जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by शीतल जाधव
15-04-2020
jadhavdineesh@gmail.com
मी सौ.शीतल जाधव. माझ्या आजोबांच्या (आईचे वडील) नावे मोशी, पिंपरी चिंचवडमध्ये, निवासी क्षेत्रात जमीन आहे. सदर जमीन माझ्या पणजोबा (आईचे आजोबा) यांनी आजोबांच्या नावे केली होती. आता माझी आई ह्यात नाही परंतु आजोबा ह्यात आहेत.सदर जमीन सात-बाऱ्या वर माझे नाव लावू शकते का ? असेल तर त्यासाठी खर्च जास्त आहे का ?
कृपया मार्गदर्शन करावे.
Question by सागर
14-04-2020
sagarkandekar1990@gmail.com
गाव नकाशा प्रमाणे माझ्या मालकीचा गट न.२४४ असून त्यालाच लागून शेजारील व्यक्ती चा गट न.236 आहे.ह्या दोन्ही गटाच्या मध्ये पाणी जाण्यासाठी बरेच वर्षा पासूनचा 10 ते 12 फूट रुंद नाला आहे पण त्याचा उल्लेख रेकॉर्ड मध्ये नाही.आत्ता ह्या जागेतून इतर शेजारील व्यक्ती पावसाळा सोडून इतर हंगामा मध्ये ये जा करत असतात ..
१.तर भविष्यात जा ये करणारे लोक ह्या जागेचा रस्ता म्हणून मागणी तहसीलदार यांच्या कडे करू शकतील का?
२.वाहणाऱ्या पाण्याच्या जागेला तहसीलदार रस्ता म्हणून देऊ शकतील का?
२.तसेच आम्ही शासकीय मोजणी करून आमची हद्द कायम करून सदर सोलडलेली जागा ताब्यात घेऊन नंतर ती बीजवून शेती करू शकतो का?
Question by Vishal sabale
13-04-2020
Vsable@dyahoo.com
नमस्कार साहेब,1) माझा प्रश्न असा आहे की पहिल्यांदा म्हणजे सन 2007 पूर्वी जिरायत शेतजमिनीचा तुकडा विकण्यासाठी जसे की 4 किंवा 5 गुंठे वर्ग 1 जिरायत शेतजमिन विक्री करण्यासाठी जमिन विक्रेत्याने तहसिलदारांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक होते काय ?
2) जिल्हाच्या प्रादेशिक आराखडा बघितला असता त्यात नगरपंचायत हद्दीचा कोणताही भाग शेती विभागात दाखवला नाही आणि नगरपंचायत विकास आराखडा प्रसिद्ध झाला नाही मग नगरपंचायत हद्दीतील माझी जमिन नक्की कोणत्या झोन मध्ये येते याचा शोध कसा घ्यावा ?
Question by रामनाथ सोनवणे
12-04-2020
sssgunjal@gmail.com
नमस्कार सर,
मी व माझा मोठा भाऊ आमची दोघांची ५ बिघे जमीन असून ती समहिक आहे. सातबाऱ्यावर दोघांचे नाव असून त्यापुढे समाहिक क्षेत्र असे नमूद आहे. पण तो मला माझ्या हिष्याची जमीन वाटून देत नाही, तसेच तो मोठा असल्यामुळे शेतीसाठी येणारे सर्व अनुदान व सुखसुविधा तोच घेतो, अगदी मला माझी जमीन सुधा वाटून देत नाही, वाटप पत्र करून देत नाही...वाटप पत्र करून मागितले की शिवीगाळ करतो...मला असे वाटते की शेतीसाठी येणाऱ्या अनुदानाचा मला पण लाभ मिळवा, अन्यथा ते अनुदान शासनाकडे परत जावे. कमीत कमी मला माझ्या हिष्यची जमीन तरी वाटून मिळावी, यासाठी मला काय करता येईल यासाठी कृपया तुम्ही मला सल्ला द्यावा ही नम्र विनंती....
Question by Ajinkya Durgule
10-04-2020
ajinkyadurgule5067@gmail.com
Sir , aamhi jamin 2000 year la kharedi keli aahe , aamachya satbara utaryavar upvibhagiya adhikari ghuntewari bigarsheti aadesh nond & no. lihila aahe tar ti jaminichi NA order zali asel ki nahi & asel tar kay tyachi prat konatya office madhun ghyayachi bank loan la problem yet aahe tar kay karave
Question by सागर
10-04-2020
sagarkandekar1990@gmail.com
आदरणीय सर ,
गुरेंचरण जमिनीच्या सातबारा उताराच्या इतर हक्कात काही शेरा , किंवा काही जूनी + नवी शर्त असते का? तसेच भोगवटदार वर्ग काय असतो?
जमीन ही गुरेंचारण्या ची आहे किंवा होती हे कसे समजते ?
शासनाचे गुरेंचारण जमिनी बद्द्ल काही अध्यादेक आहे का?
Question by पंकज कागणे
09-04-2020
pankajkagane@gmail.com
शासकीय सेवकास प्लॉट खरेदी करावयाचा असल्यास त्याआधी याबाबतची माहिती कार्यालय प्रमुखास लेखी कळविणे आवश्यक आहे का सर या बाबत योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती.
Question by पंकज कागणे
09-04-2020
pankajkagane@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे की, एखादा लिपीक मागील 5 वर्षांपासून भ्रष्टाचाराचे आरोपाखाली निलंबीत आहे त्यांचेवर फोजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांची विभागीय चौकशी पूर्ण झाली आहे. त्यांच्यावरील सर्व दोषारोप सिद्ध झाले आहे सदर प्रकरण न्यायालयात न्याय प्रविष्ट असल्याने शिक्षेचा आदेश पारीत करण्यात आलेला नाही. आता सदर कर्मचारी यांना लिपीक पदावर शासन सेवेत पुनरस्थापित करण्यात आले आहे तर सदर कर्मचारी यांना पदोन्नती देता येते का सर कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
Question by विजय रा पोवळे
08-04-2020
powalevijay@gmail.com
सर,माझा प्रश्न असा आहे की माझ्या आईला भाऊ नाही पण वडिलोपार्जित जमिनीत आईच्या चुलत चुळत्याची नावं 7/12 वर माझ्या आजीच्याअज्ञानपणामुळे ती नावं चढली आहेत .ती नावे काढावयाची आहेत कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती .धन्यवाद.
Question by संजय हंडे
05-04-2020
sanjhande@gmail.com
सर ,मंडळ अधिकारी यांनी विनाकारण फेरफार रद्द करीत असल्यास किवा onlain आलेला फेरफार रद्द केल्यास दाद कोणाकडे मागावी .
महसूल अधि. मध्ये शिक्षेची काही तरतूद आहे का.
Question by सौ. सुशीला दि. पाटील
03-04-2020
dilipp7372@gmail.com
सप्रेम नमस्कार. आदरणीय , मी दिनांक 06/03/2020 रोजी शेती खरेदी खत केले असून त्याची खरेदी तारीख 30/04/2020 आहे. सध्या कोरोना आजाराची संसर्ग आपत्ती असून संपूर्ण देशात जिल्हा बंदी आहे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प आहेत. अस्या परिस्थिती मध्ये मी ठाणे जिल्हातुन भुसावळ पर्यंत प्रवास करू शकत नाही. खरेदी च्या दिवसा आधी किंवा दिवसा पर्यंत सदर परिस्थिती अशीच राहिल्यास , खरेदीदार उपस्थित न राहता खरेदी व्यवहार पूर्ण करता येणार का ? खरेदी खतातील नोंदणी नमूद रक्कम बँकेत सदर व्यक्तीच्या खात्यात टाकता येईल का ? सदर खरेदी तारीख पुढे करता येणार का ? खरेदी खत मूळ प्रत गावी आहे. परंतु खरेदीदार साठी लागणारे मूळ ओळख पत्र माझ्याकडेच आहेत. सदर परिस्थिती बद्दल शासकीय निर्णय व योग्य माहिती बद्दल मार्गदर्शन व्हावं .
Question by Amol Damdhar
02-04-2020
amoldamdhar111@gmail.com
मा.साहेब माझ्या वडिलांचा २०१६मध्ये निधन झाले. त्यानंतर आम्ही वरसाची नोंद करून घेतली,परंतु त्या मधील नावांच्या समोर सामाईक क्षेत्र असे लिहून येत आहे.आम्हाला प्रत्येक नावासमोर वेगळं वेगळं क्षेत्र करायचे आहे.
त्यासाठी काय करावे मार्गदर्शन द्यावे.
Question by निलेश पाटील
02-04-2020
nileshpatil23683@gmail.com
Hi sir, my land has been edited in the bank water of the dam while the land is shared and we have 3 hawkers. One shareholder is brother and another is foreigner. If we get compensation, how can we allocate it because the alien is completely dependent on his land. The grass is grassy and when surveyed, there is nothing in his field, his land on the south side is recorded as padiq and both of our brothers have trees registered on the north side. What should he do if he asks for a share in the fruit tree?
Question by दीपक
29-03-2020
xyzxyz08625@gmail.com
आपण खुप छान माहीत देता त्या बद्दल आपला सर्वांचे आभार। माननीय श्री किरण पानबूडे सर
सर मी गुठेवारी प्लाट मधे दिनांक 29/08/2019 एक गुँथा विकत घेतला ।माहिति अभवाने । खरेदी खत झले वर काही दिवसांनी सदर 7/12 वर इतर हक्कत कू.का.84 क स पात्र असा शेरा दिसला। तलाठी यांचेकडे फेरफार साठी अर्ज केला आहे पन तो प्रलबलित आहे। आता मला 7/12 मधे इतर हक्कत कू.का.84 क माझे पुरते कमी करायचे आहे। किवा काय करावे लागेल याचे मला कल्पना सुधा नाही आहे। प्लीज सर मला मार्गदर्शन दया सर। प्लीज
Question by राहुल भोसले
27-03-2020
rahulbeed272@gmail.com
तुकडे बंदी कायदा मध्ये बीड जिलहयात किती गुंठे शेत जमीनीस(जिरायत) ख्रेदी परवानगी मिळते.
Question by राहुल भोसले
27-03-2020
rahulbeed272@gmail.com
म.जमीन महसूल संहिता 1966 कलम 42 अ,ब,क,ड विषयी मार्गदर्शन करावे
Question by Pooja jagadeo ade
27-03-2020
adepooja2001@gmail.com
Kul kaydyat mazya ajobala 1 shet milal hot. Tr te shet tyanich parat hiskun dusryana vikun takal . Tr tya shetachi kahi mahiti bhetu shakel ka v ti kashi .
Kul kaydyacha record kuthe mnje kuthlya office la bhetu shaknar. Yachi mahiti krapaya email dware pathva. Dhanyavad sir.
Question by Sharad handgar
26-03-2020
sharadhandgar@gmail.com
माझे आजोबा यांनी 1964 ला नोंदणीकृत दस्त करून खरेदीखत केले आहे.परंतु आजोबा अशिक्षित असल्याकारणाने त्याकाळी त्यांनी सदर दस्त नोंद केली नाही .त्या नंतर सदर दस्त त्यांचे कडून गहाळ झाला होता परंतु आम्ही घर दुरुस्ती करत असताणी सदर दस्त आम्हाला मिळून आला आहे. सदर दस्त वरून त्या गटाचे 7/12 व 8 अ उतारा पाहिले असता आजोबांची कोठेही नोंद नाही . आजोबा हयात नाहीत.खरेदीखत करून देणार यांनी सदर क्षेत्र हे 1966 ला सर्व दुसऱ्याला विकले आहे. सदर गटातील अर्धे क्षेत्र आजोबांनी खरेदीखत करून विकत घेतले होते.आता सदर दस्त नोंदणी करीता कोणाकडे द्यावा आणि 7/12 वर नोंद होणे करीता मार्गदर्शन व्हावे
Question by गारपगारे गोरक्ष मच्छींद्र
25-03-2020
ggarapgare@gmail.com
माझ्या पणजोबांनी 1969 रोजी आमच्या भावकीतील जग्गनाथ एकनाथ गारपगारे याच्याकडून 3रु स्टप वरती पैसे देउन जागा लिहुन घेतली पण तलाठी व ग्रांमपचायत कडे नाव कमी करुन आमचे नाव चुक भूलीना लावले गेले नाही पण ताबा आज पर्यत आमच्याकडे आहे आज रोजी लिहुन देणारे व लिहुन घेणारे जिंवत नाही लिहुन देणार्याचे वारस हक्क दाखवतात कारण जागेचा उतारा त्याच्या नावे निघतो तर आता आम्ही काय करावे आमच्या कडे 3रु स्टॅप आहे जो जागेबाबत लिहुन दिला होता
Question by Sachin devidas shelke
24-03-2020
Sachinshelke754@gmail.com
Sir.,amhala 25 warsha agodar grampanchayat celling kayadyat plot milala ahe... Tya jagecha patta kasa milel Ani kagadpatra kuthe pathawawe lagtil please sanga
Question by पंकज कागणे
16-03-2020
pankajkagane@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे की, बोरवेल खोदण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागते याबाबत मार्गदर्शन करावे.
बोरवेल खोदण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही . तथापि महाराष्ट्र भूजल ( विकास आणि व्यवस्थापन ) कायदा २००९ नुसार , जिल्हा प्राधिकरणाने घोषित केलेल्या सार्वजनिक पिण्याचे पाणी ठिकाणापासून ५०० मीटर आंतरचे आत तसेच जिल्हा प्राधिकरणाने घोषित भू जल शोषण क्षेत्र या मध्ये बोरवेल खोदकाम करता येत नाही .
जिल्हा प्राधिकरण म्हणजे तहसीलदार होत .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
बोरवेल खोदण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही . तथापि महाराष्ट्र भूजल ( विकास आणि व्यवस्थापन ) कायदा २००९ नुसार , जिल्हा प्राधिकरणाने घोषित केलेल्या सार्वजनिक पिण्याचे पाणी ठिकाणापासून ५०० मीटर आंतरचे आत तसेच जिल्हा प्राधिकरणाने घोषित भू जल शोषण क्षेत्र या मध्ये बोरवेल खोदकाम करता येत नाही .
जिल्हा प्राधिकरण म्हणजे तहसीलदार होत .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पंकज कागणे
16-03-2020
pankajkagane@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे की, नवीन प्लॉट वर घराचे बांधकाम करावयाचे असल्यास कोणाची परवानगी घ्यावी लागते याबाबत मार्गदर्शन करावे.
जागा ज्या नियोजन प्राधिकरणाच्या अखत्यारीत येते त्या नियोजन प्राधिकरणाची परवानगी आवश्यक आहे .
नियोजन प्राधिकरण
महानगर पालिका - महानगर पालिका क्षेत्र
नगर पालिका - अ, ब व क वर्ग नगर पालिका
ग्रामीण भागातील गावठाण क्षेत्र - संबंधित ग्राम पंचायत
ग्रामीण भाग ( सर्वे नुंबर क्षेत्र ) - जिल्हाधिकारी
या शिवाय विशेष प्राधिकरणे - सिडको - नवी मुंबई क्षेत्र , MSRDC
काही ठिकाणी - जिल्हा परिषद
आपली जागा कोणत्या क्षेत्रात येते त्यावरून आपण ठरवा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by किशोर सोनटक्के
15-03-2020
Kishorsontakke 78@gmail.com
सर नमस्कार,
सर जर एखाद्या शेत NAP 34 नुसार मंजूर (अभिण्यासानुसार)लेआऊटअकृषक झालेले असेल व त्यातील प्लॉट विक्री झालेले असतील अश्या परिस्तिथीत 5 आर,जमीनीचा 45 वर्षे आधीचा रजिस्टर्ड मोबदला लेख दाखवून तहसीलदार यांचे आदेशाने सदर अभिण्यासाप्रमाणे मंजूर झालेले लेआऊट रद्द करून दावा दाखल केलेल्या व्यक्ती च्या नावावर 5 आर जमिनीचा 7/12तयार होऊ शकतो काय?
आमचे संस्थेने 2008 मध्ये रजिस्टर्ड खताने सर्व्हे नं9/4 मधील लेआऊट मधील अकृषक झालेला प्लॉट विकत घेतलेला आहे. त्यावेळच्या परिस्थिती नुसार आमच्या प्लॉट समोरील भागात लेआऊट मधील12 मीटर रुंदीचा रास्ता होता व त्या रस्त्याला अप्रोच सर्व्हे नंबर 9/5 चा12 मीटर रुंदीचा सर्व्हिस रोड होता.
परंतु क्ष व्यक्तीने 1968 सालचा मोबदला लेख मा तहसीलदार यांचे कडे 2010 मध्ये दाखल करून सदर सर्व्हे नंबर9/5 वरील 5 आर जमिनीवर आपला हक्क दाखविला तत्कालीन मा.तहसीलदार यांनी सदर सर्व्हे नंबर 9/5 वरील मंजूर अभिण्यासाप्रमाणे झालेले लेआऊट रद्द करून पुन्हा सर्व्हे नंबर 9/5 चा कृषक 7/12 तय्यार केला व त्या सर्व्हे नंबर मधील 5आर जमिनीचा वेगळा करून क्ष व्यक्तीचा नावावर केला आहे आमचे संस्थेने मा विभागीय अधिकारी यांचे कडे सदर प्रकरणाची माहिती घेतल्यावर त्यांनी आम्हास सदर 5 आर जमिनीचा वेगळा 7/12 असल्यामुळे आमची अपील फेटाळून लावली आहे.
आमचे संस्थेने 2008 मध्ये घेतलेला प्लॉट हा सदर 12 मीटर रुंदीचा सर्व्हिस रास्ता पाहूनच घातलेला आहे परंतु आता त्या 5 आर जमिनीची सदर क्ष व्यक्तीच्या वारसांनी विक्री केली व विकत घेणारे लोक तिथे कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता सदर 5 आर क्षेत्रावर अवैध बांधकाम सुरू केलेले आहे.
सदर बांधकामाची तक्रार नगरपालिका, तहसील येथे करून सुद्धा 5 आर जमीन खरेदी करणारे लोक बांधकाम सुरूच ठेवलेले आहे.
आम्हास कृपया लवकरात लवकर मार्गदर्शन करावे.
वास्तविक तहसीलदार यांना Lay Out रद्द करण्याचा अधिकार नाही . हे अधिकार जिल्हाधिकारी यांचे आहेत . फार तर जिल्हाधिकारी हे अधिकार प्रांत अधिकारी यांना देऊ शकतात . त्यामुळे तहसीलदार यांना रेखांकन रद्द करण्याचा अधिकार नाही . तसेच या विरुद्ध अपील संचालक नगर रचना यांचे कडे आहे . आपण संचालक नगर रचना यांचे कडे अपील करा .
अनधिकृत बांधकामाबत नियोजन प्राधिकारी जिल्हाधिकारी/प्रांत अधिकारी ( जागा प्रादेशिक योजना लागू असलेल्या क्षेत्रातील असेल तर ) यांचे कडे आपण तक्रार दाखल करू शकतात .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sagar
13-03-2020
sagarkandekar1990@gmail.com
आदरणीय किरण सर , मी आपणास खलील प्रश्न विचारला होता.
प्रश्न - आमच्या आजोबांनी सन 1984 मध्ये 3 एकर गुरे चरण जमीन खरेदी केली होती , & खरेदीखत व फेरफार नोंद आहे.नंतर 1994 साली आजोबा मयत झाले आणि माझे वडील , काका व आत्या असे एकूण 7 जने वारस म्हणून लागले अशी फेरफार नोंद आहे.सन 1996 साली एका त्रयस्थ व्यक्तीने आमच्या ह्या सात जणांचे नावे खोट्या साह्य करून स्वतःला संबंधित जमीन विकण्याचा अधिकार आहे असे नॉटरी कुल मुखत्यारपत्र करून घेतले व नंतर त्याच कुल मुखत्यारपत्र आधारे त्याने एका इतर व्यक्तीस नोंदणीकृत खरेदी खत करून ति जमीन 1996 विकून टाकली. ह्या खरेदी ची नोंद असून खरेदी घेणार यांचे नाव सात बारा सदरी लागले आहे.
सदर शेती ही आम्ही राहत असलेल्या गाव सोडून दुसरीकडे असल्याने आम्हाला या जमिनीचे माहिती नव्हती.आम्हला या वर्षी याची माहिती मिळाली व अत्ता त्या जमिनी वर सिटी सर्व्ह होउन प्लॉट पडले आहेत.
1.तर आज 23 वर्षांनी आम्ही आमची जमिन परत मिळावी या साठी दावा कोर्टात करू शकतो का?
2.आणि दावा टाकून जमीन आम्हास मिळेल का?.
त्याचे आपण दिलेले उत्तर -
एकतर गुरुचरण जमीन आपण खरेदी कशी केली व फेरफार नोंद मंजूर कशी झाली ? गुरुचरण जमीन हि शाशनानें गावातील गुरांना चारण्यासाठी दिलेली असते . ती जमीन शासकीय आहे . त्यामुळे अश्या जमिनीची खरेदी विक्री होऊ शकत नाही .
आपल्या म्हणण्यानुसार खोट्या कुल मुखत्यापत्राद्वारे जमिनीची विक्री झाली आहे . कुल मुखत्या पत्र खोटे आहे हे आपणास सिद्ध करावे लागेल त्यासाठी फौजदारी नायायालयात दावा दाखल करावा लागेल .
मात्र आपणास जमीन मिळणार नाही . मात्र ज्या व्यक्तीने खोटे विक्री खत केले त्याचे कडून आपणास जमिनीची किंमत , व्याजासह मिळू शकते . आपण आपले चीक वकील यांचा सल्ला घेऊन , पुढील कायदेशीर कारवाई/ कार्यवाही सुरु करू शकता.
त्याला अनुसरून च एक प्रश्न -
आपल्या माहिती नुसार मी काही वकीलाशी बोललो ,त्याचे मते limitation act नुसार आपली दावा करण्याची मुदत संपली आहे तर खरच limitation act नुसार आमचा दावा करण्याची मुदत संपली आहे.??? मार्गदर्शन करावे.
मी माझ्या वरील उत्तरात सुधारणा करतो . वास्तविक गुरुचरण जागा आपण खरेदी केली ती प्रक्रिया चुकीची आहे .आपली फसवणूक केली म्हणून आपणास नुकसान भरपाई मिळू शकते . मात्र जमिनीची किंमत व त्यावरील व्याज मिळणार नाही .
फसवणूक झाल्यापासून कालावधी खूप झालेला आहे .मात्र न्यायालयाने वाजवी कारणासाठी झालेला विलंब माफ करू शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राहुल शेट्ये
11-03-2020
Shetye.rahul12@gmail.com
वडिलोपाजीत जमिनीवार सह हिस्से दार म्हणून अर्ज केला आहे पन हिंतसंबताने हरकत घेतली आहे पन 4 महिने झाले मंडळधिकारी सुनावणी चालु आहे पन पन अजु निकाल लावला नाहि आहे काय कराव लागेला ok
ज्या जमिनीमध्ये मालकी हक्काबाबत वाद नसेल अश्या जमिनीचे वाटप कलम ८५ खाली तहसीलदार यांचे कडे होते . हरकत संबंधित व्यक्तीने हरकत घेतली असल्याने व सदरची हरकत मालकी हक्क्का बाबत असेल तर , न्यायालयाकडून वाटप करून घ्यावे ;लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3400 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
