जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Jivansingh
09-08-2020
jivansingh20@rediffmail.com

Sir, Mala Co_operative banketun shetivar binvyaji karj jo milato to ghyayach ahe parantu 7/12 vr 3 lokanchi nave ahet. (2 bahini ani mi) sheti mi karat aslyamule mala sheti karavi lagate ani sheti karayala banketun karj milto ani tyasathi maneger ni ji nave 7 / 12 vr ahet tyanchi aadhar card magitale ahet parantu te aadhar card dyayla tayar nahit karan tyanche pati denar nahi ase bolat ahet ani mala karjachi mhanjech paisachi garaj ahe tar mala kay karav lagel ki mi tya shetivar karj milel kuthala upay karu please sangave Thank you
बँक व्यवस्थापक आपणाकडे सातबारावर जे सह धारक आहेत त्या सर्व सह-धारकांचे आधार कार्ड यासाठी मागणी करत आहे की आपण जे कर्जमागणी बँकेकडे करत आहात त्यासाठी अन्य सह धारकांची त्याला संमती आहए का ?
आपण बँक व्यवस्थापकाकडे ही मागणी करू शकता की आपल्या नावावर जेवढे क्षेत्र आहे किंवा आपल्या हिस्स्याला जेवढे क्षेत्र आहे त्यावरच आपल्याला कर्ज द्यावे जेणेकरून अन्य सहधारकांच्या आधारकार्डची आवश्यकता लागणार नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझा प्रस्न आहे की, 30 वर्षा पूर्वी माझ्या वडीलांना नोकरी मिळाली होती पण चुलते नोकरीला असलेमुळे आजोबांनी वडीलांना नोकरी करू दीली नाही आणि आजोबांच्या नावाची 2 एकर जमीन वडिलांच्या नावावर केली बाकी जमीन अजोबंच्या नावावर राहिली. आता 30 वर्षांनी आजोबांच्या मुत्यूनंतर चुलते म्हणतायेत सर्व जमिनीचे (वडिलांच्या नावावर आहे ते धरून) आर्धा हीससा पाहिजे. तर काय होईल. काय करावे
आपले चुलत्यांचे तसे काही चुकत नाही . कायदेशीर रित्या ते बरोबर आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर सात बारा व आठ अ मध्ये नावात बदल करावयाचा असल्यास काय करावे
साहेब मी धरणग्रस्त आहे. माझे पुनर्वसन करण्यात आले तेथे मला 2हेक्टर जमीन मिळाली तर ज्या मूळ मालकांची जमीन मिळाली त्या मालकाच्या सर्वे नंबरच्या बांधाच्या कडेने रस्ता होता. तो रस्ता चाळीस वर्षे जुना होता व त्याचरस्त्याने मी गेली 25 वर्षे ये जा करत होतो व ती माझी वहीवाठ आहे. तर मूळ मालकाने लॉकडाउनची संधी साधून माझा रस्ता बंद केला. तर मी मामलेदार कोर्टत लॉक डाउन असल्याने मेल ने तक्रार केली. त्यानंतर तहसीलदार यांनी मंडल अधिकारी यांस सांगुन पंचनामे केले. परंतु लॉक डाऊन असल्याने निर्णय प्रलंबित आहे. त्यात सामने वाल्याने दिवानी मध्ये केस केली. आता काय करायचं मार्गदर्शन करावे. आमची वकिल लावायची आयपत नाही.
साहेब,
आपण मेहरबान तहसीलदार साहेब यांना समक्ष जाऊन विनंती करा की आपण जी माझ्या प्रकरणाची चौकशी केलेली आहे व आपल्या न्यायालयांमध्ये जो माझा निर्णय प्रलंबित आहेत याचा निकाल तात्काळ द्यावा जेणेकरून मला माझ्या शेतावर जाण्याचा मार्ग रिकामा होईल व शेतीची चांगल्या रीतीने कास्वणूक शकेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Swapnil
07-08-2020
Swapnilshejwal6490@gmail.com

प्रश्न : साहेब मी धरणग्रस्त आहे. माझे पुनर्वसन करण्यात आले तेथे मला 2हेक्टर जमीन मिळाली तर ज्या मूळ मालकांची जमीन मिळाली त्या मालकाच्या सर्वे नंबरच्या बांधाच्या कडेने रस्ता होता. तो रस्ता चाळीस वर्षे जुना होता व त्याचरस्त्याने मी गेली 25 वर्षे ये जा करत होतो व ती माझी वहीवाठ आहे. तर मूळ मालकाने लॉकडाउनची संधी साधून माझा रस्ता बंद केला. तर मी मामलेदार कोर्टत लॉक डाउन असल्याने मेल ने तक्रार केली. त्यानंतर तहसीलदार यांनी मंडल अधिकारी यांस सांगुन पंचनामे केले. परंतु लॉक डाऊन असल्याने निर्णय प्रलंबित आहे. त्यात सामने वाल्याने दिवानी मध्ये केस केली. आता काय करायचं मार्गदर्शन करावे. आमची वकिल लावायची आयपत नाही.

Question by Rupali
06-08-2020
phatangarerupali04@gmail.com

Hello sir,
Greetings, Amach ek jun ghar gavat Grampanchaytichya haddit ahe ani grampanchaytichya utaryavr pn amach nav ahe pn City survey chy utaryavr dusrach konach nav ahe ani te nav 1969 pasun tsch ahe tyavr 1969 chya adhi pn ani ata paryant hi kontahi badal jhalela nahi. Tar amhala city survey la amch nav lavn garjech aheka, te lavnyasathi kay krav lagel.
Vinayak Gopal Limaye vs Laxman Kashinath Athavale या प्रकरणांमध्ये माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी Dual Ownership या संकल्पनेला मान्यता दिलेली आहे. या संकल्पनेनुसार जमीन एका व्यक्तीची व त्यावरील बांधकाम दुसऱ्या व्यक्तीचे असू शकते असा निष्कर्ष काढलेला आहे.त्यामुळे आपल्या नावावर ती जमीन नसली तरी चालू शकेल.
जर आपल्या नावावर ती जमीन करावयाची असल्यास ज्या व्यक्तीच्या नावावर ती जमीन आहे त्याच्याकडून आपण नोंदणी खरेदी दस्त द्वारे ही जमीन खरेदी केली आहे असा नोंदणीकृत दस्त तुम्हाला भूमिअभिलेख खात्याकडे सादर करावा लागेल त्या आधारे ते आपले नाव त्या मिळकतीला म्हणजे जमिनीला लावतील.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Vishwa
06-08-2020
vishwa.thorwat@gmail.com

Dear Sir we have purchased house in the year 2018 from reputed builder . In year 2019 july we came to know that our builder has done some agreement of lease with other builder to provide our internal acess road to other builder who is doing construction of building beside our society.
The second party builder will construct gate for there society so there society people can use our internal road for incoming and out going
of there car to there fist floor podium parking and even he has another parallel road of 9mt wide for there ground floor parking.

Later we came to know that to get FSI and increase the floor for construction of building of second party builder instead 6 floor they got plan pass for 12 floor they have done this lease agreement. And they are saying they are using for ingress and outgress for there people to use that road also they will share 50% maintenance with our society for using 100mt our internal road access and that is not having clear idea with second party builders buyer.Also the lease agreement they have done it for 99yrs for Rs 99/- i.e Rs 1 per yr.

But when we purchase flat our builder did not tell anything about that. Also they have not mentioned anything in our agreement, while doing there agreement they did not ask anthing to us. We have 6 tower they have not mentioned anything related to there lease agreement in our agreement. And actually without informing us they have done that lease agreement with there mutual understanding that is also after giving possession to our society member,now builder is saying that due to power of attorney he can do that without taking consent of alotee. Could you please guide us what we can do ?. The lease agreement they ave done for new gate access to other society of other builder which was not there in earlier layout plan which they shown to us when we were purchasing house now also for new buyer in our society they did not inform any thing reagarding that and they have not mentioned any thing there new buyer aggreement also.

We have already put case against the builder but our builder is is telling in court that for our benefit of socity to reduce maintanance cost by 50% of 100 mt road and also our builder saying that we do not have intension of demolishing the wall between our society and other builder society to construct the new gate for the other builder society.
Also he is saying he has not done anything wrong, not asking alotee of our society member. But practically in future there willl be always be fight between two society, In lease agreement they have done it is mentioned that if the other society refuse to pay the maintence cost to our society we can close the gate by giving one month notice but practicall it is not possible.

Please guide us we all people are going to struggle for long time and every alternate day there will be fight. These builder will escape once they sold out the house.

They have completely cheated with us while we buying house they said something else now they are came with new gate for other builder which was not there in earlier layout plan. The common wall and internal access road will be sharing with other builder ,that too they have another parallel road for there society.

The lease agreement they have done in the year of June 2019 after we purchase house .

Please guide us what else we can do against them? Can we go in media if case is infrom of court.?

Thanks
You can file complaint to the RERA Authority for the violations of sections 14 of the RERA Act 2016 .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर मी योगेश शेंडे. 20 वर्षापूर्वी माझ्या आईचा माझ्या वडिलांनी खून केला. आम्ही दोघे भाऊ आजी कडे राहतो. वडिलांकडे 3एकर वडीलोपार्जीत जमीन आहे. वडिलांनी दूसरे लग्न केले. आम्हाला त्या जमिनीचा हक्क कसा मिळेल.
जर वडिलांच्या नावावर जी शेतजमीन आहे ती जर वडिलांची मिळकत असेल तर केवळ वडिलांच्या मृत्युपश्चात आपणाला या जमिनी चे वारस म्हणून त्यामध्ये हक्क मिळेल. आपणा बरोबरच आपल्या वडिलांनी द्वितीय विवाह केलेला आहे त्याच्या मधून जे काही आपत्ती असतील तर त्यांनाही आपल्या बरोबरीने तेवढाच वारस हक्क राहील.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझा प्रश्न असा आहे की, बोरवेल नोंदणीसाठीच्या प्रक्रिया आणी त्याबाबत काही शासन निर्णय असलयास मार्गदर्शन करावे.
सर माझ्या आजॊबांना दि. 25/12/1960 रॊजी मा. कलेक्टर सो। यांच्या आदेशाप्रमाणे मुंबई कूळकायदा कलम ३२ (P) नुसार शेतजमिन (४.०४हेक्टर म्हणजेच १० एकर ) मिळाली आहे । तेव्हा पासून 1960 पासून सलग आपली वहिवाट आहे। ७/१२ वरती आजोबांचे नांव आहे। वरती मालकाचे नाव : या ठिकाणी "सरकार " असे असून जमिन करणाराचे नाव या कॉलम मध्ये आजोबांचे नाव आहे । २००९ साली आजोबा मयत झाले आहेत । माझे काही प्रश्न आहेत त्यांचे निरसन करावे ही कळकळीची नम्र विनंती :-

1} वारसनाॊंदीला काही अडचण येईल काय? वारसनाॊंद होईल का? वडिलांच्या व चुलत्यांच्या हलगर्जीपणामुळे इतका विलंब झाला आहे। वडिलही यावर्षी मयत झाले आहेत । आता मी लक्ष घातले आहे ।
1} वारसनाॊंद होईल का?
2} ही जमीन शासकीय किंमत भरुन आमच्या नावे करता येईल का?
3} मुंबईक कूळकायदा (P) किंवा 32 (P)(2)(C) हा आदेश कोठे मिळू शकेल । मी सोलापुर जिल्हयातील रहिवासी आहे।

प्लीज सविस्तर मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती ।
आपला कृपभिलाशी,
राजरत्न क्षीरसागर
9518985251/ 7507123178
जो फेरफार असेल त्या आधारे ७/१२ च्या भोगवटा ला नाव लावणे बाबत तहसीलदार यांना अर्ज करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

We have land in Village Salaidabha, Taluka Hingna, District Nagpur. According to Adhikar Abhilkeh Panji of 1954-55 my late grandfather have their names on it. But Due to Kul kayda & Ceiling act we lost our entire land. Can you please guide what is the remedy available with us ? Can original Landlord to be landless ?. If the name of Kul are available on the Adhikhar abhilkeh then how can a third persons name included in it ? what is the remedy to delete the name of third person?
The various States adopted post-independence Land Reforms measures across India. Amongst these land reform measures, the Bombay tenancy and agricultural land act and the agricultural land ceiling on holding act were enacted to have equitable land distribution.
If your forefathers have been divested of lands due to the operation of the above statutes, nothing can be done. Only you have to check whether this divestiture is as per the procedure and is not illegal, irrational and illogical.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नोंद खरेदीखतात चतु:सिमा व जमिनीचे चुकीचे वर्णन, स्थान (Location) असल्यास, व त्या नुसार फेरफार नोंदी झाल्यास , त्या फेरफार नोंदी वैध असतात का?

खरेदी दस्त या मध्ये स न / ग न अथवा नगर भूमापन क्रमांक योग्य असेल तर चातुर्सिमा चुकीच्या असल्या तरी काही अडचण नाही . मात्र जागेचे वर्णन चुकीचे असेल व त्यामुळे मिळकतीचा स न . /ग न या बाबत निछितता येत नसेल तर दुरुस्त दस्त करणे आवश्यक आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

कूळ कायदा कलम 84 क पत्र हा शेरा कमी करण्यासाठी काय करावे ??
सातबाराच्या इतर हक्क सदरी 84 क शेरा असणे म्हणजे , महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 च्या कलम 63 अन्वये , शेतजमीन खरेदी करण्यासाठी व्यक्ती शेतकरी असणे आवश्यक आहे . परंतु खरेदीदार हा शेतकरी नसताना , शेतजमीन खरेदी करणे .
खरतर असा खरेदी व्यवहार यास कायदा मान्यता नाही . ८४ क अन्वये अशी शेतजमीन शासन जमा करणे आवश्यक आहे .
आपले नसीब समजा कि जमीन शासन जमा करण्याची कार्यवाही सुरु केलेली नाही . असा शेरा कमी होणार नाही .
मात्र हे हि लक्षात घ्या कि , ८४ अन्वये कारवाई किती दिवसात करावी या बाबत कोणताही काल मर्यादा दिलेली नाही . मा न्यायालयाने वेळोवेळी निर्णय दिले आहेत का , एखाद्या कृतीसाठी कालावधी कायद्यात दिलेला नसेल तर ती कृती /कारवाई विहित वेळेत करणे आवश्यक आहे . या न्यायनिर्णय तत्वाचा आधार , आपणाविरुद्ध कारवाई सुरु झालीच तर , घ्यावा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

कूळ कायदा कलम 84 क पत्र हा शेरा कमी करण्यासाठी काय करावे ??
नितीन जाधव साहेब नमस्कार,

मिळकतीच्या अधिकार अभिलेख सदरी इतर अधिकारांमध्ये 84 क ला पात्र असा जो शेरा असतो याचा अर्थ, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 च्या तरतुदी विरुद्ध मिळकत खरेदी करण्यात आलेले आहे. बहुतांशी प्रकरणांमध्ये, जमीन खरेदी करताना खरेदीदार हा शेतकरी असणे आवश्यक असताना, बिगर शेतकरी व्यक्तीने जर शेत जमीन खरेदी केली असेल, तर अशा प्रकरणाची 84 क अन्वय सुनावणी घेऊन, जमिनीचे संपादन कूळ कायद्याच्या तरतुदी विरुद्ध आहे किंवा नाही याची पडताळणी करणे व असेच जमिनीचे संपादन कूळ कायद्याच्या तरतुदी विरुद्ध असेल तर जमीन शासन जमा करणे हे अभिप्रेत आहे.
पूर्वीच्या काळी व्यक्ती शेतकरी नसतानाही जमिनी खरेदी केलेले आहेत मात्र संबंधित मंडळाधिकारी यांनी असे फेरफार मंजूर न करणे आवश्यक असतानाही फेरफार मात्र मंजूर केलेले आहेत व इतर हक्कात 84 क च्या विरुद्ध असा शेरा लिहिलेला आहे. त्यामुळे अशा जमिनीचे संपादन हे खरंतर कायद्याच्या तरतुदी वृद्ध आहे त्यामुळे इतर हक्कात असलेला असा शेरा काढणे हे दुरापास्त आहे.
मात्र अश्या प्रकरणात , जर ८४ क ची कारवाई सुरु झाली तर , आपण खालील मा उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेयून , आपली जमीन शासन होण्यापासून वाचवू शकाल .

Asha Jamnadas Chandarana 40, Honister Heights vs State of Gujarat (16.10.2000 - GUJHC) :


"Where the power is conferred to effectuate a purpose, it has to be exercised in a reasonable manner, and the reasonable exercise of power inheres its exercise within as reasonable time.


In case of MOHAMAD KAVI MOHAMAD AMIN Vs. FATMABAI IBRAHIM
Even more than 1 year delay has been considered by the Apex Court unreasonable while exercising the suo motu powers under Section 84-C of the Bombay Tenancy and Agricultural Lands Act, 1976.


कायद्यांमध्ये एखादी कृती करण्यासाठी जर कालावधी दिलेलं असेल तर ती कृती योग्य कालावधी मध्ये करणे आवश्यक आहे. योग्य कालावधी हा कारणपरत्वे बदलत असतो.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by santosh bakale
03-08-2020
sandipbakan@gmail.com

सर
माझ्या आजाेबाला १८एकर व चुलत आजाेबाला १८एकर जमिन हाेति. माझ्या आजाेबाला A B C D E अशि पाच मुले आहेत. चुलत आजाेबाला अपत्य नव्हते म्हणुन माझ्या आजाेबाच्या A ला दत्तक घेतले. परंतु चुलत आजाेबाने दत्तक घेतलेले A अपत्य चुलत आजाेबाच्या नावाने असलेले १८एकर शेत घेवुन अलग झाले नाहि. माझे आजाेबा व चुलत आजाेबा दाघेहि मयत झाल्यानंतर २० वर्षे A B C D E सर्व जण एकत्र राहिले.

माझ्या आजाेबाचे व चुलत आजाेबाचे १८ +१८=३६एकर क्षेत्र A B C D E या पाच जणांनि एकत्रित जाेपासुन कसुन आता २० वर्षानंतर १००एकर क्षेत्र केले. परंतु आता A B C D E मधे वाद हाेत आहे . B C D E यांना वाटत आहे कि A ने १००एकरचे समान वाटप करुन द्यावे. परंतु A आता ५० एकर वर हक्क दाखवत आहे . २० वर्षे पासुन B C D E हे A कडे समान वाटपाची मागनि करत आहे. परंतु B C D E यांनि कंटाळुन आता आपले नाव ज्या ज्या क्षेत्रावर आहे त्या ठिकाणि कब्जे केले आहेत. परंतु आता असे झाले कि १००एकर क्षेत्रामधिल A च्या नावे ४० एकर B -२०एकर C-१५एकर D-१५एकर E- १०एकर नावाने आहे. यातहि A B C D यांच्या जमिनि भारि काळिच्या आहेत . आणि E च्या १० एकर शेतातुन वढे नाले वाहतात नेहमि ३एकर क्षेत्र पावसाळ्यात खरडुन जाते. परंतु E ला आपल्यावर अन्याय झाल्या सारखे वाटत आहे. यात E ने आपला हक्क मिळवण्यासाठि काय करावे ? दत्तक पुत्र A ला वाटते कि ५०एकर क्षेत्रावर आपला अधिकार आहे. हे याेग्य आहे का ? यात E ने काय करावे?
हिंदू दत्तक व निर्वाह अधिनियम १९५६ च्या अन्वये दत्तक विधानाच्या पूर्वी, जी मिळकत दत्तक अपत्यास निहित झालेली असते , अशी मिळकत दत्तक अपत्यास दत्तक विधान झाल्यावर हि त्याचेकडे निहीतच राहते त्याच्यापासून निर्निहीत करता येत नाही . तसेच दत्तक पालकांची मिळकत त्यांचे पश्चात , दत्तक गेलेल्या मुलाचेच नावावर होते .
आपली प्रकरणांमध्ये ज्या घरामध्ये तो दत्तक म्हणून गेला, त्यात दत्तक माता पिता कडील अठरा एकर जमीन ही अ ला मला मिळालेली आहे. इतर ब क ड व इ यांनी दोन्ही जमिनी एकत्र कसून , क्षेत्र १०० एकर वाढवले आहे .
खालील बाबींचा खुलासा होणे आवश्यक आहे .

१. १८ एकर क्षेत्र आजोबांचे पश्चात कश्या प्रकारे ७/१२ ला दाखल झाले . एकत्रित ५ जणांची नावे दाखल झाली का ?
२. आजोबांचे जमिनीचे वाटप ४ लोन्कात होऊन , प्रत्येकी ४.५ एकर झाले ? अ च्या नावे दत्तक पालकांपासून प्राप्त झालेले १८ एकर क्षेत्र अ च्याच नावे होते ?
३. नवीन खरेदी क्षेत्र कश्या प्रकारे ७/१२ ला दाखल; झाले ? प्रत्येकाचे वाट्याला किती क्षेत्र आले ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर मी दुसऱ्याच्या जागेवर घर बांधले आहे त्या साठी त्यांना पैशाच्या स्वरूपात मोबदला दिला आहे,आणि तहसीलदार कार्यालयात 30 वर्षासाठी चे रजिस्टर मुदत पूर्व खरेदी पत्र केले आहे ,पण ते आत्ता घरातून बाहेर निघा म्हणतात आता फक्त 12 वर्ष झालीत ,काय करावे
आपल्या प्रश्नावरून आपण , भाडे पत्त्याने जमीन घेतली असल्याचे दिसून येते . मात्र जमीन भाडेपट्ट्याने घेतल्यावर , त्यातीअटी व शर्तींचा भंग झाला असेल तरच , मुदत पूर्वी भाडेकरू यास मिळकतीचा ताबा सोडवा लागतो . मात्र त्यासाठी अगोदर नोटीस द्यावी लागते . तसेच आपणाला अन्याय झाला आहे असे वाटत असेल तर आपण न्यायालयात जाऊ शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Sir. माझ्या मामाने 25 गुंठे जागा 2000 साली विकली आणि रजिस्टेशन मधे माझ्या मम्मी चे कुलमुखत्यार पत्र no.1 ला म्हणजे माझा मामा. आणी रजिस्टेशन सोबत त्याची प्रत का नाही तर म्हणतात कि ते पत्र रजिस्टर नाही म्हणून. आता 50 गुंठे जागा शिल्लक आहे तर त्यातला हक्क मला मम्मीला कसा मिळवून देता येईल?
सर नमस्ते माझ्या बहिणीने सात गुंठे जागा घेतली त्याचे खरेदी खत झाले असून सात बाराचा उतारा मिळाला होता परंतु आता ऑनलाईन सात बारा चेक केला असता तो दुसऱ्याच्या नावावर आहे असे दिसते यावर कायदेशीर काय करावे लागेल
तहसीलदार यांचे कडे अर्ज करा . माहिती करून घ्या कि आपले नाव आपणाला कोणतीही नोटीस / पूर्वकल्पना न देता कसे कमी करण्यात आले

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

साहेब मी विरेश सुभाष स्वामी नळदुर्ग ता तुळजापूर जि उस्मानाबाद असून माझ्या शेजारी गुंडू डुकरे हा शेजारी असून माझा प्लॉट तुमच्या जागेत आले आहे म्हणून माझे बांधकाम 1 वर्षपासून अडवणूक करत आहे, माझ्या प्लॉट चा पाठीमागे रोड असून त्या रोड़ची जागा माझ्या प्लॉट मध्ये आत अली आहे,असे म्हणून खोटं बोलत आहे तरी यामधून मला योग्य मार्ग सांगा, documentry title clear आहे
आपला शेजारी हा काही , नियोजन प्राधिकारी नाही त्यामुळे त्याचे बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही . मात्र त्याचा अडथळा वाढत असेल तर , आपण प्रथम त्याचे विरुद्ध नजीकचे पोलीस ठाण्यात त्याचे विरुद्ध तक्रार द्याल . पोलीस महोदयांनी सांगून काही उपयोग होत आहे का? . नसेल तर न्याया लयात त्याला मनाई हुकूम देण्याबाबत दिवाणी दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

SIR AMCHA RATNAGIRI BAVNADI GAVAT ADHICHA SAPURN 31पै. CHA HISA AAHE V AMHI दस्त 1800₹ BHARATO TRI AMCHYA NAVAVR 1 HECTOR JAGA DAKHAVAT AAHE SO AMCHI AMCHI JAGA 1 HECTOR PESHA JAST ASU SHAKTE KA SIR PLEASE GUIDE ME
सर
मी २०१२साली एक बांधकाम व्यावसायिक कडुन १ गुंठा जागा ५ लाख ५०हजार खरेदी केली होती माझ्या सोबत १५ इतर काही लोकांची खरेदी झाली सदर जागा ही मी गुंतवणूक म्हणून घेतली होती वारंवार नावे लागावी म्हणून आम्ही व्यावसायिकस सांगितले परंतु आता लागतील नंतर लागेल असे सांगून टाळाटाळ करत होता मी तलाठी कार्यालयात चौकशी केली असता सदर जागा ही महार वतन ची असल्याने ती नावे लागली जाणार नाही मी ३ वर्षांपासून ती जागा विक्री करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु नावे लागली नसल्याने व महार वतन मुळे ती जागा लोक घेण्यास तयार होत नाही कोणी खरेदी स तयार झाले तर २ ते ३लाखात मागतात मी व्यावसायिकास माझी अडचण सांगितली तर त्याने शेजारी असलेल्या दुसऱ्या लेआऊट मधील एक जागा देतो व पुढील तीन महिन्यांत ५ लाख देऊन मीच खरेदी करतो अशी नोटरी करून दिली परंतु आता ५ सहीने झाले परंतु मला पैसे मिळाले नाही ५महीन्यापासुन फक्त टाळाटाळ चालु आहे मी सदर जागा गुंतवणूक म्हणून घेतली होती परंतु मला तोटाच होतोय झालेल्या फसवणूक बद्दल काही कायदेशीर कारवाई करता येईल का ? काही नुकसान भरपाई मिळण्यासाठी काय करावे लागेल






आपण बांधकाम व्यावसायिकास , मोबदला म्हणून दिलेली रक्कम धनादेशाद्वारे दिली असेल तर , आपण त्याचे विरुद्ध फसवणूक झाली आहे म्हणून प्रथम खबर अहवाल पोलीस ठाण्यात दाखल करू शकता . अथवा आपण त्याचे विरुद्ध दिवाणी दाखल करून जमिनीचे खरेदी खत आपले लाभत करून देण्या बाबत न्यायालयाने हुकुम पारित करावा , असा मागणी करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या आजोबांच्या नावावर असलेले घर हे वडिलोपार्जित आहे पण आता आजोबा मयत आहे तर ते घर आता चुलत्या च्या नावावर दिसत आहे ,घरपट्टी पण थकलेली आहे... माझे वडील मयत आहे तर मला त्या घरावर नाव लावण्यासाठी काय करावे लागेल
ग्राम पंचायत हद्दीत घर असेल तर , आपले आजोबा मयत झाल्यावर , केवळ आपले चुलत्यांचेच नाव कसे लागले याचा शोध घ्याव. गट विकास अधिकार यांचेकडे अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर, कुळकायदा कलम ४३ अन्वये १९६८ साली कु का ३२ ग प्रमाणे कुळाचे नाव कब्जेदार सदरी दाखल करून मूळ मालकांची नावे हफ्ते घेणार म्हणून इतर हक्कात दाखल आहे. तसा फेरफार हि झाला आहे आता मात्र इतर हक्कातील त्यांची नावे कमी करून भोगवटा वर्ग २ चे १ करण्यासाठी काय प्रक्रिया आहे. कोणत्या कायद्याचे कलमाचे आधारे कोणाकडे अर्ज दाखल करावा.माहिती मिळावी

आता परवानगीची आवश्यकता नाही . तहसीलदार यांचेकडे नझराणा जमा करीन वर्ग १ जमिन होईल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर, एकुमॅ शेरा काढायचा असेल तर काय प्रक्रिया आहे आणि कोठे अर्ज करावा.
वास्तविक असे शेरे ७/१२ संगणकी करण मध्ये , कमी करण्यात येऊन सर्व येकुम्या च्या पोटातील( इतर वारस ) वारसांची नावे ७/१२ सादरी दाखल केली आहेत . तरी हि अजून अश्या नोंदी असतील तर मंडळ अधिकारी , तलाठी यांचेकडे अर्ज करा . त्याची एक प्रत तहसीलदार यांना द्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सन 1974 मध्ये वडिलांच्या विधवा आत्याने बक्षीस पत्राने ९ हेक्टर जमीन वडिलांच्या नावावर केली.आत्या जिवंत असताना 1963 साली जमीन कसणाऱ्या ने कुळकायद्या द्वारे नाव लावण्याचा प्रयत्न केला. पण विधवेस कुळ लागत नाही टेंडेन्सी खटला रद्द करण्यात आला. त्याच कुळाचे 1983 शाली सदर स्वतःचे नाव लावून घेतले व नंतर १९९४ साली वडिलांच्या नावे खोटा अर्ज देऊन सदर जमीन मला नको आहे गावाकडे माझ्या नावावर 25 एकर जमीन असल्याने हि जमीन मला नको आहे ही जमीन माझ्या कुळाला देण्यात यावी असा खोटा अर्ज देऊन सदर जमीन 32ग कायद्याने नाव लावून घेतले आहे सरकारी किंमत ठरवून मिळण्यासाठी वडिलांच्या नावे अर्ज करून सरकारी किंमत ठरवून घेऊन वडिलांना ती पोहोचली अशाप्रकारे खोट्या सह्या घेऊन जमीन हडप केली आहे. तहसीलदारांकडे अपील केल्यानंतर लिमिटेशन ॲक्ट ने अपील रद्द करून दिवाणी दावा दाखल करावा अशा प्रकारचे आदेश दिले आहेत सध्या एम आर टी मध्ये (महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण ) केस चालू आहे मार्गदर्शन व्हावे.९८५०७५४३९४
MRT कुल कायद्या अंतर्गत असलेले दाद मागण्याचे अंतिम स्थळ आहे . MRT योग्य निर्णय घेतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.48 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3400
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3