जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by दिनेश दाभोलकर
21-12-2019
dabholkar.dinesh@gmail.com
नमस्कार सर ,
मला खालील प्रश्नवर मार्गदर्शन करावे हि विनंती .
1) जर आम्हाला जुने मोडी लिपी मध्ये रेकॉर्ड चेक करायचे आहेत पण आकारफोड पत्रे भूमिअभिलेख मधून आणा असे सांगितले आहे , आकारफोड पत्र भूमिअभिलेख मध्ये अर्ज केला तरीहि ते जुना रेकॉर्ड मिळत नाही असे लिहून देण्यात आले आहे . तर आत्ता आम्ही काय करावे
2) मोडी लिपी मधले रेकॉर्ड हे किती जुने असू शकतात
जुने अभिलेख मिळत नसतील तर आपण पुराभिलेख विभागात मिळते का पहा ?
जिल्हाधिकारी कार्यालय येथील अभिलेख कक्षात ते मिळते का पहा ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अजय चव्हाण, मुंबई
21-12-2019
ajayjchavan@yahoo.com
साहेब नमस्कार,
१९ ६१ साली वीर धरण प्रकल्प साठी संपादित केलेल्या शेत जमीन आणि गावठाण भूखंड ची मागणी आता २०१९ साली केल्यास कोणते कायदे तथा जी आर , परिपत्रके द्व्रारा खालील प्रश्नांचा निर्णय दिला जाईल, १९६१ चा अथवा १९९० चा, किंवा अन्य?? त्या वेळी भूसंपादन अधिनियम १८९४ द्वारे संपादन केले होते. त्या नंतर अनेक वेळा पुनर्वसन कायदे बदलत गेले आहेत.
१) एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये पर्यायी शेत जमीन वाटप बाबत कमाल आणि किमान मर्यादा ठरविणे बाबत
२) एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये नवीन गावठाण मध्ये पर्यायी गावठाण प्लॉट वाटप बाबत कमाल आणी किमान मर्यादा
३) या बाबत जी आर व परिपत्रके शासन निर्णय मध्ये उपलब्ध नाहीत. मुंबई मध्ये कसे मिळतील?
आपण मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.
धन्यवाद
अजय चव्हाण, मुंबई
वीर धरणासाठी जमीन संपादन आपले म्हणण्यानुसार १९६१ साली करण्यात आलेले आहे . पहिला पुनर्वसन कायदा १९७६ साली अस्तित्वात आला . त्यामुळे या संपादनासाठी पुनर्वसन कायदा लागू केलेला नसेल . मात्र महाराष्ट्र जमीन महसूल ( शासकीय जमिनीची विल्हेवाट लावणे ) नियम १९६९ अन्वये , आपण जिल्हाधिकारी यांचे कडे , जमीन मागू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by स्वप्नील नागे
18-12-2019
swapnil.nage88@gmail.com
वडिलांनी गावातील एका व्यक्ती कडून जमीन तोंडी खरेदी करून (दस्त न करता) त्या इसमास पैसे दिले. गावातील ओळखीचा आहे म्हणूण विश्वासाने पूर्ण पैसे दिले. नंतर माहित पडले कि त्या जमिनीवर ७०,००० हजार IDBI BANK चा बोजा आहे. परंतु बोजा १ लाख पेक्षा कमी आहे. तरी त्या ७/१२ वर IDBI बँकेचे ७०,००० हजाराचा बोजा नमूद केला गेला आहे.
RBI च्या २०११ च्या परिपत्रकानुसार १ लाखांपर्यंतचा बोजा ७/१२ मध्ये नमूद नाही केला जात.
मूळ मालक बोजा भरू शकणार नाही. तर तो बोजा चूक दुरुस्ती फेरफार ने काढता येईल का?
जर जमीन आपले नावावर नाही तर हा खटाटोप कश्यासाठी . ? जर जमीन आपणास खरेदी करायची असेल तर , दस्त नोंदणीकृत करणे आवश्यक आहे .
दुसरे , कर्जाची नोंद / बोजा काढला म्हणून कर्ज फेडले असा होत नाही . जमीन आपले नावावर झाल्यावर , आपणास बॅंकचे कर्ज व्याजासह भरावे लागेल . त्यापेक्षा त्या व्यक्तीला कर्ज रक्कम भरण्यास सांगा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Amruta Tale
13-12-2019
amrutatale6976@gmail.com
Talathi post holder na kon kontya departmental exams deta yetat?
परिस्का देण्यावर निर्बंध नाहीत . मात्र परवानगीची ( प्रांताधिकारी ) आवश्यकता आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शुभम पाटील
13-12-2019
patilshubham678@gmail.com
नवीन अविभाज्य शर्ती नुसार जमीन विक्री माझ्या आजोबाची शेती हि माझ्या नावे (नातू) करायची व बक्षीस पत्र केले आसता तर ती मुलकी पाटील इनामाची आहे असे सांगण्यात आले असेल.सदर जमीन विक्री करावयाची झालेस महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक /वतन/1099/प्र.क्र./233/ल-4 दिनांक 09/07/2002 प्रमाणे परवाणगी घ्यावी लागणार नाही अगर कसे याबाबत मार्गदर्शन होणेस विनंती आहे.
Question by Swapnil mane
13-12-2019
maneswapn124@gmail.com
सर माझा आजोबांनी 2013 साली एका व्यक्तीला नोंदणीकृत दस्ताने जमीन विकली असून त्यावर 11 गुंठे नोंद आहे तर ती जमीनीची नोंद तुकडे जोड बंदी कायद्याद्वारे रद्द करता येते का दुसरी गोस्ट त्या जमिनीचा उताऱ्यावर बोर ची नोंद आहे.तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी त्या दस्ताचा आधारे 7/12 वर नोंद ओढलेली आहे.तरी या कायदयचा आधार घेऊन ही नोंद रद्द करता येते का याबाबद्दल मार्गदर्शन हवे आहे.
जमिनीचे स्वरूप काय आहे त्या वर अवलंबून आहे .
बागायत जमीन असले तर साधारण पणे मर्यादा ५ आर , एकपिकी असेल तर १५ आर व वरकस असेल तर प्रमाण २० आर आहे . हे प्रमाण जिल्हा निहाय वेगळे आहे .
नोंद २०१३ सालची आहे . जर तहसीलदार यांनी कारवाई केली तर , जमीन शाशन यांचेकडून जप्त होईल व आवश्यकतेप्रमाणे शासन कडून संपादित होऊ शकेल . मात्र आपणास जमीन परत मिळणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by कुणालकुमार कांती
13-12-2019
kunalkumarkanti@gmail.com
एका व्यक्तीकडून दुकान भाड्याने घेतले होते 3 वर्षयाच्या करारावर परंतु व्यवसाय न चालल्यामुळे 6 महिन्यात आम्ही दुकान सदर मालकाच्या ताब्यात दिले आणि डिपॉसीट म्हणून दिलेले 150,000 रुपये चेकच्या स्वरूपात घेतले परंतु चेक बोउन्स झाला म्हणून कोर्टात केस चालू आहे एक वर्ष झाले तरी केस चालू आहे तर लवकरात लवकर केस निकाली लागण्याकरिता काय करावे लागेल?
Question by Sagar dhau jadhav
13-12-2019
sarikasagar0304@gmail.com
मला ७/१२ विभक्त करायचा आहे तरी मला प्रक्रिया सांगा
७/१२ दोघांचे नावावर आहे का ?
कृपया आकारफोड पत्रक करून घ्या . आकार फोड पत्रकांचे आधारे , ७/१२ विभक्त होईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
12-12-2019
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,म.न.पा.हद्दीत आम्ही बिनशेती परवानगी घेतली असून आम्हास बांधकाम परवानगी मिळाली आहे.त्या जागी पूर्वीची खाजगी विहीर आहे.सदर विहिरीवर आम्हास स्लॅब टाकावयाचा आहे.व पाणी घेण्यापुरती आम्ही त्यावर झाकण करणार आहोत.तरी यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागेल?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.....
आपणास बांधकाम परवानगी दिली आहे . त्यात या बाबत उल्लेख असेल . आदेश बघून घ्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
खाजगी विहीर आहे . त्या विहिरीवर कोणाचा पाणी घेण्याचा अधिकार आहे का ? अधिकार नसल्यास , आपण विहित बंद करू सःक्ता . त्या साठी परवानगीची गरज नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रमोद जाधव
12-12-2019
jpramod2234@gmail.com
गावठाण क्षेत्रात घर, आंगण व परिसदर मिळून जास्तीतजास्त किती जमिनीवर एखादा व्यक्ती हक्क सांगू शकतो, या बाबतीत काही कायदा आहे का???
ग्राम पंचायत कार्यालयात , घराची नोंदणी होताना , क्षेत्राचा तपशील नोंदवलेला असतो . क्षेत्र प्रमाणे , ताबा त्या व्यक्तीचा असतो
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मनोहर कोकरे
11-12-2019
manoharkokare902@gmail.com
माझ्या बाबांना मिलिटरी रिटायर्ड झालेवर सरकारी जमीन मिळाली आहे
तसेच माझ्या वाडीतील एका व्यक्ती ला सुदधा सरकारी जमीन मिळाली आहे सर्वे नंबर एकच आहे
सातबारा उतारा सुद्धा एकत्र मग ती जमीन वेगवेगळी कशी करता येईल
जिल्हाधिकरी यांचे जमीन प्रदान आदेश बरोबर , क्षेत्राचा नकाशा देणे आवश्यक होते . आपण जिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज करून दोघांचे क्षेत्र विभागून ( ७/१२ स्वतंत्र करून ) देणे बाबत अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by SACHIN DAREKAR
13-11-2019
sachindarekar9073@gmail.com
नमस्कार सर , आमच्या शेतातून मुख्यमंत्री ग्राम सडक मार्ग जात आहे, आमच्या उताऱ्यामध्ये रस्त्याचा उल्लेख नाही तसेच गाव नकाश्यामध्ये सदर रस्त्याचा उल्लेख नाही, आता रस्ता ३० फूट रुंदीने वाढत आहे यामध्ये आमचे १ एकर क्षेत्र रस्त्यात जात आहे तरी यासाठी काही मोबदला मिळेल का किंवा नुकसान भरपाई कशी मिळवली जाईल.
घटनेच्या अनुच्छेद ३१ अ नुसार , नुकसान भरपाई दिल्याशिवाय , जमीन संपादन करता येत नाही अथवा त्या व्यक्तीकडून जमीन काढून घेता येत नाही .
संबंधित विभागास नोटीस पाठवून , नुकसान भरपाई मागा , अन्यथा न्यायालयात दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुधीर दामोदर कडू
12-11-2019
sudhirkadu13@gmail.com
माझ्या मोठा भाऊ वडील असताना संपत्तीचे हिस्सा मागत आहे तर त्याचा पूर्ण हक्क सोड करण्यासाठी किती खर्च येईल आणि काय करावे लागेल
वडिलांना जमीन त्यांचे वडिलांकडून आलेली असेल तर , भावाची मागणी रास्त आहे . मात्र वडिलांची मिळकत स्वकष्टार्जित असेल तर , भावाला जमीन मागता येणार नाही .
वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपास अल्प खर्च आहे . २०० रुपयेच मुद्रांक शुल्क लागते . दस्त करून नोंदणीकृत वाटप करून घ्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सि. ना भोरे
12-11-2019
sitarambhore@yahoo.co.in
खरीदीखता ने बिगर शेत जमीन नावे करण्यास अर्ज दिला आहे तर त्या नुसार फेरफार नोंद दाखल किती दिवसात करण्याचा नियम आहे व त्यासाठी तलाठ्याकडे किती रूपये भरावे लागतील.आणि जर तलाठ्याने एका महिण्यात नोंद केली नाही तर तक्रार कोणाकडे करावी.
नोंद मंजूर करण्यास १५ दिवसाचा कालावधी आवश्यक आहे
तलाठी टाळाटाळ करत असेल तर , तहसीलदार यांचे निदर्शनास हि बाब आणून द्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by कैलास भगवान मुरकुट
08-11-2019
kailashmurkut81@gmail.com
१५ गुंठे शेत जमीन सार्वजनिक संस्थेंस दानपत्रा ने हस्तान्तरित करता येईल का
या पूर्वी उत्तर दिल्या प्रमाणे तुकडे बंदी कायद्याची बाधा , खालील किमान क्षेत्राचे हस्तान्तरं करण्यास आहे
5 आर - बागायत
१५ आर - एक पैकी
२० आर - वरकस
मात्र हे प्रमाण जिल्हानिहाय वेगळे आहे . तपासून घ्या .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
08-11-2019
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,वसुली व विक्री अधिकारी नागरी सहकारी पतसंस्था यांचेकडील जप्ती आदेशाने का.तलाठी यांनी जमीनदाराच्या ७/१२ तील इतर हक्कात जप्ती आदेशाची नोंद घेतली आहे.सदर आदेशाच्या नोंदीवर संबंधितास का.तलाठी यांचेकडे तक्रार अर्ज दाखल करता येईल का?किंवा कसे ? कारण संबंधित तलाठी तक्रार दाखल करून घेत नाही.कृपया मार्गदर्शन होणेस विनंती..
तलाठी यांनी वसुली अधिकारी यांचे आदेशाने , जप्त केले बाबत नोंद घेण्यात आलेली आहे . त्या विरुद्ध तलाठी यांचे कडे तक्रार करता येणार नाही. प्रांताधिकारी यांचेकडे अपील करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शाहिद उकये
08-11-2019
shahidukaye@gmail.com
दि.११/१०/१९८० रोजी फेरफार क्र.१०४६ अन्वये खातेदार श्री.पांडू रामजी सुर्वे मयत झाले असुन त्यांचे वारस पत्नी-भागीबाई पांडू सुर्वे व मुलगी एकच – शेवंतीबाई पांडू सुर्वे त्यानंतर दि. १९/११/२०१९ रोजी फेरफार क्र. १४८८ प्रमाणे खातेदार श्रीम. भागीबाई अनंदी पांडु सुर्वे मयत झाले असून त्यांना वारस मुलगी एकच – वैजंयती रामजी कानसे असे आहे. वैजंयती रामजी कानसे यांचे लग्नापुर्वी चे नाव शेवंतीबाई पांडू सुर्वे असे आहे. शेवंतीबाई पांडू सुर्वे व वैजंयती रामजी कानसे या दोन्ही नावाचे एकच व्यक्ती आहे. ७/१२ सदरी चुकीने दाखल झालेला लग्नापूर्वीचा नाव शेवंतीबाई पांडू सुर्वे कमी करण्यास काय करावा ?
Question by निलेश पाटील
05-11-2019
nileshpatil23683@gmail.com
नमस्ते सर सर माझी जमीन धरणाच्या बँक वॉटर मध्ये संपा दित होत आहे तर माझ्या जमिनीत अजून 2 हिस्सेदार आहे तर आमची आणे वारी झालेली नाही व माझ्या हिस्सावर जी जमीन आहे तीचा पूर्ण हिस्सा जात आहे व जे 2 हिस्सेदार आहे त्यांची कमी जमीन जात आहे तर आम्ही जो मोबदला मिळेल तो कसा वाटायचा
आपले हिस्सेदार नटे संबंधातील आहेत कि त्रयस्थ आहेत ? जर त्रयस्थ असतील तर , खरेदी खतात क्षेत्राचा तपशील समाविष्ट असेल . क्षेत्राचा तपशील समाविष्ट नसेल तर मालमत्ता हस्तांतरण कायदा कलम ४५ प्रमाणे , ज्या प्रमाणात आपण खरेदी मंडळ विक्रेत्यास दिला त्या प्रमाणात , क्षेत्र विभागणी होईल .
संबंधित भू संपादन अधिकारी या बाबत निर्णय घेतील . जर चुकीचे apportionment केले तर , नोटीस आल्यावर हरकत घ्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vitthal Ramchandra Kakade
05-11-2019
vitthalkakade72@gmail.com
गावातील गावठाण मध्ये माझ्या वडिलांच्या नावावर मोकळी जागा आहे. माझ्याकडे 1965 पासून ते आता पर्यंतचे त्या मिळकत क्रमांकाचे 8 अ उतारे आहेत. परंतु ग्रामपंचायत त्याजागेवर आपला हक्क सांगत आहे. आणि त्यांना आमच्या नावावरील उताऱ्याबद्दल विचारले असता ते तुमची जागा ती नसून दुसरीकडे असेल असे उत्तर देत आहे तर त्याला पर्याय काय आमची गावठाण मधील जागा आम्ही कशी शोधायची.
गावाचे भू सर्वेक्षण ( सिटी सर्वे ) झाला आहे का ? म्हणजे गावठाणातील जागांचा मिळकत पत्रिका उतारा आहे का ? असल्यास आपणास भूमी अभिलेख खात्यात त्या जागेचा सर्वेक्षण नकाशा मिळेल .
नसल्यास , मोकळ्या जागेवर आपला ताबा आहे हे दाखवणारा काही पुरावा आले का ? जशे कुंपण करणे , काही सामान ठेवणे . जागेची घरपट्टी भरलेली असल्यास , त्याच्या पावत्या .
ह्या पुराव्याच्या आधारे आपण , जागेवर पुढील विकास करा . ग्राम पंचायतीची त्यासाठी परवानगी मागा. परवानगी नाकारल्यास , विकास तरीही सुरु ठेवा . त्यास ग्राम पंचायतीने प्रतिबंध केल्यास , त्यांचे विरुद्ध , न्यायालयात दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सागर
05-11-2019
navale.sagar123@gmail.com
१)सर नोटरी आणि रजिस्टर अफिडेट यातील फरक काय?
2)हे दोन्ही चा कालावधी (validity ) किती दिवस चालते?
दस्त/अभिलेख notorize हा नोटरी कडे होते . affadavit हि नोटरी तसेच कार्यकारी दंडाधिकारी यांचे कडे होते . कायदेशरी पुरावा म्हणून दोनीही मध्ये फरक नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अक्षय पाबळे
04-11-2019
akshay.pabale7575@gmail.com
1)ग्रामपंचायत हद्दीतील -वस्ती मधील 50 वर्षे पूर्वीपासून अस्तित्वात असणारा रस्ता ग्रामपंचायतकडे हस्तांतरित झालेला नसेल,
तो रस्ता ग्रामपंचायतने 10 फूट रुंद डांबरीकरण आणि नंतर काँक्रिटीकरण केलं असेल आणि
गावकऱ्यांना वापरासाठी तो एकमेव रस्ता असेल तर अशा रस्त्याची नोंद सरकार दफ्तरी होण्यासाठी कोणता नियम/कायदा आहे का ?
रस्ता ग्राम पंचायतीकडे हस्तांतरित करणे म्हणजे सरकारी दप्तरी नोंद करणे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Bhaskar shingade नाशिक
02-11-2019
bhaskarshingade2004@gmail.com
सर,माझ्या पत्नीची माय आजी तिची जमीन माझ्या पत्नीच्या नावे करू इच्छिते.आजीला एकच अपत्य आहे.ती म्हणजे पत्नीची आई.दोघीही ह्या बाबतीत स्वेच्छेने तयार आहेत.तर हक्कासोड किंवा बक्षिसपत्र करता येईल का.आणि सर्व जण आदिवासी समाजाचे ,रक्ताच्या नात्यातले आहेत.कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
आजी ला जमीन तिचे वडिलांकडून /आई कडून प्राप्त झाली असल्यास २०० रु मुद्रांक शुल्क भरून नाव वर करता येईल
मात्र आजीची स्व कष्टर्जित असेल तर , जमीन बाजार भावाच्या ३ % मुद्रांक शुल्क भरून , बक्षीस पत्र आपले नावा वर करता येईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संग्राम विष्णू पाटील
01-11-2019
sangramvishnupatil@gmail.com
माझे पणजोबा १९६८ मध्ये वारले. वारस रजिस्टर १९७१ साली होऊन जमिनीसाठी ६३ या नंबराच फेरफार तयार झाला पण हा फेरफार no 63 तहसील ऑफिस आणि तलाठीऑफिसमध्ये मध्ये आढळ होत नाही ते कर्मचारी पानं फाटल्याचे सांगतात. पण मला दिवाणी कामासाठी तो फेरफार नक्कल हवी आहे. कशी मिळवू ?
Question by अमोल
30-10-2019
amolsalunkhe@rediffmail.com
माझ्या आईच्या चुलत भावाने माझ्या आजीची जमीन त्याच्या १३ वर्षाच्या मुलाच्या नावाने केली आहे. त्याच्या म्हणण्या नुसार १९९९ साली खरेदी केली आहे. तो मुलगा आता ३२ वर्षाचा आहे. माझ्या आजोबांचे १९९६ ला निधन झाले. ही वडिलोपार्जित शेती आहे. हा व्यवहार बेकायदा ठरू शकतो का कुठे दाद मागावी ? कृपया मार्गदर्शन करावे
आजोबांची जमीन होती . आजोबांचे निधनानंतर , आजीचे नावावर झाली . त्या नांतर , त्याचे म्हणण्यानुसार , आजीने खरेदी ने दिली . खरेदी खात झाले आहे का ? हे पहा . झाले असल्यास आजीस केवळ तिचा हिस्सा विकत येऊ शकतो . आजीशिवाय आपली आई व अन्य सरळ उतरते वारस , यांचा हिस्सा आजी विकू शकत नाही . दावा दाखल करून जमीन आपल्यायाला मिळू शकते . स्तहनिक वकिलांचे सल्ल्याने पुढील कारवाही करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by श्री. महेश जावीर
30-10-2019
jmahesh10@gmail.com
जर फाळणी ने नाव कमी झाले असेल तर ते पुन्हा ७/१२ वर कसे घ्यावे ?
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3400 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
