जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Sanket Sutar
29-09-2020
mantramugdha73@gmail.com
महोदय सदरच्या राहत्या जागेवर आम्ही मागील ३५ वर्षांपासून पक्क्या घरात राहत आहोत. मागील ३५ वर्ष पासून घरपट्टी सुद्धा भारत आहोत. ह्या घराची जमीन माझ्या काकांच्या मुलांच्या नावे आहे. आता जागेच्या अभावी आम्ही आहे त्या घरावर एक मजला वाढवितो आहे तर काकांची मुले त्यास नकार देत आहेत. कि तुम्ही ह्या घरात काही बांधकाम करू शकत नाही. तर आम्ही काय करावे. कृपया सहकार्य करावे.
Question by Nayeem yakub shaikh
29-09-2020
weeklyshevgaonnagari@gmail.com
सर आम्हाला 2004 ला भूमिहीन शेतमजूर म्हणून जमीन मिळाली होती तर आम्हाला हस्तलिखित उतारा दिला पण सधार जमीन ही मूळ मालक का सीलिंग ची जमीन होती तहसीलदार साहेबांनी आदेशानुसार जमीन दिली आहे पण ज्या मूळ मालक यांनी न्यायालयात दावा दाखल केला आणि न्यायालया न तो आदेश रद्द करून ती जमीन सरकार जमा केली आहे आणि फेर आणि उतारा आमच्या नावाने मिळत आहे परंतु फेर हा मंजूर केला नाही तरी आम्हाला मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
Question by Anil Dhavale
29-09-2020
anildhavale@gmail.com
सर, माझा प्रश्न गटवारी संबंधित असून पुणे जिल्हह्यातील काही गावांमध्ये गटवारी झालेली नाही. या गावामध्ये जमिन मिळकतींना सर्वे नंबर आहेत म्हणून येथील जमिन विक्रीला तुकडेबंदीचा कायदा लागू होत नाही का ?
Question by सुमित शिवकुमार काकडे
28-09-2020
sumitkakde2018@gmail.com
नमस्कार सर माझे आजोबा इसवी सन 1952 पूर्वी पासून जमीन कसत होते. खासरा पत्रकात इतर हक्कात (कुळ काबीज आहे. वही ती करीत आहे) अशी नोंद आहे. इसवी सन 1977 पर्यंत इतर हक्कात संरक्षित कुळाचे नाव होते. त्यानंतर ते कमी करण्यात आले. नाव कमी कशाच्या आधारे केले आहे. याची काही नोंद असलेले (तहसील कार्यालय) कुळाचा घोषवारा, इत्यादी कागदपत्रे गहाळ आहेत. तरी कागदपत्र मिळवण्यासाठी काय करावे. याविषयी मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
आपण ७/१२ वरती काही क्रमांक कंसात किंवा वर्तुळात लिहले आहेत ते क्रमांक फेरफार क्रमांक आहेत . ते फेरफार आतापर्यंत ७/१२ सदरी जे मालकीहक्क बद्दल झाले आहेत , त्याचा इतिहास आहे . आहे फेरफार आपण तलाठी व तहसील कार्यालय येथेऊन प्राप्त करा . त्यावरून आपणास आपल्या आजोबांचे नाव कसे कमी झाले याची माहिती मिळेल .
कुल वहिवाट कायद्याच्या कलम ३२ अन्वये कृषक दिनी म्हणजे ०१.०४.१९५७ रोजी , कुल याने जमीन खरेदी केली असे मानले जाते . त्यामुळे आपल्या आजोबांचे नाव कायद्याने कमी होऊ शकत नाही . या बाबत जुने फेरफार काढून , ज्या फेर्फाराने अथवा आदेशाने आपले आजोबांचे नाव कमी झाले आहे त्या विरुद्ध अपील दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दीपक तुकाराम मगदूम
28-09-2020
dmagdum95@yahoo.com
गावठाण मधील घराची जागा रस्ता रुंदीकरण मध्ये जात आहे नुकसान भरपाई दावा कसा करावा
रस्ता रुंदीकरण ग्रामपंचायत मार्फत होत असेल तर , आपण गटविकास अधिकार यांचेकडे , ग्रामपंच्यात यांचेकडे हरकत दाखल करा .
जर रस्ता रुंदीकरण अन्य विभागामार्फत होत असेल तर , त्या विभाचे संपादन करणाऱ्या भू संपादन अधिकारी यांचेकडे हरकत दाखल करा .
आपणाला या बाबत काही नोटीस आली आहे का ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by महेश काकडे
28-09-2020
kakdems2016@gmail.com
नमस्कार सर माझे आजोबा इसवी सन 1952 पूर्वीपासून जमीन कसत होते. खासरा पत्रकात काबीज कूळ म्हणून उल्लेख आहे, वहीत करत आहे अशी नोंद आहे. ई.सन 1977 पर्यंतचा इतर हक्कात संरक्षित कुळ नाव होते. त्यानंतर ते कमी करण्यात आले. परंतु 1977 च्या 7/12 वर नाव कमी करण्यात आले आहे व त्यावर फेर न. असा उल्लेख आहे परंतू फेर क्रंमाक नाही.. नाव कमी कशाच्या आधारे करण्यात आले याचीही नोंद असलेले तहसील कार्यालयातील... संबंधित प्रकरणातील कोण कोणती कागदपत्रे काढावीत याचे कृपया मार्गदर्शन करावे... आणि काही कारणास्तव तहसिल कार्यालयात कागद पत्रे उपलब्ध नसतील तर ते कुठे मिळतील .. आणि कुळा संबंधित कोणकोणते कागदपत्रे उपयोगी पडतील... कृपया मार्गदर्शन करावे ही आपणास ... नम्र विनंती
Question by Rasika
27-09-2020
rasikamhatre0303@gmail.com
सुर्वे नंबर 35/1अ उतारा कुठे milel
Question by Gurudas laxman lambar
27-09-2020
gurudasblogger91222@gmail.com
sir ,mala kontihi takrar karaychi nasun ; mala maza eka shankech uttar pahije aahe ki, ekhada vyakti ekhadi jamin swatah anek varsh kasto aahe tyat pik gheto aahe pn jaminichya malakani ti jamin padik thevleli pn aaj aamhi jr tyanchya jaminit utpadan ghet asu tr ti jamin nakki konachya malkichi vhayla pahije? hi takrar nasun ek shanta aahe
Adverse Possession या न्याय तत्वाचा आधार घेऊन आपण ही मिळकत आपल्या ताब्यात असल्यामुळे, तिचे मालक म्हणून घोषित करणेबाबत दिवाणी न्यायालय The Specific Relief Act खाली दावा दाखल करू शकता. मात्र यासाठी खालील गोष्टींची पूर्तता होत असणे आवश्यक आहे.
जमिनीचा सतत व विना अडथला ताबा
जमीन मालकासोबत कोणताही करार नसताना , जमिनीचा ताबा असणे किंवा जमीन कसणे
जमिनीचा ताबा हा सर्वांना दिसणारा , खुला असणे .
जमिनीवर प्रत्यक्ष ताबा असणे , उदा जमीन कसणे , त्यावर सुधारणा करणे , घर बांधणे
केवळ एकट्याचाच ताबा असणे , अन्य कोणाचा नसणे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ganesh Mapari
25-09-2020
ganeshmapari23@gmail.com
मी अहमदनगर जिल्ह्यातील लोणी खुर्द गावातील रहिवाशी आहे. योगायोगाने आमची शेतजमीन गावाच्या शिवे वरती आहे. सदर च्या शिवे वर आमच्या शेजारी गावाचा रहिवाश्यांच्या क्षेत्र आहे आणि आमच्या दोघांच्या मधून अनेक पिढ्यापासून शिव रस्ता आहे. परंतु गेल्या आठवड्यात त्यांनी तो रस्ता खोदून बंद केला. त्यांना विचारले असता ते अरेरावीची उत्तरे देत आहेत. बोलतात की शिव रस्ता वैगेरे असे काही आमच्या सातबारा वर नोंद नाही. कोणाला सांगायचे ते सांगा. ह्यामुळे आमचे आमच्या शेतात जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. तसेच ह्याच रोड चा वापर पुढे काही वस्त्या पण करत होत्या, त्यांचा पण जाण्या येण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मी वर अजून काही लोकांनी राहाता तेहसिल कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला आहे, परंतु हे सगळे होई पर्यंत आमचा रस्ता बंद राहील, सध्या आमचे खरिफ पिके सोंगणी सुरू करायची आहे, त्यास अता व्यत्यय येणार आहेत. आम्ही भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन सादर शिव रस्त्याचे दस्तावेज मागण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले की आमच्याकडे रस्त्यांचे नकाशे नसतात. तरी कृपया या प्रकराबाबत योग्य तो सल्ला द्यावा व गाव शिव रस्त्या चे नोंदी वा नकाशे कुठे मिळतील याबद्दल मार्गदर्शन करावे.
गणेशराव
चिंता नसावी . आपण आपले तहसीलदार महोदय यांचेकडे माम्लेतदार कोर्ट कायद्याखाली अर्ज करा . त्यांना आपली निकड पटवून द्या . तात्पुरता हुकुम देण्याचा कायद्यात तरतूद आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by कुलकर्णी ब्रह्मानंद
24-09-2020
kbrmha02@gmail.com
मी ब्रह्मानंद कुलकर्णी मु.पो.परचंडा येथील असुन माझ्या शेती मधुन रोड गेलेला आहे आता त्या रोडचे रुंदीकरण झाले आहे त्यानंतर त्या रोडवर अनधिकृत अतिक्रमण करुन दुकाने उभी राहीली आहेत ती दुकाने हटविण्यासाठी मला काय करावे लागेल ??
Question by सचिन पराते
24-09-2020
Sachin.my passion@Gmail.com
सर नगर परिषद हदितील ग्रीन झोन मधील शेत जमीन कलम ४२/ड मधून अकृशक होते का ? होत असल्यास अर्ज कोणाला सादर करावा , कसा करावा या संबंधी माहिती द्यावी हीच विनंती
पराते साहेब
४२ ड ची तरतुदीनुसार , गावठाणा पासून २०० म च्या आतील सर्व मिळकती त्या जमिनीच्या मालकाच्या इच्चेनुसार बिन शेती झाल्याचे मानीव तरतूद आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by आदेश प्रभाकर लांजेकर
23-09-2020
adeshlanjekar1998@gmail.com
नमस्कार सर,
आमच्या घराची 'अ' व 'ब' घरपट्टी केलेली होती त्यापैकी 'अ ' घरपट्टी भरत नसल्याने मुले 2012 नगरपंचायत झाल्यावर ती रद्द झालेली आहे.. तर ती मला पुन्हा सुरू करायची आहे त्यासाठी काय काय करावे लागेल याची माहिती द्यावी.. 'अ' घरपट्टीचा केवळ चहूतरा बांधलेला आहे...
Question by Jadhav subham
23-09-2020
Jadhavsubham@gmail.com
सर, वर्ग 2 च्या जमिनीचे मृत्यूपत्र करता येते का?
Question by Nitin dhum
23-09-2020
Nitindhum@gmail.com
सर मी आदिवासी खातेदार आहे, मी रजिस्टर दस्ताने जमीन खरेदी केली आहे पण तलाठी सांगतात इतर हक्कात 1966 चे 36 व 36 ला अधीन अशी नोंद टाकावी लागेल, पण माझी स्वतःची मिळकत आहे तर इतर हक्कात नोंद का? आणि मला तोंडीं सांगतात नोंद करण्याची काही पद्धत असेल तर plz सांगा आणि नोंद झाली तर मला जमीन विकता येणार नाही
नितीनराव , हि तरतूद कायद्यानुसार ठेवायचीच आहे . त्याला पर्याय नाही . ती आपल्या फायद्यासाठी आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sanjay koli
23-09-2020
sanjaypkoli1996@gmail.com
कोर्टात अपील चालू असताना बांधकाम करत असतील तर याबाबत कोणाकडे तक्रार करावी.
करत असलेल्या बांधकामास त्याने परवानगी घेतली असेल तर केवळ हि बाब आपण न्यायालायचे निदर्शनास अनु शकता . न्यायालय प्रकरण गुणवत्तेच्या आधारे मनाई हुकुम देऊ शकेल . परवानगी नसेल तर , नियोजन प्राधिकारी यांचे कडे तक्रार करा
नियोजन प्राधिकर -
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sayeed Abdul Ajij Pirjade
22-09-2020
sayeedpirjade9922@gmail.com
Wakf property( shet jamin) var varas nond karta yete ka ?
Question by शितल
22-09-2020
shitalwaghmare4491@gmail.com
तहसीलदार यांच्या कडून वारस नोंदणी ची प्रकिया कशी करावी या बद्दल माहिती पाहिजे
वारस तपास व नोंदणी हे तलाठी व मंडळ अधिकारी यांचे मार्फ्फात होते . तक्रार झाली तरच , प्रकरण तहसीलदार यांचेकडे जाते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by NIKHIL ZAMBRE
22-09-2020
nikhil.zmabre06@gmail.com
नमस्कार
आमचे वडिलांचे नावे काही जमीन आहे ज्याच्या सातबारा उताऱ्यावर आम्हा तीन भावांचे नाव लागलेले आहेत. आता आम्हाला खातेफोड करून जमीन आपल्या आपल्या नावावर करणे आहे. तर यासंबंधी ची प्रक्रिया आणि शुल्क किती असेल यासंबंधीची सविस्तर माहिती हवी आहे. जमिनीच्या संबंधित सगळे कर भरलेले असल्यास किती शुल्क भरावा लागेल हे कळावे.
धन्यवाद.
आपल्या तिघांची नावे जर सातबारा ला असतील व वाटणीसाठी जर कोणाची काही हरकत नसेल तर आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये आपल्या तालुक्याच्या तहसीलदार यांच्याकडे अर्ज करू शकता. अर्जासाठी जी काही दहा ते वीस रुपये इतकी आहे तेवढीच आपणाला भरावे लागेल. अन्य कोणताही त्यासाठी खर्च नाही.
तहसीलदार यांनी हिस्सा वाटप केल्यानंतर, स्वतंत्र सातबारा करण्यासाठी आपणाला उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे सरस निरस वाटप कार्यवाही करावी लागेल. सरस निरस वाटप झाल्यावर त्याची प्रत्यक्ष मोजणी केली जाते. या मोजणीसाठी चे शुल्क मात्र आपणाला भुमिअभिलेख खात्याकडे जमा करावे लागेल. सरस निरस वाटप झाल्यानंतर त्याच्या आधारे आकारफोड पत्रक तयार केले जाईल व प्रत्येक च्या हिस्सायला स्वतंत्र पोट हिस्सा नंबर दिला जाईल.
मात्र जर या वाटपामुळे तुकडे बंदी तुकडे जोड या कायद्याचा भंग होत असेल व प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र आपणा तीन भावाकडे राहत असेल किंवा कोणा एकाकडे राहत अईल , तर मात्र त्याचे वाटप करता येणार नाही.
त्या जमिनीची अशा पद्धतीने वाटप केले जाईल की प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र निर्माण होणार नाही मात्र असे होत असेल तर एका भावाला किंवा दोन भावांना मध्ये जमिनीचे वाटप केले जाईल व ज्या भावाला जमीन देता येणार नाही किंवा जो जमीन इतरांना देण्यास तयार होईल त्याला त्याच्या बदल्यात त्या जमिनीची नुकसानभरपाईची ज्यांना जमीन मिळत आहे त्यांना द्यावी लागेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by VINOD PATIL-GAVADE
22-09-2020
ovi20122016@gmail.com
आम्ही 1995 ला 32 ग ची जमीन 50रु च्या स्टॅपपेपर वर खरेदी केली व घर बांधले.1996 पासुन आम्ही सर्व ग्रामपंचायत कर भरतो आहे.25वर्षाने मुळ मालक आता वाद करत आहे.फसवुन जमीन घेतला म्हणतात.कायदेशीर कार्यवाही करतो असे बोलतो.तर आम्ही कायदेशीर होईन का.
काहीही मार्ग नाही . आता घर बांधले आहे . त्यामुळे त्याला काही रक्कम देऊन प्रकरण मिटवून टाकणे व रीतसर खरेदी खात करून घेणे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kunal kolhe
21-09-2020
amolhole777@gmail.com
मी कुणाल
माझी आई १९९५ ला मयत झाली व वडिलांनी दुसरे लग्न केले , वडिलांच्या नावावर (वडिलोपार्जित) ५ एकर होती तसेच माझ्या आईच्या नावे १ घर आहे (स्वकष्टचे ) माझ्या वडिलांनी मला न सांगता त्यांनी पूर्ण जमीन सावत्र आईच्या नावावर बक्षीस पत्र २०१९ ला केली आहे तसेच घरावर वारस नोंद केली आहे
प्रश्न - मला जिमिनीत तसेच घरामध्ये माझा हिस्सा मिळेल का व काय करावे लागेल
Question by बिरुदेव महादेव दाईगडे
21-09-2020
dbirudev@gmail.com
सर १९४६ साली करण्यात आलेल्या दस्त ची मूळ प्रत कोणत्या ठिकाणी अर्ज करून प्राप्त करता येईल .
Question by RAMESH REJENDRA SONAR
18-09-2020
rameshrs2010@gmail.com
सर, माझा वडिलांनी स्वतचा मालकीचा एन. ए. प्लॉट वर जळगाव मनपा नगररचना विभागाची परवानगी न घेता घराचे बांधकाम आठ वर्षापूर्वी केले आहे तसेच आठ वर्षांपासून सदर घराची मनपा घरपट्टी व पाणीपट्टी ही नियमित भरीत आहे तरी आता सदर घर बांधकामाची नगररचना विभाग मनपा परवानगी व भोगवटा परवानगी घेता येईल का व कशाप्रकारे सविस्तर माहिती द्यावी ही विनंती
Question by कुणाल अंकुश जाधव
18-09-2020
mr.k1387@gmail.com
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे "कलम 36 व 36 अ" ला पात्र जमिनीचे 7/12 उताऱ्यावर सहकारी पतसंस्था यांचेकडील थकबाकीच्या बोजाची नोंद घेता येईल का ?
Question by Nilesh Gophane
17-09-2020
nileshgophane1992@gmail.com
सर,
माझा प्रश्न असा आहे की, नवीन बांधकाम करताना कोणाची परवानगी आवश्यक आहे. आणि जर परवानगी नसेल आणि कोणी बांधकाम करत असेल तर त्या बांधकामास स्तगीती कशी देता येइल.
बांधकामाबाबत च्या तरतुदी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना कायदा 1965 व त्या अंतर्गत तयार करण्यात आलेली बांधकाम नियमावली व प्रादेशिक योजना यामध्ये आढळून येतात. जर गावठाणा मध्ये बांधकाम असेल तर संबंधित ग्रामपंचायतीची उपरोक्त कायद्यान्वये परवानगीची आवश्यकता आहे.
जर बांधकाम हे नगरपालिका हद्दीत असे संबंधित नगरपालिकेची परवानगी आवश्यक आहे त्याचप्रमाणे जर बांधकाम महानगरपालिका क्षेत्रात असेल तर संबंधित महानगरपालिकेची परवानगी आवश्यक आहे. याव्यतिरिक्त जर विशेष नगरी योजनेमध्ये जर बांधकामाचे उदाहरणार्थ सिडको, म्हाडा किंवा एमआयडीसी , रिया नियोजन प्राधिकरणाची ते परवानगी लागेल.
याव्यतिरिक्त जर गावठाणा बाहेर सर्वे नंबर वर बांधकाम असेल तर त्यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी लागेल.
जर बांधकामासाठी परवानगी घेतलेली नसेल तर त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1965 च्या कलम 52 व 53 कारवाई व कार्यवाही करण्याचे अधिकार संबंधित नियोजन प्राधिकारी यांना आहेत.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मिनहाज मुख्तार शेख
15-09-2020
shaikhminhaj786@gmail.com
अपंग व्यक्ती अधिनियम 1995 मधील तरतुदींनुसार अंध व अपंग व्यक्तींना त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी व अभिमानाने जीवन जगण्यासाठी सवलतीच्या दराने जमीन देण्यात येते का नाही
होय
अपंग व्यक्तींना महारष्ट्र जमीन महसूल अधिनियम व त्या अंतर्गत असलेल्या नियमन अतर्गत दिली जाते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
होय
अपंग व्यक्तींना महारष्ट्र जमीन महसूल अधिनियम व त्या अंतर्गत असलेल्या नियमन अतर्गत दिली जाते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3400 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
