जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Uzer Khan
04-02-2021
uzairahemad00@gmail.com
क व्यक्तीने ग्रामीण एका भागात 2010 मध्ये 1. 60 (4 एकर ) शेत जमीन खरेदी केली. जमीन विक्री करणारे वक्ती ने 2009 मध्य बिनशेती आदेश साठी उपविभागीय अधिकारी कडे अर्ज केला होता. बिन शेती आदेश आणि रेखांकन ला 2012 मद्ये मंजूर मिळाला. क ने 2020 मद्ये revise रेखांकन केले त्यास मंजुरी घेतली नाही. नगर रचना येथे जुने रेखांकन आहे. क प्लॉट जुन्या रेखांकन ने विक्री करत नाही. नवीन aprove न केलेले रेखांकन नुसार प्लॉट खरेदी केल्यास भविष्य मध्ये अडचण होईल का. कूर्पया मार्गदर्शन करावे hi विनंती
Question by Ashish Madhukar Shirsath
03-02-2021
ashishshirsath28@gmail.com
सर जुने मातीचे घर विकत घेतले आहे kherdhi खत केलेली आहे पण ct serve made nav नाही आहे नाव लावण्या साठी काय करावे
ज्या खरेदीखताने आपण घर विकत घेतलेली आहे त्या खरेदी खतांमध्ये घरात खालील जमीनही ही आपणाला हस्तांतरित झाल्या बाबतचा आठवा हस्तांतरीत होत असल्याबाबत असा उल्लेख जर खरेदी खतामध्ये असेल तर ते आपण संबंधित सिटी सर्वे अधिकारी यांना सादर करा. सादर केलेल्या खरेदीखताचा अनुषंगाने मिळकत पत्रिकेला आपले नाव लागेल.
मात्र केवळ जमिनीवरील घरच आपण खरेदी केली असल्यास व त्याखालील जमीन खरेदी केलेल्या केलेली नसल्यास आपले नाव मिळकत पत्रिकेमध्ये अशा जमिनीला लागणार नाही. जे घर आहे त्या घराला, स्थानिक स्वराज्य संस्था मार्फत म्हणजे ग्रामपंचायत/ नगरपालिका/ महानगरपालिका यांचेमार्फत करवसुलीसाठी लावले नाव लावले जाईल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Jaydeep pawar
02-02-2021
jpawar018@gmail.com
केंद्र सरकार कडून खाजगी शेत जमीन वर लागलेला वन विभागाचा केंद्र शासनाच्या पूर्व परवानगी शिवाय वनेत्तर कामास बंदी हा शिक्का कमी कसा करावा त्या बद्दल माहिती द्यावी सर
वनेतर कामास बंदी हा जो शेरा सातबाराच्या इतर हक्कात आहे तो कमी करण्यासाठी, आपणाला केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल. यामध्ये जेवढी क्षेत्र तुम्ही वनेतर कामासाठी वापरणार आहात त्याच्या दुप्पट क्षेत्र आपणाला केंद्रीय गृहमंत्रालयाला द्यावे लागते व त्यावर त्यावर वृक्ष लागवड करण्यासाठी शुल्क ही आपणाला केंद्र शासनाकडे जमा करावे लागते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Pramod pawar
02-02-2021
pramodpawar23@gmail.com
महोदय, मी वरील अर्जदार या मुंबई वडोदरा महामार्गाच्या संपादनात उद्धवस्त झालेला शेतकरी आहे. माझ्या कौटुंबिक जमिनीतून माझ्या हीश्याला आलेल्या जमिनिपैकी तब्बल 120 गुंठे जमीन संपादित झाली आहे. वाटणी पत्र नोंदी तब्बल 3 वेळा असल्याने चुकीचे वाटणीपत्र नोंदीत झाल्याने माझ्या कब्जा वाहिवाटिला असलेली जमीन माझ्या चुलत भावांच्या नावावर राहिली आणि मी हरकत घेऊनही आर्थिक व्यवहारमुळे त्याचा मोबदला माझ्या भाऊ बंधानी हडपला. त्यात सर्वे नंबर 24 ही जमीन एकत्रित (गोळा) सर्वे नंबर आहे. त्यात आमचा एक सामायिक सात बारा (40 गुंठे) तसेच इतर क्षेत्र हे भाऊ बंध आणि काही इतरांचे नाव आहे. पैकी आदिवासी खातेदार वणगा, डावरे आणि थापड यांचे क्षेत्र त्यांच्या नावे आणि वहिवाट असे बरोबर आहे, मात्र माझे भाऊ बंध सदाशिव कानू पाटील यांच्या नावे असलेला सात बारा चुकीचा आहे. 1986-87 मध्ये एकत्रिकरणात झालेल्या भूसर्वेक्षणात माझ्या हीश्याला या सर्वे नंबर चे 52.2 गुंठे क्षेत्र आहे. तशी अधिकृत नोंद आणि सह्या भूमी अभिलेख दप्तरी असलेल्या गुणाकार बुकात आहेत. त्याच 24 सर्वे नंबर पैकी 52.2 गुंठे जमीनी पैकी 49 गुंठे जमीन ही माझी जात असताना भूकरमापक श्री सुरेश लंगोटे यांनी माझ्याकडे मोबदला मिळावा असा रिपोर्ट पाठविण्याचे 5 लाख रुपये लाच मागितली. मी ती देण्यास नकार दिल्याने सदाशिव कानू पाटील यांनी त्यांना पाच लाख रुपये दिल्याने लंगोटे यांनी खोटा रिपोर्ट पाठवून या 24 सर्वे नंबर मधील 37 गुंठे जमिनीचे पैसे सदाशिव कानू पाटील यांना मिळवून दिले. मला जेव्हा हे कळले तेव्हा उपविभागीय अधिकारी भिवंडी यांच्या कार्यालयात तक्रार दाखल केली. आपण त्याची दखल घेऊन तातडीने फेर मोजणी लावण्याचे आदेश दिले. त्या नुसार 2 डिसेंबर 2020 रोजी या 24 सर्वे नंबर ची फेरमोजणी झाली. त्यात आलेला नकाशा आणि वहिवाट बरोबर नोंदवली गेली. या मोजणी मध्ये स्पष्ट झाले आहे की भूमिअभिलेख विभागाने आधी दि.12 ऑक्टोबर 2020 रोजीच्या मोजणीचा पाठवलेला रिपोर्ट हा आर्थिक व्यवहार करून पाठवला आणि त्याच आधारे प्रांत कार्यालयातून सदाशिव कानू पाटील यांना मोबदला देण्यात आला. एकत्रित (गोळा) सर्वे नंबर मध्ये वहिवाट असेल तसे हिस्से पाडले जातात असे असताना आणि सदाशिव कानू यांनी मोजणी समयी एक ही गुंठा वहिवाट न दाखवता त्यांना 37 गुंठे पैसे आणि आमचा 40 गुंठे सातबारा असताना मी 49 गुंठे वहिवाट दाखवली असताना आमची सामायिक केवळ 12 गुंठे संपादित असा चुकीचा अहवाल या रिपोर्ट मध्ये माझी 49 गुंठे वहिवाट स्पष्ट दिसते आहे, मी सामूहिक सात बारा सदरी देखील आहे, पण महत्वाची गोष्ट म्हणजे भूमी अभिलेख कार्यालयातील महत्वाचा दस्त म्हणजे गुणाकार बुक ( फॉर्म 4) मध्ये माझी हीश्याची अंतिम नोंद स्पष्ट पणे नमूद आहे, म्हणजेच माझ्या हीष्याच्या 52.2 गुंठे पैकी 49 गुंठे जमीन संपदनाखाली आहे. म्हणजेच 49 गुंठे जमिनीचा मी हकदार आहे. अगदी तसेच सर्वे नंबर 79/34 ब हा एकत्रित सर्वे नंबर चा एक भाग आहे, 40 -40 गुंठेचे 4 सातबारा असून 79/34 ब हा माझा सातबारा क्लीअर आहे, यात पुन्हा मोजणी वाल्यानी मोजणी करताना 6 गुंठ्यांत माझ्या भाऊ बंधाचे कबजेधारक दाखवले व लगत असलेल्या त्यांच्या 40 गुंठे सात बारा मधील 6 गुंठे क्षेत्र माझ्या जागेच्या एक बाजूला येते असे दाखवले, म्हणजे त्यांना पुन्हा 6 गुंठे चे पैसे जावेत असे भूमिअभिलेख यांचा डाव आहे, मुळात 40 गुंठे सातबारा पैकी 6 गुंठे एका बाजूला आणि उरलेली 34 गुंठे दूर कुठेतरी असे तुकडे होत नाही हे स्पष्ट आहे, तरीही असा चुकीचा रिपोर्ट बनवला गेला आहे. तरी ते ही 17 गुंठे माझ्या हक्काचे आहेत, 79 /34 पैकी माझा 79 /34 ब हाच सातबारा मधील 17 गुंठे जागा बाधित होत आहे. यापूर्वीही सर्वे नंबर 81 मधील 24.65 या संपादित जमिनीचा सातबारा क्लीअर असताना मला मोबदला दिला जात नव्हता ,कोणाचीही हरकत नसताना हरकत आहे असे खोटे सांगितले जायचे, मला उद्या या पर्वा या असे संगीतले जात होते. मी भिवंडी प्रांत कार्यालयात असलेले अधिकारी श्री विठ्ठल गोसावी (तिथे त्यांच्या नावाचा बोर्ड लावलेला आहे, म्हणून पूर्ण नाव माहिती आहे) यांच्याकडे गेलो, व म्हणालो साहेब का माझे पैसे देत नाही, तर ते म्हणाले पैसे फुकट मिळत नाही, त्याला खर्च आहे. प्रांत साहेबांना कमिशन दिल्याशिवाय काम होत नाही, मग त्यांनी प्रांत कार्यालयात भूसंपादन विभागात असलेले प्रकाश गजानन पाटील यांना त्यांनी बोलावले व म्हणाले यांच्याकडे तुमच्या एकूण मोबदला रक्कमेच्या 5 टक्के कमिशन चा चेक द्या मग पैसे निघतील. मी हतबल होऊन माझ्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक वज्रेश्वरी शाखेच्या खाते क्रमांक- 001400300004565. चे दोन कोरे धनादेश प्रकाश पाटील यांनी घेतले व नंतर त्यावर प्रकाश पाटील यांनी चेक क्रमांक - 078324 वरून 1 लाख 40 हजार आणि दुसरा चेक क्रमांक-078325 यावरून 2 लाख असे 3 लाख 40 हजार एवढी लाच माझ्याकडून घेतली, हे पैसे विठ्ठल गोसावी आणि प्रकाश पाटील यांनी घेतले असून प्रकाश गजानन पाटील यांच्या खात्यात गेल. मी हरकती घेतल्या ,माझ्या वकिलांनी लेखी हरकती घेतल्या मात्र त्यांची सुनावणी न करता कमिशन दिले की पेमेंट मिळेल या तत्वावर माझ्या हरकती केराच्या टोपलीत टाकून मला उद्धवस्त केले आहे. माझ्यावर आधीच खूप अन्याय झालेला आहे. यात लाच घेणे, लाचेची मागणी करणे असे प्रकारही माझ्याबाबतीत घडले आहेत, मात्र मला त्या तपशिलात न जाता मला किमान या माझ्या हक्काच्या स.न.24 मधील 49 गुंठे जमिनीचा तसेच स.न. 79/34ब मधील 17 गुंठे जमिनीचा मोबदला मला मिळावा यासाठी मी अनेकदा अर्ज,हरकती, विनवण्या केल्या, प्रांत अधिकारी यांना अनेकदा भेटलो मात्र माझी दखल घेतली नाही. म्हणून माझ्याकडे आता जमीन राहिली नाही, जी आहे नावावर ती आता भाऊ बंधांच्या कब्जात आहे. मी पूर्णपणे भूमिहीन झालो आहे. मला मार्गदर्शन करावे ही विनंती।
Question by Ajit patil
30-01-2021
ajitkhose51@gmail.com
(शेती वाटणी बद्दल) कोर्ट मध्ये केस चालू आहे, परंतु मागची पाच वर्ष पूर्ण शेत हे विरुद्ध पार्टी वापरत आहेत तरी आम्हाला त्यातून एक रुपयाचे उत्पन्न दिले जात नाही . आमचे आर्थिक नुकसान होत आहे. आणि विरुद्ध पार्टी केस जेवढं लांबेल तेवढं लांबवत आहे . पूर्ण शेती, निकाल लागे पर्यंत कोणी ही वापरायचे नाही असं काही होवू शकते का ??
अशा प्रकारचे आदेश न्यायालय देऊ शकत नाही. न्यायालयाने प्रथमदर्शनी आपली जी विरुद्ध पार्टी आहे त्यांच्या ताब्यात वादातील मिळकत असल्याचा निष्कर्ष काढल्याने त्यांच्या ताब्यात ती मिळकत आहे. भविष्यामध्ये न्यायालयाचे निकालांमध्ये त्या मिळकतीचा कायदेशीर हक्क आपल्याकडे असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला तर मुक्त कालावधीमध्ये जे उत्पन्न समोरच्या पार्टीने घेतलेले आहे हे त्याची भरपाई आपणाला करणेबाबत न्यायालय आदेश करू शकते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Eknath Bankar.
30-01-2021
er.bankar@gmail.com
वारस नोंदीसाठी किती दिवसांचा कालावधी आहे?
Question by भोकरे सोमश्री सुरेश
29-01-2021
Somshribhokare5@gmail.com
नमस्कार सर ,गावा जवळ आमची 62 गुंठे जमीन आहे ,परंतु आम्ही ज्या जागेवर राहतो ,तिथे आमचे एक घर असून बाकी जागा मोकळी आहे ,त्या जागेचा 62 गुंठे चा 7/12 आमच्या कडे आहे ,पण आम्ही राहतो त्या जागेचा 7/12 नकाशा हद्द दुसरीकडे आहे ,अन आमची जागा नकाशावर जिथे आहे ,तिथे दुसऱ्यांनी घर बांधली आहेत ,म्हणजे आम्ही त्यांच्या जागेवर अन ते आमच्या जागेवर राहतात,पण त्यांनी घर बांधली आहेत ,अन ते आता आमची जागा मागतात ,कारण आम्ही जिथे राहतो तिथला 7/12 नकाशा त्यांचा आहे ,तर आम्ही जिथे राहतो ती जागा अधिकृत करण्यासाठी ,अन तिथलाच नकाशा येण्यासाठी काय करावे ,कृपया मार्गदर्शन करावे
असा प्रश्न परस्पर सामंजस्याने सुटू शकतो. नाहीतर आपण ज्या जागेवर राहता त्याला वीस वर्षांहून अधिक काळ पूर्ण झाला असेल तर आपण न्यायालयामध्ये आपल्याला भागामध्ये मालकीहक्क जाहीर करण्यासाठी दावा दाखल करू शकता.
अथवा एकमेकाच्या जमिनीची अदलाबदल करणे आहे त्यावर एक उपाय असू शकतो.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by कासीम खानजादे
29-01-2021
kasimkhanzada5@gmail.com
विभागीय आयुक्त यांच्या आदेशानुसार, उपविभागीय अधिकारी यांनी आदेशित केले आहे परंतु जमिनीचा क्षेत्र लिहिताना चूक झाली आहे व जास्त क्षेत्राचा ताबा घेण्यात आला आहे. असे उपलब्ध रेकार्ड वरून दिसून येत आहे. तरी हि चूक कशी व कोणी दुरुस्त करावी या बाबत माहिती मिळावी हि विनंती.
उपविभागीय अधिकारी यांना त्यांच्या आदेशाचे पुनर्विलोकन करण्यास सांगा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by आदित्य भालेराव
29-01-2021
aaditya.bhalerao100@gmail.com
सर अजोबांच्या नावावर देवस्तान इनाम जमीन आहे तय जमीनीच्या उतारावर कुळ म्हणून अजोबांचे नाव आहे।आजोबा जीवंत आहे वारसंचि नावे लावत यतील का
जरी मिळकत देवस्थान असली तरी इतर हक्कात आपल्या वडिलांचे नाव कूळ म्हणून आहे. कुळाच्या नावे देवस्थान जमिनीची विक्री किंमत निश्चित होत नाही म्हणजे महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 असा कुळ या मिळकतीचा मालक होऊ शकत नाही. मात्र कुळवहिवाट ही वारसाने हस्तांतरित होत असल्याने( कलम 40) इतर हक्कांमध्ये त्या व्यक्तीच्या पश्चात त्याच्या वारसांची नावे लागतात
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सर्वज्ञ वट्टमवार
29-01-2021
ganesh.raiwar@gmail.com
सर नमस्कार
माझे वडीलाने एक प्लॉट खरेदी केलेला आहे.गट नं.२२ व २८ या दोन्ही चा लेआउट व अकृषिक परवानगी एकच आहे. दोन्ही गटात िमिळून प्लॉटींग नं. ०१ ते ५० असे केले आहेत. ०१ ते २६ क्रमांकाचे प्लॉट गट नं.२२ मध्ये आहेत व प्लॉट क्रं.२७ ते ५०दुस-या गटात आहेत. प्लॉट क्रं.२९ हा गट नं.२८ मध्ये आहे परंतू रजिस्ट्री करताना सदर प्लॉट गट नं.२२ असा नोंदणी झाला आहे. खरेदी करुन सोळा वर्षोपेक्षा जास्त कालावधी झाला आहे त्यामुळे लिहून देणार आज रोजी रजिस्ट्री दुरुस्ती साठी येत नाहीत त्यामुळे िलिहून देणा-या शिवाय दुरुस्ती करण्यासाठी दुसरा कांही पर्याय आहे का
मिळकतीचे वर्णन पूर्णपणे बदलत आहे. त्यामुळे ही चूक झाली सोळा वर्षापुर्वी दस्त नोंदणी झाल्याझाल्या जरी लक्षात आली असती तरी त्याची दुरुस्ती खत करणे थोडे कठीण होते. जर त्या दस्ता मध्ये आपण चतुर्सिमा लिहिले असत्या व त्या चतुर्सिमा या प्लॉट नंबर 29 च्या अनुषंगाने नमूद केलेले असतील व प्लॉट नंबर 22 प्लॉट नंबर 29 याची एकूण क्षेत्र सारखेच असेल तर दुरुस्ती दस्त होण्यास हरकत नसावी. तथापि ही चूक लक्षात येण्यास तब्बल सोळा वर्ष का लागले याचे कारण काय सांगणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तसेच दुरुस्ती खत करण्यास जर मूळ विकणारा व्यक्ती येत नसेल तर त्याला दुरुस्ती असे संबोधता येणार नाही.यामध्ये काही करता येईल असे मला वाटत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by ज्ञानेश्वर गणेशराव कोरडे
28-01-2021
dgkorde@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे की , वडील वडीलोपार्जित जमीन आपल्या आपत्यांपैकी कोणत्याही एका आपत्याला विक्री करू शकतात काय ?
वडिलोपार्जित जमीन मध्ये मुलांचा नातू चा तसेच मुलींचा हक्क असतो. त्यामुळे केवळ एका मुलाच्या नावे वडिलोपार्जित जमीन वडिलांना करता येत नाही. समजा एका व्यक्तीला त्याच्या वडिलांकडून पाच एकर जमीन प्राप्त झालेली आहे. आणि या पाच एकर जमिनीचे तो विल्हेवाट लावू इच्छित आहे. तर तो सर्व पाच एकर जमीन केवळ एकाच मुलाचे नावे करू शकत नाही. समजा या व्यक्तीला दोन मुले आणि दोन मुलगी आहेत. तर या जमिनीचे वाटप प्रत्येक मुलाला व मुलीला एक एकर कोणत्या व्यक्तीला स्वतःला एक एकर असा त्या मिळकतीवर हक्क असतो. या चारा प त्यापैकी केवळ एकाच मुलाचे नावे वडील मिळकत करू इच्छित असतील, तर त्या मुलाच्या वाट्याला येणारे केवळ एक एकर क्षेत्र हे त्याच्या नावे करू शकतील. संपूर्ण पाच एकर क्षेत्र एकाच मुलाच्या नावे होणार नाही. याउपरही त्याने सर्व पाच एकर क्षेत्र एकाच मुलाचे नावे केले, आणि इतर तीन व्यक्तींनी त्यास हरकत घेतली, तर अशाप्रकारे या दस्त द्वारे एकाच व्यक्तीच्या नावे मिळकत केली आहे तो दस्त रद्दबादल होऊ शकतो. व पर्यायाने हा व्यवहार ही रद्द होईल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by ज्ञानेश्वर माणिक भांगे
28-01-2021
dnyanu@live.com
नमस्कार सर
माझे आजोबा 50-55 वर्षा पूर्वी वारले
त्यांच्या नावे 7-8 एकर जमीन होती त्यांनी ती ते हयात असतानेच विकली आहे त्यांना 4 मुले व 3 मुली होत्या त्यापैकी अत्ता फक्त 2 मुले हयातीत आहे माझे वडील व चुलते
यांच्या पैकी कोणाच्याही नावे जमीन नाही
आता मला शेत जमीन घ्यायची आहे तर त्यासाठी मी शेतकरी असल्याचा पुरावा कसा द्यावा
अत्ता आमच्या गावात आमचे आजोबा व त्यांचे चुलत भाऊ यांच्या नवे 1 गुंठाचा उतारा दिसत आहे
त्याला अनुसरून काही करता येईल का व कसे
सदर उतारा अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील आहे
व मी लहानपणा पासून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात राहत आहे
ज्ञानेश्वर माणिक भांगे
9730101910
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 , कलम 63 व्यक्ती शेतकरी असल्याशिवाय त्याला शेत जमीन खरेदी करता येत नाही. या कायद्याच्या कलम दोन अन्वय शेतकरी म्हणजे जी व्यक्ती जमीन स्वतः कसते . जमीन स्वतः करणे म्हणजे स्वतःच्या देखरेखीखाली कुटुंबातील सदस्यांनी जमीन कसणे किंवा रोग पैशाच्या स्वरूपात किंवा वस्तूच्या स्वरूपात मोबदला देऊन नोकराच्या मदतीने जमीन कसणे.
या दोन व्याख्यांचा विचार केला तर आपण शेतकरी या व्याख्येत बसू शकतात. तसेच मिळकत ही आपले आजोबा व चुलत भावाच्या नावाने आहे. व त्याचे वाटप झाले नसल्याने आपण एकत्र कुटुंबात आहात व त्या व्याख्येत आपण बसत आहात. त्यामुळे कुळवहिवाट कायद्याच्या व्याख्येप्रमाणे आपण शेतकरी आहात. परंतु कुळवहिवाट कायद्यांतर्गत अभिप्रेत असलेली जमीन म्हणजे शेत जमीन. जमीन एकत्रित एक गुंठा आहे, तिचे सध्याचे स्थान कुठे आहे? ती जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत मानीव बिनशेती म्हणून झाल्याचे आदेश तहसीलदार यांनी काढलेले आहेत का? याची पडताळणी करा. अथवा त्या जमिनीचे परवानगी घेऊन त्यावर बांधकाम झालेले आहे का याची खात्री करा? जर अशी वस्तुस्थिती नसेल तर आपणाला शेतकरी दाखला मिळू शकतो. व त्या दाखल्याच्या आधारे आपण शेतजमीन खरेदी करू शकता.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सतीश सुरवसे
27-01-2021
patilsandi143@gmail.com
सर डिजिटल सातबारा वर नाव येत नाहीत dsc मधून सातबारा निघते पण डिजिटल सातबारा वारनाव येत नाही. कृपया उपाय सांगणे .
Question by Prashant
27-01-2021
pmadasnal@yahoo.com
Sir, our housing society has received notice from talathi office about pending dues under "maharashtra jamin mahsool". How to pay it online and which challan # to use?
Question by प्रवीण पाटील
27-01-2021
moreindustries595@gmail.com
महोदय,
खेडे गावातील सुशिक्षित बेरोजगार भूमीहीन व्यक्ती ला जर काही व्यवसाय उद्योग चालू करायचा असल्यास त्याला ग्रामपंचायत गावठाण किंवा शासन ताब्यातली पडीक वन जमीन भाडे करार तत्वावर किंवा इतर काही मार्गाने उद्योग करायला जमीन भेटू शकते का किंवा शासनाची काही योजना आहे का भूमीहीन व्यक्ती ला उद्योग उभा करण्यासाठी
कृपया माहिती कडवावी
धन्यवाद
महाराष्ट्र जमीन महसूल( शासकीय जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम 1971 चे नियम 26 अन्वये उद्योग चालू करण्यासाठी शासकीय जमीन देण्याबाबतची तरतूद आहे. याबाबत अंतिम अधिकार हे राज्य शासनाचे आहेत. आपणाला जमीन मागणीसाठी चा अर्ज आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे करावा लागेल. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्रकरणाची चौकशी करून तसा प्रस्ताव विभागीय आयुक्त यांच्यामार्फत शासनाकडे म्हणजे महसूल व वन विभाग कडे सादर केला जातो. अंतिम मंजुरी महसूल व वन विभागाकडून दिली जाते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पवार
24-01-2021
shreepadservices@gmail.com
वडिलोपार्जित 7 एकरशेतजमिनीवर आम्ही2 भाऊ व 2 बहिणीचे नाव असून त्या जमिनीचा किती सारा द्यावा लागतो
जमिनीचा शेतसारा हा जमिनीची उत्पादकता, जमिनीचा प्रकार त्याचा पोत व इतर बाबीवर अवलंबून असते. शेतसारा निश्चित करण्याची कार्यवाही ही फार पूर्वी झालेली आहे. त्याच्यानंतर शेत्सरा निश्चितीकरण म्हणजे( Settlement ) अजून झालेले नाही. एखाद्या जमिनीवर किती लोकांची नावे दाखल आहेत यावर जमिनीचा शेतसारा अवलंबून नसतो. आपण आपल्या गावाच्या गावकामगार तलाठी कडे जा त्या जमिनीचा शेतसारा किती आहे त्याबाबतचे मागणीपत्र तो आपणाला देईन.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विनोद मोरे
23-01-2021
Vinodmore1997@gmail.com
नमस्कार साहेब,
माझ्या पंजोबांना एकूण सहा मुले होती, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावे असणाऱ्या जमिनिपैकी अर्ध्या जमिनीमध्ये सर्व मुलांची नावे वारस म्हणून लागली ,परंतु काही जमिनीमध्ये फक्त मोठा मुलगा म्हणजे माझ्या आजोबांचेच नाव वारस म्हणून लागले आहेत , मात्र बाकी वारसांची नावे लागली नाहीत, आता ते सगळे मृत असून त्यांची मुले हयातीत आहेत आणि जमिनीच्या सातबाऱ्यावर माझ्या आजोबांच्या मुत्युनंतर माझे बाबा, काका आणि आत्या यांचे नाव लागले , आणि बाबांच्या मृत्यूनंतर आम्हा सहा भावंडांची नावे लागली त्यात एका भावाच्या मृत्यूनंतर त्यांच्या पाच वारसांची नावे लागली म्हणजे सद्यःस्थितील *माझी आई,आत्या,काका,४ भाऊ,१ भाऊजई,४ पुतणे आणि मी अशी एकूण १३ नावे आहेत* त्यामधून काही जमिनीवर माझ्या आत्याने हक्कसोड दिला आहे आणि काही जमिनीवर माझ्या एका भावाच्या नावे माझ्यासकट सर्व वारसांनी हक्कसोड दिला आहे, परंतु सदर सर्व जमीन हि वडिलोपार्जित असल्याने माझ्या आजोबांचे भावांचे वारस त्यात हक्क मिळवू शकतात का? आणि कशाप्रकारे? जर शक्य असल्यास सदर जमिनीत केलेल्या हक्कसोड आणि इतर खरेदी विक्रीच्या व्यवहारांचे काय होईल?
मूळ जमीन ती पंजोबा यांच्या मालकीची होती. त्यांच्या मृत्यूपश्चात एकूण मिळकतीला आपले आजोबा व आपले चुलत आजोबा या दोघांची नावे लागणे आवश्यक होते. एकूण जमिनीपैकी अर्ध्या जमिनीला पणजोबांच्या सर्व वारसांची नावे लागलेली आहेत. उर्वरित अर्ध्या जमिनीला केवळ आपल्या आजोबांचे नाव लागले व त्यांच्या पश्चात आपले वडील आत्या व आता आपली नावे लागलेली आहे. हिंदू वारसा कायद्याप्रमाणे एखादी हिंदू व्यक्ती मयत झाल्यावर अनुसूचीत नमूद केल्याप्रमाणे, मयत व्यक्तीच्या सर्व मुलांची नावे त्याच्या मिळते तिला लागणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या अर्ध्या जमिनीला केवळ आपल्या आजोबा व त्यांच्या पश्चात आपण सर्व वारसांची नावे लागली आहेत त्यामध्ये निम्मा हिस्सा हा आपल्या चुलत आजोबांचा व पर्यायाने आता त्यांच्या वारसांचा आहे. याबाबत त्यांनी हक्काबाबत महसूल यंत्रणेकडे अर्ज अपील केल्यास अथवा दिवाणी न्यायालयात दावा केल्यास त्यांना आपल्या ताब्यात व नावावर असलेल्या जमिनी मध्ये अर्धा हिस्सा देणे आवश्यक आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by जयश्री शेलार
23-01-2021
jayashrishelar11@gmail.com
नमस्कार सर. 7/12 सदरी 'इनाम वतन जमिन, नवीन अविभाज्य शर्त - नियंत्रित सत्ता प्रकाराने अशी नोंद असलेल्या जमिनीचे रूपांतर भोगवटदार 2 मधून भोगवटदार 1 मध्ये करायचे असेल तसेच सदर जमिनीचा अकृषिक वापर करणेसंदर्भात नेमकी काय प्रोसिजर आहे यासंदर्भात कृपया सविस्तर मार्गदर्शन व्हावे.
नवीन अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 29अ अन्वये , केवळ बॉम्बे जमीन महसूल अधिनियम 1879 , अथवा तदनंतरच्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम या कायद्याअंतर्गत भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनी अथवा वर्ग दोन म्हणून भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी, यांचेच रूपांतर वर्ग 1 मध्ये करता येते. अन्य कायद्यान्वये जसे की महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948, विदर्भ कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम , महाराष्ट्र शेत जमीन( धारण जमिनीची कमाल मर्यादा) कायदा व विविध वतन नष्ट करण्याचे कायदे या अंतर्गत दिलेल्या जमिनी ज्या वर्ग दोन म्हणून धारण केलेला आहे त्याचे वर्ग 1 मध्ये रुपांतर करता येत नाही.
तसेच 2002 मध्ये आलेल्या वतन नष्ट करणे सुधारणा अधिनियम 2002 अन्वय, वतन कायद्याखाली धारण केलेल्या वर्ग दोन च्या जमिनी यांच्या हस्तांतरणाला परवानगीची गरज नाही. तथापि हस्तांतरण यानंतरही ही जमीन वर्ग-2 म्हणूनच तिचा धारणाधिकार राहतो.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Bajarang jadhav
23-01-2021
Bajarangjadhav13@gmail.com
आदरणीय सर,
माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. आणि माझ्या बहिणीनी आम्हा 4 भावा पैकी 3चं भावांना त्यांचा हिस्सा मृत्यूपत्रात लिहून ठेवला आहे. हे मृत्यूपत्र नोटरी केले आहे. तर त्यांच्या मृत्यू नंतर मृत्यूपत्र प्रमाणे गावाकमगार तलाठी कार्यालयात नोंद होऊ शकते काय...त्यासाठी काय प्रोसेस आहे.... आणि ज्या भावाला त्यांनी त्यांचा हिस्सा दिला नाही त्याबद्दल तो आक्षेप घेऊ शकतो काय.?
मृत्युपत्र नोंदणीकृत असावे असे काही नाही. अगदी एखाद्या कोऱ्या कागदावर जरी मृत्युपत्र लिहिलेले असेल तरी ते कायद्याने वैध मृत्युपत्र आहे. हे फक्त त्यात एकच आहे की ज्याने मृत्युपत्र केले आहे त्याची आरोग्य स्थिती मृत्युपत्र करताना चांगली होती कोणत्याही द्रव्याच्या अमलाखाली तू नव्हता. तसेच मृत्युपत्र करणाऱ्यांची ही मिळकत स्वकष्टार्जित मिळकत होती. मृत्युपत्र हे करणाऱ्याकडून फसवणूक करून घेतलेली नसावेत. अशी स्थिती असेल तर एका भावाचे आक्षेप जरी घेतला तरी तू टिकणार नाही. मात्र यात एक गोष्ट होऊ शकते की मृत्यु पत्राच्या आधारे ज्यावेळेस तलाठी नोंद टाकतील आणि हीच संबंधित व्यक्तींना नोटीस देती पर्यायाने आपल्या बंधूंना ही त्याची नोटीस जाईल आणि त्याने जर त्या बाबत हरकत घेतली तर तक्रार नोंद म्हणून ती नोंद निर्णयासाठी मेहरबान तहसीलदार महोदय यांच्याकडे जाईल. त्यांच्या पुढील सुनावणीत हिजरात यांनी हरकत घेतली व सांगितले की हे मृत्युपत्र खोटे आहे तर तर ते सिद्ध करण्याची जबाबदारी त्या भावाची राहील. मात्र ज्या मिळकतीच्या बाबतीमध्ये हे मृत्यूपत्र केलेले आहे ती मिळकत जर मुंबई मध्ये स्थित असेल तर संबंधित नोंद मंजूर करणारे अधिकारी किंवा सिटी सर्वे ऑफिसर आपणाला त्या मृत्यूचे प्रॉफिट करून आणावयास सांगतील. तद्वतच मुंबई येथे स्थित असलेल्या मिळकतींचे प्रो भेट करणे हे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र मिळकत जर ही मुंबईच्या बाहेर असेल तर अशा मिळकतीचे प्रोबेट करण्याची आवश्यकता नाही. झालेल्या मृत्युपत्राचा वैधतेबाबत ज्याने शंका उपस्थित केली आहे त्याने न्यायालयात जाऊन मृत्यूपत्र अवैध आहे असे जाहीर करून आणावे लागेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Krushna Somnath Shinde
22-01-2021
krushnashinde096@gmail.com
फेरनोंद
अ ) मी दि २८/०१/२०१९ रोजी मा. उपविभागीय अधिकारी कार्यालय कर्जत यांचेकडे अर्ज दाखल केलेला आहे त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे
१ ) मौजे धोंडपारगांव ता . जामखेड जि.अ.नगर येथे माझी आई श्रीमती चंपाबाई रंगनाथ शिंदे हिचे नावावर गट नं . ३१३ व ३१४ होती . पैकी तिने मला गट नं ३१३ आणि माझे भाऊ भाऊसाहेब रंगनाथ शिंदे व बप्पा रंगनाथ शिंदे यांना गट नं २६२,२६०,२९०,२८७,३० देऊन वाटप केलेली होती व आहे .
२ ) माझी आई श्रीमती चंपाबाई रंगनाथ शिंदे हिने तहसीलदार साहेब जामखेड यांचेकडे अर्ज देऊन गट नं . ३१३ ला माझे नाव लावण्याची विनंती केली होती . त्याप्रमाणे तहसीलदार यांनी तलाठी यांना सोमनाथ च्या नवाची नोंद घ्यावी असे आदेश दिले त्यावर तलाठी यांनी ६ / ११ / १९९३ रोजी फेर नं . २७६ ने माझे नावचा फेर घेण्यात आला होता .
३ ) माझे आईने वरील गट नं .३१३ पैकी ०.३७ आर क्षेत्र आप्पासाहेब धोंडीबा शिंदे यांना खरेदी दिलेली होती . खरेदीखतावरुन फेर नं . २४९ ने खरेदीची नोंद दिनांक ३१ / १० / १९९२ रोजी झालेली होती . या नोंदीबद्दल मी तक्रार केली होती म्हणून मा . मंडळ निरीक्षक यांनी फेर नं . २४९ तक्रारी असल्याने ती नोंद निर्गत झाल्यावर फेर नोंद घ्यावी असा शेरा मारुन फेर नं . २७६ च्या नोंदीस तक्रार नसताना विनाकारण २७६ ची नोंद रद्द केली
४ ) मे निवासी नायब तहसिलदार यांनी तक्रारी नोंदीची चौकशी करून दिनांक ३० / ७ / १९९४ रोजी माझा तक्रारी अर्ज निकाली काढून नोंद मंजुर केली आहे .
५ ) गट नं . ३१३ हा ०.७४ आर क्षेत्राचा आहे त्यापैकी ०.३७ आर क्षेत्र आप्पासाहेब धोंडीबा शिंदे यांना विक्री केल्याने राहिलेले क्षेत्र ०.३७ आर माझी आई हिचे नावावर राहिले आहे .
६ ) चंपाबाई रंगनाथ शिंदे हिने गट नं .३१३ मला दिलेला आहे . तसा फेर नं .२७६ झालेला आहे . तक्रारी नोंद २४९ झालेने व तिचा निकाल झालेला असल्याने श्रीमती चंपाबाई रंगनाथ शिंदे हे तिचे नाव कमी करून ०.३७ आर क्षेत्रास माझे नाव कब्जेवहिवाटीस आहे . जंगल वहिवाटीप्रमाणे माझे नाव लावण्याचा आदेश व्हावा
त्यावर मा उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार जामखेड यांना प्रस्तुत अर्जाचे अनुषंगाने आपणामार्फत पुढील योग्य ती नियमानुसार कार्यवाही होऊन अर्जदार यांना त्याबाबत अवगत करणेत यावे असे कळविण्यात आलेले आहे
7) त्यावर तहसीलदार यांनी मा. मंडळ अधिकारी आरणगाव यांना अर्जदार यांचे अर्जाची संविस्तर चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करून तसा अहवाल ईकडेस सादर करावा असे कळवण्यात आलेले होते त्यानुसार मा. मंडळ अधिकारी आरणगाव यांनी दिनांक ( १ वर्ष ७ महिन्यांच्या कालावधी नंतर) आपला चौकशी अहवाल सादर केला आहे त्यात त्यांनी नमूद केले आहे की फेर नं 249 ही निर्गत झाल्यावर तलाठी यांनी पुन्हा नोंद घेणे अपेक्षित होते परंतु त्यांच्याकडून पुन्हा नोंद घेण्याचे राहून गेल्याचे निदर्शनास येते दरम्यानच्या काळात 2002 रोजी चंपा बाई या मयत झालेल्या असून सदर गट नं 313 यातील 8 आणे हिस्सा त्यांच्या नावे राहिला आहे तेव्हा पुढील निर्णय आपण घ्यावा
त्यावर कुळ कायदा शाखेत संपर्क साधला असता त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना चंपा बाई ह्या मयत असल्याने वारस नोंद करायची का मंडळ अधिकारी यांच्या शेऱ्याप्रमने नोंद करायची ते कळवावे असे पत्र काडले आहे परंतु तहसीलदार त्यावर सही करत नाहीत असे सांगण्यात आले
त्यावर २ महिन्यांचा कालावधी उलटूनही तहसीलदार यांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही त्यांना वेळोवेळी भेटलो असता तहसीलदार उडवाउडवीची उत्तरे देत आहेत तेव्हा सदर नोंद पुन्हा घेण्यासाठी काय करावे ?
तेव्हा माझा प्रश्न हा आहे की १) सदर नोंद पुन्हा घेण्यासाठी काय करावे ?
२) एखादे प्रकरण वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाल्यास त्याची कार्यवाही किती दिवसात पूर्ण करायला हवी
३) आता मुळ प्रश्न हा आहे की माझी आई चंपा बाई यांनी मला वाटपाने दिलेल्या जमिनीची फेरफार क्र 276 ची नोंद मंडळ अधिकारी यांनी तक्रार नसताना रद्द केली आणि दुसरी नोंद 249 जीला मी तक्रार केली होती ती निर्गत झाल्यावर पुन्हा 276 ची नोंद घ्यावी असे आदेशही दिले
त्यावर तलाठी यांनी पुन्हा नोंद करणे अपेक्षित होते त्यासाठी मी तहसीलदार यांना अनेक वेळेस अर्ज देलेले आहेत त्याच्या पोहच माझ्याकडे आहेत परंतु तलाठी यांनी अद्याप पर्यंत नोंद केली नाही दरम्यानच्या काळात माझी आई मयत झाली म्हणून पुन्हा वारस नोंद करून आईने करून देलेल्या वाटपाचा अर्थ संपुष्टात येऊन सदर जमिनीत पुन्हा माझ्या इतर दोन भावना हिस्सा द्यावा की चंपा बाई जिवंत असताना मंडळ अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी
4) माझी आई हिने मला सदर जमीन विक्री करण्यासाठी , भाड्याने देण्यासाठी , कर्ज घेण्यासाठी ,तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांचे समोर नोंदणीकृत जन मुखत्यार पत्र ही दिलेले आहे
5) माझ्या इतर दोन भावांची देखील काही तक्रार नाही परंतु वारस नोंद केल्यास ते मला हाक्क सोडपत्र, वाटप पत्र करून देणार नाहीत
तेव्हा मी माझ्या वटणीची आज रोजी मी वहिवाट करत असलेली जमीन माझ्या नावे करण्यासाठी इतर काही कायदेशीर पर्याय असतील तर सांगावे ही कळकळीची विनंती
आपल्या मातोश्री मयत झाल्यानंतर वाटपाचा अंमल न देता पुन्हा आपल्या दोन भावांची नावे मिळकतील लावलेली आहे तो फेरफार आपण एक उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील करा. अन्यथा ह्या सर्व प्रश्नांची उकल करण्यासाठी आपण दिवाणी न्यायालयात हिस्स्याप्रमाणे जमिनीचे सरस निरस वाटप करावे व त्याचा ताबा द्यावा अशा प्रकारचा दावाही आपण दाखल करू शकतो.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
आपल्या मातोश्री मयत झाल्यानंतर वाटपाचा अंमल न देता पुन्हा आपल्या दोन भावांची नावे मिळकतील लावलेली आहे तो फेरफार आपण एक उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील करा. अन्यथा ह्या सर्व प्रश्नांची उकल करण्यासाठी आपण दिवाणी न्यायालयात हिस्स्याप्रमाणे जमिनीचे सरस निरस वाटप करावे व त्याचा ताबा द्यावा अशा प्रकारचा दावाही आपण दाखल करू शकतो.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Abhay kulkarni
22-01-2021
Abhayhkulkarni@gmail.com
अभय कुलकर्णी
नमस्कार,
माझ्या वडीलांनी ग्रामपंचायत हद्दीतील 35 वर्षापूर्वी 35×35 चे घराच्या जागेचे अनुक्रमे (2 ते 3 वर्षाचे अंतर आहे प्रत्येक व्यवहारात)खुले 3 प्लाॅट विक्री केलेले आहेत.तेव्हा मोजणी केलेली नव्हती रस्त्याची. पहिल्या व दुसय्रा खरेदीदाराला रस्ता हा खतावर 5 फुटच आहे.त्यापैकी मधला खरेदीदाराला तेव्हा रस्ता बोलण्यात (विश्वास खरेदीत) 5 फुटाचा व खरेदी खतावर 10 फुटाचा रस्ता आहे.सध्या रस्ता आहे 7 फुटाचा .आमची भिंत 3 फुट जागेवर 40 वर्षापासून आहे.घेणारा खरेदीदार मृत आहे,पण त्याची मूले आता रस्ता 10 फुटाचा मागत आहेत, ते म्हनतात की आम्ही भिंत पाडून रस्ता घेऊ.काही काळ गेल की परत रस्त्यासाठी भांडणे होतात, मध्यस्त मिटवतात तात्पुरत्या स्वरूपात पण पून्हा परत भांडणे होतात.यावर कायम स्वरुपी तोडगा काय आहे ? यावर कायदेशीर काय उपाय आहे ??
खरेदी खतामध्ये तुम्ही रस्ता दहा फूट रुंदीचा दिलेला आहे आणि बोलण्यातील रस्ता पाच फूट आहे. जो रस्ता खरेदी खता मध्ये लिहिलेला असतो व त्याची रुंदी जर दहा फूट असेल तर आपणाला त्यांना दहा फूट रुंद रस्ता देणे क्रमप्राप्त आहे. आपण त्यांच्या जागेवरती तीन फूट अतिक्रमण केलेले आहे .आपली घराची भिंत चाळीस वर्षापासून रस्त्यापासून तीन फूट अंतरावर जरी असली तरी. आपण त्यांच्याशी चर्चा करा व त्यांना त्याबाबत मोबदला देऊन प्रश्न सुटत असेल तर पहा. अन्यथा अशा प्रसंगांना वारंवार सामोरे जावे लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Indrajit ashok dhamale
20-01-2021
ijeet.dhamale@gmail.com
Namakar sir, 1980 sali ajobani jaminiche vatap kele jamini chya quality nusar vadilana 10 gunthe jasta ahe, shivay vadilanchya navavaril gat mde 6 kholya ajobani bandhayla hotya ajobani 2 2 kholya 3 mulanchya navavr kelya....atta 2 ni chulte apaplya vatnit ghare bandhale ahe . Junya gharacha taba det nai .grampanchayat la tyanchi nond ahe...2 vashapurvi ajobanche sanmatipatrak tyani karun ghetale ki 4 gunthe gharpad mde 3 bhavancha hakka ahe....pn gharpad 7/12 pramane vadilanchya navane ahe ...please madat kra
आपल्या वडिलांना जमिनीचा दर्जा हा कमी प्रतीचे असल्याने इतर चुलत यांच्या प्रमाणात दहा गुंठे क्षेत्र जादा दिले होते. या दहा गुंठे क्षेत्रापैकी काही क्षेत्रांवर अन्य तीन चुलत यांची घरे होती व आहे. तसेच सद्यस्थितीत या चुलत्यांनी त्यांच्या वाटणीला आलेल्या क्षेत्रावर तीही त्यांच्या खर्चाने घरे बांधलेली आहेत. त्यामुळे आपले म्हणणे असे आहे की जे दहा गुंठे क्षेत्र आपणास जागा दिलेले आहे व त्या क्षेत्रावर जी चोरट्यांनी घरे बांधलेली आहे त्यामध्ये आपणाला हिस्सा हवा आहे.
खरं तर घर पडा खाली चार गुंठे क्षेत्र आहे व ते सामान एकच राहणार तद्वतच त्यावर असलेल्या घरांवर चुलत यांचा अधिकार राहणार. आपणास सहा गुंठे अतिरिक्त क्षेत्र मिळालेले आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रमोद गायकवाड
20-01-2021
pramodmgaikwad2@gmail.com
सर 2012 सालि जमिनीचा व्यवहार 10 गुंठेचा झाला होता आणि खरेदी खत पण 10 गुंठेचा आहे पण नंतर 2019 किंवा 2020 सालि आम्ही ऑनलाईन सात बारा उतारा आणी तलाठी कार्यालयातील उतारा त्यावेळेस उताऱ्यावर 18 गुंठे क्षेत्र दाखवत आहे. वरील एक्स्ट्रा 8 गुंठेचा कोणत्याही प्रकारचा व्यवहार नाही काही नाही.. तर आम्हाला ते क्षेत्र कमी करण्यासाठी काय करावे लागेल?
टीप- हे बदल झालेले क्षेत्र एकच व्यक्तीच्या नावावर आहे.
आपण जी खरेदीखत केलेला आहे ते कृपया पुन्हा एकदा तपासून पहा व त्यावर किती क्षेत्र नमूद केले आहे त्याची खात्री करा. आपल्या म्हणण्यानुसार जर आपण केवळ दहा गुंठे क्षेत्राची विक्री केली होती व प्रत्यक्षात सातबारावर 18 गुंठे चा अंमल दिलेला असेल तर हे प्रकरण म्हणजे लेखन प्रमाण चूक या सदरात मोडणारी आहे. त्यासाठी आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 155 अन्वये तहसीलदार यांच्याकडे सदरच्या क्षेत्राची दुरुस्ती करण्यासाठी अर्ज दाखल करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Mansi Vikas Parab
19-01-2021
mansi.parab2611@gmail.com
माझ्या गावातील जमिनीत आग लागली व जमिनीत असलेली आंब्याची व काजूची झाडे पूर्णपणे जळाली व नुकसान झाले. माझे सासरे शेतकरी असल्याने कोणताही विमा काढलेला नाही. याबाबत झालेली नुकसान भरपाई सरकारकडून मिळू शकेल का?
Question by Tushar Dhamale
19-01-2021
inert.dhamale@gmail.com
Sir, ajobani 558 Ya gat mde 6 kholi bandhalya tyachya navavarun 3 Mulana 2 2kholi milalya, Jamin vatapat 558 gat maja vadilanchya navane ala... Chulte tyanchya gat mde rahanyas gele pn junya gharacha hissa amhala det Nai... Tasech ajobankadun samati Patrak lihun ghetale ki 4 gunthe gharpad mde tyanchya sarvancha hissa Saman ahe, gat vatati 1980 LA zhalti Ani sanmatipatrak 2 varshapurvi ghetale
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
