जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

सर आमची आजी निरक्षर 75 वर्षे वय आहे.तिला फुस लाउन ती थोडी आजारी आहे पेरेलेसेस ने .त्रयस्थ व्यक्तिने जिमीनीचे खरेदीखत केले आहे .3 महिण्यापुर्वी 7/12 फेरफार पण मंजुर केली . आजी त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यास तयार आहे. जमीन परत मिळेल का आम्ही 3 मुले आणि नातवंडे आहे..
आपल्या आजीला ज्या व्यक्तीने तिला फसवून खरेदी करून घेतले आहे त्याचे विरुद्ध फौजदारी तक्रार करावी लागेल . तसेच झालेले खरेदी खत रद्द करून मिळण्य बाबत दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमची खंडाची जमीन असून आम्ही ती गेल्या ९० वर्ष पासून कसत आहोत आणि खंड पण भरला आहे. त्याच जागेतून आमच्या राहत्या घरात जाण्यासाठी वाट आहे. काही कारणा मुळे त्या जमिनीवर कुळ म्हणून आमचे नाव नोंद करणे राहून गेले. सदयस्थित मूळ मालकाचे वारस त्या जमिनीत हक्क सांगून जमिनीत अतिक्रमण करत आहेत व आमची येण्या जाण्याची एकमेव वाट जी आम्ही ९० वर्ष पासून वापरतोय ती पण बंद केली आहे. भूमी अभिलेख कार्यालय च्या चुकीमुळे आमच्या बिनशेती प्लॉट व त्या वाटेची सरकार दप्तरी नोंद नाही. पोलीस ,नगर परिषद व तहसीलदार यांनी प्रथमदर्शनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला . तरी जागेवरील अतिक्रमण थांबवून आमची वाट मोकळी करण्यास काय करावे याचा सल्ला मिळाल्यास मदत होईल . कुळ कायद्याखाली दावा दाखल केल्यास निकाल येईपर्यंत अतिक्रमणांवर स्थगिती येऊ शकते का? वरील प्रकरण लवकर निकाली काढण्यास काही तरतूद आहे का?प्रांताधिकारी अथवा जिल्हाधिकारी यांना वाट मोकळी करण्यास काही विशेष अधिकार आहेत का?
आपल्या प्रश्नानुसार , जी जागा आपणाकडे कुल म्हणून कसण्यास आहे त्यास आपले नाव कुल म्हणून जाहीर करण्यात न आल्याने मुल जमीन मालक , जमीन अतिक्रमण करत आहेत व आपला या जागे तून जाण्याचा मार्ग अडथला करत आहेत . हा मार्ग आपल्या बिन शेती केलेल्या जागेत जाण्यासाठी आपणास होतो आहे . सदरचा मार्ग रिकामा करून देण्याच्जा तहसीलदार यांना अधिकार नाही . कारण या मार्गाचा वापर बिनशेती मिळकतीत जाण्यासाठी होत आहे . जर या मार्गाचा शेती करण्सास्ठी होत असता तर , माम्लेतदार अधिनियम १९०५ अन्वये , तहसीलदार यांनी मार्ग अडथला रिकामा करून दिला असता .
जमीन त्यांचीचीच आहे त्यामुळे त्याला अतिक्रमण कसे म्हणता येईल ?
आपण दिवाणी न्यायालयाचा मार्ग पत्करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझ्या वडिलांचे नावे असलेल्या वडिलोपार्जित जमीन मी तलाठीव मंडळ अधिकारी यांचे मार्फत वाटणी पत्रक करून माझे नावे होऊ शकते का?
वडील व सर्वांची म्हणजे सर्व वर्षांची इच्छा असल्यास तहसीलदार यांचेकडे अर्ज करून करू शकता
कलम ८५ महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Pramod pawar
29-12-2020
Omprinters99@gmail.com

माझे बाबा 1954 साली जमिनीस कुळ म्हणुन नाव लागले, जमीन मालक मानसिक दुर्बेल असल्यामुळे 7/12 उतारा वर "जमीन खरेदीचा हक्क पुढे ढकलण्यात आला आहे, जमीन मालक मानसिक दुर्बल आहे " असा शेरा आहे , आता माझ्या वडिलांचे नाव इतर हक्कात आहे , तर मालक म्हणुन नाव लावण्यासाठी काय करावे लागेल , कृपया माहिती द्यावी
मानसिक दुर्बल जमीनमालक आज रोजी हयात आहे का ? याची खात्री करा . हयात नसल्यास विक्री किंमत निच्छित करण्यासाठी , जमीन मालक मयात झाल्यापासून २ वर्षाचे आत कारवाही करणे आवश्यक आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sachin karpe
29-12-2020
Sachinkarche2012@gmail.com

हाय सर, मी सातारा येथील रहिवासी आहे. माझे आजोबा व भावकी तील काही जणांनी मिळून सन १९४१ ला १ ;२ ;३; ह्या नंबर चे तीन सर्वे नंबर खरेदी केले होते.
सर्व्हे no.१ -१५ एकर २-२४ एकर ३- ३० एकर.(६९ एकर-total) माझ्या आजोबांचा त्यात तिसरा हिस्सा होता.-२३ एकर. अाजोबा हिस्सा (१-५acre ;२-८ एकर ;३-१० एकर) मात्र सन १९७२ ल गट एकत्रीकरणनतर आमचे सर्व्हे १ व २ मधील जमीन अनुक्रमे ४ व ४ एकर अशी झाली.व त्यामुळे आमचे ५ एकर जमीन कमी झाली. मात्र आम्हाला सर्व्हे नंबर ३ मध्ये ५ एकर जमीन वाढीव दिली. मात्र तिची सातबारा उताऱ्यावर नोंद नसून मात्र पूर्वी पासून आम्हीं सर्व्हे नंबर ३ मध्ये१५ एकर जमीन कसत आहोत. मात्र नावावर १० एकर आहे. ५ एकर शेती चा घोळ आहे. तरी कृपया मला सांगा;
१: मी दावा टाकू शकतो काय; टाकला तर कुठे व कोणावर?
२: ५ एकर जमीन मला कोणत्या सर्व्हे नंबर वर भेटेल?
Please reply...
सचिन करपे साहेब
इतके दिवस विलंब का केला ?
आपण जी एकत्रीकरण योजना झाली आहे त्याची पाहणी करा . त्यात नमूद क्षेत्र १५ एकर आहे का ? जर नसेल तर आपण ५ एकर क्षेत्र अन्य व्यक्तीचे कसत असाल .
जर खरच आपण म्हणत असाल त्याप्रमाणे लेखन प्रमाद चूक असेल तर , जमाबंदी आयुक्त यांचेकडे पुनरीक्षण अर्ज करा . ( कायदा - मुंबई तुक्देबंदी व तुकडे एकत्रीकरण कायदा )

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

साहेब
आमच्या आजोबांची फसवणूक करून जागा विकत घेण्याचा प्रयत्न चालू आहे...पण सात बारा वर फसवणूक करणाऱ्यांची नावे नोंद झाली नाहीं आहे....फेरफार प्रलंबित आहे...ती रद्द करावयाची आहे. खरेदी खत रद्द करावयाचा आहे...प्रांता मध्ये कशा प्रकारे विनंती अर्ज करावा या साठी मार्गदर्शन द्यावे ..तसेच वारस असून हरकत आहे..तरीही फ्ररफार का होते..या साठी काई करावे
संतोषराव
आपणास दिवाणी न्यायालयाकडून विक्री दस्त रद्द करण्यासाठी दिवाणी न्यायालयात जावे लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

देवराई जमिनीमध्‍ये ग्रामपंचायतीला नविन बांधकाम करता येते का
नमस्कार सर मी 2018 ला बिल्डर ने सांगितले नुसार आम्ही मार्च महिन्यात नोंदणी केली. पण आम्हाला ऑगस्ट महिन्यात घरची चावी मिळाली (possession ) मिळाले व घराची चावी मिळाली व त्याच महिन्याचे बिल्डर ने एक महिन्याचे maintenance घेतले. तर सर माझा हा प्रश्न होता की आज मला 2वर्षे झाले आहे व आमची सोसायटी ची कमिटी पण स्थापित आहे तर आता मला कमिटी वाले बोलत आहे की आपल्याला ला नोंदणी झाल्या पासून मेन्टेनान्स चे पैसे भरावे लागतील. तर माझ्या सांगण्या नुसार झेंव्हा मला चावी मिळाली ठेवा पासून माझे मेन्टेनान्स चालू पाहिजे तर सर मला या बद्दल माहिती द्यावी की मी मेन्टेनान्स भरावे की नाही
महाराष्ट्र सदनिका मालकी कायदा 1963 अन्वये, प्रकल्पामध्ये सदनिका खरेदी करण्याचा करार झाल्यानंतर , स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर भरण्याची जबाबदारी संबंधित सदनिकाधारकांची आहे. जरी आपण सदनिकेचा ताबा हा उशिरा घेतला असेल तरीही इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या इमारती वर करनिर्धारण स्थानिक स्वराज्य संस्थेकडून केली जाते. व करनिर्धारण आज झाल्यानंतर ती भरण्याची जबाबदारी हिच्या त्यासंबंधित सदनिकाधारकांची असते. कारण भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याचा ताबा ही संबंधित विकासकाने कायद्यानुसार तात्काळ देणे कर्म प्राप्त असते. जर त्या संबंधित विकासकाने मिळकतीचे प्रमाणपत्र मिळूनही व करनिर्धारण स्थानिक स्वराज्य संस्थेने निश्चित करूनही ताबा देण्यास टाळाटाळ केली असल्यास अथवा त्याबाबत विलंब केला असल्यास आपण या विकासकाला ताबा देण्याबाबत काही नोटीस दिली होती का> व नोटीस देऊनही जर विकासकाने ताबा देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली असेल तर जेवढा करा पण नगरपालिकेला अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेला जमा केला असेल तो देण्याबाबत आपण त्याला सांगू शकता. मात्र अशा प्रकारची जर नोटीस दिलेली नसेल व सदनिका खरेदी करताना सोसायटी शी निगडीत असलेल्या सर्व कर जमा करण्याची जबाबदारी विकासकाने काही काळासाठी त्याच्याकडे घेतली असेल तरच विकास हदशिकर भरण्यात जबाबदार असतो अन्यथा उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे स्थानिक संस्थांचे कर भरण्याची जबाबदारी सदनिका विकत घेणारा ची आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझा प्रश्न असा आहे की... माझ्या मोठ्या बंधू यांचे निधन झाले ते महावितरण मध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावर कार्यरत होते,.. सर माझा भाऊ विवाहित होता त्याला २ मुले आणि वाइफ आहे... पण वहिनींना नौकरी नाही करायची... त्यांनी मला नौकरी करण्यास संमती दिली.. परंतु माझा प्रस्ताव सादर केला असता त्यांनी माझा प्रस्ताव वापस पाठवला.. कारण मी भावाचा वारस होत नाही म्हणून आणि सी एस ७५ चा जीर पुढे करून... ते म्हणतात वारसा हक्क सर्टिफिकेट आना त्यात तुमचे नाव असल पाहिजे.. तर काय करावं सर.. काही ऑप्शन असेल तर कळवा नक्की... no.no..9075757647
आपण भावाचे जागेवर अनुकंपा तत्वावर नोकरी स लागू शकत शकत नाही . आपणस दिलेले उत्तर बरोबर आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by AVINASH BHAGANE
25-12-2020
bhaganeavinash@gmail.com

सर नमस्कार ,

आमची रत्नागिरी येथे वडिलोपार्जित जमीन आहे, सदर जमिनी शेजारून नैसर्गिक नाला आहे. सदर नाल्या मधून ग्रामपंचायत यांनी दोन वर्षांपूर्वी रास्ता साठी मोजणी केली होती. पण त्या मध्ये आमची जागा बाधित होत नव्हती. पण आता जेव्हा रस्त्याचे काम सुरु झाले तेव्हा आम्ही गावी नव्हतो सरपंचाने फोन करून सांगितले कि थोडा बांध जाईल म्हणून आम्ही होकार दिला पण जेव्हा रस्त्याचे काम सुरु झाले तेव्हा आमच्या जमिनी संपूर्ण कुंपण तोडून साधारण ४ फूट जागा रस्त्यासाठी घेण्यात आली आणि सादर बांधावर असणारी अंदाजे १५ वर्ष वयाची विविध प्रकारची झाडेहि मुळासकट तोडून टाकली होती. या संदर्भात आम्हाला ग्रामपंचाय यांचे कडून नोटीस आली न्हवती. आणि त्यांनी फक्त आमच्या बाजूच्याच जागा घेतली समोरची बाजूची व्यक्ती गावात हजर असल्याने पंचायत वाल्यानी त्यांचा बांध तोंडाला नाही. या बाबत विचारणा केली असता सदर रस्ता सरकारी आहे, सरकार तुमची जागा घेऊ शकते ,या साठी मला नुकसान भरपाई मिळणार नाही असे सुद्धा सांगितले. तोडलेला ४ फूट उंच बांध सुद्धा स्व खर्चाने बांधण्यास सांगितलं आहे. सदर जागेत ५ वर्षाची हापूस आंब्याची झाडे आहेत. पाऊस पडल्यास संपूर्ण जमीन वाहून जाऊ शकते . जर जागा घेतल्यानं आम्ही कोणतीही तक्रार करीत नाही पण आम्हाला बांध बांधण्यासाठी नुकसान भरपाई मिळेल का किंवा ग्रामपंचायत यांच्या कडून बांधून मिळेल तसेच झाडे पूर्ण तशीच ठेवली आहेत. या साठी योग्य मार्गदर्शन मिळावे हि नम्र विनंती.
घटनेच्या अनुच्छेद३०० अ अन्वय, कोणत्याही व्यक्तीची जमीन कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्या पासून त्याच्या पासून काढून घेता येत नाही.
कायदेशीर प्रक्रिया म्हणजे भूसंपादन कायद्यानुसार जमिनीचे संपादन करणे व संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला त्या जमीन मालकास देणे असा आहे.
ग्रामपंचायतीने आपली जमीन भूसंपादन प्रक्रिया पार पडतात व आपल्याला त्याबाबत कोणतीही नुकसान भरपाई न देता रस्त्यासाठी तिचा वापर केलेला आहे. आपण ग्रामपंचायतीला वकिलामार्फत नुकसान भरपाईची रक्कम मिळण्याबाबत ज्यामध्ये व्याजाचा ही समावेश असेल देण्याबाबत नोटीस द्या अथवा आपण ग्रामपंचायती विरुद्ध दिवाणी न्यायालयात आपल्या जागेमध्ये ग्रामपंचायत अतिक्रमण करून झाडे तोडून रस्ता करत असल्या मुळे मनाई हुकुम आदेश देण्याबाबत दावा दाखल करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Akshay patil
25-12-2020
ap6489095@gmail. com

नमस्कार सर
माझा सातबारा हा तलाठी ऑफिस आणि तहसिल ऑफीस दोन्ही ठिकाणी सापडत नाही... सातबारा उतारा नसल्यामुळे त्याचे फेरफार नंबर माहित नाहीत माझ्याकडे तलाठी यांनी 1970 साली दिलेला सातबारा आहे परंतु आत्ता हा सातबारा वरीलपैकी दोन्हीही ठिकाणी सापडत नाही यासाठी काय करावे?
1970 सालचा जो सातबारा आपणाकडे उपलब्ध आहे त्याच्या आधारे आपण 1970 पूर्वीचे सातबारा मिळकती संदर्भातून उपलब्ध आहेत का याची पडताळणी तहसील कार्यालय अभिलेख कक्षात करा. जर 1970 पूर्वीचे सातबारा तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षात उपलब्ध नसतील तर हा जमिनीचा सातबारा बनावट असल्याची निष्पन्न होईल. वझर पूर्वीचे सातबारा असतील तर आपण तहसीलदार यांच्याकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 155 अन्वये सातबारा पुनर्लेखन करताना सदर चा सातबारा व पर्यायाने सर्वे नंबर चे पुनर्लेखन करण्याचे राहिले असल्याचे दिसून आल्याने तो पुनर लिखित करणे बाबत अर्ज दाखल करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
माझ्या आजोबांना दोन बायका होत्या. पहिल्या पत्नीस एक मुलगा व तो सर्वात मोठा एकलुता एक होता, ते आता हयात नाहीत. तर, दुसऱ्या पत्नीस दोन मुले व दोन मुली आहेत. पैकी आता केवळ दुसऱ्या पत्नीच्या दोन मुली व एक मुलगा हयात आहे. माझ्या आजोबांच्या नावे वडीलोपार्जित 14 एकर जमीन आहे. तसेच आजोबांच्या पहिल्या पत्नीस भाऊ नसल्याने तिच्या वडीलांची 28 एकर जमीनही आजोबांकडे आली. परंतु ही 28 एकर जमीन थेट (आजोबांच्या नावे झाल्याची कागदपत्रे नसल्याने) आजोबांच्या पहिल्या पत्नीच्या व तिच्या मुलाच्या नावावर झाली आहे व त्या पहिल्या पत्नीच्या मुलाने वडीलोपार्जित 14 एकर जमिनीमध्येही तिसरा हिस्सा घेतला आहे. मात्र दुसऱ्या पत्नीच्या मुलांना 28 एकर जमिनीमध्ये कोणताही हिस्सा दिलेला नाही. तर, आता आम्हाला (आजोबांच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलांना) 28 एकर मध्ये सर्वांना समान हिस्सा मिळण्याचा अधिकार आहे किंवा कसे (सदर कालावधी सन-1970 ते 85 च्या मधील आहे.), 28 एकर जमिनीमध्ये समान अधिकार मिळविण्यासाठी काय कायदेशीर प्रक्रिया करावी लागेल? कृपया सविस्तर मार्गदर्शन करावे, ही नम्र विनंती.
हिंदू वारसा कायदा 1956 च्या कलम 15 मध्ये हिंदू स्त्री मयत झाल्यानंतर तिच्या मिळकतीची विल्हेवाट कशी लावावी याबाबतच्या तरतुदी दिलेल्या आहे. या तरतुदीनुसार हिंदू स्त्री मयत झाल्यानंतर तिची मिळकत सर्वात प्रथम तिच्या मुलांना अथवा मुलींना व नवऱ्याला समान हिस्स्या मध्ये हस्तांतरित होते.
आपल्या प्रश्नांमध्ये पहिल्या पत्नीला तिच्या वडिलांना पासून जी 28 एकर जमीन प्राप्त झाली होती तिचे वाटप तिच्या मुलांमध्ये व व नवरा यामध्ये समान पद्धतीने वाटप होणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे 28 एकर क्षेत्राचे मुलगा 14 एकर व पती हयात असेल तर 14 एकर. अशा पद्धतीने मिळकतीचे वाटप होणे अपेक्षित आहे. जर आपले वडील आपल्या सावत्र आई मयत होण्यापूर्वीच जर मयत झाले असतील तर संपूर्ण 28 एकर जमीन ही केवळ आपल्या सावत्र भावाच्या नावानेच होणे अपेक्षित आहे.
जर आपली सावत्र आई मयत झाली त्यावेळेस वडील हयात असतील उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे तिच्या मुलाच्या नावावर 14 एकर व आपल्या वडिलांच्या नावावर 14 एकर अशी क्षेत्राची विभागणी होणे आवश्यक आहे.
वडिलांच्या मृत्यूपश्चात त्यांना त्यांच्या पहिल्या पत्नी पासून मिळालेल्या 14 एकर क्षेत्राची वाटणी त्या पहिल्या पत्नीचा मुलगा व तो जर मयत असेल तर त्याचे वारस यांना एकत्रित एक हिस्सा व आपण सर्वे भाऊ भावंडे यांना प्रत्येकी एक एक हिस्सा याप्रमाणे विभागणी आवश्यक. आपण नमूद केल्याप्रमाणे आपणाला एक भाऊ व दोन बहिणी आहेत व त्यातील एक भाऊ मयत आहे. भाऊ जर अविवाहित मयत झाला असेल तर उर्वरित 14 एकर क्षेत्र याचे चार हिस्से होतील व त्याप्रमाणे त्याचे वाटप होईल . मयत भाऊ यास मुले अथवा अन्य वारस असतील तर १४ एकर क्षेत्र ५ हिस्स्यात वाटप होईल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Nitin Jadhav
23-12-2020
nitin.jadhav1@gmail.com

आमची वडिलोपार्जित जमीन सातबारा उताऱ्यावर ८ हेक्टर २१ आर आहे. प्रत्याक्षात मोजली असता ७ हेक्टर ७६ आर भरते. आम्हा दोन भावांना आता ही जमीन वाटून घ्यायची आहे. भाऊ उताऱ्याप्रमाणे ४ हेक्टर १० आर मागत आहे व मला राहिलेली ३ हेक्टर ६६ आर घेण्यास सांगत आहे. ३ हेक्टर ६६ आर घेणं मला अन्याय कारक वाटत आहे. त्यापेक्षा भावाला मी दोघेही ३.८८ / ३.८८ हेक्टर घेऊ असं सांगत आहे. भाऊ ऐकण्यास तयार नाही. दोघांवरही अन्याय होणार नाही असे वाटपपत्र कसे करता येईल? कृपया मार्गदर्शन करावे.
सातबारा वर नमूद असलेल्या क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र आपल्या तांबे वहिवाटीत आहे. जे क्षेत्र कमी आहे त्या क्षेत्रावर नक्कीच अन्य कुणाचा तरी ताबा व वहिवाट आहे . आपण सातबारा प्रमाणे मोजणी करून घेण्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे अर्ज करून संपूर्ण क्षेत्राची मोजणी घ्यावी व त्याद्वारे आपणाला आपले कमी असलेले क्षेत्र कोणाच्या ताब्यात आहे याचा बोध होईल. व त्याप्रमाणे ज्याच्याकडे त्याचा ताबा आहे त्याच्याकडून ते क्षेत्रात कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्याचा ताबा मिळवता येईल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार साहेब,
आमचे वडलोपरजी 5 गुंठे नगरपालिका हद्दी मध्ये जागा आहे,त्यात माझे काका आणि माझे दोघांचे नाव आहे. पण माझे काका मला वाटणी पत्र करून देत नाहीत(काहीही तांत्रिक अडचण नसताना आणि माझी अट नसताना),आणि बांधकाम परवाना साठी संमती ही देत नाहीत.माझे घर पडले आहे आणि माझे नावे PMAY चे घर मंजूर झाले आहे. वाटणी पत्र करू मानले तर वाद घालतात, माझी कोर्ट कचेरीत पैसे खर्च करण्याची ऐपत नाही माझी. तर मी बांधकाम परवानगी कशी मिळू शकतो नगरपालिका मधून? नॉटरी किवा शपथ पत्र देऊ मिळू शकले का बांधकाम परवाना. कृपया सुचवावे.
नगरपालिका हद्दीमध्ये असलेले 5 गुंठे क्षेत्र आपण व आपले चुलते या दोघांच्या नावावर आहे. त्यामुळे त्या मिळकतीची विकास परवानगी मिळण्यासाठी आपणा दोघांच्या संयुक्त सहीचा अर्ज नगरपालिकेला आवश्यक आहे. जर आपले सन्माननीय काका नगरपालिकेमध्ये विकास परवानगीसाठी संमती देत नसतील व वाटप करण्यासाठीही तयार होत नसतील तर आपणाला कोर्टकचेरीच्या पर्याय शिवाय अन्य कोणताही मार्ग उपलब्ध नाही.
चार प्रतिष्ठित लोक व काही प्रामाणिक नातेवाईक यांची मदत घेऊन आदरणीय काकांचे मतपरिवर्तन होईल याचा प्रयत्न करून बघण्यास हरकत नसावी. सह धारक आपली काका असल्याने त्यांना योग्य तो मानसन्मान द्या नक्कीच त्यांचे मतपरिवर्तन होईल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझा प्रश्न असा आहे की, वर्ग क्रमांक 3 ची जमीन ज्यांना ती सनद दिली आहे ते एखाद्या शैक्षणिक संस्था वा गैर सरकारी संस्थांना दान देऊ शकतात का? आणि हक्कभंग झाल्यास वर्ग क्रमांक 3 ची जमीन परत जमा करून शासन तीच जमीन पुन्हा वर्ग क्रमांक 7 अंतर्गत शैक्षणिक संस्था अथवा दवाखाना इत्यादी करीता गैर सरकारी संस्थांना देऊ शकते का?
जमीन सारा माफी कायदा 1863 च्या क्नडीका ३ , नियम ८ अन्वये , देवस्थान जमीन हस्तांतरण करता येत नाही . श्र्थ्भंग झाला आहे म्हणून ती जमीन शासन जमा होईल मात्र ती जागा शैक्षिणिक संस्थेस देणे अथवा न देणे हा शासनाचा स्वेच्छा अधिकार आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमची जमीन धरण प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसनसाठी संपादित केली आहे.. आमच्या आजोबांनी त्याचा मोबदलाही घेतला होता. पण अनेक वर्ष होऊनही सदर जमिनीवर कोणीही हक्क सांगायला आले नाही.. ती जमीन सरकारला पूर्ण मोबदला देऊन आम्हाला परत मिळवता येईल का? कृपया मार्गदर्शन करावे
आपली जमीन जर नवीन भूसंपादन कायदा 2013 अन्वये जर संपादित झाली असेल व संपादन प्रयोजनासाठी तिचा वापर विहित वेळेमध्ये संपादन संस्थेने केला नसेल तर निश्चित सदर जमीन आपणाला परत मिळण्याचा हक्क आहे.
तथापि या जमिनीचे संपादन भूसंपादन कायदा 2013 नुसार न होता अन्य कायद्यानुसार संपादन झाले असेल तर संपादन प्रयोजनासाठी वापर न झाल्यामुळे पडून राहिलेली जमीन सर्वप्रथम सार्वजनिक उपयोगासाठी आवश्यक आहे का याची पडताळणी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी करावयाची आहे व जर भविष्यामध्ये सार्वजनिक प्रयोग करण्यासाठी अशा जागेची आवश्यकता नाही अशा निष्कर्षाप्रत जर मा. जिल्हाधिकारी आले तर जमीन लिलावाद्वारे विल्हेवाट लावण्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाचे केरळ शासन विरुध्द पिल्लाय या प्रकरणात निर्देश आहेत .असा जर लिलाव मा. जिल्हाधिकारी यांनी कधी काळी केला तर या लिलावामध्ये आपण सहभागी होऊ शकता.
मात्र अशी अत्यंत दुर्मिळ परिस्थिती आहे , की शासनाला सार्वजनिक प्रयोजनासाठी जागेची आवश्यकता नसते. बहुतांशी वेळी सार्वजनिक प्रयोजनासाठी जागेची आवश्यकता आहे किंवा नाही याचीही पडताळणी केली जात नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी,आमची महार वतन जमिन आहे आणि ती जुन्या रेकोर्ड चा सातबारा रद्द केला आहे असे दाखवत आहे आणि सरकार नाव येते आहे तर ही जमीन मिळवण्यासाठी काय करावे लागेल?
सन्माननीय तुषार साहेब,
शर्तभंग झाल्यामुळे आपणाला जी शासनाने वतन जमीन जी दिली होती ती शासन जमा झालेली आहे व त्यामुळे आपल्या पूर्वजांचे व त्यानंतर आपले नाव लागण्याऐवजी या मिळकतीला महाराष्ट्र शासनाचे नाव लागलेले आहे.
आता प्रश्न असा आहे की ही सदर जमीन शासन जमा केव्हा झाली याची पडताळणी जुने फेरफार काढून घ्या व त्यावरून करा. शासन जमा आदेश या विरुद्ध अपील दाखल करा. मात्र जर शासन जमा करण्याचे आदेश फार पूर्वीचे असतील तर अपील करण्याची मुदत ही आता संपलेली आहे. झालेला विलंब जर अपिलीय प्राधिकरण यांनी मान्य केला तर आपले अपील दाखल केले जाऊ शकते व गुणवत्तेनुसार निर्णय होईल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आम्ही राहत असलेली घराची जागा सिटी सर्वे ला दुसऱ्याच्या नावावर आहे तरी संबधीत जागेच ताबा गेले ७० वर्षांपासून आमच्याकडे असून सादर घराची ग्रामपंचायत ला नोंद असून आम्ही घरपट्टी व पाणी पट्टी भारत आहे. तरी संबधीत जागा मालकाने नोव्हेंबर २०२० मध्ये मोजणी करून आत्ता जागेच ताबा मागत आहे. तरी मार्गदर्शन करावे !
या मिळकतीवर आपला ताबा गेले सत्तर वर्षाचा हून अधिक काळासाठी चा आहे. कायदेशीर प्रक्रिया शिवाय कोणताही इसम त्याच्या मालकीच्या जागेतून ज्याचा त्या मिळकतीवर ताबा आहे त्याला काढू शकत नाही. ज्या वेळेस जमिनीचा मालक आपल्याला मिळकतीतून काढून टाकण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करेल त्यावेळेस न्यायालयामध्ये आपण आपले म्हणणे दाखल करताना Adverse-possessiion या न्याय तत्त्वानुसार मिळकतीचे मालक झाल्याबाबत जाहीर करणे बाबतचा आदेश न्यायालयाने करणेबाबत मागणी करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Ritesh tambat
10-12-2020
ritesh.tambat07@gmail.com

दोन महिन्यापुर्वी नोदंणी झालेल्या जमीन खरेदीखतास चुकुन ₹४०० इतका मुद्रांक शुल्क कमी भरण्यात आले. सदर बाब लक्षात घेता आता तो कमी ने भरण्यात आलेल्या मुद्रांक शुल्क भरायचा आहे.यासाठी काेणती कार्यवाही करावी.कृपया मार्गदर्शन करावे.

१) कमी भरलेला मुद्रांक शुल्क कोणत्या article खाली चलान द्वारे भरावे.

२) चलान deface कोणाकडे करावे.

३) सदर मुद्रांक शुल्क भरुन चलान defaced केल्यावर मुळदस्तावर तसा endorsment शिक्का मिळतो की तसे लेखी प्रमाणपत्र देण्यात येते. आणि ते कोण देते ?

४) सुची २ मध्ये त्यानंतर तो मुद्रांकशुल्क जोडले जाते का?

५) सदर प्रकरणी मुंद्राक शुल्क भरुन तसा उल्लेखीत चुक दुरुतीखत करण्याची आवश्यकता आहे का?

कृपया मार्गदर्शन करण्याची कृपा करावी .नम्रविनंती

Question by akshay shelar
10-12-2020
akshayshelar850@gmail.com

2013 sali tahshil. Order zali warsnond karnyababt Circle yani aardhwat ghatat nond keli chukacha ferfar banwala
Tyatil ek ha ghat no chi vikri zali aadhiekume aaslele yani keli talathi circle aamala n sangta vikri keli
Prant sahebana bhelto tyani 1966 madhi 247 kalam kali aaapil kara sangitle
2 ferfar challege kara aase sangitl
Aapn sanga aase kelyavar kay hoil
Talathi circle var karvai hoil. Ka
सर, 2 एकर जिरायत क्षेत्रातील कमीत कमी 10 गुंठे शेत जमीन खरेदी करता येईल का? किंवा 20 गुंठे शेतजमीन खरेदी करताना दोन खरेदीदार नावे एका उताऱ्यावर लागतील का? कृपया मार्गदर्शन करावे.

जिरायत क्षेत्रासाठी जे काही प्रमाणभूत क्षेत्र आपल्या जिल्ह्यासाठी किंवा तालुक्यासाठी किंवा भागासाठी सुनिश्चित केले असेल त्यानुसार जर विक्री करावयाचे क्षेत्र अथवा विक्री केल्यानंतर शिल्लक राहणारे क्षेत्र हे जर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी होत असेल तर त्याचा कोणताही व्यवहार अथवा विक्री कायदेशीर असणार नाही. आपल्या जिल्ह्यासाठी सध्या जिरायत स्वरूपाच्या जमिनीसाठी प्रमाणभूत क्षेत्र काय आहे याबाबत तहसीलदार कार्यालयात चौकशी करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Pradip Baviskar
08-12-2020
22kars@gmail.com

नमस्कार सर, आम्ही 2013-2014 मध्ये जागा खरेदी केली,तशी नोंदणी पण झाली आहे. पण 7/12 मध्ये आमचं नाव आज पर्यंत आलेले नाही.आमची गृप मीळून जागा ८+६ गुंठे इतकी आहे. स्थानिक पातळीवर सबंधित कार्यालयात वारंवार भेटून त्यांनी फक्त एकच उत्तर मिळाले, वरून नोंदणी झालेली नाही, आमच्या सोबत नोंदणी झालेली गृपची नावे ७/१२ नोंदणी झालेली आहे, पुढे काय करावे कृपया मार्गदर्शन करा .
आपण खरेदी केलेली जागा ही बिनशेती जर स्वरूपाची जागा आहे का की तिचे स्वरूप शेती या सदराखाली ला आहे? जर ही जागा शेती स्वरूपाची असेल व गावठाणा पासून दोनशे मीटरच्या आत मध्ये असेल तर सध्याचा जो मूळ मालक आहे त्याला त्याचा बिनशेती धारा भरून मानव बिनशेती झाल्याबाबत चे आदेश तहसीलदार साहेब यांच्या कडून प्राप्त करून घ्या.
जर खरेदी केलेली जागा ही मूळचाच बिनशेती असेल तर खरेदीचा दस्त गाव कामगार तलाठी यांच्याकडे सादर करा व त्यांना फेरफार टाकणी व मंजूर करण्याच्या दृष्टीने लेखी उत्तर देण्याबाबत आग्रह करा. जर तेथूनही आपणास दिली गेली नाही तर आपण त्या तालुक्याचे तहसीलदार यांना समक्ष भेटून आपली व्यथा कथन करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sanket Agrale
04-12-2020
agralesanket@gmail.com

नमस्कार सर.
माझा प्रश्न असा आहे की, माझा मामानी माझा आजोबांच्या नावे असलेली वडिलोपार्जित २ हेक्टर. ७० आर. जमीन वाटणी पत्रा द्वारे आजोबांच्या हयातीत फक्त २ भावांमधेच १९७६ ला वाटप करून घेतली व १९८१ ला त्याच दोघा भावांनीच ९०-९० आर.क्षेत्र असा वेगळा पोट हीस्सा केला. आजोबांच्या नावे ९० आर. मधेच २०१९ मधे नव्यानेच वारस नोंद केली त्यामधे ५ वारस आहे म्हणुन फेरफारात नोंद केली. तर यात आम्हाला आजोंबांच्या नावे असलेली २ हेक्टर. ७० आर. मधे त्यांच्या ३ मुलांना व २ मुलींना सम-समान वाटणी हवी आहे त्या साठी काय कराव लागणार.

सर मला मार्गदर्शन द्या हि विनंती.
संकेत कुमार
सन 2005 मध्ये हिंदू वारसा कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली व या सुधारणा कायद्यानुसार वडलोपार्जित मिळकतीमध्ये मुलांप्रमाणेच मुलींनाही जन्मताच मालकीहक्क प्रदान करण्यात आला. मात्र जर डिसेंबर 2004 पूर्वी या मिळकतीचे हस्तांतरण झाले असेल अथवा वाटप झालेले असेल तर अशा मिळकतीमध्ये मुलींना हक्क असणार नाही.
मात्र आजोबांचे 90 गुंठे क्षेत्र आजोबांच्या मृत्यूपश्चात आपले तीन मामा आपल्या मातोश्री व आपल्या मावशी यांच्या नावे वारस हक्काने होणे अत्यंत आवश्यक. मात्र आजोबांच्या वाटपा पूर्वीच्या एकत्रित ोन हेक्‍टर सत्तर आर क्षेत्रावर आपल्या मातोश्री व मावशींचे नाव , पूर्वीच वाटप पूर्ण झाले असल्याने .नाव लागणे अशक्य आहे.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Ajit
04-12-2020
ajitjadkar2550@gmail.com

धरणग्रस्त पुर्नवर्सनातुन जमीन मिळाली आहे. नवीन शर्त कमी करुन खातेवाटप करायचे आहे.जमीन मिळून २५ वर्षे झाली आहेत. कसे करावे.
पुनर्वसन कायद्याखाली प्राप्त झालेली जमीन ही त्याच धारणा अधिकाराची असते त्याच धारणा अधिकाराची जमीन संपादित झालेली असते. त्यामुळे आपली संपादित झालेली जमीन जर वर्ग प्रकाराची असेल तर खाते वाटप करण्यास कोणतीही अडचण नाही. मात्र जर ती वर्ग-2 या स्वरूपाची संपादित झालेली असेल आपणाला सक्षम प्राधिकारी याची परवानगी निश्चितपणे लागेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
आमच्या शेताच्या सर्वात जुन्या १९४२, १९४३, च्या ७/१२ वर शेताचे "सर्वे नं ७४ नवादे बरड", "कबजेदर - आकारी पडीत (१०८)" अशी नोंद आहे.
या उताऱ्यावरील सर्वात जुनी नोंद १०८ क्रमांक तहसिल रेकॉर्ड रूम मधून काढली असता ती खालील प्रमाणे आहे.
मे. प्रांत यांचे कडील g. m.s. R 459/(27.6.1932) चे हुकमाने रे. कोड कलम १६३ प्रमाणे मारोती ......
(आजोबांचे नाव) यांच्या खात्यातील स. नं. ७४ ......
आवाचणीय मजकूर....... खालसा केले...........आवाचणीय मजकूर....
या जमीन संबंधित एक कागद घरात उपलब्द आहे. तो म्हणजे,
नमुना बाब (१), कानू ३७(४) दुमाल नाही अशा ....काराने जमिनीचे खातेदार होण्याचा ज्या मनुष्याचा इरादा असेल त्या मनुष्यांनी करून द्यावयाचा कबुलतीचा नमुना. हे प्रांताच्या आदेशाने 1964 मध्ये आजोबाच्या अंगठ्याच प्रतिज्ञापत्र आहे.
वरीलप्रमाणे कबूलातनामा माझ्या आजोबांकडून मामलेजददार जामनेर यांनी 1 ऑगस्ट 1964 ला लिहून घेतलेला कबुली जबाब माझाकडे आहे .त्या संबंधित 1964 चे प्रांताचे आदेश आज रोजी आमच्याकडे नाहीत, कदाचित घरातून गहाळ झालेले आहेत.
वरील जमीन आमच्या पूर्वजांना सरकारकडून मिळाल्याचे वडिलांकडून माहीत आहे, पण आज त्याबद्दल इतर माहिती आमच्याकडे काहीच नाही.
तरी, वरील 1964 च्या संदर्भात शासनाचे काही धोरण किंवा आदेश के असावेत?
कृपया मार्गदर्शन मिळावे

This page was generated in 0.49 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3400
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3