जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

sir
आमचे आजोबा वरल्या नंतर आमच्या मोठ्या काकांनी वारस तपासणी केली तेव्हा कुटुंब प्रमुक म्हणून आपले नाव ७/१२ वर लावले व त्यांचे वारस म्हणून माज्या वडिलांचे नाव लावले७/१२ वर नाव लावलेले नाही ,तर माज्या वडिलांचे नाव गाव नमुना ६ क मध्ये आहे तर त्यांचे ७/१२ उतार्यावर नाव कसे लावायचे . आतातर आमचे मोठे काका वारलेले आहेत तर काय करावे याची आपण माहिती द्याव्ही हीच नम्र विनंती .
कृपया आपण उपविभागीय अधिकारी यांचेकडे अपील करा.
म.ज.म.आ. १९६६ चे कलम १५५ अन्वये तहसीलदार स्तरावरही ६ का चा अंमल देनेबाबत कार्यवाही करता येयील.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by mohan
28-08-2014
mohanmsutar@gmail.com

saheb
आमचे शेत जमीन १९९७ मदे भूसंपादन झाले . त्यानंतर आमचे आजोबाने नातुला प्रकल्पग्रस्त दाखल दिले .सदर दाखल्याचे आधारे आमचे भवानी २००९ मदे नोकरी मिळाले . सदर शेत जमिनीचे भूसंपादन होऊन सुद्धा राहिलेले शेत जमिनी मदे ३५ आर जमीन वारंवार पाण्याखाली जातात .आता आमचे आजोबा मयत झाले असून आमचे वडील व काकांचे नावाने वारसा झाले आहे.सदर पाण्याखाली शेत जमिनीचे भूसंपादन करून मंजूर झाल्यानंतर त्याच कुटुंबातील दुसर्या भावना दाखल देणेसाठी कुटुंबातील सर्वांचे समती असल्यास त्यांचे काय अडचण आहे का? जुना भूसंपादन झालेले व नवीन भविष्यात भूसंपादन होणारे शेत जमीनचे सर्वे नंबर एकच आहे व आता भूसंपादन होतंन नवीन जी आर नुसार होणार काय ?माहिती मिळावे

Question by swami
27-08-2014
swati.swami@yahoo.com

तहसील कार्यालय मध्ये किती विभाग असतात ? सर्व विभागनिहाय जॉब चार्ट कुठे मिळेल .कृपया मार्गदर्शन व्हावे .
मॅडम तहसील कार्यालयाती संकलननिहाय असलेले विषय आपल्याला मेल केले आहे.

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

Question by Shrikant Pisal
27-08-2014
shreekantpisal1@gmail.com

नमस्कार सर,
पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले
त्याबद्दल धन्यवाद.
पण सर आम्ही देवस्थान ईनाम खरेदी न
करता त्या जमीनीचा संपुर्ण मिराशी हक्क खरेदि केलेला आहे
जो त्या मालकाने
पुर्वी खरेदि केलेला होता तद्नंतर
तो मिराशी हक्क आम्ही खरेदि केला व
तरी माझा आपणास प्रश्न आहे की जर· प्रथम व्यक्ती दुसर्या व्यक्तीस हस्तांतर
करु शकतो तर दुसरा व्यक्ति तोच
मिराशी हक्क
तिसर्या व्यक्तिला का हस्तांतर होऊ
शकत नाहि?
नवीन भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी सद्या करता येईल का ? म्हणजे जे प्रस्ताव कलम ४ करनेवर प्रलंबित आहेत त्या प्रस्तावा मध्ये कलम ४ काढता येईल का?
आता कलम ४ खालील प्रारंभिक अधिसूचना काढता येणार नाही.
नवीन कायद्याखालील कलम ११ अन्वये अधिसूचना काढणे आवश्यक.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Ashok
27-08-2014
nikaleashok@yahoo.co.in

सर, कोर्ट सुलाहानामा आधारे तलाठी फेरफार नोंद घेऊ शकतो का? वरिष्ठा ची परवानगी लागते का?

Question by Ashok
27-08-2014
nikaleashok@yahoo.co.in

सर, कोर्ट सुलाहानामा आधारे तलाठी फेरफार नोंद घेऊ शकतो का? वरिष्ठा ची परवानगी लागते का?
सुलाहानामा हा court decree म्हणजेच तडजोड पत्र असेल तर मात्र cpc 54c नुसार जिल्हाधिकारी कडे पाठवण्याची आवशकता नही . तलाठी नोंद घेऊ शकतो.मात्र नोंदणी कायदा १९०८ नुसार विहित मुन्द्रंक शुल्क भरून घेणे आवश्क आहे.

Reply by श्री.कैलासचंद्र विठ्ठलराव वाघमारे | तहसीलदार

तलाठी अशी फेरफार नोंद सक्षम अधिकारी यांच्या आदेशाशिवाय करू शकत नाही .court decree order हि जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडे प्रेसिप्त सह पाठवण्यात येते.त्यानंतर जिल्हाधिकारी हे तहसीलदार यांना सदर court order ची अंमलबजाणी साठी पाठवण्यात येते (delagation ऑफ power ) .यावर RTS ६४ अंतर्गत प्रकरणावर कार्यवाही होऊन आदेश ज्याल्यानंतर फेरफार नोंद प्रमाणित होते

Reply by श्री.मोहन टिकले | नायब तहसीलदार

तहसील स्तरावर माहिती अधिकार , वसुली हे विषय कोणत्या विभागातील आहेत .कृपया मार्गदर्शन व्हावे
WBN व प्रस्तुत्कार १

Reply by श्री.मोहन टिकले | नायब तहसीलदार

गाव नमून १ मधे भोग्वातदार वर्गात किवा शेत्रात दुरुस्ती कोणाचे आदेशाने करता येते ?
१)भूमी अभिलेख विभाग मार्फत शेत्रात दुरुस्ती चा प्रस्ताव आल्यानंतर प्रांत अधिकारी वा SDO यांनी आदेश करावयाचा असतो
२) वर्ग १ जमीन बाबत आदेश प्रांत अधिकारी वा SDO यांनी आदेश करावयाचा असतो

Reply by श्री.मोहन टिकले | नायब तहसीलदार

कोर्ट डिग्री आधारे फेर नोंद घेताना warista महसुल अधिकारेंची परवानगी आवशक आहे का ?
कोर्ट डिग्री प्रकाराने सी. पी.सी. १९०६ कलम ५४ नुसार जिल्हाधिकारी यांचे कडे अपेक्षित आहे. (त्या बाबत जिल्हाधिकारी यांनी इतरांकडे प्रकरण वर केले ती बाब अलहिदा!) सदरचे प्रकरण सबंधित तहसीलदार यांचे कडे पाठवणे क्रम प्राप्त असते. तहसीलदार यांनी सदर प्रकरण आर .टी.एस.६४ खाली नोंदवून त्यामध्ये आदेश करावे. (बहुतांश प्रकाराने सबंधित ) ओ त्या आदेशानुसार तलाठी यांनी फेरफारची कार्यवाही करणे आवशक आहे.

Reply by व्ही. आर. थोरवे | नायब तहसीलदार

प्रकरणात जिल्हाधिकारी delegate करतात त्यानंतर रीतसर तहसीलदार वा naib तहसीलदार
यांनी प्रकरण चालवायचे असते

Reply by श्री.मोहन टिकले | नायब तहसीलदार

सर, मागील प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद.माझा प्रश्न असा आहे कि,मी सोलापूर जिल्हातील, करमाळा या तालुक्यातील रहिवाशी आहे.सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील online ७ /१२ पहावयास मिळतो पण करमाळा तालुक्याचा online ७ /१२ कितेक दिवसापासून पहावयास येता येत नाही.(http://solapur.gov.in/webrcis/aspx/saatbara.aspx )
आपल्या प्रश्नाविषयी निवासी उपजिल्हाधिकारी सोलापूर यांना विनंती केलेली आहे. आपण पण संपर्क साधावा.

Reply by MCS Maharashtra | इतर

फीझीकल पझेशन म्हणजे काय?

फक्त ७/१२ ला नाव म्हणजे फीझीकल पझेशन?
संपूर्ण माहिती देणे,
Physical possession म्हणजे ताबा. परंतु फक्त ताबा असणे म्हणजे मालकी Nvhe. आधी मालकी मग ताबा हे कायद्याचे तत्व ahe. म्हणून प्रत्यक्षात ताबा कुणाचाही असला तरी ७/१२ मधील मालकी रकान्यात कुणाचे नाव आहे हे महत्वाचे..!!

Reply by श्री.कैलासचंद्र विठ्ठलराव वाघमारे | तहसीलदार

प्रतक्ष ताब्यात असणे .प्रत्यक्ष जमीन कसने

Reply by श्री.मोहन टिकले | नायब तहसीलदार

सर प्रश्न १ १९३२ साला पूर्वीचा ७/१२ उतारा किंवा महसुली रेकॉर्ड कोणता होता व कोठे मिळेल
प्रश्न २ फेरफार पुस्तक हरवल्यास त्याचा दुसर्या ठिकाणी म्हणजे तहसील प्रांत कार्यालयात रेकॉर्ड असतो काय
प्रश्न ३ गावठाण जमिनीचा १९३२ साला अगोदर रेकॉर्ड होता काय
सर धन्यवाद
सावर्क्षित कुल म्हणून १९३२ ते १९५४ पर्यंतच्या ७/१२ नाव असताना परतू सदर कुलाचा फेरफार नोड नाही व १९३२ पासून खंड भरल्या नंतरही जमीन मालक १९४८ साली दुसर्या व्यक्तीस जमीन विकू शकतो काय

Question by tushar
23-08-2014
tsshewale@gmai.com

सर,
भोगवाटा वर्ग-१ च्या ८-अ वरिल "खालसा(सरकारी)"चा अर्थ काय?अश्या क्षेत्राची खरेदी घेता येते का?
सर प्रतिसादाबद्दल धन्यवाद,
तुम्ही सांगितल्याप्रमाणे
mahaonline च्या जिल्हा प्रतिनिधीने दर महिन्याला प्रत्येक तालुक्याकडून ७/१२ ची CD घेण्याची आहे. प्राप्त CD राज्य महोन्लीने ला देण्याची आहे.
mahaonline व NIC यांनी , ७/१२ अद्यावत ठेवन्याचे आहेत व website वर उपलब्ध करून देण्याचे आहेत. या बाबत शाषण निर्णय आहे.
कृपया तो शासन निर्णय किंवा त्याचा नंबर उपलब्ध करून द्यावा हि विनंती .

Question by Shrikant Pisal
22-08-2014
shreekantpisal1@gmail.com

My question sir,
1) sanrkashit kulach mirashi hakka transfer hou shakto?
2) vishestha to devastan inam class 3 cha?
अव्वल कारकून संवर्गात मी आक्टोंबर २००६ मध्ये उत्तीर्ण झालो आहे. व ६/१२/१९९३ मध्ये सेवेत रुजू झालो आहे. व माझी जन्मतारीख १६/७/१९६८ आहे. माझ्या बरोबर असलेले अ व ब हे अनुकमे आक्टोंबर २००६ मध्ये उत्तीर्ण झाले मात्र त्यांचा सेवेत रुजू झाल्याचे वर्ष हे जून १९९४ आहे. त्यांचा जन्मतारीख अनुकमे १९६७ आहेत. सेवाजेष्टाता यादीत अ, ब व त्यानंतर माझे नाव दिले आहे हे बरोबर आहे किवा कसे. वर्ष निहाय जेष्ठता करता सेवेत रुजू झाल्याचा १९९३ चा मी एकच कर्मचारी आहे त्यामुळे अव्वल कारकून संवर्गात जरी आम्ही आक्टोबर २००६ पास असलो तरी रुजू होण्याचा दिनक व वर्ष हे १९९३ नंतरचे आहे. तरी याबाबत माझे नाव अ व ब च्या पहिले यावयास पाहिजे हे बरोबर आहे किवा कसे असल्यास कृपया परिपत्रक सह कळवावे हि विनंती.
सर एखाद्या जमिनीचा खंड १९३२ साला पासून राम देत असल्यास जमीन मालक १९४८ साली सदर जमीन दुसर्या व्यक्तीला विकू शकतो काय
राम याचे नाव सौरीक्षित कुल म्हणून नोंदणे आवश्यक होते.
तथापि मिल्कातीस सौरीक्षित कुल म्हणून नाव लावणे बाबत आपण दावा दाखल करू शकता.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर जमिनीस १९३२ सालापासून राम हा खंड भरत असल्यास व दिनांक २०/५/१९५७ रोजी कुल म्हणून नोद असल्याल्स जमीन मालक सदर कुल नोद दिनांक २२/६/१९६२ रोजी कमी करून जमीन मालक दिनांक ०९/०८/१९६२ रोजी दुसर्या व्यक्तीस विकतो तर सदर कुल सदर जमिनीचा दावा करू शकते का
नाव कमी करण्याचे कारण काय होते? फेरफार वरून पहा.

नाव कमी केकेले बाबत अपील करणे हितावह.
मात्र झालेला विलंब याबाबत न्यायालयास समाधानकारक उत्तर देणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एखादया व्यक्ती कडून २०:०० आर बागायत जमिनीचे क्षेत्र कायम फारोक्ताची खरीदीने घेतलेले असेल व पूर्वी त्याच व्यक्तीकडून त्याच गटातील व सर्वे नंबर मधील एकूण क्षेत्र ८१:०० आर कायम फारोक्ताची खरीदीने घेतलेले असेल तर सबंधित २०:०० क्षेत्राचा स्वतंत्र ७/१२ उतारा कोणत्या शासन निर्णयाच्या,नियमाच्या,परिपत्रकाच्या अनुषंगाने मिळू शकतो.त्याची माहिती द्यावी
नमस्कार सर,
महाराष्ट्र भूमि अभिलेख (महाभुलेख) या ''websitevar'' शासनाने ''online 7/12'' उपलब्ध करून दिले आहेत . परंतु ते ''updated'' नाहीत ..त्यामुळे त्यांचा वापर करण्यात अडचणी येत आहेत .
१) यासंदर्भात कोणाशी संपर्क साधावा किंवा पत्रव्यवहार करता येईल का?
२) ७/१२ ''update'' करण्यासाठी सरकारने यंत्रणा ठेवली आहे का असेल तर ती कोणती ??
mahaonline च्या जिल्हा प्रतिनिधीने दर महिन्याला प्रत्येक तालुक्याकडून ७/१२ ची CD घेण्याची आहे. प्राप्त CD राज्य महोन्लीने ला देण्याची आहे.
mahaonline व NIC यांनी , ७/१२ अद्यावत ठेण्याचे आहेत व website वर उपलब्ध करून देण्याचे आहेत. या बाबत शाषण निर्णय आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझा प्रश्न असा आहे?

हैदराबाद कुळ कायदा १९५० नुसार.
१. विधवे महिलेच्या जमिनीला कुळ कायदा लागू आहे का ?
२. जर असेल तर, ज्या व्यक्तीच्या कुळ लागला आहे , त्याने जमीन जर जिल्हा अधिकारी यांच्या पूर्व परवानगी शिवाय विक्री केली असेल तर(शर्तभंग ) झाली असेल तर , मूळ मालकास जमीन परत मागण्याचा अधिकार आहे का ? व ते परत मिळू शके काय ?
विधवेच्या जमिनीला कुल कायदा लागू आहे. कृषक दिनी जर जमीन मालक विधवा असेल तर , विक्री किंमत ठरत नाही . विधवा मालक मयत झालेवर २ वर्षाचे आत कुळाने , विक्री किंमत निच्छित करून मिळण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे
जमीन मालक स्वतचे बिन शेती वापरासाठी अथवा स्वताला कसनेसाठी ,जमीन किंमत निश्चीत होणे पूर्वी जमीन परत मागू शकतो ( शर्तीची पूर्तता होत असेल तर , उदा. जमीन मागणी १९५६ पूर्वी केलेली आहे , मालकाकडे किफायतशीर क्षेत्र पेक्षा जादा क्षेत्र होत नाही)
जमीन जिल्हाधिकारी यांचे पूर्व परवानगीशिवाय विकली असेल तर, शर्थभंग झालेला आहे , जमीन शाषण जमा करणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मला माझ्या तहसीलदार संवर्गाची यादी कुठे मिळेल ?
अस्थापना शाखा , आयुक्त कार्यालय / अस्थापना, महसूल व वन विभाग

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

ठेव संलग्न विमा योजने अंतर्गत मंजूर झाले नंतर मृताच्या वारसास किती दिवसात त्याचा लाभ मिळणे अपेक्षित आहे.

This page was generated in 0.28 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3