जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

आदरणीय सर,वडिलांच्या नावे वडिलोपार्जित शेतजमीन असल्यास,ते त्यांच्या इच्छेनुसार सदर जमीन तीनपैकी फक्त एका मुलास देऊ शकतात का?किंवा मुलांची संमती न घेता सदर जमिनीची ते विक्री करू शकतात का?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
वडिलोपार्जीत जमिन ही ईतर वारसांना समान द्यावी लागेल.
एकाच मुलास दयायची असेल तर ईतर वारसांची संमती आवश्यक आहे.

Reply by कामराज बसवंन्‍ना चौधरी | तलाठी

सर
सर्वे ११२ पैकी ९ हिस्सा अरविंद व इतर व्यक्तीच्या नावे आहे परंतु सचिन नावाच्या व्यक्तीच्या कबज्या आहे सचिन याने २००९ साली ग्रामपंचायत अर्ज करून झोपडी आहे असे दाखवून घरपट्टी लावून घेतली तरी जमीन नावे नसताना ग्रामपंचायत घरपट्टी लागू करू शकते का
There is legal maxim
Quicquid plantatur solo, solo cedit-- Whatever is affixed to the soil belongs to the soil.
मात्र सदरचे तत्व हे भारतात लागू नाही . आपणाकडे , Dual -Ownership संकल्पना आहे . त्यामुळे जमीन एकाची व त्यावरील सौरांचना ( बांधकाम ) दुसर्याचे असू शकते .
ग्रामपंचायत अश्या घरावर घरपट्टी बसवू शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर्व साधारणपणे कब्जा हा मालकी पाठोपाठ आला पाहिजे . ग्राम पंचायत उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून घरपट्टी आकारते . प्रताय्क्षात तेथे घर नसेल तर ग्राम पंचायत च्या निदर्शनास आणा . वयैक्तिक जागेवरील अतिक्रमण मात्र आपल्यालाच काढावे लागेल .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

Adaraniy sir . माझ्या आईचे नाव मामाच्या उताऱ्यावर वारस म्हणून इतर अधिकारत आहे , ते कब्जेदार सदरी आनायचे असल्यास काय करावे , त्या अर्जाला कोणती कागदपत्रे जोडवी लागतील ?
एखाद्या ७/१२ उताऱ्यामध्ये काही महिला वारसांची नांवे इतर अधिकार मध्ये नोंदविण्यात आलेली आहे. त्यांची इतर अधिकारातील नांवे कब्जेदार सदरी दाखल करण्याकरीता कोणता शासन निर्णय अगर परिपत्रक अथवा अन्य काही तरतुदी आहेत काय?
महिला वारसदार आहेत . त्यांचे नाव कब्जेदार सदरी असणे आवश्यक . त्यासाठी शासन निर्णयाची गरज नाही . लेखन प्रमाद चूक दुरुस्ती कलाम 155 खाली तहसीलदार यांनी आदेश काढून करणे आवश्यक आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

१) सातबारा मध्ये असणारा भोगवटादार या कॉलम मध्ये एखाद्याचे नाव ५० ते ८० वर्षापूर्वी कसे आले ते चेक कसे करावे किवा ते कोणत्या कागदपत्राची पूर्तता केल्यावर येते .

२) ८० वर्षापूर्वीचा एखादा फेरफार जर बरोबर दिसत नसेल आणि एखाद्याचे नाव याच फेरफार च्या आधारे चढले असेल तर फेरफार सोडून दुसरे कुठले कागदपत्रा चेक करू शकतो जेणेकरून सातबारात चढलेले नाव बरोबर आहे याची शाहनिशा करता येईल .

३) एखाद्याचे नाव 56 वर्षापूर्वी इतर हक्क मध्ये निगुन गेले असेल आणि तसा फेरफार ही आमच्याकडे आहे तर ते नाव सातबारा मधून कायमचे निगुन गेले पाहिजे कि नाही . पण आज रोजी ते नाव आमच्या भोगवटादार आणि इतर हक्क या कॉलम मध्ये कसे दिसते या वर कृपया मार्गदर्शन करावे .

४) इतर हक्क याचा अर्थ काय आहे
जुने चाक्बंदी ,जमाबंदी ,री सर्व्हे असे रेकॉर्ड तपासावे .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

१.जुने ७/१२ व फेरफार नोंदवही पहा.
२.फेरफार नोंदवही तील नोंदी वरून खात्री करता येयील
३.मुद्दा क्रमांक तीन चे बाबतीत कागदपत्रे पहिल्या नंतर अभिप्राय देणे योग्य आहे
४.इतर हक्क मध्ये कुल,कर्जाचा बोजा,किंवा संबंधित भूमापन क्रमांकावर इतर कुणाचा हक्क असल्यास त्याबाबर नोंद केली जाते.

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

Question by anand salve
07-05-2016
salveanand@89gmail.com

नमस्कार सर, माझ्या वडिलांनी माझ्या नावे रजिस्टर मुतुपत्र केले आहे त्यामध्ये वडिलांनी वडिलोपार्जित जमिनीला स्वकष्टित म्हटले आहे व ७ एकर जमिनीला ४ एकर म्हटले आहे व गावाचे नाव तालुका,झिला लिहिला आहे परंतु सर्वे न व गट नंबर टाकला नाही.७/१२ त्यांच्या नावानी आहे त्यांनी त्यांचा नंतर त्या जागेवर माझे नाव लावायला सांगितले आहे तर माझे नाव त्या जमिनीला लागू शकते का?
जर मृत्यापत्रात सर्वे नंबर नसेल तर , कोणती मिळकत आपणास त्यांनी दिली हे कसे लक्षात येणार ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सिटी सर्वे ऑफिस ने घराच्या जागेचा नकाशा कोणत्या कागदपत्राच्या आधारावर तयार केला याची माहिती मागविता येते का
दिनांक ३१/०३/२०१६ च्या महाराष्ट्र शासन राजापात्रानुसार शासकीय जमीन किवा नशुअल जमीन विक्री किवा हस्तांतर करण्याचे अधिकार कलेक्टर यांना देण्यात आले आहेत .त्यानुसार देवास्तान इनाम शेत जमिनेचे हस्तांतर किवा विक्री अधिकार देखील कलेक्टर यांना देण्यात आले आहेत का ?

Question by anand salve
06-05-2016
salveanand@89gmail.com

नमस्कार सर, माझ्या प्रश्नाची उत्तर दिल्याबद्दल आपले धन्यवाद . माझ्या वडिलांनी माझ्या नावे रजिस्टर मुतुपत्र केले आहे त्यामध्ये वडिलांनी वडिलोपार्जित जमिनीला स्वकष्टित म्हटले आहे व ७ एकर जमिनीला ४ एकर म्हटले आहे व गावाचे नाव तालुका,झिला लिहिला आहे परंतु सर्वे न व गट नंबर टाकला नाही.७/१२ त्यांच्या नावानी आहे त्यांनी त्यांचा नंतर त्या जागेवर माझे नाव लावायला सांगितले आहे तर माझे नाव त्या जमिनीला लागू शकते का? त्या चुक्या मी दुरुस्त करू शकतो का ? काही उपाय सांगा?
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ चे कलम १९(1) अंतर्गत प्राप्त झालेली अपिल आपल्या प्राधिकरणाशी संबधित नसेल तर संबधित प्राधिकरणाकडे हस्तांतरित करता येईल काय ? कृपया कलम सांगावे.
याच site वर अपलोड केलेला R T I संबंधित G R वाचवा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर अनिवासी भारतीय व्यक्तीला महाराष्ट्रात शेत जमीन घ्यायची असल्यास त्याला काय करावे लागेल त्याच्या वडीलांच्या नावे महाराष्ट्रात शेत जमीन असल्याचे त्याचे म्हणणे आहे त्याला काही प्रक्रिया असल्यास सांगावी .
कुल वहिवाट कायद्यानुसार शेत जमीन घेणारी व्यक्ती शेतकरी असणे आवश्यक आहे अन्यथा अशा व्यक्तीस शेत जमीन घेत येत नाही.

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

आदरणीय सर,
माझ्या आजीचा मूत्यू सन १९९५ ते ९६ च्या दरम्यान झाला आहे पण त्यांचा मुत्युचा दाखला नाही कारण त्याची नोंद कोठेही नाही तर नोंद मिळवण्यासाठी काय करावे लागेल ?

माझ्या चुलत्यांनी नकली मुत्युचा दाखला क्षेरोक्स लावली व त्याच्या मूत्यू दिनांक २/१/२०१३ रोजी दाखवला आहे व त्याच्या खाली वारस नोंद लावली आहे . हे कायद्याने चुकेचे आहे तरी वारस नोंद फेरफार रद्द करण्यासाठी काय करावे
कृपया मार्गदर्शन करावे
चुलत्यांनी लावलेला मुत्युचा दाखला खोटा आहे हे सिध्द करण्यासाठी तुमच्याकडे खरा दाखला असावा. तुम्ही चुल्त्याविरुध्ह फौजदारी गुन्हा दाखल करू शकता. दाखला नसेल तर इतर कागद पत्रांवरून ते सिध्द करावे लागेल. फेरफार रद्द करण्यासाठी प्रांताकडे अपील करावे लागेल.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by पाठक
04-05-2016
ymm6339@gmail.com

आदरणीय सर, कांबळे यांना 1 गुंठा जमीन विकायची आहे व त्यास पैशाची फार गरज आहे. मी संगितले की कागदपत्रे असल्याशिवाय मी काही घेणार नाही. फारच हाता-पाया पडल्यावर कागदपत्रे देवून काहीही करा पण माझा गुंठा घेवून माला पैसे द्या असे सांगून कांबळे निघून गेला. कागदपत्रे तपासल्यावर लक्षात आले की जमीन गुंठेवरी मध्ये आहे व महानगर्पालिके कडून बिगर शेती परवाना घेतलेला आहे. परंतु अजून कलेक्टर कडून बिनशेती आदेश घेतला नाही व 7/12 वर नावही नाही. म्हणून जागेची खरेदी होत नाही. फारच जबरदस्ती केल्यानंनातर मी त्याला नोटरी खरेदीपूर्व करार नोटरी करून 2 लाख दिले. काही दिवसांनी मी 7/12 वर कांबळे चे नाव लावलेनंतर उरलेले 2 लाख देवून जागा खरेदी करन्याचे ठरले. मी सावध राहून 2 लाख रूपयांचा बँकेचा चेक दिला. त्याने बँकेतून पैसे काढून घेतले. मी त्याच्या जागेवर त्याचे नाव 7/12 वर लावून घेतले. नंतर मी त्याला ठरलेला व्यवहार पूर्ण करण्यासाठी निबंधक कार्यालयात येउन सही करण्यास संगितले. आता तो साफ नकार देत आहे. म्हणतो तुम्ही देत असलेला दर फार कमी आहे व नोटरी खरेदिपूर्व करार ला काही महत्व नाही. पैसे वाढवून द्या असे म्हणून फारच जास्त पैसे मागत आहे. त्याचे जागेची मूळ कागदपत्रे, नोटरी केलेले कागदपत्रे, बँकेतून पैसे काढलेला पुरावा (चेक चे झेरॉक्स) माझ्याकडे आहे. मी त्याला कोर्टात खेचतो असे म्हटल्यावर आता तो म्हणतो मी ही 1 गुंठा जमीन दुसर्‍यास विकतो तुम्ही कोर्ट-कचेरी करत बसा, नोटरी ला काही महत्व नाही. मी त्याला म्हटले नोटरी का केली तर तुझे नाव 7/12 वर न्हवते म्हणून आता निबंधक कार्यालयात करार व खरेदी होते पण तू बदललास. नोटरी केलेल्या खरेदीपूर्व करार मध्ये जागेचा दर निश्चित केलेला आहे. The Specific Relief Act खाली दावा दाखल करून न्यायालयाकडून खरेदी करून देण्याबाबत कांबळे ला आदेश देवू शकतो का ? कृपया मार्गदर्शन करावे.
नोटरी खरेदीपूर्व कराराला कायद्यात किमत नाही. जमीन गुंठेवरी मध्ये आहे, कलेक्टर कडून बिनशेती आदेश घेतला नाही तर त्याच्या जागेवर त्याचे नाव 7/12 वर कसे लावून घेतले? तुम्ही The Specific Relief Act खाली दावा दाखल करून न्यायालयाकडून खरेदी करून देण्याबाबत कांबळे ला आदेश देण्याचा प्रयत्न करू शकता

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by anand salve
04-05-2016
salveanand89@gmail.com

नमस्कार सर , माझ्या वडिलांनी माझ्या नावे रजिस्टर मुतुपत्र केले आहे .त्या नुसार मी आमच्या गावी तलाठी कडे माझ्या वडिलाच्या नावे असलेल्या जमिनीच्या ७/१२ वर माझे नाव दाखल करण्यासाठी अर्ज केला होता.तलाठी नि माझ्या घरच्या लोकांना नोटीसा सुद्धा पाठवल्या.त्यांनी त्याला हरकती घेतल्या व वारस नोंद साठी अर्ज दाखल केला.तलाठी नि वारस नोंद नुसार सगळ्याचे नाव लावले.पण मुर्तुपत्र नुसार माझ्या एकट्याचे नाव लावले नाही व मला म्हणाला तुम्ही पुन्ह्या अर्ज करा त्या नंतर तहसीलदार कडे तुमची केस चालेल व तहसीलदार त्यावर निर्णय देइल.तलाठी ची हि कारवाई योग्य आहे का ? आता मी काय करू ?तहसीलदार त्यावर काय निर्णय देइल?
तलाठी ची हि कारवाई योग्य आहे कि नाही हे कागदपत्र पाहिल्यानंतरच सांगता येईल . तुम्ही त्या फेरफार विरुद्ध प्रांत कडे अपील करू शकता

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नवीन गावठाण विस्तार मधील मिळालेला प्लॉट ला १५ वर्षे झाले आहे सदर प्लॉट विकता येतो का त्यास विक्रीस परवानगी मिळते का कोणाकडून परवानगी घ्यावी
गावठाण विस्तार योजनेतील भूखंड प्रांत अधिकारी यांचेकडून प्रदान ( Grant ) केले जातात त्यामुळे , हस्तांतरास परवानगी देण्याचे अधिकार हि त्यांनाच आहेत .
आपण प्रांत अधिकारी यांची परवानगी घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

tahsildar कार्यालयात चौकशी करावी

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

मी १९९५ मधे चिपळूणमधे १ फ्लॅट खरेदी केला. साठेखत केले व खरेदीखत करणे राहून गेले. माझ्याकडे पझेशन लेटर आहे. त्या आधारावर बॅंकेकडून कर्ज घेतले व कागदपत्रे बॅंकेच्या ताब्यात दिले. नोकरीतून निवृत्त झाल्यावर चिपळूणमधे कायम वास्तव्यास रहाण्याचे ठरवले. बॅंकेचे कर्ज फेडून कागदपत्रे ताब्यात घेतली. नगरपरिषदेत फ्लॅटनावावर करण्यास गेल्यावर खरेदी खत न केल्याचे लक्षात आले. आता सोसायटी रजिस्टर झालेली असून असेसमेंट चेअरमन सोसायटीच्या नावाने होत आहे. माझे नाव भोगवटदार म्हणून नोंदलेले आहे. परंतू मालक म्हणून नोंद होण्यासाठी खरेदीखत आवश्यक असल्याचे नगरपालीका कार्यालयातून सांगण्यात आले. तसेच खरेदीच्यावेळी रीतसर स्टॅंपड्युटी भरलेली असल्याने फक्त रू.100/- च्या स्टॅंप पेपरवर सोसायटीच्या चेअरमन सोबत खरेदीखत करावे असे सांगण्यात आले. चेअरमन असे खरेदीखत सही करण्यास तयार नाही. अशा परीस्थितीत काय करावे?
दिवाणी न्यायालयात दाद मागावी

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

मरण पावलेल्या व्यक्तीने मृतुपत्र तयार करून ठेवल्यास त्यांच्या वारसांना हिंदू वारस कायदा १९२५ प्रमाणे हिस्सा मिळतो कि हिंदू विल्स कायदा प्रमाणे हिस्सा मिळतो. हिंदू वारसा कायदा व हिंदू मृतुपत्र कायदा या दोन भिन्न व्याख्या आहे काय ?
याच site वर अपलोड केलेला वारस कायदे आणि मृत्यू पत्र संबंधित माझा लेख वाचवा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

१)आम्ही आमचे आजोबा वारले . तेव्हा तलात्याकडे वारस नोंद लावण्याकरता अपित्युत करून दिली .३ महिने जाले तरी वारस नोंद झाली नाय .त्यांना विचारले असता ते म्हणाले .वारस नोंद online करतात त्यामुळे वेळ लागत आहे .२) तर आता आमची आजी वरल्या आहेत .ते जे अपितुत बनवले आहे त्याच्या मध्ये आजीचे जिवंत असताना नाव लावले होते.तर काय करावा लाघेल
संगणीकरणाचे काम चालू आहे. थोडा वेळ लागेल. तलाठी कडे अर्ज देऊन पोहोच घेउन ठेवा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर ,

१) ८ अ आणि आपले खाते क्रमांक हे कोणत्या आधारे निर्माण होते .

२) ५० ते ८० वर्षापूर्वीची आपले खाते क्रमांकाची माहिती कशी मिळवावी .

३) वारस हक्क गाव नमुना ६ क कोणत्या आधारे बनविला जातो
१) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १६८ (१) अन्वये महसूलाचे प्रदान करण्याासाठी प्रथमत: जबाबदार असणार्या प्रत्येक व्यक्तीने राज्य शासनाला जमीन महसूल आणि उपकर म्हणून देय असणार्या रकमेचा हिशोब करण्या्साठी हा नमुना उपयोगी आहे. यालाच 'खातेनोंदवही' असेही म्हणतात.
गाव नमुना आठ-अ मध्ये गावातील प्रत्ये्क शेतकर्याची, त्या गावात विविध ठिकाणी जी शेतजमीन आहे त्याची नोंद असते. गाव नमुना सात-बारा आणि आठ-अ च्या् सहाय्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १५१ अन्वये खातेपुस्तिका तयार करणे व विहित फी भरल्यानंतर त्याची प्रत देणे तलाठी यांना शक्य होते.

२) ५० ते ८० वर्षापूर्वीची आपले खाते क्रमांकाची माहिती अभिलेख कक्षात अर्ज करून घ्यावी

३) वारस हक्क गाव नमुना ६ क ही एक दुय्यम नोंदवही आहे. खातेदार मरण पावल्यावर, मयत खातेदाराच्या मालमत्तेचा उत्तराधिकार प्राप्त होणार्या सर्व वारसांच्या नावाची हिंदु उत्तराधिकार अधिनियम उपबंधान्वये वारसाहक्क नोंदवहीत नोंद करावी लागते. एखादा खातेदार मयत झाल्यानंतर त्याचे वारस तलाठी यांचेकडे, मयत व्यक्तीाच्या नावाऐवजी वारसहक्काने वारसांची नावे दाखल करण्यासाठी अर्ज देतात. त्या‍नुसार काही ठिकाणी तलाठी वारसांची नोंद प्रथम गाव नमुना सहा-क मध्ये करतात.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Adaraniy panbude sir नोंदनीकृत वाटपपात्र जर मंडलाधिकारी यांनी वाटप चुकीचे आहे व् सर्व सहहिस्सेदार यामधे सहभागी न्हवते म्हणून नोंद चुकीची थरावली आहे ,तर ते रद्द होते का?
नोंदणीकृत वाटप केले असेल आणि मंडळ अधिकारी यांनी नोंद रद्द केली असेल तर त्या विरोधात अपील करता येयील.नोंदणीकृत दस्त रद्द करण्याचे अधिकार दिवाणी न्यायालयास ahet

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

वाढीव गावठाणातील भोगवटादार वर्ग २ ची जमीन गृह कर्ज घेण्यासाठी बँकेस तारण देत येते का
आमच्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये माझ्या मोठ्या भावाने आमची कायदेशीर वारसानची कोणतीही सहमती न घेता सदर घर त्याच्या बायकोच्या नावे केले आहे त्यास साधारणपणे १० वर्षे झाली आहेत आम्ही गावी नसतो म्हणून त्याने आमच्या खोट्या सह्या केल्या व आमच्या वडिलोपरजीत जमिनीवर घर बांधून ग्रामपंचायत मध्ये नोंद करून घेतली
तर या विरोधात आम्हला न्याय हवा आहे तरी आपण आम्हास सहकार्य करावे
भावाने खोट्या सह्या केल्या असतील तर त्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करा. मालमत्तेचे कायदेशीर वाटप आणि नोंद करून घ्या.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आमच्या वडिलोपार्जित घरावर माझे वडील कर्ज काढणार आहे व त्यास आमचा विरोध आहे
सदर घर हे आमच्या आजोबांच्याच नावावर आहे व ते मयत आहेत व आजही सदर घर आजोबांच्याच नावावर आहे
तरी कायदेशीर वारस म्हणून आम्हाला सदर घरावरती कर्ज घेण्यास हरकत आहे
कारण ते खूप वृद्ध झाले आहेत व या नंतर कर्ज भरण्यावरून आमच्यात भांडणे होऊ नये म्हणून आमची हरकत आहे
कृपया मार्गदर्शन करावे
हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) अधिनियम-२००५ कलम ४ अन्वये पूर्वीच्या कायद्यान्वये वारसाला, त्याच्या पूर्वजांनी (वडील, आजोबा, पणजोबा) घेतलेली कर्जे फेडण्याची जबाबदारी होती. याला ‘पवित्र जबाबदारी (पायस ऑब्लिगेशन)’ म्हटले जात होते. असे कर्ज वारसाने न फेडल्यास, असे कर्ज देणार्यास न्यायालयात दाद मागता येत होती. केंद्र शासनाने सन २००५ च्या या सुधारीत कायद्यान्वये वारसाची, त्याच्या पूर्वजांनी (वडील, आजोबा, पणजोबा) घेतलेली कर्जे फेडण्याची जबाबदारी रद्द केली आहे व असे कर्ज देणार्यास आता न्यायालयात दाद मागता येणार नाही अशी तरतुद केली आहे.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by pramod
30-04-2016
pramodderle@yahoo.com

नमस्कार सर
आमुच्या दोन भावामध्ये सुलेहानामा कोर्तामार्फात ०२/०४/१९८१ रोजी झहालेला आहे त्यात आमुच्या वाट्याला ३० R क्षेत्र हलक्या जमिनीच्या मोह्बाद्ल्यात जास्त आलेले आहे त्यानुसार आता ३५ वर्ष्यानंतर माझ्या भावाने ते वाढीव क्षेत्र परत मिळण्यासाठी व समसमान वाटप होण्यासाठी दावा दाखल केला आहे .
१) तर यात किती वर्ष्यापर्यंत सुलेह्नाम्याविरोधात तक्रार दाखल करता येते ??
२) सुलेहनामा झाल्यानंतर मी ज्या स्वकष्टाने जमिनी घेतल्या आहेत त्या जमिनी आम्ही या वाढीव क्षेत्राच्या उत्पन्नावरून घेतल्या आहेत असा दाव्यात उल्लेख करण्यात आला आहे व हिंदू एकत्र कुटुंब नुसार सदर जमिनीत देखील हिस्सा मागितला आहे तर सदर दाव्यात किती तथ्य आहे
योग्य मार्गदर्शन करावे
एका खालासा जमिन च्या 7/12 उताऱ्यात वडीलांचे नांव असून ते आजरोजी हयात आहेत. ती जमिन वडीलांनी व एका मुलगा यांनी दुसऱ्या मुलाकरीता रजिष्टर हक्कसोडपत्राने हक्क सोडला आहे. तर सदरचे हक्कसोडपत्राने दुसऱ्याच मुलाचे 7/12 उताऱ्यात नांव दाखल करावे अगर कसे याबाबत मार्गदर्शन होणे विनंती आहे.
हक्कसोडपत्र घेणार व देणार यांचे उताऱ्यात नाव असणे आवश्यक आहे ...हक्कसोड पत्राने नवीन नाव उताऱ्यात दाखल करता येत नाही

Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार

This page was generated in 0.31 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3