जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by shamal kiran palav
22-03-2015
kir.plv@rediffmail.com
maharashtra jamin mahsul abhiniyam 1666 che kalam 36 va 36 a nusar ekach aadivashi jamatitil natyatil aadivashina hakkasod patra kartana collectorchi parawangi aavashyak aahe ka
Question by महाडीवाले के व्ही
22-03-2015
mahadiwalek.v2009@gmail.com
सर
एका प्रकरणात अ या महाराष्ट्रातील युवकाचे कर्नाटकातील स्वजातीय युवतीशी विवाह झाला त्याची नोंद ग्रा प येथे झाली पतीच्या नावाने मतदान कार्ड, आधार कार्ड, राशन कार्ड, तहसिल चे रहिवाशी , मिळाले आहे
प्रकरणात वरील पुराव्याधारे तहसिलदार मार्फत एसडीओ कडे सासरच्या नावाने जात प्रमानपत्राची मागणी केली असता एसडीओने अर्जदार कर्नाटकातील असल्यामुळे जात प्रमाणपत्र देता येत नाही असे कळवले आहे .
प्रकरणात असा निर्णय देता येतो का ?
नागरीकाच्या मुलभुत हक्काचे भंग होते का ?
याविरूध्द अपिल कोठे करावे ?
१. होय.
२. नाही
३. वैधता समितीकडे
अ या युवकाचे पत्नीने , तिच्या वडिलांना , आजोबाना अथवा नातेवाईकांना दिलेले कर्नाटक राज्यातील प्रमाणपत्र सदर करणे आवश्यक . अश्या प्रमाणपत्राचे आधारे , प्रांताधिकारी नमुना ६ अथवा १० मध्ये जात प्रमाणपत्र देतील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रकाश रमेश कवटे
22-03-2015
kavateprakash@gmail.com
मा. महोदय,
स.न.वि.वि.
मी एक अल्पशिक्षित २४ वर्षाचा तरुण आदिवासी भूमिहीन शेतमजूर आहे,
माझे आजोबांचे नावे मौजे कवडास, तालुका, जव्हार, जिल्हा, ठाणे
(आता जिल्हा, पालघर) येथे १९६० साली ५एकर २२ गुंठे जागा ३२ ग
कुळ कायद्या प्रमाणे मिळाली होती. परंतु गरिबीमुळे त्याचा किमतीचे
हप्ते नभरता आल्याने सदर जागा ३२ प (2)(c) प्रमाणे १९६५ साली
सरकारजमा करून ती एका प्रकल्पग्रस्तास देण्यांत आली. त्यामुळे आमचे कुटुंब
भूमिहीन झाले. त्यानंतर आजोबांचा लगेचच मृत्यू झाल्याने आजीनी मोलमजुरी
करून कुटुंबाचे पालनपोषण केले.
माझा प्रश्न असा आहे कि मला शासनाकडून 3 ते 4 एकर शेत जमीन वनहक्क वा इतर योजनेद्वारे
मिळू शकेल का? या साठी विनंती अर्ज व पाठपुरावा कोणाकडे करावा लागेल? कि मी आयुश्यभर
भूमिहीन शेतमजूरच राहणार? कृपया आपण याबाबत मला मार्गदर्शनकरावे. हि नम्र विनंती
प्रकाश रमेश कवटे
1. वन हक्क कायद्या खाली जमीन मिळण्यासाठी आपण वन जमिनीवर१३/१२/ २००५ पूर्वीपासून वास्तव्य / वहिवाट असणे आवश्यक
२. महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याखाली आपण जमिनी शेती करण्यासाठी शासनाकडे मागणी करा .
३. आपण ३२ ग हप्ते न भरल्याने , शासन जमा होऊन , ३२ प खाली वाटप झाली आहे .
कृपया आपण खात्री करा कि , हप्ते न भरल्याने , आपणाकडून जमिनीच्या थाक्बाकीप्रमाणे , हप्ते वसुली बाबत कारवाई करण्यात आली होती का ?
या कायद्याचे कलम ३२ म प्रमाणे , हप्ते भरण्यास कसूर केल्यास , शेत जमीन न्यायाधिकरणाने हप्ते वसुली , म.ज.म.अ.१९६६ च्या तरतुदीप्रमाणे , जमिनीची थकबाकी म्हणून वसूल करणे आवश्यक . न्यायाधिकरणाने अशी वसुली केली नसल्यास , आपली शेत जमीन केवळ आपण हप्ते भरले नाहीत म्हणून . शासन जमा करता येणार नाही .
आपण जुने कागद पत्र पहा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by mahadeo kale
21-03-2015
mahadeo.kale.88@.g.mail
१९४१ साली वडील मयत असतील तर ,मुलीचा जन्म 1933 चा असेल तर मुलीच्या वारसाला वडिलांच्या प्रोपेर्तीमाडे हिस्सा मिळतो का ,मुलगी १९८६ साली मयत आहे.
होय.
१९५६ हिंदू वारसा कायदा नुसार , वडिलांचे मिळकतीत , मुलीना हिस्सा होता . फक्त २००५ पूर्वी पर्यंत , वडील हयातीत , मिळकतीचे वाटप झाल्यास त्यात हिस्सा मिळत नसे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Shivaji L Gande
21-03-2015
shivajigande.85@gmail.com
sir
please answer me my question dt 26-2-2015
Question by राम काशीनाथ चोथवे
21-03-2015
ramchothve@gmail.com
ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वभूमी अभिलेख मधे नोंद असलेल्या जागेची दूमजली इमारत पैकी तळ मजला तळ जमीनीसह खरेदी केला असता नोंद भूमी अभिलेख करत नाहीये कारन कळावे
Question by Sambhaji
20-03-2015
paragelectronic@gmail.com
महाराष्ट्र गुंठेवारी २००१ प्रयोजन बदल करता येते का अाणि येत असेल तर कोणती कागद पञ लागतात
Question by Rajan
20-03-2015
143hasislovemail143@gmail.com
सर मला हे विचारायचे की माझ्या वडीलांच्या नावे ३०/५० एवढे घर अहे . त्या घराच्या बाजुला १२/५० एवढी जागा शिल्लक आहे ती आम्हीच गुरे बांधण्यासाठी वापरतो. आणि ती त्या प्लॉटचाच जागा आहे. पण तीची नोंद ग्रामपंचायतीत नाही .तरी ती जागा नावे करण्यासाठी काय करावे लागेल.
एकत्रित जागा म्हणजे ३०/५० व १२/५० , ग्रामपंचायत दप्तरी कोणाचे नावे होती ?
कि घर पूर्वीपासून आहे ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पानखडे
20-03-2015
monalighodke@yahoo.in
दोन गुंठेला नगररचना वाणिज्य परवागी मिळते का
Question by अजय पसारी
20-03-2015
ajypsri@rediffmai.com
सर आपन 27/02 चे प्रश्ना चेउत्त्तर दिले पण उपविभागीय अधिकारी साहेबाना पत्र दिले पण साहेब अक्रुश्क करुण देत नाही आपन म्हणाले की अक्रुषक झाले परंतु 7/2 कसे ओपन होणार अक्रुषक नकाशा वर शिका लागेल तलाठी नोंद कशी घेणार व अक्रुषक झाल्या चे जीआर ची कॉपी पाठवावी ही विनंती
आपणास परत पाठवण्यात आली आहे
आपण आपले e mail खाते उघडून पहा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संभाजी बनकर
20-03-2015
paragelectronic@gmail.com
महाराष्ट्र गुंठेवारी २००१ प्रयोजन बदल करता येते का अाणि येत असेल तर कोणती कागद पञ लागतात काही तरी उत्तर मिळावे ही विंनती
गुंठेवारी कायद्यानुसार १ जानेवारी २००१ रोजी अस्तित्वात असलेले बिनशेती भूखंड /बांधकामे जी विनापरवाना निर्माण करण्यात आलेली आहेत ती नियामंकुल करणे हा आहे .
या कायद्यानुसार जमीन वापर नियंत्रित केले जात नाहीत . त्यामुळे आपणास निवासी वापर , वाणिज्य करावयाचा असल्यास आपण , नियोजन प्राधिकरणास अर्ज करून करू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by नितीन भानुदास काकड
18-03-2015
nbkakad@rediffmail.com
मी एकत्रित वेतनावर कामावर होतो त्या नंतर मला नियमित वेतन शेणी मंजूर झाली तर एकत्रित वेतनावर ची सेवा पकडण्यात येते काय कुरुया सांगा
Question by अनंत चाटे
18-03-2015
acchate@gmail.com
कुळाची 38 इ प्रमाणे मालकी हक्काची किंमत कोणत्या लेखाशिर्ष खाली भरणा करण्यात येते ते लेखाश्िार्ष कोणते
जमिन अंबड ता.अंबड जि.जालना येथील आहे तरी कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती
Question by शाम चौधरी
18-03-2015
choudhary.sham64@gmail.com
आदरनीय महोदय,
एखाद्या शासकीय कर्मचारी यांना त्यांचे सेवा कालावधीत स्वतःसाठी व कुटुंबासाठी किती वेळा वैद्यकीय प्रतिपुर्ती देयक सादर करता येईल. याबाबत मार्गदर्शन करणेस विनंती.
Question by ganesh babasaheb gite
18-03-2015
ganeshgite@7875mail.com
सर
प्रांत साहेब अपिलातिल किती दिवसाचा विलंब माफ करु शकतात . प्रातांना विलंब माफ करण्यास काही मयादा आहेत का?
विलंब झाले बाबतचे सबळ/ वाजवी कारण असणे आवश्यक आहे .
अज्ञान , निरक्षर हि विलंबाची करणे होऊ शकत नाही
परदेशात असणे/ अंथरुणाला खिळून असणे / काही काळासाठी वेडा असणे - अश्या कारणासाठी विलंब माफ केला जाऊ शकतो
विलंब माफी बाबत म उच्च न्यायालय / सर्वोच्च न्यायालय यांचे निर्णय वाचा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by
16-03-2015
ambhorea@yahoo.com
सर करमनुक कर वसुलिवरील दंड कशाप्रकारे काढतात याबाबत काही सुत्र आहे का?
दंड थकीत असलेल्या पहिल्या महिन्याला मासीक वसुलीच्या १८% आणि त्यानंतरच्या महिन्यांसाठी २४% प्रमाणे दंडाची आकारणी केली जाते
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by किशोर राणे
16-03-2015
kinara743@gmail.com
वडिलांच्या नावावर असलेल्या प्लॉट वर रुपये ४०००/- तगाई कर्ज १९६६ सालचे आहे.मोठ्या बाबांनी ते कर्ज फेडलेले आहे.परंतु त्याची पावती आता मिळत नाही.तर त्या कर्जा बद्दल पूर्ण माहिती कोठे मिळेल .कर्ज फेडले नसल्यास आता किती रक्कम भरावी लागेल याबाबत सविस्तर माहिती आन-लाईन पाहायला कोणत्या वेब-साईट मिळेल
तगाई बोजे कमी करणे बाबत शासन निर्णय आहे .( माझ्याकडे नाही ) .
त्याद्वारे तगाई बोजे कमी करण्याचे आहेत . शासन निर्णय प्राप्त करून कारवाही करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by किशोर राणे
16-03-2015
kinara743@gmail.com
ड पत्रकाच्या नोंदी कोठे पहावयास मिळेल?
वेब साईट ची माहिती द्यावी
Question by सागर काळे
16-03-2015
sagarkale83@rediffmail.com
कुंडेटकर सर,
प्रश्न क्र.३२ दि.०९-०३-२०१५ नुसार आपण जे उत्तर दिले आहे की, विभागीय अहर्ता परीक्षा जो अगोदर उत्तीर्ण होतो त्याचे promotion अगोदर , हा नुकत्याच MAT निर्णय दिलेला आहे . तर मलाही हया निर्णयाची प्रत माझ्या ई-मेल वर पाठवावी ही विनंती
Question by मीनाक्षी मधुकर ujal
16-03-2015
minakshiujal@gmail.com
साहेब मला माझ्या आजोबांच्य पूर्वी च्या जमिनीचे होऊन गेलेली २ pidyanpurvichi वारस तपासणी करायची आहे थेर मला हि वारस तपासणी कास्द्वारे व कोणा द्वारे करता येईल कृपया सल्ला द्या.
वारस तपासणी करायची आहे म्हणजे ?
पूर्वी झालेली वारस नोंद आपणास पाह्वयाची असल्यास फेरफार नोंद व वारस register ( नमुना नो ६ क ) पहा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by kiran
16-03-2015
kirant.lote94@gmail.com
Thanks sir .10/3/2015 ya roji mi vichar lelya prashanache uttr milale.hakka sidh krane tya sati purave kon kon te lagtil.
Question by किशोर धनराज rathod
16-03-2015
rathodkishor15@gmail.com
मोहोदय,
महसुल व्यासपीठ पाहण्यासाठी काय करावे लागेल.
महसूल व्यासपीठ हे महसूल अधिकाऱ्यांच्या चर्चेसाठी करण्यात आलेली सुविधा असून ती केवळ त्यांनाच उपलब्ध आहे.परंतु त्यामुळे आपणाला हवी ती माहिती मिळण्यास अडचण येणार नाही.धन्यवाद.
Reply by MCS Maharashtra | इतर
Question by श्रीक्रीष्णा मस्तूद, वरिष्ट लिपिक
16-03-2015
shri.mastud77@gmail.com
खरी नक्कल पुरावानेकारिता फी किती आकारावी याचा जी आर क्रमांक व दिनांक द्यावा
10 /- नगर पालिका क्षेत्र / महानगर पालिका क्षेत्र
५/- ग्रामीण क्षेत्र
साम्भांडीत परिपत्रक आपले e mail वर पाठवण्यात आले आहेत . अवलोकन करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by nilesh furade
15-03-2015
nileshfurade@gmail.com
भूमीअभिलेख कडून मी माझ्या शेताचे गटनकाशा काढले त्याचे प्रमाण 1इंच=20साखळी आहे
तो नकाशा 1cm=1000Cm या प्रमाणात
एनचार्ज करून मिळेल का भूमीअभिलेख कडून
Question by महाडीवाले के व्ही
15-03-2015
mahadiwalek.v2009@gmail.com
सर, एक प्रकरणात अर्जदार यांनी तहसिल कार्यालयात अर्ज सादर करून मालकी भोग वर्ग 1 वरील जमीनीचे अतिक्रमण काढुन देण्याची विनंती केली असता मंडळ अधिकारी व्दारे चौकशी केली असता म.अ यांनी बांधाचा वाद नसुन सदर जमीनीवर त्रयस्थ व्यक्तीचे अतिक्रमण आहे असा अहवाल दिला आहे
त्यानुसार अर्जदार यांना म ज म अ १९६६ चे कलम ५०, ५९ व परीपत्रक दि.२३/८/८२ अन्वये मालकी जमीनीवरील अतिक्रमण काढण्याचे अधिकार महसुली अधिका-यास नसल्याचे कळवले आहे.
यावर अर्जदाराने जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज देऊन तहसिलदार अतिक्रमण काढत नसल्याचे तक्रार केली यावर जि का ने कलम १३८ खाली प्रकरण निकाली काढा असे पत्र दिले
यावर पुन्हा अर्जदार यांना बांधाचा वाद नसल्याने आपण न्यायालयात दाद मागण्यास कळवले आहे यावर अर्जदाराने पुन्हा जिल्हाधिकारी कार्या कडे जाऊन अर्ज दिला आहे त्यावर जि का ने नियमानुसार कार्यवाही करण्यास पत्र दिले आहे
प्रकरणात अतिक्रमण काढणे नियमात बसत नाही आता काय करणे आवश्यक आहे
जिल्हाधिकारी यांचे नियमानुसार कारवाई करा या आदेशाचे अनुषगाने , आपण अर्जदारास कालवून दया का , खाजगी मालकीचे जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे अधिकार तहसीलदार यांना नाहीत . त्यांना दिवाणी न्यायालाय्त जाणेस सल्ला दया .
पत्राची प्रत जिल्हा कार्य्लायास दया
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3433 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
