जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Sujit chavan
17-05-2017
sujitchavan456@gmail.com
सर मार्च ता. 6/3/2017प्रश्नाचे उत्तर मिळावे हि नम्र विनंती
Question by सचिन भोसले
17-05-2017
bhosalesachin23@gmail.com
नमस्कार सर , जर एखाद्य शेतकऱ्याची जमीन रस्त्यासाठी एका बाजूने दिली असेल पण त्याच सर्वे नंबर ला दुसऱ्या बाजून सरबांध असून 10 शेतकऱ्यांनी मागणी तहसीलदारांकडे केली तर तर रास्ता मंजूर होईल काय .कृपया उपाय सांगा
होय म ज म अधिनियम १९६६ चे कलाम १४३ खाली रस्ता देता येतो
Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी
Question by सागर वाबळे
17-05-2017
Sagarwabale215@gmail.com
तलाठी उत्पन्नाचा दाखल कशाची तपासणी करून देतो आणि तो उत्पन्न कशा वरून ठरवतो
Question by पंकज कागणे
16-05-2017
pankajkagane@gmail.com
नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की, विभागीय दुय्यमसेवा परीक्षा व महसूल अहर्ता परीक्षा एखादा कर्मचारी उत्तीर्ण नसेल तर त्या कर्मचा-याला कालबध्द पदोन्नती देता येते का ? याबाबत योग्य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
Question by पंकज कागणे
16-05-2017
pankajkagane@gmail.com
नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की, जिल्हातील एखादा तलाठी ज्या उपविभागामध्ये कार्यरत असेल त्या ठिकाणाहून त्याने दुस-या उपविभागात बदली व्हावी म्हणून विनंती अर्ज केला व त्याची विनंती मान्य झाली व त्याला जिल्हातील दुस-या उपविभागात पदस्थापना दिली तर जिल्हातील जेष्ठतेमध्ये त्याचे नाव सर्वात खाली टाकले जाते का? तलाठी संवर्गाची जेष्ठता फक्त उपविभागा पुरती मर्यादीत असते का?
कृपया याबाबत मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
Question by Sharayu Harish Aadhe
16-05-2017
sharayuaadhe81@gmail.com
As per MCSR is it essential for ladies in government service to change their maiden name after marraige and get it mentioned in service book to claim maternity leave and expenses. Is change in name necessary at all in service for ladies. Please also give rule or judgements if any.
Thanks.
There is no requirement under Maharashtra Civil Service Rules either under Leave or General Conditions of Service , that , female government servant shall change her name after the marriage to avail the Maternity leave. Even under the Maternity Benefit Act , no such provision exists .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अजित बोऱ्हाडे
16-05-2017
borhadeajitm@gmail.com
नमस्कार सर
1994 साली आमच्या जमिनी मधून रस्ता करण्यात आला नंतर 2005 साली त्याचे रुंदी करण्यात आले,आम्ही जमिनी ची शासकीय मोजणी भरली त्यानुसार त्यांनी हद्द दाखवली ,हद्द वरून असे लक्षात आले की सर्व रस्ता आमच्या च्या जमिनी तुन जात आहे.900 फूट लांब आणि 15 फूट रुंद असा रस्ता असून तो सर्व आमच्या जमिनी तुन जात आहे. जमिनी ची हदद कायम मोजणी केली असता पूर्ण रस्ताच क्षेत्राचा भाग आहे असे आढळून आले . आम्ही रस्त्यावर अतिक्रमण केलेले नसून रस्त्यानेच जमिनीवर अतिक्रमण केलेले आहे. आमची जमिनी कशी काढून भेटेल .कोना कडे आपिल करावी.कृपया मार्गदर्शन करावे.
रस्ता शास्नानाने , स्थानिक सव्रज्या संस्थेने केला आहे का ? जर त्यांनी रस्ता केला असेल तर , आपली जमीन बाहो संपादन कायद्याखाली संपादन न करता , असा रस्ता करता येत नाही . आता रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे . आपण जेवढे क्षेत्र रस्ताखाली गेले आहे , त्याची नुकसान भरपाई संबंधित विभागाकडे मागा.
जर आपणास , रस्ता नको असेल तर . आपणास न्यायालयाचा मार्ग पत्करावा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पंकज कागणे
13-05-2017
pankajkagane@gmail.com
नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की, विभागीय दुय्यय सेवा परीक्षा ( लिपिक संवर्ग ) ही परीक्षा सुट मिळालेल्या विषयाचा लाभ घेऊन जर परीक्षा दिली तर सदर कर्मचार्याने राहीलेल्या विषयात त्याने किती गुण मिळविणे आवश्यक आहे ? या बाबत माननीय न्यायालयाने काही निर्णय दिले आहेत काय ? याबाबत सखोल मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
Question by गणेश शिंदे
13-05-2017
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,इमारत बांधकाम करणेसाठी २०१२-१३ मध्ये गौणखनिजचे उत्खनन करण्यात येऊन त्याचा वापर त्याच जागी केलेला आहे.परंतु त्याबाबत मा.तहसीलदार साहेब यांनी तीन पट दंड भरणेची नोटीस काढल्यास त्या नोटीसवर मा.प्रांत साहेब यांचेकडे अपील करणे योग्य होईल का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती....
Question by पंकज कागणे
13-05-2017
pankajkagane@gmail.com
नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की, मुखत्यारपत्र म्हणजे काय ? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
एखादा काम स्वतः करण्या ऐयवैजी दुसर्याने करण्याकरता त्यास प्राधीकृत करणे .
कृपया भारतीय करा कायदा १८८२ चे प्रकरण १० , कलाम १८२ ते २३८ वाचा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पंकज कागणे
13-05-2017
pankajkagane@gmail.com
नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की, भोगवटदार वर्ग-१ जमीन म्हणजे काय ? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
जमीनहस्तांतरांवर निर्बंध नसलेली जमीन म्हणजे , भोगवटादार वर्ग १ जमीन
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by vijay
13-05-2017
vv_rt@rediffmail.com
नमस्कार सर
एका अर्जदाराने नॉन क्रिमिलयेर दाखला मिळणेसाठी अर्ज केला आहे परंतु जातीचे दाखला हा ऊत्तर प्रदेश चा कुशवाह जातीचा जोडला आहे
तर त्याला महाराष्ट राज्यत राज्याचे किंवा केंद्र शासनाच्या नॉन क्रिमिलयेर देता येऊ शकते का thank u sir
Question by पंकज कागणे
13-05-2017
pankajkagane@gmail.com
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, A व B हे दोन कर्मचारी आहेत जिल्हातील जेष्ठतेमध्ये A कर्मचारी B चे पुढे आहे. दोघांनीही पहिली संधी वापरून महसूल अहर्ता परीक्षा दिली आणि A कर्मचारी नापास झाला व B कर्मचारी परीक्षा पास झाला तर बी कर्मचाऱ्यास लगेचच पदोन्नती देण्यात येते का ? कृपया याबाबत मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
Question by पंकज कागणे
13-05-2017
pankajkagane@gmail.com
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, XYZ नावाचा एक कर्मचारी आहे त्याने विभागीय दुय्यम सेवा परीक्षा ( लिपिक संवर्ग ) ही परीक्षा पहिली वेळ दिली तेव्हा त्याला पेपर क्रमांक-1 मध्ये 200 पैकी 118 गुण, पेपर क्रमांक-2 मध्ये 200 पैकी 67 गुण, पेपर क्रमांक-3 मध्ये 150 पैकी 57 गुण, पेपर क्रमांक-4 मध्ये 200 पैकी 153 गुण, पेपर क्रमांक-5 मध्ये 150 पैकी 111 गुण व पेपर क्रमांक-6 मध्ये 100 पैकी 60 गुण मिळविले व तो परीक्षा नापास झाला पण त्याला पेपर क्रमांक-4, 5, 6 मध्ये 60 % किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले होते म्हणून त्याला ते पेपर पुन्हा देण्यापासून सूट मिळाली. मग तो दुसरी संधी वापरून व सूट मिळालेल्या विषयाचा लाभ घेऊन पुन्हा परिक्षेला बसला मग त्याला पेपर क्रमांक-1 मध्ये 200 पैकी 133 गुण, पेपर क्रमांक-2 मध्ये 200 पैकी 141 गुण व पेपर क्रमांक-3 मध्ये 150 पैकी 70 गुण मिळाले तर तो कर्मचारी संपूर्ण परीक्षा उत्तीर्ण होईल का ? कृपया याबाबत योग्य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
Question by पंकज कागणे
12-05-2017
pankajkagane@gmail.com
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, वाजीब-उल-अर्ज म्हणजे काय? या बाबत कृपया मार्गदर्शन करावे खूप मोठी मदत होईल सर.
Question by पंकज कागणे
12-05-2017
pankajkagane@gmail.com
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, विभागीय दुय्यम सेवा परीक्षा (लिपिक संवर्ग) ही परीक्षा दुसरी संधी वापरून व सूट मिळालेल्या विषयाचा लाभ घेऊन जर परीक्षा दिली तर सदर परीक्षेत राहीलेल्या प्रत्येक प्रश्न पत्रिकेत 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केले तर संपूर्ण परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे घोषित केले जाते काय ? ( 3 विषयात सूट मिळाली व 3 विषयांची पुन्हा परीक्षा दिली आहे. ) कृपया याबाबत मार्गदर्शन व्हावे.
Question by पंकज कागणे
12-05-2017
pankajkagane@gmail.com
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, स्थायी आदेश नस्ती म्हणजे काय? या बाबत कृपया मार्गदर्शन करावे खूप मोठी मदत होईल सर.
Question by पंकज कागणे
12-05-2017
pankajkagane@gmail.com
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, महसूल अपील प्रकरणामध्ये रीतसर चौकशी कशाप्रकारे केली जाते? या बाबत कृपया मार्गदर्शन करावे. खूप मोठी मदत होईल सर.
Question by बालाजी दहिफळे
11-05-2017
balajidahiphale1996@gmail.com
नमस्कार सर,
पदोन्नती साठी कोणकोणते निकर्ष लागतात.
कोतवालाना 25 टक्के शिपाई होण्याकरता जागा राखीव आहेत.या जागा जाती नुसार भरण्यात येतील कि आपली सेवा किती वर्ष झाली, आपले शैक्षणिक पात्रता किती उच्च, किंवा शिपाई संवागातील एख्यादया जातिच्याची पदोन्नती झाली,तर ती जागा कोतवालामधून त्याच जातीच्या उमेदवाराणे भरली जाईल का?
Question by बालाजी दहिफळे
11-05-2017
balajidahiphale1996@gmail.com
नमस्कार सर,
मला वसुली बाबत माहिती पाहिजे आहे, जसे कि एखादी वाळू ची ट्रक धरली असता त्याच्याकडून किती royalties रक्कम भरून घ्यायची ,जर तो मालक त्याच ठिकाणी (रस्तावर) जर ती रक्कम भरण्यास तयार असेल तर ती रक्कम घ्यायची का ? रक्कम तहसीलदारच घेवू शकतात का?
इतर कर्मचारी हि ती रक्कम घेवू शकतात. जेव्हा तो रेती मालक royalties ची रक्कम भरतो त्यावेळी आपण चलन काढलेले नसते, जर तो मालक पावती मागत असेल तर त्याला पावती कशी द्यायची ? जर आपल्याकडे पावतीचा फॉरमॅट असेल तर तोही मला इमेल वर पाठवावा.
धन्यवाद
Question by सीमा खोपडे
09-05-2017
Khopadeseema2161@gmail.com
माझ्या जमिनीची मोजणी होऊन मला क प्रत मिळाली आहे.तरी लगतदार शेतकरी अतिक्रमण काढून देत नाही. त्याच्यावर पुढची प्रोसेस करून मला अतिक्रमन काढून मिळण्याची तारीख मिळाली.गावचे तलाठी, सर्कल वगैरे लोक आले.व या तलाठी सर्कल यांनी आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्या तशी मागणी केली.ऐन वेळी पोलीस प्रोटेक्शन मिळत नाही याची कल्पना मला नव्हती परंतु तलाठी सर्कल यांनी त्या शेजाऱ्याबरोबर संगनमत करून अतिक्रमण काढण्यास नकार दिला त्यापूर्वी २ दिवस आधी त्या शेतकऱ्याने अतिक्रमण काढू नये म्हणून स्टे ची दिवाणी केस दाखल केली. आता पावसाळ्यापूर्वी आणि त्या स्टे ची नोटीस मिळण्यापूर्वी मला ते अतिक्रमण काढून मिळावे यासाठी मी काय करावे.कृपया मार्गदर्शन करा मी शेजारच्या शेतकऱ्याच्या त्रासाने आणि धमक्यांने वैतागलो आहे.
Question by अमोल ए वाघ
09-05-2017
amolwagh6828@gmail.com
नमस्कार सर,
माझा दिनांक ८ एप्रिल २०१७ चा प्रश्न - क्षेत्र हे गावाच्या शिवेजवळ आहे. क्षेत्राची हदद कायम मोजणी केली असता पूर्ण रस्ताच क्षेत्राचा भाग आहे.सदर क्षेत्राची २ वेळेस हद्दकायम मोजणी केलेली असून दोन्ही वेळेस आलेल्या खुणा ह्या एकच आहेत. जमिनीच्या लगत असलेला शिव रस्ता च्या पलीकडे हद्दीच्या खुणा मोजणीदार यांनी दाखविलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही रस्त्यावर अतिक्रमण केलेले नसून रस्त्यानेच जमिनीवर अतिक्रमण केलेले आहे. सदर रस्त्याचे क्षेत्र मिळेल कि नाही
Question by SANKET
08-05-2017
sanketgujar@gmail.com
आदरणीय साहेब, आपण आपल्या कामांमधुन वेळात वेळ काढुन देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खुप धन्यवाद. माझा पुढील प्रश्न पुढीलप्रमाणे – संपादित जमीनीचा मोबदला देण्यात येतो त्यापैकी अर्धवट रक्कम स्विकारलेली आहे आणि अर्ध्या रकमेचा एक भाग न्यायालयात आणि एक भाग इन्कम टॅक्स विभागात जमा केलेला आहे अशा परिस्थितीमध्ये सदर जमीनीचा शासनातर्फे केवळ कब्जा घेण्यात आलेला नाही म्हणुन, सदर मिळकत भुसंपादन कायदा -१८९४, कलम ४८ पोटकलम १ अन्वये मुळ मालकाला परत देता येउ शकते का तशी कायद्यामध्ये तरतुद असल्यास त्याची सविस्तर माहिती देण्यात यावी ही नम्र विनंती..
Question by प्रवीण पाटील
08-05-2017
pypatil77@gmail.com
नमस्कार सर , गट नं २६६ बागायत (१.४७ हेकटर + ५ आर पॊटकराब ) मध्ये ४ हिस्से करावयाचे आहेत A . ४० आर , B . २३ आर , C . ४२ आर व D . ४२ आर + ५ आर पोटकाराब. तसेच गट नं ६६ (जिरायत ३५ आर) मध्ये B . १८ आर व D . १७ आर .
वरीलप्रमाणे चार भावांचे चार हिस्से करावयाचे आहेत तरी सर्वांचे स्वतंत्र ७/१२ उतारे होतील का कृपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती . गावाचे नाव टाहाकली तालुका धरणगाव जिल्हा जळगाव
Question by गणेश शिंदे
08-05-2017
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,पूर्वी निवासी प्रयोजनासाठी बिनशेती आदेश घेतला होता.परंतु मनपा.कडून व्यावसायिक प्रयोजनासाठी परवानगी घेऊन त्यानुसार बांधकाम केले असल्यास बिनशेती आदेश व्यावसायिक प्रयोजनासाठी करण्यासाठी काय करावे लागेल? कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.....
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3400 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
