जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

मौरुशी कुल म्हणून घेतलेली जमीन आहे.त्यावर काबिल्कास्त नोंद चुकून झाली आहे .पी १ पी २ वर भूमिधारी नमूद ahe तर ती नोंद कमी करता येयील kay
साहेब माझे वडील मुकुंद पाटणकर एका जागेत भाड्याने 1976 पासून व्यवसाय करत होते. सदर जागा मालक मकरंद खरे यांनी इमारत दुरुस्तीचे कारन दाखवुन व नतर जागा देतो असे सांगून २ वर्शनपूर्वी आम्हाला जागा रीकामी करण्यास सांगितले. मात्र आता ते जागा देत नाहीत व् ईमारत दुरुस्त करत नाहीत. त्या जागेत वडिलांच्या नावाने विज मीटर आहे. तसेच गुहागर नगर पंचायत मध्ये आमचे नाव भोगवतदार म्हणून आहे. तर त्या जागेत आम्ही परत जाऊ शकतो का ?
गुहागर ला भाडे नियंत्रण कायदा लागू आहे का?
असेल तर , आपण मिळकतीचा ताबा मिळणे साठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा
इमारत दुरुस्त झाले नंतर भाडेकरू , इमारतीत राहू शकतो , त्याचा हक्क राहतो

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

का कंञाटी पदावर ३६४ दिवस अथवा जास्त दिवस तात्पुरती पदोन्नती देण्यात आली असेल तर ३६५ दिवसानंतर त्या व्यक्तीला त्या पदावरून पदानावत करता येते किवा नाही?. याबाबत काही शासन निर्णय, न्यायायलीन निर्णय असल्यास मला देण्यास विनंती.
कंत्राटी कामगाराससेवेत, नोकरीत. कयाम करायचे असेल तर पद्दवनात करण्याची गरज नाही.
परंतु आपल्या प्रश्नावरून आपण शाशिकीय सेवेच्या अनुषंगाने विचारात आहत . असे वाटते
मम औदोगिक कलह कायदा १९४७ च्या कलम २५ न अन्वये , सलग १ वर्ष सेवेत असणार्या कामगारास , कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय सेवेतून , नोकरीतून काढता येत नाही
अश्या कामगारास अन्य कामगार कायद्याचे लाभ अनुद्नेया होतात .
कामगार कायद्यांचे वाचन करून निर्णय घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Santosh Nimbare
10-01-2015
nimbares@yahoo.co.in

sir, Maze ajoba ani tyancha ek motha bhau hota, ekatra sheti karayche, kul kaydyane ti jamin mothya bhavachya navavar zali, mazya ajobanche tyala nav lavale nahi. Mothe ajoba mayat zalya nantar tyanchya mulachya navi ti jamin zali. Tyana tin bhau ahet.Ata tya jamnila mazya vadilache anti ty tin bhavanche nave ahet. Mothya bhavach mulaga vatap karaycha mhanto pan tya jaminitil ardha vata magato ani ardya vataa tumhi tighani vatun ghya ase sangato. To tya jaminicha ardha hissa karun aplya navi karu shakto kay ? ani jar tyane ase kele tar amhi kay karave.
आजोबा आणि भाऊ एकत्र कसत असलेने , ते दोघे कसतपरंतु आपले चुलत आजोबांचे नाव ७/१२ सदरी ३२ ग किंमत निक्क्क्षित होऊन लागले . चुलतआजोबामयत झाले वर , त्यांचा मोठा मुलगा म्हणजे आपलेचुलतचुलते यांचे नाव लागले , त्या नंतर चुलतचुलते , त्यांचे दोन भाऊ व आपले वासिलांचे नाव मिल्कातीस लागले.
मोठे चुलत चुलते वाटप करू एशितत , चुलत आजोबा व आजोबा या दोघांचा कायद्याने अध हिस्सा आहे
म्हज्जे तुम्क्क्षे तीन चुलत चुलते यांचा अर्धा हिस्सा तर वडील यांचा अर्धाहिस्सायाप्रमाणे वाटपहोमे अब्श्यक
जात मोठेचुलतचुलतेऐकत नसतील. तर दिवाणी न्यायालाय्त दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर जर जमीन महाराष्ट्र शासन राखीव वने असा कब्जेदार सदरी ७/१२ वर असेल तर अशी जमीन खरेदी करता येते का? असल्यास कशा प्रकारे करता येईल ? कृपया मार्गदर्शन करावे ...
कब्जेदार सादरी राखीव वने असेल तर ती , जमीन राखीववन आहे
त्यामुळे तीखरेदी करता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एखादा शासकीय अधिकारी (वर्ग २)सेवानिवृत्त झाल्यानंतर DE (साधारण प्रकरण)चालू झाल्यास पेन्शन चालू आहे परंतु ग्रज्युएति ची रक्कम मिळाली नाही.ती मिळू शकेल का ?
आदरणीय सर,मा.तहसीलदार साहेबांकडे तक्रार केसचा निकाल लागल्यानंतर सदर केसची पूर्ण साक्षांकित नकल(रोजनाम्यासाहित दाखल असलेली सर्व कागपत्रे) अर्ज केल्यास अभिलेख कक्षातून मिळू शकतात का?
१९७० साली ८८ आर शेतजमीनीतील आमच्या आजोबांचा ३ रा हिस्सा म्हणजेच २९ आर हे क्षेत्र आमच्या पणजोबानी २०० रू. रोख देऊन १९५२ साली खरेदी केलेली होती.१९६७मध्ये फेरफारला आजोबांचा मृत्यूनंतर माझे वडील व चुलते यांची वारस नोंद झाली त्यानंतर १९७१ साली ग्रामपंचायतीने बगीचा करिता ८० आरची शासनाकडे मागणी केली त्यानुसार मा. तहसीलदार व पु. अधिकारी यांनी अवार्डच्या सुनावणीला बोलावले परंतु आम्ही हजर राहिलो नसल्याने सुनावणी एकतरफा होऊन दोनभाग करण्यात आले ८ आर मध्ये ३ रा हिस्सा आम्हास देण्यात आला आजपर्यंत आम्ही सर्व २९ आर याजागेमध्ये व्यवसाय व रहिवाशी आहे. मा. जिल्हाधिकारी व मा.मुखमंत्री कार्यालय यांचाकडे जमीन परत मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न चालू आहेत.आजपर्यंत आम्हास यश मिळाले नाही कृपया आम्हास कायदेशीररीत्या मार्गदर्शन मिळावे.
प्रश्न. विस्ताराने मांडणे आवश्यक आहे

१. तुम्क्क्षे मालकीची जमीन , भू साम्पानाशिवाय ग्राम्पांच्यात मागू शकत नाही

२. २९ गुंठे पैकी ८ गुंठे बगीचा करिता गरम पंचायत ने घेतले असले तर , २९गुंठेजमीनतुम्क्क्षे ताबे कब्जात न राहता , २१ गुंठे क्षेत्र राह्यला पाहिजे होते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर आमचे आजोबा वारल्यानंतर आमच्या मोठ्या काकांनी वारस तपासणी केली होती तेव्हा त्यांनी कुटुंब प्रमुक म्हणून आपले नाव सातबारावर लावले व माज्या वाडिलांच्या व लहान काकानच्या नावाची नोंध गाव नमुना ६क मध्ये झालेली आहे पण सातबारावर नावे नाहीत . तरी आता आमचे मोठे काका वारलेले आहेत मोठ्या काकांच्या कुटुंबाकडून वारस तपासणी करीत असताना माज्या वडिलांचेहि नाव गाव नमुना ६क प्रमाणे वारस म्हणून लावता येईलकाय
महोदय ,माझी नवीन शर्त असलेली ४.५ एकर शेती विकावयाची आहे .सदरची शर्त शेती महामंडळाची आहे १९७१ साली मिळालेली जमीन आहे. विक्री साठी परवानगीची गरज आहे का?
होय. नविन शर्थिच्या जमिनीच्या विक्रीला पुर्व परवानगी आवश्यक आहे

Reply by श्री. महेश शेवाळे | उप जिल्हाधिकारी

Question by Viraj
06-01-2015
vvm.prod@coep.ac.in

Sir
I have 15 gunthe shet jamin at madhevadgaon tal- Shrigonda but not having seperate 7/12 extract. it is total of 546 gunthe.I would like to start a industry in that land
1) What I need to make that 15 gunthe land as N.A. land
2) Is it possible to start small agro based industry in that land.
3) Which permissions I need to take
जर मिळकत औद्योगिक शेत्रात असेल ( zone ) तर , म.ज.म अ १९६६ चे कलम ४४ अ प्रमाणे , बिन शेती परवानगीची गरज नाही
तसेच नवीन अध्यादेशानुसार नुसार , बिनशेती परवानगी गरज नाही
मात्र बांधकाम परवानगी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियान द्वारे आवश्यक जर मिळकत , प्रादेशिक योजनेत असेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आपण १५ गुंठेसाठी अकृषक परवानगी घेऊ शकता ...............आपणास अकृषक परवानगी मिळाल्यावर आपण उद्योग सुरु करू शकता .

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

सर/मॅडम,
मी महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाने सध्‍या प्रसिध्‍द केलेल्‍या राज्‍यसेवा पूर्व परीक्षेस बसणेस इच्‍छुक आहे. माझी एक अशी शंका आहे की, आयोगाने नुकताच “महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाच्या यापुढे घेतल्‍या जाणा-या परीक्षेच्या कोणत्याही
टप्‍यावर मागासवगीर्यांना देय असलेली वय / परीक्षा शुल्‍क तसेच इतर पात्रता विषयक अटी / निकषांसंदभार्त
सवलत उमेदवारांने घेतली असल्‍यास अशा उमेदवारांची अमागास वगर्वारीच्या पदावर श्‍िाफारस करण्यात येणार
नाही” असा निणर्य घेण्यात आलेला आहे.
माझे वय सध्‍या 31 वर्षे असून मी मागासवर्गीय प्रवर्गातील आहे. समजा मी या प्रक्रियेमध्‍ये अमागास प्रवर्गास असलेले शुल्‍क भरून परीक्षा दिली व अंतिम टप्‍पयामध्‍ये माझे मेरिटमध्‍ये नाव आेपनमध्‍ये बसले नाही तर आयोग माझ्या नावाची शिफारस मागासवर्गीयांच्‍या यादीमध्‍ये करणार का
नाही

कृपया खालील निकालपत्र वाचा
Union of India Vs. Ramesh Ram & Ors. etc.

CIVIL APPEAL NOS.4310-4311 OF 2010
[Arising out of SLP (C) Nos.13571-72 of 2008]

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

कृपया परिपूर्ण व अचूक माहितीसाठी आयोगाकडे चौकशी करावी .

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

मृत्युपत्र मुत्युनंतर वारसांना कोर्टाकडून शाबित करुनच आणावे लागते काय? की ते डायरेक्ट तहसिलदार कार्यालयात पुढील नोंदीसाठी सादर केले जाते?
मुंबई या शहरात व्यक्ती( हिंदू, बुद्ध, सिख, जैन ) राहत असेल अथवा मिळकत असेल तर Probate आवश्यक
अन्य ठिकाणी आवश्यकता नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नोंदणीकृत असेल तर सरळ नोंदणीकरू शकतात पण ते करावेच असा आग्रह धरणे योग्य नाही ................पण कोर्टाकडून प्रोबेत आणल्यास उत्तम .

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

Question by atul ambhore
05-01-2015
ambhorea@gmail.com

पाणी परवाना देण्याचे अधिकार कोणाला आहेत

तहसिल कार्यालय कि जल सिंचन किंवा पाणी पुरवठा विभाग
पाणी स्त्रोत जर जलसंपदा विभाग अथवा लघु पाटबंधारे विभाग यांचे कडे अधिसूचित असेल तर त्या विभागाची परवानगी आवश्यक
जर स्त्रोत अधिसूचित नसेल मात्र शासकीय मालकीचा असेल व शेतीसाठी पाणी आवश्यक असेल तर , तर तहसीलदार यांची परवानगी घेणे आवश्यक
शेतीशिवाय अन्य कारणासाठी , शाश्नाची परवानगी आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

धरणातून परवानगी पहिजेअसेल तर ...........जलसिंचन विभाग

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

इनाम ६ ब ची जमीन निवासी झोनमध्ये आहे.0 .०६ आर आहे.विक्री परवानगी घेताना शेतकरी दाखला आवश्यक आहे का?
होय
कलम ६३ , म.क.व शे अ. १९४८ तरतुदी लागू होतात

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर ,६ ब इनामाची जमीन बांधकाम फर्म तर्फे भागीदार बिनशेतीसाठी घेत असेल तर त्याच्या स्वतःच्या नावे असलेला शेतकरी दाखला चालेल का? किंवा ६३ ची परवानगी घ्यावी लागेल?कृपया मार्गदर्शन करावे.
भागीदारी संस्था कायद्याचे भाषेत व्यक्ती नाही . त्यामुळे भागीदारी संस्थाचे नावे मिळकत घेत येत नाही .
भागीदारी संस्थातेतील भागीदार शेतकरी असेल तर , त्याचे नावे जमीन खरेदी करणे
भागीदार संस्था नोंदणी कृत करताना , दस्त बनवला जातो अथवा आपापसात करार केला जातो , त्या मध्ये , एखादे भागीदाराचे नावे मिळकत असल्यास , ती firm ची मिळकत असले बाबत उल्लेख करता येतो

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझ्या ऐका नातेवाईकाच्या विरोधात ग्रामपंचायत मध्ये त्यांच्या ऐका चुलत भावाने तक्रार अर्ज दिलेला आहे(माझ्या नातेवाईकाच्या वाट्याला आलेल्या जमिनीमध्ये सोच्याल्य बांधलेले आहे ) तर त्या तक्रार अर्जाची नकळ प्रत माहितीच्या आघीकाराखाली मागू शकतो काय तो अर्ज कोणाच्या नावे करावा .
माहितीचा अधिकार २००५ कलम ३ अन्वये , नागरिकांना माहितीचा अधिकार आहे . त्यामुळे आपण ती प्रत मागू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

तुमचा नातेवाईक नक्कल मागू शकतो ....................................

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

स्वतःच्या हिश्श्याच्या (वाटपानंतर मिळालेल्या) वडीलोपार्जित मालमत्तेचे मत्युपत्राद्वारे वाटप करता येते का?
हिंदू वारसा ( सुधारणा ) कायदा २००५ नंतर , वडिलोपार्जित व स्वकष्टार्जित मिळकत असा भेदभाव राहिलेला नाही .
मृत्यापात्राद्वारे वाटप करू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

होय. परंतु फक्त एकांगी मृत्युपत्र असल्यास ते वारसांकडून आव्हानित / रद्द होऊ शकते ....

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

क ड ई पत्रके व फेरफार नोंदी साधारण कोणत्या वर्षापासून ठेवल्या गेल्या? त्या कुठे प्राप्त होतील? याविषयी माहिती हवी आहे
पूर्वी क ड ई पत्रके ठेवायचे आता ठेवली जात नाहीत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझी व माझ्या भावाचे नावे ३० गुंठे जमीन आहे दोघांचा ८ अ वेगळा आहे पैकी माझ्या हिस्ष्याची १५ गुंठे जमीन माझ्या अडचणीसाठी विक्री केली आहे इतर हक्कात कोणतीही नोंद नाही.. आता भाऊ खरेदीला हरकत घेत आहे हे बरोबर आहे का
हिंदू वारसा कायदा १९५६ च्या कलम २२ प्रमाणे वंशापारांपारागत मिळकतीच्या विक्रीवेली , भावास खरेदी कार्याचा प्राधान्य हक्क आहे
मात्र जमीन मुल्य प्रचलित बाजारभावाने असणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर/मॅडम,
मी कोल्‍हापूर येथे शासकीय नोकरीत असून सध्‍या निलंबीत आहे. माझेवर माझ्या विभागाने विभागीय चौकशी सुरू केली असून मला चांगला व अनुभवी बचाब सहायकाची आवश्‍यकता आहे. मला महाराष्‍ट्रातील चांगल्‍या व अनुभवी बचाव सहायकाची नाव पत्‍ते व फोन नं. कळवावीत. ही विनंती.
आपण विभागीय चौकशी कार्यालयात चौकशी करा
तेथे बचाव सह्याकांची नावे मिळतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमचे नाव ७/१२ च्या कब्जेदार सादरी ३२म सिर्तीफिकॅतेद्वारे खरेदीखत होऊनpurvi दाखल झाले आहे.परंतु इतर हक्कातील पोक्लीस्त नवे कायम आहेत.काय करावे लागेल?जमीन ४३ ची आहे.
पोक्लीस्त नोंद काय आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by manish
28-12-2014
manish85@gmail.com

सन १९३० सालचे क ड ई पत्रक काढले त्यावर माझे खापर पणजोबा यांचे नाव हे विठल रुक्मिणी मंदिर आर्चक म्हणून दाखल होते ,त्यानंतर ते मयत झाले त्यांना ३ मुले होते त्या पैकी मोठा मुलगा म्हणून माझा पणजोबा यांचे नाव मोठा मुलगा म्हणून एकुक म्हणून नाव दाखल झाले नंतर त्यांनी आपले लहान २ भाऊ यांना व स्वताला सेक्सशन ८५ नुसार वाटप केले मग माझे आजोबा यांचे नाव दाखल झाले त्यानंतर त्यांनी पण सेक्सशन ८५ नुसार वाटप केले माझे चुलत आजोबा हे मयत झाले त्यांची पण वारस नोंद लागली त्यानंतर चुलत आजी वारली त्यांची पण वारस नोंद लागली त्यानंतर माझा चुलत काका व आत्या यांनी जाबजबाब देऊन नाव कमी केली आता माझा चुलत काका याचे नाव विठल रुक्मिणी मंदिर आर्चक म्हणून दाखलआहे.
माझे सख्ये आजोबा हे मयत झाले माझ्या काकांचे नाव दाखल झाले आता ते मयत झाले असून त्यांना पत्नी व मुलगी असून त्यांचे नाव वारसा हक्काने दाखल होईल का ?
आर्चन (पुजारी ) यांचे वारस लागतात का हो तर कसे ? नाही तरी कसे ?
देवस्थान इनाम बदल सविस्तर माहिती पाहिजे आहे ?
पुस्तक पण सांगा ?
वास्तविक देवस्थान इनाम जमीन हि देवाचे दिवा बतीची व्यवस्था करण्यासाठी एखद्याला कसण्यासाठी दिलेली असते . कसणार्याला वाहिवातदार संबोधतात . मात्र असा वाहिवातदार हा कायदेशीर मालक होत नाही
त्यामुळे वाहिवात्दाराचे वारसांची नवे लावणे चुकीचे आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर मल सावत्र आई आहे माझे वडीलाना शेतीचे पैसे मिळालेत ते आम्हाला मिळन्य साठी काय करावे लागेल ?
आपली शेती शाश्नाने संपादित केल्याने आपणास , नुकसान भरपाई मिळत असेल.
आपण भू संपादन अधिकारी यांचेशी संपर्क साधा.
मात्र हिंदू विवाह कायदा १९५५ , मधील तरतुदीचा विचार करता , आपला प्रश्न मला सविस्तर
kiranpanbude@gmail.com पाठवा अथवा 991711999 वर विचारा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर आमची जागा चुकून दुसर्या व्यक्तीच्या नावावर झाली आहे खरेदीपत्र तयार करायला किती खर्च येईल ..रत्नागिरी जिल्हा ,चिपळूण तालुका बामणोली किज्बिलेवाडी ,मीन रोड पासून आतमध्ये आहे.बिनशेती प्लॉट आहे.४ गुंठे
आपणास जुने खरेदी खात रद्द करून , नवीन खरेदी करावे लागेल .
दुरुस्ती करता येणार नाही
नोंदणी फी व मुन्द्रंक शुल्क भरावे लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.36 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3454
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3