जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by अनंत आप्पा करंबळे
21-06-2019
anant.karmbale@rediffmail.com
साहेब आमची वडिलोपार्जित जमीन माझया चुलत काकीच्या नांवावर आहे , माझे आजोबा व काकीचे सासरे सक्के भाऊ होते आणि माझ्या आजोबांचे नाव ७/१२ वरती सहाहिषेदार म्हणून आहे , परंतु माझे आजोबा मयत झाले आहेत, तर आम्हाला १/१२ वरती आमची सर्वांची नावे लावायची आहेत तर त्यासाठी माझ्या चुलत काकीची सहीची गरज आहे का , तसेच जमिनीचे वाटप करता येईल का कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद .
काकीचे संमतीची आवश्यकता नाही . आपण अधिकार अभिलेख दावा प्रांत अधिकारी यांचेकडे दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by महावीर कासार
21-06-2019
vishalkasar55@gmail.com
नमस्कार. मला O. B. C. महामंडळाकडून थेट कर्ज योजनेअंतर्गत रुपये 25000 मंजूर झालेले आहेत. त्यानुसार जामीनदाराच्या 7/12 उताऱ्यावर रुपये 25000 चा बोजा नोंद घेणे आवश्यक आहे. मात्र मा. तलाठी साहेब असे म्हणतात की रुपये 25000 चा बोजा नोंद करता येत नाही. त्यासाठी किमान 1 लाख रुपये रक्क्म असावी लागते असे शासकिय परिपत्रक आहे. तरी याविषयी खुलासा व्हावा.
Question by प्रदीप वर्पे
20-06-2019
pradeepvarpe1986@gmail.com
निलंबन कालावधी कर्तव्यकाल करणेबाबत(न्यायालयीन निर्णयाचे अधीन राहून) बाबत काही gr, परिपत्रक असेल तर कृपया share करावे
महाराष्ट्र नागरी सेवा ( सेवेत सामील होणे ,परदेशी सेवा , व निलंबन , बडतफी व सेवेतून काढणे कालावधीत वेतन ) नियम १९८१ वाचा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संदीप यादव
19-06-2019
sysandeepyadavy.1995@gmail.com
सर,
माझे पणजोबा यांचे निधन हे १९७२ साली झाले आहे. परंतु
ह्याची नोंद कुठेही केली नाही. परंतु आता जमीन ला वारीस होण्यासाठी त्यांचा आता मुत्यू दाखला लागत आहे परंतु त्यांचा कुठेही नोंद नसल्यामुळे जमीन हि माझ्या आजोबांच्या नावावर होत नाही तर आता यासाठी काय आणि असे करणे सोयीचे होईल.
कोर्टातून असा दाखला मिळेल का?? जर हो तर कसा मिळेल
कृपया मार्गदर्शन करावे
The Registration of Births and Deaths Act 1969 , च्या कलम १३ (३) नुसार , न्यायिक दंडाधिकारी यांचे कडे अर्ज करून त्यांचा मृत्यू दिनांक जाहीर करून घ्या . त्या आधारे जन्म मृत्य नोंदणी अधिकारी , आजोबांचे मृत्यूची नोंद करतील व आपणास मृत्यू दाखला मिळेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by कर्ण ढवळे
18-06-2019
Karna.dhawale@gmail.com
नमस्कार साहेब,
माझ्या क्षेत्रातून हायवे गेला आहे त्यात माझी ९० गुंठे क्षेत्र माझ्या७/१२ वरून कमी झाले आहे. पण प्रत्येक्षात माझी 35 आणि शेजारील गटातील 55 गुंठे गेली आहे. आम्ही बाहेर आपआपसात तडजोड पत्र करून मोबदला वाटुन घेतला होता. पण आता पुर्ण 90 गुंठे क्षेत्र माझ्या 7/12 वरती नोंद झाली आहे व त्यामुळे माझे क्षेत्र कमी झाले आहे. तरी आता 7/12 बरोबर करून घेणे साठी काय करावे लागेल क्रुपया मार्गदर्शण करावे.
आपली जमीन संपादित झाली त्या वेळेस निवडा जाहीर झाला . निवडा जाहीर झाल्यावर वाजवी कालावधीत ( ६ महिने ) लेखन प्रमाद चूक दुरुस्त करता येते . निवडा रक्कम स्वीकारताना आपण हि बाब भू संपादन अधिकारी यांचे निदर्शनास आणून देणे आवश्यक होते .
ज्या वेळेस संपादन मूळ आधी सूचना काढण्यापूर्वी , संयुक्त मोजणी झाली , त्या नंतर अधिसूचना काढण्यात आली , त्या वेळेस आपण हरकत घेणे आवश्यक होते .
आपणास हि दुरुस्ती करावयाची असल्यास आपणास , जाहीर निवड , writ याचिके द्वारे , उच्च न्यायालयात आव्हानीत करावा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सीमा साव॔त
17-06-2019
sawantseema176@gmail.com
आदरणीय सर, माझ्या आईची अमरावती जिल्ह्यात ५ एकर भोगवाटदार २ जमिन आहे. आईच्या मृत्युनंतर आम्ही तलाठ्याकडे वारसनोंदी साठी सर्व कागदपत्र (मृत्यू दाखला, प्रतिज्ञापत्र, सर्व वारसांचे नाव पत्ता आधार कार्ड पुरावा इत्यादी) दिले. सर्व वारसदार रक्ताच्या नात्यातील असून एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. जमिनी बाबय कोणताही वाद नाही.असे असून ही दोन महिने झाले तरी तलाठी वारस नोंद करण्यास टाळाटाळ करत आहे.त्यांनी आम्हांला Legal Heir Certificate कोर्टाकडून आणण्यास सांगितले.आमचे जमिनी बाबत कोणतेही वाद नसताना हे Certificate देणे गरजेचे आहे का? आमच्या आईची सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमिन होती त्यावर आमची वारस नोंद होऊन ७/१२ वर नावे सुद्धा लागली त्यासाठी आम्ही कोणतेही Legal Heir Certificate दिले नव्हते फक्त वर उल्लेख केलेले कागदपत्र दिले.मग इथे अमरावती ला का Legal Heir Certificate ची मागणी केली जात आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महसूल खात्याचे एकच नियम असताना तलाठी महाशय जाणिवपूर्वक दिरंगाई करत आहे. Legal Heir Certificate हे खूप खर्चिक व वेळखाऊ procedure हे निरदर्श नास आणून दिल्यावर ही ते आपला हेका सोडायला तयार नाही.कृपया मार्गदर्शन करावे.
आपण सदरची बाब , जिल्हाधिकारी यांचे निदशंनास अनु शकता
१. आपले सरकार - online Platform
2. लोकशाही दिन
३. प्रत्यक्ष भेट घेऊन आपले तक्रार जिल्हाधिकारी /प्रांताधिकारी यांचे निदर्शनास आणून देणे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विक्रम patil
17-06-2019
Patilvikram461@gmail.com
Sir,
Mi tal- walawa, dist- sangli madun aahe.
Aamchya gavi ek devasthan trust aahe ti 1952 pasun registered aahe tasech trust la inam 3 agriculture land aahe.
1952 pasun sadar trust la 3 trustees hote, 1984 madhye J.C.C. Pune yani new scheme keli tyapramane 3 trustees na remove karun new 5 trustees nemale.
Tya order la last chya trustees ni District Court, Sangli yethe challenge kele, D.C. sangli yani 1991 la matter remanded karun fresh enquiry chi order keli tasech "defecto manager or temporary panchas mhanun 5 paiki 2 trustees chi niyukti keli". Tyapaiki ek maze vadil (father) aahet.
2013 madhye dusarya trustee chi death zalya nantar aamhi B.P.T. Act 50 A(3) nusar scheme madhye durusti sathi Charity commissioner, sangli yanchyakade application kele parantu 2017 madhye Charity commissioner yani " District court ne remanded kelele matter ajun suru zale nahi tasech to matter sapadat nahi, asha condition madhye sadar application chalu shakat nahi" ashi order karun matter close kela aahe. Tasech sadar inam 3 agriculture land ha 1991 pasun mazya vadilanchya vahivatit aahe. Sir maze question ase aahet,
1) ya condition madhye aamhi kay karu shakto? Karan aata maze vadil pn aged aahet.
2) gavatil kahi lok aamhala vaglun new scheme sathi try karat aahet, asha condition madhye charity commissioner other lokani dakhal kelela scheme application manjur karu shaktat ka?
3) jo agriculture land aamhi kasat aahe tasech tyachya income cha audit report aajparyant aamhi charity commissioner office madhye dakhal kela aahe. To land aamchya kadun kadhun ghetla jau shakto ka?
१. आपण काही करू शकत नाही
२. जी चौकशी चालू आहे . ती पूर्ण होणे आवश्यक आहे
३. देवस्थान जमीन विश्वस्त यांचे नावे होऊ शकत नाही . आपणास देवस्थान जमीन कसण्याचा अधिकार नाही . आपणाकडून हि जमीन काढून घेतली जाऊ शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Akshay Diliprao Raut
16-06-2019
akshayrautjain@gmail.com
govt. job for well educated aurtho. handicap person by3% handicap quota
Question by Swapnil kshirsagar
15-06-2019
kshswapnil8@gmail.com
1. सहकारी पतसंस्थेचे गहाणखत कर्जाची रक्कम पतसंस्थेच्या कार्यालयात रोख दिली जाते की पतसंस्थेचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेचा चेक दिला जातो ?
2. पतसंस्था 6 लाख कर्जाची रक्कम पतसंस्थेच्या कार्यालयात रोख देऊ शकते का ?
हा प्रश्न संभंधित पतसंस्था योग्य रीतीने देऊ शकेल आपण त्यांना विचारा , त्यासाठी हा फोरम योग्य नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गिरीश झाल्टे
15-06-2019
grzalte@gmail.com
ग्राम पंचायत निवडणूक प्रशिक्षण पॉवर पॉईंट प्रेसेंटेशन मिळेल का? तहसील कार्यालय सिल्लोड जी औरंगाबाद
Question by अमोल सोपान गवांदे
14-06-2019
Amolgavande6787@gmail.com
सर,
मी एक na प्लॉट विकत घेत आहे.agreement of sale मध्ये मालकाने नावापुढे huf असे लिहिलेले आहे.सादर मालकाचे पॅन कार्ड पब huf चे आहे.परंतु सातबारा उतारा वर मालकाच्या नावापुढे huf(कर्ता)अशी नोंद नाहीये. सादर प्लॉट वर कर्ज मिळणे साठी मी बँकेकडे अर्ज केला आहे परंतु बँकेने
"जर मूळ मालक हा प्लॉट huf च्या कपॅसिटी मध्ये विकत असेल तर सातबारा वर सुद्धा नावापुढे huf अशी नोंद करून आणा किंवा अग्रीमेंट of sale मधून huf काढून correction deed करून आना असे सांगत आहे."
सादर जमीन हि त्यास वंशपरंपरेने आलेली आहे.
बँक सांगते ते बरोबरच आहे का?
कृपया मार्गदर्शन करावे.
धन्यवाद सर,
आपला विश्वासू,
अमोल गवांदे
संगमनेर
कायदेशीर बाबीपेक्षा व्यावहारिक बाब महत्वाची
बँक आपणास कर्ज देत आहे त्यामुळे , बँक जे सांगत आहे त्याप्रमाणे करणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by नानाभाऊ दशरथ जाधव
14-06-2019
scalpower. sunil@gmail.com
आदरणीय सर,
वडीलांच्या निधनानंतर वडिलोपार्जित जमिनीच्या 7/12 वर वारसाहक्काने ' मोठ्या भावाचे नाव ( कुटुंब प्रमुख) आणि इतर 6 ' अशी नोंद आहे. मोठय़ा भावाने मनमानी पद्धतीने ढोबळ वाटप केले असले तरी कागदोपत्री वाटणीपत्र्क करून दिले नाही. सदर प्रकरण तालुका दिवाणी न्यायालयात मागील 7 वर्षांपासून प्रलंबित आहे.
दरम्यानच्या काळात शासनाकडून मिळणारे विविध स्वरूपातील अनुदानाची रक्कम मात्र फक्त मोठ्या भावाच्या बँक खात्यात जमा होत असते. तहसीलदाराकडे हरकतीचा अर्ज देऊनही कार्यवाही झाली नाही.
प्राप्त अनुदान सर्व वारसदारांना समप्रमाणात वाटप व्हायला हवे अथवा अनुदान रक्कम शासनाला परत करण्यात यावी असे आम्हाला वाटते.
मार्गदर्शन करावे ही विनंती.
जिल्हाधिकारी यांचे निदर्शनास हि बाब
लोकशाही दिन , आपले सरकार अथवा आपण प्रत्यक्ष भेटून आणून द्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by नानाभाऊ दशरथ जाधव
14-06-2019
scalpower. sunil@gmail.com
30-40 वर्षापूर्वी आमच्या वडिलांनी गाव-शिवारातील एक शेतजमीन गहानखत करुन ताब्यात घेतली. दरवर्षी पिक-पाहणी अहवालात तशी नोंद होत राहीली. त्या नंतर काही वर्षांनी मुळ मालकाने ती जमीन परत घेतली. मात्र आजही सदर जमिनी च्या 7/12 वर ( वडिलांच्या मृत्यूनंतर वारसाहक्काने) आमच्या वडीलबंधू चे नाव आहे. विशेष बाब अशी की आजही त्या शेतजमिनीच्या 7 /12 वर पिक-पाहणी अहवालात आमच्या मोठ्या भावाच्या नावाची नोंद घेतली जाते.
तसेच शासनाकडून विविध योजनांद्वारे मिळणारे अनुदानाची रक्कम ही आमच्या मोठ्या भावाच्या बँक खात्यात जमा होत असते.
यासंदर्भात मार्गदर्शन व्हावे ही नम्र विनंती.
मूळ मालकाने हि बाब संभंधित अनुदान वितरित करणाऱ्या विभागाचे निदर्शनास आणून दिल्यास भावास , अनुदान व्याजासह परत करावी लागेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Bhaskar MAPARI
13-06-2019
maparimilind11@gmail.com
Sir,
माझ्या वडिलांच्या नावावर २५आर एवढी जमीन आहे. संबंधित जमीन गट एकत्रीकरण योजनेमध्ये २९३ गट न. नुसार ७/१२ वर ८ अ वर वडिलांच्याच नावावर आहे. गट एकत्रीकरण योजना ही आजोबांच्या काळामध्ये झाली. या योजनेनुसार संबंधित गट नंबर ची जमीन आजोबांच्या नावावर झाली. त्यावेळच्या जबाबाच्या नकले नुसार संबंधित गटाची मालकी आमची दाखवली जाते. परंतु संबंधित जमिनीचा ताबा दुसऱ्याच व्यक्तींकडे आहे. या जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी काय करावे?
जमीन एकत्रीकरण योजना झाल्यावर , जमीचा ताबा एकत्रीकरण अधिकारी ( Settlement Officer ) यांनी ताबा आपणास दिला असेल ? त्याची तबे पावती आपणाकडे आहे का ? नसेल तर उप अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडून तांबे पावती घ्या . जमीचा ताबा आपणाकडे इतके दिवस नसताना आपण शांत काय बसला ?
असोत The Specific Relief Act खाली , जमिनीचा ताबा परत मिळण्यासाठी दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शामराव
13-06-2019
creshma6289@gmail.com
मा.सर
माझ्या वडिलांनी १ हे ५२ गुंठे जमीन १९८१ साली निबंधक कार्यालाय नोंद करुन खरेदी केलि होति. आजतगायत जमिन अाम्हिच कसतोय पण जमिन घेतल्यानंतर त्यांचे मानसिक संतुलन बिघडले व कागदपत्रे गहाळ झालि होति त्या कारणाने ७/१२ ला नोंद करणे राहुन गेले होते. कागदपत्रे मिळाल्यानंतर मी गेले २ वर्षापासुन जमीनिची ७/१२ला नोंद व्हावी म्हणुन तलाठि याच्याकडे अर्ज व लागणरी कागदपत्रे खरेदिखत, प्रत दस्त प्रत सादर केलि परंतु त्यावर कुठलिहि कार्यवाहि झालि नाहि. या परिस्थितिचा गैरफायदा घेत मुळ मालकाने वरिल जमिनिचि फेरविक्री केलि. सदर जमिन विक्री होताना केलेल्या पेपरनोटिशिला मी वकिलामार्फत नोटिस पाठवुन हरकत घेतलि होति. सदर व्यवहाराचा तलाठि कार्यालायात फेरफारिस अर्ज आल्यानंतर त्यालाहि मी हरकत घेतलि परंतु हे प्रकरण नायब तहसिलदार यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी इतके वर्ष ७/१२ नोंद का नाहि केलि? असे विचारले. मी आणि वडिलांनी त्याच्या आजारपणाचीहि माहिती दिलि. परंतु आता सदर फेरफारास मंजुरि देण्यात आलि आहे.
अशा प्रकारे काहि सरकारी अधिकारि पैशासाठि काहिहि करतात अशा परिस्थितित मी काय करावे कारण कोर्टात जाण्याइतकि परिस्थितिहि नाहि.
आपले खरेदी खत अगोदरचे आहे . आपण काळजी करण्याचे कारण नाहीं . आपण मंजूर फेरफार विरुद्ध प्रांत अधिकारी यांचे कडे अपील दाखल करा . निर्णय आपल्या बाजूने लागेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by निवृत्ती कवठे
08-06-2019
kniwrutti001@gmail.com
सर माझ्या आजोबांची वडिलोपार्जित
शेती काही कारणास्तव महाजनको ने नवीन पॉवर प्लांट साठी अधिग्रहित केली आहे. माझा असा प्रश्न आहे कि
माझ्या आजोबांचे निधन १९९४ या साली झाले आहे आणि इतर वारस सुद्धा लागलेले आहे जेव्हा जमीन संपादित झाली तेंव्हा सर्वे मिळून ५ वारस लागलेले होते. माझे वडील आणि त्यांचे दोन भाऊ आणि २ बहिणी
१) माझ्या वडिलांचे निधन झालेले आहे आणि मला प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट हवे आहे जॉब साठी, तर मला असे विचारायचे आहे कि मला इतर जे वारसदार आहे त्यांचे संमतीपत्र घ्यावे लागेल का प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट मिळवण्या यासाठी ,किंवा इतर दुसरा पर्याय आहे का प्रकल्पग्रस्त दाखला मिळवण्यासाठी.
२) कोण कोणते डोकमेण्ट लागतात प्रकल्पग्रस्त दाखला मिळवण्यासाठी .
३) इतर वारसदार काही हरकत घेऊ शकतात का जर त्यांच्यी संमती जर नाही घेतली तर
४) आणि मला प्रकल्पग्रस्त दाखला कुठे मिळू शकेल कृपया माहिती द्या
५) सर्वे नंबर एकाच असल्यामुळे एकाच सर्टिफिकेट मिळेल कि सर्वाना सर्टिफिकेट मिळेल
मला असे सांगण्यात आले आहे कि आता कायदा बदल्या मुले आता इतर वारस दारांचे संमती पात्र लागत नाही असे सांगण्यात आले आहे . ते खरंच आहे का ???
आणि असेल तर मला प्रकल्पग्रस्त चा दाखला मिळू शकतो का
६) माझ्या वडिलांच्या बहिणीचे निधन झालेले आहे तर त्यांचा मुलांचे संमती मला घ्यावी लागेल का कि फक्त मृत्यू दाखला दिला तरी चालेल का ?
सर कुपया लवकरात लवकर मला माझ्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे
नवीन काही नियम आला आहे का या विषयी
आपले एकूण किती क्षेत्र संपादित झाले आहे ?
प्रत्येकाचे नावे ( वारस प्रत्येकी ) किती क्षेत्र आहे .
प्रकल्प ग्रस्त दाखला मिळण्यासाठी कमीत कमी २० गुंठे क्षेत्र संपादित झालेले असणे आवश्यक आहे . तसेच ज्या प्रकल्पसाठी जमीन संपादित झालेली आहे त्या प्रकल्पासाठी , १९९९ चा प्रकल्प बाधित कायदा अधिसूचने द्वारे लागू केलेला असणे आवश्यक आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Arvind batwada
04-06-2019
Arvindbatwada51@gmail.com
सर
आम्ही 10 भावंडे आहोत.आमची17.35 एकर वडिलोपार्जित जमीन आहे. त्यात वाद चालू आहे. कारण ती गव्हर्नमेंट रेकॉर्ड मध्ये जास्त दिसत आहे. म्हणजे जुन्या रेकॉर्ड मध्ये तलाठी कढून चूक अशी झाली कि एकर चे हेक्टर मध्ये करताना चुकीने ने वाडिव झालीय.. म्हणजे 17.35 एकर ची हेक्टर मध्ये 6.94 हेक्टर होतय तर तलाठी ने ती 7.94 हेक्टर रेकॉर्ड ला नोंद करून टाकली होती तरी ती शेतजमीन आता कमी करून पोट वाटप करायचं पण तयासाठी आम्ही 10 भावंडांपैकी 8 चा सहमतीने आम्ही सर्कल कडे मागिल 2 वर्षा पासून प्रकरण पाठवलाय पण ती process अजून पुढे गेलेली नाही . त्यासाठी मी सर्कल कडे वारंवार गेलो पण काही झालेलं नाही . वा त्यांनी आता 2 वर्षा नंतर ते प्रकरण तहसीलदार कडे पाठवले 2 वर्षा चा दिरंगाई नंतर. वा process अजून अडकून पडलीय तयासाठी काय करता येईल सर. वा त्याची पूर्ण process काय आहे सर.
तहसीलदार यांना स्मरण करून द्या . अथवा जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करा . सादर बाब त्यांचे निदर्शनास आणून द्या . वास्तविक तहसीलदार यांनी हि लेखन प्रमाद चूक कलम १५५ खाली दुरुस्त करणे आवश्यक आहे . मंडळ अधिकारी यांना दिरंगाई बद्दल जबाबदार धरता येणार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सचिन मेंडीस
04-06-2019
sachin.mendes@gmail.com
माझ्या आईच्या माहेरील जागेवरील काही सातबारा उताऱ्यावर मामाकडे आजोबांचे निधन झाल्यावर कुटुंब प्रमुख म्हणून मामाच्या नावाची नोंद झाली. नंतर मामाच्या मृत्यूनंतर चुकीने माझ्या आईचे व आजीचे नाव कमी होऊन फक्त मामाच्या वारसाची नोंद झाली. नजरचुकीने राहून गेलेली नावे गावनमूना ७/१२ वर घेणे बाबत मी तहसीलदारांना अर्ज दिला आहे व तलाठी कार्यलयाने रिपोर्ट दिला आहे. परंतु तलाठी कार्यलयाने अर्ज तहसीलदारांकडे न करता प्रांत कार्यलयात द्यायचा सल्ला दिला आहे.
मला तहसीलदारकडून आदेश मिळू शाळतो का कि प्रांत कार्यलयात अर्ज करणे कायदेशीर योग्य ठरेल? कृपया मार्गदर्शन करावे.
ज्या फेरफारानें केवळ मामी व मामाचे वारसांची नावे दाखल आहेत तो फेरफार प्रांताधिकारी यांचेकडे दाखल करणे आवश्यक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by हेमंत जाधव
04-06-2019
hemantjadhav36@yahoo.in
१९२७ साली २३ एकर जमिन खरेदीने घेतली परंतु खरेदी तारखेला त्यातील ५०% जमिन परस्पर विक्रीने गावातील प्रतिष्ठित व्यक्तिच्या नावे झाली त्यानंतर उर्वरित ५०% जमीनीमधील २५% जमीन १९२८ साली गावातील देवस्थानास गावकर्यान्नी घेतली परंतु तहसील मधे देवस्थान नोंद नाही उर्वरित २५ % जमीन नावे राहिली या संदर्भात दावा दाखल करता येइल का?
Question by Pradeep j
03-06-2019
904933@gmil.com
नमस्कार सर
सर्वे नंबर अ चे क्षेत्र 25 एकर 5 गुठे आहे?
सर्वे नंबर ब चे क्षेत्र 6 एकर 22गुठे आहे?
दोनी सर्वे नंबरच एकत्रित टिपण पक्का बुक मध्ये 29 एकर 31 गुठे नोंद आहे ,
दोनी तफावत 73 गुठे आहे,
सर्वे नंबर अ चे पहिले 24एकर 5 गुठे खोडून 25एकर 5 गुठे केले, खासरा प्रत्र मध्ये अशी खाडा खोड कली आहे
माझे क्षेत्र ब आहे
मोजणी मध्ये मला माझे क्षेत्र 6एकर २२गुठे हद्द कायम करूण देत नाही
कुपया सही स्तर माही ती कळवा
Question by योगेश वाघमारे
01-06-2019
yograjwaghmare@gmail.com
नमस्कार सर,
माझ्या आजोबांची २१ एकर जमीन होती, आजोबांनी १९६९ साली १० एकर २० गुंठे जमीन एका व्यक्तीला विकली, त्या व्यक्तीने त्याच्या ३ मुलांना समान वाटणी केली, प्रत्येकी ३ एकर २० गुंठे.
पैकी एका मुलाचा वाटा माझ्या वडिलांनी व २ चुलत्यांनी मिळून १९९४ साली विकत घेतला, आता आम्हाला एकूण जमीन १४ एकर झाली विकत घेतलेली ३ एकर २० गुंठे व आजोबांची वडिलोपार्जित १० एकर २० गुंठे व नंतर १९९६ साली माझ्या वडिलांचे व चुलत्यांचे जमिनीची समान वाटणी झाली पण माझ्या वडिलांच्या वाट्याला विकत घेतलेली ३ एकर २० गुंठे व आजोबांची वडिलोपार्जित १ एकर २० गुंठे अशी एकूण ५ एकर जमीन वाट्याला आली. वडील थोरले असल्याने शेवटी वाटणी उचलावी लागल्याने जमीन थोडीशी हलकी म्हणून ५ एकर, दोन नंबर चुलता अपंग आहे, एक हात ज्वारी करायच्या मशीन मध्ये गेल्यामुळे त्याला तालीच्या पोटातील भारी जमीन व वाड्यात हिस्सा म्हणून ४ एकर, तीन नंबर चुलता लहान असल्याने त्याला किराणा दुकान म्हणून ५ एकर. (यात हलकी / भारी जमीन, राहता वाडा व किराणा दुकान यांच्या वाटणीमुळे क्षेत्र कमी जास्त)
पण ७ / १२ उतारावर ५ एकर जमीन बरोबर दिसत आहे. पण इतर हक्कात ३ आत्या व आजी यांची नावे आहेत.
मला वाटते नियमाप्रमाणे फक्त १ एकर २० गुंठे वरच म्हणजे वडिलोपार्जित जमिनीवरच इतर हक्कातील नावे पाहिजे पण ती उताऱ्यावर सर्व क्षेत्रात दिसत आहेत कारण वडिलांच्या वाट्याला आलेली विकत घेतलेली ३ एकर २० गुंठे व वडिलोपार्जित १ एकर २० गुंठे यांचा गट नंबर एकच आहे. तर ३ एकर २० गुंठे व १ एकर २० गुंठे याचा गट फोडता येईल का व त्यांची नावे ३ एकर २० गुंठे वरून कमी करता येतील का.
पण अजून एक अडचण आहे आजी मयत झाली आहे, त्यांमुळे आजीच्या इतर वारसांना म्हणजे दोन चुलत्यांना इतर हक्कातील नावे कमी करताना बोलवावे लागेल का ?
मी १९९७ साल चा फेरफार काडून पहिला आहे त्यात तिघांची समान वाटप व क्षेत्र दिसत आहे.
कृपया मार्गदर्शन करावे
आजोबांची १० एकर २० गुंठे जमिनीची वाटणी २००५ पूर्वी म्हणजे १९९६ साली झाली आहे . त्यामुळे वाटणी झाल्यानंतर ती जमीन वडिलोपार्जित स्वरूपाची राहत नाही . तसेच ३ एकर २० गुंठे जमीन आपले वडील व चुलत्यांनी विकत घेतली आहे . ती जमीन वडील व चुलत्यांची स्व कष्टर्जित जमीन होते . त्यामुळे या जमिनीवर आजी /आत्या यांचा कोणताही अधिकार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by आशपाक बागवान
27-05-2019
ashapakbagban786@gmail.com
जमीन खंडाने दिलेली असताना आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा खंड मला मीळालेला नाही शिवाय खंडाने घेणाऱ्याने त्याचे नाव इतर हक्कात लावलेले आहे तरी इतर हक्कतील त्याचे नाव कमी करण्यासाठी मार्गदर्शन करावे शिवाय कालावधी कीती लागेल याचीही माहिती मिळावी ही विनंती.
कुळाने खंड दिला नाही म्हणून, खुलासा कधी नोटीस दिली होती का ? नोटीस दिल्यानंतर कुळाने , खंड दिला होता का ? त्याने काही उत्तर दिले होते का ?
नसल्यास आपण , कुळवहिवाट संपुष्ठात आणण्यासाठी मामलतदार यांचेकडे दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by आशपाक बागवान
27-05-2019
ashapakbagban786@gmail.com
जमीन खंडाने दिलेली असताना आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा खंड मला मीळालेला नाही शिवाय खंडाने घेणाऱ्याने त्याचे नाव इतर हक्कात लावलेले आहे तरी इतर हक्कतील त्याचे नाव कमी करण्यासाठी मार्गदर्शन करावे शिवाय कालावधी कीती लागेल याचीही माहिती मिळावी ही विनंती.
महाराष्ट्र कुल वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ च्या कलम १४ अन्वये
कुळाने खंड दिला नाही म्हणून त्यास ३ महिने कालावधीची नोटीस देण्यात यावी . त्यामध्ये त्याने खंडाची रक्कम उक्त कालावधीत द्यावी याबाबत नमूद करणे आवश्यक . जर त्याने रक्कम दिली नाही तरच , कुल वहिवाट संपुष्टात आणता येते . खंड रक्कम दिल्यास कुल वहिवाट संपुष्टात आणता येत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by किशोर गुलाबराव खरात
27-05-2019
kharatkishor338@gmail.com
श्री. पानबुडे सर,
मि आणि माझे सख्खे चुलत भाऊ दोघांनी मिळून एक सामाईक प्लाट 5वर्ष पुर्वी विकत घेतला होता. दोघांपैकी एकाला घ्यायचा आहे, तर हक्क सोडपत्र पूरेसे होईल का?
की रितसर खरेदी करून घ्यावा लागेल. गृहकर्ज करण्यासाठी कोणती गोष्ट करणे योग्य ठरेल.
कृपया मार्गदर्शन करावे, ही नम्र विनंती.
दोनीही चालेल . मात्र दोनीही दस्तास सारखेच मुन्द्रानक शुल्क लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by shantilal kadam 8668958599
22-05-2019
shantilal.kadam079@gmail.com
माझे वडील यांच्या नावे गट नं.147 मध्ये शेतजमीन असुन ती आंबेचिंचोली ते पुळूज या रस्त्या लगत आहे. माझे वडील अशिक्षित असल्याने यारस्त्याचे अतिक्रमण माझे शेतावर झाले आहे. सध्या हा रस्त्या साव॔जनिक बांधकाम विभाग पंढरपुर (M. D.R ) अंतर्गत मंजूर होउन काम सुरू आहे परंतु हा रस्ता माझे शेतावर अतिक्रमण होत आहे. हा रस्ता गाव नकाशा मध्ये माझे जमीनीवर नसुन तो माझे क्षेत्र सोडून आहे. सदर जमिनीचे भूसंपादन झालेले नाही , कोणताही मोबदला दिलेला नाही, असे असताना सुध्दा सदर रस्ता जबरदस्तीने, माझ्या जमीनीवर करण्यात येत आहे. तरी कृपया रस्ता गाव नकाशाप्रमाने करण्यात यावा yasathi kay karave?. मी याबाबत तहसीलदार पंढरपूर, सार्वजनिक बांधकाम उपविभाग पंढरपूर, सार्वजनिक बांधकाम विभागा पंढरपूर यांना लेखी तक्रार दाखल केली होती तरीही याची कोणतीही दखल घेतली नाही ? nakasha pramane rarta karnyasathi kay karave?
आपण सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडे , नुकसान भरपाई मिल्ने बाबत नोटीस द्या . नुकसान भरपाई न दिल्यास , आपण दिवाणी दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
