जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Ashish
18-01-2021
ashishpujari2001@gmail.com
नमस्कार सर, मला सिरियल नंबर व प्लॉट नंबर नेमका काय असते याची माहिती कुठं भेटू शकते.
कॉलेज assignment साठी लागत आहे.
आपणास सर्वे नंबर व प्लॉट नंबर मधील फरक या विषयी माहिती कॉलेजच्या प्रोजेक्ट साठी आवश्यक आहे. गावामध्ये असणाऱ्या सर्व जमिनींना ज्यावेळेस जमिनीची जमाबंदी झाली त्यावेळेस त्यांना नंबर देण्यात आले होते हे जे नंबर दिलेले आहेत त्यांना सर्वे नंबर असे संबोधले जाते. या उपरोक्त एखाद्या शेत जमिनीला विकास परवानगी मिळाली असे व त्या मध्ये प्लॉटिंग मंजूर केलेले असेल, तर या सर्वे नंबर मध्ये असलेल्या विविध प्लॉटला असतात त्यांना प्लॉट असे संबोधतात.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by ganesh patil
16-01-2021
gpganesh24patil@gmail.com
माझ्या वडिलांची 51 गुंठे जमीन होती वडील अशिक्षित असल्याने पलीकडील व्यक्तीने 51 गुंठे यातील 12 गुंठे जमिन आपल्या नावावर लावली आहे तर काय करावे
एक तर पलीकडच्या व्यक्तीने आपल्या जागेवर अतिक्रमण केलेले असावे. अतिक्रमण केल्यामुळे त्या व्यक्तीचे नाव सातबारा लावू शकत नाही. आपण त्या व्यक्तीचे नाव सातबारावर ज्या ठिकाणी आहे त्या खाली फेरफार नंबर नमूद असतात ते फेरफार पहा व त्यावरून आपणास कळून येईल की त्यांनी इसमाचे/ व्यक्तीचे नाव कसे लागले.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Anand Ankush Rawool
15-01-2021
rawoolanand@gmail.com
नमस्कार सर,
माझ्या आजोबांना दोन बायका होत्या. पहिल्या पत्नीस एकच मुलगा असून, ते आता हयात नाहीत. तर, दुसऱ्या पत्नीस दोन मुले व दोन मुली आहेत. पैकी आता दुसऱ्या पत्नीच्या दोन मुली व एक मुलगा हयात आहे. आजोबांना वडिलोपार्जित 14 एकर जमीन असून, दुसऱ्या पत्नीला भाऊ नसल्याने त्या पत्नीची 28 एकर जमीन होती. परंतु या 28 एकर जमिनीवर आजोबांचे नाव लागल्याचे कागदपत्रावरून दिसून येत नाही. त्यामुळे संपूर्ण 28 एकर जमीन पहिल्या पत्नीच्या मुलाच्या नावावर झाली आहे, त्यामध्ये इतर भावंडांना हिस्सा मिळालेला नाही. तसेच पहिल्या पत्नीच्या मुलाने वडीलोपार्जित 14 एकर जमिनीमध्येही तिसरा हिस्सा घेतला आहे. मात्र दुसऱ्या पत्नीच्या मुलांना 28 एकर जमिनीमध्ये कोणताही हिस्सा दिलेला नाही (सदर कालावधी साधारण सन-1970 ते 95 मधील आहे.). तर, आता आजोबांच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलांना 28 एकर शेत जमिनीमध्ये समान हिस्सा मिळेल किंवा कसे, तसेच याबाबत 28 एकर जमिनीमध्ये समान अधिकार मिळविण्यासाठी काय करावे लागेल? कृपया सविस्तर मार्गदर्शन करावे, ही नम्र विनंती.
https://indiankanoon.org/doc/588769/
हिंदू वारसा कायदा 1956 च्या कलम 15 दोन अन्वय, हिंदू स्त्रीला तिच्या आई किंवा वडिलांकडून मिळालेले मिळकत, तिच्या मृत्युपश्चात केवळ तिच्या मुलांना मिळते. अशा मिळकतीमध्ये तिच्या पतीला कोणताही हिस्सा मिळत नाही.
उपरोक्त जी लिंक देण्यात आलेली आहे त्यामधील निकाल पत्रही आपणाला उपयुक्त ठरेल. या निकालपत्रात नमूद केले आहे की हिंदू स्त्रीला तिच्या आई किंवा वडिलांकडून मिळालेली मिळकत तिच्या मृत्युपश्चात केवळ तिच्या मुलाला किंवा मुलीला मिळू शकते इतर कोणाचाही म्हणजे तिचा पती चाहिये अशा मिळकतीमध्ये कोणताही हक्क असू शकत नाही. फेरफार आपल्या आईच्या मृत्यूपश्चात, वारस म्हणून आपल्या वडिलांचे सुपारी आणि त्यांच्या मृत्युपश्चात आपल्या सावत्र भावाचे नाव लागलेले आहे त्याविरुद्ध आपण उपविभागीय अधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अपील दाखल करावे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Somnath lokhande
15-01-2021
somnathlokhanderx@gmail.com
नमस्कार सर, माझ्या आजोबांनी 1960 साली घारासाठी 6 आर जागा मोठ्या चुलत्याच्या नावे खरेदी घेतली 1962 सली आजोबा मयत झाले चुळत्याचे नावे ए कु मॅ आशी नोंद आहे तर एकुमॅ च्या फेरफार नुसार वारस नोंद केली आहे परंतु चुलता आम्हास हिस्सा देत नाही त्याचे म्हणने आहे की जागा माझी खरेदीची आहे कृपया मा्गदर्शन करावे
आपण म्हणता की आजोबांनी चुलत्याचे नावे जमीन खरेदी केली मात्र सातबारा सदरी सुलतान चे नाव एकत्र कुटुंब पुढारी म्हणून लागलेले आहे. खरंतर सातबारा संगणीकरण करताना एकत्र कुटुंब पुढारी म्हणून या व्यक्तीचे नाव यापुढे अशी नोंद होती, अशा सर्व सातबारावर इतर वारसांची नावे दाखल करण्यात आलेली आहे. याउपरही आपल्याशी संबंधित मिळकतीबाबत अजूनही चुलत यांचे नावापुढे अशी नोंद आहे. यासाठी आपण तहसीलदार यांच्याकडे अर्ज दाखल करा एकत्र कुटुंब पुढारी यामध्ये समाविष्ट असलेले इतर वारसांची नावे सातबारा सदरील दाखल करणे बाबत विनंती करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sunil bajrang kodarkar
15-01-2021
sunilkodarkar63@gmail.com
सर एका प्रकरणात एका खरेदीच्या नोंदीबाबत A व B मध्ये वाद सुरू होता सदरील नोंदीवर b ने उपविभागीय अधिकारी यांचे कडे अपील दाखल केले परंतु सदरील निकाल b च्या विरोधात गेला त्यामुळे त्यांनी अपर जिल्हाधिकारी यांचे कडे कलम 247 नुसार अपील दाखल केले सदरील प्रकरणात अपर जिल्हाधिकारी यांनी वादी व प्रतिवादी हजर नसल्याने अपील न्यायालयीन कामकाजातून काढून टाकले व प्रकरण बंद केले त्यानंतर B ने याच न्यायालयात अपील पुनर्स्थापित करणेबाबतच अर्ज दाखल केला तो अर्ज ही नामंजूर करण्यात आला नंतर b ने या निर्णय विरुद्ध मा. विभागीय आयुक्त यांचेकडे अपील 60 दिवसाच्या आत दाखल केले आहे. सदरील अपील दाखल आहे परंतु स्थगिती आदेश नाही. माझा प्रश्न असा आहे की मा. उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या फेरफार नोंद रद्द करणेबाबत चा आदेश आज ही कायम आहे त्यात बदल नाही फक्त अपील आहे (स्टे ऑर्डर नाही) या सबबीवर नोंद घेणे टाळता येते का
एखाद्या प्रकरणांमध्ये अपील दाखल झाले असेल तर त्यावर स्थगिती आदेश देणे किंवा नाही हा त्या संबंधित अधिकाऱ्याचा विवेक अधिकार असतो. अपिलीय अधिकारी जर त्यांनाही वाटले की प्रकरणात स्थगिती आदेश दिला नाही तर प्रतिवादी/ प्रतिपक्ष जमिनीमध्ये हितसंबंध निर्माण करतील किंवा जमिनीची विक्री करतील व अपील करणारा च्या मागणीमध्ये गुणवत्ता आहे तर अशा प्रकरणात स्थगिती आदेश देण्याची तरतूद आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sagar
13-01-2021
sagarghotekar1221@gmail.com
कोणी शेतीचे बांध कोरून काढत असेल तर,* -त्यासाठी कायद्यात काही तरतुदी आहेत का?
बांध कोरणे म्हणजे शेजारच्या जमिनीवरती अतिक्रमण करणे आहे. बांध कुरणे ही वैश्विक समस्या आहे. यासाठी आपण आपल्या जमिनीची शासकीय मोजणी करून त्याचे सीमांकन म्हणजेच हद्दी निश्चिती करून करून घ्या. त्याप्रमाणे बाउंड्री मार्क्स त्या ठिकाणी फिक्स करा. आपल्या लक्षात येईल की शेजारच्या किती क्षेत्रावर होती अतिक्रमण केलेले आहे किंवा बांध कोरलेला आहे.
त्या अनुषंगाने प्रथम त्याबाबत त्याला कायदेशीर नोटीस द्या तसेच नजीकच्या पोलीस स्टेशन मध्ये त्याच्याविरुद्ध एक लेखी अर्ज द्या. त्याच्या वागणुकी मध्ये सुधारणा झाली नाही तर दिवाणी न्यायालयात स्पेसिफिक रिलीफ एक्ट खाली संबंधित बाजूचे शेतकऱ्यास अतिक्रमण करणे/ किंवा बांध करण्यापासून प्रतिबंध करणे बाबत कायमचा हुकुम होणेबाबत दावा दाखल करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ravindra harpale
10-01-2021
Ravindraharpale8070@gmail.com
सर मी एक जागा घेतील आहे खरेदीखत पण झाले आहे 2014 साली आणि मालक आता म्हणतात की पैसे पुर्ण दिले नाहीत म्हणून तुमचे खरेदीखत रद्द झाले आहे पण मी पैसे पण पुर्ण दिले आहेत आणि त्यांनी जागेचे कंपाऊंड पण काढले आहे तर काय करावे
जागा जर नोंदणीकृत दस्ताने घेतलेली असेल व त्याप्रमाणे जर आपले नाव सातबारा सदरील दाखल झाले असेल तर आत्ता मालक काय म्हणतो याला काही महत्व उरत नाही. जमिनीचा ताबा जर आपल्याकडे असेल तर काही प्रश्न नाही पण जर जमिनीचा ताबा आपल्याकडे नसेल तर खरेदीखत याप्रमाणे जमिनीचा ताबा देण्यासाठी प्रयत्न करा अन्यथा दिवाणी न्यायालयात ताबा मिळणे बाबत दावा दाखल करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सिद्धेश भोईटे
09-01-2021
Siddheshbhoite2001@gmail.com
नमस्कार
माझा प्रश्न हा आहे की आम्ही ग्रामीण भागामध्ये घर खरेदी केले होते तर आम्ही घर खरेदी करताना आम्हाला बिल्डर ने ****** या नावाची NA Order दिली होती व आम्हाला फाइनान्स मध्ये लोन मंजूर झाले होते पण आता आम्ही ते घर दुसऱ्याला विक्री करत आहे तर घेणाऱ्या व्यक्तिने आमच्या घराची NA Order काढली आहे ती ***** या नावाची निघत आहे तर आमच्याकड़े असलेल्या NA Order वरील भूखंड क्र. व घर घेणाऱ्या व्यक्ति ने काढलेल्या NA order वरील भूखंड क्र. वेगळे आहेत तर हा नेमका प्रकार काय आहे समजू शकेल का?
आपणाला घर खरेदी करताना ज्या मिळकती संदर्भात कागदपत्र अथवा विकास परवानग्या दाखवल्या होत्या त्यानुसार बांधकाम परवानगी मध्ये नमूद सर्वे नंबर व घर क्रमांक हा आता आपण ज्या व्यक्तीस जमीन व घरी इच्छिता त्याने काढलेल्या विकास परवानगीनुसार जमिनीचा सर्वे क्रमांक व घर क्रमांक भिन्न आहेत अशी आपली तक्रार आहे. आपण याबाबत ज्या नियोजन प्राधिकरणाने आपल्याला विकास परवानगी दिलेली आहे त्यांच्याकडून आपण प्रमाणित प्रत प्राप्त करून घ्या.
या दोन्ही परवानग्या वरून घर क्रमांक ओ सर्वे क्रमांक याची पडताळणी करा जर भिन्न असतील तर ज्या आधारे आपण लोन मंजूर करून घेतली ती परवानगी निश्चितच खोटी आहे असा निष्कर्ष निघतो.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमेय जोशी
08-01-2021
ameyjoshi@gmail.com
नमस्कार सर, माझ्या आजीच्या नावे शेतजमीन होती. सदर शेतजमीनीचा ७/१२ आजीच्या नावे असल्याने ती जमीन माझ्या आजीने खरेदी खत करून विकून टाकली त्या जमिनीच्या ७/१२ वर जमीन विकत घेणाऱ्याचे नाव देखील दाखल झाले परंतु आताएक व्यक्ती त्या जागेवर आपला मालकी हक्क सांगत आहेत. सदर जमिनीवर १९८० च्या आधी माझ्या आजोबांचे नाव लागले आहे (फेरफार उपलब्ध आहे). त्यानंतर आजीचे नाव लागले आहे.(फेरफार मध्ये नोंद आहे.) दावा सांगणाऱ्या व्यक्तीचे नाव १९८० च्या अगोदर ७/१२ वर आहे. परंतु त्यानंतर च्या ७/१२ नाही (नाव कमी केल्याचा सुद्धा फेरफारनाही) मग ७/१२ वरून त्या व्यक्तीचे नाव कमी कसे काय झाले?
तुम्हाला या जमिनी चा सर्व इतिहास माहित आहे. जुने फेरफार काढा व जी त्रयस्थ व्यक्ती आता त्यामुळे कितीवर हक्क सांगत आहे त्याचे नाव कमी कसे झाले तो फेरफार काढा त्यावरुन आपणाला सर्व माहिती मिळेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Amit patole
08-01-2021
amitpatole123@gmail.com
7/12 उतर्यातील खातेदारला कंस झाला पण फेरफार नं नसेल तर काय करावे
कदाचित कौन्साखाली संबंधित फेरफार लिहिण्याचे अनावधानाने राहून गेलेले असेल. त्यासाठी आपण या सातबारा वर नमूद मिळकती संदर्भातील जुने फेरफार तपासून पहा. व त्यानुसार आपणाला कौंस केलेले कोणता फेरफार नमूद करावयाचा राहिलेला आहे याचा बोध होईल. जर जुने फेरफार पाहूनही जर फेरफार याचा बोध होत नसेल तर अनावश्यक रित्या जो कोंसा सातबारा वरती दिसत आहे तो कमी करण्याबाबत मेहरबान तहसीलदार महोदय यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 155 अन्वये अर्जाद्वारे विनंती करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
07-01-2021
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,वडिलोपार्जित जमिनीच्या ७/१२ सदरी वडिलांच्या मृत्युनंतर वारस नोंद झाली .आता मुली भावाच्या लाभात रजिस्टर हक्कसोड करून देणार आहेत.त्यांच्या आई सुद्धा मुलाच्या लाभत हक्कसोड पत्र करून देण्यास तयार आहेत.तरी आईचे हक्कसोड पत्र करणे योग्य होईल किंवा कसे?की बक्षीसपात्र करणे योग्य होईल.कृपया मार्गदर्शन होणेस विनंती
ज्या जमिनीच्या बाबतीत आपल्या मातोश्री आपणाला जमीन देऊ इच्छितात, ती जमीन जर शेत जमीन असेल तर हक्क सोड पत्र केले किंवा बक्षीस पत्र केले दोन्हीसाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 च्या अनुच्छेद 36 व 52 अन्वय मुद्रांक शुल्क दोनशे रुपये एवढे आहे. दोन्हीपैकी आपण कोणतेही करू शकता.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संतोष शिरसाठ
06-01-2021
santoshbhaishirsath@gmail.com
मा.किरण सर जी ...
कृपया मार्गदरशन हवे.
मौजे …. ता. …. जि……. येथील गट नं. 102 क्षेत्र 0.58 हे, आर आकार रु. 4.25 पै. यापैकी 0.29 हे. आर या शतजमिनीस शेती प्रयोजनार्थ विक्री परवानगी मिळणेबाबत श्री. … यांनी दिनांक …. रोजी विनंती केलेली आहे.
मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, 1947 अन्वये प्रश्नाधिन शेत जमीन "तुकडा" ठरविलेली असून 7/12 उता- यावरील इतर हक्की तुकडा" अशी नोंद गांव दप्तरातील फेरफार नोद नं. 544 दिनांक 10/08/1950 नुसार घेण्यात आलेली आहे.
मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, 1947 चे कलम 7 (1) मध्ये कोणत्या व्यक्तीने. कलम 6. पोट-कलम (2) अन्वये ज्याच्या संबंधात नोटीस देण्यात आली असेल अशा कोणत्याही तुकड्याचे हस्तांतरण त्याच्या लगतच्या भूमापन क्रमांकाच्या किंवा भूमापन क्रमांकाच्या मान्य केलेल्या पोट विभागाच्या मालकाव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीकडे हस्तांतरित करता कामा नये, अशी तरतूद आहे.
प्रस्तुत प्रकरणात सदर जमीन विकत घेणारी व्यक्ती गट नं. 102 क्षेत्र 0.58 आर च्या लगत भूमापन क्रमांकाच्या जमिनीची बाजू गट नं. 52/1/अ च्या पुर्वीच्या भूमापन क्रमांकाच्या मान्य केलेल्या पोटविभागाचा मालक असल्याचे दिसुन येत नाही त्यामुळे मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, 1947 चे कलम 7 (1। मधील तरतुदींचा भंग होती.
तथापि, जमिन खरेदी घेणार श्री... यांनी प्रश्नाधीन शेतजमीन हतनुर उजव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रात येतो. व सदयस्थितीच्या 7/12 उत्तान्यावर सन 2020-21 च्या पिकपाणी सदरात जलसिंचीत रकान्यात 0.58 है, आर क्षेत्र असुन जलसिंचन साधनामध्ये कुपनलिका असल्याबाबतच्या 7/12 उतारा सादर कलेला आहे त्यामुळे प्रश्नाधिन शेतजमीनीस जलस्रोताचे साधन उपलब्ध झाल्याने 7/12 उताऱ्यावरील प्रमाणभूत क्षेत्रानुसार तुकडेबंदी तुकडेजोड कायदापाचा भंग होत नसल्याचे नमुद केले आहे. तरी अर्जदार यांचे विनंतीच्या अनुषंगाने मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 मधील तरतुदीचा अनुषगाने प्रश्नाधिन शेतजमीनीच्या 7/12 उताऱ्यावरील इतर अधिकारातील तुकडा शेरा कमी करण्याबाबत शासन नियमातील तरतुदीनुसार आवश्यक ती नियमांचित कार्यवाही करावी. व तसा अहवाल सादर करावा.
सोबत ७/१२(कूपनलिका) हतनूर कालवा लाभक्षेत्र दाखला कागदपत्रे सादर केली आहेत.
आपल्या प्रश्न नुसार गट नंबर १०२ एकूण क्षेत्र५८ गुंठे हे 1950 सालापासून प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र असल्याने तुकडा म्हणून इतर हक्कात नोंदलेले आहे. या 58 गुंठ्यांत पैकी एकूण 29 गुंठे क्षेत्राची विक्री करण्याबाबतचा अर्ज आपल्या विचाराधीन असल्याचे दिसून येते.
वास्तविक आपण गट नंबर नमूद केलेला आहे त्यामुळे सदर जमिनीला गट स्कीम लागू झालेली आहे . मग जर गट स्कीम लागू झालेली असेल तर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र असलेला तुकडा कसा अस्तित्वात राहील याचा प्रश्न मला पडत आहे. 58 गुंठे क्षेत्र एकत्रीकरण करताना अन्य सर्वे नंबर मध्ये समाविष्ट कसे झाले नाही.
असोत
आपणाला गटनंबर ऐवजी सर्वे नंबर म्हणावयाचे आहे काय? जर सर्वे नंबर आहे असे समजून जर आपण याचा विचार केला तर विक्री करावयाचे क्षेत्र ज्या व्यक्तीला करा विक्री करायचे आहे तो जर लगेच खातेदार नसेल तर त्याला विक्री करता येणार नाही.
तसेच पूर्वी तुकडा नमूद झालेले क्षेत्र याच्यामध्ये जर बदल झालेला असेल म्हणजे पूर्वीची जिरायत स्वरूपाची असलेले क्षेत्र पाणीपुरवठ्याची व्यवस्था झाल्यामुळे बागायत स्वरूपात रूपांतरित झाले असेल तर तुकडा म्हणून झालेली नोंद बदलण्याबाबत कायद्यामध्ये तरतूद नाही.
मात्र याबाबत काही शासनाचे परिपत्रक असेल अथवा नियमांमध्ये काही तरतूद असेल याची मला माहिती नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by स्वप्नील
05-01-2021
borkar.rohit5@gmail.com
सर माझ्या वडिलांनी १ आर जमीन २००० साली गुंठेवारी ने विकत घेतली होती.त्या जमिनीच्या आजूबाजूची सर्व जमीन NA झालेली आहे. तर आता ही १ आर जमीन कशी NA करायची.
Question by बापू सावंत
04-01-2021
bapusawant35@gmail.com
आईच्या वडिलांच्या मृत्यूनंतर आई व तिचे चार भाऊ यांची नावे उताऱ्यावर आहेत जर आईचा वाटा हवा असेल तर काय करावे लागेल तसेच ही जमीन कुळ कायद्याने मिळालेली आहे .
बापूराव
कुल वहिवाट हक्क हा कुळकायदा ( मुंबई विभाग ) १९४८ कलम ४० अन्वये वंश परंपरागत आहे . त्यामुळे आपले आजोबांचे मृत्य नन्तर आपल्या आईचे नाव कुल म्हणून ७/१२ सदरी लागणे आवश्यक आहे . या साठी आपण तहसीलदार यांचेकडे अर्ज करा . ( कलम ७० ब )
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अजय अनंता पाटील
04-01-2021
ajaypatil312@gmail.com n
नमस्ते सर, माझ्या नावाने एक घरपट्टी,लाईट बिल,पाणी बिल असून त्या चाळीवर माझा मोठा भाऊ हक्क दाखवून भाडा घेतो.आणि मी भाडेकरूंना करार करण्यास सांगितले तर माझा मोठा भाऊ माझ्याशी भांडण करतो. शिवीगाळ आणि मरणाची धमकी देतो.आणि करार करण्यास ते भाडेकरू घाबरतात.ह्या चाळीचा भाडा आधी माझे बाबा घेत होते पण दुर्देवाने त्यांचा मृत्यू झाला असून बाबांनी कधी भडेकरूनशी करार केला नव्हता.आता मी ताबा घेण्यासाठी काय करावे?
Question by पोपट कमोदकर येवला जि -नाशिक
01-01-2021
popatkamodkar6304@gmail.com
सर आमची आजी निरक्षर 75 वर्षे वय आहे.तिला फुस लाउन ती थोडी आजारी आहे पेरेलेसेस ने .त्रयस्थ व्यक्तिने जिमीनीचे खरेदीखत केले आहे .3 महिण्यापुर्वी 7/12 फेरफार पण मंजुर केली . आजी त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यास तयार आहे. जमीन परत मिळेल का आम्ही 3 मुले आणि नातवंडे आहे..
आपल्या आजीला ज्या व्यक्तीने तिला फसवून खरेदी करून घेतले आहे त्याचे विरुद्ध फौजदारी तक्रार करावी लागेल . तसेच झालेले खरेदी खत रद्द करून मिळण्य बाबत दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विल्यम डिसोझा
31-12-2020
williamd737@gmail.com
आमची खंडाची जमीन असून आम्ही ती गेल्या ९० वर्ष पासून कसत आहोत आणि खंड पण भरला आहे. त्याच जागेतून आमच्या राहत्या घरात जाण्यासाठी वाट आहे. काही कारणा मुळे त्या जमिनीवर कुळ म्हणून आमचे नाव नोंद करणे राहून गेले. सदयस्थित मूळ मालकाचे वारस त्या जमिनीत हक्क सांगून जमिनीत अतिक्रमण करत आहेत व आमची येण्या जाण्याची एकमेव वाट जी आम्ही ९० वर्ष पासून वापरतोय ती पण बंद केली आहे. भूमी अभिलेख कार्यालय च्या चुकीमुळे आमच्या बिनशेती प्लॉट व त्या वाटेची सरकार दप्तरी नोंद नाही. पोलीस ,नगर परिषद व तहसीलदार यांनी प्रथमदर्शनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला . तरी जागेवरील अतिक्रमण थांबवून आमची वाट मोकळी करण्यास काय करावे याचा सल्ला मिळाल्यास मदत होईल . कुळ कायद्याखाली दावा दाखल केल्यास निकाल येईपर्यंत अतिक्रमणांवर स्थगिती येऊ शकते का? वरील प्रकरण लवकर निकाली काढण्यास काही तरतूद आहे का?प्रांताधिकारी अथवा जिल्हाधिकारी यांना वाट मोकळी करण्यास काही विशेष अधिकार आहेत का?
आपल्या प्रश्नानुसार , जी जागा आपणाकडे कुल म्हणून कसण्यास आहे त्यास आपले नाव कुल म्हणून जाहीर करण्यात न आल्याने मुल जमीन मालक , जमीन अतिक्रमण करत आहेत व आपला या जागे तून जाण्याचा मार्ग अडथला करत आहेत . हा मार्ग आपल्या बिन शेती केलेल्या जागेत जाण्यासाठी आपणास होतो आहे . सदरचा मार्ग रिकामा करून देण्याच्जा तहसीलदार यांना अधिकार नाही . कारण या मार्गाचा वापर बिनशेती मिळकतीत जाण्यासाठी होत आहे . जर या मार्गाचा शेती करण्सास्ठी होत असता तर , माम्लेतदार अधिनियम १९०५ अन्वये , तहसीलदार यांनी मार्ग अडथला रिकामा करून दिला असता .
जमीन त्यांचीचीच आहे त्यामुळे त्याला अतिक्रमण कसे म्हणता येईल ?
आपण दिवाणी न्यायालयाचा मार्ग पत्करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by जनार्धन राजू तेजनकर
30-12-2020
Janapatiltejankar@Gmail.com
सर माझ्या वडिलांचे नावे असलेल्या वडिलोपार्जित जमीन मी तलाठीव मंडळ अधिकारी यांचे मार्फत वाटणी पत्रक करून माझे नावे होऊ शकते का?
वडील व सर्वांची म्हणजे सर्व वर्षांची इच्छा असल्यास तहसीलदार यांचेकडे अर्ज करून करू शकता
कलम ८५ महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Pramod pawar
29-12-2020
Omprinters99@gmail.com
माझे बाबा 1954 साली जमिनीस कुळ म्हणुन नाव लागले, जमीन मालक मानसिक दुर्बेल असल्यामुळे 7/12 उतारा वर "जमीन खरेदीचा हक्क पुढे ढकलण्यात आला आहे, जमीन मालक मानसिक दुर्बल आहे " असा शेरा आहे , आता माझ्या वडिलांचे नाव इतर हक्कात आहे , तर मालक म्हणुन नाव लावण्यासाठी काय करावे लागेल , कृपया माहिती द्यावी
मानसिक दुर्बल जमीनमालक आज रोजी हयात आहे का ? याची खात्री करा . हयात नसल्यास विक्री किंमत निच्छित करण्यासाठी , जमीन मालक मयात झाल्यापासून २ वर्षाचे आत कारवाही करणे आवश्यक आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sachin karpe
29-12-2020
Sachinkarche2012@gmail.com
हाय सर, मी सातारा येथील रहिवासी आहे. माझे आजोबा व भावकी तील काही जणांनी मिळून सन १९४१ ला १ ;२ ;३; ह्या नंबर चे तीन सर्वे नंबर खरेदी केले होते.
सर्व्हे no.१ -१५ एकर २-२४ एकर ३- ३० एकर.(६९ एकर-total) माझ्या आजोबांचा त्यात तिसरा हिस्सा होता.-२३ एकर. अाजोबा हिस्सा (१-५acre ;२-८ एकर ;३-१० एकर) मात्र सन १९७२ ल गट एकत्रीकरणनतर आमचे सर्व्हे १ व २ मधील जमीन अनुक्रमे ४ व ४ एकर अशी झाली.व त्यामुळे आमचे ५ एकर जमीन कमी झाली. मात्र आम्हाला सर्व्हे नंबर ३ मध्ये ५ एकर जमीन वाढीव दिली. मात्र तिची सातबारा उताऱ्यावर नोंद नसून मात्र पूर्वी पासून आम्हीं सर्व्हे नंबर ३ मध्ये१५ एकर जमीन कसत आहोत. मात्र नावावर १० एकर आहे. ५ एकर शेती चा घोळ आहे. तरी कृपया मला सांगा;
१: मी दावा टाकू शकतो काय; टाकला तर कुठे व कोणावर?
२: ५ एकर जमीन मला कोणत्या सर्व्हे नंबर वर भेटेल?
Please reply...
सचिन करपे साहेब
इतके दिवस विलंब का केला ?
आपण जी एकत्रीकरण योजना झाली आहे त्याची पाहणी करा . त्यात नमूद क्षेत्र १५ एकर आहे का ? जर नसेल तर आपण ५ एकर क्षेत्र अन्य व्यक्तीचे कसत असाल .
जर खरच आपण म्हणत असाल त्याप्रमाणे लेखन प्रमाद चूक असेल तर , जमाबंदी आयुक्त यांचेकडे पुनरीक्षण अर्ज करा . ( कायदा - मुंबई तुक्देबंदी व तुकडे एकत्रीकरण कायदा )
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संतोष तानाजी मांडवकर
28-12-2020
santoshmandavkar2011@gmail.com
साहेब
आमच्या आजोबांची फसवणूक करून जागा विकत घेण्याचा प्रयत्न चालू आहे...पण सात बारा वर फसवणूक करणाऱ्यांची नावे नोंद झाली नाहीं आहे....फेरफार प्रलंबित आहे...ती रद्द करावयाची आहे. खरेदी खत रद्द करावयाचा आहे...प्रांता मध्ये कशा प्रकारे विनंती अर्ज करावा या साठी मार्गदर्शन द्यावे ..तसेच वारस असून हरकत आहे..तरीही फ्ररफार का होते..या साठी काई करावे
संतोषराव
आपणास दिवाणी न्यायालयाकडून विक्री दस्त रद्द करण्यासाठी दिवाणी न्यायालयात जावे लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by देवराई जमिनीमध्ये ग्रामपंचायतीला नविन बांधकाम करता येते का
28-12-2020
prajaktaterse@gmail.com
देवराई जमिनीमध्ये ग्रामपंचायतीला नविन बांधकाम करता येते का
Question by सचिन पवार
28-12-2020
sppawar1234.sp@gmail.com
नमस्कार सर मी 2018 ला बिल्डर ने सांगितले नुसार आम्ही मार्च महिन्यात नोंदणी केली. पण आम्हाला ऑगस्ट महिन्यात घरची चावी मिळाली (possession ) मिळाले व घराची चावी मिळाली व त्याच महिन्याचे बिल्डर ने एक महिन्याचे maintenance घेतले. तर सर माझा हा प्रश्न होता की आज मला 2वर्षे झाले आहे व आमची सोसायटी ची कमिटी पण स्थापित आहे तर आता मला कमिटी वाले बोलत आहे की आपल्याला ला नोंदणी झाल्या पासून मेन्टेनान्स चे पैसे भरावे लागतील. तर माझ्या सांगण्या नुसार झेंव्हा मला चावी मिळाली ठेवा पासून माझे मेन्टेनान्स चालू पाहिजे तर सर मला या बद्दल माहिती द्यावी की मी मेन्टेनान्स भरावे की नाही
महाराष्ट्र सदनिका मालकी कायदा 1963 अन्वये, प्रकल्पामध्ये सदनिका खरेदी करण्याचा करार झाल्यानंतर , स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर भरण्याची जबाबदारी संबंधित सदनिकाधारकांची आहे. जरी आपण सदनिकेचा ताबा हा उशिरा घेतला असेल तरीही इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या इमारती वर करनिर्धारण स्थानिक स्वराज्य संस्थेकडून केली जाते. व करनिर्धारण आज झाल्यानंतर ती भरण्याची जबाबदारी हिच्या त्यासंबंधित सदनिकाधारकांची असते. कारण भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याचा ताबा ही संबंधित विकासकाने कायद्यानुसार तात्काळ देणे कर्म प्राप्त असते. जर त्या संबंधित विकासकाने मिळकतीचे प्रमाणपत्र मिळूनही व करनिर्धारण स्थानिक स्वराज्य संस्थेने निश्चित करूनही ताबा देण्यास टाळाटाळ केली असल्यास अथवा त्याबाबत विलंब केला असल्यास आपण या विकासकाला ताबा देण्याबाबत काही नोटीस दिली होती का> व नोटीस देऊनही जर विकासकाने ताबा देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली असेल तर जेवढा करा पण नगरपालिकेला अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेला जमा केला असेल तो देण्याबाबत आपण त्याला सांगू शकता. मात्र अशा प्रकारची जर नोटीस दिलेली नसेल व सदनिका खरेदी करताना सोसायटी शी निगडीत असलेल्या सर्व कर जमा करण्याची जबाबदारी विकासकाने काही काळासाठी त्याच्याकडे घेतली असेल तरच विकास हदशिकर भरण्यात जबाबदार असतो अन्यथा उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे स्थानिक संस्थांचे कर भरण्याची जबाबदारी सदनिका विकत घेणारा ची आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by vijay kolhapure
26-12-2020
kolhapurevijay91@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे की... माझ्या मोठ्या बंधू यांचे निधन झाले ते महावितरण मध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावर कार्यरत होते,.. सर माझा भाऊ विवाहित होता त्याला २ मुले आणि वाइफ आहे... पण वहिनींना नौकरी नाही करायची... त्यांनी मला नौकरी करण्यास संमती दिली.. परंतु माझा प्रस्ताव सादर केला असता त्यांनी माझा प्रस्ताव वापस पाठवला.. कारण मी भावाचा वारस होत नाही म्हणून आणि सी एस ७५ चा जीर पुढे करून... ते म्हणतात वारसा हक्क सर्टिफिकेट आना त्यात तुमचे नाव असल पाहिजे.. तर काय करावं सर.. काही ऑप्शन असेल तर कळवा नक्की... no.no..9075757647
आपण भावाचे जागेवर अनुकंपा तत्वावर नोकरी स लागू शकत शकत नाही . आपणस दिलेले उत्तर बरोबर आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by AVINASH BHAGANE
25-12-2020
bhaganeavinash@gmail.com
सर नमस्कार ,
आमची रत्नागिरी येथे वडिलोपार्जित जमीन आहे, सदर जमिनी शेजारून नैसर्गिक नाला आहे. सदर नाल्या मधून ग्रामपंचायत यांनी दोन वर्षांपूर्वी रास्ता साठी मोजणी केली होती. पण त्या मध्ये आमची जागा बाधित होत नव्हती. पण आता जेव्हा रस्त्याचे काम सुरु झाले तेव्हा आम्ही गावी नव्हतो सरपंचाने फोन करून सांगितले कि थोडा बांध जाईल म्हणून आम्ही होकार दिला पण जेव्हा रस्त्याचे काम सुरु झाले तेव्हा आमच्या जमिनी संपूर्ण कुंपण तोडून साधारण ४ फूट जागा रस्त्यासाठी घेण्यात आली आणि सादर बांधावर असणारी अंदाजे १५ वर्ष वयाची विविध प्रकारची झाडेहि मुळासकट तोडून टाकली होती. या संदर्भात आम्हाला ग्रामपंचाय यांचे कडून नोटीस आली न्हवती. आणि त्यांनी फक्त आमच्या बाजूच्याच जागा घेतली समोरची बाजूची व्यक्ती गावात हजर असल्याने पंचायत वाल्यानी त्यांचा बांध तोंडाला नाही. या बाबत विचारणा केली असता सदर रस्ता सरकारी आहे, सरकार तुमची जागा घेऊ शकते ,या साठी मला नुकसान भरपाई मिळणार नाही असे सुद्धा सांगितले. तोडलेला ४ फूट उंच बांध सुद्धा स्व खर्चाने बांधण्यास सांगितलं आहे. सदर जागेत ५ वर्षाची हापूस आंब्याची झाडे आहेत. पाऊस पडल्यास संपूर्ण जमीन वाहून जाऊ शकते . जर जागा घेतल्यानं आम्ही कोणतीही तक्रार करीत नाही पण आम्हाला बांध बांधण्यासाठी नुकसान भरपाई मिळेल का किंवा ग्रामपंचायत यांच्या कडून बांधून मिळेल तसेच झाडे पूर्ण तशीच ठेवली आहेत. या साठी योग्य मार्गदर्शन मिळावे हि नम्र विनंती.
घटनेच्या अनुच्छेद३०० अ अन्वय, कोणत्याही व्यक्तीची जमीन कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्या पासून त्याच्या पासून काढून घेता येत नाही.
कायदेशीर प्रक्रिया म्हणजे भूसंपादन कायद्यानुसार जमिनीचे संपादन करणे व संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला त्या जमीन मालकास देणे असा आहे.
ग्रामपंचायतीने आपली जमीन भूसंपादन प्रक्रिया पार पडतात व आपल्याला त्याबाबत कोणतीही नुकसान भरपाई न देता रस्त्यासाठी तिचा वापर केलेला आहे. आपण ग्रामपंचायतीला वकिलामार्फत नुकसान भरपाईची रक्कम मिळण्याबाबत ज्यामध्ये व्याजाचा ही समावेश असेल देण्याबाबत नोटीस द्या अथवा आपण ग्रामपंचायती विरुद्ध दिवाणी न्यायालयात आपल्या जागेमध्ये ग्रामपंचायत अतिक्रमण करून झाडे तोडून रस्ता करत असल्या मुळे मनाई हुकुम आदेश देण्याबाबत दावा दाखल करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
