जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by kedar khadke
04-03-2020
kedarkhadke@gmail.com
क्रुपया खालिल जुने शासन निर्णय व परीपत्रकांच्या प्रति उप्लब्ध व्हाव्यात ही नम्र विनंति.
१.महसुल व वनविभाग निर्णय क्र. १०८९ प्र.क्र.९४ र -१ दि.१७-७-१९९१.
२.परिपत्रक क्र. आर.पी.ए.-१०९७/२७१७/सीआर-३१०/र- दि.९-१-१९९२.
३. शासन आदेश क्र. आर पीए-१०९०/सीआर-१६९०/आरआय दि. ८/६/१९९०.
Question by Pratap Gorkhanath khaire
04-03-2020
khairepratap@gmail.com
आमचे आजोबा मयत असुन त्यानी 2003 साली रोटरी समोर त्याचे वाटणीपत्र केले असुन प्रत्येकाचे हिस्से एका भावाने विकत घेतले आहेत व बहिणीची वाटणी त्या वाटणी पत्रात नाही.तर वारस म्हणून त्या एका भावाची नोंद होऊ शकते का ???
Question by narayan kadam
02-03-2020
gajanankadam585@gmail.com
नमस्कार,
गावठाणामध्ये घराच्या शेजारी सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केले,त्याबद्दल आम्ही ग्रामपंचायतीकडे तक्रारी अर्ज केला , सदर प्रकरण मा. गट विकास अधिकारी यांच्याकडे गेले , साहेबानी स्थळ भेट घेऊन तसेच ग्रामपंचायत, अतिक्रमण करणारे व आम्हाला कागदपत्रे घेऊन बोलावले व त्यावर सात दिवसात अतिक्रमण काढण्याचे आदेश ग्रामपंचायतीला दिले ग्रामपंचायतीने त्या आदेशानुसार संबंधित अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला नोटीस पाठवून अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले परंतु संबंधित अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीने अतिक्रमण काढले नाही यावर आम्ही पुन्हा गट विकास अधिकारी यांना अर्ज केला त्यावर त्यांनी पुन्हा ग्रामपंचायतीला अतिक्रमण करण्याबाबतचे आदेश दिले परंतु ग्रामपंचायती मधील ग्रामसेवक यांच्याशी या विषयावर चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले समोरचा व्यक्ती अतिक्रमण काढत नाही त्यावर आम्ही काही करू शकत नाही जर ग्रामसेवक वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेले आदेश याची अंमलबजावणी करत नसेल तर यावरती कोणत्या ॲक्शन घेण्यात यावे याबाबत कृपया मार्गदर्शन करावे
महाराष्ट्र ग्राम पंचायत कायदा १९५८ च्या कलम ५३(२अ) अन्वये आपण मा जिल्हाधिकारी यांना अर्ज करा व अतिक्रमण दूर करण्याची विंनती करा .मा जिल्हाधिकारी तहसीलदार यांना अतिक्रमण दूर करण्या बाबत आदेशित करतील .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kishor Rokade
28-02-2020
sagaradipune@gmail.com
219 हा सर्व्हे नंबर होता पुढे फाळणी होऊन 219/1 219/2 , असे सर्व्हे नंबर पडले 219/1 चे पुढे हिस्से होऊन 219/ 1अ , 219/1ब, 219/ 1क असे हिस्से पडले.
219/1ब चे पुन्हा 219/1ब/1 आणि 219/1ब/2 असे हिस्से पडले.
पुढे 1950 साळी 219/1 आणि 219/ 2 तलाठ्यांनी फेरफराने एकत्रित केले व 219/1+2 असा सर्व्हे नंबर पडला. त्यातील 219/1ब/2 + 219/1क आणि 219/2 अशा 6 एकर या जमिनीस माझे आजोबा कूळ होते व 219/1अ+219/1ब/1 अशा 3 एकर जमीन आमचा शेजारी कूळ होता. या सर्व जमिनी कुलकर्णी वतनाच्या जमिनी होत्या. 1955 साळी वतन दारणी कब्जे हक्काची रक्कम न भरल्याने सरकार अकरी पड अशी नोंद झाली. आमची कुल म्हणून नोंद तशीच होती पण 1966 अतिरिक्त मामलेदार यांनी फेरफराने सदर जमीन सरकार अकारी पड असल्या कारणाने 32 ग लागू नाही सबब इतर हक्कातील कुळाची नावे कमी केली. फेरफार हा संपूर्ण गावातील वतन जमिनी वरील सर्व्हे नंबर ला पडला होता.
त्यानंतर एकूण आकाराच्या 1.5 पट खंड भरून या जमिनी कसल्या जात होत्या.
1972 साळी सरकारच्या ठरावाला अनुसरून कलेक्टर यांनी संबंधित जमिनी वहिवाट दारांच्या नावे regrant करण्यास आदेशाने सांगितले. कब्जेहकाची रक्कम साऱ्यच्या 24 पट ठरली होती त्याची सर्व संबंधित कागदपत्रे माझ्याकडे उपलब्ध आहेत. रक्कम भरेपर्यंत वहिवाट दरांचे नाव इतर हक्कात नोंद घ्यावे असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
1975 साळी आमच्या shejaryane त्याच्या नावे असलेली रक्कम भरली व माझ्या आजोबांनी ती रक्कम 1978 साळी भरली.
शेजाऱ्यांची इतर ही वतन जमीन होती त्यामुळे त्यांनी सर्व रक्कम एकाच चलन द्वारे भरली.
त्यांच्या फेरफरचा अमल घेताना 219/1 अ + 219/1ब/1 या 3 एकराला तर दिलाच सोबत आमच्या वाहीवातीवर असलेल्या 219/1ब/2 + 219/1क या 4 एकर जमिनी ला पण दिला.
1945 पासून ते आत्ता पर्यंत ती जमीन आम्हीच कसत आहोत .1945 ते 1975 पर्यंत 7/12 ला तशा नोंदी आहेत. परंतु 1979 साळी शेजाऱ्यांच्या जमिनी जो फेरफार झाला त्यात त्यांचे आमच्या जमिनी ला नाव लागले. आजोबा अज्ञानी असल्याकारणाने regrant ची रक्कम भरून पण पुढील पाठपुरावा न केल्यामुळे जमिनीस आमचे नाव लागले नाही.
याचा गैरफायदा घेऊन शेजाऱ्यांनी त्यांच्या आत्त्यांचे हिस्से आमच्या जमिनीत कागदोपत्री काढून दिले व त्या नंतर दोघांनी मिळून एका त्रयस्थ वक्तीस त्यातील 70 गुंठे क्षेत्र विक्री केले केवळ चुकीच्या पद्धतीने आमच्या क्षेत्रास नाव लागले असल्याच्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन. आता सदर शेजारी आम्हाला आमचा ताबा असल्यामुळे धमकावत आहेत तुमचा या जमिनीशी संबंध नाही सरकारने आमच्या नावे जमीन केली आहे. त्यांनी पोलिस स्टेशन ला तक्रार केली आहे की आम्हीच घुसखोरी करून त्याची जमीन हडप करू पाहतोय वास्तविक परिस्थिती नेमकी या उलट आहे. आम्हाला तेहसिल दार आमच्या ओळखीचे आहेत सर्कल तलाठी सगळे आमच्या मर्जीतले आहे असं सांगून सतत धमकावल जातंय.
वास्तविक जी जमीन आमच्या कुल वहीवातीस होती तिला त्यांचं नाव लागण्याचा सबंध नव्हता.
मी त्यांचे regrant चे चलन पाहिले आहे 364Rs एवढी कब्जा हक्कची रक्कम भरली आहे.फेरफार नुसार ज्या जमिनी त्यांच्या नावे झाल्या त्याची 24 पट शेतसार्याची रक्कम 525 Rs होते.
आमच्या आजोबांनी भरलेली रक्कम ही 310Rs आहे व आमच्या वहीवतीस असलेल्या जमिनीच्या शेत्साऱ्याची 24 पट रक्कम पण 310Rs होत आहे.
आमच्या जमिनीचे पैसे भरण्याचा त्यांचा संबंध नव्हता व त्यांनी ते भरलेले देखील नाहीत.
आज शेजाऱ्यांच्या नावे त्याची 3 एकर तर आहेच सोबत आमच्या 4 एकर ल पण नाव आहे.
तरी मी शेजाऱ्यांनी त्रयस्थ व्यक्तीस विक्री केलेले फेरफार आव्हणीत केले आहेत.
त्यांनी आमच्या नावे पोलिस स्टेशन मध्ये दाखल केलेली तक्रार तेहसील दरांकडे गेली आहे त्यांनी स्थळ पाहणी ची नोटीस बजावली आहे.
आमचे लगत चे सर्व खातेदार ती जमीन पूर्वी पासून आम्हीच कसत आहोत हे खरं सांगण्यास तयार आहेत.
याचा काही उपयोग होईल का?
शेजारीच नाव कसे कमी करता येईल आणि इतर संबधित मार्गदर्शन करावे.
प्रश्न खूप लांब झाला या बद्दल क्षमस्व.
आपले प्रश्नावरून आपण /आपले पूर्वज कुलकर्णी वेतन जमिनीस कुल होते . जमीन re grant झाल्यावर, आपण पैसे शासन जमा केले आहेत . ,मात्र आपले नाव जमिनीस लागले नाही . त्याचा फायदा शेजाऱ्याने घेतला व आपल्याला re grant झालेल्या जमिनीला त्याचे नांव लावून घेतले व तदनंतर जमिनीची विक्री केली आहे .
आपण शेजाऱ्याचे नाव मिळकतीस लागल्यावर , संबंधित फेरफार अहवाणीत केला का ? तसेच जमिनीची विक्री झाल्यावर , विक्री खात होई अहवाणीत करणे आवश्यक होते . विक्री खात हवनीत केले का ? तसेच जय या फेरफाराने त्रयस्थ व्यक्तीचे जमिनीस नाव लागले तो हो अहवाणीत करणे आवश्यक आहे . फेरफार विरद्ध प्रांत अधिकारी यांचे कडे अपील दाखल करा . तर विक्री दस्त न्यायायलायात अहवाणीत करावा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Suresh Patil
27-02-2020
03sureshpatil@gmail.com
आम्ही चार गटनंबरमधील तोंडी वाटपाप्रमाणे एका ठिकाणी असणारी 25.70 आर शेतजमीन सन 2019 मध्ये खरेदी घेतली आहे. सदर जमीन ज्या व्यक्तिकडून खरेदी घेतली त्यांच्या बाजूने कब्जेपटटीबाबत मा कोर्टाचे निकाल आहेत. (सन-2010 व 2016) मात्र सदर जमीन आम्ही खरेदी केल्यापासून लगतच्या एका सहहिस्सेदाराने त्याच्यावर कब्जा केला आहे. व तो कब्जा सोडणेस तयार नाही. त्याचे म्हणणे आहे की, या ठिकाणी 8 गुंठे जमीन तुमची आहे. राहिलेली जमीन इतर गटनंबरमध्ये आहे. येईल् तेथे घ्या. प्रत्यक्षात तो सहहिस्सेदार स्वत: मात्र त्यांचे मालकीच्या हिस्सेपेक्षा जास्त हिस्सा (आमच्यासहीत) एका ठिकाणी तोंडी वाटपाप्रमाणे कसत आहे. सदर चार गटनंबर मध्ये एकूण 9 हिस्सेदार आहेत. प्रत्येक हिस्सेदार स्वत:चा चार गटनंबरमधील हिस्सा एका ठिकाणी तोंडी वाटपाप्रमाणे कसत आहेत. मात्र आम्हास फक्त 8 गुंठेच शेतजमीन प्रत्यक्षात कसण्यास दिली आहे. पोलिस प्रशासन दिवाणी बाब म्हणून दुर्लक्ष केले आहे. कोर्टामध्ये पैसा व वेळ जाणार आहे. तरी लवकरात लवकर कब्जा मिळविण्यासाठी कृपया जवळचा मार्ग सांगावा.
दुसरा त्वरित उपाय देणारा मार्ग नाही . पोलीस यांनी सांगितल्या प्रमाणे हि दिवाणी बाब आहे .आपणास न्यायालयात दाद मागणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमित शिर्के पाटील
26-02-2020
amitkumar.shirke@gmail.com
मा. किरण पाणबुडे सर
सर मला महाऑनलाईनचे सेतू सुविधा केंद्र हवे आहे त्यासाठी मी मा. जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात पाठपुरावा केलेला आहे परंतु मला असे सांगण्यात येते की, महाऑनलाईन चे सेतू मिळत नाहीत.
तरी मला सेतू मिळवण्यासाठी काय करावे लागेल याची माहिती द्यावी. ही विनंती.
या बाबत शासनाने लोकसंख्येच्या प्रमाणात किती सेतू केंद्र असावेत याचे norms ठरवून दिले आहेत . त्या नुसार सेतू agency निश्चित करण्यात आलेल्या आहेत .
जिल्हास्तरावर mahaonline , यांचा नोडल अधिकारी आहे . त्याचेकडे पाठपुरावा करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Atul
26-02-2020
dhamdheredeshmukh@gmail.com
नमस्कार,
विषय:-कुळ कायदा
महोद्य,
आमचे आजोबा सन १९४५ आधीपासुन जमिन कसत होते जुण्या (१९४५ )पासुनच्या सातबार्यात 'कुळ व खंड' या सदरात त्यांच्या नावाचा उल्लेख सापडतो
त्यानंतर सन १९६० साली MRT(Maharashtra revinue tribunal)न आमच्या आजोबांना कुळ म्हणून घोषीत केल
त्याच प्रमाणे Bombay highcourt न सुध्दा आमचे आजोबा कुळ आहेत अस सांगीतल
परंतु अनावधानान ईतर हक्क सदरात कुळाची नोंद घ्यावयाची राहून गेली पिक पहानी सदरात सन २०१५ पर्यत आमच्या वडिलांच्या नावाची नोंद होती परंतु डिजीटल सातबार्यात 'पिक पहानी' हा रकानाच नसल्याने ति नोंद आता सापडत नाहि
तरी१) ईतर हक्क सदरात आम्हास कुळाची नोंद घेता येईल का?
२)महत्वाचे, सन १९४५ आधीपासुन कसत असल्याकारणाण आम्हि 'संरक्षीत कुळात ' समावीष्ट होतो काय?
कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती....।
MRT व उच्च न्यायालयाचे आदेश तहसीलदार यांना सादर करा . आपले नाव लागणे आवश्यक आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रमण बेलचाटे
25-02-2020
ramanbelchate1@gmail.com
मा. सर
माझ्या आजीने बक्षीस पत्राद्वारे सर्वे नं. ९ ची शेतजमीन माझ्या वडिलांच्या नावे केली माझ्या आजीच्या नावे सर्वे नं. ६,७ आणि ९ हे एकत्र शेत होते त्यापैकी सर्वे नं. ६ मध्ये विहीर आहे बक्षीस पत्र करताना चुकीने सर्वे नं. ७ मधून पाणी ओलविण्याचा बक्षीस पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला होता या झालेल्या चुकीची तलाठ्याला माहिती देऊनही तलाठ्याने ७/१२ वर सर्वे नं. ६ मधून पाणी ओलविण्याच्या अधिकाराची नोंद केलेली नाही वा ७/१२ वर दिसत नाही. यासाठी बक्षीस पत्रामध्ये दुरुस्ती करून फेरफार घ्यावं लागेल कि तलाठी करून देईल यासाठी काय तरतूद आहे
Question by Tanaji Navghare Parbhani
25-02-2020
tanajinavghare123@gmail.com
सर आमच्या दोन चुलत्यांच्या नावे परभणी येथे 2 हेक्टर 78 आर शेतजमीन आहे,दोन चुलत्यांपैकी एक मयत आहे. तर माझ्या नावाने एकूण शेतजमीन पैकी 0.60 आर शेतजमीन नावे करून घेण्यासाठी काय करावे लागेल, जर दोन्ही चुलते आणि त्यांचे वारस ती शेतजमीन माझ्या नावे 0.60 आर कोरडवाहू शेतजमीन बक्षिसपत्र करून द्यायला तयार असतील तर बक्षिसपत्र द्वारे शेतजमीन माझ्या नावे करता येईल का? आणि करता येत असेल तर काय खर्च येईल ते सांगावे
बक्षीस पत्र केवळ पती /पत्नी/मुलगा/मुलगी ........ यांनाच करता येते . आपणास जमीन मूल्याच्या ४ % मुन्द्रांक शुल्क भरावे लागेल + नोंदणी शुल्क
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by कृष्णत पवार
25-02-2020
1nonlykrishnat@gmail.com
प्लॉट च्या हद्दिवरून शेजाऱ्यांसोबत कोर्टात केस चालू आहे.
भूमापन कार्यालयाकडून कोर्ट आदेशानुसार मोजणी अर्जा केला. प्लॉट च्य मोजणी साठी एक गट( साधारण २० प्लॉट) चे पैसे भरले. मोजणी झाली परंतु हद्दी करून दिल्या नाहीत.
कोर्टाकडून वारंवार नोटीस देऊन सुद्धा काम होत नाही. 8 वर्ष कोर्ट केस चालू आहे. जसे उपभोक्ता हक्कासाठी स्पेशल कोर्ट आहेत तसा भूमापन कार्यालयात अर्ज आणि पैसे दिल्यावर योग्य पद्धतीने काम ना झाल्यास दाद मागण्यास कुठे वाव आहे का?
सरकारी अधिकारी जबाबदार होतील अशी काही तरतूद आहे का?
सेवा हमी कायद्याखाली हद्दी निश्चित करून देण्या बाबत कालावधी निश्चित केला आहे का ? हे पहा . सेवा कालावधी निश्चित करण्या बाबत प्रत्येक विभागाने कालमर्यादा निश्चित केली आहे व त्याच्या अधिसूचना प्रसिद्ध केल्या आहेत . अधिसूचनेनुसार उक्त कालावधित हद्दी निश्चित केल्या नसतील तर अपील दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by KISHOR BAGKAR
24-02-2020
kcbagkar@rediffmail.com
नमस्कार , माझ्या आईच्या वडिलांची राहते घर आणि साधारण २ एकर जमीन ( बागायत ) मालमत्ता होती . आजोबा बेस्ट मध्ये सर्विस ला होते आणि त्यांना दोन मुली आहेत . माझी आई आणि मावशी . मामा नाही . लग्नानंतर आई आणि मावशीचे गावी जाणे कमी झाले . या दरम्यान आजोबांच्या चुलत चुलत भावाने त्याला कुल वहिवाट लावून घेतली . सात बारा काढला असता व फेरफार तपासाला असता बोली व्यवहाराने कुल लावले . असे नात्यामध्ये कुल लागते का ? ज्या व्यक्तीला दोन मुली आहेत आणि तो स्वतः सरकारी नोकरीत आहे तो कुल कसा लावून देईल .
साहेब आम्हाला मार्गदर्शन कर. आम्ही अपील करू शकतो का . माझी आई अर्ज करू शकते का आणि याची दाद कोणत्या ठिकाणी MAGAYCHI
Question by कदम के डी.
23-02-2020
Kdkadam11@.com.
शेत जमीन मिलकत साठेखत करार आकटोबर 2006 ला केला आहे. खरेदी खत आज परयंतं केलेले नाही परंतू वकिल आणि कोरटं यांनी आमचे कडून हूकूम नामा लिहून घेतला आहे. ङिकरी करून घेतली आहे . सदरचा करार रद्द करता येतो का?
साठे कराराचे अनुषंगाने मयायालयाने आपणास जमिनीचे विक्री खत करण्या बाबत आदेशित केले आहे . तसेच अंमल बजावणी आदेश हि काढले आहेत . आपण अपील करू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by स्वप्नील कैलास अक्कर
23-02-2020
swapnilakkar55@gmail.com
सर
आमच्या चुलत काकांची जमीन चुकीने माझ्या वडिलांच्या व एका काकांच्या नावे झाली होती.ही जमीन 2000 दरम्यान त्यांना आजोबांनी विकली होती,माझ्या वडिलांना दोन भाऊ असून ती फक्त माझे वडील व मधल्या काकांच्या नावावर होती,ती जमीन आम्ही परत त्यांच्या नावावर रजिस्ट्री करून दिली आहे,नावावर करते वेळेस वडील व मधल्या काकांनी सह्या केल्या परंतु लाहण्या काकांनी फेरफार वर आक्षेप घेतला आहे ह्या संबंधी मार्गदर्शन करावे ही विनंती.
आजोबांनी जमीन विकली होती . आजोबाना हि जमीन कशी प्राप्त झाली होती ? ती त्यांची स्वकष्टार्जित होती कि वडिलोपार्जित होती ? स्व कष्टार्जित असेल तर , काकांच्या आक्षेपाला काहीही अर्थ नाही . मात्र आजोबांना त्यांच्या वडिलांकडून प्राप्त झालीअसेल तर , काकांचा आक्षेप योग्य आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Santosh Natulkar
21-02-2020
santoshnatulkar@gmail.com
60 ते 70 वर्षा पासून कुळ हक्कात किव्हा इतर हक्कात असलेली जमीन आहे त्या जमिनीला माझे आजोबा वारस म्हणून आहेत व ती जमीन गेल्या 60 वर्षांपासून आम्हीच करत आहे, असे 5 गट न आहेत तिथे कुळ म्हणून नोंद आहे व सातबर्याला दुसया मालकाचे नाव आहे तर आत्ता त्या जमिनीवर कुळ हकातून नाव काडून मालकाच्या ठिकाणी आपले नाव कसे लावता येईल, त्या जमिनीच्या मालकाचा काही ठाव ठिकाण नाही व वरसाचा पण नाही
कुल म्हणून नाव दाखल असेल तर आपण किंमत निश्चित करण्याचा दावा शेत जमीन न्याधीकरण /तहसीलदार यांचे कडे दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by चंद्रकांत मारुती मांढरे.
21-02-2020
chandrakant.mandhare3@gmail.com
नमस्कार सर
माझ्या वडिलांच्या नावे 7/12 वर 1 हे 30 आर जमीन आहे परंतु माझ्या वडिल व वडिलांचे 4 चुलते यानी एकत्र कुटुंब असतानी 6 हे 30 आर जमिन 1961 साली खरेदी घेतली नंतर त्यानी आपसात एकत्र कुटुंबात पारंपरिक पधतिने वाट्प केली नंतर त्याना व्यवारिक आड्चनी येउ नये म्हनुन त्यानी सर्वानी एकत्र 1992 साली तसीलदार यांच्या कड़े वाट्प करुण मिळावे यासाठि अर्ज़ केला व त्या प्रमाने तसीलदार यानी कग्दोपत्रि प्रतेकास समान ( 1 हे 30 आर ) वाट्प केलें व तसा फेरफार पण ज़ाला आहे व सरकारी मोजनी करुन घ्यावी असा आदेश केला व त्या प्रमाने सर्वानी सरकारी मोजनिसाठि अर्ज़ केला, सरकारी मोजनी 1994 साली आली पन मोजनी करतेवेळि काही वाद निर्मान ज़ाले त्या मुळे सरकारी मोजनी पूर्ण ज़ाली नाहीं. नंतर तेव्हपासुन आज पर्यंत सरकारी मोजनी पूर्ण ज़ाली नाहीं व आता सर्वजण सरकारी मोजनी साठी तयार होत नाहीत,
तर आता मि आमची कमी आसलेली 38 आर जमीन मिळवीण्यासाठी कुठे दाद मागावी.
Question by श्री शिवाजी लक्ष्मण पा. साळुंके
21-02-2020
salunkeshivaji71@gmail.com
सर, अज्ञान मुलांच्या नावाने जमीन फेर झालेला आहे व परत 8-9 वर्षानी त्या सदर फेर रद्द करण्याबाबत विभागिय अधिकारी साहेब यांच्याकडे प्रकरण गेले तेंव्हापासून आजपर्यंत मुले अज्ञानच आहेत तर सदरील फेरफार रद्द करता येतो का?
अज्ञान मुलांचे नावे जमीन होऊ शकते . फक्त त्यांचे सोबत पालकांचे ( Guardian ) नाव लिहावयाचे असते .आई वडील हे दोघेही हयात नसतील तर , न्यायालय पालक नियुक्त करते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by indrajit ashok pudale
20-02-2020
indrajitpudale@gmail.com
माझ्या आजोबाचा जमिनीचा गट ०.०१ आर इतक्या क्षेत्राचा आहे.ते क्षेत्र आजोबांनी विक्री केले आहे हा व्यवहार तुकडेजोड व तुकडे बंदी कायद्याविरुद्ध आहे का ? किंवा विक्री केलेल्या व्यवहारास आव्हान देता येईल का?
हा तुकडा केंव्हा निर्माण झाला आहे त्या वर अवलंबून आहे . सदरचा तुकडा तुकडेबंदी कायद्या पूर्वी पासून असेल तर त्यास आव्हान देता येणार नाही . तसेच हा तुकडा रहिवासी/वाणिज्य /औद्योगिक जमीन वापर विभागात असेल तर हि त्यास हवं देता येणार नाही .
या दोनीही परिस्थीशिवाय अन्य असेल तर हवं देता येईल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by आर टी सोनावणे
19-02-2020
rupalitsg@gmail.com
वाणिज्य कडे वर्ग झालेल्या जमिनीसाठी आकारणी कशी करावी .
Question by अविनाश भागणे
19-02-2020
avinashbhagane@ymail.com
सर नमस्कार ,
आमच्या आजोबांच्या नावे रत्नागिरी जिल्ह्या मध्ये जमीन आहे. त्या पैकी काही जमिनीच्या सात बारा उताऱ्यावर भोगवटा सदरी जमीन मालकाचे नावे आहेत व आजोबांचे नाव इतर हक्कात "साधे कुळ" असे आहे. सदर जमिनीत वहिवाट आमचीच आहे. इतर हक्कात "साधे कुळ" असणाऱ्या जमिनी मध्ये आम्ही भात शेती करतो, त्या ऐवजी माझे भाऊ सदर जमिनीत नारळाची झाडे लावण्याचा विचार करीत आहेत.
सर, आम्ही त्या जमिनी मध्ये नारळाची झाडे लावल्यास भविष्यात काही अडचण येऊ शकते का?
आणि सदर सात बारा सदरी आम्ही आमची वारस नोंद करू शकतो का ?
कृपया सुचवावे,
धन्यवाद
ज्या जमिनीत आपण कुल आहेत त्या जमिनीची खरेदी आपले लाभात शेत जमीन मुख्याधिकारां यांचे कडे अर्ज करून घ्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by ओंकार कुलकर्णी
19-02-2020
Kulkarnio893@Gmail.com
नमस्ते. सर.
1) भुसंपादन चे पैसे मे.दिवानी वरिष्ठ न्यायालयात आलेले आहे.तर हा निधी जॉईंट अकाउट वर घेण्याचा कायदा आहे का.
2)सिंगल अकौंउटं वर देण्यासाठी रितसर अर्ज दिलाय .तो अर्ज रिजेक्ट केला.त्याच जिल्ह्यातील दुसर्या तालुक्यातील मे.दिवानी न्यायालय सिंगल अकौंउट वर देतात. या साठी माझा
मावेजा सिंगल अकौंउट वर घेण्यासाठी काय करावे.
आपण उपाय सांगावा ही नम्र विनंती.
Question by सोमण मुरलीधर जयराम
19-02-2020
jayantsoman1974@gmail.com
माझा प्रश्न असा आहे की
माझी जमीन अधिग्रहण केली होती पण 3हे 96आर कँनोल बांधणीसाठी ते काम संपवून खुप वरष झाली आहेत आता मला ती परत माझ्या नावावर करून घ्यायची असेल तर मी काय करावे
जमीन कोणत्या कायद्या खाली संपादन झाली आहे त्यावर अवलंबून आहे . भू संपादन कायदा १८९४ खाली , जमीन संपादन झाली असेल तर , संपादित जमिनीचा वापर , संपादन प्रयोजनासाठी झाला नसेल , तर अन्य सार्वजनिक प्रयोजनासाठी जमिनीचा वापर करावयाचा आहे . जर अन्य सार्वजनिक प्रयोजनासाठी जमिनीची आवश्यकता नसेल तर , अश्या जमिनीचा लिलाव करावाच आहे . लिलावामध्ये मूळ मालक सहभागी होऊ शकतो
नवीन कायदा २०१३ अन्वये जमीन संपादित झाली असेल तर , ५ वर्षणानंतर जमिनीचा वापर संपादन प्रयोजनासाठी झाला नाही तर मूळ मालकास जमीन परत करता येते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
जमीन कोणत्या कायद्या खाली संपादन झाली आहे त्यावर अवलंबून आहे . भू संपादन कायदा १८९४ खाली , जमीन संपादन झाली असेल तर , संपादित जमिनीचा वापर , संपादन प्रयोजनासाठी झाला नसेल , तर अन्य सार्वजनिक प्रयोजनासाठी जमिनीचा वापर करावयाचा आहे . जर अन्य सार्वजनिक प्रयोजनासाठी जमिनीची आवश्यकता नसेल तर , अश्या जमिनीचा लिलाव करावाच आहे . लिलावामध्ये मूळ मालक सहभागी होऊ शकतो
नवीन कायदा २०१३ अन्वये जमीन संपादित झाली असेल तर , ५ वर्षणानंतर जमिनीचा वापर संपादन प्रयोजनासाठी झाला नाही तर मूळ मालकास जमीन परत करता येते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by gajanan khandare
17-02-2020
gajanankhandre1991@gmail.com
आदरनिय साहेब
मि वर्ग ३ चा शासकिय कर्मचारी आहे तरि नॉनक्रीमिलेयर प्रमाणपत्रासाठिचा अर्ज भरताना नोकरि ऐवजी व्यवसाय- शिक्षण असे झाले आहे व सदर अर्ज भरुन १ महिना झाले आहे कृपया मार्गदर्शन मिळावे
आपण दुसरा अर्ज सादर करा . सेतू कर्मचारी तसेच निवासी नायब तहसीलदार यांचे निदर्शनास हि बाब आणून द्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by vaibhav bahekar
17-02-2020
bahekar1994@gmail.com
I am interested to know the current royalty charges in maharashtra state on various material like sand, murum. Etc.
Please send the various links about GR.
You may visit tahsil office and obtain the same. Alternatively you may search Government Resolution prescribing the Royalty rates on various minor minerals in the state of Maharashtra , on Maharashtra Government web site
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by CHANDRAKANT KHUTADE
17-02-2020
khutodec@gmail.com
प्रश्न : नमस्कार सर, माझ्या आजोबांनी 1953 वा त्या अगोदर एक जमीन शेतसारा भरून मिळवली होती. त्यावेळी त्यांना मूल नसल्याने त्यांनी 7/12 ला वारस म्हणून चुळत्याच्या मुलाचे नाव लावले होते पण 1957 ला चुलता वारल्याने त्यांच्या बायकोने व मुलाने गाव कायमस्वरूपी सोडलं. त्या नंतर आजोबांनी दुसरं लग्न केलं आणि त्यांना एक मुलगा व मुलगी अशी दोन अपत्य झाली. आमच्या आजोबांचा मृत्यू 2011 साळी झाला त्यानंतर वारस हक्काने 7/12 ला आजी, बाबा आणि आत्या चे नाव लागले आहे तसेच 7/12 ला आजोबांच्या चुलत भावाचे नाव शुध्दा आहे. 1957 ते 2019 पर्यंत आजोबांचा चुलत भाऊ कधी गावाकडे आलाच नाही पण आज घडीला आजोबांच्या चुलत्याच्या मुलाचे वारस येवून आमच्या जमिनीतून अर्धा वाटा मागत आहेत. जी जमीन गेले 50-52 वर्ष आमचे आजोबा व बाबा कसत आले आहेत त्यांनी त्याचे पूर्ण आयुष्य या जमिनीमध्ये घालवले आहे. आज त्या जमिनीचा हिस्सा मागताहेत. 1) कायदेशीर रित्या हे योग्य आहे का? 2) जर कायदेशीर योग्य असेल तर आम्हाला त्याच्या विरोधात काही कारवाई करता येवू शकते का? 3) आणि जर योग्य नसेल तर त्यांचे नाव 7/12 वरून कमी करू शकतो का? कृपया आम्हाला मार्गदर्शन करावे.
शेत सारा भरून जमीन मिळवली म्हणजे - आजोबांचीच जमीन किंवा त्यांना त्यांचे वारसा हक्काने प्राप्त झालेली असा आहे .
आजोबा हयात असताना , वारस म्हणून पुतण्याच्या मुलाचे नाव वारस लावले ? व्याव्क्ती हयात असताना , वारसांची नावे लागू शकत नाहीत .
आपले प्रश्नावरून खालील वस्तुस्थिती असणे संभव आहे
आजोबांना जमीन त्यांचे वडिलांकडून प्राप्त झाली आहे . शेत सारा न भरल्याने , शासनाने जमीन जप्त केली . थकीत शेतसारा रक्कम आजोबांनी रक्कम जमा केली व परत प्राप्त करून घेतली .
आजोबांना जसे आपले वडील वारस आहेत तसेच आपले चुलते हि वारस आहेत . त्यामुळे चुकत्याच्या मुलाचा मिळकतीत हक्क आहे . त्याची मागणी योग्य आहे . त्याचे नाव कमी करता येणार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सागर पानसरे
16-02-2020
sagardpansare@gmail.com
नमस्कार सर, माझा प्रश्न महार वतन जमिनीशी संबंधित आहे. भोगवटादार वर्ग २
आमच्या जमिनीचे ३/९/१९७६ ३७४ रु एका हफ्त्यात भरायचे होते ते मराठा समाजातील एका व्यक्तीने भरले व ३२ ओ प्रमाणे आपल्या बायकोचे नाव कब्जेदार म्हणून ७/१२ वर लावले व हफ्ते फिटे पर्यंत मूळ मालकाचे नाव इतर हक्कात दाखल केले .
१/२/१९७६ ला जमिनीची खरेदी किंमत संपूर्ण भरली व ३२ एम प्रमाणे मूळ मालकाचे नाव कमी केले.
५/९/१९७६ ला बँक ऑफ महाराष्ट्र व १७ /१/१९७७ भूविकास बँक कडून कर्ज घेतले. ताबे गहाण सोडवणार अशी नोंद ७/१२ वर आहे (मुदत १० वर्ष ). त्यांनी कर्ज घेऊन बोजा दाखल करून ठेवला आहे. २००४ साला पासून ७/१२ व ८ अ हा दि महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह लॅन्ड डेव्हलोपमेंट बँक च्या नावावर झाला आहे.सध्या स्तिथीत चौकशी केल्यावर कळले भूविकास बँक बंद झाली आहे .जमीन पडीक आहे.आमच्या कडे जमीन विकल्याचा कोणताही पुरावा नाही. माझे वडील त्यावेळी लहान असल्याने त्यांना पुरेशी माहिती नाही.मी सर्व जुने फेरफार व ७/१२ काढले आहेत(१९४७ ते १९७३ पर्यंत आजोबांचे नाव आहे).
मला जमीन परत मिळू शकेल का ?
मला कुठे दाद मागावी लागेल ?
कोणता मार्ग आहे ?
आपण मार्गदर्शन करावे
आपण उपरोक्त जमिनीस कुल होता का ?
कर्ज कोणी घेतले ? आपण कि त्या व्यक्तीने
कर्जाची परत फेड झाली का ?
जमीन स बँकेचे नाव केंव्हा लागले ? त्याचा फेरफार आहे का ?
सर्व बाबींचे फेरफार पहा . विस्ताराने प्रश्न मांडा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
