जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Rahul Tupe
23-08-2020
tuperahul87@gmail.com

आम्ही गाव मौजे चांदिवली येथे दिनांक 12/12/20005 रोजी सर्व्हे न. 42/11 व 42/13 या मिळकती खरेदी केल्या त्यापैकी 1) सर्व्हे नं. 42/11 मध्ये खरेदीखतावेळी इतर अधिकारात कोणताही शेरा नव्हता. 2) सर्व्हे नं. 42/13 मध्ये खरेदीखतावेळी इतर अधिकारात महाराष्ट्र खाजगी वन (संपादन) कायदा 1975 चे कलम 22 अन्वये सेक्शन 35 मधून वगळन्यात आला असा शेरा होता. सदर खरेदीखताची नोंद करण्यापूर्वी सदर सर्व्हे न. 42/11 व 42/13 या मिळकतीच्या 7/12 च्या इतर अधिकारात नंतर वन संवर्धन अधिनियम १९८० च्या तरतुदीस पात्र असा शेरा आला. तरी माझा प्रश्न असा आहे कि सदर खरेदीखताची नोंद होऊन आमचे नाव मालक कब्जेदार सदरी दाखल होईल का?
आमच्या गावाचे सरपंच यांनी शासनाची गायरान जमीन ही ग्रामपंचायत च्या नमुना 8 रजिस्टर ला लावलेली आहे.माझ्या निदर्शनास आल्यावर मी तक्रार अर्ज परभणी जिल्हाधिकारी यांना दिला आहे हे सरपंच यांना समजताच त्यांनी मासिक मीटिंग घेवून ती जागा रद्द केली आहे. त्यांना शासकीय जमीन लावण्याचा अधिकार आहे का.आणि त्यांनी पदाचा दुरुपयोग केला तर त्यांचे पद रद्द होते जा
सर नमस्कार '
मूळ मालकाने जमीन एन ए केल्यावर रहिवास प्रयोजनासाठी परवानगी मिळाल्यानंतर प्लॉट पडल्यानंतर मुळ मालकाचा मोकळ्या खुल्या भूखंडावर त्याचा अधिकार असतो काय ?एखादया सेवाभावी शैक्षणिक संस्थेस ग्रामपंचायतीला खुल्या भूखंडा बाबत ताबा पावती करून देण्याचा अधिकार असतो का ? याबाबत कृपया मार्गदर्शन करावे .
सर नमस्कार,
माझा प्रश्न असा आहे की, जमीन क्षेत्र 10 गुंठे असे सामाईक क्षेत्र आहे त्या पैकी एक जणाचा हिस्सा खरेदीखत झाले आहे तरी त्याची तलाठी व सर्कल 7/12 व फेरफार नोंदणीसाठी काय उपाययोजना करावी??

Question by Shubham mane
19-08-2020
manes9443@gmail.com

नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की माझे वडील व माझे चुलते यांची जमीन ही खातेफोड न झाल्यामुळे सरकार जमा झाली आहे ते परत मिळवण्यासाठी काय करावे लागेल

Question by Shubham mane
19-08-2020
manes9443@gmail.com

नमस्कार सर माझा असा प्रश्न आहे की की माझे वडील व माझे चुलते यांची जमीन खातेफोड न झाल्यामुळे सरकार जमा झाली आहे ती परत मिळवण्यासाठी काय करावे लागेल

Question by Amol
19-08-2020
amolsalunkhe@rediffmail.com

आमची कोरेगांव तालुक्यात शेती आहे. शेतीचा online 7/12 पहात असताना त्यावर " या 7/12 वर शेवटचा फेरफार 3715 हा प्रमाणित झाला असून मंडळ अधिकारी यांनी 7/12 वर योग्यरित्या अंमल झाला आहे याचे confirmation करणे बाकी आहे याची नोंद घ्यावी” असा मजकूर येत आहे, परंतू सदर 3715 या फेरफारची नोटीस 'आपली चावडी' या संकेत स्थळावर आजतागायत प्रसिद्ध झालेली नाही (त्याच्या मागच्या पुढच्या फेरफार नंबरच्या नोटीशी प्रसिद्ध झालेल्या आहेत) त्याबाबत तलाठी यांना विचारले असता तो रेकॉर्ड दुरुस्तीचा फेरफार आहे.असे मोगम उत्तर दिले आहे. परंतू याबाबत आम्हाला शंका वाटते.
याबाबत काय करावे लागेल ? कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
नमस्कर सर ,
अमच्या जमिनिचे वाटनीपत्र २०११मध्ये झाले आहे. पण उतय्रावर त्याची नोंद नाहि . ती नोंद करन्यासाठी कय करावे ? .
आपले वाटप पत्र जर नोंदणीकृत असेल, तर ते आपल्या गावच्या तलाटी महोदयांच्या कडे सातबारा ला अंमल घेण्यासाठी सादर करा. जर वाटप पत्र हे दिवाणी न्यायालय मार्फत झालेले असेल, तर त्याच अंतिम हुकूमनामा मुद्रांकित करून घ्या व मुद्रांकित झालेला हुकूमनामा तलाठी यांच्याकडे सादर करा. जर वाटत हे मेहरबान तसीलदार साहेब यांच्यामार्फत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये झालेले असेल, तर तो आदेश मेहेरबान तलाठी साहेब यांच्याकडे सातबारा ला अंमल घेण्यासाठी सादर करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, नमस्कार,
मी सुजित बबन सुपेकर, राहणार केडगाव ता. दौंड, जि.पुणे. मी 2016 साली 4 एकर शेतजमीन खरेदी केली आहे. सदर जमिन हि पानशेत धरण ग्रस्त साठी संपादन झाली होती. मूळ मालक यानी सदर भोगवटा शासकीय नियमा नुसार सर्व कागद पत्रांची पूर्तता करुन वर्ग 1 करुन आम्हाला खरेदी खत करुन दिले आहे. 1982 साली सदर व्यक्तीचा आई ने या जमिनीचे 20 रु चा स्टंप पेपर वर कुलमुखत्यार व गहाण खत करुन शेजारील शेतकर्याला दिले होते त्यावर 50 वर्ष मुदत आहे..फक्त नोटरी आहे.सदर व्यक्तीची आई व तो शेतकरी 1998 व 2000 साली मयत आहेत. सदर जमिनीचा कागदोपत्री मला ताबा आहे, परंतू प्रत्यक्षात मात्र ताबा नाही, मी बरेच प्रयत्न केले गाव पातळी ला तसेच मी शासकीय मोजणी पोलिस बन्दोबस्त घेउन केली आहे..क प्रत मिळालेली आहे, पुनर्वसन चे 1972 साल चे जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचे नकाशे उपलब्ध असुन हि मला जमिनीचा ताबा मिळत नाही...मी ज्यांचा कडून खरेदी केली आहे ती व्यक्ती सुद्धा मयत झालेली आहे... 7/12 ला माझा नावाची नोंद आहे, मी पिक कर्ज सुध्हा वापरत आहे..शेजारील शेतकर्यचा घरातील मुले, नातवन्ड़े या जमिनीशी काहीही संबंध नसताना, त्यांचाकडे काहीही कागदपत्रे नसताना तिथे येण्यापासून मज्जाव करत आहेत... पोलिस स्टेशन ला बर्याच तक्रारी नोंद दिल्या आहेत तरी सुद्धा काहीही होत नाही.. तरी सदर जमिनिवर ताबा घेण्यासाठी मी कोणत्या पद्धतीने जावे या बद्दल मार्ग दर्शन करावे हि नम्र विनंती..

माझा मो. नं 9970239087/ 9834845589 हा आहे, तसेच email I'd: sujitbsupekar@gmail.com हा आहे..
मी गेली 5 वर्ष प्रयत्न करुन थकलो आहे..तुमचे मार्गदर्शन खुप मोलाचे राहिल सर..
सुपेकर साहेब, या माध्यमातून आम्ही फोनद्वारे आपल्या विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत नाही. जी माहिती आमच्याकडे आहे की आपणाला आम्ही देण्याचा प्रयत्न याच माध्यमाद्वारे करत असतो.

महाराष्ट्र मुन्द्रांक अधिनियम १९५८ च्या कलम ३४ अन्वये , कोणत्याही दस्तावर यौग्य व यथोचित मुन्द्रांक शुल्क जमा केले नसेल तर , असा दस्त पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाऊ शकत नाही . गहाण खत व कुल मुखत्यार पत्र नोटरी समोर केलेले आहे . अश्या दस्तास पुरावा म्हणून वापर करता येऊ शकत नाही . त्यामुळे तो शेतकरी या जमिनीचा मालक होत नाही .
आपण हि जमीन नोंदणीकृत दस्ताद्वारे खरेदी केली असेल तर , विनिर्दिष्ट अनुतोष अधिनियम १९६३ च्या कलम ५ अन्वये व दिवाणी संहिता अधिनियम अंतर्गत आपणास मालक म्हणून घोषित करणे व त्याद्वारे मिळकतीचा ताबा देण्या बाबत दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा .
मात्र ज्या पुनर्वसन कायदा खालील हि जमीन आहे त्यासाठी आवश्यक त्या परवानगी घेतलेल्या असणे आवश्यक आहे . मात्र त्यामुळे दावा दाखल करणे व त्या द्वारे मालकी घोषित करून , ताबा मिळवण्यासाठी अडचण येणार नाही मात्र , पुनर्वसन कायद्याच्या विरुद्ध व्यवहार असल्यास , तो नियामानुकुल करून घेणे हि नन्तर आवश्यक ठरेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझ्या जमिनी पैकी दोन गुंठे क्षेत्र 7/12 वर समाईक दाखवते पण मी सरकारी मोजणी केली आहे त्यात पण एक गुंठे क्षेत्र दाखवले व फाळणी नकाशात पण एक गुंठे दाखवते समोरच्या व्यक्ती ते क्षेत्र मला देत नाही मी काय करू
आपण आपल्या जागेची मोजणी केली आहे . त्याप्रमाणे भूमी अभिलेख खाते यांना , हद्दी निच्छित करून देण्याबाबत विंनती करा . त्यांनी हद्दी दाखवून देल्यावर , नक्की आपली जागा त्यांचे ताब्यात आहे हे कळून येईल . त्या नन्तर त्यांना ताबा देण्यास सांगा . नाही दिला तर न्यायालयात ताबा मिळणे बाबत दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर,,,माझ्या पूर्वेकडील ग न 1113ची विक्री झाली असूनते 94 अधिक 2 गुंठे पोट खराबा सह विक्री केला आहे परंतु ती जमीन मोजणीमध्ये जास्त भरली (6 गुंठे) सदर जमीन हि खरेदीदारने अकृषक करून त्यात प्लॉट पाडले व अतिरिक्त 6 गुंठे मध्ये विक्री करणाऱ्या मालकाने अतिक्रमण केले आहे व जाण्या येण्यास रस्ता नाही आहे, तरी काय करावे
अतिरिक्त जागा हि मंजूर अभिन्यासाचा भाग आहे का ? असल्यास त्या अभिन्यासामध्ये जे रस्ते दाखवलेले असतात ते , स्थानिक स्वराज्य संस्थेकडे निहित होतात व ते सर्वांसाठी खुले असतात . त्या रस्त्यांचा वापर करा .
जी जागा अतिरिक्त आहे ती कोणाच्या माल्कीचीमाल्कीची आहे ते सिद्ध करणे आवश्यक . त्या नन्तर त्याचा ताबा मागणे न्यायालयामार्फत आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, जमीन खरेदी दस्त झाल्यावर त्या खरेदी दस्ताचा रद्द लेख करता येतो का.सर
होय करता येतो . मात्र पुन्हा तेवढेच मुन्द्रांक शुल्क किंवा त्यापेक्षा जादाचे भरावे लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आम्हाला आमच्या घरापुढची जागा(21×33) अंगण आहे तर ते आम्हाला आमच्या नावे नोंद होण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत ला रितशीर अर्ज केला पण त्यांनी नामंजूर केला त्यासाठी आम्ही पुढे काय केले पाहिजे म्हणजे ग्रामपंचायत ला त्याची नोंद घ्यावी लागेल काहीतरी उपाय सांगा ..पुढे आम्ही कुठे जाऊन अर्ज करू की त्यामुळे ग्रामपंचायत त्याची नोंद घेईल...काहितरी पर्याय किंवा उपाय सांगा
महाराष्ट्र पंचायत कायदा 1958 च्या कलम 55 अन्वये, ग्रामपंचायतीकडे निहीत झालेल्या मिळकतींची विल्हेवाट लावण्याचा पूर्ण अधिकार हा केवळ त्या ग्रामपंचायतीस आहे. ग्रामपंचायतीने एखादी मालमत्ता खाजगी व्यक्तीस हस्तांतरीत किंवा भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय घेतल्यास, त्याला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संमतीची आवश्यकता असते. \
आपल्या प्रकरणांमध्ये सुरुवातीलाच ग्रामपंचायतीने आपल्या घरापुढील अंगण हस्तांतरित करण्यासाठी / आपले नावावर करण्यासाठी संमती दिलेली नाही .जागा देणे अथवा न देणे , पंच्यातीचा पूर्ण अधिकार आहे . आपण काहीही करू शकत नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या वडिलांकडून २००७ साली ४०आर क्षेत्राची विसार पावती करुन घेतली होती.विसार पावती रजिस्टर नाही.विसार म्हणुन काही रक्कम चेक ने दिली होती.त्यावेळी वडिलांनी विसार पावतीची मागणी केली असता उद्या देतो म्हणून सांगितले व नंतर वेळोवेळी मागणी करूनही विसार पावती दाखवली अथवा दिली नाही व व्यवहार ही पूर्ण केला नाही.अाम्ही २००८ मधे जाहीर पेपर नोटीस काढून व त्यालाही वैयक्तिक नोटीस पाठवून व्यवहार रद्द करत अाहोत असे म्हटले.त्याला त्याचे काहीही उत्तर आले नाही.त्याने AUG २०२० मध्ये अाम्हाला नोटीस पाठवून तुम्ही मोजणी व कंपाऊण्ड घालून नाही दिले,सातबारावरचा बोजा कमी करुन दिला नाही म्हणून व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही तरी या गोष्टींची पूर्तता करुन द्या व व्यवहार पूर्ण करायला तयार आहे असे म्हणतोय.अाम्हाला आता जमीन विकायची नाही व त्याचा विसार म्हणून घेतलेली रक्कम ही द्यायची तयारी नाही, तरी यात काय होऊ शकते..
आपले प्रश्नावरून आपल्या वडिलांनी त्यांच्या मालकीचे क्षेत्र काही रक्कम स्वीकारून दुसऱ्या व्यक्तीला विकलेले आहे. जे क्षेत्र वि केलेले आहे त्या क्षेत्राचा ताबा हा त्या व्यक्तीकडेच असल्याची दिसून येते. ईसार पावती ने आपण क्षेत्र विकले आहे असे नमूद करत आहात व काही रक्कम ही धनादेशाद्वारे ही दिली असल्याचे आपण नमूद केलेले आहे. प्रश्न असा आहे की या विसार पावती वर अथवा ईसार पावती वर, वडिलांच्या मालकीचे क्षेत्र त्यांना विकण्या बाबत चा मजकूर नमूद केलेला आहे का ?
असा मजकूर असल्यास , ती व्यक्ती विनिदिर्ष्ट अनुतोष कायदा १९६३ च्या कलम १० अन्वये , इसार पावती आधारे , जमीन विक्री करून मिळणे बाबत , न्यायालयात दावा दाखला करू शकते . न्यायालय आपणास या जमिनीचे विक्री खात करून देण्यास फर्माऊ शकते .
तसेच ताबा दिला असल्यास , मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२ , कलम ५३ अ अन्वये आपणाला या मिळकतीत फारसा हक्क राहत नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by omprakash
15-08-2020
computerom94@gmail.com

1) पुंडलीक सिताराम सराफ (मयत) 2) ज्ञानेश्वर सिताराम सराफ 3) हरिहर सिताराम सराफ 4) रामकृष्ण सिताराम सराफ 5)गणेश सिताराम सराफ

ग.भा. व्दारकाबाई पुंडलीक सराफ वरील अर्जदार लक्ष्मण बापुजी सराफ यांचे वारस असुन हे सर्व 32 वर्षापासुन ते आजपर्यंत वाहीतदार आहेत तसेच खरे मालक आहेत गिरजाबाई ही गंधर्वाची पत्नी असुन हीचा आणि लक्ष्मण बापुजी सराफ 1) सदाशिव लक्ष्मण सराफ 2) सिताराम लक्ष्मण सराफ 3) नामदेव लक्ष्मण सराफ लक्ष्मण बापुजी सराफ यांनी सिताराम आणि नामदेव यांचा सांभाळ करण्यासाठी गिरजाबाई हिच्याशी गंधर्व विवाह केला आणि तिच्या अन्न, वस्त्रा करीता शेत सर्व्हे नं. 140 यामधील पुर्वेकडील 6 एकर शेताचे 30/03/1932 रोजी व्यवस्थापत्र केले. जुलै 1932 मध्ये त्यांच्या इस्टेटची तोडी वाटणी केली त्यामध्ये सर्वे नं. 140 मधील पुर्वेकडील 12 एकर शेती सिताराम यांच्या हिश्यावर दिले. सिताराम यांच्या हिशातील 6 एकर शेतीचे 30/03/1932 रोजी व्यवस्थापत्र केले. त्यानुसार गिरजाबाई जिवंत असे पर्यंत त्या शेताचा उपभोग घेऊ शकत होती. त्यानंतर ही शेती सिताराम याला मिळणार होती. परंतु गिरजाबाई हि सिताराम व नामदेव यांना चांगल्या प्रकारे वागवीत नव्हती त्यामुळे गिरजाबाई करीता केलेले व्यवस्थापत्र दि. / /1933 मध्ये रद्द केले. आणि 1935 मध्ये लेखी वाटणी पत्र करुन रजिस्टर केले. पण ही गोष्ट सिताराम ह्याला माहिती नव्हती. त्यानंतर 20/10/1973 मध्ये सिताराम ह्यांचा मृत्यु झाला. पण शेती गिराजाबाई ल. सराफ (गधर्वाची पत्नी) हिच्या ताब्यात होते व त्या शेताचा ति उपभोग घेत होती. पुढे गिरजाबाई हिने हे 90 रुपयात बँकेकडे (सोसायटी) सदर शेत गहान ठेवले. त्या कर्जाच्या परतफेडी करीता शेताची हर्रासी करण्याचा घाट सोसायटीने रचला. तेव्हा सिताराम यांचा मोठा मुलगा पुडंलीक सिताराम सराफ व इतर चार भावंडे यांनी मा. दिवाणी न्यायालयात वाटणी पत्र व व्यवस्थापत्राच्या आधारे मुकदमा दाखल केला. परंतु व्यवस्थापत्र रद्द झाले असल्याचे पुंडलीक सिताराम सराफ ह्यांना माहीत नसल्या कारणामुळे व्यवस्थापत्रानुसार न्यायालयाने ह्या शेताचे कर्जाचे पैसे पुंंडलीक याने भरावे व गिरजाबाई हीने यांनतर सदर शेत गहान ठेवणे, विकणे, बक्षिस देणे याचा अधिकार गिरजाबाई कडून काढून घेतला व पुंडलीक सि. सराफ ह्याच्या बाजुने प्रकरण खारीज करण्यात आले. (कारण गिरजा ल. सराफ (गधर्वाची पत्नी) जिवंत होती.) तिच्या मृत्युनंतर तिन दिवसांनी सदर शेतावर सिताराम ल. सराफ यांची मुले पुंडलीक सि. सराफ व इतर चार भावंडे यांनी 1980 मध्ये ताबा घेतला. (तेव्हापासुन आज पर्यंत सिताराम ल. सराफ यांची मुले 1)पुंडलीक सि. सराफ 2) ज्ञानेश्वर सि. सराफ 3) हरीहर सि. सराफ 4) रामकृष्ण सि. सराफ 5) गणेश सिताराम सराफ) वाहीती करीत आहेत.) त्यानंतर पुंडलीक सि. सराफ यांनी गिरजाबाई ल. सराफ हिच्या मृत्यु दाखला संबंधीत कार्यालयात जमा करुन फेरफारीचा अर्ज दाखल केला. त्यानुसार फेरफार केली. व सिताराम ल. सराफ यांचे वारसांची नावे 7/12 वर चढवण्यात आली. परंतु शासनाच्या भोंगळ कारभारामुळे सिताराम सराफ यांच्या वारसांच्या नावावर काट मारुन कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता तसेच गिताबाई हिचा कोणत्याही प्रकाराचा फेरफारी संदर्भात अर्ज नसतांना तसेच ह्या शेतीसी काहीही संबध नसणाऱ्या गिताबाई नामदेव अंबाळे हिचे नाव 7/12 वर चढवण्यात आले. हे नाव पाहुन पुंडलीक सिताराम सराफ ह्यांनी लगेच संबंधीतांना फेरफार मध्ये झालेल्या चुकी दुरुस्त करण्यासाठी विनंती अर्ज केले. परंतु संबंधीत तहसीलदारांनी हेतुपुरस्कर पणे त्यांचे अर्ज फेटाळून लावले. पुंडलीक सि. सराफ यांनी मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे सुध्दा विनंती अर्ज केला. परंतु नायब तहसीलदार यांच्या कडून पत्राचे उलट असे उत्तर आले की, आपला संबंध दुरचा आहे. गिरजा लक्ष्मण सराफ (गंधर्वाची पत्नी) हिची मुलगी गिता नामदेव अंबाळे हिच वारस आहे. आणि 7/12 वर गिताबाई नामदेव अंबाळे हिचे नाव पडले. परंतु सदरहु शेती पुंडलीक सि. सराफ, ज्ञानेश्वर सि.सराफ, हरीहर सि.सराफ,रामकृष्ण सि. सराफ, गणेश सिताराम सराफ हेच वाहीती करीत होते. गीताबाई नामदेव अंबाळे हिचे 7/12 वरील नाव काढण्याचे बरेचदा पुंडलीक सि. सराफ यांनी विनंती अर्ज सादर केले. परंतु कोणीही त्यांच्या विनंती अर्जाचा विचार केला नाही. नंतर सन 2005 मध्ये गिताबाई नामदेव अंबाळे हिचा मृत्यु झाला. तेव्हा सुध्दा पुंडलीक सराफ यांनी विनंती अर्ज केला. परंतु काहीही उपयोग झाला नाही. आणि 2006 मध्ये पुंडलीक सिताराम सराफ यांचा मृत्यु झाला. त्यांनंतर त्यांची पत्नी व्दारकाबाई पुं. सराफ यांनीही प्रयत्न सुरुच ठेवले. 2008 मध्ये गिताबाई नामदेव अंबाळे हिची मुलगी कुसुमबाई बाळकृष्ण मेहेर हीचे नाव 7/12 वर शासनाच्या कर्मचाऱ्यांना चिरीमीरी देऊन चढवीण्यात आले. त्यांनतर व्दारकाबाई पुंडलीक सराफ व इतर चार जणांनी मा. तहसिलदार मुर्तिजापूर यांना फेरफार रद्द करण्याचा अर्ज केला. त्यांनी सुध्दा केलेल्या अर्जाचा पुर्णपणे विचार न करता सदर फेरफार मध्ये बदल करण्याचे प्रकरण आमच्या आखत्यारीत येत नाही. तसा आम्हाला अधिकार नाही असे पत्रच मा. नायब तहसिलदार यांनी दिले. आता कुसुमबाई बाळकृष्ण मेहर हिने सदर शेत विकण्याचा घाट रचला आहे.

त्यानंतर प्रविण सराफ याने पुंडलीक सिताराम सराफ व इतर चार जणांनी दाखल केलेला 1974 चा मुकदमा वाचला आणि जिल्हा सत्र न्यायालय अकोला येथुन पुर्ण मुकदम्याचे निशानी असलेले दस्ताऐवज आणले. विशेष म्हणजे आजही मौजे हिरपूर येथील शेत.स. न. 140 गट क्र. 365 हे शेत सिताराम लक्ष्मण सराफ यांची पाचही मुले 1) पुंडलीक सिताराम सराफ (मयत 2006) नंतर व्दारकाबाई पु. सराफ(मयत 2017) नंतर मंदा दिलीप आमले (पुंडलीक सराफ यांची मुलगी) 2) ज्ञानेश्वर सिताराम सराफ 3) हरीहर सिताराम सराफ 4) रामकृष्ण सिताराम सराफ 5) गणेश सिताराम सराफ हेच सदर शेती वाहती करीत आहेत. तसा पुरावा त्यांच्या कडे उपलब्ध आहे.

Question by Rahul Tupe
15-08-2020
tuperahul87@gmail.com

आम्ही सन 1940 पासुन देवस्थानाची जागा खंडाने करत होतो. तदनंतर सदर जागा आम्ही देवस्थानाकडून सन 1965 साली खरेदी घेतली सदर खरेदीखतास आवश्यक त्या सर्व शासकीय परवानग्या त्यावेळी घेतल्या होत्या. सदर खरेदीखताची नोंदीचा फेरफार मंजूर झाला परंतु 7/12 उताऱ्यावर आमचे नाव आले नाही. तहसीरदारांकडे अर्ज रिजेक्ट झाला सदर केस मध्ये काय करावे लागेल इतर अधिकारात नावाची नोंद आहे संरक्षित कुळ म्हणून दुसऱ्या व्यक्तीची नोंद आहे. सदर व्यक्ती(संरक्षित कुळ) व आमचे आजोबा वर नमूद केलेल्या खरेदीखत मध्ये खरेदी घेणार आहे.
The Exemptions from Land-Revenue (No. 1) Act, 1863, Bombay Act No. 2 of 1863 च्या नियम ८(३) नुसार , देवस्थान जमीन हस्तांतरित करता येऊ शकत नाही . त्यामुळे आपले नावे ३२ग़किंमत निच्छित होणार नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर, माझ्या वडील आणि आजीच्या नावे शेती (एकाच 7 बारा वर नावे आहे )आहे. आजीची मयत झालेली आहे. आजीला तीन मुली आहे. आजीचे नाव असल्यामुळे पीक कर्ज मिळण्यास अडचण येतं आहे. तरी सात बारा वरील नाव कमी करण्यास काय करावं.
आजी मयत असल्याबाबत मृत्यू दाखला प्राप्त करून , तलाठी यांचेकडे सादर करा . आपल्या वडिलांचे व तीन आत्यांची नावे दाखल करून घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आजी मयत असल्याबाबत मृत्यू दाखला प्राप्त करून , तलाठी यांचेकडे सादर करा . आपल्या वडिलांचे व तीन आत्यांची नावे दाखल करून घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझे पंजोबा यांचे १९८५ साली मिरा भाईंदर शहरातील एका मालमत्ता पत्रक वर ईतर हक्की नोंद झाली व ती आज मितीत ही आहे तर त्या मालमत्तेत आमचा हक्क बनतो का
नमस्कार सर माझ्या वडीलांनी गट क्रमांक 66 मध्ये 3 आर इतके क्षेत्र 2011 साली खरेदी घेतले आहे आणि वडील 2013 साली अपघाती वारले आम्ही लहान असल्या मुळे काही करता आले नाही आपल्या जागेला चतुरसिमा नाहित गट सामाईक आहे आणि आम्हाला त्या गटात कोनच वहिवाट घालू देत नाही मी सदर गटाची शासकीय मोजणी केली असता लगतच्या गटात गट क्रमांक 65 मध्ये 45 फुट क्षेत्र निघत आहे मोजणी केल्याची ' क' मिळाली आहे तरी ते लगत हिस्सदार पण आम्हाला ताबा देत नाहीत आम्ही अनुसूचित जातीतील असल्यामुळेच आमच्या वर वारंवार अन्याय केला जात आहे तरी आपले मार्गदर्शन हवे आहे सर प्लिज
आदिक राव ,
तीन गुंठे क्षेत्र आहे त्यामुळे ते प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असेल व पर्यायाने तुक्देबंदी कायद्याचा भंग होत आहे . फक्त हि खात्री करा कि , हे क्षेत्र बिन शेती जमीन वापर विभाग येत आहे का ? जर येत असेल तर व्यवहार नियमित करून घ्या . व्यवहार नियमित झाल्यावर , ७/१२ ला आपले नाव दाखल करा . नन्तर जमीनच ताबा मिळण्यासाठी न्यायालयात दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

sir.....
1)आणेवारी असलेल्या 1 (7/12) क्षेत्राची वहिवाटी नुसार क्षेत्र निश्चिती करायची आहे काय करावे लागेल 2) कर्ज बोजा असलेल्या जमिनीतील काही हिस्सा खरेदी करता येतो का
१. तुकडे बंदी तुकडे जोड कायदा याचा जर भंग होत नसेल व मिळकतीमध्ये j6 धारक आहेत त्या सर्वांची जर संमती असेल, तर सातबारा वरील नमूद क्षेत्राप्रमाणे जमिनीची मोजणी करून घ्या व स्वतंत्र सातबारे तयार करा.
२. ज्या मिळकतीवर कर्ज आहे ती मिळकत घेण्याला कोणतीही अडचण नाही मात्र जमिनी बरोबरच कर्जाचा बोजा ही जमिनी बरोबर येऊ शकतो व पर्यायाने जमिनीवरील असलेल्या कर्जाची परतफेड आपणाला करावी लागेल. त्यामुळे आपण जो दस्त बनवा त्याच्यावर स्पष्टपणे नमूद करून घ्या की कर्जाची परतफेड ही विक्रेत्यांनी करावयाची आहे व जमिनीचा बोजा हा केवळ विक्रेत्याच्या शिल्लक राहणाऱ्या जमिनीवर राहील. अथवा जमिनीचा मोबदला म्हणून जी रक्कम ठरलेली आहे त्यामधूनराहिलेल्या कर्जाची रक्कम व व्याजाची रक्कम कमी करून मोबदला विक्रेत्याला आता करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर, माझे आजोबा सरकारी फॉरेस्ट जमीन कसत होते. त्यांचे पीक पाहणी मध्ये नाव होते. चार पाच वर्षांनी आजोबा मयत झलेनंतर चुलत्याने पीक पाहणी मध्ये नाव लाऊन घेतल. नंतर 7/12 वर नाव लाऊन घेतल. आमचे वडील लहान असल्यामुळे त्यांना यामधील काहीच कळलं नाही. त्यामुळे आमच्या वडिलांचं नाव 7/12 वर आले नाही तर त्याकरता काय करता येईल त्याबद्दल माहिती मिळावी मला. आपले खूप आभार होतील सर कृपा करून माहिती सांगा.
सचिन राऊत साहेब नमस्कार,
वनखात्याची जमीन विशेषता सामाजिक वनीकरण विभागाची शेतकऱ्यांनी त्यावर झाडे लावावी या उद्देशाने आपणाला अथवा आपल्या पूर्वा अधिकाऱ्यांना दिली असल्यास, पीक पाहणी सदरी नाव न लावता गाव नमुना नंबर सात ब ला नाव लावता येईल.
मात्र अशी जमीन आपणा अथवा आपल्या पूर्वजांना दिली नसल्यास, आपली वहिवाट ही अतिक्रमण समजून वन खात्यामार्फत आपल्या विरुद्ध कारवाई होऊ शकते.
पीक पाहणी सदरी नाव आहे म्हणजे आपणाला कोणताही कायदेशीर अधिकार प्राप्त होत नाही केवळ या वर्षापुरते आपण त्या मिळकती मधून कोणतेही पीक घेऊ शकता. त्यामुळे कुठलाही कायमचा अधिकार प्राप्त होत नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार
माझा प्रश्न आहे कि सार्वजनिक बांधकाम विभागात जर सब डिविजन मध्ये बदली झाल्यास मूळ डिविजन मध्ये सेवा वर्ग करायाचे अधिकार कोणाला असतात

Question by ajitkharat
11-08-2020
ajitkharat@21gmail.com

सर नदिकाठा वरील जमिनीची मोजणी करताना नदीचा बाजूने अंतर सोडले जाते का जर सोडले जात असेल तर किती सोडतात
मोजणी करताना जमिनी बाजूने जे शेतीचा बांध आहे त्याची हद्द मोजणी खात्यामार्फत निश्चित केली जाते व त्याप्रमाणे क्षेत्राप्रमाणे मोजणी केली जाते.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by A s chavan
10-08-2020
ashokchavan41@gmail.com

सर, नगरपंचायत मध्ये टीपी कडुन रहिवासी दाखला आणल्यास २आरचा दस्त करता येतो का ?

Question by Nilesh chavan
09-08-2020
nileshac94@gmail.com

नगर पंचायत हद्दित रहिवासी दाखला टिपी कडुन आणल्यास तुकडेबंदि कायदा लागु आहे का? कृपया कळवावे
आपली जमीन जर रहिवास अथवा वाणिज्य अथवा औद्योगिक जमीन वापर विभागात समाविष्ट असल्यास त्याला तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याची बादा लागू होणार नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.36 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3400
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3