जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by mohan
01-07-2014
mohansutar52@gmail.com
साहेब
इतर हक्कातील बहिणींचे नांव असेल तर सदर जमीन भूसंपादन झाल्यावर प्रकल्पग्रस्त दाखला
कडता येइल काय ? आणि त्याला
मंजूर रक्कम मदे हिस्सा किती असते .माहिती मिळावे विनंती .
इतर हक्कातील वारस व कब्जेदार सदरी वारस असे वारस नसतात. सर्व वारसांची नवे कब्जेदार सादरी असणे आवश्यक आहे.
बहिण हि हिंदू वारसा कायदा नुसार वडिलांची वर्ग १ वारसदार आहे. बहिणाला , भावा इतकाच वडिलांचे मिळकतीत हिस्सा आहे.
जमिनीचे संपादन होताना मिळकत वारसांचे नावावर asel तर , बहिनालाही प्रकल्प ग्रस्त दखल milane आवश्यक आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दया जाधव
30-06-2014
dayadutt13@gmail.com
सर ,
मला अधिकृतरीत्या बिगरशेती झालेल्या जमिनीमधील १/२ गुंठे इतकी जागा आणि त्यावर बांधलेले घर विकत घ्यायचे आहे. जागा आणि घर विकत घेतल्यानंतर त्याची नोंद ७/१२ उताऱ्यामध्ये माझ्या नावे होऊ शकते का? जर होत नसेल तर ७/१२ उताऱ्यात नाव येण्यासाठी काय करावे लागेल (सदर जागेवरील घराची नोंद नगरपरिषद मध्ये झालेली आहे.) कृपया मार्गदर्शन करावे … धन्यवाद .
अनधिक रित्या बिनशेती झालेल्या जमिनीचे विक्रीवर निर्म्बंध नाही. मात्र अनधिक रित्या बिन शेती व त्यावरील बांधकाम या मुळे होणारे परिणाम भोगण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे.
आपण बिगर परवानगी केलेली बिन शेती जागा नियामंकुल करता येयील . अर्ज करा जिल्हाधिकारी/प्रांताधिकारी.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रमेश kamble
28-06-2014
rameshkamble152@yahoo.in
लिपीक टंकलेखक संवर्गातील जेष्ठता यादी ही महसूल अर्हता परिक्षा ९ वर्षात३संधीमध्ये पास झाल्यास मुळ जेष्ठता अबाधीत राहते असा शासन निर्णय आहे मात्र काही जिल्हामध्ये विभागीय दुययम सेवा ४ वर्षात ३ संधीमध्ये उत्तीर्ण न झाल्याने मुळ जेष्ठता देण्यात आलेली नाही तरी जेष्ठता यादी ही महसूल अर्हता परिक्षेवर आहे की विभागीय दुययम सेवा परिक्षेवर कृपया मार्गदर्शन होणेस विनंती आहे.
कर्मचारी महसूल विभागात नियुक्त झाले वर , साधारपणे १ वर्षनंतरदुय्यम सेवा परीक्षेस बसू शकतो. ४ वर्षात कार्माच्र्याने तीन संधीत हि परीक्षा पास होणे आवश्यक आहे. मात्र त्याने ९ वर्षात तीन संधीत अहर्ता परीक्षा हि पास होणे आवश्यक आहे. जर एखादा कर्मचारी दुय्यम सेवा परीक्षा विहित मुदतीत पास झालेला आहे त्यास तो ज्या तारखेस सेवेत दाखल झालेला आहे ती त्याच्गी जेष्ठ तारीख निस्षित होते परंतु तो अहर्ता परीक्षा विहित वेळेत व संधीत पास न झालेस त्याची जेष्ट्था गमावतो व त्यो ज्या वेळेस अहर्ता परीक्षा पास होईल त्या वेळेस त्यास पास दिनाकाची जेष्ट्था तारीख मिळते . जर तो वयाचे ४५ वर्षापर्यंत अहर्ता परीक्षा पास झाला नाही तर त्यास
४५ वर्षे पूर्ण केलेमुळे सुट मिळाली असल्यास , सुट मिळायचा दिनाक हा जेष्ट्था दिनांक असतो.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by लतीफ
28-06-2014
latif.mujawar02@gmail.com
Sir aamche gat no. var aamche kaka yanche nawavar shetra 1-57-5 yevade hoty, va aamchya vadilanche nawe 1-57-5 yevade shetra lihile hoty. vadil nokari nimit bahir gavi hoty tyanche don varsha purvi nidhan zale tyancha varsane aamche nave 7/12 dakhal zali. aamchya kaka ne tyanche hishacha shetra paiki 1-00-0 shetra vekari keli. jamin vikari kartana vadilanchi samnti n gheta vavhar kela. Sadar jamini paiki bharipotichi jamin vikari keli aahe va halkya potiche jamin aamchya sathi thevali aahe. Ha kela vavhar kaydeshir hoto ka? Naslyas kay karave.
वडील व काकांचे नावावर प्रत्येकी १-५७-५ शेत्र होते कि एकत्र १-५७-५ शेत्र होते?
जर वडील व काकांचे नावावर प्रत्येकी १-५७-५ शेत्र असेल तर काकांना त्यांचे शेत्र विकण्याचा अधिकार आहे.
जर मिळकतीचे वाटप झाले नसते तर हिंदू वारसा कायदा कलम २२ प्रमाणे आपणास , काकांची वाटणीची जमीन खरेदी करण्याचा प्राथांम्याने अधिकार होता.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शिंदे MAHADEO JALINDAR
24-06-2014
shindedev74@gmail.com
Dear sir, shetkari aatmhatya babtit talathi yanchi kartayva kay aahet? 1-43 mudyancha ahwal koni sadar karava? sambandhitache bayan koni ghave ya babtit ....please margdarshan karave
Question by ganesh pingale
24-06-2014
ganeshpingale2014@redifmail.com
Q.No. 65 चे कृपया उत्तर लवकर द्यावे हि विनंती
या पूर्वीच उत्त्तर दिले आहे.
७\१२ शेत्र नमूद नाही मात्र इतर हक्कात वने असा उल्लेख आहे म्हणजे पूर्ण शेत्र वने आहे.
वनेतर काम करता येणार नाही.
परवानगी देत येणार नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by mahadeo dane
23-06-2014
mahadeodane444@gmail.com
सर
महसुल कर्मचारी यांना घराचे बांधकाम करायचे असल्यास वाळूसाठी राँयल्टीची गरज आहे का?
वाळू महसुल कर्मचार्याला मोफत मिळू शकते काय तसा G.R.असल्यास क्रुपया email वर send करा़
Question by प्रकाश dhumane
20-06-2014
prakashdhumane867@rediffmail.com
माझ्या भावाच्या नावाने २.०२ हेक्टर
जमीन आहे.त्यातील १ हेक्टर जमीन विकायची आहे.तालुका निर्ब्न्धक कार्यालय कळंब,जिल्हा यवतमाळ,येथे विचारणा केली असता त्यांनी ६ एकर पेक्षा कमी जमिनीची विक्री करता येत नाही असे सांगितले,कृपया मार्गदर्शन द्या.
यवतमाळ जिल्ह्यासाठी , standard area क्षेत्र तुकडे बंदी कायद्यासाठी किती आहे याची , भूमी अभिलेख खाते /तहसील कार्यलय यांचेकडून माहिती घ्या.
जर standard area क्षेत्र १.००.० हे पेक्षा जादा असल्यास १.००.० हे क्षेत्र विकत येणार नाही.
परंतु माझे मते standard area ( प्रमाणभूत क्षेत्र ) एवढे जादा असणार नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by pramod b dalvi
19-06-2014
boicrsocldt@gmail.com
aamhi 75 varshe vhivat karat asalelya jaget vihir padli sadar jagechi mojani aata keli asata ti dusaryachi asalyache kalale tya babat aata kay karayache ha prashana padala aahe tya babat margadarshan karave dhanyavad
ज्या दुसर्याची जागा आहे त्याचेबरोबर जागेची अडला बदल करणे श्याक्या आहे का ? हा पर्याय तपासा. अन्यथा त्या दुसर्या व्यक्तीवर अवलंबून आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विकास pawase
19-06-2014
vikaspawase8@gmail.com
sir,
our crop inspection case pending in tahsil office after hearing for result since last 2 years. is there any time limit to give decision on form no. 14 cases.
please guide.
नियमामध्ये प्रकरण किती दिवसात निर्नायीत करावे या बाबत मर्यादा दिलेले नाही. तथापि चौकशी पूर्ण झाले वर ८ सप्ताहात निर्णय देणे अपेक्षित.
महाराष्ट शासनाने अर्ध- न्यायिक प्रकरणाचा निकाल सुनान्वणी संपले नंतर ८ आठवड्यात द्यावा या बाबत , एका जनहित याचिकेचे अनुषंगाने परिपत्रक काढले आहे. ( २००८-२००९) .
पवार साहेब हि याचिका , रस्ता भाव दुकान सुनावणी संदभातील आहे. त्यामध्ये शासनाने अर्ध न्यायिक प्रकरण सुनावणी पद्धत विशद केली आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by किरण भरगुडे
18-06-2014
bkiru.4787@gmail.com
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २४७,२५७,२५८ याची सविस्तर माहिती मिळावी.
सर, माझी मिळकत मला मुंबई कुल कायदा १९४८ चे ३२ ग सर्टिफ़िकेट वरुन मिळाली आहे. परंतु माझे चुलत बंधू यांनी पूर्वी माझे विरुध तहसीलदार यांचेकडे अपील केले ते फेटाळले, त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांचेकडे कलम २४७ नुसार अपील केले ते मान्य केले त्यानंतर मी पुन्हा अप्पर जील्हधिकरि यांचेकडे अपील केले ते मान्य केले. पुन्हा माझे चुलत बंधू यांनी अप्पर आउक्त यांचेकडे अपील केले त्यामध्ये त्यांना स्टेटस को मिळाला पुन्हा माझे चुलत बंधू यांनी तहसीलदार यांचेकडे माझी झालोली नोंद रद्द करणेसाटि रिविजन केले व ते मान्य केले त्यावर मी मा. उपविभागीय अधिकारी यांचेकडे त्याविरुद्ध कलम २५७ कालि रिविजन केले ते मान्य करून तहसीलदार यांचेकडे कलम २५८ खाली फ़ेर्चोक्षिने निर्णय घेनेसटि पाट्विले व ते मान्य करून माझ्या नावाची सादर जमिनीला नोंद झाली आहे त्यावर माझेविरुद्ध मा. उपविभागीय अधिकारी यांचे कोर्टात पुन्हा माझे चुलत बंधू यांनी अपील केले आहे. तरी कृपया मला अशी माहिती हवी आहे कि प्रस्तुत केलेले अपील योग्य आहे का? व मी पुढे काय करू याचे मार्गदर्शन करा.
आपले चुलत बंधूने कोणत्या मुद्द्यावर उपविभागीय अधिकारी यांचेकडे अपील केलेले आहे?
३२ ग प्रक्रिये नंतर आपले नावे मिळकत झाली आहे त्यामुळे अप्पर आयुक्त यांचे कडे यांचेकडे दुसरे अपील कसे झाले ? अपिलाचा मुद्दा कोणता होता?
status - quo हा अंतिम आदेश नसतो तर तो अंतरिम ( तात्पुरता) आदेश असतो. त्यामुळे त्या आदेशाचे अनुषंगाने , चुलत भावाने तहसीलदार यांचेकडे तुमचे नाव कमी करण्याचा अर्ज कसा दाखल केला? अप्पर आयुक्त यांचे कडे दुसरे अपील चालू असताना , तहसीलदार चुलत भाऊ यांचा अर्ज दाखल करून घेऊ शकत नाहीत. त्यांनी तो अर्ज फेटाळणे आवश्यक होते.
आपले वादाचा तपशील थोडा विस्तृत मांडणे आवश्यक आहे.
एकदा एखादे प्रक्नावर निर्णय झाला असेल तर पुन्हा त्या मुन्द्यावर दावा/अपील दाखल करता येत नाही. दिवाणी प्रक्रिया संहितेत , त्यास res judicata हे तत्व म्हणतात . हे तत्व कदाचित या प्रकरणास ते लागू शकते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by कुणाल अंकुश जाधव
18-06-2014
mr.k1387@gmail.com
७/१२ च्या इतर हक्क सदरी वनेतर कामास बंदी असा शेर आहे. त्याचा खरेदीखत झालेला आहे. तर तो तलाठी यांना फेरफार मध्ये नोंद घेत येईल का ? व मंडळ अधिकारी यांनी काय करावे ?
फेरफार नोंद घेता येयील . मंडळ अधिकारी यांनी नोंद मंजूर करावी.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by mahesh
15-06-2014
mohansutar52@gmail.com
साहेब
इतर हक्कातील व्यक्तींचे भूसंपादन
पैसे मिळ्वणेसाठि नाहरकत समती पत्र
मा तहशिलदार यांचे समोर समती पत्र दिले आहे .मुळ समती पत्र हरवले आहे. तिचे झेरोक्स प्रत आहे. सदर झेरोक्स प्रत पैसे कडणे साठी सादर केला तर चालेले काय? करण समती करून दिलेले व्यक्तींचे मृय्तु झालेले आहे. झेरोक्स प्रत असलेने काय कराव सदर माहिती मिळावे ?
इतर हक्कातील वाक्तीचे नावे नुकसान भरपाई प्रथम निवाड्या मध्ये निश्हीत केलेली असणे आवश्यक आहे.
नुकसान भरपाई मिल्नेचा हक्क सोडून दिले बाबत , नोंदणीकृत सोडपत्र मुल प्रतीसह असणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by mohan
15-06-2014
mohanmsutar@gmail.vom
साहेब
आमचे आजोबा निरक्षर असलेने, त्यांचे लहान भाऊ ७/१२ उतार वाटणी करताना सदर त्यांचे ७/१२ उतार मदे इतर हक्कात बहिणींची नांव नोंद केलेले नाही.इतर हक्कातील बहिणींची नाव नोंद मोठे भावांचे ७/१२ मदे नोंद केले आहे, असे वाटणी करणेचे योग्य आहे का ? त्यासाठी आम्ही तक्रार करू शकतो का ? नियम सांगावे. विनंती.
आपण वाटणी कशी केली हे कळत नाही ...................वाटणी करताना जर कोणत्या गटात कोणते नाव ठेवावे हे नोंदणीकृत वाटप-पत्रात लिहिले असेल व तशी नवे असतील तर योग्ये आहे. ...अन्यथा तसे न करता फक्त एकाच भावाचे ७/१२ वर नाव ठेवले असेल तर ते नियमानुसार नाही.
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by mohan
15-06-2014
mohanmsutar@gmail.com
सर
माझे भाऊ न कळत दोन वेगवेगळे स .नं मिळुन एकच प्रकल्पग्रस्त दाखला काढण्यात आले आहे .सदर दाखल्यावरून नोकरी मिळाले .सदर दोन स,नं पैकी एक प्रकल्पग्रस्त दाखला वाटणी करून देणे शक्य नसल्याचे माहिती देणेत आले आहे. मग शानाने दोन स.नं मिळुन एक प्रकल्पग्रस्त दाखला कडण्यासाठी उपयोग केलेले आहे.सदर त्यांचे नोकरी उशीर लागल्याने दोन्ही स.नं फायदा व्हावा म्हणून हमी पत्रावर प्रकल्पग्रस्त आरक्षण कोट्यांतर्गत पदोन्नती मिळ्वनेसाठि अर्ज करता येईल काय ? माहिती द्यावे.
Question by नेमाडे किरण
14-06-2014
nemadeyk@gmail.com
मला शासना कडून मिळणाऱ्या स्वयं रोजगार कर्ज योजने ची माहित इथे मिळेल का? & त्यासाठी कुठे संपर्क साधावा
लागेल .
आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेलेल्या जिल्हा उद्योग केंद्रास भेट द्या.
तसेच प्रकल्प अधिकारी ग्रामीण विकास यंत्रणा यानाही भेटा.
जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांचे मार्फत अनेक स्वयं रोजगाराच्या योजना राबवल्या जातात.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ashok
14-06-2014
nikaleashok@yahoo.co.in
सर,७/१२ मधे वहिवाट सदरी ७ब तालुकेत सादर अशी नोद आहे.जमीनी विषयी दिवानी न्यायालयात तक्रारदार च्या बाजुने निकाल झाला असुन त्याने ७ब काढण्यास तहसिल येथे आर्ज केला आहे.तहसिल ने आर्ज तलाठी कडे पाढविला आहे.७ब तलाठी याना कमी करता येइल का? व कसे?
दिवाणी न्यायालयात , तक्रारदार यांची वहिवाट हि सिद्ध झाली असावी. ७ ब प्रमाणे ज्यांची नोंद आहे , त्यांची वहिवाट न्यायालयाने मान्य केलेली नाही.
मात्र कोर्ट निर्णयाप्रमाणे ७ ब मधील नाव काढता येणार नाही. प्रांत अधिकारी यांचे कडे अपील करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विनोद
13-06-2014
thorvevinod80@gmail.com
मला भंडारा येथून वर्धा जिल्यात नायब तहसीलदार पदावर बदली करायची आहे . वर्धा येथून भंडारा येथे येण्यास कोणी तयार असेल तर कुर्पया संपर्क करावा .
9403088520
Question by प्रमोद शिर्के
12-06-2014
psshirke14@gmail.com
सर मी मा. तहसीलदार यांच्याकडे महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम ८५ नुसार जमीन वाटपा बाबत अर्ज सदर केला आहे. तरी आपण मला खालील माहिती द्यावी हि विनंती.
१. तहसीलदार आदेश किती दिवसात देतात.
२. खर्च किती येतो.
वाटप आदेश किती दिवसात प्रारित करावा या बाबत कलम ८५ अथवा त्याखालील नियमामध्ये तरतूद नाही. मात्र तीन महिन्यात आदेश प्रारित केले जातात.
वाटप करताना मोजणी, सरस निरास वाटप भूमी अभिलेख विभागा मार्फत करावे लागते.
मोजणी फी हा खर्च यात अंतर्भूत आहे. m
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by mohan
12-06-2014
mohansutar52@gmail.com
साहेब.
अ या व्यक्तीचे ९९७ मदे भूसंपादन झालेले आहे सदर शेत
जमीन भूसंपादनाचे रक्कम मिलावानेसाठी इतर हक्कातील बहिणी तहशील karyaalayaamade १०० स्टंप पेपरवर हक्क
सोड पत्र न करता
भूसंपादन पैसे आमचे भावू यांना मिलावानेसाठी आमाचे काही तक्रार नाही म्हणून समती दिले.
सदर मुल प्रत हरवले असूनत्याचे झारोक्सा प्रत आहे
सदर झारोक्स प्रत रक्कम
कादान्यासाठी सादर kela तर चालेल ka? Aata समती दिलेले बहिणींचे मृत्यू झाले आहे.से
१९९७ साली संपादन झालेनंतर , खूप विलंब झालेला आहे.
आपणास , भाऊ यांचे विरुद्ध जमिनीची नुकसान भरपाई मिळणेबाबत दावा केला तर , कदाचित उपयोग होईल . आपणास न्यायालयात केवळ फसवून संमती पत्र वर सही घेतली हे सिद्ध करावे लागेल तरच , रक्कम मिळू शकते.
जरी नोंदणीकृत दस्ताद्वारे हक्क सोडला नसला तरी , भाऊ ला रक्कम देणे बाबत हरकत नसल्याचे लिहून दिले आहे, हे विसरून चालणार नाही .
विलंब माफिचाही प्रश्न आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश सुभाष माजेरकर
11-06-2014
mjrkrganesh@gmail.com
महोदय, आमच्या आजोबांच्या नावावरती म्हणजेच ग्रामपंचायत (नमुना नं. ८ ) असेंसमेन्टला असेलेले घर माझ्या लहान काकांनी माझे वडील व इतर दोन भावांच्या सही मारून वीस रूपयाच्या बाँडवरती २००४ ला ते संमतीपत्र तत्कालीन सरंपच यांना साक्षीदार वा समक्ष ठेवून ग्रामपंचायत मध्ये सादर केले. त्यानंतर ग्रामपंचातीने ते घर वा घर क्र. वा असेंसमेंन्टला लहान काकांचे नाव लावण्याचे ठराव केला.
तर साहेब मला आपल्याकडे विनंती करतो की, मला पडलेले प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करावे. १) संमती करणारे दोन भाऊ निधन झालेले आहेत, त्यापैकी एक भाऊ जिवंत आहेत. जिवंत असणारे माझे काका यांचेही म्हणणे असे आहे की अशी सही आम्ही केली नाही. तर मला आमचे रहाते घर पुन्हा माझ्या आजोबांच्या नावे कसे होईल कींवा त्यांच्या सर्व मुलाचे नावे कसे लागतील याचा सल्ला द्यावा. आणि त्याच बरोबर असेंसेमेंन्ट ला नाव लावण्यासाठी कायदेशीर प्रकीया सांगावी. वीस रूपयाच्या बाँन्डवरती केलेली वरील योग्य आहे का. नसेल तर आपण कायदेशीर प्रकीया सांगावी. ही विनंती
तसद्दी बद्ल क्षमस्व
२०/- रुपयाचे stamp paper वर समंती घेऊन मिळकतीमधील हक्क सोडता येत नाही. त्या साठी नोंदणीकृत दस्त करावा लागतो.
आपण या विरुद्ध गट विकास अधिकारी यांचे कडे अपील करावे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राहुल ग. सावंत
11-06-2014
rahul9619309796@gmail.com
सर आपण माज्या प्रश्नाचे उतर दिल्या बदल धन्यवाद पण सर आपल्या दि .७/०६/२०१४ च्या खुल्यासा बाबत प्रांत साहेबांकडे वारस तपासणीबाबत विलंबा बाबतचा आपला खुलासा सविस्तर सांगण्याची मी विनंती करीत आहे
Question by रोहन
10-06-2014
143hasislovemail143@gmail.com
नमस्कार सर, माझा प्रेश्न असा अहे. कि. माझ्या वडीलांच्या नावे जमीन अाहे तिच्या खटला चालु आहे प्रांत साहेबानी आपील कर्ता यांचे बाजुने निकाल दिला होता त्या नंतर आम्ही त्या निकालावर स्टे आनला व जिल्ह्याचा ठीकणी आपिल केली व ती मंजुर ही झाली त्या नंतर त्या ठीकाणी 2 तारखा झाल्या पण आता प्रांत कार्यालयातुन आॅर्डर होवुन ७/१२ वरील नोंदी रद्द करुन मुळ मालकाचे नावे करण्यात आले. जर कलेक्टर साहेबांचा आदेश स्टे चा असतांना असे होते का? कृपया मार्गदर्शन करावे.
Question by सुधाकर येसाजी दांडगे
10-06-2014
sydandge1@gmail.com
सद्या मी महसुल विभागाअंतर्गत पुरवठा विभागात विभागीय गोदाम निरिक्षक या पदावर कार्यरत आहे. मला पूढील पदोन्नती तांञिक अधिकारी या पदाची आहे. पूढील पदोन्नतीसाठी कार्यरत पदावर कमीत कमी तिन वर्ष होणे आवश्यक आहे, असा नियम आहे. मला विभागीय गोदाम निरिक्षक या पदावर दोन वर्ष पूर्ण झालेली आहेत. माञ याच विभागात या पदापूर्वी मी पुरवठा निरिक्षक या पदावर तिन वर्ष कार्यरत होते. सदरील पद देखील विभागीय गोदाम निरिक्षक या पदाच्या समकक्ष पद आहे. दोन्ही पदाचा कालावधी माझा एकूण ५ वर्षाचा होतो. तांञिक अधिकारी या पदासाठी हापुर ट्रेनिंग बंधनकारक आहे. जेष्टता यादीनूसार हापूर ट्रेनिंग झालेले महाराष्ट्रात एकूण ७ उमेदवार आहेत, एकूण ७ जागा पदोन्नतीने भरणे आहे, अशी माहिती मिळाली आहे. तरी मला पूढील पदोन्नतीसाठी संधी मिळेल किंवा नाही. कृपया सविस्तर माहिती देण्यांत यावी.
आपणास निश्चित पद्दोनति मिळेल.
पुरवठा विभागात महसूल विभागापेक्षा पद्दोनतिच्या संधी जादा आहेत .
पुरवठा विभागाच्या मंत्रालयीन अस्थापना विभागाशी चर्चा करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुहास ajmire
09-06-2014
suhasajmire@gmail.com
resp sir this is suhas ajmire wants to ask one que , my mother plus her 4 brothers belongs a land in amravati district . and according to maharashtra land revenue code 1966. section 150 (2)has taken my mother signature at our living place in yavatmal district.they pressurised my mother to make signature.(in matathi hakka sodane).but as i know. hakka sod lekh patrak has been done register office on stamp paper with proper legal documents. so can i put a court case against them so that my mother wiil be 1/5 owener of the belongings property. ple give me suggestion thank u urs faithfully suhas ajmire
आता नोंदणीकृत हक्कासोड पत्रक खोटे ठरवणे अवघड ( अशक्य नाही ) आहे ..............आता फक्त दिवाणी कोर्ट हाच पर्याय आहे
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
