगळे झाल्यावर सदर विहीर मी गाडू शकतो का ? कृपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती प्रदीप सहाने
जर आपले इतर दोन भावांनी , विहिरीवरचा हक्क सोडला तर , आपण विहीर बुजवु शकता .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by pramod
24-05-2016
pramodderle@yahoo.com

नमस्कार सर
आमुच्या दोन भावामध्ये सुलेहानामा कोर्तामार्फात ०२/०४/१९८१ रोजी झहालेला आहे त्यात आमुच्या वाट्याला ३० R क्षेत्र हलक्या जमिनीच्या मोह्बाद्ल्यात जास्त आलेले आहे त्यानुसार आता ३५ वर्ष्यानंतर माझ्या भावाने ते वाढीव क्षेत्र परत मिळण्यासाठी व समसमान वाटप होण्यासाठी दावा दाखल केला आहे .
१) तर यात किती वर्ष्यापर्यंत सुलेह्नाम्याविरोधात तक्रार दाखल करता येते ??
२) सुलेहनामा झाल्यानंतर मी ज्या स्वकष्टाने जमिनी घेतल्या आहेत त्या जमिनी आम्ही या वाढीव क्षेत्राच्या उत्पन्नावरून घेतल्या आहेत असा दाव्यात उल्लेख करण्यात आला आहे व हिंदू एकत्र कुटुंब नुसार सदर जमिनीत देखील हिस्सा मागितला आहे तर सदर दाव्यात किती तथ्य आहे
योग्य मार्गदर्शन करावे
सुलेहनामा विरुद्ध अपील होते शकत नाही .
तेही 35 वर्षानंतर तर , शक्य नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by prashant mali
23-05-2016
police9015@gmail.com

आपला प्रश्न/सूचना... sir eka prakalpagrast dakhlyacha vapar karun kiti vyaktina government job milu shakato?
एका व्यक्तीस .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

आदरणीय मगर सर प्रथमतः प्रश्नाचे उत्तराबाबत आपले आभार .....तुकडा बंदी कायद्यानाये प्रत्येक जिल्ह्यासाठी किमान मर्यादा वेगळी आहे ती कुठे पाहता येयील ....त्याबाबत माहिती कोठून मिळेल ...... नाशिक जिल्हा मर्यादा किती आहे
आपले तालुक्यातील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय आपणास सदर माहिती मिळेल

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

This page was generated in 0.37 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3