जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by MAHADEV GHOSALKAR
23-10-2019
manjulaghosalkar@gmail.com
माझे वडील १९९८ ला वारले ,मला आई व ३ बहिणी आहेत ,त्यात १ व २ बहिणी चे लग्न नाही झाले , ३ नंबर बहिणीचे लग्न झाले आहे ती चे नाव ७/१२ मधून काडून टाकाय चे आहे ती ची मुले हक्क सोड पत्र करून देण्या साठी नकार देत आहे . तर काय करावे लागेल ?
१] हिंदू उत्तराधिकारी अधिनियम २००५ वापर होईल का ?
२] शेत जमीन न देता मोबदला किती द्यावा व ते कुठून माहिती करावे ,ते दलाला मार्फत मोबदला खूप मागत आहेत ?
३] कोर्टात न जात काय करावे लागेल ?
२००५ चा कायदा , वाटपासाठी लागू आहे . नाव कमी करता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दीपक Bandivadekar
22-10-2019
poisar.r@gmail.com
नमस्कार सर,
माझ्या मालकी हक्काच्या मिळकतीत एका गावगुंड्या ने अतिक्रम करून माझा रहदारीचा रस्ता बंद करून माझी ६ गुंठे जमीन बळकावली , या संबंधी मी तहसील कार्यालयात सर्व जमिनीचे व अतिक्रमण झाल्याचे व हद्द मोजणीचे पुरावे दाखल करून तक्रार केली , तहसील कार्यालया मार्फत चौकशी करून सदर कुंपण काढून टाकण्या बाबत त्याला आदेश देण्यात आला , आदेश देऊन २ वर्ष झाली पण त्याने कुंपण काढले नाही , या कालावधीत मी दोन वेळा पोलिसात तक्रार केली, पण पोलिसात येऊन " मला तहसीलदार कार्यालयाचा आदेश मिळालाच नाही ,आदेश मिळाला की मी कुंपण काढून टाकेन " अशी कबुली जबाब त्याने दिला , आत्ता मी या गावगुंड्या ला तहसीलदारां मार्फत मिळालेलं पत्र त्याच्या सही सहित माहिती अधिकारात काढले आहे , पोलिसात दिलेला कबुली जबाब सुद्धा काढला आहे , पुढे काय करायचे ते कृपया मार्गदर्शन करा .
आपला अडवलेले रास्ता , पुन्हा पोलीस बंदोबस्तात , तलाठी यांचेकडून कडून मोकळा करून घ्या
पोलीस यांना खोटी /चुकीची माहिती दिली अशे आपले म्हणणे असल्यास , आपले इच्छे नुसार पुढील कायदेशीर कारवाई त्या व्यक्ती विरुद्ध करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vishal pawar
20-10-2019
mrvishalpawar4912@gmail.com
सर आमचा गावाला वनीकरण विभागाची जागा आहे
ती जागा आम्हला करारावर किवा भाडे तत्त्वावर पाहिजे
त्या साठी काय करावे लागेल.
सर मदत करा प्लीज.
Question by सीमा साव॔त
19-10-2019
sawantseema176@gmail.com
आदरणीय सर , आमच्या आईच्या नावे अमरावती जिलह्यात जमीन आहे.आईच्या मृत्यून॓तर आम्ही वारस नोंदी साठी तलाठ्याकडे अर्ज व कागदपत्रे दिली.तलाठ्याने सर्व वारसांची नोंद गाव नमुना ६क मध्ये केली व आम्हां सर्व वारसांना नोटिस पाठवली ज्यात कोणाला काही हरकत असल्यास १५ दिवसात कळवावे अन्यता फेरफार मंजूर करण्यात येईल.मला आपल्याला विचारायचे आहे की सदर नोटिस सर्व वारसदारांनी सही करून परत तलाठूयांकडे पाठवणे बंधनकारक आहे का? आम्ही सर्व वारसदार एकाच कुटुंबातील असून मयताशी रक्ताचे नाते आहे व आमचा फेरफार नोंदीस कोणताही विरोध नाही.असे असताना सुद्धा २महिने झाले तरी आमचे नाव ७/१२ ला अजून आले नाही.कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
तलाठी यांनी , सर्व वारस गावात राहत नसतील तर , जागेवर महाराष्ट्र जमीन अधिनियम कलम २३० प्रमाणे जागेवर नोटीस प्रसिद्ध करावी . पंचनाम्याचे ( नोटीस प्रसिद्धी बाबत ) वारस नोंद मंजूर करावी
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by vishal pawar
19-10-2019
mrvishalpawar4912@gmail.com
sir amcha Gavala vanikarn jamin ahe tar ti amala kararaver kiva bhadi ver pahiji tey sati kay karave lagel
Question by Shweta Abhay mangaonkar
19-10-2019
abhay.mangaonkar@yahoo.co.in
नमस्कार सर आम्ही 2011 ला आमच्या जमीनीवर घर बांधले ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन पण ग्रामसेवक अजून मला घरपट्टी भरू देत नाही कारण माझ्याकडे माझ्या आत्यांची संमतीपञक नाही जर शासनाच्या नविन नियमानुसा मी अनिधीकुत घर म्हणून घरपट्टी भरली व नंतर संमतीपञ सादर करून माझ घर नावावर करून घेऊ शकते का?
परवानगी असेल तर , ग्राम सेवक आपणास घर पट्टी भरून घेण्यास नाकारू शकत नाही .
गट विकास अधिकारी यांचे कडे अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by कौनैन शेख
18-10-2019
kaunainshaikh2780@gmail.com
मा. सर,,
नगरपंचायत क्षेत्रात पेसा कायदा लागू होतो का???
''संपूर्ण अनुसिचित क्षेत्र'' याचा अर्थ काय होतो??
नगरपंचायत निवडणुकीत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करताना एकूण सदस्य संख्याच्या 27% जागा राखून ठेवण्यात येतात.
मात्र, संपूर्ण अनुसूचित क्षेत्रा बाबतीत अनुसूचित जाती / जमातीचे सदस्य वगळून,, उर्वरित सदस्य संख्येच्या 27% सदस्य नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात येतात का?? या संबंधी शासन आदेश/माहिती द्यावि.
Panchayat ( Extension to Scheduled Areas) Act हा अद्याप पर्यंत शहरी भागास लागू केला नाही '
अनुसूचित क्षेत्रात ५० % जागा या अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत .
तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर तपासून देतो
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अजित पवार
17-10-2019
ajitdpawar31@gmail.com
एकञीकरण योजनेअंतर्गत गाव फाळणी बारा तयार करताना खरेदीने घेतलेल्या शेतजमिनीचे क्षेत्र कमी झाले असल्यास कोणत्याही कायदेशीर फेरफार जाब जबाब शिवाय केवळ एकञीकरण अधिकारी यांनी फाळणी बारा तयार केला या पञाद्वारे 7 एकर क्षेत्र कमी झाले आहे... तर ते कमी झालेले क्षेत्र मला परत मिळेल का? ?? जर होय तर त्यासाठी मला कोठे कायदेशीर प्रक्रिया करता येईल? ??
Question by अजित पवार
17-10-2019
ajitdpawar31@gmail.com
इतर अधिकारामध्ये विहिर हक्काची नोंद फेरफार ने कमी केली तसा फेरफार तयार झाला व नावाला कंस झाला परंतु सदर फेरफार समोर रद्द चा शेरा दिला 7/12 पञकी फेरफार नंबर लिहला होता त्यावर रद्द लिहिले माञ नावाला कंस तसाच राहिला व नंतर नाव उता-यावरून कमी झाले आहे अशा स्थितीत इतर अधिकारात नाव कायम यावे यासाठी काय करावे.
आपणास इतर अधिकारात जी , विहीर हक्काची नोंद आहे ती कमी करून हवी आहे कि ती कमी झालेली पूर्ववत करावयाची आहे ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
आपणास इतर अधिकारात जी , विहीर हक्काची नोंद आहे ती कमी करून हवी आहे कि ती कमी झालेली पूर्ववत करावयाची आहे ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Shweta Abhay mangaonkar
16-10-2019
abhay.mangaonkar@yahoo.co.in
आम्ही 2011 ला आमच्या जमीनीवर घर बांधले ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन पण ग्रामसेवक अजून मला घरपट्टी भरू देत नाही कारण माझ्याकडे माझ्या आत्यांची संमतीपञक नाही जर शासनाच्या नविन नियमानुसा मी अनिधीकुत घर म्हणून घरपट्टी भरली व नंतर संमतीपञ सादर करून माझ घर नावावर करून घेऊ शकते का?
Question by रवी जाधव
16-10-2019
ravijadhav53@gmail.com
नमस्कार,
गावी वडिलोपार्जित सक्खे चुलत काकांचे मिळून चांगल्या अवस्थेतील घर आहे ते आता माझे काही बंधू घर पडून आम्हा काही बंधूंना तसेच चुलत्यांना विश्वासात न घेता घर बांधत आहेत. काही बंधूंची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे नवीन घरात त्यांच्या नावावर एकही खोली नाही आहे. तसेच एक बंधू बाहेरगावी असल्यामुळे त्याला या नवीन घराची काही कल्पना नाही आहे.
सात बारवर सर्व काकांची नावे आहेत. सर्व बंधूंना तसेच चुलत्यांना विश्वासात न घेता घर बांधणे बरोबर आहे का ?? तसेच वडिलोपार्जित घर पडून नवीन घर बांधतेवेळी ग्रामपंचायतीकडून कोणती परवानगी घ्यावी लागते ? सात बारावरील सर्व सभासदांची नवीन घर बांधण्यासाठी परवानगी घ्यावी लागते का ? ग्रामपंचायत सर्वांची संमती न घेता घर बांधण्यास परवानगी देऊ शकते का ? दिली असल्यास इतर भावंडानी काय करावे ?
कृपया आपण मार्गदर्शन करावे.
घर गावठाणात आहे का ? कि घर शेतामध्ये ( सर्वे नंबर मध्ये ) आहे ?
घर बांधण्यासाठी नियोजन प्राधिकरणाची परवानगी आवश्यक आहे .
गावठाण क्षेत्रात , ग्राम पंचायतीची व इतर ठिकाणी ग्रामीण भागात जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे .
बाहधकामास परवानगी घेतली नसल्यास , आपण स्थानिक नियोजन अधिकारी यांचे कडे तक्रार दाखल करू शकता . जर परवानगी दिलेली असेल तर , स्थानिक नोयोजन प्राधिकारी यांचे निदर्शनास , जेजेच्या मालकी हक्क बाबत वस्तुस्थिती निदर्शनास आणून देऊ शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by आदित्य अशोक गायकवाड
15-10-2019
adityaashokgaikwad1991@gmail.com
महोदय, आमचे दिवाणी कोर्टाच्या हुकूमनाम्याने वाटप झाले होते. परंतु दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम ५४ अनुसार काहीही कार्यवाही न करता तत्कालीन तलाठी व मंडळाधिकाऱ्यांनी राजपत्रित अधिकाऱ्यांचे म्हणजे तहसीलदार यांचे अधिकार वापरून सदर हुकूमनाम्याची फेरफार नोंद घेऊन तो फेरफार प्रमाणित केला. आम्ही सदर फेरफार नोंदीवर हरकत घेऊन नोंद मान्य नसल्याचे सांगितले. तरीही मंडळाधिकाऱ्यांनी सदर फेरफार प्रमाणित केला. माझा प्रश्न आहे कि, वरीलप्रमाणे झालेले कामकाज कायदेशीर आहे का? कारण माझ्या वाचनात असे आले आहे कि, दिवाणी न्यायालयात हुकूमनामा झाला असेल तर त्याची पुढील कार्यवाही हि तहसीलदार व भूमी अभिलेख विभाग यांनीच दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम ५४ अनुसार व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम ८५ अनुसार करायची असते. माझा अजून एक प्रश्न आहे कि, जर तत्कालीन तलाठी व मंडळाधिकाऱ्यांनी केलेले कामकाज हे बेकायदेशीर असेल तर मी पुढे त्यावर कोणती कार्यवाही करावी याबाबतही कृपया मार्गदर्शन मिळावे.
धन्यवाद.
फेरफार आव्हानित करा
कलम २४७ - प्रांताधिकारी यांचेकडे अपील करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by आदित्य अशोक gaikwad
15-10-2019
adityaashokgaikwad1991@gmail.com
महोदय, आमचे दिवाणी कोर्टाच्या हुकूमनाम्याने वाटप झाले होते. परंतु दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम ५४ अनुसार काहीही कार्यवाही न करता तत्कालीन तलाठी व मंडळाधिकाऱ्यांनी राजपत्रित अधिकाऱ्यांचे म्हणजे तहसीलदार यांचे अधिकार वापरून सदर हुकूमनाम्याची फेरफार नोंद घेऊन तो फेरफार प्रमाणित केला. आम्ही सदर फेरफार नोंदीवर हरकत घेऊन नोंद मान्य नसल्याचे सांगितले. तरीही मंडळाधिकाऱ्यांनी सदर फेरफार प्रमाणित केला. माझा प्रश्न आहे कि, वरीलप्रमाणे झालेले कामकाज कायदेशीर आहे का? कारण माझ्या वाचनात असे आले आहे कि, दिवाणी न्यायालयात हुकूमनामा झाला असेल तर त्याची पुढील कार्यवाही हि तहसीलदार व भूमी अभिलेख विभाग यांनीच दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम ५४ अनुसार व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम ८५ अनुसार करायची असते. माझा अजून एक प्रश्न आहे कि, जर तत्कालीन तलाठी व मंडळाधिकाऱ्यांनी केलेले कामकाज हे बेकायदेशीर असेल तर मी पुढे त्यावर कोणती कार्यवाही करावी याबाबतही कृपया मार्गदर्शन मिळावे.
धन्यवाद...
Question by यशवंत विधाते
15-10-2019
yashvidhate111@gmail.com
महोदय, १९९७ रोजी माझ्या वडिलांच्या खोट्या व बनावट सह्या करून व कोणतेही कुलमुखत्यारपत्र दिलेले नसतानाही ते दिल्याचे भासवून आमची जमीन विकली. सदर बनावट खरेदीखतावरून १९९८ रोजी फेरफार नोंद घेतल्यानंतर त्याविरुद्ध आम्ही हरकत घेतल्यानंतर त्यावर तक्रार केस चालून सदर नोंद मंडळाधिकाऱ्यांनी रद्द केली. प्रतिवादींनी मंडळाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरुद्ध कोणत्याही दिवाणी अगर महसुली न्यायालयात अपील केले नाही. त्यांनी पुन्हा एकदा १९९९ रोजी सदर बनावट खरेदीखतावरून दुबार नोंद केली. त्याविरुद्धही आम्ही हरकत घेतल्यानंतर तक्रार केस चालून सदर फेरफार नोंद महसूल न्यायालयाने रद्दबातल केली. आम्हाला आमची जमीन मिळाल्यामुळे आम्ही सदर बनावट खरेदीखत दिवाणी न्यायालयातून रद्दबातल करून घेतले नाही. किंबहुना त्याबद्दल तेव्हा आम्हाला याची माहितीच नव्हती कि बोगस खरेदीखत दिवाणी न्यायालय रद्द करते.आता आमचे वडील हयात नाहीत.
महोदय, याचा गैरफायदा पुन्हा एकदा प्रतिवादींनी घेतला व तब्ब्ल २० वर्षांनंतर पुन्हा एकदा सदर बोगस खरेदीखतावरून तिबार/तिसऱ्यांदा फेरफार नोंद घेतली व यावेळी ती प्रमाणातही केली. यावेळी तलाठी व मंडळाधिकारीही प्रतिवादींबरोबर सामील झाले. कारण त्यांनी आम्हाला कोणतेही नोटीस पाठविले नाही. मी या फेरफारची RTS फाइल मिळवली असता असे दिसून आले कि आम्हाला रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविल्याचे दिसत आहे(जरी ती आम्हाला मिळाली नसेल तरी) परंतु येथे विशेष गोष्ट हि आहे कि, सदर पोस्टाच्या रजिस्टरची पावती पहिली असता असे दिसते कि, मंडळाधिकाऱ्यांनी फेरफार प्रमाणित केल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी नोटीस रजिस्टर पोस्टाने पाठविल्याचे दिसत आहे. म्हणजे हे तर पूर्ण बोगस कामकाज केल्याचे दिसते कारण नोटीस मिळाल्यानंतर १५ दिवस गेल्यानंतर नोंद प्रमाणित करायची असते.
तर महोदय, या फेरफारविरुद्ध मी प्रांतांकडे अपील केले आहे. माझा प्रश्न आहे कि, वर सांगितल्याप्रमाणे एकदा महसूल न्यायालयाने खरेदीखताची फेरफार नोंद रद्द केल्यानंतर पुन्हा त्याच खरेदीखतावरून दुबार/तिबार नोंदी घेता येतात का?? व मी आता अपील केलेली फेरफार नोंद रद्द होईल का??
धन्यवाद...
एकदा नोंद मंजुरी बाबत मंडळ अधिकारी यांनी निर्णय घेतल्या नांतर पुन्हा त्याच नोंदी बाबत निर्णय घेता येत नाही
आपण अपील केले आहे . अपील मेमो मध्ये हे मुद्दे मांडा .
त्याच बरोबर खरेदी खत रद्द करून घ्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Pravin Garud
12-10-2019
Pravingarud76@gmail.com
Dear sir/madam, I want to inquire, for Succession Certificate/legal heirship which documents is required . If name of the Disease is different. in death certificate and 7/12 because of marriage . How we can produce documents to court because marriages done in the year 1950. We don't have any records. Pls suggest and advice suitably. Thanks and Regards Pravin G Kalyan
Succession certificate and Legal Heirship certificate are both different things .
Succession Certificate - It is issued by the Civil Court to the legal heirs of the deceased to establish the identity of the legal heirs to authorise them to inherit debts, securities , funds invested in banks by deceased . The purpose is limited only to get shares , securities and other assets of the deceased .
A succession certificate may be used in situations where banks, financial and private institutions release funds to the nominee (where such nominee is not the legal beneficiary of the asset) and the nominee refuses to cooperate in distribution of the asset to the legal beneficiary. Similarly, a succession certificate may be useful to prove genuineness of the claimant where the inheritance amount is substantial.
Documents required are as follows
1. applicant has to file petition in the court within the jurisdiction where deceased died .
2. Death certificate of the deceased
3. list of other heirs
Legal Heirship Certificate - It is issued to the heirs of the deceased to recognise them as legal heirs of the deceased to inherit the immovable property . In case of the dispute or if there are differing claimants to the property , the issue is determined by the Civil Court by regular trial
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विनोद रणदिवे
12-10-2019
vinodrandive85@gmail.com
सर, आमच्या जमिनीची मोजणी 2009 साली झाली आहे.हद्द कायम नकाशाची क प्रत आमच्याकडून गहाळ झाली आहे.
ती आम्हाला भूमिअभिलेख कार्यालयातून मिळेल का. काय करावे लागेल. आमच्याकडे मोजणी झाल्याच्या पुरावा नाही.
माहिती मिळावी ही विनंती...
Question by विनोद रणदिवे
12-10-2019
vinodrandive85@gmail.com
सर, 1953 साली फ़ॉरेस्ट जमीन माझ्या पंजोबाला अनुसूचित जाती अंतर्गत साऱ्याच्या सहापट रक्कम भरून कायमची जमीन मिळाली आहे. पंजोबाच्या निधनानंतर 1978 मधे वारस म्हणून त्यांची मुले ( म्हणजे माझे आजोबा )सुना, (आजी )आणि नातवंडे (माझे वडील )यांची नावे 7/12 वर लावली आहेत.तेव्हा पंजोबाच्या मुलींनी (वडिलांच्या आत्या ) यांनी नावे दाखल करण्यास नकार दिला.
1978 साली पंजोबाच्या निधनानंतर त्यांच्या तिन्ही मुलींनी नावे वारस म्हणून 1995 साली दाखल केली.त्या आजोबाच्या 3 बहिणींचे (वडिलांच्या आत्या ) निधन होऊन अनुक्रमे 20, 10, 5 इतकी वर्ष झाली आहेत.
त्यांच्या मुलाची नोंद वारस म्हणून लागू शकते का...
1994, आणि 2005 सालचा कायदा याबद्दल काय तरतुदी सांगतो...
त्यांनी दावा केला तर काय होऊ शकते..?
उत्तर मिळावे ही विंनती....
आत्याचे निधन होऊन कितिही दिवस झाले तरी , त्यांचे वारसांची नावे लागू शकतात . त्यांना न्यायायलायात जाण्याची आवश्यकता नाही . प्रांतधिकारी यांचेकडे अपील करून त्यांच्या वारसांची नावे लावता येतील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विनोद रणदिवे
12-10-2019
vinodrandive85@gmail.com
नमस्कार सर, आमची फ़ॉरेस्ट जमीन पुणे विजापूर बायपास मार्गांवर आहे. सरकारी जमीन मोजणी केल्यानंतर रस्त्याच्या पलीकडे आमच्या जमीनीची हद्द 65 ते 70 फुटापर्यंत आहे.
त्या रस्त्याच्या पलीकडचा शेतकरी तुमची जमीन रस्त्यात गेली आहे असे म्हणून बळजबरीने तो पलीकडचा शेतकरी आमच्या त्या 65 ते 70 फूट जमिनीवर रस्त्याच्या कडेला मंगलकार्यालयाचे बांधकाम आमच्या जमीनीवर करत आहे.
आम्हाला धमकावत आहे. आम्ही कोणाची मदत घ्यावी. रस्त्याची भूसंपादन झाल्याची नोंद आमच्या उताऱ्यावर (कजाप )वर नाही. त्या बद्दल आम्हाला माहिती द्यावी.?
रस्त्याची हद्द किती फुटापर्यंत असते? .या बायपासचे भूसंपादन झाले नाही.
भविष्यात रस्ता गेल्यास त्या फॉरेस्ट जमिनीचा भूसंपादनाचा मोबदला आम्हाला मिळेल का..?
आपण शासकीय मोजणी केली आहे . त्या मोजणीच्या आधारे न्यायालयात तुमच्या जागे वर अतिक्रमण करण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी दिवाणी दावा दाखल करा .
जागा तुमची संपादनात गेल्यास , त्याचा मोबदला आपणास मिळेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विनोद रणदिवे
12-10-2019
vinodrandive85@gmail.com
नमस्कार सर, आमची फ़ॉरेस्ट जमीन पुणे विजापूर बायपास मार्गांवर आहे. सरकारी जमीन मोजणी केल्यानंतर रस्त्याच्या पलीकडे आमच्या जमीनीची हद्द 65 ते 70 फुटापर्यंत आहे.
त्या रस्त्याच्या पलीकडचा शेतकरी तुमची जमीन रस्त्यात गेली आहे असे म्हणून बळजबरीने तो पलीकडचा शेतकरी आमच्या त्या 65 ते 70 फूट जमिनीवर रस्त्याच्या कडेला मंगलकार्यालयाचे बांधकाम आमच्या जमीनीवर करत आहे.
आम्हाला धमकावत आहे. आम्ही कोणाची मदत घ्यावी. रस्त्याची भूसंपादन झाल्याची नोंद आमच्या उताऱ्यावर (कजाप )वर नाही. त्या बद्दल आम्हाला माहिती द्यावी.?
रस्त्याची हद्द किती फुटापर्यंत असते? .या बायपासचे भूसंपादन झाले नाही.
भविष्यात रस्ता गेल्यास त्या फॉरेस्ट जमिनीचा भूसंपादनाचा मोबदला आम्हाला मिळेल का..?
Question by Sadik
11-10-2019
ssadikmmulla@gmail.com
सर 1993 मध्ये भोगावतादार वर्ग 2 च्या जमिनीच्या इतर हक्कमध्ये पुनर्वसन कायदा 1986 कलम 12 नुसार हस्तांतरण करण्यास बंदी असा शेरा आहे तरी तो शेरा आजपर्यंत कायम आहे।
तरी अशी जमीन विकली असल्यास त्याच्यावर आपण कार्यवाही करू शकतो का व खरेदीपत्र रद्द होऊ शकेल का
पुनर्वसन कायद्याखाली जमीन दिलेली असल्यास त्या वरील हस्तांतनाचे निर्बंध दूर करण्यात आले आहेत . त्यामुळे जमीन विकली असेल तर काही करता येणार नाही .
मात्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत दिली असल्यास , अनार्जित रक्कम व दंड वसूल होतो अथवा जमीन शासन जमा होऊ शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पंकज कागणे
07-10-2019
pankajkagane@gmail.com
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की, A व B हे दोन कर्मचारी आहेत जिल्हातील जेष्ठतेमध्ये A कर्मचारी सिनियर आहे. दोघेही दुय्यम सेवा परीक्षा व महसूल अहर्ता परीक्षा उतीर्ण आहेत आणि A कर्मचारी यांचे CR खराब आहेत A कर्मचारी मागासवर्गीय आहे. A कर्मचारी यांची जेष्ठता डावलून B कर्मचार्यास पदोन्नती देण्यात येईल का सर असे नियमात बसते का सर कृपया याबाबत मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
Question by Nandu Shelake
07-10-2019
nsshelake9@gmail.com
नमस्कार सर,
मी भूमिहीन शेतमजूर आहे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर शेत जमीन (मालमत्ता) नाही. आम्ही ज्या शेत जमिनीत वस्ती करून राहात आहोत (७० वर्षाहून अधिक काळ ) त्या शेत जमिनीचे शेत मालक (स्वखुषेने, विना मोबदला) आम्हला दोन गुंठे (०.२"R") इतकी शेत जमीन खरेदी देण्यास तयार आहेत तरी दोन गुंठेची खरदी होवू शकते का आणि सातबारा वरती नोंद होईल का
कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
मुंबई कुल वहिवाट व शेत जमीन अधिनियम कलम १८ अंतर्गत दावा दाखल करा . खरेदी करण्याची हि गरज नाही . तुकडेबंदी कायद्याची बाधा येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विवेक ढेरे
06-10-2019
vivekdhere4@gmail.com
तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याविरुद्ध पूर्वी व्यवहार झाला असल्यास व त्याची नोंद सातबारा सदरी घेण्यात आली आहे पण आता क्षेत्र जुळत नसल्याने त्याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनिय1966 चे कलम 155 अन्वये अर्ज दाखल केल्यास त्यावर कोणती कारवाई करावी कृपया मार्गदर्शन करावे
Question by yogesh
04-10-2019
yogeshrudruke2GMAIL.COM
आमच्या गावामध्ये १९८० मध्ये वाढीव गावठाण अंतर्गत प्लॉट पडले आहेत, त्या मधील काही प्लॉट शिल्लक आहेत ते खरेदी करण्यासाठी काय करावे लागेल
त्यासाठी काही प्राधान्य क्रम आहे का ? ते प्लॉट कोणाला मिळू शकतात
Question by Sagar
03-10-2019
sagarkandekar@hotmail.com
हि वेबसाईट इतक्या उशिरा का update होते?.
महिन्यात एकदा पण माझे मांडलेले प्रश दिसत नाही.
खूप कामाची आहे ही वेबसाईट specialy शेतकरी वर्गासाठी.
सागरजी आपले म्हणणे मान्य आहे
website Maintenance साठी update नव्हती .
असुविधेसाठी दिलगीर आहोत
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3400 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
