जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

सर माझ्या वडीलानी २०१७-१८ मधे २०r शेत जमीन काका ला गट१ जमीन विकली अद्याप् जमिनीची रेजिस्ट्री झाली नाही.कारण बँकेचे लोन आहे आता लोन भरूँण त्यान जमीन विक्री करू ई छिसर माझ्या वडीलानी २०१७-१८ मधे २०r शेत जमीन काका ला विकली अद्याप् जमिनीची रेजिस्ट्री झाली नाही.कारण बँकेच लोन आहे पन लोन भरूँण त्यान रेजिस्ट्री करून द्यायची आहे पन काही करना मुड़े गट २ ची जी जमीन लागूंनच आहे तिची रेजिस्ट्री करून द्यायची आहे. अस करता येईल का ? (पूर्व न देता पश्चिम कडली मंजे गट १- न विकता गट २ देउ शक्तो का?)
सर मी माझ्ये आजीने बहिणी जवळून 0.50 आर जमीन २००१ मध्ये खरेदी करून घेतली 0.50 परतू आता तिच्या दुसऱ्या बहिणीचा मुलाने दावा केला आहे कि ह्यांनी केलेळी खरेदी हि बेकायदेशीर आहे तर sdo ह्यांनी त्य्च्यक्डून निकाल लावून जमीन सरकार जमा करायचे आदेश पारित केला आहे मी आयुक्ताकडे अपील मध्ये गोलो तर त्यांनी sdo निकाल कायम ठेवला व नंतर मी राज्यमंत्री महसूल ह्याच्या कोर्टात दाद मागितली तर त्यांनी ०२ जानेवारी २०१८ च्या सुधारित परिपत्रकावरून मला माझ्याकडून 25% टक्के दंड आकारून निकाल दिला नंतर दुसऱ्या बहिणीचा मुलगा उच्च न्यायालय नागपूरला कोर्टात गेला व तेथे या मुद्यावर लढला कि आयुक्ताची नेमणूक राज्यमत्री ह्यांनीच केलेली आहे तर आयुक्ताच्या निर्णय विरुध्द तुम्ही उच्च न्यायालयात यायला पाहिजे पण तुम्ही राज्यम्त्री ह्याच्या कोर्टात गेला त्य्मिले तुमच्या राज्यमंत्री ह्याच्या निल्काल रद्द केला व आयुक्ताच्या निर्णयाला अपील करण्याची परवानगी दिली तर निकाल आपल्या बाजूने लागेल आसे काय करावे मार्गदर्शन द्या
कृपया आपला प्रश्न समजून येत नाही . आपला जो निकाल नागपूर उच्च न्यायालयाने दिला आहे . तो निकाल पत्र सादर करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एन ए नसताना 1200चौ.फुट जागा सन 2017 मध्ये रजिस्ट्री करून घेतली आहे त्यासाठी 7/12 वर नोंद करून घेण्यासाठी काय करावे लागेल
नोंदणीकृत दस्त तलाठी यांचेकडे सादर करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर मी एका गावातिल व्यक्त्ती कडुन त्याच्या शेतात प्लॉट घेतला आहे, पण त्यानी तो फक्त बॉन्ड वर ग्रामपंचायत ला लावुन दिला आहे. मला नमूना नं 8 भेटतो पण माझे नाव त्या व्यक्त्ती च्या सातबारा मध्ये येत नाही आणि आता तो मला खरेदीखत करुन देत नाही मी त्या जागेत घर बांधले आहे माझ्या नाव त्या सातबारा वर नाही आले तर मला काही अडचण येईल का. उद्या तो माणुस शेतीचा मालक मला परेशान करु शकतो का माझ्याकडे फक्त नमूना नं 8 आहे सातबारा मध्ये माझ नाव नाही. मला तो पुढे चालुन परेशान करु शकतो का. मार्गदर्शन करा सर की मी आता समोर काय करावे.
आपण जो बोंड पेपरवर जमीन घेतली आहे . त्यावर आपण मुन्द्रनंक शूल्क्शुल्क भरून घ्या . त्याला कायदेशीर पुरावा महत्व येईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार
माझे वडील एक वर्षा पुर्वी वारले असून त्यांचे श्राद्ध आताच झाले आहे म्हणून आम्ही आता संपत्ती वाटपचा विषय घेतला आहे. परंतू संपत्तीच सर्व बरोबरीने वाटप होत नाही आहे, आम्ही तीन भाऊ असून अजून आई पण आहे. समसमान वाटणीस एका भावाचा आक्षेप आहे, त्यावर कायदेशीर तोडगा काय काढता येईल
त्याबद्दल सहकार्य करावं
धन्यवाद
सर्व सह्धाराकांची संमती असेल तर जमिनीचे वाटप महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये तहसीलदार यांच्यासमोर करता येते. परंतु वाटपाबाबत एका भावाची हरकत आहे. यासाठी दिवाणी न्यायालयात दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 54 अन्वये आपलेही हिस्से ठरवून मिळण्यासाठी व त्याप्रमाणे ताबा मिळण्यासाठी दावा दाखल करावा लागेल. िवाणी न्यायालयाने आपले सर्व सह धारकांची हिस्से निश्चित केल्यानंतर प्रकरण सरस निरस वाटपासाठी संबंधित जिल्हाधिकार्‍यांकडे न्यायालयामार्फत पाठवले जाते. जिल्हाधिकाऱ्यांकडून सदर प्रकरण हे तहसीलदार यांच्याकडे व प्रत्यक्षात सरस निरस वाटपासाठी आपल्या तालुक्याचे उप अधीक्षक भूमिअभिलेख यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवले जाते. त्यांच्यामार्फत सरस निरस वाटप केल्यानंतर सरस निरस वाटप तक्ता व सर्व प्रकरण पुन्हा जिल्हाधिकारी यांचेमार्फत ज्या न्यायालयाकडून प्राप्त झालेले आहे त्यां न्यायालयाकडे प्रकरण परत पाठवले जाते. या झालेल्या सरस निरस वाटपाचे आधारित संबंधित दिवाणी न्यायालय अंतिम हुकूमनामा काढते . सदरच्या हुकूमनामा वरती आपणाला महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 मुद्रांक शुल्क जमा करावे लागेल. व त्यानंतर सरस निरस वाटप प्रमाणे जमिनीचे स्वतंत्र सातबारा तयार होतील.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Vishal Malode
12-09-2020
vishal.d.malode@gmail.com

माझ्या वडिलांनी जमीन खरेदीखत करून घेतली १९९१ मध्ये ६०गुंठे जमीन विकत घेतली त्यानंतर २००८ मध्ये माझ्या चुलत्या ने त्यातील जमीन २०गुंठे स्वतः च्या नवे करून घेतली वडिलोपार्जित जमीन ३९ गुंठे व हे २० गुंठे म्हणजे त्याच्याकडे पूर्ण ५९गुंठे झाले हे प्रकरण कळल्या नंतर आम्ही त्यावर गुन्हा दाखल करणार होतो पण त्याने आत्महत्यांचे नाटक केलं म्हणून हे प्रकरण मिटावे म्हणून तो म्हणाला अदला बदली पत्रक करू त्याच्या कडले ५९ गुंठे देईल व आमच्याकडे ४०गुंठे राहिलेले त्याला देवू पण त्याने त्यात ५४ गुंठे नावावर लावले बाकीचे राहिलेले ५ गुंठे चा उल्लेख केला नाही त्यात चातुसिमेत त्याचे नाव टाकले व तो त्या आधारे त्यात त्याची जमीन आहे असा दावा करत आहे तर त्याला जमीन मिळेल का राहिलेले ५ गुंठे मध्ये
सर मी बक्षिसपत्र केले आहे.माझे 3 गट आहेत.प्रत्येक गटात पुढीलप्रमाणे 27 गुंठे,13.5 गुंठे,31गुंठे आहे.उर्वरित एवढीच जमीन चुलत्याच्या नावावर आहे.सर्कल 125000 रुपये भरा म्हणत आहे.कशाचे पैसे भरायचे.

Question by Anmol patil
12-09-2020
amolmore907@gmail.com

नमस्कार सर,
आमची वडिलोपार्जित जमीन असून आजोबांना 3 मुले 4 मुली आहेत.परंतु कर्ज घेण्यासाठी आजोबांनी पहिला मुलगा मोठा असल्याने मुलाच्या नावे जमीन करून कर्ज घेतले होते.तेव्हा उरलेल्या दोन मुलांपैकी एक मुलगा 1 वर्षाचा आणि दुसऱ्याचा तर जन्मच झालेला नव्हता.आजोबांचे निधन झाल्या नंतर पहिला मोठा मुलगा इतर 2 भावांना जमीन देण्यास नकार देत आहे.कारण 7/12 उताऱ्यावर त्यांचे एकट्याचे नाव लागले आहे.
वारसाहक्काने जमीन मिळवण्यासाठी काय करावे लागेल..
माझा प्रश्न असा आहे की समजा एक गट नं (उदा ... गट नं ३४०) हा दोन शेकऱ्यांच्या नावे असून, या गट नं मध्ये दोन्ही शेतकऱ्यांचा सामान क्षेत्र वेगळे दिलेले आहे आणि त्या मध्ये एक विहीर आहे, पण विहीर ही दोन्ही शेतकऱ्यापैकी एका शेतकर्यांचा शेतात पूर्णपणे येते. आणि विहिरीसाठी लागणारी विहीर पड याची नोंद पण ७/१२ उतारा मध्ये नाही .. तर ज्या शेतकऱ्याच्या शेतात विहीर येते व त्या शेतकऱ्याच्या संपूर्ण क्षेत्रा पैकी काही क्षेत्र त्या विहारी मध्ये गेले आहे त्यामुळे तो शेतकरी त्या विहिरीवर त्याचा पूर्ण अधिकार समजतो , पण ७/१२ उतारा नुसार व गट नं एक असल्यामुळे ती विहीर दोन्ही शेतकऱ्याच्या नावाने लागते व उतारा मध्ये "विहीर सामाईक आहे" अशी नोंद आहे तर त्या विहिरीवर खरं हक्क कोणाचा असेल ?? ज्या शेतकऱ्याच्या शेतात ती विहीर येते त्याचा का दोन्ही शेतकऱ्यांचा ...????
सामायिक शेत जमीन वेगळी करून घेण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब यांना अर्ज कसा करावा
नमस्कार सर
सर देवस्थान जमिनीत ग्रामपंचायत नी अतिक्रमण करून मानसिक त्रास दिला आहे देवस्थान जमिनीतून गेलेला रस्ता हा जिल्हा परिषदेचा आहे पण त्यामध्ये ग्रामपंचायत नी सिमेंट चा रस्ता तयार करण्याच्या उद्देशाने देवस्थान जमिनीत अतिक्रमण केले आहे तर ते अतिक्रमण कोण काढुण देईल मला
देवस्थान जमीन जरी असली तरी , शासन , ग्रामपंचायत यांना , कायदेशीर प्रक्रिया पाडूनच जमीन संपादन करावी लागते . जमीन संपादन केल्यावर त्याबद्दल नुकसान भरपाई देणे आवश्यक . अनिक्रमन केले असेल तर , न्यायालयात अतिक्रमण काढून टाकणे बाबत हुकुम होण्यासाठी दावा दाखल करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Ganraj takle
09-09-2020
ganrajtakle@gmail.com

Namskar saheb mi ganraj Takle Maza vadilanche 2 lagna zale hote tyanche nidhan 2012 Sali zale ani tyana pahilya patni pasun 3 mul ani dusrya patni pasun 1 mulga ahe tr pahilya patni ne ani ticha mulanne wadiloparjit 7/12 vr tyancha 4 jananche nav add Kele ahe.ani dusrya patni cha mulache nhi Kele. pn dusrya patnicha mulala the 2020 la samjale ahe Karan jevha vadilanche nidhan zale tevha to Adnan hota.mg ata tyala 7/12vr kase nav add karta yeyil tyache
ज्या फेरेफाराने केवळ पहिल्या पत्नीच्या मुलांची व तिच्या मुलांची नावे दाखल झाली त्या विरुद्ध अपील करा .
दुसर लग्न जरी कायद्यानुसार अवैध असल तरी , दुसर्या विवाहामुले , झालेल्या मुलांना , मिळकती मध्ये कायदेशीर अधिकार असतो .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार माझा प्रश्न असा आहे की,
माझे आजोबा मयत झाल्यानंतर त्यांचे वारसांची (माझे वडील व काका) यांची नावे मिळकत पत्रामध्ये नोंद केलेली नाही. माझे काका आणि वडील मयत झाले. माझ्या सावत्र भावाने 32 ग करुन स्वत:चे कुळ लावून घेतले. कुळाची जमिनीवर आमचे हक्क नोंद न करता स्वत:च्या मुलाच्या नावे विकलेली आहे आणि त्याचे मुलाने तेथे इमारत बांधलेली आहे.
1) असे करता येते का ?
2) आमचा हक्क डावलता येते का ?

Question by विजय
09-09-2020
sanapvijay7@gmail.com

माझ्या पंजोबांनी जमीनीचे वाटप करताना काही जमीन माझ्या वडिलांच्या नावे केली व बाकी जमीन माझे आजोबा आणि त्यांच्या भावांत वाटून दिली. तर माझ्या वडिलांच्या नावे केलेल्या जमिनीत त्यांच्या भावंडांना हिस्सा मागता येतो का ?
नमस्कार सर,मला गवशेजरील शेतजिनीवर घर बांधायचे आहे. सेतमलक बिगर NA करताच प्लॉट पाडून नोटरी करून देत आहे.सदरील जागेची व घराची माझ्या नावावर नोंद होईल का?? नोंद होत नसेल तर काय करावे लागेल.जर अशा जागेवर मी घर बांधले तर माझा मालकी हक्का जाऊ शकतो का

Question by Laxman
07-09-2020
jadhav52laxman@gmail.com

नमस्कार सर ,
मी मार्च २०२० मध्ये ९० गुंठे जमीन खरेदी केली. रीतसर मुद्रांक शुल्क भरून दुय्यम निंभनदक कार्यलयया खरेदीखत करून घेतले . तलाठी कार्यालल्यात फेरफार नोंदी साठी प्रकरण दिले . तलाठी ने संबंधीत मूळ मालकाला ऑगस्ट २०२० नोटीस काढली . नोटीस चा पिरियड पण संपला . मूळ मालकाने नोटीस वर अंगठा पण दिला . फेर मंजुरी साठी मंडलाधिकारी कडे पडून आहे . आता मूळ मालकाच मुलगा मंडलाधिकारी कार्यालयात जाऊन म्हणत आहे कि आमचे काही पैसे बाकी आहे. आणि नोटीस वर आम्ही सही केली नाही. मंडलाधिकारी फेर मंजुर करत नाही . कृपया काय कायदेशीर कारवाई करावी ?

Question by Laxman
07-09-2020
lakhan52.jadhav@gmail.com

सर मी माझ्या आईच्या आणि भावाच्या सामायिक नावे असलेली वडिलोपार्जित जमीन नोव्हेंबर २०१८ मध्ये विकली . तदनंतर त्याच पैशात काही आणखी रक्कम टाकून दुसरीकडे मार्च-२०२० मध्ये जमीन खरेदी केली . जमिन खरेदीचा फेर मंडलाधिकारी कार्यालयाकडे पेंडिंग आहे. मंडलाधिकारी म्हणत आहे कि तुम्ही भूमिहीन होते तुम्हाला जमीन खरेदी करता येत नाही. आणि फेर मंजूर करत नाही. कृपया काय कार्यवाही करावी लागेल? माझ्या वडिलोपार्जित जमिनीच्या सातबारारावर माझे नाव आहे. पण क्षेत्र ० आर दाखवते. कृपया मार्गदर्शन करावे
नमस्कार सर , मी मार्च २०२० मध्ये ९० गुंठे जमीन खरेदी केली. रीतसर मुद्रांक शुल्क भरून दुय्यम निंभनदक कार्यलयया खरेदीखत करून घेतले . तलाठी कार्यालल्यात फेरफार नोंदी साठी प्रकरण दिले . तलाठी ने संबंधीत मूळ मालकाला ऑगस्ट २०२० नोटीस काढली . नोटीस चा पिरियड पण संपला . मूळ मालकाने नोटीस वर अंगठा पण दिला . फेर मंजुरी साठी मंडलाधिकारी कडे पडून आहे . आता मूळ मालकाच मुलगा मंडलाधिकारी कार्यालयात जाऊन म्हणत आहे कि आमचे काही पैसे बाकी आहे. आणि नोटीस वर आम्ही सही केली नाही. मंडलाधिकारी फेर मंजुर करत नाही . कृपया काय कायदेशीर कारवाई करावी ?
सर ,
मी माझी वडिलोपार्जित शेती नोव्हेंबर २०१८ मध्ये विक्री केली. २०१८ पर्यंत माझ्या नावाचा सातबारा उतारा निघत होता आणि दुसरीकडे मार्च २०२० मध्ये शेतजमीन खरेदी केली. आता मंडलाधिकारी भूमिहीन होता तुम्हाला जमीन खरेदी करता येत नाही म्हणून फेर मंजूर करत नाही.. ह्या प्रकरणात काय करावे कृपया योग्य मार्गदर्शन करा
सर मी 48 आर क्षेत्र कोरड वाहू क्षेत्र खरेदी केली आहे. परंतु तलाठी यांनी सदरचा फेर तुकडे बंदी कायद्याचा भंग होत असल्याने फेर नामंजूर केला आहे . तुकडे बंदी कायद्याचा भंग होण्यासाठी किती गुंठे क्षेत्र प्रमाणभूत ठरवण्यात आले आहे ? कृपया याबद्दल मार्गदर्शन व्हावे.
How to distribute compensation of devasthan Inam land. Is there any case law or G. R of Maharashtra gov. Is G. R. Dt. 26june 2006.is cancelled by any court or Maharashtra gov. And whether provisions of Maharashtra project affected persons rehabilitation Act. Applicable to devasthan inam land. Please guide me.Thanks...
इनाम जमीन चे बक्षीस पत्र करण्यासाठी कोणाच्या परवानगीची आवश्यकता असते व किती दिवसात परवानगी मिळते

Question by Luv Shirsat
04-09-2020
shirsatlove@gmail.com

नमस्कार माननीय सर,
माझा प्रश्न असा आहे की , दोन गावांच्या सीमेवर रास्ता ज्याला शिव रास्ता पण म्हणतात त्या शिव रास्ता संदर्भात शासनाचे काही नियम आहे का ? आमच्या गावामध्ये शिव रास्ता मोकळा केलेला होता पण ३ वर्षा पासून सध्या रस्त्याचाच बाजूने शेजारील शेतकऱ्यांनी अतिक्रमण करायला सुरुवात केलेली आहे ,व मोठी चारचाकी वाहने नेता येत नाही , त्याठिकाणी आता फक्त एक पायवाट उरली आहे, याचा जाण्या येण्यास त्रास होतो. यासाठी काही शासन स्तरावर उपाय करता येईल का ?

लिहिताने काही चूक झाली असल्यास - क्षमस्व:

Question by Gajanan garud
04-09-2020
gajagarud@gmail.com

प्रश्न : प्रकरण- जमीनदाराला 63 एकर जमीन होती.त्यापैकी 21 एकर जमीन A नावाचा कुळधारक कसत होता आणि 13 एकर जमीन Bनावाचा कुळधारक कसत होता .A ह्या कुळस जमीनदाराने कुळ कायद्याप्रमाणे 21 एकर जमीन दिली होती. मग कुळधारक B ने tenancy authority अर्ज केला 13 एकर जमीन मिळविण्यासाठी ,tenancy authority ने कुळ B च्या बाजूने निकाल दिला होता परंतु जमीनदारान tenancy authority च्या निकालाच्या विरोधात अपिलात गेला व जमीनदाराने कुळ A यास 63 एकर मधून 21 एकर जमीन कुळ कायद्याप्रमाणे देली आहे त्यामुळे शिल्क 42 एकर जमीन माझ्या दोन कुटुंबाना पुरेशी नाही त्यामुळे tenancy authority ने दिलेला निर्णय कायद्याच्या दृष्टीने योग्य नाही. असे जमीनदार सांगत आहे (जमीनदार आणि त्याच्या (लग्न झालेल्या )2 मुली असे मिळून 3 जण होते कुटुंबात) B या कुळास न सांगताच जमीनदाराने सर्व जमीन त्याच्या एका मुलीच्या मुलांना 1974 ला विकली होती. प्रश्नन्न 1)अशा वेळी B कुळास त्याला ती जमीन कायदेशीर मिळविण्याचा अधिकार आहे का? किंवा B कुळाने काय करावे ? केस अजून कोर्ट चालू आहे हैद्राबाद कुळवहिवाट व शेत जमीन 1950 च्या अधिनियमन 2)हैद्राबाद कुळवहिवाट व शेत जमीन 1950 च्या कलम 4 नुसार जमीनमालक धरुन 5 इसम म्हणजे एक कुटुंब तर मग कुटुंबात जमीनमालक एक व इतर 4 इसम कोणस मानावे कायद्याप्रमाणे. 3) हैद्राबाद कुळवहिवाट व शेत जमीन 1950 च्या कायदानुसार जमीनमालकाला किती जमीन स्वतःच्या कुटुंबाला किमान ठेवण्याचा अधिकार आहे 4)कायध्यप्रमाणे लग्न झालेल्या मुलीचा व तिच्या मुलांचा समावेश तिच्या वडिलांच्या कुटुंबात कुटुंब सदस्य म्हणून होतो का?
नमस्कार सर
माझी पुरवजा पासून चालत आलेली 36 एकर जमीन आहे. ती जमीन कुळ करून समोरील व्यक्तीने नावची करून घेतली होती नंतर नाबालीग कायद्याच्या तरतुदी नुसार कोर्ट खटला चालू आहे कोर्टाचा निर्णय कोणत्याही क्षणी माझ्या बाजूने होण्याची शक्यता आहे तर पुढची पार्टी ही ती जमीन तिसऱ्या व्यक्तीला विकत आहे

This page was generated in 0.42 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3400
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3