जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by अरुण राजाराम जायकर
21-04-2019
arunjaykar@gmail.com
नमस्कार सर,
वडिलांच्या मृत्यूनंतर आई, मी व भावंडांची वारसनोंद केल्यानंतर तलाठी व ग्रामसेवक यांच्याकडून कोणकोणती कागदपत्रे, दाखले व उतारे घ्यावेत व त्यामधून कोणकोणत्या बाबींची खातरजमा करावी याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
धन्यवाद.
... अरुण जायकर.
Question by रोहिदास सखाराम पाबळे
18-04-2019
rohidaspable@yahoo.in
नमस्कार सर ३२ ग चे सर्टिफिकेट आमच्याकडे नाही ७/१२ वर इतर हक्कात जमीन मालक यांना जमिनीची रक्कम ३३७८ तारीख १/१०/१९६३ पासून वार्षिक १० हप्त्यात मिळाली आहे असा शेरा इतर हककात आहे सदर त्याबाबतच्या पावत्या आहे तरी सदर भोगवटा वर्ग२ व इतर हक्कातील शेरा कमी करण्यासाठी काय करावे लागेल
आपले तहसील / शेत जमीन न्यायाधिकरण कार्यालयात जाऊन ३२ मी प्रमाणपत्र ( जमिनीचे हप्ते भरले बाबत ) घ्या . त्या आधारे तलाठी इतर हक्कातील हि नोंद कमी करतील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रोहिदास सखाराम पाबळे
17-04-2019
rohidaspable@yahoo.in
११ आर जागा २००६ मध्ये ११ जणांच्या नावे घेतली आहे सादर व्यवहार तुकडेबंदी विरुद्ध असा शेरा इतर अधिकारात आहे नवीन सुधारणेनुसार किमतीच्या २५ % रक्कम भरण्याबाबत काही परिपत्रक अथवा जि आर आहे का ते मिळावे हि विनंती
कायद्यात सुधारणा झाली आहे . महाराष्ट्र शासनाचे संकेत स्थळावर सुधारणा कायदा प्रत आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by क्षितिजा
15-04-2019
kshitija1020@gmail.com
खुल्या प्रवर्गातील लग्न झालेल्या महिलांसाठी NCL प्रमाणपत्र काढण्यासाठी तिच्या आई वडील कि नवरा यापैकी कोणाचे उत्पन्न धरण्यात येते? तसेच महिला स्वत: नोकरी करत असेल तर तिचे पगारापासून मिळणारे उत्पन्न कुटुंबातील उत्पन्नाच्या तपशील मध्ये पकडण्यात येते का ? कुटुंबातील उत्पन्नाच्या तपशीलामध्ये कशाकशाचा समावेश होतो याबद्दल मार्गदर्शन करावे,
१. आई व वडील
२. आई -वडील यांचे वेतन व शेती पोंसून मिळणारे उत्पन्न सोडून , सर्व बाबी उत्पन्नात येतात
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by समाधान नाना साबळे
15-04-2019
samadhansabale96@gmail.com
उपजिल्हाधिकार्याची कार्य किंवा उपविभागीय अधिकाऱ्याची कार्य
Question by Sagar Dadaso Yedage
14-04-2019
yedagesagar@gmail.com
मा.सर.....आमच्या 7/12 मध्ये तिन व्यक्तिंची नावे आहेत.
तिन्हीं व्यक्तींच्या नावे 2 हेक्टर समाईक क्षेत्र असुन त्याचा 8अ हा तिघांच्या नावे 2हेक्टर जमिनीचे क्षेत्र समाईक दाखवत आहे.....
मला व्यक्ती नं.ऐकाच्या नावे 80आर क्षेत्र...व्यक्ती नं.2 च्या नावे 80आर व व्यक्ती नं.3च्या नावे 40आर आशी वाटनी पत्र करायचे आहे...तिन्ही व्यक्ती एकाच घरातले आहेत.....वाटणीपत्र कसे...व कोठे करावे....कमी खर्चात....
Question by Sadik
13-04-2019
Sadik11m@rediffmail.com
सर crpc 133 अंतर्गत अर्जामध्ये स्वतःचे नाव नमूद न करता अर्ज sdm ला पाठविल्यास ते त्या public nuisance वर कारवाई करू शकतात का ते पण नगर पंचायतीच्या विरुद्ध
Question by RAMESH
12-04-2019
rameshpawar9049@gmail.com
नमस्कार सर, वीस (20) वषॉपुवी सदरील कब्जेदाराकडुन व त्याच्या मालकी हक्कामध्ये असलेली दोन(2) एकर जमिन खरेदी खत करुन विकत घेतली होती परंतु आता पुविच्या मुळ मालकाने महसुली विभागात अपिल करुन आमच्या नावे असलेला फेरफार कमी केला व त्याच्या नावे फेरफार मंजुर करुन घेतला व आता जमिनीवर हक्क मागतो तर त्याच्यावर काय कायॅवाही करावी, व न्याय कुठे मागावा ,याबद्दल सर योग्य मागॅदशॅन करावे .
प्रांत अधिकारी यांचे आदेश विरुद्ध , अप्पर जिल्हाधिकारी यांचेकडे अपील करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Anuradha patil
07-04-2019
Anurodhpatil1996@gmail.com
सर, आमचे मुंबई हायकोर्टमध्ये 1951 ला अपिल होते तो निकाल आमुच्यासारखा झाला आहे व सर्वे नंबर ला तिघाची नाव समान क्षेत्राला आहेत प्रत्येकी एक चतुर्थ अंश 135 गुंठे प्रत्येकाला आहे परंतू सर्वे नंबर नंतर एकत्रीकरण ज्यावेळी झाले त्यावेळी ' ' एका भावाला182 आर दुसऱ्याला132 आणि तिसऱ्या भावाला99आर नुसते आहे, एकत्रीकरण मध्ये कोणतेही जाब जबाब नाहीत तीच चुक गट नंबर तीन पडले त्यातही झाले, परंतु भुमिअभिलेख मध्ये विचारले असता ते साहेब म्हणतात की ही पहिल्यावहिवाटीनुसार मोजणी झाली आहे, गट नकाशाही चुकीच्या क्षेत्रानुसार झाला आहे मग क्षेत्र परत सर्वे नंबर सारखे होन्यासाठी काय करावे लागेल साहेब मार्गदर्शन करा | प्लिज.6
एकत्रीकरण योजना झाल्यानंतर , आपण झालेल्या चुकीबाबत पुनरिक्षण अर्ज दाखल करू शकला असता . आता तो कालावधी संपलेला आहे . आता काही करता येणार .
समान क्षेत्र करण्यासाठी , क्षेत्राची विक्री आपापसात करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Nitinkumar Y.Mahale
07-04-2019
nitinmahale389@gmail.com
सर नमस्कार.
आजोबांची शेतजमीन आहे,भुमिअभिलेख एकत्रीकरनाचा सन 1971 ला शेजारचा खातेदाराचा व आजोबांचा काही संबध नसतांना देखील एकत्रीकरणने दोघांचे सातबारे सामाईक करुन दिले आहेत,सातबारा वेगळे करणेकामी भुमिअभिलेख कार्यालय,तहसिलदार सो.तहसिल कार्यालयाला भरपुर अर्ज करुन देखील दाद मिळाली नाही,तरी यावर आत्ता पुढे काय पाऊल टाकावे याचे आपन योग्य मार्गदर्शन करावे हि विनंती...
धन्यवाद,,,
Question by Suraj shivanath madan
04-04-2019
surajmadanpatil@gmail.com
नमस्कार सर..
2015-16 मध्ये केळीगव्हाण (ता.बदनापूर) गावातील नदीमध्ये जलयुक्त शिवार, सामाजिक संस्थेच्या आणि लोकवर्गणी निधीतून खोलीकरण आणि रुंदीकरनाचे अर्धवट काम झाले होते
त्यामुळे आमचा नदीतीरावरील वडिलोपार्जित शेतरस्ता विस्थापित झाला तो नदीतीरावरुन पूर्ण करून देऊ अस आम्हाला सांगण्यात आलं पण आजपर्यंत 3 वर्षात तो बनवला नाही त्यासाठी तहसील ला नोव्हेंबर -2018 मध्ये ३५ शेतकऱ्यांच्या सातबारा नंबर आणि तलाठी पंचनामा प्रत सह त्रकार दिल्यावर आमचा अर्ज मजूर करून तहसील ने फक्त खाजगी सामाजिक संस्थांना रस्ता पुर्ववत करण्याची नोटीस दिली पण आजपर्यंत रस्ता तयार करण्यासाठी काही उपाययोजना झाली नाही..
लोकवर्गणीतून जमा झाालेल्या निधीतील जवळपास पाच लाख रुपयांची रक्कम कार्यकारी समितीकडे शेष आहे. नदीला जुलै ते जानेवारी पर्या्यं्त पाणी असते,आम्हाला पर्यायी रस्ताही नाही. दोन वर्षेपासून पाण्यातून अवजारे नेऊन शेती पिकावतो आहे..
बदनापूर तहसीलला जानेवारी पासून सतत पाठपुरावा करतोय पण काहीच कार्यवाही होत नाहीय.. आम्ही काय करावे कोणाकडे दाद मागावी??
कृपया मदत करावी,सल्ला दयावा.
लोकवर्गणीतून जल शिवार योजना राबवण्यात आली आहे . याबाबत कोणाकडे दादा मागण्याशिवाय आपण सावताच रस्ता तयार करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by इंद्रजित पडले
04-04-2019
indrajitpudale@gmail.com
सर, माझ्या आजोबाच्या नावाने एकून १४ एकर पैकी ७ एकर इतकी जमीन पाझर तलावासाठी संपादन झाली आहे.ग्रामपंचायत आणि निवृत्ती बाबू पुदाले अशी संयुक्त पणे संपादन अहवालात नमूद आहे. तरी आमची पूर्ण जमीन वर्ग झाल्यामुळे आमची जमीन शिल्लक असून उर्वरित ७ एकर जमिनीचा ७/१२ तयार झाला नाही. संयुक्त जमीन मोजणी अहवालाची नक्कल मागणी केली असता ती भूमी अभिलेख आणि उपविभागीय अधिकारी यांच्याकडे उपलब्ध नाही असे सांगतात तरी यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणाकडे हि नक्कल मिळेल माहिती द्यावी.
जमीन ज्या भू संपादन अधिकारी कार्यालयाकडून संपादित झाली आहे , त्या कार्यालयाकडे मागणी करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Indrajit ashok pudale
04-04-2019
Indrajitpudale@gmail.com
सर पाझर तलाव मध्ये गाळ पेरा करण्याचा हक्क कुणाला असतो मूळ मालकाला की लगतच्या/ गटातील शेतकर्याला?
Question by चंद्रशेखर ह.नितोणे
03-04-2019
vickynitone2112@gmail.com
नमस्कार सर...मी ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमातील वडीलोपार्जित जागा सूमारे 30ते35 वर्षे पासून वापरत आहे.नेहमी ग्रामपंचायतला कर भरणा चा आग्रह करूनही त्यानी गावपातळीवरील राजकारणामुळे कर घेतला नाही व जागा नावाने पण केली नाही.मी ती जागा शेती वापराच्या साहित्य व जनावर ठेवण्यासाठी मा.तहसिलदार साहेबांना शासनाने निर्धारीत रक्कम भरून जागा मिळण्यासाठी निवेदन सुद्धा दिले पण 2002च्या शासन निर्णयानूसार जागा देता येत नाही म्हणून मला नकार दिला तरी मी काय करू की जेनेकरून मला ती जागा मिळेल.2001पासून मी ती जागा वापरतो याचा स्टम्प पेपर पुरावा सुद्धा आहे.. व मी त्या जागेवर कच्चा स्वरुपात बांधकाम पण केलय व आता गावपातळीवरील राजकारणी विरोधक ग्रामपंचायतीच्या साहाय्याने अतिक्रमण हटाओ च्या नोटीस देऊन धमकावत आहे तरी मी काय करू साहेब मार्ग सांगावा ही विनंती...
अतिक्रमित जागा देता येत नाही असे तहसीलदार यांनी आपणास कळवले आहे . त्यामुळे आपणास ती जागा मिळणार नाही . आपण ती जागा खाली करणे योग्य
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विजय भोई
03-04-2019
vijaybhoi007@gmail.com
सर शेती साठी नदी मध्ये विहीर खोदण्यासाठी नियम,gr, मार्गदर्शक सूचना आहेत का?
Question by हेमंत
02-04-2019
He69mant@gmail.com
नमस्कार साहेब,
जर 'अ ' हा व्यक्ती शेतकरी नाही परंतु 'अ ' या व्यक्तीचे वडीलांच्या नावे थोडी शेतजमिन आहे आणि ते दुसरया ईसमांकरवी शेती करतात. तर ' अ ' हा व्यक्ती स्वतःच्या नावे शेतजमिन खरेदी करू शकतो का ?
वडिलांकडे असलेली जमीन जर त्यांची वडिलोपार्जित जमीन असेल तर , अ व्यक्तीचा त्या जमिनीत जन्मताच हक्क / मालकी निर्माण होते . त्यामुळे तो व्यक्ती शेतकरी आहे . जमीन खरेदी करू शकेल
मात्र जर वडिलांची जमीन स्वकष्टार्जित असेल तर , अ या व्यक्तीचा त्या जमीनीत जन्मताच अधिकार निर्माण होत नाही . त्यामुळे ती व्यक्ती शेतकरी होऊ शकत नाही . सबब त्यास जमीनखरेदी करता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by परशुराम भिकाजी अनसूरकर
02-04-2019
parshu50@hotmail.com
साहेब,आमच्या वडिलांना कुळकायद्याने जमीन मिळाली आहे.वडिलांच्या नंतर आम्हा भावंडांची नावे लागली आहेत. पण सादर जमिनीची अजून विक्री करून मिळालेली नाही . सादर कुळकायद्याची जमीन विक्री करून मिळण्यासाठी आम्हाला काय करावे लागेल?
कृपया या बाबतीत आम्हाला योग्य मार्गदर्शन करावे ही आपणास आमची विनंती आहे
आभार
आपले संबंधित तहसीलदार / शेत जमीन न्यायाधिकरण यांचेकडे ३२ ग किंमत निश्चित करून मिळण्यासाठी अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रमेश भावे
27-03-2019
rameshbhave@hotmail.com
१. वडिलोपार्जित शेत जमिनीच्या वाटपात कमीत कमी किती गुंठे जमिनीचा ७/१२ उतारा बानू शकतो? माझ्या नावे ८ गुंठे जागा येत आहे
२. जमिनी मोजणी अर्जा सोबत कोणती कागद पत्रे जोडावी लागतात ?
वरकस जमीन -२० गुंठे
भात शेती / एकपिकी - १५ गुंठे
बागायती - ५ गुंठे
उपरोक्त जमीन प्रकारानुसार , या पेक्षा जमीन कमी उरणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक .
८ गुंठे जागेवंगे स्वरूप काय आहे ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Rupesh vishwekar
26-03-2019
rupeshvishwekar@gmail.com
वर्ग2शेत जमिनीचे रजिस्टर willdeed करणेस permission लागते काय
Question by सागर
23-03-2019
sagarkandekar@hotmail.com
माझा प्रश्न - गट नं.238 ही जमीन नवीन अविभाज्य शर्तीची असून 'सक्षम अधिकाराच्या परवानगी शिवाय हस्तांतरणस बंदी' हा शेरा इत्तर हक्कात आहे.पूर्वी ही जमीन पुंजा नावाचं व्यक्तीची होती.पुंजा हा 1952 साली मयत झाला व त्याच्या दोन वारस मुलाचे नाव मोगल पुंजा आणि दादा पुंजा यांचे नाव 7 / 12 दिसू लागले.दादा पुंजा हा 1972 साली मयत होऊन त्याच्या 3 मुले ,2 मुली व पत्नी चे नाव वारस म्हणून लागले.2000 साली मोगल हा मयत होऊन त्याच्या 2 मुले व 2 मुली व पत्नी चे नाव वारस म्हणून लागले.आज मितील ह्या दोन्ही परिवारात कटुता असून त्याची वाटणी झालेली नाही व ही सर्व जमीन सामायिक क्षेत्र म्हणून 9 जणांचे नाव 7 / 12 ला आहे.माझा स्वतःचा गट 237 हा गट या 238 गट शेजारी असून मी हा गट विकत घेऊ इच्छितो व आज ती सर्व जमीन माझाकडे कासण्यासाठी असून कब्जा आमचाच आहे तर...
1.सामाईक वारसा पैकी दादा पुंजा चे 6 वारसा मला त्याचा 1/2 (अर्धा ) हिस्सा विकू इच्छिता तर मी ती जमीन खरेदी करू शकतो का?.
2.जिल्हाधिकारी 1/2 (अर्धा ) जमीन विक्री ची परवानगी देतील का?.
3.मागील 20 वर्षी पासून सदर जमीन कसतोय पण पिकपहानी मालकाची आहे तर मी पीक पाहनि कशी लावू अथवा सिद्ध करू शकतो.
4.आणेवारी करून घेण्या साठी काय करावे लागेल?
आपले उत्तर -
दादा पुंजयाची जमीन आपण परवानगीने खरेदी करी शकता ( तुकडे बंदी कायदा अधीन ) .
जिल्हाधिकारी परवानगी देतील
आपण पीक पाहणी लावली तर याचा अर्थ असा होतो कि मूळ मालक जमीन कसत नाही . त्यामुळे जमीन सरकार जमा होऊ शकते .
प्रश्न सर -
१.हे सर्व वारस एक मेक्याचे रक्ताचे नातेवाईक आहेत, जर मी त्यांना नोटिस न बजावत 1/2 क्षेत्र खरेदि केले तर ते (इतर वारस) न्यायालयात माझे 'हिंदू उत्तराधिकार अधिनियम , कलम 22 ' प्रमाणे खरेदी खत रद्द करण्याचा व तो 1/2 आम्ही घेण्यास तयार होतो असा दावा टाकू शकता का?
Question by poorva
22-03-2019
poorva.wadke@yahoo.com
नमस्कार सर ,तलाठी व मंडळ अधिकारी ला पत्र लिहायचे आहे .न्यायालयात चालू असलेला दावा वादी ने न चालविल्याने रद्द करण्यात आला आहे तर सात बारा वरती असलेली दाव्याची नोंद रद्द करण्याकरिता.
Question by अजय पाटोळे
04-02-2019
ajaypatole.ap@gmail.com
सर 1980 साली शासनाने प्लॉट करून जागा वाटप केल्या होत्या लोकांना राहण्यासाठी परंतु खुली जागा होती म्हणून एक प्लॉट वर 1987 साली ग्रामपंचायतीने राहण्यासाठी ती जागा आम्हाला दिली होती राहण्यासाठी.पण ती जागा सिटी सर्व्हे ला (7/12) दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर आहे.आम्हाला माहिती पण नाही ती व्यक्ती कोण आहे उताऱ्यावर च नाव फक्त माहिती आहे तरी आम्हाला दुसरीकडे कुठेच जागा नाहीये व या जागेचा 7/12 वर आमचं नावं नोंद करायचे आहे त्यासाठी काय करावं लागेल योग्य ते मार्गदर्शन करावे???
शासनाकडून हि जागा आपणास मिळणार नाही
परंतु या जागेवर आपले अतिक्रमण नियमानुकूल करता येईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पाबळे रोहिदास सखाराम
04-02-2019
rohidaspable@yahoo.in
महार वतन जमिनीची शर्तभंग झाली असल्यास नियमित करण्यासाठी काय करावे लागेल
Question by श्रेयस रामचंद्र जोशी.
03-02-2019
shreyasrjoshi26@gmail.com
नमस्कार,
देऊळ, ट्रस्ट, देवस्थान, मंदिराच्या जागांना कुळ लागतात का ? कुळ लागली असतील पण त्यांना काढायची असतील तर काय करावे लागेल ?
देवस्थान जमीन ला कुल लागू शकतो
मात्र त्याचे नावे विक्री होऊ शकत नाही
देवस्थान जमीन स्वतः कसण्यासाठी अशी जमीन काढून घेऊ शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sharmila
01-02-2019
shardha12@yahoo.com
mi X kadun jamin vikat ghetli, sale deed register kele. X ya navane 7/12 hota. pan mazya navavar 7/12 zala nahi, jamin ni.sa.pra. aslyache karan denyat aale. aata X sahkary karat nahi, tar aata mazya kade kay paryay aahet ?
आपण शेतकरी आहेत का ? आपण जर शेतकरी असाल तर नवीन सुधारणा कायदयानुसार आपला व्यवहार दंड भरून नियमानुकूल करता येईल .
जमीन कोणत्या गावी/ तालुक्यात/ जिल्ह्यात आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3400 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
