जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by गणेश बाबासाहेब गीते
30-01-2016
ganesgite39922gmail.com
सर
आमच्या आजोबंच्या वाट्याला दीलेली २० आर ईतकी जमिन सध्या आमच्या ताब्यात सूमारे २५ सालापासून आमच्या ताब्यात आहे .मात्र ती जमिन सध्या आमच्या चूलत चूलत्याच्या वारसांच्या नावावर आहे . चूलत चूलते ते हयात असताना ती जमिन आमच्या वाट्याला दिल्यामूळे ती जमीन आमच्या नावावर करुन द्यायला तयार होते मात्र आता ते मयत झाले आहेत त्यांच्या वारसांनी सदर जमिनी वर त्यांच्या नावाची वारस नोंद लावली आहे आता ते सदर जमिन आमच्या नावावर करुन देत नाहीत . आमच्या आजोंबाच्या वाट्याला सदर जमिन दिली असल्याबाबत आमच्याकडे सध्या कोनताही पूरावा नाही मात्र सदर जमिन २५ सालापासून आमच्याच ताब्यात आहे सदर जमिनीत आमचे १० सालापासून घर आहे त्या घराची ग्रामपंचायत ला तेव्हापासून नोंद आहे तेव्हापासून सदर घराची दरसाल आम्ही ग्रामपंचायतीकडे पट्टी भरत आहोत तसेच महावितरनाने आम्हाला सदरजमिनीतील आमच्या घराला विज मिटर दीले आहे त्याचेही आम्ही विजबिल भरत आहोत त्या जमिनीत आमचे २० नारळाचे झाडे आहेत व दरसाल आम्ही सदर जमिनीत विविध पिके घेत आहोत मात्र पिक पाहणीला आमचे नाव तलाठीने घेतलेले नाही अशी स्थिती असताना आम्हाला आमचे चूलत चूलत्याचे वारसदार ती जमिन आमच्या नावावर करुन देत नसल्यामूळे आम्हाला सदर जमिन आमच्या नावावर कायदेशिर मागाने करावयाची आहे .
१. तरी आम्ही सध्या काय करु
२ कामगार तलाठी सदर जमिनीवर आमचे पिकपाहणीला नाव लावू शकतो का?
३ सदर जमिन आमच्या नावावर करण्यासाठी आम्ही काय करु
४ महसूली अधिकारी सदर जमिन आमच्या नावावर करुन देऊ शकतिल का त्या साठी काय करा वे
१. आपली जर २० वर्षा हून अधिक काळ वहिवाट असेल तर , आपण Adverse -possession चा दावा दिवाणी न्यायालयात दाखल करा .
२.पिक पाहणीला नाव लावण्यासाठी , जमीन मालकाने त्याचे संमतीने जमीन आपल्याला कसण्यास दिलेलेइ असणे आवश्यक आहे . आपले जमीन कसणे किंव्हा आपली वहिवाट कायदेशीर असणे आवश्यक आहे . आपली वहिवाट आपले , चुलत चुलत्यांचे वारसांचे , इच्छे विरुद्ध असणार , त्यामुळे आपली वहिवाट हि कायदेशीर नाही . पर्यायाने , आपले नाव पिक पाहणी सादरी लावले जाणार नाही
३. उत्तर क्रमांक १ प्रमाणे , उपाययोजना करणे उचित
४. नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by स्वाती स्वामी
29-01-2016
swati.swami@yahoo.com
ग्रामीण पेयजल योजनेतील टाकी बांधकाम करण्यास जागा मिळणेबाबत वस्तीवाधीसाठी संपादित केलेली जमीन इतर प्रयोजनासाठी देता येते का ? कृपया शासन तरतुदी सह मार्गदर्शन करावे हि विनंती .
जमीन ज्या कारणासाठी संपादित झाली असेल त्याच कारणासाठी जमिनीचा वापर होणे आवश्यक आहे .
नवीनभू संपादन कायद्याच्या कलम ९९ नुसार , अन्य कारणासाठी जमिनीचा वापर अनुद्नेय नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by स्वाती स्वामी
29-01-2016
swati.swami@yahoo.com
बांधकाम परवानगी /परवाना देण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना आहेत का ? असतील तर कोणत्या शासन तरतुदीनुसार कृपया मार्गदर्शन करावे .
बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार , नियोजन अधिकार यांना आहेत .
प्रादेशिक योजना असेल तर - जिल्हाधिकारी नियोजन अधिकारी आहेत
कलम ११३ प्रमाणे Special Township असेल तर - अशे प्राधिकरण
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by rajesh
28-01-2016
gawandestate@gmail.com
aaicha mrityu patr ani bahinicha khredi khat banvlela ahe pn talathi karyalay nondani kryala kahi tharavik mudat aste ka krupya madat kra.
Question by चेतन घोड्के
26-01-2016
rajughodke40@gmail.com
जमीन चा निकाल नाशिक कोर्टाने आमच्या बाजूने दिला आहे तर समोरच्या ने मुम्बई हाइ कोर्ट मधी अपील केला आहे तर काय होइल क्रुपया सांगा
hmmmmm
या प्रश्नाचे उत्तर आपणास काय अपेक्षित आहे.
एक तर निकाल आपले बाजूने लागेल अथवा विरोधी पक्षाचे बाजूने लागेल ................................
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राहुल सावंत
26-01-2016
sawantrahul1974@gmail.com
साहेब माजा प्रश्न पुढील प्रमाणे आहे माजे मित्र पुणेकर यांची पुण्याला त्यांच्या गावी दोन जीमिनी आहेत एक जमीन त्यांच्या चुलत्यांनी विकत घेतली आहे व दुसरी त्यांच्या चुल्त्यांसकट व्दिलोपाजित जमीन आहे .ज्या वेळी या लोकांनी व्दिलोपाजित जिमीनवाटण्या च्या विचार केला तेव्हा व्दिलोपाजित जमीन म्हणून त्यान्ही त्यांच्या चुलत्यांनी वयक्तिक विकत घेतलेल्या लामिनीची वाटणी केली होती. त्याला आता जेव्हा सत्य काय ते कळले तेव्हा चुलत्यांची जी वाटणी झालेली जमीन ती त्यांना परत करायची आहे किव्हा सदर जमानीचा जो सर्वे नंबर आहे तो व व्दिलोपाजितजमानीचा जो सर्वे नंबर आहे तो अद्लाबद्ल करायचा त्यांचा विचार आहे तर असे करता येईल काय . त्या साठी कोणते पेपर लागतील कोणाला भेटावे लागेल याची आपण माहिती द्यावी हीच विनंती .
मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८१ च्या कलम ११८ ते १२१ नुसार , जमिनीची आदला-बदल करता येते.
मात्र त्या साठी आपणास नोंदणी व मुन्द्रंक शुल्क भरणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सागर अशोक महाजन
26-01-2016
sagarmahajan77@gmail.com
रक्ताच्या नात्याला स्टेम्प ड्यूटी माफ़ हयाचे परिपत्रक आहे का कोनकडे कृपया असेल तर त्याचे लिंक पाठवा नहितर अपलोड केरा
Question by VIKRAM YADAV
25-01-2016
vikram.vy11135@gmail.com
namaskar ,
kortat hukumnama zala ahe mazaa aai va 2 bhinini hakka soad lela hahe kortat.atta maze nava 7/12 var lagave mhnun mi tahsil office madhe arg kela ahe thoha mala sagnyat ale ki thumala mudrank bhrave lagel.
Question by abhijit
24-01-2016
abhijitkadam55@gail.com
११/१२/२०१५ शासन आदेशा प्रमाणे ग्रामिन भागात घर बाधनी परवाना चे अधिकार ग्रामपचायत यांना देण्यात आले आहेत, त्यासाठी नगर रचना विभागाची परवानगी आवश्यक आहे का? तसेच बाधकाम परवानगी साठी लागणारे कागद पत्रे व कार्यपध्दती सविसतर माहीती मिळावे?
ग्राम पंचायत यांनी नगर रचना विभागाचे अभिप्राय घेण्याचे आहेत
आपणास बंधं नकाशे सदर करावे लागतील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by rajaram
20-01-2016
rajaram4021@gmail.com
सर, माझे आजोबा १९७० साली मयत झालेले आहेत,मयत झालेनंतर ६ क फेरफारला आमची सर्वांची म्हणजे माझ्या वडिलाची,आत्याची , चुलत्यांची नावें लागलेली होती .परंतु ७/१२ वरती माझे आजोबा मयत झालेवार फक्त माझ्या चुलत्याचे ए.कु .म. म्हणून नाव लागलेले होते.इतर हकाम्ध्ये कुणाची नावें लागलेली नव्हती .१९८५ सालापासून चुलत्याने ए.कु म.नाव कमी करून आमच्या आजोबांची जमीन विकलेली आहे त्यावरती माझ्या वडिलाची,आत्याची सही , सोढपत्र ,वाटणीपत्र ,वाटप झालेले नसताना चुलत्याने जमीन विकलेलीआहे . आता ५.३० मधील ३.०० एकर विकलेली आहे व जी २.०० एकर आहे ती मुदत खरेदी दिलेली आहे. आणि ३० गुंठे जमीन आपल्या पत्नीच्या नावें केलीली आहे.तरी सर आम्हला आमची सगळी जमीन परत मिळेल का ,त्यासाठी काय करावे लागेल.कृपया उपाय सांगा.
आपण The Specific Relief Act खाली , आपले चुलत्याने केलेलं विक्री व्यवहार राद्द्द करून मागा
त्यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Rameshwar Kashte
20-01-2016
kashte876@gmail.com
महाराष्ट्र शासनाने, शहराजवळील जमिनीवर प्लाॅट घेतल्यास तुकडेबंदी कायदा लागु होणार नाही असा निर्णय घेतला आहे;त्याचा जी.आर.मराठी भाषेतला कोठे मिळेल ?तो G.R.माझ्या email वर पाठवता का प्लीज ?
आपण महाराष्ट्र शाषण संकेत स्थळ पहा . त्या ठिकाणी आपणास कायदा दुरुर्स्ती आदिसुचना भेटेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by खेडकर दुर्योधन शंकर
20-01-2016
oiitcomputerarun@gmail.com
आदरणीय सर,
ग्रामीण भागात घर/इमारत बंधनेसाठी परवानगी घेनेची आवश्यकता नाही असे सुधारित परिपत्रक आहे असे म्हणतात या बाबत कृपया सविस्तर विवेचन करावे.
Question by खेडकर दुर्योधन शंकर
20-01-2016
oiitcomputerarun@gmail.com
आदरणीय सर,
नवीन ७/१२ संगणकीकृत करताना अथवा हस्तांतरित ७/१२ चे इतर हक्कातील विवाहित मुलीची नोंद कब्जेदार सादरी दाखवू शकतो का व असे केले तर इतर हक्कातील नवे कब्जेदार सदरी ठेवताना कब्जेदार सदरी असलेले खातेदार आपल्याला कायदेशीर त्रास देउ शकतो का ? नावे आम्हास पत्र न देता डायरेक्ट कब्जेदार सादरी कशी नोंद केली.
कृपया विवेचन द्यावे.
मुलिनाहि वडिलांचे मिळकतीत मुलां इतकाच हक्क आहे . त्या मुळे, मुलीची नावे , ७/१२ सदरी कब्जेदार असणे आवश्यक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by खेडकर दुर्योधन शंकर
20-01-2016
oiitcomputerarun@gmail.com
आदरणीय सर,
सन २००९ रोजी फेरफार मंजूर आहे परंतु त्यांचा अंमल ७/१२ ला न झालेले त्याचा अंमल देताना गाव तलाठी तालुकेकडून या बाबत परवानगी न घेता आज तारखेस अंमल होऊ शकतो का ?
कृपया विवेचन द्यावे.
Question by खेडकर दुर्योधन शंकर
20-01-2016
oiitcomputerarun@gmail.com
आदरणीय सर,
ख-या खु-या औद्योगिक क्षेत्रासाठी कोणत्याही सक्षम अधिकारी कडून परवानगी न घेत समोरची व्यक्ती दस्तावेज करू शकतो / कोणतीही शर्तीची जमीन असली तरी असे प्रचलित परिपत्रक आहेत हे खरे असेल तर असे व्यवहार गाव दप्तरी अथवा सब रजिस्टर कार्यालयात का नोंदविले जात नाही.
कलम ६३अ सुधारणा कायदा अन्वये , शेती झोन मध्ये जरी कमिन असली व औद्योगिक वापर , अनुनेया असेल तर , परवानगीची गरज नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by खेडकर दुर्योधन शंकर
20-01-2016
oiitcomputerarun@gmail.com
आदरणीय सर,
कुल या संज्ञेत जातीची अट नाही मग आदिवासी व्यक्तीचे वर्ग १ चे जागेवर बिगर आदिवाशी व्यक्तीची कुळ नोंद होते का ?
कृपया विवेचन करावे.
Question by खेडकर दुर्योधन शंकर
20-01-2016
oiitcomputerarun@gmail.com
आदरणीय सर,
एखादे खातेदाराने गावठाण जागेतील जागा मोजणी साठी अर्ज करून जागा सर्व्हे खातेकडून मोजणी करून मिळते का?
Question by खेडकर दुर्योधन शंकर
20-01-2016
oiitcomputerarun@gmail.com
आदरणीय सर,
एखादे झाडे किती वर्षाचे झालेवर त्याचेवर रोजगार हमी योजना/शिक्षणकर / विशेष शिक्षण आकारणी करतात.
कृपया विवेचन करावे.
Question by शशिकांत नाना पाटील
20-01-2016
shashikantnanapatil@gmail.com
आदरणीय सर,
एखादे व्यक्तीने त्याचे मूळ गावाशिवाय अन्य ठिकाणी जमीन खरेदी केली आहे व त्याचा अकस्मात मृत्यू झाला तर त्याची वारस चौकशी ज्या गावी जमीन खरेदी केली आहे. तो मंडळ अधिकारी अथवा असा कारकून फेरफार मंजूर करू शकतो का? किंवा त्याने मूळ गावी वारस चौकशी करून असा फेरफार नोंदविणे गरजेचे आहे.
कृपया विवेचन द्यावे.
Question by खेडकर दुर्योधन शंकर
20-01-2016
oiitcomputerarun@gmail.com
आदरणीय सर,
ज्या त्या ठिकाणी मोबाईल टोवर्स आहेत प्रत्येक तलाठी / मंडळ अधिकारी / तहसीलदार/प्रांत / वेगवेगळे नियम सांगतात म्हणून किती रुपये अनधिकृत कर वसूल करावा. तरतूद सांगा.
Question by राजेंद्र लांडगे
19-01-2016
rajlandge12 @gmail.com
सर ,
नॅशनल हायवेवरील टोल नाक्याला ग्रा .पं. कर ला वू शकते का ?
टोलनाका दाद देत नाही काय करावे .
Question by गणेश शिंदे
19-01-2016
ganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,एखाद्या तक्रार केसमध्ये मं अ.यांनी अर्जदार व जाब देणार हजर राहत नसल्याने अपिलाचे कामकाज काढून फेरफार नोंद रद्द केली असल्यास त्याबाबत मा.प्रांत साहेब यांचेकडे अपील करावे लागेल का? किंवा का.त. फेरनोंद घेऊ शकतात का? कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
Question by खेडकर दुर्योधन शंकर
19-01-2016
oiitcomputerarun@gmail.com
आदरणीय सर,
एखाद्या शेतक-याने जमिनीवर कर्ज घेतले त्याची नोंद फेरफार वहीत केल्यावर अथवा एखाद्या शेतक-याने घेतलेल्या कर्जाची पूर्ण परतफेड केल्यावर त्याची नोंद फेरफार पुस्तकात घेतली जाते. यासाठी हे दोन्ही फेरफार मंजूर करताना १५ दिवसाचा कालावधी कलम १५० अन्वये आवश्यक आहे अगर कसे कि हा फेरफार १४ दिवसाच्या अवधीची वाट न बघता हा फेरफार मंडळ अधिकारी यांना मंजूर करता येईल अगर कसे मार्गदर्शन करावे.
Question by abhijit
19-01-2016
abhijitkadam55@gmail.com
आपला प्रश्न/सूचना... महोदय सिटी स न ची मालमत्ता ९९ वर्षाच्या रजिस्टर भाडेपट्टयाने १९८३ ला घेतला पट्टेदार म्हणुन नोंद आहे धारक म्हणुन मुळ मालकाची नोंद आहे तर धारक म्हणुन नोंद लावण्यासाठी काय करावे लागेल
Question by खेडकर दुर्योधन शंकर
19-01-2016
oiitcomputerarun@gmail.com
आदरणीय सर,
एखाद्या ७/१२ उता-यावर रवींद्र जयराम कासार चे प्रोप्रायटर धारा इंटरप्राईजेस अशी नोंद ७/१२ चे उता-यावर आहे असे असताना जर प्रोप्रायटर व्यक्ती मयत झाल्यास त्याचे वारस नोंदवण्याची काय तरतूद आहे कृपया मर्गदर्शन करा.
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
