जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by pratik raut
16-01-2020
pratikraut222@gmail.com
आमची शेतजमीन नॅशनल HIGHWAY साठी २०१९ मध्ये संपादित करण्यात आली आहे. पण संपादित केलेल्या जमिनीचे सातबारा सदरी मूळमालकाचे नाव कायम राहायला हवे असते व सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय चे नाव इतर हक्कामध्ये राहते, तसे इतर गावामध्ये झाले आहे. पण आमच्या गावातल्या संपादित केलेल्या प्रत्येक सातबारा मध्ये सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय यांचे नांव भोगवटादार सदरी लागले आहे जे इतर हक्कामध्ये असायला हवे होते. तरी अश्याबाबतीत सातबारावर नाव नोंद कशी व्हायला हवी याबाबत माहिती द्यावी.
Question by करण कोळी
15-01-2020
kk6264385@gmail.com
नमस्कार सर,
माझं नाव करण,राहणार कोल्हापूर,
माझ्या आजोबांना दोन सावत्र भाऊ आहेत.माझ्या आजोबानी स्वकष्टाने 1960 साली 3 एकर जमीन खरेदी केली. माझे आजोबा आणि त्यांचे दोन भाऊ यांना मिळून वडिलोपार्जित २ एकर जमीन होती. ५ ( ३ एकर स्वकष्टार्जित + २ एकर वडलोपार्जित) एकर जमिनीचे तीन भावंडांमध्ये समान हिस्से होण्यासाठी किवा दोन भाऊ सहाहिसे दार होण्यासाठी,आजोबांनी ग्रामपंचायत मधे अनेवारी अर्ज दिला,भावांची अनेवरी लागावी म्हणुन.
तसा अर्ज दिल्यावर दोन भावांची नावे स्वकष्टार्जित आणि वडिलोपार्जित या दोन्ही प्रकारच्या जमिनीवर/सातबारावर लागली.
तर माझा प्रश्न असा आहे की,
स्वकष्टाने विकत घेतलेल्या जमिनीचे भावंडांध्ये समान हिस्से करण्यासाठी आनेवरी ही पद्धत योग्य/कायदेशीर ठरेल का ?
अशा आनेवारी अर्जाणे सातबाऱ्यावर
(स्वकष्टार्जित जमीनिच्या ) लागलेल्या नावा प्रमाणे समान हिस्से होतील का ?
ज्याच्या नावावर स्वकष्टार्जित जमीन खरेदी पत्र आहे,तोच मालक राहील की, त्यांचे भाऊ पण जमिनीचे मालक किंवा समान हिस्सेदार होतील ?
तसेच स्वकष्टाने घेतलेली जमिनीचे भावांमध्ये(बंधू) समान हिस्से हे १०० रुपये च्य्या स्टॅम्प पेपर वर गावातील १० लोक जमवून केले तर ते ग्राह्य धरले जाईल का ?
आता आजोबांची स्वकष्टार्जित जमिनीवरून/सतबर्यावरून भावाची नावे कमी करू शकतो का व त्यासाठी काय करावे लागेल ?
नोट -
३ एकर जमिनीचे खरेदीत खत आजोबांच्या नावे आहे.तसेच आजोबा एकत्र कुटुंब प्रमुख होते.पण तसे ३ पैकी एका जमिनीच्या खरेदी पत्रवर नमूद आहे.पण आजोबांच्या दोन भावाची नावे कुठल्याही खरेदी पत्रावर नमूद नाहीत..!!
माझ्या आजोबांच्या 3 एकर स्वकष्टार्जित जमिनिपैकी 1 एकर जमीन आजोबांच्या एका भावाने 2018 मध्ये विकली. तर या विकलेल्या जमिनीवर आम्ही दावा करू शकतो का ?
तसदी बद्दल क्षमस्व...!
आपला नम्र,
करण कोळी.
Question by वैभव
13-01-2020
vaibhavraykar9765@gmail.com
आपल्या मालकीची गावातील जागा ग्रामपंचायतीच्या नावावर होते का? ग्रामपंचायत नियम ३/१० ३/७२ विषयी माहिती हवी आहे कृपया ती द्यावी.
Question by सुमन रामा तेटगुरे
11-01-2020
rammatetgure@gmail.com
नमस्कार सर मी सुमन रामा तेटगुरे मु-साळवे,पोस्ट-कोस्ट खुर्द,तालुका-माणगांव, जिला-रायगड, पिनकोड-४०२१०४, माझे वडील किसन(कृष्णा) रामजी फुलारे हे मुके होते आणि १६/०६/२०१५ साली वारले .माझा चुलत भाऊ वसंत दादा यांना खूप वेळा सांगितले दादा माझा वारसनोंद करून दे पण नेहमी टाळा टाळ केली तेव्हा मी स्वता वारसा नोंद अर्ज ०२/१२/२०१९ ला गट क्रमांक व उप विभाग ९२२ आणि ५८९ . तलाठी साहेब न कडे जमा केला. आता पर्यंत नमुना ९ नोटीस नाही दिली जेवा मी तलाठी कार्यालयात गेली तेवा तलाठी साहेब बोलले आप्पा रामजी फुलारे तुमचे काका त्याचा वारस नोंद अर्ज पहिला आला आहे त्यात ५ वारस दार आहेत .त्यात फक्त मंजुळा यांनी सही केली आहे .वसंत आणि अन्य ३ वारसांची सह्या बाकी आहेत त्याची वारस नोंद पूर्ण झाल्या शिवाय तुम्हाला नमुना ९ नोटीस नाही देऊ शकत.आप्पा रामजी फुलारे च्या सर्व वारसांची नमुना ९ वर सही होये पर्यंत आणि वारस नोंद होई पर्यंत थांबावे लागेल.
१] वसंत दादा मुद्दाम आम्हा दोन बहिणीचे नाव ७/१२ येऊ नये यासाठी अशी कामे करत आहे.
२] मला आई आणि वडील नाही ते वारले आहेत.माझा नवरा मुका आहे माजी परस्तिती देखील खराब आहे, या सर्व कारणा मुळे माझा पैसे गाडी भाड्या मागे खर्च होत आहे. आणि हे चुलत भावाला माहित आहे एकदा का हिचे पैसे संपले कि हि घरी गपप बसेल
३] किसन(कृष्णा) रामजी फुलारे आमचा तरी वारस नोंद करून टाकावी तलाठी साहेबानी आम्ही फक्त दोन बहिणी आहोत
Question by Sanket velkar
10-01-2020
Velkarsanket4 @gmail.com
1)शासन निर्णय 2014 नुसार वर्ग 2 जमीन (नि.स.प्र) वर्ग 1 केली आहे (40 पट नजराणा रक्कम भरून)
2) अशी वर्ग 1 केलेली शेतजमीनीचा काही भाग बिगर शेतकरी व्यक्तीस विकण्या साठी अकृषीक परवानगी मिळेल का
Question by सागर
09-01-2020
sagarkandekar1990@gmail.com
प्रश्न - आमच्या आजोबांनी सन 1984 मध्ये 3 एकर गुरे चरण जमीन खरेदी केली होती , & खरेदीखत व फेरफार नोंद आहे.नंतर 1994 साली आजोबा मयत झाले आणि माझे वडील , काका व आत्या असे एकूण 7 जने वारस म्हणून लागले अशी फेरफार नोंद आहे.सन 1996 साली एका त्रयस्थ व्यक्तीने आमच्या ह्या सात जणांचे नावे खोट्या साह्य करून स्वतःला संबंधित जमीन विकण्याचा अधिकार आहे असे नॉटरी कुल मुखत्यारपत्र करून घेतले व नंतर त्याच कुल मुखत्यारपत्र आधारे त्याने एका इतर व्यक्तीस नोंदणीकृत खरेदी खत करून ति जमीन 1996 विकून टाकली. ह्या खरेदी ची नोंद असून खरेदी घेणार यांचे नाव सात बारा सदरी लागले आहे.
सदर शेती ही आम्ही राहत असलेल्या गाव सोडून दुसरीकडे असल्याने आम्हाला या जमिनीचे माहिती नव्हती.आम्हला या वर्षी याची माहिती मिळाली व अत्ता त्या जमिनी वर सिटी सर्व्ह होउन प्लॉट पडले आहेत.
1.तर आज 23 वर्षांनी आम्ही आमची जमिन परत मिळावी या साठी दावा कोर्टात करू शकतो का?
2.आणि दावा टाकून जमीन आम्हास मिळेल का?.
एकतर गुरुचरण जमीन आपण खरेदी कशी केली व फेरफार नोंद मंजूर कशी झाली ? गुरुचरण जमीन हि शाशनानें गावातील गुरांना चारण्यासाठी दिलेली असते . ती जमीन शासकीय आहे . त्यामुळे अश्या जमिनीची खरेदी विक्री होऊ शकत नाही .
आपल्या म्हणण्यानुसार खोट्या कुल मुखत्यापत्राद्वारे जमिनीची विक्री झाली आहे . कुल मुखत्या पत्र खोटे आहे हे आपणास सिद्ध करावे लागेल त्यासाठी फौजदारी नायायालयात दावा दाखल करावा लागेल .
मात्र आपणास जमीन मिळणार नाही . मात्र ज्या व्यक्तीने खोटे विक्री खत केले त्याचे कडून आपणास जमिनीची किंमत , व्याजासह मिळू शकते . आपण आपले चीक वकील यांचा सल्ला घेऊन , पुढील कायदेशीर कारवाई/ कार्यवाही सुरु करू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विठ्ठल लक्ष्मण लवटे
09-01-2020
vitthallawate82@gmail.com
नमस्कार सर
आजोबांच्या नावे जमिन आहे आणी त्यांच्या नावे कर्ज आहे आणी आमाला वाटणी करायची आहे bankबोज्या आहे तसा ठेऊन वाटणी करायची आहे bankबोज्या उपगाटावर ठेऊन वाटणी करता येईल का कलम 85 नुसार वाटणिपत्र मिळेल का.......
Question by Pravin
09-01-2020
pmpravin1@gmail.com
सर, निलंबन आदेशा विरुद्ध उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यास जिल्हा परिषदेला कर्मचाऱ्याला पुनर्स्थापित करता येते का?
उच्च न्यायालयाचे कोणते स्थगित आदेश नसल्यास , पुनर्स्थापित करण्यास कोणतीही बाधा नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राजेंद्र पवळे
09-01-2020
rajupawale111@gmail.com
नमस्कार सर माझी आई परगंधा आहे म्हणजे घरातून २२ वर्षा पूर्वी निघुन गेली आहे त्याची नोद पोलिस स्टेशन ला केलेली नाही माझ्या आई चे १५ वर्षा पूर्वी वडील वारले आहे त्यांच्या नावावर असणारी सर्व जमीन ४ मामा नी त्यांच्या नावावर केली व त्यातील बरीच जमीन त्यानी विकाली आहे ७/१२ वर वारसदार म्हणून आई चे नाव नाही तर मला त्यात माझ्या आई चा वारस म्हणून मला जामिनीचा अधिकार मिळू शकतो का आणि जर मिळत असेल तर त्यासाठी काय करावे
आई परागंदा असले बाबत प्रथम तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करा .
आपली आई परागंदा आहे म्हणजे ती अजून हयात ( still alive ) असा होता . त्यामुळे प्रथम आई चे नाव दाखल करून घ्या . त्यासाठी जय फेरफाराने केवळ मामांचे नाव दाखल आहे तो प्रांत अधिकारी यांचे कडे अपील दाखल करा .
आई ची तक्रार दाखल करून ७ वर्षे झाल्यावर , आई चे वारस म्हणून आपले नाव दाखल होईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ajit bhalchandra deshpande
08-01-2020
ajitd.2009@rediffmail.com
सर
फेरफार नंबर 23339मधील नोंदी बाबत जुना 6ड न बघता नवीन 6ड वर मालकी चा केला व विक्री वेळी जुने कागद पञ न बघता खरेदी विक्री केली त्यानी आता आम्हा ला नोटीस आलीच नाही मी शेजारी असुन आता माझे क्षेत्रापरमाणे भरत नाही मी ऑनलाईन तक्रार टाकली मंडळ अधिकारी यांनी आम्हाला 3तारखा दिल्या पण आम्हा ला आदेश दिला आता उपविभागीय अधिकारी यांचे कडे अपिला मधे जाणेच आहे किती दिवस असतात
६० दिवस
जर आपला प्रश्न क्षेत्र बाबत असेल तर , मंडळ अधिकारी अथवा प्रांत अधिकारी काही करू शकणार नाही . लेखन प्रमाद अथवा जाणीव पूर्वक केलेली चूक असेल तरच , उपरोक्त अधिकारी यांचा प्रकरणातील हस्तक्षेप उपयोगी पडेल अन्यथा आपणास भूमी अभिलेख खाते यांचे दरवाजे ठोकावे लागतील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by amol kolekar
29-12-2019
amolkolekar5@gmail.com
नमस्कार सर,
माझा शेतजमिनी विषयीच्या रेकॉर्ड्स संदर्भात प्रश्न आहे.
सर माझ्या पंजोबना २ मुले होती. त्या २ मुलांच्या नावावर समान शेतीचे क्षेत्र १९७२ परेंत होते. पण १९७२ साली आमचा शेतीचे सर्वे भुमिअभिलेख मार्फत बदलले गेले होते,
त्यामध्ये एका सर्व नंबर चे रुपांतर दोन सर्वे नंबर झाले आहेत.
त्या दोन सर्व नंबरचे योग्य फेरफार झाले होते. पण एका सर्व नंबर मध्ये दोघांच्या नावावर समान क्षेत्र होते, तर दुसऱ्या सर्वे मध्ये ते क्षेत्र एकाचा नावर लागलेलं आहे पण त्याचा फेरफार मध्ये दोघांची हि नावे आहेत. पण तालाठीने सातबारा नोंद घालताना चूक केली आहे.
नंतर ज्या सर्वे मध्ये चूक झाली आहे तो सर्वे च्या प्लॉट चुलत आजोबाने दुसऱ्याला विकला,.
अशाप्रकारे.. आमचा आजोबांच वाट्याला कमी जमीन आलेली आहे.
तर ह्याजमिनीची रेकॉर्ड्स ची चूक सुधाण्यासाठी काय करावे
लागेल? कोर्ट केस करून जमीन मिळेल की हे मार्गदर्शन करावे
आपले प्रश्नावरून , आपले गाव मध्ये एकत्रीकरण योजना अमलात आलेली आहे . त्यामुळे आपण म्हणता त्या प्रमाणे एका भू खंडला केवळ एकाच आजोबांचे नाव लागले आहे . याला चूक म्हणता येणार नाही .
आपण हे हि म्हणता कि , तलाठी याने , फेरफारामध्ये , दिघंची नाव असताना , ७/१२ सादरी चुकीचा अंमल दिलेला आहे . अशी वस्तू स्थिती असेल तर , चूक दुरुस्त करता येईल . आपण तहसीलदार यांचेकडे कलम १५५ खाली अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुरज कदम
21-12-2019
surajkadam.mh12@gmail.com
महोदय
खालील अपिलाच्या निर्णयाची प्रत मेल वर मिळावी हि विनंती
मा. मंत्री (महसूल) यांचे न्यायालयात क्रमांक आरटीएस-२८१७/प्र.क्र. ७८२/ज-४ अ
आपला विश्वासू
सुरज कदम
कृपया अशी माहिती विचारू नये
प्रश्नांना माहिती /उत्तरे दिली जातात
माहितीच्या अधिकारप्रमाणे , अभिलेख या ठिकाणी उपलब्ध करून दिले जात नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमित शिर्के पाटील
21-12-2019
amitkumar.shirke@gmail.com
मा. किरण पाणबुडे साहेब
माझे आजोबा शिवराम तात्या शिर्के यांचा जन्म 1914 सालाचा आहे. (जुन्या जन्मनोंदीनुसार), माझ्या आजोबांचे मामा बापु खामगळ यांना मूलबाळ नसल्याने त्यांनी माझ्या आजोबांना ते 10 वर्षाचे असताना दत्तक घेतले होते. (दत्तक पत्र वगैरे नाही). व त्यांचे नाव शंभु बापू खामगळ असे ठेवले होते. पुढे काही कालावधीने आजोबांचे मामा मयत झाले, त्यांच्या नावावरील 1 एकर जमीन माझ्या आजोबांच्या नावावर आली, माझ्या आजोबांना त्यांच्या मामांच्या मृत्यूनंतर पुन्हा माझे पणजोबा त्यांच्याकडे घेऊन आले, व पुन्हा त्यांचे नाव शिवराम तात्या शिर्के असेच राहिले, जे आजपर्यंत आहे. वरील सर्व माहिती आजोबांनी सांगितलेली आहे. 1 महिन्यापूर्वी माझे आजोबा मयत झाले आहेत, त्यांचे सर्व कागदपत्रे शिवराम तात्या शिर्के नावांनी आहेत मी त्यांच्या मृत्यूची नोंद करणेकरिता ग्रामसेवकास भेटलो असता मी त्यांच्याकडे शिवराम तात्या शिर्के उर्फ शंभु बापू खामगळ अशी नोंद लावण्याची विनंती केली असता त्यांनी नकार दिला. ते शिवराम तात्या शिर्के या नावाने नोंद करण्यास तयार आहेत. पण मला दोन्ही नावांच्या नोंदी मृत्यू दाखल्यावर हव्या आहेत, कारण आजोबांच्या नावावर 1 एकर जमीन आहे.
तरी मी काय करावे याची माहिती द्यावी.
आजोबांचे नावात बदल आपणास करता येणार नाही .
प्रश्न आपले नाव मिळकतीस लागण्याचा आहे . आजोबांचे जे वारस ( वर्ग १ ) असतील त्यांची नावे लागतील . वर्ग १ वारस मयत असतील तर , अश्या वारसांचे , वारस यांची नावे लागतील .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दिनेश दाभोलकर
21-12-2019
dabholkar.dinesh@gmail.com
आमच्या फेरफार मध्ये एका विक्तिचे नाव डी ए बोर्डच्या नियम प्रमाणे कमी झाले . या वर मला खालील प्रश्नावर मार्गदर्शन करावे हि विनंती
1) डी ए बोर्ड म्हणजे काय ,
Question by दिनेश दाभोलकर
21-12-2019
dabholkar.dinesh@gmail.com
१९५८ वर्षाची किंवा त्या आधीची एखादी फेरफाराची हिस्टरी फाईल जर तलाठी ऑफिस किंवा तहसीलदार ऑफिस ला मिळत नसेल तर ती कुठे शोधावी
Question by दिनेश दाभोलकर
21-12-2019
dabholkar.dinesh@gmail.com
नमस्कार सर ,
मला खालील प्रश्नवर मार्गदर्शन करावे हि विनंती .
1) जर आम्हाला जुने मोडी लिपी मध्ये रेकॉर्ड चेक करायचे आहेत पण आकारफोड पत्रे भूमिअभिलेख मधून आणा असे सांगितले आहे , आकारफोड पत्र भूमिअभिलेख मध्ये अर्ज केला तरीहि ते जुना रेकॉर्ड मिळत नाही असे लिहून देण्यात आले आहे . तर आत्ता आम्ही काय करावे
2) मोडी लिपी मधले रेकॉर्ड हे किती जुने असू शकतात
जुने अभिलेख मिळत नसतील तर आपण पुराभिलेख विभागात मिळते का पहा ?
जिल्हाधिकारी कार्यालय येथील अभिलेख कक्षात ते मिळते का पहा ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अजय चव्हाण, मुंबई
21-12-2019
ajayjchavan@yahoo.com
साहेब नमस्कार,
१९ ६१ साली वीर धरण प्रकल्प साठी संपादित केलेल्या शेत जमीन आणि गावठाण भूखंड ची मागणी आता २०१९ साली केल्यास कोणते कायदे तथा जी आर , परिपत्रके द्व्रारा खालील प्रश्नांचा निर्णय दिला जाईल, १९६१ चा अथवा १९९० चा, किंवा अन्य?? त्या वेळी भूसंपादन अधिनियम १८९४ द्वारे संपादन केले होते. त्या नंतर अनेक वेळा पुनर्वसन कायदे बदलत गेले आहेत.
१) एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये पर्यायी शेत जमीन वाटप बाबत कमाल आणि किमान मर्यादा ठरविणे बाबत
२) एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये नवीन गावठाण मध्ये पर्यायी गावठाण प्लॉट वाटप बाबत कमाल आणी किमान मर्यादा
३) या बाबत जी आर व परिपत्रके शासन निर्णय मध्ये उपलब्ध नाहीत. मुंबई मध्ये कसे मिळतील?
आपण मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.
धन्यवाद
अजय चव्हाण, मुंबई
वीर धरणासाठी जमीन संपादन आपले म्हणण्यानुसार १९६१ साली करण्यात आलेले आहे . पहिला पुनर्वसन कायदा १९७६ साली अस्तित्वात आला . त्यामुळे या संपादनासाठी पुनर्वसन कायदा लागू केलेला नसेल . मात्र महाराष्ट्र जमीन महसूल ( शासकीय जमिनीची विल्हेवाट लावणे ) नियम १९६९ अन्वये , आपण जिल्हाधिकारी यांचे कडे , जमीन मागू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by स्वप्नील नागे
18-12-2019
swapnil.nage88@gmail.com
वडिलांनी गावातील एका व्यक्ती कडून जमीन तोंडी खरेदी करून (दस्त न करता) त्या इसमास पैसे दिले. गावातील ओळखीचा आहे म्हणूण विश्वासाने पूर्ण पैसे दिले. नंतर माहित पडले कि त्या जमिनीवर ७०,००० हजार IDBI BANK चा बोजा आहे. परंतु बोजा १ लाख पेक्षा कमी आहे. तरी त्या ७/१२ वर IDBI बँकेचे ७०,००० हजाराचा बोजा नमूद केला गेला आहे.
RBI च्या २०११ च्या परिपत्रकानुसार १ लाखांपर्यंतचा बोजा ७/१२ मध्ये नमूद नाही केला जात.
मूळ मालक बोजा भरू शकणार नाही. तर तो बोजा चूक दुरुस्ती फेरफार ने काढता येईल का?
जर जमीन आपले नावावर नाही तर हा खटाटोप कश्यासाठी . ? जर जमीन आपणास खरेदी करायची असेल तर , दस्त नोंदणीकृत करणे आवश्यक आहे .
दुसरे , कर्जाची नोंद / बोजा काढला म्हणून कर्ज फेडले असा होत नाही . जमीन आपले नावावर झाल्यावर , आपणास बॅंकचे कर्ज व्याजासह भरावे लागेल . त्यापेक्षा त्या व्यक्तीला कर्ज रक्कम भरण्यास सांगा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Amruta Tale
13-12-2019
amrutatale6976@gmail.com
Talathi post holder na kon kontya departmental exams deta yetat?
परिस्का देण्यावर निर्बंध नाहीत . मात्र परवानगीची ( प्रांताधिकारी ) आवश्यकता आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शुभम पाटील
13-12-2019
patilshubham678@gmail.com
नवीन अविभाज्य शर्ती नुसार जमीन विक्री माझ्या आजोबाची शेती हि माझ्या नावे (नातू) करायची व बक्षीस पत्र केले आसता तर ती मुलकी पाटील इनामाची आहे असे सांगण्यात आले असेल.सदर जमीन विक्री करावयाची झालेस महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक /वतन/1099/प्र.क्र./233/ल-4 दिनांक 09/07/2002 प्रमाणे परवाणगी घ्यावी लागणार नाही अगर कसे याबाबत मार्गदर्शन होणेस विनंती आहे.
Question by Swapnil mane
13-12-2019
maneswapn124@gmail.com
सर माझा आजोबांनी 2013 साली एका व्यक्तीला नोंदणीकृत दस्ताने जमीन विकली असून त्यावर 11 गुंठे नोंद आहे तर ती जमीनीची नोंद तुकडे जोड बंदी कायद्याद्वारे रद्द करता येते का दुसरी गोस्ट त्या जमिनीचा उताऱ्यावर बोर ची नोंद आहे.तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी त्या दस्ताचा आधारे 7/12 वर नोंद ओढलेली आहे.तरी या कायदयचा आधार घेऊन ही नोंद रद्द करता येते का याबाबद्दल मार्गदर्शन हवे आहे.
जमिनीचे स्वरूप काय आहे त्या वर अवलंबून आहे .
बागायत जमीन असले तर साधारण पणे मर्यादा ५ आर , एकपिकी असेल तर १५ आर व वरकस असेल तर प्रमाण २० आर आहे . हे प्रमाण जिल्हा निहाय वेगळे आहे .
नोंद २०१३ सालची आहे . जर तहसीलदार यांनी कारवाई केली तर , जमीन शाशन यांचेकडून जप्त होईल व आवश्यकतेप्रमाणे शासन कडून संपादित होऊ शकेल . मात्र आपणास जमीन परत मिळणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by कुणालकुमार कांती
13-12-2019
kunalkumarkanti@gmail.com
एका व्यक्तीकडून दुकान भाड्याने घेतले होते 3 वर्षयाच्या करारावर परंतु व्यवसाय न चालल्यामुळे 6 महिन्यात आम्ही दुकान सदर मालकाच्या ताब्यात दिले आणि डिपॉसीट म्हणून दिलेले 150,000 रुपये चेकच्या स्वरूपात घेतले परंतु चेक बोउन्स झाला म्हणून कोर्टात केस चालू आहे एक वर्ष झाले तरी केस चालू आहे तर लवकरात लवकर केस निकाली लागण्याकरिता काय करावे लागेल?
Question by Sagar dhau jadhav
13-12-2019
sarikasagar0304@gmail.com
मला ७/१२ विभक्त करायचा आहे तरी मला प्रक्रिया सांगा
७/१२ दोघांचे नावावर आहे का ?
कृपया आकारफोड पत्रक करून घ्या . आकार फोड पत्रकांचे आधारे , ७/१२ विभक्त होईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
12-12-2019
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,म.न.पा.हद्दीत आम्ही बिनशेती परवानगी घेतली असून आम्हास बांधकाम परवानगी मिळाली आहे.त्या जागी पूर्वीची खाजगी विहीर आहे.सदर विहिरीवर आम्हास स्लॅब टाकावयाचा आहे.व पाणी घेण्यापुरती आम्ही त्यावर झाकण करणार आहोत.तरी यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागेल?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.....
आपणास बांधकाम परवानगी दिली आहे . त्यात या बाबत उल्लेख असेल . आदेश बघून घ्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
खाजगी विहीर आहे . त्या विहिरीवर कोणाचा पाणी घेण्याचा अधिकार आहे का ? अधिकार नसल्यास , आपण विहित बंद करू सःक्ता . त्या साठी परवानगीची गरज नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रमोद जाधव
12-12-2019
jpramod2234@gmail.com
गावठाण क्षेत्रात घर, आंगण व परिसदर मिळून जास्तीतजास्त किती जमिनीवर एखादा व्यक्ती हक्क सांगू शकतो, या बाबतीत काही कायदा आहे का???
ग्राम पंचायत कार्यालयात , घराची नोंदणी होताना , क्षेत्राचा तपशील नोंदवलेला असतो . क्षेत्र प्रमाणे , ताबा त्या व्यक्तीचा असतो
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
