जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

सर माझ्या आजोबांची वडिलोपार्जित
शेती काही कारणास्तव महाजनको ने नवीन पॉवर प्लांट साठी अधिग्रहित केली आहे. माझा असा प्रश्न आहे कि
माझ्या आजोबांचे निधन १९९४ या साली झाले आहे आणि इतर वारस सुद्धा लागलेले आहे जेव्हा जमीन संपादित झाली तेंव्हा सर्वे मिळून ५ वारस लागलेले होते. माझे वडील आणि त्यांचे दोन भाऊ आणि २ बहिणी
१) माझ्या वडिलांचे निधन झालेले आहे आणि मला प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट हवे आहे जॉब साठी, तर मला असे विचारायचे आहे कि मला इतर जे वारसदार आहे त्यांचे संमतीपत्र घ्यावे लागेल का प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट मिळवण्या यासाठी ,किंवा इतर दुसरा पर्याय आहे का प्रकल्पग्रस्त दाखला मिळवण्यासाठी.

२) कोण कोणते डोकमेण्ट लागतात प्रकल्पग्रस्त दाखला मिळवण्यासाठी .
३) इतर वारसदार काही हरकत घेऊ शकतात का जर त्यांच्यी संमती जर नाही घेतली तर
४) आणि मला प्रकल्पग्रस्त दाखला कुठे मिळू शकेल कृपया माहिती द्या
५) सर्वे नंबर एकाच असल्यामुळे एकाच सर्टिफिकेट मिळेल कि सर्वाना सर्टिफिकेट मिळेल
मला असे सांगण्यात आले आहे कि आता कायदा बदल्या मुले आता इतर वारस दारांचे संमती पात्र लागत नाही असे सांगण्यात आले आहे . ते खरंच आहे का ???
आणि असेल तर मला प्रकल्पग्रस्त चा दाखला मिळू शकतो का
६) माझ्या वडिलांच्या बहिणीचे निधन झालेले आहे तर त्यांचा मुलांचे संमती मला घ्यावी लागेल का कि फक्त मृत्यू दाखला दिला तरी चालेल का ?
सर कुपया लवकरात लवकर मला माझ्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे

नवीन काही नियम आला आहे का या विषयी
आपले एकूण किती क्षेत्र संपादित झाले आहे ?
प्रत्येकाचे नावे ( वारस प्रत्येकी ) किती क्षेत्र आहे .
प्रकल्प ग्रस्त दाखला मिळण्यासाठी कमीत कमी २० गुंठे क्षेत्र संपादित झालेले असणे आवश्यक आहे . तसेच ज्या प्रकल्पसाठी जमीन संपादित झालेली आहे त्या प्रकल्पासाठी , १९९९ चा प्रकल्प बाधित कायदा अधिसूचने द्वारे लागू केलेला असणे आवश्यक आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर
आम्ही 10 भावंडे आहोत.आमची17.35 एकर वडिलोपार्जित जमीन आहे. त्यात वाद चालू आहे. कारण ती गव्हर्नमेंट रेकॉर्ड मध्ये जास्त दिसत आहे. म्हणजे जुन्या रेकॉर्ड मध्ये तलाठी कढून चूक अशी झाली कि एकर चे हेक्टर मध्ये करताना चुकीने ने वाडिव झालीय.. म्हणजे 17.35 एकर ची हेक्टर मध्ये 6.94 हेक्टर होतय तर तलाठी ने ती 7.94 हेक्टर रेकॉर्ड ला नोंद करून टाकली होती तरी ती शेतजमीन आता कमी करून पोट वाटप करायचं पण तयासाठी आम्ही 10 भावंडांपैकी 8 चा सहमतीने आम्ही सर्कल कडे मागिल 2 वर्षा पासून प्रकरण पाठवलाय पण ती process अजून पुढे गेलेली नाही . त्यासाठी मी सर्कल कडे वारंवार गेलो पण काही झालेलं नाही . वा त्यांनी आता 2 वर्षा नंतर ते प्रकरण तहसीलदार कडे पाठवले 2 वर्षा चा दिरंगाई नंतर. वा process अजून अडकून पडलीय तयासाठी काय करता येईल सर. वा त्याची पूर्ण process काय आहे सर.
तहसीलदार यांना स्मरण करून द्या . अथवा जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करा . सादर बाब त्यांचे निदर्शनास आणून द्या . वास्तविक तहसीलदार यांनी हि लेखन प्रमाद चूक कलम १५५ खाली दुरुस्त करणे आवश्यक आहे . मंडळ अधिकारी यांना दिरंगाई बद्दल जबाबदार धरता येणार नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या आईच्या माहेरील जागेवरील काही सातबारा उताऱ्यावर मामाकडे आजोबांचे निधन झाल्यावर कुटुंब प्रमुख म्हणून मामाच्या नावाची नोंद झाली. नंतर मामाच्या मृत्यूनंतर चुकीने माझ्या आईचे व आजीचे नाव कमी होऊन फक्त मामाच्या वारसाची नोंद झाली. नजरचुकीने राहून गेलेली नावे गावनमूना ७/१२ वर घेणे बाबत मी तहसीलदारांना अर्ज दिला आहे व तलाठी कार्यलयाने रिपोर्ट दिला आहे. परंतु तलाठी कार्यलयाने अर्ज तहसीलदारांकडे न करता प्रांत कार्यलयात द्यायचा सल्ला दिला आहे.

मला तहसीलदारकडून आदेश मिळू शाळतो का कि प्रांत कार्यलयात अर्ज करणे कायदेशीर योग्य ठरेल? कृपया मार्गदर्शन करावे.
ज्या फेरफारानें केवळ मामी व मामाचे वारसांची नावे दाखल आहेत तो फेरफार प्रांताधिकारी यांचेकडे दाखल करणे आवश्यक आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

१९२७ साली २३ एकर जमिन खरेदीने घेतली परंतु खरेदी तारखेला त्यातील ५०% जमिन परस्पर विक्रीने गावातील प्रतिष्ठित व्यक्तिच्या नावे झाली त्यानंतर उर्वरित ५०% जमीनीमधील २५% जमीन १९२८ साली गावातील देवस्थानास गावकर्यान्नी घेतली परंतु तहसील मधे देवस्थान नोंद नाही उर्वरित २५ % जमीन नावे राहिली या संदर्भात दावा दाखल करता येइल का?

Question by Pradeep j
03-06-2019
904933@gmil.com

नमस्कार सर
सर्वे नंबर अ चे क्षेत्र 25 एकर 5 गुठे आहे?
सर्वे नंबर ब चे क्षेत्र 6 एकर 22गुठे आहे?
दोनी सर्वे नंबरच एकत्रित टिपण पक्का बुक मध्ये 29 एकर 31 गुठे नोंद आहे ,
दोनी तफावत 73 गुठे आहे,
सर्वे नंबर अ चे पहिले 24एकर 5 गुठे खोडून 25एकर 5 गुठे केले, खासरा प्रत्र मध्ये अशी खाडा खोड कली आहे
माझे क्षेत्र ब आहे
मोजणी मध्ये मला माझे क्षेत्र 6एकर २२गुठे हद्द कायम करूण देत नाही
कुपया सही स्तर माही ती कळवा
अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
माझ्या आजोबांची २१ एकर जमीन होती, आजोबांनी १९६९ साली १० एकर २० गुंठे जमीन एका व्यक्तीला विकली, त्या व्यक्तीने त्याच्या ३ मुलांना समान वाटणी केली, प्रत्येकी ३ एकर २० गुंठे.
पैकी एका मुलाचा वाटा माझ्या वडिलांनी व २ चुलत्यांनी मिळून १९९४ साली विकत घेतला, आता आम्हाला एकूण जमीन १४ एकर झाली विकत घेतलेली ३ एकर २० गुंठे व आजोबांची वडिलोपार्जित १० एकर २० गुंठे व नंतर १९९६ साली माझ्या वडिलांचे व चुलत्यांचे जमिनीची समान वाटणी झाली पण माझ्या वडिलांच्या वाट्याला विकत घेतलेली ३ एकर २० गुंठे व आजोबांची वडिलोपार्जित १ एकर २० गुंठे अशी एकूण ५ एकर जमीन वाट्याला आली. वडील थोरले असल्याने शेवटी वाटणी उचलावी लागल्याने जमीन थोडीशी हलकी म्हणून ५ एकर, दोन नंबर चुलता अपंग आहे, एक हात ज्वारी करायच्या मशीन मध्ये गेल्यामुळे त्याला तालीच्या पोटातील भारी जमीन व वाड्यात हिस्सा म्हणून ४ एकर, तीन नंबर चुलता लहान असल्याने त्याला किराणा दुकान म्हणून ५ एकर. (यात हलकी / भारी जमीन, राहता वाडा व किराणा दुकान यांच्या वाटणीमुळे क्षेत्र कमी जास्त)
पण ७ / १२ उतारावर ५ एकर जमीन बरोबर दिसत आहे. पण इतर हक्कात ३ आत्या व आजी यांची नावे आहेत.
मला वाटते नियमाप्रमाणे फक्त १ एकर २० गुंठे वरच म्हणजे वडिलोपार्जित जमिनीवरच इतर हक्कातील नावे पाहिजे पण ती उताऱ्यावर सर्व क्षेत्रात दिसत आहेत कारण वडिलांच्या वाट्याला आलेली विकत घेतलेली ३ एकर २० गुंठे व वडिलोपार्जित १ एकर २० गुंठे यांचा गट नंबर एकच आहे. तर ३ एकर २० गुंठे व १ एकर २० गुंठे याचा गट फोडता येईल का व त्यांची नावे ३ एकर २० गुंठे वरून कमी करता येतील का.
पण अजून एक अडचण आहे आजी मयत झाली आहे, त्यांमुळे आजीच्या इतर वारसांना म्हणजे दोन चुलत्यांना इतर हक्कातील नावे कमी करताना बोलवावे लागेल का ?
मी १९९७ साल चा फेरफार काडून पहिला आहे त्यात तिघांची समान वाटप व क्षेत्र दिसत आहे.

कृपया मार्गदर्शन करावे

आजोबांची १० एकर २० गुंठे जमिनीची वाटणी २००५ पूर्वी म्हणजे १९९६ साली झाली आहे . त्यामुळे वाटणी झाल्यानंतर ती जमीन वडिलोपार्जित स्वरूपाची राहत नाही . तसेच ३ एकर २० गुंठे जमीन आपले वडील व चुलत्यांनी विकत घेतली आहे . ती जमीन वडील व चुलत्यांची स्व कष्टर्जित जमीन होते . त्यामुळे या जमिनीवर आजी /आत्या यांचा कोणताही अधिकार नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जमीन खंडाने दिलेली असताना आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा खंड मला मीळालेला नाही शिवाय खंडाने घेणाऱ्याने त्याचे नाव इतर हक्कात लावलेले आहे तरी इतर हक्कतील त्याचे नाव कमी करण्यासाठी मार्गदर्शन करावे शिवाय कालावधी कीती लागेल याचीही माहिती मिळावी ही विनंती.
कुळाने खंड दिला नाही म्हणून, खुलासा कधी नोटीस दिली होती का ? नोटीस दिल्यानंतर कुळाने , खंड दिला होता का ? त्याने काही उत्तर दिले होते का ?
नसल्यास आपण , कुळवहिवाट संपुष्ठात आणण्यासाठी मामलतदार यांचेकडे दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जमीन खंडाने दिलेली असताना आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा खंड मला मीळालेला नाही शिवाय खंडाने घेणाऱ्याने त्याचे नाव इतर हक्कात लावलेले आहे तरी इतर हक्कतील त्याचे नाव कमी करण्यासाठी मार्गदर्शन करावे शिवाय कालावधी कीती लागेल याचीही माहिती मिळावी ही विनंती.
महाराष्ट्र कुल वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ च्या कलम १४ अन्वये
कुळाने खंड दिला नाही म्हणून त्यास ३ महिने कालावधीची नोटीस देण्यात यावी . त्यामध्ये त्याने खंडाची रक्कम उक्त कालावधीत द्यावी याबाबत नमूद करणे आवश्यक . जर त्याने रक्कम दिली नाही तरच , कुल वहिवाट संपुष्टात आणता येते . खंड रक्कम दिल्यास कुल वहिवाट संपुष्टात आणता येत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

श्री. पानबुडे सर,
मि आणि माझे सख्खे चुलत भाऊ दोघांनी मिळून एक सामाईक प्लाट 5वर्ष पुर्वी विकत घेतला होता. दोघांपैकी एकाला घ्यायचा आहे, तर हक्क सोडपत्र पूरेसे होईल का?
की रितसर खरेदी करून घ्यावा लागेल. गृहकर्ज करण्यासाठी कोणती गोष्ट करणे योग्य ठरेल.
कृपया मार्गदर्शन करावे, ही नम्र विनंती.
दोनीही चालेल . मात्र दोनीही दस्तास सारखेच मुन्द्रानक शुल्क लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझे वडील यांच्या नावे गट नं.147 मध्ये शेतजमीन असुन ती आंबेचिंचोली ते पुळूज या रस्त्या लगत आहे. माझे वडील अशिक्षित असल्याने यारस्त्याचे अतिक्रमण माझे शेतावर झाले आहे. सध्या हा रस्त्या साव॔जनिक बांधकाम विभाग पंढरपुर (M. D.R ) अंतर्गत मंजूर होउन काम सुरू आहे परंतु हा रस्ता माझे शेतावर अतिक्रमण होत आहे. हा रस्ता गाव नकाशा मध्ये माझे जमीनीवर नसुन तो माझे क्षेत्र सोडून आहे. सदर जमिनीचे भूसंपादन झालेले नाही , कोणताही मोबदला दिलेला नाही, असे असताना सुध्दा सदर रस्ता जबरदस्तीने, माझ्या जमीनीवर करण्यात येत आहे. तरी कृपया रस्ता गाव नकाशाप्रमाने करण्यात यावा yasathi kay karave?. मी याबाबत तहसीलदार पंढरपूर, सार्वजनिक बांधकाम उपविभाग पंढरपूर, सार्वजनिक बांधकाम विभागा पंढरपूर यांना लेखी तक्रार दाखल केली होती तरीही याची कोणतीही दखल घेतली नाही ? nakasha pramane rarta karnyasathi kay karave?

आपण सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडे , नुकसान भरपाई मिल्ने बाबत नोटीस द्या . नुकसान भरपाई न दिल्यास , आपण दिवाणी दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी crpf मध्ये सेवारत असून मला कसण्यासाठी शासकीय जमीन मिळण्यासाठी आवश्यक बाबी बाबत मार्गदर्शन करावे
महाराष्ट्र जमीन महसूल ( शासकीय जमिनीची विल्लेवाट लावणे ) नियम १९६९ नुसार , व्यक्तीच्या नावे जमीन नसल्यास ( असल्यास २ हे पेक्षा कमी आहे तर , देण्यात येणारी जमीन २ हे पर्यंत त्याचे धारण क्षेत्र होईल त्या मर्यादेत ) जमीन देता येते . आपल्या वास्तवाच्या ठिकाणापासून ८ किलोमीटर परिसरात आपणास जमीनदेण्यात येते
आपण आपले क्षेत्राच्याबी जिल्हाधिकरी यांचेकडे अर्ज करा . तत्पूर्वी तहसील कार्यालयात जाऊन लँड बँक मधून , उपलब्ध व निर्बद्ध रित्या वाटपास उपलब्ध जमिनीची माहिती घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
माझ्या आजोबांना सन १९४३ साली त्यांच्या भावाने नजर गहाण खताद्वारे आम्हास 50 आर क्षेत्र लिहून दिले होते सदरचा दस्त विना रजिस्टर आहे तलाठी साहेबांनी त्या गहाण खताचा फेरफार मंजूर केला ७/१२ सदरी सण १९४३ साली आमच्या आजोबांचे नाव इतर अधिकारात लागले असून आज तागायत आहे ... ते नाव अधिकारात येईल का ? ते इतर अधिकारातील नाव अधिकारात आणण्यासाठी काय करावे , किंवा ७/१२ सदरी अधिकारात नाव येण्यासाठी काय करावे ? कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
आजोबांचे भावाने आजोबांना काही क्षेत्र गहाण खताने दिले . मात्र त्या बदल्यात आपल्या आजोबांनी काही पैसे त्यांच्या भावांना दिले असतील .आपले चुलत आजोबांनी त्यांना दिलेले पैसे परत केले आहेत का ?
आपणास आपले आजोबांनी , चुलत आजोबांना दिलेले पैसे परत मिळण्यासाठी दिवाणी दावा दाखल करावा लागेल . जर चुलत आजोबा अथवा त्यांचे वर्षांनी पैसे परत केले नाहीत तर , आपले नावे जमीन होईल अन्यथा आपले नावे जमीन होणार नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Balajisawant
21-05-2019
Balajisawant927@gmail.com

सर माझ्या वडिलांनी गावठाण मधील एक जागा खरेदी केली त्याची खरेदी नोंदणी रजिस्टर कार्यालयात झालेली आहे जागा खरेदी करुन 20 वर्षे झाले परंतु खरेदी करतेवेळी त्या खरेदीदस्तावर सिटी सर्व्हे नंबर टाकण्यात आला नसल्यामुळे आजही सिटी सर्व्हे ला मुळ मालकाच्या नावे नोंद आहे मी त्या सिटी सर्व्हे कार्यालयात वडिलांच्या नावाने नोंद लावण्यासाठी गेलो असता मला त्यांनी डबल नविन खरेदीदस्त बनवण्यास सांगितले आहे वडिलांच्या नावे नोंद करण्यासाठी काय करावे
गावठाणाचा सिटी सर्वे झाला असेल तरच , गावठाणातील जमिनींना , CTS नंबर असतो . अन्यथा गावठाणातील जमिनीला CTS नंबर नसतो .
सल्ला दिल्या प्रमाणे , दुरुस्त खरेदी खत करावे लागेल . म्हणजे नवीनच खरेदी खत करावे लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
नमस्कार सर,
माझ्या आजोबांची २१ एकर जमीन होती, आजोबांनी १९६९ साली १० एकर २० गुंठे जमीन एका व्यक्तीला विकली, त्या व्यक्तीने त्याच्या ३ मुलांना समान वाटणी केली, प्रत्येकी ३ एकर २० गुंठे.
पैकी एका मुलाचा वाटा माझ्या वडिलांनी व २ चुलत्यांनी मिळून १९९४ साली विकत घेतला, आता आम्हाला एकूण जमीन १४ एकर झाली विकत घेतलेली ३ एकर २० गुंठे व आजोबांची वडिलोपार्जित १० एकर २० गुंठे व नंतर १९९६ साली माझ्या वडिलांचे व चुलत्यांचे जमिनीची समान वाटणी झाली पण माझ्या वडिलांच्या वाट्याला विकत घेतलेली ३ एकर २० गुंठे व आजोबांची वडिलोपार्जित १ एकर २० गुंठे अशी एकूण ५ एकर जमीन वाट्याला आली. वडील थोरले असल्याने शेवटी वाटणी उचलावी लागल्याने जमीन थोडीशी हलकी म्हणून ५ एकर, दोन नंबर चुलता अपंग आहे, एक हात ज्वारी करायच्या मशीन मध्ये गेल्यामुळे त्याला तालीच्या पोटातील भारी जमीन व वाड्यात हिस्सा म्हणून ४ एकर, तीन नंबर चुलता लहान असल्याने त्याला किराणा दुकान म्हणून ५ एकर. (यात हलकी / भारी जमीन, राहता वाडा व किराणा दुकान यांच्या वाटणीमुळे क्षेत्र कमी जास्त)
पण ७ / १२ उतारावर ५ एकर जमीन बरोबर दिसत आहे. पण इतर हक्कात ३ आत्या व आजी यांची नावे आहेत.
मला वाटते नियमाप्रमाणे फक्त १ एकर २० गुंठे वरच म्हणजे वडिलोपार्जित जमिनीवरच इतर हक्कातील नावे पाहिजे पण ती उताऱ्यावर सर्व क्षेत्रात दिसत आहेत कारण वडिलांच्या वाट्याला आलेली विकत घेतलेली ३ एकर २० गुंठे व वडिलोपार्जित १ एकर २० गुंठे यांचा गट नंबर एकच आहे. तर ३ एकर २० गुंठे व १ एकर २० गुंठे याचा गट फोडता येईल का व त्यांची नावे ३ एकर २० गुंठे वरून कमी करता येतील का.
पण अजून एक अडचण आहे आजी मयत झाली आहे, त्यांमुळे आजीच्या इतर वारसांना म्हणजे दोन चुलत्यांना इतर हक्कातील नावे कमी करताना बोलवावे लागेल का ?
मी १९९७ साल चा फेरफार काडून पहिला आहे त्यात तिघांची समान वाटप व क्षेत्र दिसत आहे.

कृपया मार्गदर्शन करावे
आदरनीय सर, माझ्या जमिनी च्या बांधालगत च्या शेजार्‍याने अवैध रित्या माती उचलली व तिची विक्री केली आहे व माझा बांध फोडला आहे .तरी यावर काय कारवे लागेल.
अवैध्य रित्या माती उचली आहे म्हणजे माती चा वापर कोठे केला आहे ?
त्याचेच शेतात केला असल्यास , तो दंडनीय कारवाईस पात्र होत नाही .
आपला बांध फोडला आहे , त्याचेकडून नुकसान भरपाई मागा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Sir, date 10-05-2019 The Bombay High Court granted probate on 09/01/2019 with reference to will. In said will executor was appointed. Can executor, on the basis of probate order, submit the application to the concerned Tahsildar/Talathi for adding the name of legal hairs as mentioned in will ? if so, a] in this case can you specify the list of other documents required ? b] specific time limit prescribed to add the names in 7/12 for concerned Talathi ? c] if the said time limit is not followed by the Talathi then who is the higher authority to take up the matter ? Sir, will you like to reply by mail to my mail id i.e. djt07@rediffmail.com Thanking in anticipation regards Deepak
Executor has to apply to Talathi / Tahsildar to mutate the 7/12 in the name of beneficiary. 15 days is the mandatory period for mutation . You can take up this matter to Tahsildar or District Collector .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर / मॅडम
शेती बक्षीसपत्र / दानपत्र केल्यास 7/12 मध्ये नाव येऊ शकते का ??

Question by Gajanan
16-05-2019
gajananp8910@gmail.com

सर मला शिवरस्ते विषयी माहिती हवी आहे
1) सर शिव रस्ते हे सर बांधावरून असतात का
2) शिव रस्त्या वर 3 डेपनी आहेत त्या डेपनी (मातीच्या मोठे बांध )मध्ये काही अंतर आहे ते अंतर किती असते
3)शिवरस्ते सर बांधावरून4 फूट -4फूट असा देता येतो का पण डेपनी असताना
4) पूर्वी ब्रिटीश काळात डेपनी मधून शिव रस्ते होते का
5) काही जन म्हणतात कि डेपनी मधून8 फूट रास्ता असतो ते बरोबर आहे का
आदरणीय सर/मॅडम
बक्षीसपत्र/दानपत्र केलेली शेती ची नोंद 7/12 मध्ये होऊ शकते का ? कृपया मार्गदर्शन करावे
दस्त नोंदणीकृत असल्यास , नोंद होऊ शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमच्या वडीलांची स्वतंत्र मिळकत आहे. सदर मिळकत एकूण क्षेत्र 3.29.0 हे.आर एवढी आहे. मिळकत अजूनही वडीलांच्या नावावर नाही
या मिळकतीची वारसाना वाटणीसाठी काही नियम आहे का?
मिळकत वडिलांची स्वकष्टर्जित असेल तर , वडिलांचे इच्छेनुसार , त्याची विक्री / विल्हेवाट ते लावू शकतात . वडील मयत झाल्यावर , व्ययक्तिक वारसा कायद्यानुसार वारसांची नावे दाखल होतील
मिळकत वडिलोपार्जित असेल व वडिलांचे हयातीत वाटप करायचे असल्यास , वडील व इतर वारस , अश्या सर्व वारसांना प्रत्येकी एक हिस्सा या प्रमाणे वाटप होईल
उदा
वडील व त्याना २ मुले व एक मुलगी आहे तर प्रत्येकी १/४ हिस्सा या प्रमाणे वाटप होईल . मात्र वडील मयत झाले तर , २ मुले , १ मुलगी व आई हयात असेल तर आईस या प्रमे प्रत्येकी १/४ हिस्सा मिळेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर, बिनशेती मोजणी करून कजाप.प्लॉट नुसार विभागणी करून भूमी अभिलेख कार्यालयाकडून प्राप्त.झाला आहे.जमिनीचे विनिश्चीतीकरण झाले असून त्यानुसार बिनशेती चलन भरले आहे.सदर ठिकाणी अंशतः विकास परवानगी मिळाली आहे.त्यामुळे बिनशेतीची इतर हक्कात नोंद घेता येत नाही असे मा.तलाठी यांचे म्हणणे आहे.तर ७/१२ सदरी कजाप.नुसार प्लॉटिंग नुसार वेगळे ७/१२ तयार करता येतील का?आकारणी केव्हा करता येईल?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.बिनशेती नोंद करण्या अगोदर कजाप.ची नोंद घेता येऊ शकेल का?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.....
आपणास आकार फोड पत्रक म्हणायचे आहे , कजाप नाही . जो पर्यंत आकारफोड पत्रक येत नाही तो तोपर्यंत बिनशेती नोंद व आकारणी ७/१२ वर करता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
माझ्या आजोबांना 1974-74 मध्ये धरणग्रस्त म्हणून 5000 चौ फूट प्लाॅट मिळाला होता. सिटी सर्वे 1987 ला झाला आहे. त्यानंतर 1994 मध्ये आजोबांनी 1200 चौ फूट जागा भावकीतल्या व्यक्तीला विकली. परंतू खरेदीखत जिल्हाधिकारी किंवा कोणत्याही सक्षम अधिकाय्राची पूर्वपरवानगी न घेता झाल होत. खरदीखतावर सिटी सर्वे चा नंबरही नाही व सिटी सर्वे चा किंवा ग्रामपंचायतीचा उताराही जोडला नव्हता. तसेच खरेदी घेणाराची सही किंवा अंगठासुद्धा नाही.
1994 पासून आजपर्यंत(2019) खरेदी घेणाराची सिटी सर्वे ला नोंद नाही.
आजोबा 2011 वारलेत व नंतर 2016 मध्ये वडिलांनी 5000 चौ फूट जागेवर वारस(4 वारस वडील, चुलते व दोन आत्या) नोंद करून घेतली.
जागा वारसाने मिळाल्यामुळे वारस त्यांचा हक्क सोडत नाहीत. तर वारसांची संमती नसताना खरेदी घेणाराची सिटी सर्वे ला नोंद होईल का? वारसांची संमती नसताना 25 वर्षापूर्वीच्या खरेदीखतावरून खरेदी घेणाराची नोंद करण्याचा अधिकार उप-अधीक्षक भूमि अभिलेख यांना आहे का?
पूर्वपरवानगी न घेता केलेलं खरेदीखत रद्द होत का? रद्द होत असेल तर ते कोणाकडे रद्द करून मागाव लागेल?
1994 ला खरेदीखतावरून खरेदी घेणाराची 1200 चौ फूट जागेची नोंद ग्रामपंचायत नमुना 8 ला झाली.
त्यानंतर 1998-2002 या काळात (खरेदी घेणाराने ) कोणत्याही दस्त, अर्ज किंवा ठराव याचा उल्लेख(शेरा) न करता 1200 चौ फूट नोंद 2500 चौ फूट अशी बोगस वाढवून घेतली. हे 2016 मध्ये आमच्या निदर्शनास आले. तर बोगस वाढवलेले क्षेत्र कमी करून मिळेल का?ते कमी करण्यासाठी कुणाकडे अपील कराव लागेल?
खरेदी खत रद्द करून मागितल्यावर धरणग्रस्ताने मिळालेला प्लाॅट सरकार गोठवेल का?
१. ज्या आदेशाने आपल्या आजोबांना भू खंड मिळाला , त्या आदेशामध्ये भूखंड विक्री बाबत काही निर्बंध आहेत का ? जर निर्भेड असतील तरच , जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे .
२. खरेदी खत नोंदणीकृत नाही , त्या वर सिटी सय्र्वेय नंबर नाही , तर त्याचा अंमल मिळकत पत्रिकेवर उप अधीक्षक तसेच ग्राम पंच्यात यांनाही घेता येणार नाही
३. ग्राम पंचायतचे आदेश विरुद्ध गट विकास अधिकारी यांचे कडे अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
माझ्या आजोबांना 1974-74 मध्ये धरणग्रस्त म्हणून 5000 चौ फूट प्लाॅट मिळाला होता. सिटी सर्वे 1987 ला झाला आहे. त्यानंतर 1994 मध्ये आजोबांनी 1200 चौ फूट जागा भावकीतल्या व्यक्तीला विकली. परंतू खरेदीखत जिल्हाधिकारी किंवा कोणत्याही सक्षम अधिकाय्राची पूर्वपरवानगी न घेता झाल होत. खरदीखतावर सिटी सर्वे चा नंबरही नाही व सिटी सर्वे चा किंवा ग्रामपंचायतीचा उताराही जोडला नव्हता. तसेच खरेदी घेणाराची सही किंवा अंगठासुद्धा नाही.
1994 पासून आजपर्यंत(2019) खरेदी घेणाराची सिटी सर्वे ला नोंद नाही.
आजोबा 2011 वारलेत व नंतर 2016 मध्ये वडिलांनी 5000 चौ फूट जागेवर वारस(4 वारस वडील, चुलते व दोन आत्या) नोंद करून घेतली.
जागा वारसाने मिळाल्यामुळे वारस त्यांचा हक्क सोडत नाहीत. तर वारसांची संमती नसताना खरेदी घेणाराची सिटी सर्वे ला नोंद होईल का? वारसांची संमती नसताना 25 वर्षापूर्वीच्या खरेदीखतावरून खरेदी घेणाराची नोंद करण्याचा अधिकार उप-अधीक्षक भूमि अभिलेख यांना आहे का?
पूर्वपरवानगी न घेता केलेलं खरेदीखत रद्द होत का? रद्द होत असेल तर ते कोणाकडे रद्द करून मागाव लागेल?
1994 ला खरेदीखतावरून खरेदी घेणाराची 1200 चौ फूट जागेची नोंद ग्रामपंचायत नमुना 8 ला झाली.
त्यानंतर 1998-2002 या काळात (खरेदी घेणाराने ) कोणत्याही दस्त, अर्ज किंवा ठराव याचा उल्लेख(शेरा) न करता 1200 चौ फूट नोंद 2500 चौ फूट अशी बोगस वाढवून घेतली. हे 2016 मध्ये आमच्या निदर्शनास आले. तर बोगस वाढवलेले क्षेत्र कमी करून मिळेल का?ते कमी करण्यासाठी कुणाकडे अपील कराव लागेल?
खरेदी खत रद्द करून मागितल्यावर धरणग्रस्ताने मिळालेला प्लाॅट सरकार गोठवेल का?
कोकणे साहेब
आपले आजोबांना भूखंड मिळाला होता त्याप्रमाणे त्यांनी तो आपल्या भावकीतील एका इसमास विक्री केला . ग्राम पंचायत अभिलेख सदरी घेणारच नाव लागले . तथपि अद्याप मिळकत पत्रीकेस नाव लागले नही . ताबा मात्र घेनारचेकडे आहे . ज्या आदेशाने भू खंड प्रदान करण्यात आला त्या मध्ये , हस्तांतर करण्यापूर्वी , जिल्हाधि यांची परवानगी आवश्यक आहे असा अट होती का ? जर अशी अट असेल तर , खरेदी खत रद्द होणार नाही मात्र , त्याचे नाव मिळकत पत्रीकेस लागणार नाही . मात्र जर अट नसेल , तर त्याचे नाव लागण्यास काही अडचण नसावी

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Gajanan
27-04-2019
gajananp8910@gmail.com

सर माझे शेत दोन गावच्या शिववर आहे शिवरस्त्याची मागणी आहे शिववर 3 डेपनी(मोठे मातीचे बांध)तिन्ही बाजूस आहेत 3डेपनी मध्ये अंतर आहे
1)डेपनी मध्ये किती अंतर असते त्यातुन रस्ता असतो का
2)डेपनी असताना शिववरुन रस्ता कुठून देता येतो
3)शिववरच्या बांधाला सरबांध म्हणतात का
4)डेपनी कस्यासाठी असतात त्याचे महत्व काय
5)शिववरुन 4-4 असा सरबंधाने डेपनी असताना रस्ता देता येतो का
6)प्रत्येक शिववरुन रस्ता पूर्वी पासून असतोच का
7)काही माणसे म्हणतात ब्रिटिश काळापासून डेपनी मधून शिव रस्ते असतात /मग प्रत्येक शिववर रस्ता असतो का व् तो किती असतो
8)तहसीलदार याना शिवरुन कसा रस्ता देता येतो
सर,
1980-82 साली खरेदी केलेली जमीन च खरेदी खत पुणे जिह्यातील कोणत्या कार्यलयात काढता येतील.

दुसरा प्रश्न

सातबारा मध्ये नावात बदल झाला असेल(म्हणजे आधी शेषराव होते की ते बरोबर आहे पण आता ऑनलाइन ते शेष असे झाले आहे.)आधी ऑनलाइन तसेच हस्तलिखित उतारा यावर शेषराव असे बरोबर लिहिलेले दोन्ही उतारे आहेत. यात दूरुस्ती कशी करायची

धन्यवाद!

१. एवढे जुने खरेदी खत मिळणे अवघड आहे . आपण संबंधित दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयात अर्ज करा
२. तहसीलदार यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.35 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3400
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3