जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by रवी गव्हाणे
20-11-2016
ravindra171282@gmail.com
नमस्कार सर आपल्या कार्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार . प्रश्न असा आहे कि जमिनीचा सातबारा मध्ये ३ भाऊ १ बहीण वेग वेगळे खाते नंबर वरती आहेत जमीन हि वडिलोपार्जित आहे . वडिलांच्या मृत्यू नंतर ३ भाऊ एक बहीण वारस नोंद झाली आहे. नोंदींना बरेच दिवस सारून गेले आहेत त्यांचे खाते number वेगवेगळे दाखवत आहेत तरी सादर बाबतीत हक्क सोड पत्र होऊ शकते का ? जर हो तर काय करावे लागेल किंवा जर नाही तर तिला आपला हक्क सोडायचा असल्यास काय आणि कुठल्या प्रकारचा दस्त करावे लागेल ते सांगावे ? प्रश्न २) सर सादर जमिनीवर ३ भाऊ एक बहीण चे नाव आहे तरी सादर बहीण एका भावाच्या नावे तिच्या नावे असलेले जमिनी पैकी काही भाग फक्त एक भावास देऊ इच्छिते तर सादर बाबतीत हक्क सोड पत्र होईल ka. सादर बहीण एका भावाच्या नावे काही भाग देऊ शकते ka. आणि ते हक्क सोड पत्र होईल ka. अन्य काही खरेदी खात करावे लागेल?.
Question by नरेंद्र पाटील अलीबाग रायगड
20-11-2016
ngpatil@rcfltd.com
साहेब मी आपला विशेष आभारी आहे.कारण आपण मी दिलेल्या प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल.माझा दुसरा प्रश्न असा आहे माझ्या आजोबांना सन 1961 ला 32ग ची शेतजमीन मिळाली.प्रत्यक्ष 3 सातबारा होते परंतु 2सातबाराचे मूल्यांकन झाले.सन 1967 ला आजोबा वारले.सर्व मुले लहान होती नंतर नौकरी निमित्त बाहेर गेली.सर्व शेतजमीन आमच्या ताबेकब्ज़ात आहे.आता ऑनलाइनच्या जमान्यात मूळ मालकांच्या वारसांना गावातल्या एजेंट लोकांनी न झालेल्या त्या सातबाराबद्दल सांगितले.एवडेच नाहीतर वारसाची नावे दाखल केली.त्यांचे कुटुंब 1961 अगोदरच मुम्बई स्थित आहेत आता एजेंट आम्हाला सांगत आहेत की ती जागा तुम्ही विकत घ्या.सदरील वारसाना कोठे जागा आहे ते ही माहिती नाही.माझा प्रश्न असा आहे की आम्हाला काय करता येईल.सदरील सातबारावर कूळ वहिवाटची नोंद झालेली नही.कृपया मार्गदर्शन करावे
Question by किशोर
20-11-2016
brsawalkar@gmail.com
नमस्कार सर,मी २०१५ साली एक २४०० sqare ft चा प्लॉट गाव नमुना ८अ च्या आधारे खरेदी केला आहे.सादर प्लॉट मी ज्या व्यक्तीकडून घेतला त्याचे नाव ७/१२ ला नोंदणी केलेले नाही परंतु त्या व्यक्तीने तो प्लॉट झान्च्याकडून घेतला त्या दोघांची नोंद ७/१२ ला आहे.आता मला ७/१२ ला सादर प्लॉट च्या खरेदीखताद्वारे माझे नाव लावायचे आहे .परंतु मी ज्याच्याकडून हा प्लॉट घेतला त्याचीच नोंद ७/१२ ला नसल्यामुळे मला माझे नाव ७/१२ ला लावता येत नाही असे तलाठी साहेब म्हणतात.तर आता मी ज्याच्याकडून हा प्लॉट खरेदी केलेला आहे त्याचे नाव ७/१२ ला नोंद करण्यासाठी काय करू ? ज्याच्याकडून हा प्लॉट घेतला त्याचे नाव ७/१२ ला नोंदविण्यासाठी ,अर्ज मी करू शकतो का ?मला माझे नाव ७/१२ ला लावण्यासाठी काय करावे लागेल ? कृपया मार्गदर्शन करावे.
आपण ज्याचे कडून खरेदी केली त्याचे नाव ७/१२ सादरी नसले तरी आपले नाव ७/१२ सादरी लावता येईल . ज्याने आपणास जमीन विकली , त्याचे खरेदी दस्त , तलाठी कडे सादर करा . प्रथम आपल्या विक्रेत्याचे नाव लागेल , त्या नंतर आपले लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विनायक
19-11-2016
vnyk1234@gmail.com
नमस्कार,
माझ्या सात बारावर खालील प्रमाणे नोंद आहे.
लागवडीचे योग्य क्षेत्र हेक्टर आर
जिरायत १ - ४८ ०
बागायत - -
भातशेती - -
------------------------------------------------
एकूण १ - ४८ ०
------------------------------------------------
पोटखराब ४-४३ ०
वर्ग ( अ ) - ०
वर्ग ( ब ) - ०
------------------------------------------------
एकूण ४-४३ ०
------------------------------------------------
रुपये पैसे
आकारणी.....
------------------------------------------------
जुडी किंवा विशेष आकारणी ० ७९
------------------------------------------------
वरील एकूण क्षेत्र (हेक्टर, एकर, गुंठे ) किती आहे याचे कृपया मार्गदर्शन करावे.
८ –अ नुसार १ हे. ४८ आर
७-१२ नुसार लागवडी लायक क्षेत्र १ हे. ४८ आर
अधिक पोटखराबा (लागवडी लायक नसलेले) क्षेत्र ४ हे. ४३ आर
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by विशाल एकनाथ khairnar
19-11-2016
vishalkhairnar84@rediffmail.com
कर्मचारी लाचलुचपत प्रकरणात निलंबित असून अजून पुनर्स्थापित करण्यात आलेले नाही अशा कर्मचाऱ्याला वय वर्ष ४५ पूर्ण झाले असल्यास अहर्ता / सेवा प्रवेशोत्तर परीक्षा सूट देता येल का
निलंबन कालावधी जर १ वर्ष पूर्ण झाला असेल तर निलंबन आढावा समिती , अपचारी कर्मचाऱ्यास सेवेत घेणे बाबत विचार करू शकते . दोन वर्षे पूर्ण झाले वर , गुन्ह्याचे स्वरूप बघून , सेवेत पुनर्स्थापित केले जाते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विशाल एकनाथ khairnar
19-11-2016
vishalkhairnar84@rediffmail.com
नगर भूमापन योजना लागू करताना शेती मिळकती वर सनद फी आकारता येते का
Question by संतोष मोरे
19-11-2016
santoshpmore9@gmail.com
एकाद्या इसमाने आपल्या सर्वे नंबर पैकी काही जमीन सहकारी संस्थेस खरेदी दिली सदर संस्था आता विसर्जित झालेली आहे. विसर्जनावेळी संस्थेची सर्व देणी पूर्ण झालेली आहेत व आता ती जमीन सदर संस्थेच्या नावावर दहा वर्षा पासून पडून आहे . सदर जामीन विकणारी व्यक्ती हयात नसलेने त्याचे वारस सदर जमीन सरकारी दराने परत मागणी करू शकतात का ?
एकदा जमीन विकत दिल्यानंतर, विकत देणार्या्च्या वारसांना, विकत दिलेल्या मिळकतीवर हक्क सांगता येणार नाही.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by योगेश अहिरे
18-11-2016
yogesh.ahire9290@gmail.com
प्रथम मागच्या प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
नमस्कार सर मला खाते-फोड विषय माहिती पाहिजे ़
जमीन नवीन अविभाज्य शर्तीची (महार-वतन) धुळे जिल्ह्यातील आहे , सदर जमीन आजोबांच्या नावाने असून ती वडील व काकांच्या नावाने करायची आहे,आजोबा हयात आहेत , तरी इतर वारस हक्क सोड पत्र करुन देण्यासाठी तयार आहेत, तर ह्या साठी नजराणा भरावा लागेल का..? लागेल तर किती..? कुणाची परवानगी घ्यावी लागणार का..? क्रुपया परिपूर्ण मार्गदर्शन करा हि विनंती मोबाईल नंबर 7588517207
Question by नरेंद्र शिवदास शिंदे
18-11-2016
vickysss40@gmail.com
आदरणीय,
सर/ मॅडम,
मी आदिवासी आहे माझी जमीन दुसऱ्या कडे होती खूप दिवस झाले आता ती जमीन मला सोडून घ्यायची आहे. आणि तो पुढचा व्यक्ती सुद्धा आदीवाशी आहे . तो द्यायला पण तयार आहे. त्यांनी माझी जमीन वर ६०००० कर्ज काढला होता. आता मला ती जमीन माझ्या नावावर करायची आहे. आदिवासी कायद्या विषयी मला जास्त माहिती नाही आहे तरी मला मार्गदर्शन करावे.
धन्यवाद...!!!
आपली जमीन दुसऱ्याकडे म्हणजे आपण ती जमीन गहाण दिली होती का ?
जर जमीन कोणत्याही दस्ताशिवाय दुसऱ्या इसमाकडे दिली असल्यास , तो आपले जमिनीवर कर्ज काढू शकत नाही
आपण जर जमीन त्यास विकली असेल , तर त्याचे इच्छे शिवाय आपणास परत घेता येणार नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
तुमचा आपसात काय आणि कसा करार झाला होता हे पाहणे आवश्यक आहे. आपण संबंधीत तहसिलदार कार्यालयाशी संपर्क साधावा.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by कुणाल अंकुश जाधव, लिपीक
17-11-2016
mr.k1387@gmail.com
एखादे कर्मचाऱ्यावर न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असेल व त्यांचे मागील अंदाजे दीड महिन्यांचा निलंबन कालावधी अद्याप नियमित करण्यात आलेला नसेल तर त्यास कालबद्ध पदोन्नती (12 वर्षे) लाभ अनुज्ञेय आहे का ?
Question by anand salve
16-11-2016
salveanand@89gmail.com
नमस्कार सर , ऑनलाइन फेरफार पाहू शकतो का ? फेरफार संबंधित कागतपत्र मिळवण्यासाठी काय करावे लागेल ?
Question by धनाजी जठार
16-11-2016
dhana.jathar@gmail.com
सर, आमच्या आजोबाना माझ्या वडिलांना धरून ३ मुले आणि ३ मुली आहेत आजोबा व आजी हयात नाहीत. आजोबांचा नावे ११ एकर जमीन असून सध्या स्टॅम्प वर वाटणीपात्र झाले आहे ३ मुलं कडे प्रत्येकी ३ एकर असून अजून जमिनीची खातेफोड झाली नाही. ३ मुली पैकी एक मुलगी बेपत्ता आहे व २ मुली हिस्सा मिळावा यासाठी इच्छुक आहेत. तरी ह्याची खातेफोड कशी होईल व प्रथम कुठे चौकशी करावी लागेल तसेच सिलिंग ऍक्ट १९७५ कधी पासून लागू होणार आहे किंवा होईल कि नाही याची माहिती मिळावी हि विनंती.
११ एकर जमीन ६ हिस्स्यात वाटप करणे आवश्यक्य . जर एक मुलगी बेपत्ता असेल व तीस कोणतीही वारस नसतील तर ५ हिस्स्यात वाटप करणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by भिमराव त्र्यंबक ढाकरे
15-11-2016
bhimraodhakare79@gmail.com
सर, माझ्या वडीलांच्या नाले 2 हेक्टर जमिन आहे, आणि आम्ही आदिवासी खातेदार आहोत, ती माझ्या नावे करण्यासाठी तलाठी रजिस्ट्री करण्यास सांगतात व दुय्यम निबंधक साहेब जिल्हाधिकारी यांची परवानगी आणण्यास सांगतात परंतु वडिलांची जातीचे व्हँलीडीटी नसल्यामुळे परवानगी देत नाहीत कारण वडील निरक्षर आहेत, वाटणी पत्रााद्वारे फेर करण्यासाठी परवानगी लागते का? कृपया मार्गदर्शन करावे
आदिवासी व्यक्तीचे जमिनीचे हस्तांतरण बिगर आदिवासी व्यक्तीस करता येत नाही .
वडिलांचे हयातीत , आपले नावे जमीन करता येणार नाही .
आपले व वडिलांचे जातीची पडताळणी झाली असल्यास , जिल्हाधिकारी यांचे परवानगीने , जमिनीचे हस्तांतरण करता येईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अभिजित य पाटील
14-11-2016
abhijit_y_patil@yahoo.co.in
सर,
नमस्कार
तीन भावांच्या वडिलोपार्जित मालकीच्या दोन वेगवेगळ्या गावातील मिळकत 'अ' व मिळकत 'ब' होत्या. त्यांच्यात २००४ साली रजिस्टर वाटणीपत्र झाले. वाटणीपत्राच्या सुरवातीला त्यांच्या वडिलांच्या मालकी कब्जे वहिवाटीच्या मिळकती म्हणून 'अ' व 'ब' या दोन्ही मिळकतीचा उल्लेख करण्यात आला आहे.
वाटणीपत्राच्या मुख्य कलमामध्ये फक्त मिळकत 'अ' ची वाटणी करण्यात आली असा उल्लेख आहे व मिळकत 'अ' मधील प्रत्येकाच्या वाटणीचे क्षेत्राचा उल्लेख आहे. मुख्य कलमामध्ये मिळकत 'ब' चे वाटप झाले म्हणून कोणताही उल्लेख नाही. परंतु परिशिष्ट मध्ये वारस १ च्या वाटणीस मिळकत 'अ' मधील हिश्श्याबरोबर मिळकत 'ब' सुद्धा आल्याचा उल्लेख झाला आहे.
आता वारस 2 व 3 चे म्हणणे असे कि, वाटणीपात्राच्या मुख्य कलमामध्ये मिळकत 'ब' चे वाटप झाले म्हणून कोणताही उल्लेख नाही वा मिळकत 'ब ' वारस १ च्या वाटणीस आल्याचा कोणताही उल्लेख नाही. फक्त परिशिष्ट मध्ये मिळकत 'ब' चा उल्लेख आहे म्हणून मिळकत 'ब' चे वाटप झाले असे म्हणता येणार नाही. वाटपासाठी मुख्य कलमात उल्लेख असणे आवश्यक आहे. त्या मुले मिळकत 'ब' अजून सामायिक व अविभाजित आहे आणि म्हणूनच मिळकत 'अ' च्या वाटपाचा फेरफार लगेच केला मात्र मिळकत 'ब' चा फेरफार अजून झालेला नाही.
तर वारस १ चे म्हणणे असे कि, परिशिष्ट प्रमाणे मिळकत 'ब' माझे वाटणीस आलेली आहे. परिशिष्ट सुद्धा वाटणीपत्राचा भाग आहे. म्हणून वारस १ ने आता २०१६ साली त्याच्या फेरफार साठी अर्ज केला आहे. फेरफाराची नोटीसला वारस 2 व 3 यांनी हरकत घेतली आहे.
या प्रकरणामध्ये योग्य बाजू काय आहे? याबाबत मार्गदर्शन करावे हि विनंती.
धन्यवाद
वाटप पत्राचे मुख्य भागात , जमिनीचे वाटप सह धारकाच्या कश्याप्रकारे करण्यात आले आहे , त्याचा उल्लेख काण्यात आला आहे . प्रत्येकाचे वाट्याचे क्षेत्र किती , प्रत्यक्ष की=जमिनीचा कोणता भाग कोणाच्या वाट्यास आला आहे इत्यादी
परिशिष्ट मध्ये वाटप करण्यात आलेल्या जमीनीचा उल्लेख करण्यात येतो मात्र त्याचे वाटप कश्यपराकारे झाले आहे याचा उलेख नाही
त्यामुळे मुख भागात अ मिळकतीचा उल्लेख आहे त्याप्रमाणे वाटप झालेले आहे . ब मैळकतीचे वाटपाचा फेरफार मंजूर होणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by महेश ढमढेरे
13-11-2016
maheshdhamdhere84@rediffmail.com
माझ्या वडीलांच्या आईला 1945 साली मिळालेली मुलकी पाटील ईनाम वर्ग 6ब ची जमीन 1952साली विक्री केली सदर खरेदी दाराने कुठल्याही समकक्ष अधीकारी यांची परवानगी घेतली नाही
हे खरेदी खत सरकारी नियमानुसार झाले असेल का ?
1952 नंतर आजीचे नाव कूळ आणी खंडा मधे येते पुढे मूलकी पाटिल पद रद्द झाले सरकारने रीग्रँड करायला सांगितली ती झाली नाही आनी 1975 नंतर सरकारी आकारी पङ झाली
आता आम्ही काही करु शकतोका ?
कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी आपले आजीने , हस्तांतरित केली आहे . मुलकी पोलीस पटेल ( पाटील ) नष्ट करण्याचा कायदा कलम ३ प्रमाणे , पटेल वतन जमीन नष्ट करण्यात आलेली आहे . त्यावेळी आपले आजीने परत मिल्ने करिता अर्ज करणे आवश्यक होते .
आजी वतनदार असताना , ती पुन्हा कुल कशी असू शकते ?
विलंब खूप झालेला आहे . त्यातच आपण आता authorised - holder होऊ शकत नाही . आता काही होऊ शकत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by nanabhau madaku koli
13-11-2016
nanabhau3282@gmail.com
आजी गिताबाई गुमान कोळी याच्या दोन मुली
१) जिजाबाई मडकु कोळी मोठी
२लीलाबाई पंढरीनाथ कोळी लहान
आजी वारली ३०/५/२०१५ रोजी पण आजी जमीन १६० गुंठा आहे पण लीलाबाई जमीन देत नाही म्हणुन धुळे जिल्हा तालुका सिरपुर यथे कोर्ट कचेरी चालु आहे केस टाकायला १८ महीने झाले
Question by Goroba Pawar
13-11-2016
gorobap@gmail.com
३२ म चे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर १० वर्ष्याच्या आत उप विभागीय अधिकारी नि. स. प्र. ची नोंद शिथिल करू शकतात का?
Question by Goroba Pawar
13-11-2016
gorobap@gmail.com
कुळाची नसलेली एखाद्या जमिनीला एकत्रीकरणाच्या वेळी अनावधाने नि. स. प्र. चा लागलेला शेरा कमी करण्याबाबत तहसीलदार यांनी उप विभागीय अधिकारी यांचेकडे अहवाल सादर केलेला आहे. म.ज.म.अ. १९६६ चे कलम १५५ अन्वये तो शेरा कमी करण्यासाठी उप विभागीय अधिकारी यांना वरिष्ठांची मान्यता घ्यावी लागेल कि ते स्वतः उक्त कलमाखाली आदेश देऊ शकतात
उपविभागीय अधिकारी यांना अधिकार नाही
एकत्रीकरण मधील चुका साठी उप संचालक भूमी अभिलेख यांचे कडे अर्ज करणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by योगेश अहिरे
12-11-2016
yogesh.ahire9290@gmail.com
नमस्कार सर
प्रश्न :- माझ्या आजोबांच्या नावाने नवीन अविभाज्य शर्तीची वर्ग 2 -वडिलोपार्जित शेतजमीन आहे 6 हेक्टर 60 आर, आजोबा हयात आहेत.
ती जमिन वडिलांच्या व काकांच्या नावाने 3-3 हेक्टर करायची आहे , आजोबांना 4 मुली असून त्यांची पण संमती आहे तरी नजराणा भरावा लागेल का? भरावा लागल्यास किती? कोणाची परवानगी घ्यावी लागेल का? जमिन धुळे जिल्ह्यातील आहे.
हो नजराणा भरावा लागेल .
बहिणांना हक्क सोड पत्र करावे लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by HANMANT PHADATARE
12-11-2016
hpphadatare123@gmail.com
Sir,
सन 1999 साली वाटप झाले आहे. वाटपाच्या फेरफार नोंदी करताना तलाठी/मंडळ अधिकारी यानी stamp पेपरवरील वाटपपत्र, हक्कसोडपत्र, व कागदपत्रे पाहुन संबधिताचे जाब जबाब घेहुन फेरफार नोंदी मंजूर केलेल्या आहेत. व तसा उल्लेखही फेरफारला आहे.
सदर वाटपाप्रमाणे सन 1999 सालीपासन माझ्या हिस्स्याच्या जमीनीवर माझा व भावाचा, त्याच्या हिस्स्याच्या जमिनीवर ताबा व मालकी आहे.
त्याच मालकी हक्काने भावाने सन 2003 त्याचे हिस्स्याची जमीन रजिस्टर दस्ताने विकली आहे व आता वाटप झाले नाही असा व 2000 साली झालेल्या नोंदी केवळ अर्जावरून झाल्या असल्याने बेकायदेशिर आहेत त्या रद्द करावयात याकरीता उपविभागीय अधिकारी याचेकडे अर्ज केला.
सदर प्रकरणात मा.उपविभागीय अधिकारी, मा. जिल्हाधिकारी व मा.अप्पर अायुक्त यानी वाटप रजिस्टर दस्ताशिवाय झाले असल्याचे कारणावरून माझ्या हिस्स्याच्या जमिनीसंबंधीचे फेरफार नोंदी रद्द करून भावाच्या व बहिणीच्या नावाची नोंद माझ्या हिस्स्याच्या जमिनीत केली आहे.
सदर अादेश देताना मा.उपविभागीय अधिकारी, मा. जिल्हाधिकारी व मा.अप्पर अायुक्त यानी शासन परीपत्रक क्रमांकः जमीन- 07/2014/प्र.क्र. 130 /ज-1
नुसार वाटणीपत्राची नोंदणी करणे सक्तीचे नाही याचा विचार केलेला नाही
या पूर्वी दिलेल्या उत्तराप्रमाणे एकत्रित जमिनीतील हिस्सा व त्या प्रमाणे क्षेत्र अथवा क्षेत्र विकले असल्यास हास्याचे प्रमाणात जमीन विक्री किंमत मिल्ने बाबत दावा दाखल करणे हितावह
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रोहिदास सखाराम पाबळे
11-11-2016
rohidaspable@yahoo.in
१९६५ साली वडील वारल्यानंतर ४ भावांपैकी मोठया भावाचे नाव एकूम म्हणून ७/१२ वर दाखल झाले १९८९ साली ४ हि भावांनी सध्या कागदावर ४ भावांनी जमिनीचे वाटप केले त्यापैकी २ भावांनी आपल्या हिश्याच्या जमिनी एकूम असलेल्या भावाच्या नावाने विक्री केल्या व इतर ३ भावांनी त्यास संमती दिली २ भावाचा हिस्स्यास त्या जमिनी गेल्याचा उल्लेख विक्री दस्तामध्ये आहे परंतु एकूम हे नाव उरलेल्या २ भावाच्या ७/१२ वर तसेच राहिल्या मूळे त्याच्या वारसांनी एकूम चा फेरफार काढून त्याच्या वारस नोंदी करून घेतल्या तरी त्याची नावे काढण्यासाठी काय करावे लागेल वाटप पत्र हे रजिस्टर नाही ते सध्या कागदावर आहे परंतु वक्री दसतात वाटप केलेल्या त्याचा उल्लेख आहे
Question by प्रदीप बोरले
11-11-2016
pradip.borle6226@gmail.com
महोदय,अ या व्यक्तीला बक्षीस पत्राने शेत जमीन प्राप्त झाली.अ ला अपत्य नाही.अ ला ३ पुतणे आहेत.त्या पैकी एका पुतण्याला अ ने हि शेतजमीन रजिस्टर बक्षीस पत्राने दिली.फेरफार होण्यापूर्वी अ हा मयत झाला.तलाठी ह्यांचेकडे बक्षीस पत्र व वारस असे २ अर्ज प्राप्त झाले.तलाठी ह्यांनी कोणत्या अर्जाप्रमाणे नोंद घ्यावी.कृपया मार्गदर्शन करावे.
Question by गणेश शिंदे
10-11-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,बांधकाम व्यावसायिकाने सोसायटीस रजिस्टर Convence Deed करून दिले आहे.त्याची नोंद गावदप्तरी घेतली असता नोंद घेता येत नाही या कारणास्तव नोंद रद्द केली आहे.तरी अशी नोंद गावदप्तरी घेता येईल का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.....
कोणत्या कारणामुळे नोंद घेता येत नाही याचे कारण दिले आहे का ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by anand salve
09-11-2016
salveanand@89gmail.com
नमस्कार सर , पि.आर बॉण्ड म्हणजे काय ?त्याला काही मुद्दत असते का ? एखादा आरोपी त्या नुसार सुटला आसेल तर त्याला पुन्हा कस्टडी होऊ शकते का ?त्याला जामीन लावावा लागेल का ?
Question by RAM PHADATARE
09-11-2016
ram.p.phadatare@gmail.com
सन १९९७ साली तोंडी वाटप झाले आहे. वाटपानतर सन १९९७ साली फेरफार नोंदी केलेल्या आहेत. नोंदी करताना तलाठी/मंडळ अधिकारी यानी stamp पेपरवरील हक्कसोडपत्र, वाटपसंबंधी मुळ कागदपत्रे पाहुन संबधिताचे जाब जबाब घेहुन फेरफार नोंदी मंजूर केलेल्या आहेत. व तसा उल्हेखही फेरफारला आहे. व वाटपाप्रमाणे सन १९९७ सालीपासन माझ्या हिस्स्याच्या जमीनीवर माझा व भावाचा त्याच्या हिस्स्याच्या जमिनीवर ताबा व मालकी आहे.
त्याच मालकी हक्काने भावाने सन 2000 साली त्याचे हिस्स्याची जमीन रजिस्टर दस्ताने विकली आहे व आता वाटप झाले नाही, अन १९९७ साली केलेल्या नोंदी केवळ अर्ज व stamp पेपरवरून झाल्या असल्याने बेकायदेशिर असल्यामुळे
रद्द करणेकरीता उपविभागीय अधिकारी याचेकडे अर्ज केला.
सदर प्रकरणात उपविभागीय अधिकारी यानी वाटप रजिस्टर दस्ताशिवाय झाले
असल्याचे कारणावरून माझ्या हिस्स्याच्या जमिनीसंबंधीचे फेरफार नोंदी रद्द करून भावाच्या बहिणीच्या नावाची नोंद माझ्या हिस्स्याच्या जमिनीत केली आहे.
सन १९९७ साली फेरफार नोंदी करताना तलाठी/मंडळ अधिकारी याना stamp पेपरवरील हक्कसोडपत्र, वाटपसंबंधी कागदपत्रे असलेली आरटीएस Faayil कागदपत्रे जतन करण्याचा कालावधी संपल्याने नष्ट केली आहेत त्यामुळे माझ्याकडे पुरावा नाहीत.
आपले हिस्स्यांचे जमिनीस आपले बहिणीचे नाव लावणे बाबत उपविभागीय अधिकारी यांनी निर्णय दिला आहे . भावाने त्याचे हिस्स्याची जमीन विकली आहे . त्यामुळे एकत्रित जमिनीत आपले सर्वांचा हिस्सा किती आहे /होता हे निश्चित करणे आवश्यक आहे . मात्र एकत्रित जमिनीतील काही हिस्सा भावाने विकला आहे . तो हिस्सा आता वाटप करण्याचे दृष्टीने विचार करता येणार नाही.
आपले एकत्रित क्षेत्र किती आहे ? आपले वडिलांना वारस क्ती आहेत ? हि माहिती द्यावी .
हिस्से निश्चित करण्यासाठी , हि माहिती आवश्यक आहे
आपले भावाने जमीन विकली आहे ते आता परत मिळणार नाही . जमीन विक्रीतून प्राप्त पैसे , हिस्स्याप्रमाणे अन्य वारसांना मिळण्यासाठी व उर्वरित जमीनीचे वाटप करण्यासाठी दिवाणी दावा दाखल करावा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
