जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by दिपक अरविंद डुबल
16-02-2020
dubalsarkar43@gmail.com
नमस्कार सर माझे पणजोबांना दोन मुले होते.त्यातील 2 नंबरचे हे माझे आजोबा आहेत तर माझे आजोबा हे 1952 मध्ये कामासाठी मधप्रदेश मध्ये सरकारी(ministry of defence) नोकरीत रुजू झाले व 1984 ला तेथेेच रिटायर्ड झाले. व माझे आजोबा डिफेन्स मध्ये नोकरी वर असताना.1952 साली आजोबांचे मोठे बंधू(ऐकूम्या) आणि आजोबां चा चुलत भाऊ यांच्यात satara court त वाटपाचा स्पे.अ. न. ने दावा होऊन court ने माझे आजोबाना 4आने व आजोबांचे मोठे बंधू(ऐकूम्या )4आनेआणि चुलतभाऊ याना 8आणे प्रमाणे वाटप केली.पुढे जाऊन त्या वडिलोपार्जित मिळकतीत कुळा ने 32 ग करून आजोबांचे मोठे बंधू व चुलतभाऊ यांना नोटीस देऊन कुळाने खरेदी केल्या. त्या वेळी माझे आजोबा मध्यप्रदेश येथे डिफेन्स मध्ये रुजू होते .आणि कुळा ने माझे आजोबा व त्यांचे वारसास32ग करताना आज पर्यंत कुठल्याही नोटीस नाहीत .पण वाटपाने 1952 लाच कोर्टात आम्ही 4आणे प्रमाणे आम्ही मालक असताना कुळाने आमचा पण हिस्सा 32ग ने घेतला आहे. नंतर माझे वडील सुद्धा 1982 (ministry of defence)मध्ये रुजू झाले व 2007 ला रिटायर्ड झाले त्या मुळे आमच्या दोन पिढ्या ह्या सरकार च्या सेवेत गेले. गावाकडे आमची वडिलोपार्जित जमीन कुळाला गेल्याने. आज ही आमच्या 3 पिढया भूमिहीन आहोत व आम्हाला उदर निर्वाह चे कोणतेही साधन नाही.आज आम्ही मोलमजुरी करून पोटाची खळगी भरत आहोत .तर आम्हाला सरकार कडून पुनर्वसन होहिलं का व आम्हाला आमची वडिलोपार्जित शेत जमीन मिळेल का
टीप:-1)जेव्हा 32 ग झाले तेव्हा आम्हाला कोणतीही नोटीस बजावली नाही.
2) कोर्टात वाटपाने जो हिस्सा आम्हाला धीला पण पुढे 7/12सदरी आजोबा चे मोठे बंधू व चुलतभाऊ यांच्याच नावाची नोंद केली आमचे आजोबा चे नावाची कोठेही नोंद नाही .
३२ ग किंमत निश्चित झाली तो आदेश अहवानीत करणे आवश्यक होते . आता कालावधी खूप झाला आहे . त्यामुळे अपील दाखल करण्यास झालेला विलंब प्रांत अधिकारी यांनी मान्य केला तर आपले अपील दाखल होऊ शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by NILESH GAVIT
16-02-2020
nileshg592@gmail.com
सर मी निलेश गावित आहे माझा प्रश्न असा आहे की .
माझ्या पणजोबा चे आजोबांचे नाव मोजाजी होते .त्यांना 6 मुले होते .पणजोबा चे वडील क्रमांक 3 चे वरील 6 पैकी 5 मुलांचा वाट्याला जमीन वाटली गेली पण . क्रमांक 3 चा मुलाचा जमीन दिली नाही ..मी क्रमांक 3 चा पिढीत जन्माला आलो .पणजोबा ,आजोबा यांनी पाठपुरावा केला असता .वरील वारसदारांनी मारझोड करून पळवून लावले .ते बजुचाचा गावात जाऊन वास्तव्य करू लागले . पण आता ,पणजोबा चे आजोबा, पणजोबा., आजोबा हे सर्व आता मयत आहे ,माझ्या पापा नीही प्रयत्न केला असता आजोबा वरले तेव्हा ते 10 वी ला होते .म्हणून राहून गेले प्रयत्न करायचे .पण आता मी मागील 50 वर्षाचे फेरफार काढले असता .क्रमांक 3 चा मुलाचे नाव कुठेच दिसून आले नाही.पुरावा म्हणून आता काय करता येईल .की मग मी या पिढीत जन्म घेतला नाग. म्हणून शांत बसू .. मला मार्गदर्शन करावे सर
Question by सचिन त्र्यंबक जावळे
16-02-2020
sachin19121981@gmail.com
माननीय महोदय,
सप्रेम नमस्कार,
मला सात बाराच्या उताऱ्यामध्ये खासरा नंबर कुठे असतो,त्याबद्दल माहिती हवी आहे.
Question by भुजंग साखरे
16-02-2020
bhujangsakhare@gmail.com
सर माझी जवळा शिवारात शेत जमीन असून मला दुधना नदी पत्रातून पाणी घेण्यासाठी वीहिर किंवा खडा घेण्यासाठी
दुसरा शेतकरी अडवणूक करत आहे नदी मध्ये माझी जमीन आहे किंवा ताबा सांगतो तर मी काय करायला पाहिजे?
जेथे विहित आपणास खोदायची आहे ती जागा आपले मालकीची आहे का ? आपले मालकीची जागा असेल तर आपण विहीर आपण महाराष्ट्र भू जल ( विकास व व्यवस्थापन ) कायदा २००९ च्या अधीन खोदु शकता .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by नवनाथ नारायण माली
15-02-2020
Navnath 852@Gmail.com
महोदय मी स्वतंत्र प्लाट खरेदी केला आहे मला अगोदर स्वतंत्र नावाचा 7/12 उतारा मिळत होता आता ई-उतारा तो पण आता 8 लोकांचा सामाईक उतारा मिळतो तहसीलदार साहेब यांना दोन वेळेस अर्ज दिला तरी न्याय मिळाला नाही
Question by सागर
15-02-2020
sagarkandekar1990@gmail.com
महोदय ,
Power of Attorney Act , 1882 नुसार 100 रु.पेक्षा जास्त मालमत्ताचे कुलमुखतीयार पत्र हे नोंदणीकृत असले पाहिजे पण त्रयस्थ व्यक्तीने जमीन हि जर नॉटरी कुलमुखतीयर खोट्या साह्य करून व नंतर त्याच नॉटरी कुलमुखतीयरच्या आधारे रजिस्टर खरेदी खत्ताने परस्पर विकली असेल तर Specific relief act खाली दावा टाकून खरेदी Null and Void करून मिळेल का?
किंवा आम्ही आमचा जमीन मोबदला व्याजा सकट मिळवू शकतो का?
Question by रोहिदास हरिभाऊ काळे
14-02-2020
rohidaskale19@gmail.com
आदरणीय मोहदय,
सरकारने जाहीर केलेली कर्ज माफी हि गाव स्तरीय पत संस्था व विकास सोसायटी यांच्या मार्फत घेतलेले कर्ज हे माफ होण्यास लागू होते काय?
कर्जाची रक्कम व त्या बरोबर असणारे पत संस्थेचे प्रतिनिधी यांचे नाव ७/१२ (इत्तर अधिकार) वरून कमी होईल का?
७/१२ वरील इत्तर अधिकारातील पत संस्था व त्यांचे प्रतिनिधी यांचे नाव कमी करण्यासाठी मार्गदर्शन करावे हि विनंती.
आपला कृपाभिलाषि,
रोहिदास काळे
Question by Subodh Yadre
14-02-2020
yadre86@gmail.com
महोदय,
मी सुबोध यद्रे, राजापूर, रत्नागिरी, माझ्या आजोबांचे वडिलोपार्जित जमीन आहे, त्यांना २ मुलगे आणि १ मुलगी हयात आहेत. आजोबांचा मृत्यू झाल्यानंर वारस तपासात माझ्या मोठया चुलत्याने ज्या जमिनी फक्त आजोबांच्या नावे होत्या त्यांच खाते वेगळे करून ते स्वतःच्या नावे केले आहे, आणि इतर सामायिक जमिनी आहेत त्याच्या सातबाऱ्यात सगळ्या भावंडांची नावे लावली आहेत, परंतु त्यांच्या नावे ज्या जमिनी आहेत त्या सुद्धा सगळ्याच्याच आहेत तर या वर कायदेशीर काय करता येईल कृपया मार्गदर्शन करावे.
आपण ज्या फेरफाराने आजोबांच्या जमिनी चुलत्याच्या नावे झाले आहेत तो फेरफार अहवाणीत करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Subodh Yadre
14-02-2020
yadre86@gmail.com
महोदय,
मी सुबोध यद्रे, राजापूर, रत्नागिरी, माझ्या आजोबांचे वडिलोपार्जित घर आहे, आजोबांचा मृत्यू झाला आहे, त्यांना २ मुलगे आणि १ मुलगी हयात आहेत. त्याचप्रमाणे मोठा मुलगा म्हणून माझ्या मोठ्या चुलत्याचा नावावर ते घर झाले आहे, म्हणून आम्हाला ते माझ्या वडिलांच्याहि नावे करायचे आहे, म्हणजेच घरपट्टी मध्ये अ आणि ब करायचे आहे. त्यासाठी ग्रामपंचायत मध्ये संमती पत्र मागितले आहे, परंतु चुलता ते द्यायला तयार होत नाही आहे ( सही करायला येत नाही आहे ). तर यावर कायदेशीर काही उपाय करता येईल का, याचे मला मार्गदर्श्न करावे हि विनंती.
माझ्या आत्याला घरात हिस्सा नको आहे तसेच सदर जमीन हि तिघांच्या नावर आहे.
आजोबांचे मृत्य नंतर केवळ आपल्या वडिलांचे भावाचे नाव दाखल करण्यात आले आहे . आपले वडील वारस असून हि त्यांचे नाव घराला लावले नाही . ग्राम सेवक यांनी चुलत्यांना नोटीस काढणे आवश्यक आहे . चुलते यांनी त्यावर जरी संमती दिली नाही तरी , ग्राम पंचायतीने , आपले वडील वारस असल्याचे पुरावे पाहून आपले वडिलांचे नाव दाखल करणे आवश्यक .
सदरची बाब गट विकास अधिकारी यांचे निदर्शनास आणून दया
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुशील
13-02-2020
sushilk22@gmail.com
नमस्कार सर माझे आजोबाचे ८ मुले होती व त्यांना दोन ठिकाणी जागा होत्या त्यांतील एक राहते घर व दुसरी संपूर्ण मोकळी जागा होती मोकळ्या जागेपैकी माझ्या आजोबांनी माझ्या वडिलाच्या नांवावर ग्रामपंचायत कार्यालयात त्यातील काही जागा नमुना न ८ ला करून दिली व त्यानुसार माझ्या वडिलांनी रीतसर बांधकाम परवाना काढून 30 वर्षापूर्वी घर बांधले आहे व आम्ही त्याची घर पट्टी भरत असून आमची मालकी आहे अडचण अशी आहे कि आता आजोबा नाहीत आणि pr कार्ड काढले असता त्यावर अजून आजोबांचे नाव आहे तर मी माझे तेवढे क्षेत्रापुरते pr कार्ड ला कश्या प्रकारे लावू शकतो आणि आता बाकीच्या काकांनी विरोध केला तर मी कोर्टात adverse possesion चा दावा कसा दाखल करू शकतो किंवा आणखी काही मार्ग असल्यास सुचवणे
Question by जहीर मणेर
13-02-2020
jjfoodsindia@gmail.com
प्रादेशिक योजना मंजूर असलेल्या नगरपंचायत क्षेत्रात 1.5 गुंठे क्षेत्राची खरेदी होवु शकते का ? तुकडेबंदी अधिनियम लागू शकतो का?
नवीन कायदा दुरुस्ती नुसार ज्या ठिकाणी प्रादेशिक योजना मंजूर व प्रसिद्ध झालेली आहे त्या ठिकाणी तुकेबंदी कायदा लागू नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by भगवान तबाजी शिंदे
12-02-2020
ajayshinde333@gmail.com
नमस्कार साहेब मी भगवान तबाजी शिंदे माझी आव्हाट ता राजगुनगर खेड पुणे येथे माझी वडिलपार्जित जमीन आहे त्या मध्ये माझी महार वतनाची जमीन आहे त्या जागेवर आधीच केंद्र दवाखाना बांधला होता व आता त्या जागेच्या बाजूला आणखी वॉल कंपाउंड चा बांधकाम करत आहे पण मी व माझा वडीलनी असा कोणताच बक्षीस पात्र बनवून दिला नाही ग्रामपंचात मध्ये व ग्रामसेविका सोबत मी विचारणा केली असता कोणताही पत्र मिळालं नाही हि जमीन मला कशी परत मिळेल व योग्य मोबदला कसा मिळेल कृपया करून मार्गदर्शन करावे
सदरची जमीन आपले मालकीची आहे का ? जर आपल्याला जमीन ती वतन जमीन म्हणून दिलेली असेल तर , प्रथम ज्या विभागाने त्या जागेवर दवाखाना बांधला आहे त्यांना वकील मार्फत नोटीस द्या व जमीन वापराबाबत नुकसान भरपाई मागा . तीच प्रक्रिया हॉल ज्या विभागाने बांधला आहे त्या विभागास हि नोटीस द्या . संबंधित विभाग प्रमुख यांना भेटा
नोटीस ला जर काही प्रतिसाद मिळाला नाही तर आपणास न्यायालयात जावे लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मंगेश
12-02-2020
mangesh2015@gmail.com
मा. महोदय साहेब
माझे नाव . मंगेश लक्ष्मण कुंडे आहे
माझ्या आजोबाच्या नावे ४० एकर जमीन होती पण सन (१९५९ ) ला माझ्या आजोबांचे निधन झाले.त्यांच्या निधनानतर माझ्या आजीचा नाव सात बारा मध्ये लागला आजीचा नाव सातबारा मध्ये एकत्र कुटुंब प्रमुख म्हणून लागले होते कारण आमच्या परिवारामध्ये माझी आजीचं सर्वात मोठी होती. त्यामुळे तिचा सात बारा मध्ये नाव लागले होतेआजोबा नंतर आजीचा फेरफार झाला तेंव्हा ( हिस्सा न . ० ) असा होता . १९७२ मध्ये आमच्या जमिनी मध्ये (हिसा न. १ ) झाला आणि त्या जमिनी मध्ये आणखीन १५ नावे लागली आणि ती नावे माझ्या कुटुंबातील नसून गावातील आहेत आणि त्यांनी गट स्कीम मध्ये १९७२ साली नावे लावून घेतली आहेत.
माझ्या आजी मयत झाल्यानंतर तिच्या मुलांची नवे सातबारावर लागणे गरजेचे आहेत ती नावे सुद्धा लागली नाही आहेत आम्ही त्या लोकांना विचारले असता ते बोलले कि तुमची नावे नाही आहेत काही करायचे ते करा तुमच्या आजीचा नाव जमीन कसत नाही म्हणून कमी केले आमच्या फॅमिली मध्ये यांची नावे कशी लागली साहेब
१) एकत्र कुटुंब प्रमुख आजीचे नाव होते तेंव्हा (हिसा न. १ ) झाला तेंव्हा आजीच्या मुलांची नावे न लागत इतर १५ लोकांची नावे गट्स्कीम मध्ये कशी लागली ती आमच्या फॅमिली व्यतिरिक्त इतर लोकांची लागली आहेत त्या साठी काय करावे लागेल १९५६ चा उतारा काढला तेंव्हा फक्त माझ्या आजोबाचा आणि आजीचा सातबारा मध्ये नाव आहेत पण नंतर नवीन सातबारा मध्ये माझ्या कुटुंब मधील कुणाची नावे लागली नाहीत सर काय करावे लागेल
सर्वप्रथम इतर १५ लोकांची नावे गट्स्कीम मध्ये ज्या फेरफार नोंदी ने लागली त्यावर संबंधित मा. उपविभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी) यांचे कडे अपील दाखल करावी
Reply by श्री.पी.एम. गड्डम | नायब तहसीलदार
Question by Mahesh Maske
12-02-2020
maheshmaske86@gmail.com
नमस्कार सर, विभागीय आयुक्त पुणे यांनी आदेश दिला त्या आदेशास अपिल कोणाकडे करावयाचे सल्ला द्या.
मा विभागीय आयुक्त यांनी कोणत्या कायद्याखाली आदेश दिला आहे त्या वर अवलंबून आहे . जर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम या खाली निर्णय दिला असेल तर अपील , शासनाकडे करावे लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Nikesh A Devakate
10-02-2020
nikeshdevakate@gmail.com
sir maharashtra nagri seva raja niyam 1981 madhil rajeche namune namuna 3,4,5 ya madhe kahi badal zale aahe kay
Question by विशाल
10-02-2020
rolexvishal@gmail.com
नमस्कार ,
माझे वडील २००५ साली मयत झाले त्यांचा परिवार पुढीलप्रमाणे २ पत्नी पहिल्या पत्नीला २ मुले .दुसऱ्या पत्नीला १ मुलगा मी .वडिलांनी त्यांच्या नावाची २.५ एकर जमीन माझ्या आईच्या नवे २००३ साली केली .७/१२ वर आईचे नाव आले.२००५ साली वडील मयत झाले त्यानंतर २.५ एकर सोडून बाकी जमिनीवर दोन्ही पत्नीचे व आम्हा ३ ची नावे अली .२०१६ माझ्या आईचा अकस्मात मृत्यू झाला व आईचे नाव २.५ एकर सोडून बाकी जमिनीवरून कमी झाले.आई च्या नावे जमीन जमीन अधिनियम ८५ प्रमाणे २००३ साली झाले होते .तयारी जमीन नावे करण्यासाठी काय करावे लागेल ? त्या २.५ एकर वर बाकी सावत्र भावांचे व सावत्र आई चे नावे लागतील का?ज्या जमिनीवर सगळ्यांची नावे आहेत त्या जमिनीची वाटणी कशी होणार ?जमीन वडिलोपार्जित आहे .
धन्यवाद
२.५ एकर जागा वडिलांची स्व कष्टार्जित होती का वडिलोपार्जित होती ? स्व कष्टार्जित असेल व नोंदणीकृत दस्ताने आपले आईचे नावे विक्री केली असेल तर या मिळकतील आपल्या सावत्र आई चे व सावत्र भावाचे नाव लागणार नाही .मात्र जर जमीन वडिलो पार्जित असेल तर , वडिलांना सर्व २.५ एकर जागा विकण्याचा अथवा आपले आईचे नावे करण्याचा कोणताही अधिकार नाही . वडिलोपार्जित मिळकतीत त्यांचा जेवढा हिस्सा असेल तेवढाच विकण्याचा हक्क आहे होता ,. म्हणजे वडील यांचे शिवाय त्या मिळकतीत आपले दोन सावत्र भाऊ . आपण व वडील यांचा प्रत्येकी १/४ हिस्सा होता . वडील केवळ तेवढाच हिस्सा ( १/४) आपले आई चे नावे करू शकले असते .
दुसऱ्या मिळकतीवर आपले नाव आहे मात्र आईचे नाव कमी झाले आहे . हिंदू विवाह कायद्यानुसार , दुसऱ्या पत्नीला पतीच्या मिळकती मध्ये कोणताही हक्क नसतो . मात्र दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या अपत्यास मालकी हक्क प्राप्त होतो . त्या मुले आपले नाव अगोदरच लागले आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विशाल
10-02-2020
rolexvishal@gmail.com
नासिक मध्ये आई च्या नावे फ्लॅट आहे (नासिक रोड )परंतु माझ्याकडे ओरिजिनल कागतपत्र नाहीत तसेच सोसायटी चे कागतपत्र नाही तरी डुप्लिकेट खरेदी खात व इतर कागतपत्र मला कसे व कुठे मिळतील?
Question by गणेश शिंदे
10-02-2020
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,सन १९५६ मध्ये एका डोंगराचे रजिस्टर खरेदीखत करून घेतले होते.व त्यात ताब्याबाबत न्यायालयात दावा दाखल करून ताबा घ्यावा.असे नमूद करण्यात आले होते.परंतु ७/१२ सदरी खरेदी घेणाऱ्याचे नाव दाखल झाले.त्यानंतर न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर दावा फेटाळण्यात आला.अशा वेळी इतर हक्कात जे सर्वसाधारण कुळ होते त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून ७/१२ च्या कब्जेदार सदरी एकतर्फी आदेशाने नावे ७/१२ च्या कब्जेदार सदरी लावून घेतली.वास्तविक डोंगरावर कोणाचीच वहिवाट नव्हती.अशा वेळी सदरचे बिनकब्जाचे खरेदीखत उपयोगी आहे किंवा नाही?कारण सदर डोंगर आता भूसंपादनात जाणार आहे.खरेदीखताच्या आधारे मोबदला मिळू शकेल?किंवा कसे?कारण आज रोजी ७/१२ सदरील नावास कंस झाला आहे.कृपया मार्गदर्शन होनेस विनंती....
१९५६ साली डोंगर खरेदी करण्यात आला होता त्या वेळी डोंगर कोणाचे मालकीचा होता ? जर सरकारी मालकी असेल तर काहीही उपयोग होणार नाही .
१९५६ साली डोंगर जागेबाबत न्यायालयात वाद चालू होता का ?
आपण ज्यावेळेस प्राथमिक भू संपादन ( Preliminary Notification/notice ) सूचना प्राप्त होईल त्यावेळेस आपण आपली हरकत नोंदवा . जेणेकरून नुकसान भरपाई वाटप या वेळेस संबंधित भू संपादन अधिकारी आपली हरकत विचारात घेतील व आपण डोंगराचे मालक असाल तर , आपणास नुकसान भरपाई देतील .
नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपणास आपली मालकी सिद्ध करावी लागेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संकेत प्रल्हाद भापकर
09-02-2020
sanketbhapkar@gmail.com
आमच्या आई-वडिलांनी 2010 साली जमीन खरेदी केली,परंतु जुन्या मालकाचे नाव इतर अधिकारात होते.याबाबतच्या फेरफारात 'एकत्रीकरण कायद्याविरुद्ध व्यवहार सबब रद्द खरेदी घेणार्यांची नावे इतर हक्कात नोंदवा दि. ०८/०८/९७' अशी नोंद आहे.सदर जमीन ही रहिवासी झोन मधील असून सुद्धा असा शेरा आला.त्यामुळे आमचे ७/१२ मध्ये नोंद करण्याआधी जुन्या मालकाचे नाव काब्जेदर मध्ये येन्यासाठी कुणाला अर्ज करावा त्याची काय प्रक्रिया आहे सविस्तर मार्गदर्शन करावे.
Question by विनोद रणदिवे
09-02-2020
vinodrandive85@gmail.com
सर, आमच्या भोगवटादार वर्ग 2 जमिनीवर वडिलांच्या आत्यांची नावे मागील 20 वर्षांपासून आहेत. आत्याचा मृत्यू होऊन 15-20 वर्ष झालेली आहेत. आम्हाला उताऱ्यावरील नावे काढून टाकायची आहेत. आत्याची मुलेही त्यासाठी तयार आहेत. आम्हाला त्यांच्याकडून हक्कसोड पत्र करता येईल का ? त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया कशी आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
Question by रवी रणदिवे
09-02-2020
vinodrandive85@gmail.com
सर, आत्या 15 -20 वर्षांपूर्वी मरण पावल्या आहेत. त्यांच्या मुलांकडून हक्कसोड पत्र करता येईल का? नावे मागील 20 वर्षांपासून उताऱ्यावर आहेत. जमिन वर्ग 2 ची आहे कुळकायद्य्याने मिळालेली. त्यासाठी कशी प्रोसिजर आहे.कृपया माहिती द्यावी.
Question by सागर पाटील
08-02-2020
sagarpatil3696@gmail.com
सर सर्वे नंबर वरुण रस्ता मिळवा यासाठी आम्ही वकिला मार्फत तशीलदारा कडे केस दाखल केली असून केस चालू आसताना त्या सर्वे नंबर वरील इसमाने तो रस्ता बंद केला आहे ( रसत्या मध्ये चर मारली आहे ) तर त्या इसमावर कायदेशीर कारवाई कोणती करावी
Question by NILESH GAVIT
08-02-2020
nileshg592@gmail.com
सर मी निलेश गावित मी आदिवासी समाजातील आहे.आमची वडिलोपार्जित जमीन आहे .पण आमचा वाट्याला आलेली नाही .
एम.गावित यांना ६ मुले होते .त्यातील सर्वांकडे जमीन आहे मात्र क्रमांक ३ चा मुलाला जमीन दिली नाही .मी क्रमांक ३ च्या ४ थी पिढीचा वारसदार आहे .याआधी पणजोबा.आजोबा .यांनी जमीन मिळवण्या साठी प्रयत्न केला पण .त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने प्रकरण दाबले व पंजोबाला मारझोड करून गावातून पळवून लावले काही कालावधीने मृत्यू झाला ,या भीतीने आजोबाने हि बाजूचे गावात वास्तव्यास गेले,व आजोबा काही वर्षांनी मृत पावले ,१९८० साली माझ्या पापांनी जमीन मिळविन्या साठी तहसील कार्यालयात अर्ज केला पण पैशांचा जोरावर प्रकरण दाबले गेले.त्या प्रकरण नंतर पप्पांना समजोता करून आमची जमीन ज्याचा कडे आहे त्यांनी जमीन देण्याची हमी दिली,पण त्या आधीच आजोबा वारले , त्यावेळी पप्पा १०वी ला होते वयाने लहान पडले व त्यांनी पापांना जमीन दिली नाही.ते पैशांचे जोरावर प्रकरण दाबून देतात.माझी जमीन वरिल क्रमांक २ वारसा कडे आहे .मि ४ थ्या पिढीचा वारसदार आहे.मला आता ती जमीन मिळवायचीय .काय कायद्याने ती जमीन आताहि मी मिळवू शकतो का? मला ४०/४५ वर्षांचा जुना रेकॉर्ड भेटू शकते का ? मी आजही त्या पिढीचा वारसदार आहे का सर ? मला ती जमि मिळवण्या साठी काय करावे लागेल माहिती मार्गदर्शन करावे
Question by Balu
08-02-2020
baluthorat@gmail.com
एकत्रित कुटुंबाची जमिन फाळणी बाराने मूळ खातेदारास २ मुले वारस असतानि एक मयत आहे त्याची नोंद नाही आणि फाळणी बाराने एका मुलाच्या नावे १६ एकर व मयत मुलाच्या मुल्घ्याच्या नावे ४ एकर लागली आहे आणि ३ सर्वे नंबर ला ८ आणे हिस्सा दाखवत आहे तर चुकीच्या फाळणी बाराची दुरुस्ती कशी करायची ? ( मूळ खातेदाराची वारस नोंद फेरफार दाखवत नाही )
Question by नांव संदीप मारुती पतांगे
06-02-2020
sandeep.patange111@gmail.com
सर नमस्कार ,
सर माझ्या आजोबांनी कुळ कायद्यात जमीन कसून मिळवली होती , आजोबांचा म्रुत्यु सन 1981 साली झाला , त्या नंतर वारस म्हणून 3 मुळे व 1 मुलगी म्हणून नोंद झाली ,
जमीन ही आत्याच्या , काकांच्या व वडिलांच्या नांवे होती , कुळ कायदा हा शेरा कमी झाला नव्हता ,
एका खरेदी दाराला ती जमीन पाहिजे होती म्हणून त्या खरेदी दाराने , वरील वारसांना घेऊन ती जमीन विकत घेतली , वरील वारसाची मुळे ही 18 वर्ष पूर्ण होती ,
खरेदी दाराला ती मुळे जमीन विकत नव्हती म्हणून त्यांने त्याच्या वडिलांन कडून जमीन विकत घेतली , वडिलोपार्जित जमीन होती वारस हक्का प्रमाणे नातवानांची सहमती घेतली नाही , नातवंडाचे नुकसान झाले आहे ,
काय करावे , सर सांगा , व वडिलांनी जमीन विकल्या मुळे वडिलांचे काही दुखापत होऊ शकेल काय ,
माहिती द्या सर , भरपूर उपकार होतील आपले , आजोबांच्या नातवंडान वर व त्यांच्या लहान लहान मुलानं वर , माहिती द्या सर काय करू ,
आजोबा या मिळकतीचे कुल होते . आजोबांचे पश्श्चत आपल्या वडिलांसह दोन काका ( चुलते ) व आत्याचे नाव मिळकतील लागले . वडिलांनी ती जमीन त्रयस्थ व्यक्तीस , वरील वारस यांचे वारस यांची संमती न घेता विकली त्या मुले आपले नुकसान झाले असा आपला प्रश्न आहे .
नातवंडांची संमती घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
