जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

मा. किरन सर, नविन अविभाज्य शर्त भोगवटदार वर्ग 2 शेतजमिनीत कूकुट्टपालन करने करिता परवानगी संबंधी माहिती द्यावी हि विनंती
कुक्कुट पालन व्यवसाय हा शेती समजला जातो .
त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही .मात्र कुक्कुट पालन शेड साठी नियोजन अधिकारी यांची विकास परवानगी लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Kishor Rokade
25-08-2019
sagaradipune@gmail.com

माझा प्रश्न: माझे आजोबा कुलकर्णी इनाम जमिनी ला कुळ होते. नंतर तेहसिल दार यांनी ३२ ग या इनाम जमिनीला लागू नसलेले कलम अंतर्गत चौकशी करून कुळ बेदखल केले. परंतु त्या पूर्वीही आणि त्या नंतरही शासकीय खंड भरून ती जमीन आजोबा वहिवाट करत होते ७/१२ सादरी तशी नोंद आहे. १९७२ ला मा. प्रांत साहेबांनी ऑर्डर काढून आजोबांना व बाकी इतर जणांना कब्जे हक्काची रक्कम भरण्यास सांगितली ऑर्डर तेहसील दार साहेब यांच्या नावे होते मूळ ऑर्डर ची प्रत आमच्याकडे आहे. ऑर्डर मध्ये आजोबांचे नाव कुळ म्हणून दाखल करण्यात यावे असा स्पष्ट उल्लेख आहे. परंतु तशी काही कार्यवाही त्यांनी पुढे केली नाही.
१९७९ ला आजोबांनी तहसील दारंच्य परवानगी ने कब्ज हक्काची रक्कम भरली परंतु अजनाते पणी पुढील कार्यवाही करायची राहून गेली तरी आजोबा तिथून पुढे त्याचा प्रत्येक वर्षी त्याचा खंड भरत होते तशा पावत्या आहेत.
पुढे जाऊन वडिलांनी त्या जमिनीची मागणी केली ती मागणी प्रांत साहेबांनी मान्य करून त्या कारणी बुडीत खंडाचे २० rs चालना द्वारे भरून घेतले व तहसील दारांना पुढील कार्यवाही करून अहवाल त्वरित सादर करायला सांगितला.
तहसील दारांनी ती फाईल खूप वर्ष कोणतीच कारवाई न करता स्वतः कडे ठेवली खूप पाठपुरावा करून देखील उत्तर मिळाले नाही लेखी अर्ज करता फाईल गहाळ झाली वाळविणे खाल्ली असा शेरा देण्यात आला.
पुन्हा परत जमीन नावे करण्या कामी अर्ज केला असता कोणतीच कारवाई न करता चुकीच्या पद्धतीने बेदखल केलेल्या कुळाचा हवाला देण्यात आला परंतु नंतर च्यां प्रांत साहेबांच्या कुळ दाखल करण्याच्या ऑर्डर कडे लक्ष दिले नाही पुरेस म्हणणं ऐकून घेतले नाही.
पुढे जाऊन वडिलांनी परत प्रांत साहेबांकडे मागणी केली असता त्यांनी खूप वेळ झाला असा निकाल दिला.
वास्तविक आजोबा त्या जमिनीचे कुळ आहेत याकडे लक्ष दिले नाही.
प्रांत साहेबांच्या निकालाच्या २० दिवसात मूळ वतनदार की ज्याने १९४८ पासून कधीच जमिनीचा भोगवटा केला नाही किंवा कसलेच भोगवटा मूल्य कधी शासन दरबारी जमा केले नाही अश्या इसमाने तहसील दारांकडून स्वतः नावे ऑर्डर करून घेतली. व त्या आधी १ वर्षा पूर्वी एका इसमाला सरकारी अकरि पड शेरा जमिनीवर असताना साठे खत करून दिले.
आम्ही काय करावे आमचं सर्व कुटुंब त्या जमिनीवर अवलंबून आहे.

आपले उत्तर: As per Bombay Pargana and Kulkarni Watan (Abolition) Act १९५१ च्या कलम ८ नुसार , कुलकर्णी वाटण जमीन निर्धारित दिनांकास , त्रयस्थ व्यक्तीस कायदेशीर रित्या कसण्यासाठी दिली असल्यास , अशी मिळकत /जमिनीस , मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या तरतुदी , कुल व जमिनीच्या धारकास त्यांचे हक्क व जबाबदारी संदर्भात लागू असतील .
आपले जमिनीचे कुल असल्याचे प्रांत साहेबांनी जाहीर केले होते . केवळ त्यांचे नाव ७/१२ सादरी दाखल केले नाही म्हणून , आपला कुल मी हणून असलेला हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही . तहसीलदात यांचे आदेश आवाहणीत करा . ( अपील करा )
मात्र आपले प्रश्नात आपण नमूद केले आहे कि , जमीन सरकारी नोकरी पड असताना , , साठे खत करून , त्रयस्थ पक्ष हिट संबंध निर्माण केले .
जर आपले आजोबा या जमिनीचे कुल होते व जामीन कस्त होते तर जमीन पड म्हणून कशी नोंद झाली? आजोबांनी जमीन कसली नाही का ?
तहसीलदार यांनी पूर्वाश्रमीचे वतनदारास ५ वर्षे होऊन गेल्यानंतर ( हा कायदा अमलात आल्या नंतर ) पुनर्प्रदान कशी केली ? हा तहसीलदार यांचा आदेश अहवानीत करा

आपण विचारलेले प्रश्न: जमीन अकरी पड कशी झाली?
उत्तर: kulkarni vatan abolition act नुसारच झाली 1958 सालाला तसा फेरफार आहे. 1966 सली adiitional मामलेदारानी 32ग अंतर्गत चौकशी करून इनाम वतन जमिनीला 1957 ला सदर जमिनीस कुळकायदा लागू नाही सबब कुलांचे इतर हक्कातून नाव कमी केले. त्यानंतर 1972 ला प्रांत साहेबांनी ऑर्डर काढून त्या जमिनी वहिवाट दाराच्या नावे करण्यास सांगितले होते व
७/१२ ला इतर हक्कात नोंद घ्यायला सांगितले होते. तशी काही नोंद घेतलीच नाही.
आपला प्रश्न: आजोबांनी जमीन कसली नव्हती का?
उत्तर: सदर जमीन आजही मी माझ्या कुटुंबासह कसत आहे.

मूळ वतन दाराची regrant order मी पाहिली आहे त्यात त्याने खोटे प्रतिज्ञा पत्रक करून तो जमीन कसत आहे असे सांगितले. व आमचे कुळ बेदखल केले आहे हे त्यात नमूद केले.
आम्ही जमीन कसत असून देखील 2012 ते 2016 पर्यंत तलाठी यांनी पीक पाहणी ला आकरि पड अशी नोंद केली आम्ही हरकत घेतली असता जमीन सरकारची आहे असं सांगितले.
खोट्या प्रतिज्ञा पत्रविषयी काय काय कारवाई करता येईल.
आणि जमीन आकारि पड असताना register साठे खत कसे काय केले असेल.?
तहसीलदार यांचे आदेश हवनीत करा
३२ ग (६) अन्वये , जमीन मूळ वतनदारास पुनर्प्रदान करण्यापासून एखादा कुल जमीन कसत असेल तर , अश्या कुळांना सौरक्षण आहे . अश्या कुळाचे नावे जमीन ३२ ग किंमत निश्चित होऊ शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by सुरेश
25-08-2019
sushilk22@gmail.com

सर मिळकत पत्रिकेला सामाईक वारस नोंद आहे पण ग्रामपंचायत नमूना न 43 ला एकाचे नाव आहे त्यावेलेस वडिलांनी भूमिअभिलेख ला वाटणीपत्र न करता ग्रामपंचायत ला केले आहे 100 रु चे बोंड वर
आता माझ्या भावांनी हिस्सा मागीतल्यावर मि त्यांचे नाव ग्रामपंचायत ला लावायला अडवू शकतो का pr card सामाईक लागले आहे पण ग्रामपाच्नायात रेकॉड ला माझे नाव 30 वर्ष पूर्वी लागले व त्या सगळ्या वारसांच्या संमतीने लागले आहे पण त्यांनी आता pr कार्ड ला वारसा केला आता मि काय उपाय करू शकतो कि जेणे करून माझे भाऊ हिस्सा मागणार नाहीत
अशे करणे योग्य नाही
आपला भावाचा हिस्सा मिळकत पत्रिकेत नोंदवला आहे .
आपण ग्राम यांच्यात अभिलेख या मध्ये नोंदवण्यास विरोध केला म्हणून काही फरक पडणार नाही .ग्राम पंचायतीकडे अभिलेख हा केवळ कर संकलनापुरता मर्यादित आहे . त्यावरून मालकी हक्क सिद्धह होत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

ग्रामपंचायतीची परवानगी न घेता बांधकाम केल्यास कोणत्या प्रकारची कार्यवाही होते? जर दंड भरला तर पुढे बांधकाम नियमित होईल का?
केवळ गावठाण मध्ये बांधकाम करावयाचे असल्यास , ग्राम पंचायत परवानगी देऊ शकते . अनधिकृत बांधकाम जर बांधकाम नियंत्रण नियमावली नुसार नियमानुकूल होत असेल तरच , ते नियमानुकूल होऊ शकते . अन्यथा बांधकाम दूर करावे लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी राधिका मोरे बोलत आहे.माझा प्रश्न असा आहे की
1) माझे काका शेतकरी नाहीत.त्यांनी 2001 साली ग्रामपंचायत हद्दीत
भोगवटादार वर्ग 1 शेतजमीन खरेदी केली होती त्यांचा व्यवहार सन २०१६
चा अधिनियम क्रमांक 20 प्रमाणे दंड आकारून नियमित होऊ शकतो का ? सध्या जमीन नगरपंचायत हद्दीत आहे.परंतु नगरपंचायतीचा विकास आराखडा अजून तयार झाला नाही.
2) सरकारी नोकरी असलेल्या व्यक्तीला शेतकरी दाखला मिळू शकतो का ? सरकारी नोकरी करणार्‍या व्यक्तीचे वडील यांची वडिलोपार्जित शेतजमीन असून ते शेती करतात.
3) संभाव्य बिनशेती म्हणून एका शेतकरयाकडून रस्त्याच्या हक्कासहीत शेतजमीन खरेदी केली असल्यास ती जमीन आता अधिकृत निवासी बिनशेती होऊ शकते काय ?
4) संभाव्य बिनशेती खरेदी म्हणजे काय ?
कृपया प्रश्नांची उत्तरे द्यावीत ही विनंती.
१. व्यक्ती शेतकरी नसेलतर जमीन खरेदी करू शकत नाही . २०१६ अधिनियम नुसार जमीन व्यवहार नियमित होऊ शकत नाही
२. होय
३. जर जमीन गावठाण हद्दी पासून ५०० मीटर हद्दीत असेल तर , जमीन मानीव बिन शेती आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या मुलाचा जन्म 2018 मध्ये झाला आहे तरी त्याचा दाखला काढलेला नाही काढायचा आहे त्याच्यासाठी प्रोसिजर काय
प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मला २०१६ मधील ८४ क संधर्बातील शासन निर्णय कोठे मिळतील .
महाराष्ट्र्र शासनकजे संकेत स्थळावर नवीन कायदा सुधारणा आहेत
Google वर , महाराष्ट्र्र शासन निर्णय तुपे करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

साहेब माझा प्रश्न पुढीलप्रमाणे आहे माझी आजी गावच्या ठिकाणी 1985 / 86 निधन पावली. तेव्हा तिच्या मृत्यु ची नोंद केल्याची ग्रामपंचायत मध्ये कल्पना नाही. तरी तिचे सातबारावरील नाव अजून प्रयन्त तसेच आहे ते आम्हाला कमी करायचे आहे तलाठी साहेब मृत्यु दाखला मागत आहे आणि तो आमच्याकडे नाही तर आता आम्ही आमच्या आजीचे नाव सातबारावरून मृत्यु दाखल्या शिवाय कसे कमी करू शकतो याचे मार्गदर्शन करावे हीच नम्र विनंती
प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे कडे अर्ज करा . JMFC मृत्यू नोंद दिनांक जाहीर करतील . त्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्थेत मृत्यूची नोंद होईल व आपणास मृत्यू दाखला मिळेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Imran Tamboli
22-08-2019
itamboli209@gmail.com

मालकी हक्काचा पुरावा खालीलपैकी कोणता आहे
सिटी सर्व्हे उतारा की ग्रामपंचायत 8 अ उतारा
हे दोन्ही हि मालकी हक्काचे पुरावे नाहीत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by सुशील
20-08-2019
sushilk22@gmail.com

नमस्कार सर
मी परळी येथील रहिवाशी असून माझ्या आजोबाच्या नावावर pr कार्ड ला मोकळी जागा होती त्यांना 8 मुले होते त्यांनी 1993 ला माझ्या वडिलांच्या नावावर ग्रामपंचायत कार्यालय नमुना 8 ला काही जागा नावे करून दिली नंतर त्या जागेवर वडिलांनी घर बांधले पण काही वर्षात त्यांचा मृत्यू झाला नंतर ते घर ग्रामपंचायत ला वारसा आधारे माझ्या नावावर झाले पण pr कार्ड वर आजोबाचीच नोंद आहे तर माझ्या वडिलांनी बांधलेल्या घरावर कोणी दुसरा हिस्सा मागू शकतो का pr कार्ड आधारे व जर pr कार्ड ला नोंद करायची असल्यास ती कशि होईल?
आजोबानी कि त्यांचे इतर वारसांनी आपले वडिलांचे नावावर जमीन करून दिली ?
जमीन नावावर नोंदणीकृत दस्त द्वारे करून दिली कि केवळ अनोंदणीकृत दस्त द्वारे ग्राम पंचायत रेकॉर्ड ला नाव दाखल झाले ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय,
मी नितीन दत्तात्रय साळुंके राहणार कविटखेडा तालुका वैजापुर जिल्हा औरंगाबाद
आमची जमीन पंचवीस वर्षांपूर्वी चुलत आजोबांनी ३ हिस्सा मध्ये वाटली होती .माझ्या आजीच्या नावे चार एकर अजून आजीच्याच नावे आहे पण जी पंचवीस वर्षांपूर्वीची चुलत आजोबांनी वाटणी केली होती त्यामध्ये मला एक एकर जमीन कमी दिल्या गेली ,ती जमीन आता ते त्यांच्या नावे आहे (आजीची सोडून)आणि मला जमीन हलकी पण दिली गेली त्यासाठी मी आता मागणी करत आहे पण आता मला उडवाउडवीची उत्तरे मिळत आहे. त्यासाठी मी काय करू.
आजीच्या नावे जमीन आहे तिच्यावर स्टे ऑर्डर आणू असा विचार चालू आहे
तर यासाठी मार्गदर्शन करावं अशी विनंती.
आपण न्यायालयात जाऊन आपला हिस्सा व जमिनीचा ताबा मिल्ने बाबत दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Dada moin
18-08-2019
Dadapmoin123@gmail.com

नमसकार सर आपली माहीती माझ्यासाठी फार महत्त्व पुर्ण आहे,
गट रस्ता संदर्भात माझ्या शेतात जाण्यासाठी तहसीलदार यांनी 143 नुसार रस्ता मंजूर केला आहे त्यानंतर अपील झाले उपविभागीय अधिकारी त्यांनी देखील तहसीलदार याचा आदेश कायम केला आहे त्यानंतर पुन्हा अपील अप्पर जिल्हाअधिकारी यांचेकडे दाखल झाल्यानंतर त्यांनी देखील तहसिलदार याचा आदेश कायम ठेवला आहे त्यानंतर प्रकरण दिवाणी न्यायालयात गेले त्यांनी देखील निकाल माझ्या बाजूने दिला आहे . तरी देखील माझा रस्ता मोकळा झाला नाही माझी शेत जमीन गेल्या 10 वर्ष पडीत आहे .tahsildar कोणतीही कारवाई केली जात नाही तर सर रस्ता मोकळा करण्यासाठी काय करावे लागेल. आता तर समोरील माणसाने जीतून रस्ता मंजूर केला आहे तेथें त्या बांदाच्या एकाकडेला कडेला रस्त्यावर घर बांदले आहे तरी सर मला योग्य सल्लाह द्यावे ही नम्र विनंती.
दिवाणी न्यायालयात निकालाचे अनुषंगाने Execution proceedings दाखल करा . न्यायालयामार्फत रस्ता देणे बाबत आदेशित करेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Shankar
18-08-2019
Shankarbkakade@Gmail com

मा. महोदय वनविभागातील अधिकाऱ्यांनी वनक्षेत्रात गुरे चरण्यासाठी मनाई केली आहे,, गावात दुसरे कुठे राखीव गुरचारण जमीन नाही तर, कायमस्वरूपी गुरेचारण्यासाठी जमीन मिळणेसाठी काय करावे लागेल,, 2) राखीव वनजमिन शेती साठी व बांबू लागवड, फळबाग, देशी वृक्ष लागवड करून पर्यावरण शुद्ध राहावे, इत्यादी गोष्टींसाठी हवी असल्यास , पाणबुडे साहेब मार्गदर्शन करावे , ही आपणास विनंती,,
सर, मी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ३२ अन्वये माझ्या क्षेत्रालगत तयार झालेली मळई जमीन मिळणेकामी महसुल उपजिल्हाधिकारी यांचे कडे सन २०१५ मधे अर्ज केला आहे.
नदी पात्राच्या पलीकडील लोकांचे माझ्या ताब्यातील मळई जमीन त्यांना मिळण्याचे अर्ज कलम ३२ अन्वये फेटाळले आहेत. त्यामुळे
अर्जाच्या अनुषंगाने आज पर्यंत सुमारे ४ वेळा स्थळपाहणी झाली आहे. सर्व रिपोर्ट नुसार मळई जमीन माझ्या गटालगत आहे.
मी कलम 32,33 तसेच महसुल परिपत्रक क्रमांक 5 दिलेले आहे. माझा पुर्ण अर्ज कायदेशीर आहे. परंतु दुर्दैव असे आहेत की वाळूमाफिया आणि त्यांचा वाली असणारा स्थानिक आमदार हे सर्व महसुल कलेक्टर बरोबर हातमिळवणी करून बसले आहेत त्यामुळे माझा अर्ज मुद्दाम प्रलम्बीत ठेवला आहे.
काय करू मी आता इथे कुंंपणच शेत खात आहे.
प्रकरणावर केवळ विहित मुदतीत निर्णय घेणे बाबत आपण उच्च न्यायालय कडून रीत याचेकेद्वारे आदेश घेऊ शकता . मात्र सदर मलाई जमीन आपणासच द्यावी अशे आदेश उच्च न्यायालय देऊ शकत नाही .
जमीन प्रदान करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत . या बाबत आपण जिल्हाधिकारी यांना भेटा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, मी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ३२ अन्वये माझ्या क्षेत्रालगत तयार झालेली मळई जमीन मिळणेकामी महसुल उपजिल्हाधिकारी यांचे कडे सन २०१५ मधे अर्ज केला आहे.
नदी पात्राच्या पलीकडील लोकांचे माझ्या ताब्यातील मळई जमीन त्यांना मिळण्याचे अर्ज कलम ३२ अन्वये फेटाळले आहेत. त्यामुळे
अर्जाच्या अनुषंगाने आज पर्यंत सुमारे ४ वेळा स्थळपाहणी झाली आहे. सर्व रिपोर्ट नुसार मळई जमीन माझ्या गटालगत आहे.
मी कलम 32,33 तसेच महसुल परिपत्रक क्रमांक 5 दिलेले आहे. माझा पुर्ण अर्ज कायदेशीर आहे. परंतु दुर्दैव असे आहेत की वाळूमाफिया आणि त्यांचा वाली असणारा स्थानिक आमदार हे सर्व महसुल कलेक्टर बरोबर हातमिळवणी करून बसले आहेत त्यामुळे माझा अर्ज मुद्दाम प्रलम्बीत ठेवला आहे.
काय करू मी आता इथे कुंंपणच शेत खात आहे.
tenancy act...protected tenanants right was not recorded till 1957....the land transfered to salt deptt in the year 1953....limitation of claiming deemed purchasers right is valid afterwords is it possible?...the same land was not utilised for the purpose for which was acquired..in the year1982 same land transfered to CIDCO....till date cidco has not utilized land..the same was transfered to New mumbai corporation...a piece of 5 acres is utilised by nmmc...rest is not utilised for development any kind till date...can we claim the PROTECTED TENANTS right 32g..now?...now LAQ officer says your are liable to have claim of 12.5p.c.benifits..as per nmmc.norms..is it possible to have all land to back to P.T.?would like to meet you for cosultation...reply your availability..comming accordingly...thanks,regards....inamdar.
your right as a protected tenant is not recorded. Then how you can claim that you are deemed purchaser ? Before such claim is made , you need to be recorded as protected tenant in revenue record . However land has been transferred to salt Department which has been transferred to CIDCO . At this stage you cannot claim to be tenant and deemed purchaser

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

ग्रामपंचायत हद्दीत संभाव्य बिनशेती म्हणजे काय ?
एक शेतकरी जर त्याची 6 गुंठे जिरायत शेतजमीन संभाव्य बिनशेती म्हणून विकायला तयार आहे मला ती शेत
जमीन निवासी कारणासाठी घ्यायची आहे परंतु मी शेतकरी नाही आणि माझ्या नावावर कोणतीही शेतजमीन नाही.सदर शेतजमीन खरेदी करावी काय ?
संभाव्य बिनशेती संकल्पना हि शीघ्र सिद्ध गणक म्हणॆ नोंदणी विभागाने दरवर्षी , जमिनीचे बाजार मला काय याची प्रसिद्ध केलेली सूची .
संभाव्य बिबशेती म्हणजे अशी जमीन बिनशेती झाली आहे असा नाही .
कुल कायद्याच्या कलम ६३ प्रमाणे जमीन खरेदी करणारा शेतकरी असणे आवश्यक आहे .

तथपि २०१६ मधील , कुळकायदा सुधारणा कायद्या नुसार , जमीन रहिवासी , वाणिज्य अथवा औद्योगिक वापर विभागात ( झोन ) स्थित असेल व तिचा वापर या उपरोक्त कारणासाठी करण्याचा असेल तर तर शेतकरी असण्याची आवश्यकता नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जमिनीचे एकत्रीकरण झाल्या नंतर दोन्ही खातेदाराला समान जमिन मिळते काय?
म्हणजे त्यांचा एकत्रीकरणाच्या अगोदरची जमिन त्यांना परत मिळते की पू्रण जमिनीत दोघांचा समान हक्क पडतो
एकत्रीकरण प्रक्रिया हि जमिनीच्या उत्पादकतेवर अवलंबून असते . मात्र जे क्षेत्र प्रमाण दुसर्यास गेले आहे तेवढजेच क्षेत्र प्रमाण देण्याचा प्रयत्न केला जातो . मात्र जर दोनीही जमिनीत ( जाणाऱ्या व आपणास येणाऱ्या ) उत्पादकता भिन्न असेल तर , मिळणारी जमीन कमी क्षेत्राची असू शकेल अथवा जादा क्षेत्राचीही असू शकेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदिम जाती कल्याण विभाग व जनपद जमिनी स्थानिक स्वराज्य संस्था कडे हस्तांतरित केल्याचा शासन निर्णय किंवा परिपत्रक मिळणे आवश्यक आहे. पंचायत समिती च्या कोर्ट केस साठी आवश्यकता आहे.
मालमत्ता कार्डा मधील सत्ता प्रकार अ, ब आणि क महणजे काय, तो कशा प्रकारे बदलतात
जमिनीला कुळ लावन्याअगोदर जमीन मालकाच्या जातीचा विचार करण्यात येतो का व कुळ लावण्या अगोदर अशाप्रकारचा काही कायदा आहे का किवा त्याविषयी विचार केला जातो का ?
Respected sir me sheti kharedi keli ahe tya shetivar adhiche malkache pik karj ahe sadar Malak karj bharnyas nakarat ahe talathi yanche Kade nondani karne karita kharedi dili parantu 2 mahine Zale Tari nondani zali nahi krupaya marg Darshan karave hi vinanti tasech satbaravar adhiche malkache karj asatana va tyane ti vikali asatana navin shet ghenarache navane nondani karata yet nahi ya prakaracha kahi shasan nirnay asalyasa tyachi mahiti dyavi hi vinanti
जामिनावर परत फेड न केलेल्या कर्जाचा बोजा आहे म्हणून नोंद प्रलंबित ठेवता येत नाही . तलाठी यांने २ महिने होऊन गेले आहेत , नोंद तात्काळ मंजूर करणे आवश्यक आहे
आपण मेहेरबान तहसीलदार साहेब यांचे निदर्शनास हि बाब आणून द्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Abhay jagtap
08-08-2019
abhayjgp999@gmail.com

म.ज.अ.1966 तहसीलदार प्रदान अधिकार GR print कुठे मिळेल

Question by Shrikant Hiremath
07-08-2019
smhiremath92@gmail.com

शेतकरी जमीन विक्री नंतर कीती कालावधीत विक्री विरोधात हरकत/तक्रार करु शकतो?
दस्त नोंदणीकृत झाल्यावर , तलाठी यांचेकडे दस्त नोंदणीचा तपशील online पद्धतीने प्राप्त होतो . तलाठी यांनी वाजवी हरकत नसेल तर , नोंद १५ दिवसात मंजूर करणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by शुभम
06-08-2019
nitinskashid@gmail.com

नमस्कार सर,
आमची शेतजमीन १२ वर्षांपूर्वी माझ्या वडिल व चुलते यांनी नोंदणी कृत दस्ताने विक्री केली होती, परंतु आजही ७/१२ वर आमच्या वडीलांचे, चुलत्यांचे नाव आहे.
खरेदी झाले पासून किती दिवसात ७/१२ वर नाव नोंद केली पाहिजे?
आम्हाला ती जमीन परत मिळेल का? किंवा
तो दस्तावेज रद्द करता येईल का ? व कसा?
त्याचा काही दंड किंवा खरेदी ची रक्कम परत करता येते का?
वारस म्हणून आम्ही मुले काय करू शकतो ....
शुभम साहेब
दस्त नोंदणीकृ झाल्यावर , तो तात्काळ फेरफारांसाठी तलाठी यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे . सध्या स्थितीत तो online पद्धतीने तलाठी यांचेकडे येतो
जमीन जरी अजूनही आपले वडील व चुलत्याची नावे असली तरी , ज्या दिवशी दस्त नोंदणीकृत झाला त्याच दिवशी जमीन आपलेकडून हस्तांतरित झाली आहे . जमीन आपणास परत मिळू शकत नाही .
वारस म्हणू आपण काहीही करू शकत नाही
दस्त हा जर सुरवाती पासूनच अवैध व परिणामकारक शून्य असेल तरच , जमीन आपले नावावर राहू शकते . मात्र दस्ताची वैधता ठरवण्याचा अधिकार , न्यायालयास आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.51 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3400
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3