जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

पतसंस्थेतुन राजीनामा देऊन सरकारी नोकरी मिळालेल्या कर्मचाऱ्याने पतसंस्थेकडे रजा रोखीकरण म्हणून ०३ महिन्याच्या पगाराची मागणी केली आहे तरी या कर्मचाऱ्यास सदर लाभ डे आहे का
मी महसूल खात्यामधून सेवानिवृत्त झालो असून, मला घरबांधणी अग्रिम कर्ज पूर्तता प्रमाणपत्र मिळालेले नाही. मी कुणाकडे अर्ज करू? मार्गदर्शन करावे.

Question by Vikas mane
01-07-2019
vikasmane555@gmail.com

सर्वे नंबर काढण्यासाठी अर्ज कोणाकडे करायचा
आपणास आपल्या जमिनीचा सर्वे नम्बर माहित नाही म्हणून आपणास त्याचा नंबर माहित करून घ्याचा आहे असे मी समजतो . आपली जमीन ज्या ठिकाणी आहे त्याचा शेजारी ( चारी बाजूनी कोण आहे ) यांची नावे माहित करून घ्या . तसेच आपले जमीनीचा ७/१२ असेल . तलाठी यांचेकडून ७/१२ घ्या . सर्वे नम्बर कळेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Rajesh kahare
29-06-2019
rajeshkahare@gmail.com

सर नमस्कार
महसूल विभागातिल गाव कामगार म्हणजे कोतवाल तसेच गावाचा पोलीस पाटील यांनी शासकीय कामात अनियमितता किंवा दुर्लक्ष केले अशावेळी त्यांना निलंबित करता येते ❓
होय
त्यांचे सेवा नियम पहा . त्या नुसार कारवाई करता येईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी व माझी पत्नी सध्या निवृत्तीमुळे मुक्काम नाशिक ह्यांचा भुसावळ तालुक्यात साकेगाव शिवारात स नं ३०७/३ मध्ये प्लॉट २१ आहे. मला असे कळले आहे कि तेथील कोणी दलाल संगनमताने आमचा प्लॉट खोट्या साह्य कागदपत्रे करून विकण्याच्या तयारीत आहे. त्याबाबत दुय्यम निबंधक भुसावळ ह्यांच्याकडे तक्रार अर्जही पाठविला आहे. ह्याबाबत अजून कोणत्या अधिकाऱ्यांकडे ह्याची तक्रार करावी ह्याचे मार्गदर्शन करावे. तसेच महसूल खाते आमच्या पासपोर्ट व आधार कार्ड ची नोंद ७/१२ ला जोडू शकेल का जेणेकरून अपप्रकार टाळू शकेल. आपला इमेल मिळाल्यास संबंधित कागदपत्रे पाठवता येतील. तसेच प्लॉट ची पुनर्मोजणी कोण करून देईल ??
कृपया मार्गदर्शन करावे
आपल्या भू खंडाची अशी कोणी विक्री करू शकत नाही . विक्री दस्त करताना विक्रेत्याचे ओळख पात्र पहिले जाते .
आपल्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

वारसाहक्काने आलेल्या वर्ग २ (वन ) जमिनीचे हक्कसोडपत्र होते का ?
वन जमीन क्झाजगी व्यक्तीस प्रदान केली जात नाही
आपल्या कडे कोणती जमीन वर्ग २ म्हणून आहे . विस्ताराने प्रश्न मांडा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by सतीश
26-06-2019
satishd78@gmail.com

माझ्या जन्मा नंतर जन्मदाते वडील सोडुन गेल्याने आईने दुसरे लग्न केले त्यामुळे माझ्या शाळेच्या दाखल्यावर दुसऱ्या वडिलांची जात टाकली आहे परंतु मी माझ्या मुलाच्या दाखल्यावर माझी मूळ जात नोंदविली आहे.मुलाचा दाखला काढताना माझ्या जन्मदात्या वडिलांच्या शाळेचा दाखला एका भावाचा शाळेचा दाखला ज्याच्या वर आमची जन्म जात आहे ती व जात प्रमाणपत्र तसेच माझ्या नावाचे gazZaet व माझा आताचा दाखला लावला होता परंतु आता माझ्या मुलाचे कास्ट सर्टिफिकेट काढताना अडचण येत आहे अप्लिकेशन रिजेक्त करण्यात आले आहे काय करू उत्तर द्यावे प्लीज
आपल्या biological वडिलांची जी जात आहे त्याचे अन्य पुरावे सक्षम अधिकारी ( प्रांत साहेब ) यांचे कडे सादर करा .अथवा Rejection order अहवाणीत करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Anil kumar
25-06-2019
ashende524@gmail.com

माझे गावाकड़े घर आहे, घर बांधताना घराची भिंत 03 फुट ग्रामपंचायतच्या जागे मधे गेली आहे.
यामुळे काही आडचंण निर्माण होईल का.
जर झाली तर उपाय सांगा please.
आणि ती जागा नावावर करता येईल का?
निश्चित
३ फूट जागेचे क्षेत्र ग्राम पंचायतीकडे मागणी करा . जर ग्राम पंचायतीने जागा दिली तर काही अडचण येणार नाही . मात्र पंचायतीने जागा दिली नाही तर , आपणास अतिक्रमण काढून टाकावे लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
1943 साली माझ्या आजोबांनी त्यांच्या सख्या भावाला 98 रुपये दिले त्याबदल्यात त्यांच्या भावाने आजोबांना 82 आर क्षेत्रामधील दक्षिणेकडील 50 आर क्षेत्र 6 वर्ष मुदतीसाठी नगद गहन खत द्वारे लिहून दिले . झालेला दस्त बिगर रजिस्टर आहे . यांना त्याचे वडील साक्षीदार आहेत हे 3 घे म्हणजेच माझे आजोबा त्यांचे भाऊ आणि 2 घांचे वडील यांनी तलाठी साहेबांसमोर तो दस्त हजर केल्याने त्याचा फेरफार तलाठी साहेबांनी नोंदविला तो आज तागायत 7/12 सादरी आहे . परंतु आजोबाच्या भावाने त्याचा मोबदला आज तागायत आम्हाला दिलेला नाही .तर या संदर्भात आमची कलेक्टर साहेबाकडे दावा चालू आहे . आमचे नाव 7/12 सादरी इतर हक्कात आहे तर ते नाव मूळ मालक म्हणून 7/12 सादरी येण्यासाठी आम्ही काय करावे याचे योग्य ते मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
१९४३ साली आपले आजोबांनी त्यांचे भावाची जमीन गहाण घेतली होती . कालावधी ६ वर्षाचा होता . सदरचा कालावधी संपला . जिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज करून अथवा दावा करून , आपल्याला relief मिळेल असे वाटत नाही . आपणास The Specific Relief Act खाली दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा .
अश्या प्रकरणात , आपले नाव ७/१२ सादरी लावावे या बाबतचे अधिकार क्षेत्र , जिल्ह्जाधिकारी न्यायालयास नाही .
मात्र आपले नाव ७/१२ सदरी लावणे या शिवाय , आपणास ९८ रुपये व त्यावरील आजपर्यंतचे व्याज मिळू शकते आपले आजोबांचे भाऊ अथवा त्यांचे वारस यांनी हि रक्कम दिली नाही तरच आपले नाव ७/१२ सदरी लागू शकते .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सामान्य प्रशासन विभाग मंत्रालयीन विभाग मधील लेखा लिपिक व वरिष्ठ लेखापाल या पदाची कर्तव्य व जबाबदाऱ्या हव्या आहेत.तसेच तंत्र शिक्षण संचनालय येथील वरिष्ठ लिपिक तथा लेखापाल या पदाची कर्तव्य व जबाबदाऱ्या हव्या आहेत
साहेब आमची वडिलोपार्जित जमीन माझया चुलत काकीच्या नांवावर आहे , माझे आजोबा व काकीचे सासरे सक्के भाऊ होते आणि माझ्या आजोबांचे नाव ७/१२ वरती सहाहिषेदार म्हणून आहे , परंतु माझे आजोबा मयत झाले आहेत, तर आम्हाला १/१२ वरती आमची सर्वांची नावे लावायची आहेत तर त्यासाठी माझ्या चुलत काकीची सहीची गरज आहे का , तसेच जमिनीचे वाटप करता येईल का कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद .
काकीचे संमतीची आवश्यकता नाही . आपण अधिकार अभिलेख दावा प्रांत अधिकारी यांचेकडे दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार. मला O. B. C. महामंडळाकडून थेट कर्ज योजनेअंतर्गत रुपये 25000 मंजूर झालेले आहेत. त्यानुसार जामीनदाराच्या 7/12 उताऱ्यावर रुपये 25000 चा बोजा नोंद घेणे आवश्यक आहे. मात्र मा. तलाठी साहेब असे म्हणतात की रुपये 25000 चा बोजा नोंद करता येत नाही. त्यासाठी किमान 1 लाख रुपये रक्क्म असावी लागते असे शासकिय परिपत्रक आहे. तरी याविषयी खुलासा व्हावा.
तलाठी यांचे म्हणणे बरोबर आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

निलंबन कालावधी कर्तव्यकाल करणेबाबत(न्यायालयीन निर्णयाचे अधीन राहून) बाबत काही gr, परिपत्रक असेल तर कृपया share करावे
महाराष्ट्र नागरी सेवा ( सेवेत सामील होणे ,परदेशी सेवा , व निलंबन , बडतफी व सेवेतून काढणे कालावधीत वेतन ) नियम १९८१ वाचा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर,
माझे पणजोबा यांचे निधन हे १९७२ साली झाले आहे. परंतु
ह्याची नोंद कुठेही केली नाही. परंतु आता जमीन ला वारीस होण्यासाठी त्यांचा आता मुत्यू दाखला लागत आहे परंतु त्यांचा कुठेही नोंद नसल्यामुळे जमीन हि माझ्या आजोबांच्या नावावर होत नाही तर आता यासाठी काय आणि असे करणे सोयीचे होईल.
कोर्टातून असा दाखला मिळेल का?? जर हो तर कसा मिळेल

कृपया मार्गदर्शन करावे
The Registration of Births and Deaths Act 1969 , च्या कलम १३ (३) नुसार , न्यायिक दंडाधिकारी यांचे कडे अर्ज करून त्यांचा मृत्यू दिनांक जाहीर करून घ्या . त्या आधारे जन्म मृत्य नोंदणी अधिकारी , आजोबांचे मृत्यूची नोंद करतील व आपणास मृत्यू दाखला मिळेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार साहेब,
माझ्या क्षेत्रातून हायवे गेला आहे त्यात माझी ९० गुंठे क्षेत्र माझ्या७/१२ वरून कमी झाले आहे. पण प्रत्येक्षात माझी 35 आणि शेजारील गटातील 55 गुंठे गेली आहे. आम्ही बाहेर आपआपसात तडजोड पत्र करून मोबदला वाटुन घेतला होता. पण आता पुर्ण 90 गुंठे क्षेत्र माझ्या 7/12 वरती नोंद झाली आहे व त्यामुळे माझे क्षेत्र कमी झाले आहे. तरी आता 7/12 बरोबर करून घेणे साठी काय करावे लागेल क्रुपया मार्गदर्शण करावे.
आपली जमीन संपादित झाली त्या वेळेस निवडा जाहीर झाला . निवडा जाहीर झाल्यावर वाजवी कालावधीत ( ६ महिने ) लेखन प्रमाद चूक दुरुस्त करता येते . निवडा रक्कम स्वीकारताना आपण हि बाब भू संपादन अधिकारी यांचे निदर्शनास आणून देणे आवश्यक होते .
ज्या वेळेस संपादन मूळ आधी सूचना काढण्यापूर्वी , संयुक्त मोजणी झाली , त्या नंतर अधिसूचना काढण्यात आली , त्या वेळेस आपण हरकत घेणे आवश्यक होते .
आपणास हि दुरुस्ती करावयाची असल्यास आपणास , जाहीर निवड , writ याचिके द्वारे , उच्च न्यायालयात आव्हानीत करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर, माझ्या आईची अमरावती जिल्ह्यात ५ एकर भोगवाटदार २ जमिन आहे. आईच्या मृत्युनंतर आम्ही तलाठ्याकडे वारसनोंदी साठी सर्व कागदपत्र (मृत्यू दाखला, प्रतिज्ञापत्र, सर्व वारसांचे नाव पत्ता आधार कार्ड पुरावा इत्यादी) दिले. सर्व वारसदार रक्ताच्या नात्यातील असून एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. जमिनी बाबय कोणताही वाद नाही.असे असून ही दोन महिने झाले तरी तलाठी वारस नोंद करण्यास टाळाटाळ करत आहे.त्यांनी आम्हांला Legal Heir Certificate कोर्टाकडून आणण्यास सांगितले.आमचे जमिनी बाबत कोणतेही वाद नसताना हे Certificate देणे गरजेचे आहे का? आमच्या आईची सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमिन होती त्यावर आमची वारस नोंद होऊन ७/१२ वर नावे सुद्धा लागली त्यासाठी आम्ही कोणतेही Legal Heir Certificate दिले नव्हते फक्त वर उल्लेख केलेले कागदपत्र दिले.मग इथे अमरावती ला का Legal Heir Certificate ची मागणी केली जात आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महसूल खात्याचे एकच नियम असताना तलाठी महाशय जाणिवपूर्वक दिरंगाई करत आहे. Legal Heir Certificate हे खूप खर्चिक व वेळखाऊ procedure हे निरदर्श नास आणून दिल्यावर ही ते आपला हेका सोडायला तयार नाही.कृपया मार्गदर्शन करावे.
आपण सदरची बाब , जिल्हाधिकारी यांचे निदशंनास अनु शकता
१. आपले सरकार - online Platform
2. लोकशाही दिन
३. प्रत्यक्ष भेट घेऊन आपले तक्रार जिल्हाधिकारी /प्रांताधिकारी यांचे निदर्शनास आणून देणे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Sir,
Mi tal- walawa, dist- sangli madun aahe.
Aamchya gavi ek devasthan trust aahe ti 1952 pasun registered aahe tasech trust la inam 3 agriculture land aahe.
1952 pasun sadar trust la 3 trustees hote, 1984 madhye J.C.C. Pune yani new scheme keli tyapramane 3 trustees na remove karun new 5 trustees nemale.
Tya order la last chya trustees ni District Court, Sangli yethe challenge kele, D.C. sangli yani 1991 la matter remanded karun fresh enquiry chi order keli tasech "defecto manager or temporary panchas mhanun 5 paiki 2 trustees chi niyukti keli". Tyapaiki ek maze vadil (father) aahet.
2013 madhye dusarya trustee chi death zalya nantar aamhi B.P.T. Act 50 A(3) nusar scheme madhye durusti sathi Charity commissioner, sangli yanchyakade application kele parantu 2017 madhye Charity commissioner yani " District court ne remanded kelele matter ajun suru zale nahi tasech to matter sapadat nahi, asha condition madhye sadar application chalu shakat nahi" ashi order karun matter close kela aahe. Tasech sadar inam 3 agriculture land ha 1991 pasun mazya vadilanchya vahivatit aahe. Sir maze question ase aahet,
1) ya condition madhye aamhi kay karu shakto? Karan aata maze vadil pn aged aahet.
2) gavatil kahi lok aamhala vaglun new scheme sathi try karat aahet, asha condition madhye charity commissioner other lokani dakhal kelela scheme application manjur karu shaktat ka?
3) jo agriculture land aamhi kasat aahe tasech tyachya income cha audit report aajparyant aamhi charity commissioner office madhye dakhal kela aahe. To land aamchya kadun kadhun ghetla jau shakto ka?
१. आपण काही करू शकत नाही
२. जी चौकशी चालू आहे . ती पूर्ण होणे आवश्यक आहे
३. देवस्थान जमीन विश्वस्त यांचे नावे होऊ शकत नाही . आपणास देवस्थान जमीन कसण्याचा अधिकार नाही . आपणाकडून हि जमीन काढून घेतली जाऊ शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

govt. job for well educated aurtho. handicap person by3% handicap quota

Question by Swapnil kshirsagar
15-06-2019
kshswapnil8@gmail.com

1. सहकारी पतसंस्थेचे गहाणखत कर्जाची रक्कम पतसंस्थेच्या कार्यालयात रोख दिली जाते की पतसंस्थेचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेचा चेक दिला जातो ?
2. पतसंस्था 6 लाख कर्जाची रक्कम पतसंस्थेच्या कार्यालयात रोख देऊ शकते का ?
हा प्रश्न संभंधित पतसंस्था योग्य रीतीने देऊ शकेल आपण त्यांना विचारा , त्यासाठी हा फोरम योग्य नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

ग्राम पंचायत निवडणूक प्रशिक्षण पॉवर पॉईंट प्रेसेंटेशन मिळेल का? तहसील कार्यालय सिल्लोड जी औरंगाबाद
आपण तयार करा . आपला अभ्यास होईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर,
मी एक na प्लॉट विकत घेत आहे.agreement of sale मध्ये मालकाने नावापुढे huf असे लिहिलेले आहे.सादर मालकाचे पॅन कार्ड पब huf चे आहे.परंतु सातबारा उतारा वर मालकाच्या नावापुढे huf(कर्ता)अशी नोंद नाहीये. सादर प्लॉट वर कर्ज मिळणे साठी मी बँकेकडे अर्ज केला आहे परंतु बँकेने

"जर मूळ मालक हा प्लॉट huf च्या कपॅसिटी मध्ये विकत असेल तर सातबारा वर सुद्धा नावापुढे huf अशी नोंद करून आणा किंवा अग्रीमेंट of sale मधून huf काढून correction deed करून आना असे सांगत आहे."

सादर जमीन हि त्यास वंशपरंपरेने आलेली आहे.

बँक सांगते ते बरोबरच आहे का?
कृपया मार्गदर्शन करावे.
धन्यवाद सर,

आपला विश्वासू,

अमोल गवांदे
संगमनेर
कायदेशीर बाबीपेक्षा व्यावहारिक बाब महत्वाची
बँक आपणास कर्ज देत आहे त्यामुळे , बँक जे सांगत आहे त्याप्रमाणे करणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,
वडीलांच्या निधनानंतर वडिलोपार्जित जमिनीच्या 7/12 वर वारसाहक्काने ' मोठ्या भावाचे नाव ( कुटुंब प्रमुख) आणि इतर 6 ' अशी नोंद आहे. मोठय़ा भावाने मनमानी पद्धतीने ढोबळ वाटप केले असले तरी कागदोपत्री वाटणीपत्र्क करून दिले नाही. सदर प्रकरण तालुका दिवाणी न्यायालयात मागील 7 वर्षांपासून प्रलंबित आहे.
दरम्यानच्या काळात शासनाकडून मिळणारे विविध स्वरूपातील अनुदानाची रक्कम मात्र फक्त मोठ्या भावाच्या बँक खात्यात जमा होत असते. तहसीलदाराकडे हरकतीचा अर्ज देऊनही कार्यवाही झाली नाही.
प्राप्त अनुदान सर्व वारसदारांना समप्रमाणात वाटप व्हायला हवे अथवा अनुदान रक्कम शासनाला परत करण्यात यावी असे आम्हाला वाटते.
मार्गदर्शन करावे ही विनंती.
जिल्हाधिकारी यांचे निदर्शनास हि बाब
लोकशाही दिन , आपले सरकार अथवा आपण प्रत्यक्ष भेटून आणून द्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

30-40 वर्षापूर्वी आमच्या वडिलांनी गाव-शिवारातील एक शेतजमीन गहानखत करुन ताब्यात घेतली. दरवर्षी पिक-पाहणी अहवालात तशी नोंद होत राहीली. त्या नंतर काही वर्षांनी मुळ मालकाने ती जमीन परत घेतली. मात्र आजही सदर जमिनी च्या 7/12 वर ( वडिलांच्या मृत्यूनंतर वारसाहक्काने) आमच्या वडीलबंधू चे नाव आहे. विशेष बाब अशी की आजही त्या शेतजमिनीच्या 7 /12 वर पिक-पाहणी अहवालात आमच्या मोठ्या भावाच्या नावाची नोंद घेतली जाते.
तसेच शासनाकडून विविध योजनांद्वारे मिळणारे अनुदानाची रक्कम ही आमच्या मोठ्या भावाच्या बँक खात्यात जमा होत असते.
यासंदर्भात मार्गदर्शन व्हावे ही नम्र विनंती.
मूळ मालकाने हि बाब संभंधित अनुदान वितरित करणाऱ्या विभागाचे निदर्शनास आणून दिल्यास भावास , अनुदान व्याजासह परत करावी लागेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Bhaskar MAPARI
13-06-2019
maparimilind11@gmail.com

Sir,
माझ्या वडिलांच्या नावावर २५आर एवढी जमीन आहे. संबंधित जमीन गट एकत्रीकरण योजनेमध्ये २९३ गट न. नुसार ७/१२ वर ८ अ वर वडिलांच्याच नावावर आहे. गट एकत्रीकरण योजना ही आजोबांच्या काळामध्ये झाली. या योजनेनुसार संबंधित गट नंबर ची जमीन आजोबांच्या नावावर झाली. त्यावेळच्या जबाबाच्या नकले नुसार संबंधित गटाची मालकी आमची दाखवली जाते. परंतु संबंधित जमिनीचा ताबा दुसऱ्याच व्यक्तींकडे आहे. या जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी काय करावे?
जमीन एकत्रीकरण योजना झाल्यावर , जमीचा ताबा एकत्रीकरण अधिकारी ( Settlement Officer ) यांनी ताबा आपणास दिला असेल ? त्याची तबे पावती आपणाकडे आहे का ? नसेल तर उप अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडून तांबे पावती घ्या . जमीचा ताबा आपणाकडे इतके दिवस नसताना आपण शांत काय बसला ?
असोत The Specific Relief Act खाली , जमिनीचा ताबा परत मिळण्यासाठी दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा.सर

माझ्या वडिलांनी १ हे ५२ गुंठे जमीन १९८१ साली निबंधक कार्यालाय नोंद करुन खरेदी केलि होति. आजतगायत जमिन अाम्हिच कसतोय पण जमिन घेतल्यानंतर त्यांचे मानसिक संतुलन बिघडले व कागदपत्रे गहाळ झालि होति त्या कारणाने ७/१२ ला नोंद करणे राहुन गेले होते. कागदपत्रे मिळाल्यानंतर मी गेले २ वर्षापासुन जमीनिची ७/१२ला नोंद व्हावी म्हणुन तलाठि याच्याकडे अर्ज व लागणरी कागदपत्रे खरेदिखत, प्रत दस्त प्रत सादर केलि परंतु त्यावर कुठलिहि कार्यवाहि झालि नाहि. या परिस्थितिचा गैरफायदा घेत मुळ मालकाने वरिल जमिनिचि फेरविक्री केलि. सदर जमिन विक्री होताना केलेल्या पेपरनोटिशिला मी वकिलामार्फत नोटिस पाठवुन हरकत घेतलि होति. सदर व्यवहाराचा तलाठि कार्यालायात फेरफारिस अर्ज आल्यानंतर त्यालाहि मी हरकत घेतलि परंतु हे प्रकरण नायब तहसिलदार यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी इतके वर्ष ७/१२ नोंद का नाहि केलि? असे विचारले. मी आणि वडिलांनी त्याच्या आजारपणाचीहि माहिती दिलि. परंतु आता सदर फेरफारास मंजुरि देण्यात आलि आहे.

अशा प्रकारे काहि सरकारी अधिकारि पैशासाठि काहिहि करतात अशा परिस्थितित मी काय करावे कारण कोर्टात जाण्याइतकि परिस्थितिहि नाहि.
आपले खरेदी खत अगोदरचे आहे . आपण काळजी करण्याचे कारण नाहीं . आपण मंजूर फेरफार विरुद्ध प्रांत अधिकारी यांचे कडे अपील दाखल करा . निर्णय आपल्या बाजूने लागेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.39 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3400
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3