जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by bhanudas
25-01-2020
waghb999@gmail.com
सर,
रजिस्टार ऑफिस मध्ये खरेदीखत केल्यानंतर आपण जर फेरफार करण्याकरिता तलाठ्यांकडे फेरफार करण्याकरिता अर्ज व खरेदीखता चे झेरॉक्स पेपर चे दोन सेट करुन दिले व त्यातील एका सेट वर पोच म्हणून सही व शिक्का देण्यास तलाठ्यांनी नकार दिल्यास काय करावे
Question by bhanudas
25-01-2020
waghb999@gmail.com
सर,एक विहीर असलेला 6 गुठें चा गट आहे त्यात माझ्या नावावर एक गुठा जमीन आहे. पण त्यात माझ्या वडीलांच्या नावात सुरुवाती पासून चुक झालेली आहे माझ्या वडीलांचे नाव बाबुराव आहे पण त्यात बापुराव झालेले आहे तो गट विहीरीचा असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष झाले नावात दुरुस्ती करण्याकरिता काय करावे
Question by सागर
21-01-2020
sagarkandekar1990@gmail.com
प्रश्न - माझ्या आजोबांनी सन 1948 साली एकूण 94 गुंठे क्षेत्र असलेल्या गटापैकी उत्तरेकडील 47 गुंठे जमीन एका सखाराम नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केली होती.उर्वरीत दक्षिणेकडील 47 गुंठे ही सखाराम नावे च होती. सन 1968 साली सखाराम मयत झाले आणि त्याच्या मुलगा माधव यांचे नाव सातबाराच्या मुळ कब्जेदार व दोन मुलीचे नाव इतर हक्कात वारस नोंदीने लागले.पण इतर हक्कात नोंद करताना तलाठी यांनी मुलीचा हक्क हा दक्षिणेकडील 47 गुंठे मध्ये आहे असा केला नाही. सन 1992 रोजी माझ्या काकांनी उर्वरित दक्षिणेकडील 47 गुंठे माधव कडून एकत्र कुटुंब असताना खरेदी केली म्हणजे आत्ता सर्वं 94 गुंठे चा गट काकांच्या च्या नावे झाला मात्र त्या मुलीचा सही किंवा हक्क सोड न केल्याने त्याचे नावे आजही सातबारा इतर हक्कात आहे. सन 2015 रोजी माझे काका व आम्हीं विभक्त झालो तेंव्हा ह्या गटात माझ्या वडिलांच्या हिस्सास उत्तरेकडील 47 गुंठे जमीनिवर आला आहे पण काकांना ते माहीत नाही आहे तर
1.आम्ही तहसीलदार यांना मजमस 1966 , कलम 155 ने दुरूस्ती अर्ज करू शकतो का?
2.आम्ही जर सातबारा स्वतंत्र करून मुलींचे नावे कमी करू शकतो का?
Question by Navnath dharpale
19-01-2020
Navnathdharpale85@gmai.com
नमस्कार सर जमिनीचा गट नंबर सतरा व 18 आहे दोन्ही गटाचे नकाशे विपरीत आहे माझा गट नंबर 17 आहे जमीन मोजणी करून नकाशा दुरुस्त करता येईल का कृपया मार्गदर्शन मिळावे
Question by समीर राम घाडी
19-01-2020
rammatetgure@gmail.com
आमची वडिलोपार्जित शेती आहे सिंधुदुर्ग मध्ये . त्यात ७/१२ मध्ये ५ नावे आहेत , जुईली घाडी (आजी),राम घाडी (वडील),सानिका घाडी(आत्या),सविता घाडी(आत्या)शोभा शेडगे(आत्या) ,अशी नावे आहेत ,
१]मला माझे नाव ७/१२ दाखल करायचे आहे.
२] आज्जी चे नावे बक्षीस पत्र किंवा मृत्यपत्र केला तर चालेल का ३] २ अविवाहित आत्याचे सर्व काही मीच करणार आहे .तर त्याचे पण मृत्यूपत्र केले तर चालेल का
४] लग्न झालेली आत्या शोभा शेडगे त्याचे मुले हक्क सोड पत्र आणि मोबदला घेण्यास नकार देत्यात आज्जी आणि २ आत्या वारल्यावर बघू
५] आज्जी वय ८७ आणि २ आत्याचे वय ६० आणि ६५ आहे . आजारपण मुळे माझा खूप पैसे खर्च होतोय ,उद्या आज्जी वारल्यावर शोभा शेडगे(आत्या) विवाहित आत्या ची मुले मला त्रास देतील
६] आज्जी आणि दोन आत्या वारल्यावर फक्त ७/१२ मध्ये दोन हिस्से होईल १ माज्या वडिलांचा आणि शोभा शेडगे(आत्या) विवाहित चा .
७] मी आज्जी आणि २ आत्या अविवाहित ची संपून जवाबदारी घेतली आहे.७/१२ मध्ये शोभा शेडगे(आत्या) ला उद्या फक्त तिचाच हिंसा भेटेल या साठी काय करावे
Question by अमोल चव्हाण
18-01-2020
amol.chavan25@rediffmail.com
साहेब
आमच्या ७/१२ वरती ३ आणेवारी आहेत ,त्यामध्ये आमच्या चुलतिची आणेवारी आहे ,अज्ञान चुलतील फसवून तिच्या भावाच्या मुलाने रजिस्टार मृत्यूपत्र तयार केले आहे ,चुलती मयत झाली आहे ,मृत्यू पत्र बोगस आहे ,साक्षीदार खोटे आहेत ,आम्ही तलाठी ,मंडलाधिकारी ,प्रांत ,ऍड कलेक्टर ,अप्पर आयुक्त ,मंत्रालय ,इथेपर्यन्त अपील करत गेलो आहे पण मृत्यूपत्राचा निकाल त्याच्या बाजूने लागला आहे ,सर्व अधिकारी यांनी मंडळ अधिकारी यांचा निकाल कायम करण्यात यावा असा आदेश दिला आहे ,मृत्यूपत्र बोगस आहे ,आम्ही दिवाणी नायालयात सुद्धा दावा दाखल केला आहे ,त्याची तारखा चालू आहेत ,अजून त्याचे नाव ७/१२ ला लागले नाही ,आत्ता त्याचे नाव लागणार का ,जमीन सामाईक आहे वाटप झाले नाही ,७/१२ नाव न लागण्यासाठी काय करावे लागेल ,व लागले तर आम्ही पुढील प्रोसेस काय करू ,आता पुढील स्टेप काय घ्यावी काय करावे हे कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती विनंती
Question by रोहिदास सखाराम पावले
17-01-2020
rohidaspable@yahoo.in
नमस्कार सर ७/१२ च्या इतर अधिकारात लीज पेंडन्सी ची नोंद तलाठी यांनी टाकली आहे परंतु त्यानंतर दिनांक २१/०९/२०१७ च्या महाराष्ट्र शासनाच्या जीआर नुसार सादर नोंदी इत्तर अधिकारात घेण्यास मनाई केली आहे सदर नोंद तलाठी यांनी टाकल्यानंतर जी आर पडला आहे मंडळ अधिकारी यांनी ती नोंद अद्याप मजूर केलेली नाही तरी तलाठी यांनी टाकलेली नोंद कशी रद्द करता येईल
Question by भगवान तबाजी शिंदे
17-01-2020
ajayshinde333@gmail.com
भगवान तबाजी शिंदे
माझी वडिलोपार्जित इनाम व वतनाची जमीन आहे भोगवटादार वर्ग २ आहे पण त्या जागेवर शासना कडून केंद्राचा दवाखाना बांधला आहे आमच कोणताही बक्षीसपत्र न बनवत व आमची परवानगी नसताना सुद्धा तर ती जमीन कशी परत मिळवता येईल व काही मोबद्दल कसा मिळवत येईल तहसीलदारांना व सरपंच याना पत्र देऊन काम थांबवणाची विनंती केली पण काम काही थांबला नाही काही मार्ग सांगा
Question by विश्वास भोसले
17-01-2020
Visbhosale5vs@gmaill.com
नमस्कार साहेब, माझा प्रश्न असा आहे की
1) 2001 साली ग्रामपंचायत हद्दीत 3 गुंठे शेतजमिन खरेदी केली होती.नंतर मी 3 गुंठे क्षेत्र तात्पुरते बिनशेती केले करून घेतले पण 7/12 वर अजून बिनशेती नोंद नाही. सध्या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले आहे.विकास आराखडा अजून झाला नाही. मला 3 गुंठे क्षेत्र नव्याने निवासी बिनशेती करावयाचे आहे.बिनशेती करण्यासाठी काय करावे लागेल ?
2) तुकडेबंदी कायद्याची बाधा येईल का ? दंड भरून नियमित होईल का ?
Question by अविनाश आडसरे
17-01-2020
avinashadsare007@gmail.com
मी राज्य महामार्गाशेजारी बांधकाम करताना मी नियमानुसार रस्त्याच्या मध्यरेषेपासूनचे अंतर + service road ची जागा सोडून बांधकाम केले आहे. रस्त्याच्या पलीकडील शेतकऱ्याचा शेतजमिनीचा त्रिकोणी भाग हा आमच्या प्लॉट समोर आला आहे. संबंधित शेतकऱ्यांने तो जमिनीचा त्रिकोणी भाग गुंठेवारीने विकला असून विकत घेणाऱ्यांने तेथे चहाच्या टपऱ्या, पानाच्या टपऱ्या टाकल्या आहेत. ही सर्व बांधकाम राज्य महामार्गाच्या लगत मध्य रेषेपासून 45 फुटावर आहेत. शिवाय कुठलाही service road त्यांनी सोडलेल नाही व माझा संपुर्ण दर्शनी भागावर अतिक्रमण केले आहे.या संदर्भात मी गेल्या 3/4 वर्षापासून उप- अभियंता, कार्यकारी अभियंता pwd यांच्याशी अर्ज फाटे करतोय मात्र प्रतिसाद भेटत नाही. काय करावे हे समजेना कृपया मार्गदर्शन करावे.
Question by pratik raut
16-01-2020
pratikraut222@gmail.com
आमची शेतजमीन नॅशनल HIGHWAY साठी २०१९ मध्ये संपादित करण्यात आली आहे. पण संपादित केलेल्या जमिनीचे सातबारा सदरी मूळमालकाचे नाव कायम राहायला हवे असते व सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय चे नाव इतर हक्कामध्ये राहते, तसे इतर गावामध्ये झाले आहे. पण आमच्या गावातल्या संपादित केलेल्या प्रत्येक सातबारा मध्ये सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय यांचे नांव भोगवटादार सदरी लागले आहे जे इतर हक्कामध्ये असायला हवे होते. तरी अश्याबाबतीत सातबारावर नाव नोंद कशी व्हायला हवी याबाबत माहिती द्यावी.
Question by करण कोळी
15-01-2020
kk6264385@gmail.com
नमस्कार सर,
माझं नाव करण,राहणार कोल्हापूर,
माझ्या आजोबांना दोन सावत्र भाऊ आहेत.माझ्या आजोबानी स्वकष्टाने 1960 साली 3 एकर जमीन खरेदी केली. माझे आजोबा आणि त्यांचे दोन भाऊ यांना मिळून वडिलोपार्जित २ एकर जमीन होती. ५ ( ३ एकर स्वकष्टार्जित + २ एकर वडलोपार्जित) एकर जमिनीचे तीन भावंडांमध्ये समान हिस्से होण्यासाठी किवा दोन भाऊ सहाहिसे दार होण्यासाठी,आजोबांनी ग्रामपंचायत मधे अनेवारी अर्ज दिला,भावांची अनेवरी लागावी म्हणुन.
तसा अर्ज दिल्यावर दोन भावांची नावे स्वकष्टार्जित आणि वडिलोपार्जित या दोन्ही प्रकारच्या जमिनीवर/सातबारावर लागली.
तर माझा प्रश्न असा आहे की,
स्वकष्टाने विकत घेतलेल्या जमिनीचे भावंडांध्ये समान हिस्से करण्यासाठी आनेवरी ही पद्धत योग्य/कायदेशीर ठरेल का ?
अशा आनेवारी अर्जाणे सातबाऱ्यावर
(स्वकष्टार्जित जमीनिच्या ) लागलेल्या नावा प्रमाणे समान हिस्से होतील का ?
ज्याच्या नावावर स्वकष्टार्जित जमीन खरेदी पत्र आहे,तोच मालक राहील की, त्यांचे भाऊ पण जमिनीचे मालक किंवा समान हिस्सेदार होतील ?
तसेच स्वकष्टाने घेतलेली जमिनीचे भावांमध्ये(बंधू) समान हिस्से हे १०० रुपये च्य्या स्टॅम्प पेपर वर गावातील १० लोक जमवून केले तर ते ग्राह्य धरले जाईल का ?
आता आजोबांची स्वकष्टार्जित जमिनीवरून/सतबर्यावरून भावाची नावे कमी करू शकतो का व त्यासाठी काय करावे लागेल ?
नोट -
३ एकर जमिनीचे खरेदीत खत आजोबांच्या नावे आहे.तसेच आजोबा एकत्र कुटुंब प्रमुख होते.पण तसे ३ पैकी एका जमिनीच्या खरेदी पत्रवर नमूद आहे.पण आजोबांच्या दोन भावाची नावे कुठल्याही खरेदी पत्रावर नमूद नाहीत..!!
माझ्या आजोबांच्या 3 एकर स्वकष्टार्जित जमिनिपैकी 1 एकर जमीन आजोबांच्या एका भावाने 2018 मध्ये विकली. तर या विकलेल्या जमिनीवर आम्ही दावा करू शकतो का ?
तसदी बद्दल क्षमस्व...!
आपला नम्र,
करण कोळी.
Question by वैभव
13-01-2020
vaibhavraykar9765@gmail.com
आपल्या मालकीची गावातील जागा ग्रामपंचायतीच्या नावावर होते का? ग्रामपंचायत नियम ३/१० ३/७२ विषयी माहिती हवी आहे कृपया ती द्यावी.
Question by सुमन रामा तेटगुरे
11-01-2020
rammatetgure@gmail.com
नमस्कार सर मी सुमन रामा तेटगुरे मु-साळवे,पोस्ट-कोस्ट खुर्द,तालुका-माणगांव, जिला-रायगड, पिनकोड-४०२१०४, माझे वडील किसन(कृष्णा) रामजी फुलारे हे मुके होते आणि १६/०६/२०१५ साली वारले .माझा चुलत भाऊ वसंत दादा यांना खूप वेळा सांगितले दादा माझा वारसनोंद करून दे पण नेहमी टाळा टाळ केली तेव्हा मी स्वता वारसा नोंद अर्ज ०२/१२/२०१९ ला गट क्रमांक व उप विभाग ९२२ आणि ५८९ . तलाठी साहेब न कडे जमा केला. आता पर्यंत नमुना ९ नोटीस नाही दिली जेवा मी तलाठी कार्यालयात गेली तेवा तलाठी साहेब बोलले आप्पा रामजी फुलारे तुमचे काका त्याचा वारस नोंद अर्ज पहिला आला आहे त्यात ५ वारस दार आहेत .त्यात फक्त मंजुळा यांनी सही केली आहे .वसंत आणि अन्य ३ वारसांची सह्या बाकी आहेत त्याची वारस नोंद पूर्ण झाल्या शिवाय तुम्हाला नमुना ९ नोटीस नाही देऊ शकत.आप्पा रामजी फुलारे च्या सर्व वारसांची नमुना ९ वर सही होये पर्यंत आणि वारस नोंद होई पर्यंत थांबावे लागेल.
१] वसंत दादा मुद्दाम आम्हा दोन बहिणीचे नाव ७/१२ येऊ नये यासाठी अशी कामे करत आहे.
२] मला आई आणि वडील नाही ते वारले आहेत.माझा नवरा मुका आहे माजी परस्तिती देखील खराब आहे, या सर्व कारणा मुळे माझा पैसे गाडी भाड्या मागे खर्च होत आहे. आणि हे चुलत भावाला माहित आहे एकदा का हिचे पैसे संपले कि हि घरी गपप बसेल
३] किसन(कृष्णा) रामजी फुलारे आमचा तरी वारस नोंद करून टाकावी तलाठी साहेबानी आम्ही फक्त दोन बहिणी आहोत
Question by Sanket velkar
10-01-2020
Velkarsanket4 @gmail.com
1)शासन निर्णय 2014 नुसार वर्ग 2 जमीन (नि.स.प्र) वर्ग 1 केली आहे (40 पट नजराणा रक्कम भरून)
2) अशी वर्ग 1 केलेली शेतजमीनीचा काही भाग बिगर शेतकरी व्यक्तीस विकण्या साठी अकृषीक परवानगी मिळेल का
Question by सागर
09-01-2020
sagarkandekar1990@gmail.com
प्रश्न - आमच्या आजोबांनी सन 1984 मध्ये 3 एकर गुरे चरण जमीन खरेदी केली होती , & खरेदीखत व फेरफार नोंद आहे.नंतर 1994 साली आजोबा मयत झाले आणि माझे वडील , काका व आत्या असे एकूण 7 जने वारस म्हणून लागले अशी फेरफार नोंद आहे.सन 1996 साली एका त्रयस्थ व्यक्तीने आमच्या ह्या सात जणांचे नावे खोट्या साह्य करून स्वतःला संबंधित जमीन विकण्याचा अधिकार आहे असे नॉटरी कुल मुखत्यारपत्र करून घेतले व नंतर त्याच कुल मुखत्यारपत्र आधारे त्याने एका इतर व्यक्तीस नोंदणीकृत खरेदी खत करून ति जमीन 1996 विकून टाकली. ह्या खरेदी ची नोंद असून खरेदी घेणार यांचे नाव सात बारा सदरी लागले आहे.
सदर शेती ही आम्ही राहत असलेल्या गाव सोडून दुसरीकडे असल्याने आम्हाला या जमिनीचे माहिती नव्हती.आम्हला या वर्षी याची माहिती मिळाली व अत्ता त्या जमिनी वर सिटी सर्व्ह होउन प्लॉट पडले आहेत.
1.तर आज 23 वर्षांनी आम्ही आमची जमिन परत मिळावी या साठी दावा कोर्टात करू शकतो का?
2.आणि दावा टाकून जमीन आम्हास मिळेल का?.
एकतर गुरुचरण जमीन आपण खरेदी कशी केली व फेरफार नोंद मंजूर कशी झाली ? गुरुचरण जमीन हि शाशनानें गावातील गुरांना चारण्यासाठी दिलेली असते . ती जमीन शासकीय आहे . त्यामुळे अश्या जमिनीची खरेदी विक्री होऊ शकत नाही .
आपल्या म्हणण्यानुसार खोट्या कुल मुखत्यापत्राद्वारे जमिनीची विक्री झाली आहे . कुल मुखत्या पत्र खोटे आहे हे आपणास सिद्ध करावे लागेल त्यासाठी फौजदारी नायायालयात दावा दाखल करावा लागेल .
मात्र आपणास जमीन मिळणार नाही . मात्र ज्या व्यक्तीने खोटे विक्री खत केले त्याचे कडून आपणास जमिनीची किंमत , व्याजासह मिळू शकते . आपण आपले चीक वकील यांचा सल्ला घेऊन , पुढील कायदेशीर कारवाई/ कार्यवाही सुरु करू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विठ्ठल लक्ष्मण लवटे
09-01-2020
vitthallawate82@gmail.com
नमस्कार सर
आजोबांच्या नावे जमिन आहे आणी त्यांच्या नावे कर्ज आहे आणी आमाला वाटणी करायची आहे bankबोज्या आहे तसा ठेऊन वाटणी करायची आहे bankबोज्या उपगाटावर ठेऊन वाटणी करता येईल का कलम 85 नुसार वाटणिपत्र मिळेल का.......
Question by Pravin
09-01-2020
pmpravin1@gmail.com
सर, निलंबन आदेशा विरुद्ध उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यास जिल्हा परिषदेला कर्मचाऱ्याला पुनर्स्थापित करता येते का?
उच्च न्यायालयाचे कोणते स्थगित आदेश नसल्यास , पुनर्स्थापित करण्यास कोणतीही बाधा नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राजेंद्र पवळे
09-01-2020
rajupawale111@gmail.com
नमस्कार सर माझी आई परगंधा आहे म्हणजे घरातून २२ वर्षा पूर्वी निघुन गेली आहे त्याची नोद पोलिस स्टेशन ला केलेली नाही माझ्या आई चे १५ वर्षा पूर्वी वडील वारले आहे त्यांच्या नावावर असणारी सर्व जमीन ४ मामा नी त्यांच्या नावावर केली व त्यातील बरीच जमीन त्यानी विकाली आहे ७/१२ वर वारसदार म्हणून आई चे नाव नाही तर मला त्यात माझ्या आई चा वारस म्हणून मला जामिनीचा अधिकार मिळू शकतो का आणि जर मिळत असेल तर त्यासाठी काय करावे
आई परागंदा असले बाबत प्रथम तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करा .
आपली आई परागंदा आहे म्हणजे ती अजून हयात ( still alive ) असा होता . त्यामुळे प्रथम आई चे नाव दाखल करून घ्या . त्यासाठी जय फेरफाराने केवळ मामांचे नाव दाखल आहे तो प्रांत अधिकारी यांचे कडे अपील दाखल करा .
आई ची तक्रार दाखल करून ७ वर्षे झाल्यावर , आई चे वारस म्हणून आपले नाव दाखल होईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ajit bhalchandra deshpande
08-01-2020
ajitd.2009@rediffmail.com
सर
फेरफार नंबर 23339मधील नोंदी बाबत जुना 6ड न बघता नवीन 6ड वर मालकी चा केला व विक्री वेळी जुने कागद पञ न बघता खरेदी विक्री केली त्यानी आता आम्हा ला नोटीस आलीच नाही मी शेजारी असुन आता माझे क्षेत्रापरमाणे भरत नाही मी ऑनलाईन तक्रार टाकली मंडळ अधिकारी यांनी आम्हाला 3तारखा दिल्या पण आम्हा ला आदेश दिला आता उपविभागीय अधिकारी यांचे कडे अपिला मधे जाणेच आहे किती दिवस असतात
६० दिवस
जर आपला प्रश्न क्षेत्र बाबत असेल तर , मंडळ अधिकारी अथवा प्रांत अधिकारी काही करू शकणार नाही . लेखन प्रमाद अथवा जाणीव पूर्वक केलेली चूक असेल तरच , उपरोक्त अधिकारी यांचा प्रकरणातील हस्तक्षेप उपयोगी पडेल अन्यथा आपणास भूमी अभिलेख खाते यांचे दरवाजे ठोकावे लागतील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by amol kolekar
29-12-2019
amolkolekar5@gmail.com
नमस्कार सर,
माझा शेतजमिनी विषयीच्या रेकॉर्ड्स संदर्भात प्रश्न आहे.
सर माझ्या पंजोबना २ मुले होती. त्या २ मुलांच्या नावावर समान शेतीचे क्षेत्र १९७२ परेंत होते. पण १९७२ साली आमचा शेतीचे सर्वे भुमिअभिलेख मार्फत बदलले गेले होते,
त्यामध्ये एका सर्व नंबर चे रुपांतर दोन सर्वे नंबर झाले आहेत.
त्या दोन सर्व नंबरचे योग्य फेरफार झाले होते. पण एका सर्व नंबर मध्ये दोघांच्या नावावर समान क्षेत्र होते, तर दुसऱ्या सर्वे मध्ये ते क्षेत्र एकाचा नावर लागलेलं आहे पण त्याचा फेरफार मध्ये दोघांची हि नावे आहेत. पण तालाठीने सातबारा नोंद घालताना चूक केली आहे.
नंतर ज्या सर्वे मध्ये चूक झाली आहे तो सर्वे च्या प्लॉट चुलत आजोबाने दुसऱ्याला विकला,.
अशाप्रकारे.. आमचा आजोबांच वाट्याला कमी जमीन आलेली आहे.
तर ह्याजमिनीची रेकॉर्ड्स ची चूक सुधाण्यासाठी काय करावे
लागेल? कोर्ट केस करून जमीन मिळेल की हे मार्गदर्शन करावे
आपले प्रश्नावरून , आपले गाव मध्ये एकत्रीकरण योजना अमलात आलेली आहे . त्यामुळे आपण म्हणता त्या प्रमाणे एका भू खंडला केवळ एकाच आजोबांचे नाव लागले आहे . याला चूक म्हणता येणार नाही .
आपण हे हि म्हणता कि , तलाठी याने , फेरफारामध्ये , दिघंची नाव असताना , ७/१२ सादरी चुकीचा अंमल दिलेला आहे . अशी वस्तू स्थिती असेल तर , चूक दुरुस्त करता येईल . आपण तहसीलदार यांचेकडे कलम १५५ खाली अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुरज कदम
21-12-2019
surajkadam.mh12@gmail.com
महोदय
खालील अपिलाच्या निर्णयाची प्रत मेल वर मिळावी हि विनंती
मा. मंत्री (महसूल) यांचे न्यायालयात क्रमांक आरटीएस-२८१७/प्र.क्र. ७८२/ज-४ अ
आपला विश्वासू
सुरज कदम
कृपया अशी माहिती विचारू नये
प्रश्नांना माहिती /उत्तरे दिली जातात
माहितीच्या अधिकारप्रमाणे , अभिलेख या ठिकाणी उपलब्ध करून दिले जात नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमित शिर्के पाटील
21-12-2019
amitkumar.shirke@gmail.com
मा. किरण पाणबुडे साहेब
माझे आजोबा शिवराम तात्या शिर्के यांचा जन्म 1914 सालाचा आहे. (जुन्या जन्मनोंदीनुसार), माझ्या आजोबांचे मामा बापु खामगळ यांना मूलबाळ नसल्याने त्यांनी माझ्या आजोबांना ते 10 वर्षाचे असताना दत्तक घेतले होते. (दत्तक पत्र वगैरे नाही). व त्यांचे नाव शंभु बापू खामगळ असे ठेवले होते. पुढे काही कालावधीने आजोबांचे मामा मयत झाले, त्यांच्या नावावरील 1 एकर जमीन माझ्या आजोबांच्या नावावर आली, माझ्या आजोबांना त्यांच्या मामांच्या मृत्यूनंतर पुन्हा माझे पणजोबा त्यांच्याकडे घेऊन आले, व पुन्हा त्यांचे नाव शिवराम तात्या शिर्के असेच राहिले, जे आजपर्यंत आहे. वरील सर्व माहिती आजोबांनी सांगितलेली आहे. 1 महिन्यापूर्वी माझे आजोबा मयत झाले आहेत, त्यांचे सर्व कागदपत्रे शिवराम तात्या शिर्के नावांनी आहेत मी त्यांच्या मृत्यूची नोंद करणेकरिता ग्रामसेवकास भेटलो असता मी त्यांच्याकडे शिवराम तात्या शिर्के उर्फ शंभु बापू खामगळ अशी नोंद लावण्याची विनंती केली असता त्यांनी नकार दिला. ते शिवराम तात्या शिर्के या नावाने नोंद करण्यास तयार आहेत. पण मला दोन्ही नावांच्या नोंदी मृत्यू दाखल्यावर हव्या आहेत, कारण आजोबांच्या नावावर 1 एकर जमीन आहे.
तरी मी काय करावे याची माहिती द्यावी.
आजोबांचे नावात बदल आपणास करता येणार नाही .
प्रश्न आपले नाव मिळकतीस लागण्याचा आहे . आजोबांचे जे वारस ( वर्ग १ ) असतील त्यांची नावे लागतील . वर्ग १ वारस मयत असतील तर , अश्या वारसांचे , वारस यांची नावे लागतील .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दिनेश दाभोलकर
21-12-2019
dabholkar.dinesh@gmail.com
आमच्या फेरफार मध्ये एका विक्तिचे नाव डी ए बोर्डच्या नियम प्रमाणे कमी झाले . या वर मला खालील प्रश्नावर मार्गदर्शन करावे हि विनंती
1) डी ए बोर्ड म्हणजे काय ,
Question by दिनेश दाभोलकर
21-12-2019
dabholkar.dinesh@gmail.com
१९५८ वर्षाची किंवा त्या आधीची एखादी फेरफाराची हिस्टरी फाईल जर तलाठी ऑफिस किंवा तहसीलदार ऑफिस ला मिळत नसेल तर ती कुठे शोधावी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3400 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
