जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

माझ्या वडिलांchi जमीन itranni नावावर करून घेतली आहे पण प्रॉब्लेम असा आहे की ती जमीन खरेदीखत सुरूपात त्यांच्या नावावर झालेली आहे तर मला आत्ता काय करावे लागेल
त्या भावाविरुद्ध प्रथम फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल करावा व संबंधित खरेदी खताविरुद्ध दिवाणी न्यायालयात दाद मागावी

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

1972 साली शेती महामंडळाची जमीन मिळाली आहे ते शेतजमीन कर्ज काढण्यासाठी लॉक काढून तारण द्ययाच आहे काय करावे लागेल।
संबंधित तहसीलदार कार्यालयात संपर्क साधावा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Mahesh
22-11-2021
maheshmaske86@gmail.com

नमस्कार, माझ्या आजीला शेत मिळकत, घर मिळकत मे.कोर्ट आदेशाने मिळाली आहे. सदरचा कोर्ट दावा सावत्र आई (माझ्या आजीची आई) व सावत्र मुलगा यांचेत झाला असून कोर्टकडून आजीच्या आईने पोटासाठी पैकी दोन शेत जमिनी (अर्धा हिस्सा) व घर मिळकत घेतली, त्याप्रमाणे पुढे माझ्या आजीने कब्जे वहिवाट ठेवली असून पुढे माझे वडिलांचे नवे तशीच वहिवाट व नोंद झाली आहे, परंतु यामध्ये अजून एक शेतजमीन क्षेत्र आहे त्यामध्ये आजीच्या आई ने वाटणी मगिलतलीच नव्हती व तसे कुठे लेखी स्वरूपात मला या मिळकतीतील वाटणी नको असे कुठे लिहून दिले नाही तरी माझे वडिलांना त्या राहिलेल्या मिळकतीत वाटणी मिळू शकेल का? त्यासाठी कोणाकडे न्याय मागावा लागेल आणि कशा पध्दतीने?
आपणास आपला वारसाहक्क सिद्ध करत दिवाणी न्यायालयात दाद मागावी लागेल

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर सन 1979 मध्ये ग्रामपंचायतने जागा वाटप केली होती त्या मध्ये माझ्या वडीलाला आणि चुळत्याला जागा भेटली आहे सन 2000मध्ये चुलत्याची जागा माझ्या वडिलांनी खरेदी केली आहे पण ती जागा ग्रामसेवकने त्या वेळेस फेर वढला नाही आता त्या बॉण्ड ची वेदता संपली आहे आता माझ्य चुलत भाऊ ती जागा विक्री केली नाही म्हणतात त्यांनी 2015 मध्ये दिवणी केस केली होती त्याचा निकाल 2018 मध्ये त्याच्या बाजूने लागला आहे पण मी सेशन मध्ये 2018 ला अपील केली आहे माझ्य वडील मयत आहेत आणि चुलताही मयत आहेत
ग्रामपंचायतीस शासनाकडून जंगल/वन , गायरान /गुरुचरण , स्म्शान भूमी , खळ , बाजार , रस्ते , गटार या कारणासाठी दिली जाते . हि जमीन मालकी शासनाच्या मालकीची असते . ग्रामपंचायतीस हि जमीन कोणाला वाटप करण्याचा हक्क /अधिकार नाही .
त्यामुळे ग्राम
पंचायतीने जरी जागा भाडेपट्ट्याने दिली असली तरी ते अवैध वाटप आहे . मा जिल्हाधिकारी अशी जमीन ग्राम पंचायती कडून काढून घेउ शकतात . आपले नातेवाईकांचे लाभत झालेले वाटप अवैध आहे
मा न्यायालयाचे निदर्शनास हि बाब आणून दिलेली नाही कि , हि जागा ग्रामपंचायतीचे मालकीची नाही तर शासनाची आहे त्यामुळे निकाल चुलत्याची लाभत लागला आहे .
भांडून काही उपयोग नाही , शासन भविष्यात हि जमीन काढून घेणार आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आपले संबंधित खरेदीखत नोंदणीकृत असेल तर अशा नोंदणीकृत दस्ताची वैधता सक्षम न्यायालयाने ते खरेदीखत रद्द केल्या शिवाय संपत नाही. आपल्या प्रश्नावरून आपण अनोंदणीकृत दस्ताद्वारे खरेदी केली होती असे दिसून येते. आपणास पुन्हा वरिष्ठ न्यायालयात दाद मागावी लागेल

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Manoj n wagh
21-11-2021
manojwagh51285@gmail.com

शेती मध्ये जाण्या्साठी रस्ता ची अडवणूक होते आहे
आपला रस्ता अडवून सहा महिन्यापेक्षा कमी कालावधी झाला असेल तर आपण तहसीलदार यांचे कडे मामलतदार कोर्ट कायदा नुसार दावा दाखल करावा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by rahul tupe
17-11-2021
tuperahul87@gmail.com

प्रश्न : आम्ही सन 1940 पासुन देवस्थानाची जागा खंडाने करत होतो. तदनंतर सदर जागा आम्ही देवस्थानाकडून सन 1965 साली रजिस्टर खरेदीखताने खरेदी घेतली आहे. सदर खरेदीखतास आवश्यक त्या सर्व शासकीय परवानग्या व धर्मादाय आयुक्त व पुणे कोर्ट यांच्या परवानगी त्यावेळी घेतल्या होत्या. सदर खरेदीखताची नोंदीचा फेरफार तलाठी यांचेकडून मंजूर झाला परंतु 7/12 उताऱ्यावर आमचे नाव आले नाही. तहसीरदार साहेब यांचेकडे नोंदीचा अर्ज रिजेक्ट झाला सदर केस मध्ये काय करावे लागेल. हस्तलिखित 7/12 उताऱ्यावर वहिवाटदार म्हणुन आमचे नाव दाखल होते. संरक्षित कुळ म्हणून दुसऱ्या व्यक्तीची नोंद आहे. सदर व्यक्ती(संरक्षित कुळ) व आमचे आजोबा वर नमूद केलेल्या खरेदीखत मध्ये खरेदी घेणार आहे.
देवस्थान जागा हि देवाचे मालकीची आहे . देवस्थान जागा Exemption to Land Revenue Act १८६३ च्या कलम ८ खंड ३ अन्वये विक्री करता येत नाही . नुकत्याच मा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने , वहिवाट दरांची नावे काढून टाकण्याबाबत न्यायालयाने निर्देश दिले आहेत .
शर्तभंग झाला म्हणून शासन जमीन काढून शासन नावे करू शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by rahul tupe
17-11-2021
tuperahul87@gmail.com

आम्ही गाव मौजे चांदिवली येथे दिनांक 12/12/20005 रोजी सर्व्हे न. 42/11 व 42/13 या मिळकती खरेदी केल्या त्यापैकी 1) सर्व्हे नं. 42/11 मध्ये खरेदीखतावेळी इतर अधिकारात कोणताही शेरा नव्हता. 2) सर्व्हे नं. 42/13 मध्ये खरेदीखतावेळी इतर अधिकारात महाराष्ट्र खाजगी वन (संपादन) कायदा 1975 चे कलम 22 अन्वये सेक्शन 35 मधून वगळन्यात आला असा शेरा होता. सदर खरेदीखताची नोंद करण्यापूर्वी सदर सर्व्हे न. 42/11 व 42/13 या मिळकतीच्या 7/12 च्या इतर अधिकारात नंतर वन संवर्धन अधिनियम १९८० च्या तरतुदीस पात्र असा शेरा आला. तरी माझा प्रश्न असा आहे कि सदर खरेदीखताची नोंद होऊन आमचे नाव मालक कब्जेदार सदरी दाखल होईल का?
७/१२ सादरी नाव लागण्यास अडचण नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sanket Agrale
16-11-2021
agralesanket@gmail.com

सर..
एक महिलेने तीच्या दोन मुल्या नावे १९४८ साली बक्षीस पत्र करून शेत जमिनीची समान वाटणी करून दिली. नंतर एकाने ती जमीन ३ मुल व २ मुली यांचा पैकी फक्त तीन मुलांच्याच नावे १९७६ साली समान वाटणी करून दिली.. तर त्या वेळी ज्या दोन मुली वाटणीत वगळल्या गेल्या होत्या त्या समान वाटणी चा दावा आता 2021 साली करू शकतात का ?
हिंदू वारसा कायदा २००५ ( सुधारणा ) नुसार , ज्या जमिनीचे वाटप २००४ पूर्वी झाले असेल त्या जमीनीत मुलींना आता वाटणी मागता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Shweta Gaikwad
15-11-2021
shwetag1969@gmail.com

नमस्कार सर, माझ्या वडिलांची रत्नागिरी जिल्ह्यात, संगमेश्वर तालुक्यात वडिलोपार्जित जमीन आहे. त्यांचे तोंडी वाटप झालेले आहे. त्यानुसार वडिलांनी त्यांच्या हिस्साच्या जमिनीवर रोजगार हमी योजना अंतर्गत स.न.१९९८-९९वस.न.२०००-२००१या वर्षांत आंबा व काजूची लागवड केलेली आहे. याची नोंद कृषी खात्यात देखील आहे. तसेच सातबाऱ्यावर फलोद्यान विकास योजनेचा लाभ घेतला असा शेरा आहे. कायदेशीर वाटप नसल्यामुळे सातबाऱ्यावर इतर सहहिस्सेदारांची पण नावे आहेत. माझा प्रश्न असा आहे, आमच्या सजाचे तलाठी यांचे म्हणणे आहे हि लागवड फक्त माझ्या वडिलांच्या नावे न राहता ती इतर सहहिस्सेदारांच्या नावे लागतील. त्यांचे म्हणणे योग्य आहे का? तसेच रोहयो अंतर्गत केलेली लागवड सातबारा वर वडिलांच्या नावे कशी करता येईल? यासाठी आपण मार्गदर्शन करावे.हि विनंती. ता.क.सहहिस्सेदारांपैकी दोन हिस्सेदार जमिनीचे वाटप करणयासाठी तयार नाहीत.
ज्यो झाडे लावतो व ज्याच्या मिळकतीत झाडांचे बुंधे असतात त्याचे मालकीची झाडे असतात . आपल्या प्रकरणात , जरी झाडे वडिलांनी लावली असली तरी , सामायिक जमिनीत झाडे लावली आहेत . जमीनीची वाटणी झालेली नाही . त्यामुळे इतर सहहिस्सेदारानाचा हि मालकी झाडांवर आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Pramod Kashid
14-11-2021
drpramodkashid@gmail.com

Dear Sir ,
We need advice . My father has 7 hector agricultural land and he want to divide land between him ,me , my mother and my brother . We approached Talathi and he is asking for more than 1 Lakh without any receipt . Can you suggest ideal way to get this done .
Make an application to Tahsildar under section 85 of the Maharashtra Land Revenue Code 1966 for the partition of the land . Talathi has no right to partition the land .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Mahesh
11-11-2021
maheshmaske86@gmail.com

40 वर्षाचे घर मिळकतअतिक्रमण कसे काढता येईल
अतिक्रमण काढून टाकण्याचा आदेश न्यायालयाकडून देणेबाबत दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Vipin
09-11-2021
vipindesai@gmail.com

1) jaminicha Tittle search report kothe milti 2) Tittle search report v ferfar utara yaat Kay fark aahe
Title Search म्हणजे जमिनीवर मालकी कोणाची आहे . मालकाशिवाय इतर कोणाचे हितसंबंध मिळकतीत आहे का ? जमिनीवर कोणता अधिभार आहे का ? इत्यादी बाबींची तपासणी करणे . हे काम वकील करतात .
फेरफार जमिनीच्या अनुषंगाने झालेले व्यवहार लिहणे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Anand Ankush Rawool
08-11-2021
dymane101@gmail.com

नमस्कार सर,
माझ्या आजोबांना दोन बायका होत्या.पहिल्या पत्नीस एकच मुलगा असून, ते आता हयात नाहीत. तर, दुसऱ्या पत्नीस दोन मुले व दोन मुली आहेत. पैकी आतादुसऱ्या पत्नीच्या दोन मुली व एक मुलगा हयात आहे. आजोबांना वडिलोपार्जित 14 एकर जमीन असून, दुसऱ्या पत्नीला भाऊ नसल्याने त्या पत्नीची 28 एकर जमीन होती. परंतु या 28 एकर जमिनीवर आजोबांचे नाव लागल्याचे कागदपत्रावरून दिसून येत नाही. त्यामुळे संपूर्ण 28 एकर जमीन पहिल्या पत्नीच्या मुलाच्या नावावर झाली आहे, त्यामध्ये इतर भावंडांना हिस्सा मिळालेला नाही. तसेच पहिल्या पत्नीच्या मुलानेवडीलोपार्जित 14 एकर जमिनीमध्येही तिसरा हिस्सा घेतला आहे. मात्र दुसऱ्या पत्नीच्या मुलांना 28 एकर जमिनीमध्ये कोणताही हिस्सा दिलेला नाही(सदर कालावधी साधारण सन-1970 ते 95 मधील आहे.). तर, आता आजोबांच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलांना 28 एकर शेत जमिनीमध्येसमानहिस्सा मिळेल किंवा कसे, तसेच याबाबत 28 एकर जमिनीमध्ये समान अधिकार मिळविण्यासाठी कायकरावे लागेल? कृपया सविस्तर मार्गदर्शन करावे, ही नम्र विनंती.
AnandAnkushRawool
२८ एकर जमीन हि दुसऱ्या पत्नीची आहे . दुसरी पत्नी , हि आजोबांच्या अगोदर मयत झाली असल्यास , ती मिळकत वारसाने तिची मुले व आजोबा यांना समान हिस्यामध्ये मिल्ने आवश्यक . म्हणजे दोन मुली व दोन मुले . एका मुलगा मयत आहे . त्यास जर वारस असतील तर ते हि मयत मुलास मिळणार हिस्सा (१/४) हक्कदार आहेत .
दुसरी पत्नी मयत झाल्यावर पहिल्या पत्नीच्या मुलाचे नाव ज्या फेरफाराची लागले तो फेरफार अहवानीत प्रांतांकडे करावा लागेल . जर विलंब खूप असेल तर , दिवाणी न्यायालयात , हक्क निश्चित करून मी हीने बाबत दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sarang
04-11-2021
darya21@gmail.com

सर शेजारचा शेतकरी बांध फोडत आहे तो म्हणतोय पूर्वेकडील बांधावर माझा अधिकार आहे मी फोडणारच तरी मी काय करु मला तहसीलदार किंवा sdo यांच्याकडून मदत मिळू शकते त्यासाठी काय करावे
तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल करावी

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
तलाठी यांनी फेरफार नोंद घेतल्यानंतर मंडलाधिकरी यांनी ती नोंद प्रमाणित करण्याचा कालावधी किती असतो त्याबाबत काही परिपत्रक आहे का. प्रमाणभूत क्षेत्र जसे ११ आर हे क्षेत्र ३ व्यक्तींना समाईक घेता येते का त्यामुळे तुकडेबंदी कायद्याचा भंग होतो का ?
मंडळ अधिकारी यांनी 25 दिवसात नोंदीवर निर्णय घेणे अपेक्षित आहे. प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची जमीन जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय विकत घेता येणार नाही आणि असे क्षेत्र प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असेल तर ते सामायिकात विकत घेता येणार नाही

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Shridhar Dhaware
03-11-2021
shridhar.d333@gmail.com

नमस्कार सर,
माझे आजोबा यांनी 1951 मध्ये नोंदणीकृत खरेदीखताने जमिनी खरेदी केलेली आहे. तद्नंतर शासनाने ती जमिन निर्वासीत मालमत्ता (Evacuee Property) म्हणून जाहिर करुन 1954 ला पाकिस्तानातून भारतात आलेल्या एका निर्वासित व्यक्तीला दिली व त्याची सनद 1958 ला सदर निर्वासित व्यक्तीला दिली होती. या निर्वासित व्यक्तीने 1980 ला ही जमिन गावातीलच इतर व्यक्तींना कायम खरेदीने विकली आहे. सर, माझा प्रश्न असा आहे की, जर ही निर्वासीत मालमत्ता पाकिस्तानाहून भारतात स्थलांतरीत झालेल्या व्यक्तीला दिली होती तर अशी जमीन विकताना त्यासाठी शासनाची पूर्व परवानगीची आवश्यकता आहे का ? असेल तर कोणाची परवानगी घ्यावी लागते आणि नसेल तर त्यासाठी कोणती तरतूद आहे ? कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती.
अशी जमीन विकतांना शासनाची किंवा शासनामार्फत नियुक्त केलेल्या कस्‍टाोडियन यांची परवानगी आवश्यक आहे आपण संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,
सन २००८ साली मनपा.हद्दीत ०-०३ आर चे खरेदीखत केले आहे.त्याबाबत का.तलाठी यांना आता गावदप्तरी सदर खरेदीखताची नोंद घेता येईल का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती...
२००८ साली हि खरेदी केले क्षेत्र मनपा हद्दीत होते का ? असल्यास गाव दप्तरी नोंद होण्यास अडचण नाही .
नसल्यास नवीन तरतुदी नुसार दंड भरून व्यवहार नियमानुकूल करून घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sarang
29-10-2021
darya21@gmail.com

सर 1967 रोजी इनामी वर्ग 6 अ ची जमीन परवानगी न घेता 400 रुपयात खरेदीखत करून घेतली आहे आज तो दस्त नियमित करायचा आहे तर त्यासाठी किती रक्कम भरावी लागेल
संबंधित तहासदिलदार कार्यालयात विचारणा करणे उचित

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
सर आम्ही 2002 साली खरेदीखत करून जमीन विकत घेतली आहे. सदर जमीन दोघे भाऊ यांचे 141 आर क्षेत्र होते. ते क्षेत्र विभागणी करून मझी आई विद्या.व दोन चुलती यांच्या नावावर 47आर अशी विभागणी केली आहे.तसेच ती जमीन तोंडी वाटपाने आम्हाला 2005 साली देण्यात आली आहे.
सदर जमीन अहमदनगर -सोलापूर रोड क्र 516 च्या चौपदरीकरण साठी 2017 साली संपादित झाली आहे. तेव्हा पासून चे रस्ता सर्व्हे, 3d प्रांत ची नोटीस, नकाशा हे सर्व ची नोंद माझी आई विद्या यांच्या नावावर झाली आहे, तसेच निवाडण्यात ही आई च्या नावानेच नोंद आहे. सदर जमिनीत आम्ही 2011 साली घरबांधणी केली आहे तसेच त्याची 7/12 उतारा वर वस्तीपड लावून ग्रामपंचायत ला 2013 साली नोंद केली आहे. 2013 सालापासून ते 2021 पर्यंत घरपट्टी , पाणीपट्टी आपण भरलेली आहे, तसेच सदर जमिनीत एक बोरवेल घेतलेला आहे. त्याची नोंद 7/12 उतारा वर बोरवेल पड म्हणून लावली आहे. व लाईट चे कोटेशन 2013 साली भरले आहे. तसेच या क्षेत्रात आंबा फळबागेची आपण 2016 साली लागवड केली आहे.त्याची नोंद व पावती आहेत. या सगळ्या गोष्टी ची उपविभागीय अधिकारी यांच्या निवाड्यात नोंद आहे. आणि निवाडा तयार होपर्यंत माझ्या चुलतींनी कसली ही हरकत व अर्ज केलेला नाही,
सदर जमिनीचा मोबदला मिळत्या वेळी प्रांत अधिकारी यांनी ७/१२ उतारा वर असलेल्या सर्व नांवाच्या व्यक्तींची सहमती लागेल असे सांगितले होते. तर 2 चुलतींनी सहमती दयायला विरोध केला. तर त्यानंतर मी प्रांताधिकारी यांच्या सल्यानुसार अर्ज करून प्रत्यक्ष पाहणी साठी यावे ही विनंती केली. तर 16/9/21 ला उपभूमिअभिलेख श्रीगोंदा येथील शिरस्तेदर पाहणी करता आले व त्यांनी अहवालात वहिवाट व ताबा तसेच इतर पुरावे लक्ष्यात घेऊन परत 3d नोटीस च्या नावाप्रमाणेच अहवाल पाठवला त्या मध्ये माझ्या दोघी चुलतींचे नाव कमी झाले. व पैसे घेणारे माझी आई व गट क्रं मधील 4 असे एकूण 5 लोकांची सहमती घेऊन पैसे काढून घ्यावे असे प्रांताधिकारी यांनी संगीयतले. तर त्या अहवाल वर माझ्या चुलत्या यांनी हरकत घेतली व हा अहवाल खोटा बनवला असे हरकत घेऊन परत पाहणी चा अर्ज केला तर परत पाहणी करता उपअधीक्षक भूमिअभिलेख श्रीगोंदा हे पाहणीला आले तर परत जुना अहवाल त काही बदल न करता पाठवला.
1)सदर जमिनीचे आम्हाला पैसे काढण्यासाठी काय करावे लागेल
2) सदर जमिनीत 5 जण मोबदला घेणारे आहेत तर त्या पैकी माझे चुलते सहमती देत नाहीत. बाकी 4 जण तयार आहेत.तर आमच्या 4 घांचे पैसे काढण्यासाठी काय करावे?
3) गटामधील इतर व्यक्ती सोडून आपले वयक्तिक रक्कम काढता येईल का?
४) जर पैसे नाही निघाले तर पुढे काय करावे
5) भविष्यात जर हे प्रकरण न्यायालयात गेले तर काय होईल?
ह्रषीकेशजी
खरतर जमीन ज्या व्यक्तीच्या नावे खरेदी केली आहे त्या सर्व व्यक्तींची नावे ७/१२ ला लागणे आवश्यक आहे . त्यामुळे मिळकत ज्यांचे नावे मिळकत खरेदि करण्यात आली आहे त्या सर्वांचा भू संपादन नुकसान भरपाई मिळण्याचा हक्क आहे .
इतरांना म्हणजे ज्याचे नावे मिळकत खरेदी करण्यात आली आहे त्या सर्वांना नुकसान भरपाई मिळू द्या
प्रकरण न्यायालयात गेल्यास , सर्वाना नुकसान भरपाई मिळेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Shridhar Dhaware
27-10-2021
shridhar.d333@gmail.com

सर, एखादी निर्वासित मालमत्ता सनद देऊन जर कोणाला अलॉट केली असेल तर अशी जमिनी विक्री करताना परवानगीची आवश्यकता आहे का ?
निर्वासित मालमत्ता प्रदान केल्यानंतर त्या मिळकतीवर कोणतेही निर्बंध नाहीत . अशी मालमत्ता free -hold आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Rahul B Kale
18-10-2021
rahulrk7085@gmail.com

सर माझा प्रश्न असा आहे की, जर एका कुटुंबात 2 भाउ व 1 बहीण आहे. त्या बहीणीने जर हक्कसोडपत्र एका भावाच्या लाभात करून दिले असेल व अशा हक्कसोडपत्रान्वये 7/12 पत्रकी अंमल होवुन बहीणीचे नाव कमी झाले असुन फक्त दोन भावांची नावे दाखल आहेत.


तर ते हक्कसोडपत्र दुस—या भावाच्या लाभात देखील सोडुन दिले जाते किंवा नाही ? तसेच सदरील 7/12 पत्रकी कोणाचा किती हिस्सा आहे ?
दोन भाऊ व एक बहीण आहे . बहिणीने एका भावाच्या लाभत आपला हक्क सोडून दिला आहे त्यामुळे बहिणीचा १/३ हिस्सा ज्या भावाच्या लाभात हक्क सोडला आहे त्याचे लाभात होईल . दुसऱ्या भावाच्या लाभात हक्क जाणार नाही . एका भावाचे नावे २/३ हिस्सा व दुसऱ्या भावाचे नावे १/३ हिस्सा होईल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर माझ्या मामाने माझ्या आईचा अंगठा घेऊन विनामोबदला हक्कसोड पत्र बनवलेलं आहे माझ्या आईच त्यावेळी वय ७५ वर्षे होत आणि ती अज्ञानी होती तर ते हक्कसोडपत्र रद्द होऊ शकते का आईचा मृत्यू २ वर्षांपूर्वी झाला आहे तर हे हक्कसोडपत्र रद्द होईल का?
करार कायदा १८८१ च्या कलम २५ अन्वये , कोणताही करार मोबदल्याशिवाय अवैध असतो . मात्र जर असा करार नोंदणीकृत असेल व प्रेमापोटी रक्तातील नात्याच्या व्यक्तीस दिला असेल तर असा करार अवैध ठरत नाही . त्यामुळे करार अवैध ठरणे अवघड आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Aditya
13-10-2021
itsadi9696@gmail.com

नमस्कार सर/मॅडम,
आमच्या पूर्वजांनी १९६९ मध्ये गावठाण लगत पुर्व-पश्चिम दिशेने साधारणपणे ५० फूट रुंद अशा पट्टीच्या स्वरूपात सर्व्हे नं.१ मधून १ हेक्टर १६ गुंठे जमीन घरे बांधण्यासाठी विकत घेतली होती आणि तेव्हापासून सर्वजण त्यावर घरे बांधून राहत आहोत. आमच्या घरांच्या दक्षिण बाजूला सर्व्हे नं १ मधील लोकांच्या मालकीचा पूर्वापार रस्ता होता म्हणून आमच्या पूर्वजांनी रस्त्याच्या शेजारी असलेली ही जमीन विकत घेतली होती.रस्त्याच्या दक्षिण बाजूला सर्व्हे नं ९९ आहे. सर्व्हे नं ९९ मधील लोकांनी तो रस्ता त्यांच्या मालकीचा आहे असे म्हणून जमिनीची कोणत्याही प्रकारची मोजणी न करता बंद केला आहे. हा रस्ता गेल्या ३ महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे गल्लीतील सर्वांना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आमच्या घरांची व रस्त्याची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात आहे पण आमची गल्ली गावठाण मध्ये येत नसल्याने ग्रामपंचायत त्यावर काही कारवाई करू शकत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. यासाठी आम्ही मामलेदार ॲक्ट १९०६ चे कलम ५(२) अंतर्गत तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली आहे पण इतर शेतरस्ता तक्रारी प्रमाणे या विषयावर अत्यंत मंद गतीने कार्यवाही चालू असल्याने त्यावर अजून काही ठोस प्रकारची कारवाई झालेली नाही.मुळात हा रस्ता इतर शेतरस्त्यांपेक्षा वेगळा असल्याने त्यावर लवकरात लवकर कारवाई होणे आवश्यक आहे. रस्ता बंद असल्यामुळे व दुसरा पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने आम्हाला घरांच्या बाहेर पडणे देखील अवघड झाले आहे. हा रस्ता लवकरात लवकर खुला करून मिळावा म्हणून आम्ही काय करावे व कोणाकडे दाद मागावी यासाठी कृपया मार्गदर्शन करावे.
धन्यवाद.
Indian Easement Act १८८२ खाली दिवाणी दावा दाखल करावा .
कारण रस्त्याचा वापर शेतीकामासाठी होत नाही . त्यामुळे मामलतदार कोर्ट ऍक्ट चा उपयोग करता येणार नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Ghansham
11-10-2021
rathodghansham24@gmail.com

Good evening sir ,
I purchased one acre irrigated land out five acres land from one person via Registered Kharedi but He already took loan from the other bank so It is not being registered on my name .mandal Adhikari is saying . This farm can not be registered because there is loan on it . Please give answer
Circle Officer cannot refuse to mutate the land in your name which you have purchased by registered deed . Ask him to give in writing.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, माझ्या नातलगाचे २.५० रुपये घ्या स्टॅंपवर १९७५ मध्ये अनोंदणीकृत आपसी वाटणी पत्रानुसार हिस्सेवाटणी झाली होती.त्यांच्या सोबत त्यांच्या आईचे सुध्दा ७/१२ वर नाव दर्ज आहे.आपसी वाटणी पत्रानुसार त्यांच्या आईचे मृत्यू नंतर त्यांचा एकट्याचांच हिस्सा राहील असे लिहिले आहे.त्यांच्या आईचा २५ वर्षा आधी मृत्यू झाला आहे,आज पावेतो आईचे नाव कमी केलेले नाही.करीता आजही त्या आपसी वाटणी पत्रानुसार त्यांच्या आईचे नाव कमी होऊ शकते का? किंवा इतर वारस दावेदारी करु शकते, त्याबद्दल मार्गदर्शन करावे.
आईचा मृत्यू झाला आहे तर आईचे नाव कमी होणे आवश्यक आहे . मात्र आईस त्या व्यक्तीशिवाय अन्य वारस आहेत का ? त्या अन्य वारसांची नावे हि लागू शकतात

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.77 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3