जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by स्वाती स्वामी
17-02-2016
swati.swami@yahoo.com
कृपया तहसीलदार यांचे मासिक डायरी चे समीक्षण करण्याबाबतचा उद्दिस्त निहाय नमुना देण्यात यावा हि विनंती
जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधून माहिती मिळवावी
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by स्वाती स्वामी
17-02-2016
swati.swami@yahoo.com
मा. उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले तलाठी यांचे निलंबन आदेश मा. जिल्हाधिकारी यांनी रद्द केले आहेत . तर त्या तलाठी यांचे विभागीय चवकशी पण रद्द होऊ शकते का ? कृपया मार्गदर्शन व्हावे हि विनंती .
Question by स्वाती स्वामी
17-02-2016
swati.swami@yahoo.com
विभागीय चवकशी सुरु करण्याची कार्य पद्धती कोणती आहे ?
विभागीय चौकशीबाबतची अनेक पुस्तके बाजारात मिळतात. त्यातून सविस्तर माहिती मिळू शकेल
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by स्वाती स्वामी
17-02-2016
swati.swami@yahoo.com
ऐपत प्रमाणपत्र देण्याचे अधिकार तहसीलदार यांना आहेत कि उपविभागीय अधिकारी यांना आहेत . कार्य पद्धती कोणती आहे ? कृपया मार्गदर्शन करावे .
किमतीनुसार तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना आहेत. त्या त्या कार्यालयात चौकशी करावी
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by स्वाती स्वामी
17-02-2016
swati.swami@yahoo.com
अकृषी परवानगीसाठी अर्जदार यांनी दोन वर्षापूर्वी अर्ज केला . नाहरकत साठी कार्यालयाकडून इतर कार्यालयांना पत्र दिले आहे परंतु समन्धित कार्यालयाचे नाहरकत / अभिप्राय प्राप्त झालेले नाहीत . तर अर्जदार यांना नवीन अर्ज सदर करण्याची सूचना द्यावी लागेल का ?
नाही . इतर कार्यालयांना तत्काळ न हरकत देण्यास कायद्याने बाधा नसल्यास, न हरकत देणे बाबत कळवा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by हेमंत धनाजी ताकवले.
17-02-2016
hemanttakwale@gmail.com
मा महोदय,
मी हेमंत धनाजी ताकवले मौजे धनकवडी त.पुरंदर,जी.पुणे येथील रहिवाशी असून पंचायत समिती पुरंदर सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडील पुरंदर तालुक्याच्या नकाशात आमच्या गावातील ग्रा.म २४० स्त्याची नोंद आहे.मी त्या रस्त्यासंदर्भात तेथे विचारणा केली कि हा रस्ता कसा मंजूर करण्यात आला.तसेच सदरील रस्ता कोणत्या सर्वे नं / गटांमधून कसा जातो.त्याचा नकाशा वगैरे मागितला असता ते ह्याबद्दल काहीच माहिती पुरवत नाही.ते बोलले कि हा रस्ता आमच्या आराखड्यामध्ये आहे कसा आला.कोठून जातो हे माहित नाही.
तेव्हा कृपया सदरील ग्रा.म.२४० रस्त्याची माहिती म्हणजेच नकाशा,कोणत्या गटांमधून जातो.त्याची माहिती कोठे उपलब्द होईन?
कृपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती,
आपला कृपाभिलाषी,
हेमंत ताकवले.
सार्वजनिक बांधकाम विभाग ..कार्यकारी अभियंता यांचेसी संपक साधा
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by पाटील bajirao
16-02-2016
patilbajirao45@gmail.com
सर बी पी एल रेशन कार्ड आहे वडिलाची मुत्य झाली तर मला तहसीलदार साहेबा कडून मदत मिडल का ?
Question by पाटील bajirao
16-02-2016
patilbajirao45@gmail.com
सर आमदार निधीतून वडिलाची कर्जबाजारी पणा मुडे विश प्राशन करून आकस्मात मूत्यू झाल्यास मदत मिडणार का
Question by पाटील bajirao
16-02-2016
patilbajirao45@gmail.com
सर आम आदमी विमा योजना ची पूर्ण माहिती सागा
Question by प्रमोद पाटील
15-02-2016
pramod2615@gmail.com
सर मी महसूल मध्ये वर्ग ३ पदावर असून स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी रजेवर जायचे आहे...मी ६ वर्षाचा कालावधी पूर्ण केलेला असून मला विनावेतन रजा किती दिवस मिळेल...???
Question by VIKRAM YADAV
15-02-2016
vikram.vy11135@gmail.com
नमस्कार सर ,७/१२ नोद झाली आहे . ती पक्की करण्यसाठी किती दिवसच कालावधी असतो .
७/१२ वरील नोंद पक्कीच असते , आता पूर्वी सारख्या पेन्सिल ने नोंदी ठेवत नाहीत . जर आपल्या नोंदी विरुद्ध कोणी त्यांचे नाव लावावे असे अपील केले व केस जिंकली तरच आपले नाव बदलू शकते
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
15-02-2016
ravindra.golesar@rediffmail.com
नमस्कार सर , क्षेत्राची मोजणी करण्यासाठी खाजगी मोजणी आणावी कि सरकारी मोजणी आणावी खाजगी मोजणी केली तर कागदोपत्री तसेच कोर्ट कामासाठी ग्राह्याधारली धरली जाते काय ?
Question by pradeep
15-02-2016
prpatil979743@gmail.com
कुणबी दाखला काढायचा आहे त्याला कागदपत्रे कोणती आहे
कुणबी हि जात इतर मगद प्रवर्गात , १९६७ ला समाविष्ट करण्यात आलेली आहे . त्या मुले १९६७ अथवा त्या पूर्वीचा कुणबी जात नमूद असलेलें अभिलेख आपले वडिलांचे आवश्यक
१९६७ साली आपले वडील/आजोबा जेथे वास्तव्यास होते , तेथून जातीचा दाखला काढणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by स्वाती स्वामी
12-02-2016
swati.swami@yahoo.com
मा. जिल्हाधिकारी यांनी अधिकारी / कर्मचारी यांचे विरुद्ध चे तक्रारीवर तपासणी करून अहवाल सदर करण्यास सुचित केले आहे . समजा तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांचेविरुद्ध तक्रार असेल तर सध्याचे उपविभागीय अधिकारी हे तपासणी करू शकतात का ? कृपया मार्गदर्शन करावे ...
मा. जिल्हाधिकारी यांनी सध्याच्या उपविभागीय अधिकारी यांना अशी तपासणी करण्याचे आदेश दिले असतील तर सध्याचे उपविभागीय अधिकारी हे अशी तपासणी करू शकतात. विषय गंभीर असल्यास सध्याचे उपविभागीय अधिकारी मा. जिल्हाधिकारी यांना तसे कळवून अप्पर जिल्हाधिकारी यांनी अशी तपासणी करावी अशी विनंती करू शकतात
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by राहुल सावंत
12-02-2016
sawantrahul1974@gmail.com
साहेब माजा प्रश्न असा आहे कि माज्या गावी वाडी लोपाजित सामाईक जमनी आहेत. त्या जमिनीनच्या सात बारावर माजे आजोबा१९७१ मध्ये वारले तेव्हा माज्या मोठ्या चुलत्यांनी कुटुंब प्रमुक म्हणून नाव लावले व गाव नमुना ६क मध्ये माज्या वडिलांचे नाव लावले आहे. तर मला माज्या वडिलांचे नाव सातबारावर लावायचे आहे मोठे चुलतेही वारलेले आहेत तर त्यांच्या कुटुंबाची वारस तपासणी त्यांचे कुटुंब करतीलच पण मी फक्त माज्या वडिलांचीच वारसतपासणी करू शकतो काय व ती कोणाकडे करू , त्या साठी कोणते पेपर लावायचे याची मला माहिती द्यावी हिच नम्र विनंती .
संबंधित फेरफार जोडून तहसीलदार कडे अर्ज करावा.
ए.कु.मॅ. ची वारस नोंद:
कायदा: हिंदू वारसा कायदा 1956.
बर्याच वेळा असे निदर्शनास आले आहे की, एखाद्या जमिनीवर एकत्र कुटूंब मॅनेजर म्हणून नाव दाखल असलेला इसम मयत झाल्यानंतर त्याचे वारस, वारस नोंदीसाठी अर्ज करतात आणि त्या मयत ए.कु.मॅ. चे वारस म्हणून फक्त त्यांच्याच मुला/मुलींच्या नावाची त्याचे वारस म्हणून नोंद केली जाते. यामुळे मयत इसम ज्यांचा ए.कु.मॅ. असतो त्यांचा वारस हक्क डावलला जातो.
वास्तविक एकत्र कुटूंब मॅनेजर म्हणून नाव दाखल असलेला इसम मयत झाल्यानंतर त्याची वारस नोंद करतांना अत्यंत सखोल चौकशी करणे आवश्यक असते.
मंडलअधिकारी यांनी करावयाची कार्यवाही: मंडलअधिकारी यांनी ए.कु.मॅ. च्या निधनानंतर वारस नोंदीसाठी अर्ज आल्यास गाव कामगार तलाठी यांना प्रथम मयत इसमाचे नाव ज्या फेरफार नुसार ए.कु.मॅ. म्हणून दाखल झाले होते त्या फेरफारात नमूद सर्व व्यक्तींना नोटीस बजवण्यास सांगावे. त्यापैकी जे सज्ञान झाले आहेत त्यांची नावे तसेच इतर व्यक्तींपैकी जे मयत आहेत त्यांच्या वारसांची आणि ए.कु.मॅ. चे वारस अशा सर्वांची नावे वारस ठराव करून आणि त्यानंतर गाव नमुना नं. 6 मध्ये अन्वये कब्जेदार सदरी आणणे आवश्यक असते.
अशा सखोल चौकशीनंतरच मंडलअधिकारी यांनी सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली गेली आहे याची खात्री करावी तसेच कोणताही वारस डावलला गेला नाही याची खात्री करून सदर वारसनोंद प्रमाणीत करावी. मुस्लिम कायद्यामध्ये एकत्र कुटूंब मॅनेजरची संकल्पना नाही हे लक्षात ठेवावे.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by राहुल सावंत
12-02-2016
sawantrahul1974@gmail.com
साहेब आमची सामाईक जमीन ४ गुंठे आहे हि सर्व जमीन आम्ही सर्वजण गावच्या मंदिरा साठी बक्षीसपत्र करून देणार आहोत. तर आम्हाल एक प्रश्न पडला आहे कि आम्ही मुख्य हिसेदार ६ जन आहोत पण सातबारावर आमची ६ मुख्य वारस दरांची व आमचे सहहिसेदार यांची नावे आहेत यामध्ये काही अज्ञान आहेत तर बक्षीसपत्रावर सह्या सातबारावर नावे आहेत त्यांच्या सर्वांच्या घ्यायच्या कि आम्ही मुख्य ६ हिसेदारानी सह्या करायच्या, सदर बक्षीसपत्र नोंधणी करणार आहोत याचे मार्गदर्शन करावे हीच नम्र विनंती.
अज्ञानाच्या नावावर असणारी मिळकत विकण्यास हिंदू अज्ञानत्व व पालकत्व अधिनियम 1956, कलम 8 अन्वये दिवाणी न्यायालयाची पूर्व परवानगी घ्यावी लागते. तशी परवानगी असल्यास नोंद प्रमाणीत होते अन्यथा अशी नोंद दिवाणी न्यायालयाची परवानगी नाही म्हणून रद्द होते कारण असा अ.पा.क. हा त्या मालमत्तेचा मालक नसून पालक असतो.
परंतू एखाद्या मिळकतीवर संयुक्त कुटुंबातील चार व्यक्तींची नावे आहेत, त्यापैकी एक व्यक्ती अज्ञान असून इतर तिघांपैकी एका व्यक्तीचे नाव त्या अज्ञानाचा अ.पा.क म्हणून दाखल आहे. त्या अ.पा.क. असणार्या व्यक्तीने 7/12 वरील संपूर्ण क्षेत्राची विक्री केली तर दिवाणी न्यायालयाची परवानगीची आवश्यकता नाही. अविभक्त हिंदू कुटुंबाला किंवा संयुक्त कुटुंबाला अशा परवानगीची आवश्यकता असणार नाही असा निकाल मा. सर्वोच्च न्यायालयाने हिंदू अज्ञानत्व व पालकत्व अधिनियम 1956, कलम 8 व 12 याचा एकत्र अर्थ लावतांना दिला आहे.
जमिनीतील हिस्सा कायदेशीरपणे ठरवला गेला नसल्यास, मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882, कलम 44 अन्वये समाईकात नावे असणार्या सर्वांचा समान हिस्सा असतो हे लक्षात ठेवावे.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by शिवाजीराजे
12-02-2016
Shivajirajetarale@gmail.com
लहान पासून दत्तक वडिलांच्याकडे असणार्या मुलाला दत्तक वडील आजारी होते म्हणून आजीनी १९५० साली दत्तक वडिलांच्या मांडीवर १२ वर्षे वय असताना दत्तक घेतला आहे नंतर दत्तक वडील मरण पावले त्यामुळे धार्मिक कार्यक्रम करायचे राहून गेले तसा उल्लेख करून दत्तक घेणार्या आजीनी १९६१ साली धार्मिक कार्यक्रमानुसार दत्तक पत्र करून ठेवले त्यात त्यांनी नवरयाच्या इच्छेनुसार दत्तक घेतला आहे धार्मिक कार्यक्रम राहिला तो करून दत्तक पत्र करून ठेवले व आजीनी नंतर स्वताचे मृत्यू पत्र हि करून ठेवले असेल तर दोनीही चालू शक्तेका ? वारस नोंद जर दत्तक पत्राने असेल, तर त्याच्या वारसाबद्दल कोणी आक्षेप घेऊ शकते का ? ते मुदतीत बसते का ? व तो आक्षेप कोणी घेतला पाहिजे त्याच्या भाऊकितील लोकांनी का इतर कोणीही व्यक्ती जिच्या बरोबर आमचा जमिनीचा वाद चालू आहे अशी इतर कोणीही व्यक्ती ?
याच site वर असलेला दत्तक कायदा वाचवा. वारस नोंद जर दत्तक पत्राने असेल, तर त्याच्या वारसाबद्दल कोणीहि आक्षेप घेण्याचे कारण नाही. आक्षेप असल्यास तक्रार केस चालून निर्णय घेता येईल.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
12-02-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,एखाद्या व्यक्तीने ग्रामीण भागात ०-०३ आर क्षेत्र खरेदी केले. त्यावेळी सदर गट नं.शेती झोन होता.परंतु आता सदर गट नं. निवासी झोन मध्ये आहे तर तुकडे बंदी कायदा लागू होईल का?कृपया मार्गदर्शन होनेस विनंती.
खरेदी केले त्यावेळीच तुकडे बंदी कायदा शेरा ठेवला असावा. तुकडे बंदी कायदा शेती क्षेत्रासाठी लागू असतो
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by sanjay
12-02-2016
sanjaytadwalkar@gmail.com
ग्रामपंचायत हदीतील आमचे घर जागेचे दक्षिण बाजूला खुली जागा असून गेली ७० वर्षे आम्ही त्या खुल्या जागेची स्वचता,झाडलोट ,निगराणी करत ती खुली जागा आम्ही वापरत आहोत परंतु आमचे शेजार्यांनी १९८१ च्या सर्वे वेळी ती खुली जागा आम्ही व इतर दोन शेजार्यांमध्ये सामायिक असे सांगून 'सामायिक खुली जागा' अशी नोंद केली.
आता आम्हास ती खुली जागा आमचे मालकीची करावयाची आहे त्या करिता काय करावे?
खुली जागा सामायिकच असते. तरीही आपण सदर नोंदिविरुद्ध अपील करू शकता
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by Arjun
12-02-2016
mohanms9775@gmail.com
साहेब , x या व्यक्ती १९७३ मध्ये वारल्यानंतर x या व्यक्तिंचे वारसदार AB दोन मुले व PQR तीन मुलींचे नांव व B या व्यक्तिंचे नांव इतर हक्कात ठेवले . A या व्यक्ती कुटुंब प्रमुख होते.सदर B या व्यक्तीने १९९० मध्ये वाटणी करून घेतले , वाटणी करून घेताना B व्यक्तिंचे ७/१२ उतार वर PQR या बहिणींचे नांव आढळून येत नाही सदर PQR बहिणींचे नांव A या भावांचे ७/१२ उतार वर वारसा लावले पासून कायम आहे ,१९९७ मध्ये भूसंपादन झाल्यानंतर बहिणींचे हक्क सोड पत्र द्यावे असे बोलतात सदर तिनी बहिणींचे २००१ पूर्वी मयत झालेले आहे,बहिणींचे वारसा लावले नाही व A या व्यक्तिंचे २००१ मध्ये मृत्यू झाले नंतर त्यांचे वारसदार चे नाव लावले, सदर भूसंपादन रक्कम आजतागायत मिळाले नसून रक्कम मिळवणे साठी इतर हक्कातील व्यक्तींचे २००५ पूर्वी मृत्यू झालेने १६/१०/२०१५ या सुप्रीम कोर्ट निर्णयानुसार रक्कम मिळवणेसाथि पुढील मार्ग दर्शन मिळावे .विनंति
Question by chetan
11-02-2016
drchetanspatil@gmail.com
how to take permission in gaothan jamin which is having only gaon namuna 8 and goathan remark form panchayat only. and how to make mojani of the goathan plot from tilr office
गावठाण जमिमिनीचे पुरावे देवून सिटी सर्वे ऑफिसर कडे मोजणीचा अर्ज करा . जेतेह सिटी सर्वे अधिकारी नाही तेथे तालुका निरीक्षक ( आता उप अधीक्षक ) जमीन रेकॉर्ड येथे अर्ज करा
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by प्रवीण हेगणेश्वर
11-02-2016
hey_ganeshwar@yahoo.com
महाेदय,
मुक्काम भत्त्या वीषयी BOMBAY CIVIL SVS RULES मधील नीयम क्र ५५६ ची माहीती मीळणे वीषयी वीनंती अाहे. तसेच BOMBAY CIVIL SVS RULES ची मराठी तसेच इग्रजी अावृती साॅफ्ट काॅपी मीळणे वीषयी वीनंती अाहे.
धन्यवाद,
माे.क्. 9890952821
Question by प्रवीण हेग्नेश्वर
11-02-2016
hey_ganeshwar@yahoo.com
महाेदय,
१. सहा गठ्ठे पद्धत
२. वार्षिक प्रशासकीय अहवाल
या वीषयी सवीस्तर माहीती मीळावी ही नम्र वीनंती.
धन्यवाद
mobile no . 9890952821
Question by रोहिदास सखाराम पाबळे
11-02-2016
rohidaspable@yahoo.in
ताबेसाठेखाताची नोंद ७/१२ च्या इतर अधिकारात करता येते का येत असल्यास त्याबाबत काही नियमावली आहे काय अशी नोंद झाली असल्यास काय करावे
नोंदणीकृत ताबा गहाण खत/मुदत गहाण खत:
कायदा: भारतीय नोंदणी कायदा, कलम १७; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५०.
एखादा खातेदार दुसर्या. इसमास नोंदणीकृत दस्ताने स्वत:च्या मालकी हक्काच्या जमिनीचे नोंदणीकृत ताबा गहाण खत/मुदत गहाण खत करून देतो. गाव कामगार तलाठी यांच्याकडे या संबंधीची कागदपत्रे प्राप्त झाल्यावर गाव नमुना नं. ६ मध्ये त्याची नोंद होते.
सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजवल्यानंतर सर्व हितसंबंधीत हजर राहून नोटीस पुस्तकावर संमतीदर्शक स्वाक्षरी करतात. १५ दिवसानंतर मंडलअधिकारी संबंधीत नोंदीवर योग्य तो निर्णय घेतात.
महत्वाचे: * काही ठिकाणी, विशेषत: सातारा जिल्ह्यात असे निदर्शनास आले आहे की, नोंदणीकृत ताबा गहाण खत/मुदत गहाण खत याची नोंद करतांना गाव कामगार तलाठी, गहाण देणार (जमिनीचा मूळ मालक) याचे नाव ७/१२ च्या कब्जेदार सदरातून कमी करून ते इतर हक्कात नोंदवतात आणि जमीन गहाण घेणार्याच इसमाचे नाव ७/१२ च्या कब्जेदार सदरी नोंदवतात. ही पध्दत अत्यंत चुकीची आणि बेकायदेशीर आहे. कब्जेदार सदरी नाव आल्यामुळे जमीन गहाण घेणारा इसम त्या जमिनीची विक्री करतो, जमीनीवर मोठ्या रकमेचे कर्ज काढतो. यामुळे पुढील कायदेशीर गुंतागुंत वाढत जाते.
मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२, कलम ५३ अ अन्वये ताबा गहाणखतामुळे जमीन गहाण घेणार्याण इसमास मालमत्ता ताब्यात ठेवण्याचा हक्क निर्माण होत असला तरीही त्यास 'मालकी हक्क' प्राप्त होत नाही. त्यामुळे ताबा गहाण खत/मुदत गहाण खतानुसार, जमीन गहाण घेणार्या' इसमाचे नाव ‘इतर हक्क’ सदरीच नोंदवणे कायदेशीर आहे. गहाण देणार (जमिनीचा मूळ मालक) याचे नाव ७/१२ च्या कब्जेदार सदरीच ठेवावे.
* महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम ६३ अ अन्वये शेतकरी नसलेल्या व्यक्तीला शेतजमीन विकता येणार नाही किंवा त्याच्याकडे शेतजमीन गहाण ठेवता येत नाही.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by स्वाती स्वामी
11-02-2016
swati.swami@yahoo.com
एका कर्मचारी यांचे विभागीय प्रकरणातील दोष सिद्ध झाले . त्यांना शासन सेवेतून मुक्त करण्यासाठी कोणती कार्य पद्धती अनुसरावी लागेल . कृपया शासन तरतुदी सह मागदर्शन करावे ..
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
