जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by दशरथ धूळसैदर
27-07-2020
dhulsainder21@gmail.com
मी मौजे लोहारे तालुका संगमनेर मध्ये राहत असून माझ्या पंजोबा पासून आम्ही त्या जागेमध्ये राहतो व त्या जागेची नोंद ग्रामसेवक का कडे आहे व त्याचा नमुना 8 पण आहे तसेच त्या जागेचा स्टॅम्प पेपर पण आहे परंतु समोरील व्यतीच्या 7 12 वर नोंद नाही त्यामुळे ते आम्ह्यला त्रास देतात व तुमचे येथे काही नाही तुम्ही जा असे बोलतात तर कृपया यावर काय उपाय आहे.
भारतामध्ये द्वी मालकी संकल्पना आहे . म्हणजे जागा एकाची व त्यावरील घर दुसर्याच्या मालकीचे . त्या दुसर्या व्यक्तीस आपणाला त्रास देण्याचा कोणताही हक्क नाही . त्याचे विरुद्ध तक्रार दाखल करा . अन्यथा न्याया लयात दाद मागा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Yogesh Jagadish supekar
27-07-2020
yogesh.supekar.mcm@gmail.com
मी योगेश जगदीश सुपेकर रा. सारोळा सोमवंशी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर माझे वडील जगदीश लक्ष्मण सुपेकर यांचं नावे असणारी शेत जमीन ते हजन नसतं नामदेव सुपेकर व इतर ३ जण नी खोटे प्रतिज्ञा पत्रक दिनांक १३/०१/२०२० रोजी श्रीगोद्यातील तहीलदारात सादर करून खोटा व्यक्ती दाखुन ७ एकर २० आर जमीनच अपहरे केला आहे तलाठी साहेबांनी नियमबाह्य नोद केले आहेत.७/१२ वर
Question by विजयसिंग भास्कर देशमुख
27-07-2020
vijaysing.deshmukh@gmail.com
महाराष्ट्रात जसा महाराष्ट्र कमाल जमीन धारणा कायदा आहे तसा उर्वरीत भारतात काय परिस्थिती आहे ? मध्य प्रदेशात शेतकरी किती एकर जमीन धारण करू शकतात?
Question by Jaydip nikude
27-07-2020
jaynikude@gmail.com
सर. एकत्र कुटुंब असताना काही मालमत्ता खरेदी केली पण मोठे चुलते घरचे कर्ता पुरुष म्हणुन त्यांचा नावे खरेदी केली.. आता कुटुंब वेगळे झालेत पण चुलते चा नावे आसल्या मुळे ते आता म्हणत्यात मीच खरेदी केली याला काही कायदा आहे का..
जयदीप निकुडे महोदय
आता काही हि करता येत नाही
आपणाला सिद्ध करावे लागेल किं जमीन खरेदी करताना , एकत्रित कुटुंबाचा पैसा खार्देदिसाठी वापरला होता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संजय
26-07-2020
sanjayraut1755@gmail.com
सर, माझ्या आजोबांनी 1999 साली त्यांचे नावे असलेली वडिलोपार्जित संपत्ती माझे आजी, वडील, आत्या, यांची संमती न घेता विकली आहे , 1999 पासून ती ज्यांनी घेतली त्यांचे नावे त्यांच्या कडेच आहे, ती माझ्या वडील, आत्या यांना कायदेशीर परत मिळेल का??
आपले आजोबा हयात आहेत का ?
ज्या व्यक्तीने जमीन खरेदी केली आहे तो जर Bonafide Purchaser for value without notice असे सिद्ध करू शकला तर , काही ही करता येणार नाही . केवळ आजोबा हयात असतील तर , आजोबांकडून आपणाला त्यांच्या हिस्स्यास येणार्या जमिनीपेक्षा जे क्षेत्र त्यांनी विकले आहे , त्याची विक्री किंमत व त्यावरील व्याजासह आपणाला मागता येईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राकेश हरिचंद्र सावळे
24-07-2020
savalerakesh19@gmail.com
सर, आमची वडिलोपार्जित जमिन आहे, म्हणजे ती जमिन माझ्या आजोबांनी खरेदी करुन माझ्या आजीच्या नावे केलेली होती,त्याच जमिनीतुन माझ्या आजोबांचे भाऊ यांना वाटणी दिलेली आहे,व राहिलेल्या माझ्या आजीच्या हिस्यावर वारस लावलेला नव्हता याचा फायदा घेत माझ्या लहान भावाने वडिलांच्या (आजीला दोन मुले व एक मुलगी आहे,माझे वडिल लहान व काका मोठे आहेत.)संगनमतीने आजीचे वय 65 वर्ष होते व आजारी होऊन बेडवर पडलेली होती,ऐकुही येत नव्हते,अशा स्थितीत आजीला उचलुन घेऊन जाऊन नातवाने परस्पर कोणाला न माहित होता जमिन खरेदी केलेली दाखवुन स्वत:च्या नावे करुन घेतली, आजी आजारी होती व ऐकुही येत नसल्यामुळे काय केले ते आजीला समजले नाही व आजी काही दिवसांनीच मरण पावली, हे प्रकरण आम्हांला (काकांना,मला व नातेवाईकांना नंतर समजले). आता मला काय करावे लागेल जेणेकरुन वारस नोंद होऊन वाटणी पडेल. कृपया मार्गदर्शन करावे.
आपली आजी आजारी असताना तिला पासून बक्षीस पत्र करण्यात आले हे आपणाला सिद्ध करावे लागेल त्याच वेळेस ते बक्षीस पत्र रद्द होईल व त्या बक्षीस पत्राच्या आधारे जे आपल्या भावाचे नाव लागलेले आहे ते कमी होईल.
आपण कथन केल्या प्रमाणे आपल्या आजीबाई सध्या हयात नाहीत त्यामुळे त्या आजारी असताना त्यांच्याकडून फसवून बक्षीस पत्र करण्यात आलेले आहे हे सिद्ध करणे थोडेसे कठीण व जिकिरीचे काम मला दिसते. पहा आपणाला काय करता येईल ते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दिगंबर गणपत वाघ
23-07-2020
waghd001@gmail.com
7/12 वर भोगवटादार वर्ग २,भोगवटादार नाव -श्री बालसिद्ध नाथ देव वहिवाटदार असा उल्लेख असून त्याखाली आमची दोन भावांची नावे आहेत तसेच सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरास बंदी -कुळ कायद्याने प्राप्त जमीन ,नवीन अविभाज्य शर्त, कु.का. क ४३प्रमाणे (१) (हस्तांतरास बंदी-पुनर्वसन कायदा १९८६ कलम १२ अन्वये पासून बंदी १३-११-१९९६ असा उल्लेख आहे तरी सदर जमीन आम्हाला कृषी वापरासाठी विक्री करावयाची आहे त्यासाठी आम्हाला कोणाची परवानगी घ्यावी लागेल तसेच सदर जमीन भोगवटादार वर्ग १ मध्ये आणायची असल्यास काय करावे लागेल. कृपया मार्गदर्शन व्हावे हि विनंती
जमीन बाल-सिद्धनाथ यांचे मालकीची आहे . आपण केवळ वाहिवातदार आहात .
खालील प्रकरणांमध्ये माननीय उच्च न्यायालय अलाहाबाद यांनी देवस्थानाला देण्यात आलेल्या मिळकतीच्या हस्तांतरणाबाबत खालील निरीक्षणे नोंदवली आहेत
Shyamal Ranjan Mukerjee Vs Respondent: Nirmal Ranjan Mukerjee and Ors.
(i) Property dedicated to and vested in Deity is unalienable if there is a restriction in the Deed of Dedication, and any alienation made in contravention of such restriction is not binding on the Deity
(ii) The Temple, which is the abode of the Deity, is unalienable on any condition, and the other properties vested in Deity may be alienable in the event of legal necessity if there is no restriction in the Deed of Dedication with the prior permission of the concerned District Judge.
उपरोक्त न्याय निर्णयाचा विचार करता देवस्थानाच्या नावे असलेली मिळकत माननीय जिल्हा न्यायालयाच्या परवानगीशिवाय हस्तांतरीत करता येत नाही.
खालील प्रकरणांमध्ये माननीय उच्च न्यायालय अलाहाबाद यांनी देवस्थानाला देण्यात आलेल्या मिळकतीच्या हस्तांतरणाबाबत खालील निरीक्षणे नोंदवली आहेत
Shyamal Ranjan Mukerjee Vs Respondent: Nirmal Ranjan Mukerjee and Ors.
(i) Property dedicated to and vested in Deity is unalienable if there is a restriction in the Deed of Dedication, and any alienation made in contravention of such restriction is not binding on the Deity
(ii) The Temple, which is the abode of the Deity, is unalienable on any condition, and the other properties vested in Deity may be alienable in the event of legal necessity if there is no restriction in the Deed of Dedication with the prior permission of the concerned District Judge.
उपरोक्त न्याय निर्णयाचा विचार करता देवस्थानाच्या नावे असलेली मिळकत माननीय जिल्हा न्यायालयाच्या परवानगीशिवाय हस्तांतरीत करता येत नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by pravin lokhande
23-07-2020
nil.lokhande88@gmail.com
sir me adiwasi (ST ) Ya Category cha asun , mala majha NAP-34 aslela plot sell karaycha ahe..tar sell karnyasathi kahi adchan yeil ka.
Question by श्रीधर दौलत कुताळ
23-07-2020
Shridhar.kutal@gmail.com
सर माझी शेतजमिन चौघे गुंडेगाव ता.नगर.जि.अहमदनगर येथिल गट नं.657 पैकी 48आर क्षेत्र शासनाने पाझर तलावाच्या खोदकामासाठी संपादित केली त्याचा मोबदला मिळाला ते क्षेत्र बुडीत क्षेत्र नाही किंवा पाण्याखाली गेलेले नाही ते क्षेत्र 7/12ऊतार्यावरून किम झाले आज मी या क्षेत्रावर पिक घेत आहे ते शासना कडून मला परत मिळेल का किवा ऊतार्यावर पुन्हा या क्षेत्राची नोंद करता येईल का शासनाचे तसे राजपत्र प्रसिध्द झालेले आहे त्यासाठी मि काय करावे मार्गदर्शन मिळावे हि विनंती
आपले प्रश्नावरून १८९४ च्या भू संपादन कायद्याखाली जमीन संपादन झाली आहे . जमिनीचा संपादन प्रयोजनासाठी वापर झाला नाही तर अश्या जमिनीचा अन्य सार्वजनिक वापरासाठी वापर करण्याचा आहे . अन्य सार्वजनिक वापरासाठी आवश्यकता नसल्यास , जमिनीचा जाहीर लिलाव करण्याचा आहे . त्यामुळे आपणाला जमीन परत मिळणार नाही . तसेच ७/१२ उतार्यावर आपली नोंद करता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रश्मी बागुल
22-07-2020
rashmisbagul@gmail.com
माझ्या आजीची ६ एकर जमीन आहे. आजी गेल्या नंतर माझे वडील आणि काका यांचे नाव लागले आहे. नुकतेच माझ्या काका चे निधन झाले. आता मला काका ची जमीन विकत घ्यायची आहे तर काकाच्या वारसांना मला किती पैसे द्यावे लागतील. Government valuation प्रमाणे की वारसदार मागतील तेवढे. घरातल्या घरात खरेदी विक्री बद्दल काही नियम असेल तर कृपया मार्गदर्शन करावे
हिंदू वारसा कायदा 1956 च्या कलम 22 मध्ये, वर्ग 1 मधील , दोन वारसांमध्ये मिळकतीचे वारसा हक्काने हस्तांतरण झाले असेल व या दोन वारसा मधील एक व्यक्ती मिळकतीतील त्याचा हिस्सा विक्री करू इच्छित असेल तर दुसऱ्या वारसाला तो घेण्याचा प्राधान्याने हक्क असतो.
या हस्तांतरणासाठी मोबदला , घेणाऱ्या व देणाऱ्या व्यक्तीने परस्परांमध्ये निश्चित करावयाचा असतो. जर हा मोबदला निश्चित केलेला नसेल तर मोबदला विकत घेणाऱ्या व्यक्ती च्या अर्जावरून माननीय न्यायालयाने निश्चित करावयाचा असतो.
आपल्या प्रश्नावरून आपल्या काकांची चे वारस आहेत व आपण वर्ग 1 मधील वारस नाही. त्यामुळे अशी मिळकत घेण्याचा प्राधान्याने हक्क आपणाला नाही. त्यामुळे आपणा परस्परांमध्ये ची किंमत निश्चित होईल ही आपणाला द्यावी लागेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by kiran tambe
22-07-2020
kirantambe375@gmail.com
नमस्कार साहेब
१९८० मध्ये फेरफार झाला आहे कि जमिन मालक माझी पणजी यांनी वर्दी दिलेवरून व वर्दी पाहून नोटीस लागू केली .असा शेरा आहे. व त्यानुसार सदर व्यक्तीची कुळ म्हणून नोंद ७/१२ मध्ये आली आहे. पूर्वी पासून हि शेती माझ्याच कब्जावहिवाट मध्ये आहे आणि त्याचा खंडही मीच भरत आहे. तसेच २००९ पासून चे ७/१२ माझ्याकडे आहेत त्यामध्ये त्या व्यक्तीचे नाव ब्रॅकेट आहे .हे त्याला माहित होत व त्यानंतर त्याने मला नोटीस मारली आणि सांगितले कि हि शेतजमीन मी तुमच्या पणजी कडून ३ जानेवारी १९७९ च्या कराराने विकत घेतली आहे तेव्हा तू त्याचे खरेदीखत करून दे.त्याच्या नोटीसला मी सविस्तर उत्तर दिले व त्याला त्या नोटीसच्या माध्यमातून सांगितले कि तू खोटे बनावट दाखले बनवून त्यांचा आधार घेऊन माझी व महसूल खात्याची दिशाभूल करीत आहेत शिवाय सदरील शेतीमध्ये माझा आतापर्यंत कबजावहीवाट आहे. तसेच असा चावटपणा पुंन्हा करू नये . असे झाल्यास आपल्यावर कायदेशीर करण्यात येईल असे त्याला मी नोटीसच्या माध्यमातून सांगितले . त्या नोटीस ला त्याने काही उत्तर दिले नाही. परंतु आता त्याने फेरफार दुरुस्ती करून स्वतःच्या नावाची नोंद करून पुन्हा त्या शेतीमध्ये वहिवाट सुरु केली आहे तरी याबाबत काय करायला हवे.
सहकार्य अपेक्षित
किरण तांबे साहेब नमस्कार
वास्तविक मिळकतीच्या इतर हक्क सदरी असलेल्या कुळांच्या ज्या नोंदी असतात त्या महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 च्या तरतुदीनुसार नोंदी केल्या जातात. आपले मिळकतीला प कूळ म्हणून आपल्या पूर्वअधिकार्यांचे म्हणजे पणजीचे नाव होते. व त्यानंतर आपल्या म्हणण्यांनुसार आपले नाव लागले मात्र खोटे अभिलेख सादर करून दुसर्या व्यक्तीने तिचे नाव कूळ म्हणून लावले असल्याचा आपले म्हणणे आहे.
आपले इतर हक्क मध्ये असलेले कुल हे नाव कमी केलेले आहे ते कोणत्या फेरफाराची आधारित कमी केलेले आहे व त्या फेरफार मध्ये कोणता आदेश नमूद केलेला आहे या दोन्हीचाही प्रमाणित प्रति प्राप्त करून आपले नाव कोणत्या आधारावर कमी केले याचा बोध होईल व तदनंतर पुढील कार्यवाही/ कारवाई करता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अशोक बाबुराव शिंदे
22-07-2020
sunilgavate459t@gmail.com
नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की,आमच्या चुलतयाने तयानचया नावे असलेली वडीलोपरजित जमीन आम्हाला न विचारता दुसरयाला विकली दुसरयाने ति जमीन तिसरयाला विकली तर ति जमीन आम्ही परत कशी मिळवू शकतो? कृपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.
दुसऱ्या व तिसऱ्या व्यक्तीने या मिळकती , वर्तमानपत्रात जाहीर नोटीस प्रसिद्ध करून व मिळकतीचा मालकी हक्क शोध प्रमाणपत्र घेयून खरेदी केल्या असतील तर , दुसरे व तिसरी व्यक्ती , या Bonafide Purchaser for Value without notice स्वताला सिद्ध करू शकतील . त्यामुळे या व्यवहारात त्यांचा काहीही दोष नसल्याने , आपणाला जमीन परत मिळणार नाही .
मात्र या मिळकतीत असणार्या हिस्स्याच्या प्रमाणत मोबदला रक्कम जी चुलत्याने घेतली असेल ती व्याजासह आपणाला न्यायालयात दावा दाखल करून मिळू शकेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संदीप पतांगे
21-07-2020
sandeep.patange111@gmail.com
Hii
सर नमस्कार
सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी - कुळ कायद्याने प्राप्त जमीन आसा शेरा 7/12 वर आहे कसे काढता येऊ शकेल व किती खर्च यईल या बद्दल माहिती मिळेल काय
Question by संदीप पतांगे
21-07-2020
sandeep.patange111@gmail.com
Hii
सर
नमस्कार सर जमीन कुलकायदा ने मिळालेली आहे 25 गुंठे क्षेत्र आहे त्या पैकी 12-५० गुंठे क्षेत्र ती जमीन चुलत बहीण सख्या काकाची मुलगी आपल्या चुलत भावाच्या नावे करण्याचा विचार केला आहे पण कसे करता येऊ शकते . दान पत्राने करता येऊ शकेल काय , काय करावे लागेल, किती खर्च येऊ शकेल ,माहिती मिळेल काय .
त्यांना ते क्षेत्र विकावे लागेल . मुद्रांक शुल्क १२.५० गुंठे क्षेत्राच्या शीघ्र सिद्ध गणक दर तक्त्यातील बाजार मूल्याच्या ५% दराने भरावे लागेल . तसेच मोजणी फी
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सिताराम फलके
20-07-2020
sphalke1955@gmail.com
मला सात बाऱ्या प्रमाने जी जमीन आली आहे तीची मोजनी करावयाची आहे.पण त्या गटात भावाच्या वारसाची नावे आहेत. ते मोजनी अर्जावर सह्या करीत नाहीत. व महसुलवाले सांगतात सर्वांच्या सह्या पाहिजेत. अन्यथा कोर्टात जा. तरी मी काय करावे
नवीन शासन निर्णयानुसार , आपल्या एकट्याच्या अर्जावरून मोजणी होऊ शकते .
मात्र तो शासन निर्णय आपणाला महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावरून घ्यावा लागेल . माझ्याकडे उपलब्ध नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by धनचंद सुखलाल परदेशी
20-07-2020
dspardeshi55@gmail.com
माननीय श्री साहेब
शहर तील मालमत्ता पत्रक वर ची जागा ची लांबी रुंदी आणि प्रत्येकक्षात मोजल्यावर जागा ची लांबी रुंदी जास्त भेटत आहे. उदाहरण - मालमत्ता पत्रक वर जागा - ३०' १२' व प्रत्येकक्षात मोजल्यावर जागा - ३०' २२' भेटतं आहे काय करावे लागेल
तुमच्या उत्तराची अपेक्षा आहे.
क्षेत्र दुरुस्ती अर्ज जिल्हाधिकारी /अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by जालिंदर बाबुराव सिरसट
20-07-2020
jalindar.b.sirsat@gmail.com
महोदय, मी बीड जिल्ह्यातील शेतकरी असून माझे नावे 64 गुंठे तुकडेबंदी कायदा लागू होण्याच्या पूर्वी प्राप्त झाली आहे . सदर शेतजमीन भोगवटा वर्ग ०१ असून जिरायती जमीनचे प्रमाणभूत क्षेत्र दोन एकर आहे मला त्यातील 20 गुंठे विकायची आहे सदर व्यवहार झाल्यास कायद्याचं उल्लंघन होऊ शकते का ?याबाबत सविस्तर माहिती देण्यात यावी.
६४ गुंठे क्षेत्र म्हणजे अगोदरच तुकडा आहे . विकण्याचा प्रयत्न करू नये . सदरचा व्यवहार नोंदणीकृत होऊ शकणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by जालिंदर बाबुराव सिरसट
20-07-2020
jalindar.b.sirsat@gmail.com
महोदय, माझ्या वडिलांनी त्रेचाळीस गुंठे शेतजमीन एका शेतकऱ्याने शेतकऱ्याकडून भोगवटा वर्ग वनची विकत घेतली आहे. सदर शेतकऱ्याकडे वारस हक्काने शेतजमीन प्राप्त झाली होती. माझ्या वडिलांना सदर शेत जमिनीचे सर्व क्षेत्र सर्वांच्या सहमतीने विकले असताना एका व्यक्तीच्या नावे काही गुंठे दाखवण्यात आले होते. त्याचा फायदा घेत त्या वारस व्यक्तीने तेवढे क्षेत्र दुसऱ्या व्यक्तीला विकले आहे सदर व्यक्तीचे नाव सातबारा वरून कसे कमी करावे याबाबत सविस्तर माहिती देण्यात यावी
७/१२ वर जेवढे क्षेत्र नमूद आहे , तेवढ्याच क्षेत्र खरेदी दसतात नमूद करण्यात आले असेल तर , महाराष्ट्र जमीन मह्सील अधिनियम १९६६ च्या कलम १५५ अन्वये दुरुस्तीचा अर्ज मेहेबन माम्लेतदार यांचेकडे करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by श्री.चंदन रमाकांत म्हात्रे.
19-07-2020
Chandanmahtre 2727@gmail.com
माझ्या आजीची आई हि मौजे राई,जिल्हा ठाणे येथील, तेथील वडीलोपजित जमिनीवर ५ भाऊ व २बहिणी वारस होते. पण ५ भावाने वडील वारल्यानंतर ७/१२ ला भावाची नोंद करून २ बहिणीची नोंद केली नाही., आजतागत भावाची नावे ७/१२ सदरी आहेत तरी २ बहिणीचा अधिकार लागतो का?? व त्या साठी कुठे अपील करावा ते सांगावे.
हो बहिनान अधिकार आहे . त्यांचे नाव लागणे आवश्यक आहे . ज्या फेर्फाराने केवळ भावांची नावे लागली आहेत त्या विरुद्ध अपील दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुहृद वाघ
19-07-2020
shswaghmode@gmail.com
सर नमस्कार, माझे आजोबांचे नावे 1970 सालापर्यंत 16 एकर क्षेत्र सर्वे नं 22 मध्ये होते. त्यामध्ये 20 गुंठे वस्तीपड होती व 12 खोलींचे घर होते. सन 1971 साली आजोबांनी 4 मुलांच्या नावे प्रत्येकी 4 acer क्षेत्र केले फक्त खातेफोड केली. व वस्तीपड जागेची प्रत्येकी 5 गुंठे सर्वे नं 22 सातबारा वरती नोंद केली, परंतू 1973 साली सर्वे नं 22 चे चार गट चार मुलांचा हिस्सा नुसार अनुक्रमे 75,76,77,78 पडले. सदर वस्तीपड 20 गुंठे हि गट नं, 75 मध्ये आहे. सदर गट नं पडल्यानंतर वस्तीपड जागेची नोंद गट नं 75 च्या मुलाने परस्पर रद्द केली. सदर जागेत उर्वरित 3 मुलांचे घर आहेत व त्याची ग्रामपंचायत मध्ये नोंद आहे. व ती घर गट नं 75 चा मुलगा पाडत आहे. तर उर्वरित 3 मुलांनी काय करावें . कृपया मार्गदर्शन करावे.
अधिकार अभिलेख पत्रकी ( ७/१२ चा न न १२ ) ला केवळ पिकांच्या नोंदी घेतल्या जातात . त्यामुळे त्याठिकाणी वस्तीपड नोंद घेणे अभिप्रेत नाही . आपल्या घराची नोंद ग्रामपंचायत अभिलेख सदरी आहे हे पुरेसे आहे . आपला हक्क त्यामुळे जतन होत आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by इरफान गुलामअली शेख
18-07-2020
irfaan.shaikh313@gmail.com
नगर परिषद हद्दितिल विकास आराखड़ा मंजूर झालेल्या ७/१२ ला बागायती शेती म्हनून नोंद असलेली शेतजमिन जिल्हाधिकारी यांच्या परवानगी शिवाय शेतकरी नसलेल्या शिक्षण संस्थेला बक्षीसपत्र करुन देणे विधिअग्राह्य असेल काय ? याबाबत मार्गदर्शन करावे.
हो निच्छित . महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ६३ - ( 1C) नुसार , नगरपालिका हद्दीत स्थित जमिनीला कलम ६३ च्या तरतुदी लागू होत नाही . त्यामुळे शिक्षण संस्थेला बागायती शेत जमीन हस्तांतरण करता येईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by जालिंदर बाबुराव सिरसट
17-07-2020
jalindar.b.sirsat@gmail.com
तुकडेजोड व तुकडी बंदी कायद्यानुसार शेत जमिनीचा व्यवहार झाल्यास कीती दिवसांत तो व्यवहार रददबातल होतो
सध्या परिस्थितीत जमिनीचा तुकडा पडत असेल तर अश्या जमिनीचे दस्त नोंदणीकृत होत नाही .
तसेच अश्या जमिनीचे नोंदणीकृत दस्त झाल्यास , व्यवहार रद्द होत नाही तर , खरेदी खत निष्फळ होते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by ज्ञानेश्वर अंतरकर
17-07-2020
Dnyaneshwarantarkar1844@gmail.com
सर, सर्व्हे नंबर २७ मध्ये १२एकर १२ गुंठे मुळ शेतकऱ्याच्या नावे होती.त्यातील आजोबांनी (१९६५)लावला ६ एकर जमीन विकत (खरेदी) घेतली आहे.त्याची सातबारा नोंद लावला करण्यात विलंब झाला.नंतर त्या शेतकऱ्यानी शिल्लक राहिलेली जमीन xy व्यक्तीला (१९६७)ला ६एकर १२ गुंठे विकली .गट एकत्रीकरणामध्ये गट नंबर ११५ मध्ये आजोबांच्या नावे ३ एकरची नोंद झाली वxy व्यक्तीच्या नावे ६एकरची १२ गुंठे नोंद झाली. आज फक्त गट ९एकर १२गुंठे आहे. तर ३ एकर जमीन ही तिसऱ्या व्यक्तीच्या नावाने झाली आहे . तिसऱ्या व्यक्तीच्या नावाने त्याची मुळं जमीन कमी आहे . तसेच भुमी अभिलेख विभागात जाऊन पाहणी केली व प्रत घेतील आहे तर ३ एकरची कशाप्रकारे नोंद करण्यात येईल.कारण गट एकत्रीकरण मधील चुक दुरुस्त करण्यासाठी कोणाकडे अपील करावे कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत कायद्या अंतर्गत दुरुस्तीची तरतूद नाही . केवळ पूर्ण योजना ( Scheme) हि सदोष , अयोग्य असेल किंवा लेखन प्रमाद चूक अथवा गणितीय चूक असेल ज्यामुळे , पूर्ण योजनेवर कोणताही परिणाम होणार नसेल तरच दुरुस्ती होते . आपली चूक दुरुस्त होणे अशक्य वाटते . शिवाय मुदतीच्या कायद्याची बाधा हि आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दिपाली आजवेलकर
16-07-2020
dipalee747@gmail.com
ज्या गावात आम्ही राहतो तीथे 7 पिढ्या गेल्या असून 1गुंठा जमिन आमच्या मालकीची असून त्या जागेचा कर आम्ही भरतो.त्या जागेत मूळ घर आहे पण अंगणासमोरील 1 गुंठा जागा जमिन मालकाने पुवॆंजाना तोंडी दिली होती त्या जागेत आमचा 30 वषाॆंपासून वावर आहे आणि आमचा वडीलोपाजिॆत गोठा त्याठीकाणी 30 वषाॆंपासून आहे .पण आमच्याकडे कागदोपञी काही पूरावा नाही.आणि आता आमच घराच बांधकाम चालू आहे आम्ही घर 10 फूट पूढे घेत आहोत पण जमिन मालकाने घर बांधकाम अडवले आहे घर मागे घेन्यास सागत आहे तर अंगणासमोरिल जागा कूळ कायद्याने ताब्यात कशी घेता येईल? 100 रू. च्या bondpaper त्याने लिहून दिले होते पण नोटरी नाही आमच्याजवल..मागॆदशॆन करावे.
आपली जागा अथवा घर हे गावठाण जागेत असेल व आपण त्या जागेवर गेले ७ पिढ्या राहत असाल तर अन्य दुसरा मालक कसा असू शकतो ? ग्रामपंचायत अभिलेख तपासून घ्या . त्यामध्ये आपल्या घराच्या पुढील जागेला , आपल्या पूर्वजांची नावे असतील तर , दुसर्या कोणाशी आपणाला अडवण्याचा अथवा आपल्या प्रस्तावित बांधकामास अडथला करण्याचा अधिकार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by ज्ञानेश्वर अंतरकर
14-07-2020
Dnyaneshwarantarkar1844@gmail.com
सर नमस्कार
सर्वे नंबर ३७ मधील एकुण जमीन १२एकर १२ गुंठे तर त्यातील ६ एकर जमीन आजोबांनी १९६५ लावला विकत घेतली आहे.उरलेली जमीन दुसऱ्या शेतकरी यांनी १९७२ लावला ६एकर१२ गुंठे घेतली आहे.तर गट एकत्रीकरणामध्ये आजोबांच्या नावे ३ एकरची नोंद झाली आहे.आज गटामध्ये ९ एकर१२ गुंठे नोंद आहे. तर ३एकरची नोंद होऊ शकते का? त्यासाठी अपील कोणाकडे करावी.
अपील करून काही उपयोग नाही . जमीन एकत्रीकरण यामुळे गटाची बांधणी / रचना , जमिनीच्या उत्पादकतेच्या अनुषगाने व पूर्वजांनी दिलेल्या संमती मुले झाली आहे . महाराष्ट्र धारण जमिनीचा एकत्रीकरण करण्याचा व तुकडे पडण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम , या मध्ये एकत्रीकरण योजना या विरुद्ध अपील करण्याची तरतूद नाही . एकत्रीकरण योजना प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर लगेच हरकत घेणे आवश्यक होते .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3400 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
