जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

आदरणीय सरजी, नमस्कार ग्रामपंचायत क्षेत्रातील एका व्यक्तीने दुसर्‍या कडून घराची जागा खरेदी करून सोबत लागून असलेल्या आमच्या जागेवर अतिक्रमण केले आणि त्यासंदर्भात विचारले असता अरेरावी व धमकी देतात. मी माहिती अधिकार कायद्याच्या आधारे ग्रामपंचायत कडून माहिती काढली असता सदर व्यकतीने जागा खरेदी संदर्भात कोणतीही दस्तऐवज ग्रामपंचायतीकडे दिलेली नाही. असी लेखी माहिती देण्यात आली. तसेच ग्रामपंचायत कडे खरेदीचे दस्तऐवज नसताना ग्रा. पं. रेकॉर्ड ला जागेची नोंद घेतली आहे. आता आम्हाला आमच्या अतिक्रमण केलेल्या जागेत व्हालकंपाउंड करायचे आहे. त्यासाठी पुढे काय व कोणती कार्यवाही करावी. यासंबंधी मार्गदर्शन करावे, ही विनंती.
मी, यशवंत भिकनराव मोरे भोरस बु., ता.चाळीसगाव जि.जळगांव येथे अकृषिक भूखंड भूमापन क्र. व उपविभाग 76/83 असून त्याचा मागिल महिन्यात 7/12 उतारा घेतला असता त्यावर रस्त्यासाठी भूसंपादन करुन फ्रिज करण्यात आला आहे. परंतू याबाबत मला नोटीस किंवा त्याचा मोबदला देखिल मिळालेला नाही. कृपया मार्गदर्शन व्हावे. माझा मोबाईल क्र. 9029683711 आहे.
Sir, mazya nave v kutumbatil konachyahi nave 7/12 nahi. Mi fisharman aahe Mala mazyach gavat 14 gunthe jamin kharedi karaychi aahe tar tyasathi ky karav lagel
महाराष्ट्रामध्ये कोणतीही व्यक्ती शेतकरी असल्याशिवाय त्याला शेत जमीन खरेदी करण्याचा अधिकार नाही. नाही मात्र जर आपणाला शेत जमीन निवासी औद्योगिक किंवा वाणिज्य वापरासाठी आवश्यक असेल व जी जमीन खरेदी करावयाची आहे ती जमीन जर उपरोक्त जमीन वापर विभागांमध्ये प्रादेशिक योजनेनुसार समाविष्ट असेल तर परवानगीची आवश्यकता भासत नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by saurabh kulkarni
17-11-2020
kul.saurabh15@gmail.com

मस्कार सर , 7/12 वरती इतर हक्कात सक्षमप्राधिकरणाच्या पुर्व परवानगीशिवाय हस्तांतरणस बंधी -इनाम व वतन जमिनी

*नविन अविभाज्य शर्थ*
नविन अविभाज्य व तब्दील न करनेचे शर्तिवर (1) असा शेरा आहे. तरी आम्हाला घरातच खते वाटप करायच आहे काय करव लागेल.
[(3)
2[(a)] On or after the commencement of the Bombay Paragana and Kulkarni Watans
(Abolition), the Bombay Service Inams (Useful to Community) Abolition, the Bombay
Merged Territories Miscellaneous Alienations Abolition, the Bombay Inferior Village
Watans Abolition and Maharashtra Revenue Patels (Abolition of Office) (Amendment)
Act, 2000 (hereinafter, in this section, referred to as “the commencement date”),
1. Sub-section (3) was substituted by Mah. 21 of 2002, s. 7.
2. Sub-section (3) was re-numbered as clause (a) thereof by Mah. 19 of 2008, s. 7.
Regrant of
watan land
to watandar.
Mah.
XXI
of
2002.
जर आपला इनाम उपरोक्त इनाम वा पैकी असेल तर आपणास हस्तांतरणाच्या परवानगीची गरज नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझा प्रश्न असा आहे की आमच्या पणजोबाची 15 एकर शेती आहे त्यावर काम करायला गडी माणस ठेवली होती 1997 साली सदर शेतीच्या 7/12 वर गडी माणसांना वहिवाट दार दाखवून पटवारी साहेबाने तहसीलदार साहेबांच्या पत्र क्र दाखवून गडी माणसांना भोगवटा दार चा फेरफार केला आहे परंतु 7/12 वर मृदुसनधारण योजने अंतर्गत केलेल्या कामाची दुरुस्ती असे दाखविले आहे सदर शेती ही wcl ला हस्तांतरीत झाली असून त्याचा मोबदला व नोकरी चा फायदा गडी माणसं ना देण्यात आला आहे सादर शेती ही भोगवटा वर्ग 1 ची आहे आम्ही काय करावे म्हणजे आम्हाला आमच्या पणजोबांच्या शेती चा मोबदला मिळेल
वारस नोंद साठी सर्व कागदपत्रे दिली तलाठी यांनी 15 दिवसांची नोटीस कादून फेरफार घेतली कोणीही हरकत घेतली नाही तरीही मंडळ अधिकारी यांनी वारसा पंजी सह ठेवा तूर्त फेरफार नामंजूर असा शेरा दिला व फेरफार नामंजूर केली आज जवळपास 40 दिवसांचा कालावधी झाला कोणतीही कार्यवाही नाही काय करावे
पटवारी साहेब यांना जी लोक काम करतात त्यांना वहिवाटदार दाखवण्याचा अधिकार नाही. सातबारा वरती या लोकांची नावे ज्या फेरफारनि लागलेले आहेत तो फेरफार कृपया तपासून पहा व त्यावर चा तपशील /मसुदा वाचून आपणाला याबाबतची कल्पना येईल की या व्यक्तींची नावे सातबारा सदरी कशी लागलेली आहे.
या व्यक्तींची नावे प्रथम कुल म्हणून मेहरबान तहसीलदार साहेब यांनी लावलेली असावी नंतर त्यांच्या लाभात कुल कायद्याअंतर्गत विक्री किंमत निश्चित होऊ ते या जमिनीचे भोगवटादार झालेले असतील. आपण संबंधित फेरफार पहा आपल्या लक्षात.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Ramesh Rokade
16-11-2020
amitrokade03@gmail.com

नमस्कार सर, माझी वडिलोपार्जित जमीन नवीन अविभाज्य शर्तीची जमीन होती 30गुंठे माझ्या वडील आणि चुलता यांच्या नावाने आणि 30 गुंठे 7/12 वर नोंद आजोबांच्या प्रयत्नातून झाली नाही परंतु ही संलग्न 60 गुंठे जमीन आमच्या ताब्यात वाहिवाटात होती.त्यातील 29 गुंठे जमीन वडील यांनी विकली परंतु 10 वर्ष होऊन ही 7/12 वर नवीन मालकाचे नाव आले नाही. जमीन विकल्यानंतर शेजारील जमीन मालकाने सदर आमचा झालेला व्यवहार अमान्य करण्यास केस दाखल केली. निकालाअंतर्गत असे झाले की 30 गुंठे जमीन सरकार जमा झाली आणि 30 गुंठे मधी माझ्या वडील व चुलता यांच्या नावावर आळे केले आहे तर सरकार जमा झालेली जमीन परत मिळवता येईल का ? त्यासाठी काय करावं लागेल?
जमीन कोणत्या कारणासाठी सरकारी जमीन झालेली आहे? आहे तसेच अविभाज्य सत्ता प्रकार म्हणजे ही जमीन शासनाने प्रदान केलेली आहे व शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय अथवा सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय सदरची जमीन विकल्याने ती कदाचित शासन जमा झालेली आहे. आपण ज्या केसचा संदर्भ यामध्ये दिलेला आहे त्या केसचा निकाल पत्रामध्ये जमीन सरकार जमा होण्याबाबत ची कारणमीमांसा दिलेली असेल. ही कारणमीमांसा वाचून घ्या. तसेच हा निकाल लागून किती दिवस झाले? जर जादा दिवस झालेले असतील तर विलंब माफीचा ही प्रश्न उद्भवेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by S K Patil
16-11-2020
skpatil130985@gmail.com

सह हिस्सेदार आपल्या हिश्श्याची जमीन विक्री करू शकतो का? ७/१२ मध्ये सामाईक क्षेत्र आहे. एकूण ५ सख्खे भावंडे आहेत (३ भाऊ आणि २ बहिणी). यातील २ भाऊ त्यांच्या हिश्श्याची (१/५ प्रत्येकी) जमीन विकु इच्छितात, तर अशी विक्री शक्य आहे का? कृपया माहिती द्यावी.
जर आपल्या प्रश्नात नमूद मिळकत ही आपल्याला वडलोपार्जित मिळालेली असेल तर हिंदू वारसा कायदा 1956 च्या तरतुदीनुसार इतर सह धारकांना जमीन खरेदी करण्याचा प्राधान्यक्रम असतो. आपण इतर सहज धारकांना ते जमीन खरेदी करू इच्छितात का याबाबत लेखी विचारना करा व त्यांची लेखी उत्तर प्राप्त झाल्यावर त्यानुसार जर त्यांनी जमीन खरेदी करण्याची इच्छा जर नसेल तर आपण अन्य त्रयस्थ व्यक्ती नाही जमीन विकू शकता. जर आपल्या सहज धारकांची जमीन खरेदी करण्याची इच्छा असेल तर आपणाला अपेक्षित असलेली किंमत देण्यास तयार असतील तर आपण त्यांना जमीन विक्री करू शकता. जर आपणाला अपेक्षित असलेली विक्री किंमत मिळत नसेल तर त्याबाबत आपण त्यांना अशा प्रकारची नोटीस देऊन त्रयस्थ व्यक्तीला जमीन विकू शकता.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Nitin Desai
16-11-2020
nitin.cdesai7673@gmail.com

1.सर कोर्ट वाटप दरखास्त मधून वाटपा साठी प्रकरण जिल्हा अधीकारी कार्यलया कडे पाठविणेत आले आहे सदर प्रकरण भूमी अभिलेख कडे आले असून त्यानुसार मोजणी फी भरले आहे . परंतु आद्यप मोजणी झाली नाही, तरी न्यायालयातून जिल्हाधिकारी याना समरणपत्र काढू शकतो का..? 2.मोजणी करते वेळी 2 गटा मध्ये तुकडेबंदी कायद्याचा भंग होत आहे 18 गुंठे मध्ये 3 हिस्से करता येतील का ..?
जर तुकडेबंदी कायद्याचा भंग होत असेल तर अशा जमिनीचे सर असणारच वाटप केले जात नाही. सातबारा वरती जेवढे सह धारक आहेत त्यापैकी काही लोकांना तुकडा न पाडता जमिनीचे वाटप केले जाते तर काही सह धारकांना त्याबदल्यात, ज्यांना जमीन मिळत आहे त्यांचेकडून जमिनीचे मूल्य दिले जाते.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, आमच्या परिसरातील एफ-क्लासचा न.प. हद्दीतील 40 आर भूखंड ठरावाने न.प.द्वारा आमच्या संस्थेस देण्यात आला आहे. सदर भूखंडात अर्ध्या भूखंडावर (20आर) खाजगी शाळेचे तार-कुंपणाचे अतिक्रमण आहे, तर उरलेल्या भूखंडापैकी जवळपास 10आर जमिनीवर एका समाजाने अनधिक्रुतपणे मंदीर रुपाने अतिक्रमण केले आहे. सदर पूर्ण 40आर भूखंड ठराव झालेल्या आमच्या संस्थेस पूर्णपणे मिळेल का? शाळेचे व अनधिक्रुत मंदीराचे अतिक्रमण कशा पद्धतीने हटवावे? सर्व 40आर भूखंड विविध विकास कामांसाठी व परिसरातील लोकांच्या उपयोगासाठी आमच्या संस्थेला पूर्णपणे मिळवता येईल का? त्यासाठी काय करावे लागेल? क्रुपया मार्गदर्शन करावे...
वास्तविक जमीन नगरपालिकेने आपल्याला ठरावाने दिल्यानंतर जमीनीचा ताबा घेण्यापूर्वी आपण त्यावर जे काही अतिक्रमण होते ते अतिक्रमण नगरपालिकेकडून काढून घेणे आवश्यक होते. मात्र नगरपालिकेत जमिनीचा ताबा आपल्याला दिल्यानंतर, त्यावर अतिक्रमण झालेले असेल तर ते अतिक्रमण काढून टाकण्याची जबाबदारी आपली आहे.
त्यासाठी कायदेशीर मदत घेऊन, ज्यांनी अतिक्रमण केलेले आहे त्यांना नोटीस देण्यात यावी. व जर नोटीस देऊनही त्यांनी अतिक्रमण काढले नाही तर त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दावा दाखल करणे संयुक्तिक.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार,
आमच्या वडिलोपार्जित घरात ,खोल्यांचं असमान वाटप झालं आहे.तहसीलदार यांना सांगून समान वाटपाचे आदेश घेता येतील काय ? किंवा इतर कायदेशीर मार्ग काय आहेत?
मेहरबान तसीलदार महोदय यांचेकडून जमिनीचे वाटप कलम 85 अन्वये करण्यात येते. घराचे वाटप असमान पद्धतीने झाले असेल तर आपणाला दिवाणी न्यायालयात जाणे खूपच संयुक्तिक.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार,
कुलमुखत्यार पत्राने एका व्यक्तीने जमीन विकली ,त्या काळात मूळ मालकाचा मृत्यू झाला .त्यानंतर
१)जमिनीचा मोबदला कुठल्या पद्धतीने वारसांना मिळेल?
२)कुलामुख्यत्यार घेतलेली व्यक्ती पैसे देत नसेल तर काय करावे?
३)हे बेकायदेशीर असेल तर त्याच्यावर काय कारवाई होईल?
३)मूळ मालक मेल्यानंतर उरलेल्या जमिनी ची विक्री निरंतर कुलामुख्ट्यार द्वारे कुलामुख त्यार करू शकतो का ?
आपणाला फौजदारी कारवाई कुल्मुख्त्यारी विरुद्ध करणे आवश्यक आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या आजोबांनी २० गुंठा जमीन विकत घेतली. त्यांना एकूण पाच वारसदार आहेत. एका मुलाने त्यांच्याकडून १ गुंठा जमीन २००० मध्ये खरेदीखत करून घेतली आहे. २००३ मध्ये आजोबा मयत झाले. सध्या वाटणी करून घेताना आम्हाला याबाबत माहिती मिळाली आहे. आता आम्ही तो एक गुंठा सोडून वाटणी करावी लागेल का? याबाबत मार्गदर्शन करावे?
सर माझ्या वडिलांकडे 1 देवस्थान इनाम जमीन आहे त्यामध्ये आम्ही घर बांधू शकतो का?
देवस्थान जमीन ही देवस्थानाला दिलेली असते . वहिवाटदार हा केवळ अशी जमीन देवस्थान विश्वस्तांच्या परवानगीने कशात असतो. त्याला कोणताही कायदेशीर अधिकार नाही. वाहिवातदार हा काही भाडेपट्टा धारक किंवा कुल नाही . त्यामुळे अश्या वाहिवात्दाराला कोणतेही अधिकार नाहीत .
जर देवस्थान विश्वस्तांनी आपणाला त्या मिळकतीवर घर बांधण्याची परवानगी दिली तर अन्य परवानगी( बांधकाम, इत्यादी ) घेऊ घेऊन आपण घर बांधू शकतो.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Res. sir, 1 )आमची जमीन भोगवतदार 2 इनाम 6 ब या सदरातील आहे . म्हणजे महार वतने व देवस्थान वगळून आहे .अशा जमिनींना कृषिक प्रयोजनासाठी खरेदी विक्री परवानगी घेणे आवश्यक असते का ? 2) आमच्या वडिलांनी 1973 मध्ये वरील सदरातील जमीन खरेदी केलेली आहे . ती जमीन मला कृषिक प्रयोजन म्हणून आहे त्याच शर्ती वर विक्री /मोबदला करावयाची आहे . ह्या जमिनीस नजराणा भरावा लागतो का ? असेल तर कोणत्या शासन निर्णयामुळे ..कृपया एवढी माहिती द्या
1[(3)
2[(a)] On or after the commencement of the Bombay Paragana and Kulkarni Watans
(Abolition), the Bombay Service Inams (Useful to Community) Abolition, the Bombay
Merged Territories Miscellaneous Alienations Abolition, the Bombay Inferior Village
Watans Abolition and Maharashtra Revenue Patels (Abolition of Office) (Amendment)
Act, 2000 (hereinafter, in this section, referred to as “the commencement date”),
1. Sub-section (3) was substituted by Mah. 21 of 2002, s. 7.
2. Sub-section (3) was re-numbered as clause (a) thereof by Mah. 19 of 2008, s. 7.
Regrant of
watan land
to watandar.
Mah.
XXI
of
2002.
Regrant of
watan land
to authorised
holder.
the occupancy of the land regranted under sub-section (1) may be transferred by the
occupant for agricultural purpose, and no previous sanction or no objection certificate
from the Collector or any other authority shall be necessary for such transfer. After
such transfer, the land shall be continued to be held by such transferee occupant on
new and impartiable tenure (Occupant Class II), in accordance with the provisions of
the Code : 1[(b) Before the commencement date, if any such occupancy has already, without
previous sanction or no objection certificate from the Collector or any other authority,
been transferred by the occupant, for agricultural purpose, such transfer may be regularised
on the production of registered instruments such as sale deed, gift deed, etc., as a proof
thereof, for such transfer. After such regularisation, the occupancy of such land shall be
held by such transferee occupant on new and impartiable tenure (Occupant Class II), in
accordance with the provisions of the Code :]
Provided that, any such occupancy held on new and impartiable tenure (Occupant
Class II) may, after the commencement date, be converted into old tenure (Occupant
Class I) by the occupant by making payment of fifty per cent. of the amount of the
current market value of such land to the Government and after such conversion, such
land shall be held by the occupant as Occupant Class I, in accordance with the provisions
of the Code :
Provided further that, if on the commencement date, any such occupancy has already,
with the prior permission of the Collector or any other competent authority on payment
of the appropriate amount as Nazarana, been transferred for non-agricultural use, such
transfer of occupancy shall be deemed to have been made under the first proviso and the
land shall be deemed to be held by the occupant as an Occupant Class I, in accordance
with the provisions of the Code with effect from the date of such transfer :
Provided also that, if on the commencement date, any such occupancy has already,
without prior permission of the Collector or any other competent authority and without
payment of the amount equal to fifty per cent of the current market value of such land
as Nazarana, been transferred for non-agricultural use, such transfer may be regularised
on payment of an amount equal to fifty per cent. of the current market value of such
land for non-agricultural use as Nazarana, and an amount equal to fifty per cent. of such
Nazarana as a fine, and on such payment, the occupant shall hold the land as an
Occupant Class I, in accordance with the provisions of the Code.]
6. When any watan land resumed under section 3 is held by an authority .
उपरोक्त इनाम पैकी आपली आपली जमीन इनल असल्यास त्यास परवानगीची आवश्यकता नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Rahul khamgal
11-11-2020
khamgalrahul86@gmail.com

पूर्वी आणेवारी नूसार वडीलोपार्जित जमीनीचे वाटप झाले परंतू क्षेत्र लिहताना हस्तदोष झाला. हस्तदोष दुरुस्ती चा अधिकार कोणाचा ? आणेवारी कायम राहिल की क्षेत्र? काही कलमे माहित असलेस सांगा?
हस्त दोष म्हणजे लेखन प्रमाद चूक दुरुस्त करण्याचे अधिकार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 155 अन्वते मेहरबान तहसीलदार महोदयांना आहेत. आपण मेहरबान तहसीलदार महोदय यांच्याकडे कलम 155 खाली जी काही दुरुस्ती आपण करू इच्छितात यासाठीचा अर्ज करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर आजोबांच्या मृत्यूनंतर वारस लावताना फेरफार चुकीचा केला आहे व सदर जमीन फक्त एकाच्या नावावर लावली आहे, सदर फेरफार करताना तलाठी कार्यालयातून कोणतीही संबंधित व्यक्तींना नोटीस दिली नाही व सदर फेरफार 155 अंतर्गत दुरुस्त करताना सुद्धा टाळाटाळ करत आहे व हे आधीच्या तलाठ्याने केले आहे असे उत्तर दिले जाते यासाठी काय करता येईल ?
७/१२ सगनिकीकरण या मध्ये झालेल्या अश्या प्रकारच्या चुका तहसीलदार यांनी स्वताहून म ज म अ १९६६ च्या कलम १५५ अन्वये दुरुस्ती आदेश काढण्याचे आहेत . आपण तहसीलदार यांचे निदर्शनास हि बाब आणून द्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार सर आम्हाला सन 1972 साळी एकसाली प्लॉट वाटप केले आहे . या प्लॉट ची विक्री करता माहिती घेतली तर फॉरेस्ट ऑफिसर बोलतात की याचे निर्वणीकरण झाले नाही निर्वाणी कारण करण्या साठी काय करावे लागेल ,व कुठे अर्ज करू शकतो माहिती मिळेल का
निर्वणीकरण करणे ही प्रक्रिया फार क्लिष्ट स्वरूपाची आहे. भारतीय वन संवर्धन कायदा 19८० भारतीय वन कायदा 1927 अंतर्गत निर्वणीकरण करण्याचे आदेश भोपाळ येथून प्ररित केले जातात.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Hii नमस्कार प्रांतिक सरकार हा ७/१२ उताऱ्यावर शेरा आहे हा शेरा रद्द करण्या करिता काय करावे व कोणा कडे अर्ज दाखल करू शकतो माहिती मिळेल का
सर सामाइकातील २८ आर पैकी १४ आर जमीन विकत घेता येईल का परवानगी लागेल का
आपली जमीन ज्या भागात /जिल्ह्यात स्थित आहे त्या जिल्ह्याचे / भागाचे , तुकडे बंदी व तुक्देजोड कायदा अन्वये, जमीन स्वरूप नुसार , म्हणजे ( जिरायत /बागायत या नुसार ) प्रमाण भूत क्षेत्र प्रमाण किती आहे याची पडताळणी करा /माहिती घ्या . जर हे प्रमाण १४ R पेक्षा कमी असेल तर , विक्रीस बाधा नाही . मात्र जर जास्त असेल तर , विक्री दस्त नोंदला जाणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

sir, my name in property card on lessy now i want . to convert in holder what is its process in city servey please tell me.
From your question, it appears that the government has leased you land, and you are the lessee of the Government's land. The land is situated within the Municipal Council limits or municipal corporation limits.
The government of Maharashtra has issued GRs in respect of a few Municipal Councils, wherein , such lessees have been given an option to convert the land on leasehold rights to freehold rights on payment of conversion charges as prescribed. You may look for whether such type of GR has been issued by GoM in respect of the area where you are holding land on leasehold rights.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा सर माझा मोठा भाऊला वारलेला आहे आणि. जमिन सामाईक आहे मला जमिन भावाच्या मुलांना वाटणी करुन द्याची आहे पण माझ्या 7 12 मध्ये इतर हक्कात माझ्या आत्याच नाव आहे व आत्या देवाघरी (वारल्या ) आहे पण आत्याचा मुलगा हक्क मागतोय आत्या च्या मुलाला हक्क घेण्याचा अधिकार आहे
ज्या अर्थी आपल्या आत्याचे नाव सातबारा सद्रि आहे आहे त्यावरून, जमीन ही आपल्या आजोबांच्या नावावर होती. आजोबांच्या मृत्यूपश्चात वारसाहक्काने ही जमीन आपल्याकडे आलेले आहे. त्यामुळे जसा आपल्या वडिलांचा हिस्सा या मिळकतीमध्ये होता त्याचप्रमाणे आपल्या आत्याचा हि हिस्सा या मिळकतीमध्ये आहे. त्यामुळे आपणाला आत्याला हिस्सा म्हणजे पर्यायाने आत्याच्या वारसाला म्हणजे तिच्या मुलाला द्यावाच लागेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

ज्या अर्थी आपल्या आत्याचे नाव सातबारा सद्रि आहे आहे त्यावरून, जमीन ही आपल्या आजोबांच्या नावावर होती. आजोबांच्या मृत्यूपश्चात वारसाहक्काने ही जमीन आपल्याकडे आलेले आहे. त्यामुळे जसा आपल्या वडिलांचा हिस्सा या मिळकतीमध्ये होता त्याचप्रमाणे आपल्या आत्याचा हि हिस्सा या मिळकतीमध्ये आहे. त्यामुळे आपणाला आत्याला हिस्सा म्हणजे पर्यायाने आत्याच्या वारसाला म्हणजे तिच्या मुलाला द्यावाच लागेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

ज्या अर्थी आपल्या आत्याचे नाव सातबारा सद्रि आहे आहे त्यावरून, जमीन ही आपल्या आजोबांच्या नावावर होती. आजोबांच्या मृत्यूपश्चात वारसाहक्काने ही जमीन आपल्याकडे आलेले आहे. त्यामुळे जसा आपल्या वडिलांचा हिस्सा या मिळकतीमध्ये होता त्याचप्रमाणे आपल्या आत्याचा हि हिस्सा या मिळकतीमध्ये आहे. त्यामुळे आपणाला आत्याला हिस्सा म्हणजे पर्यायाने आत्याच्या वारसाला म्हणजे तिच्या मुलाला द्यावाच लागेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझा प्रश्न असा आहे की, आमचे 7/12 वर असे लिहिले आहे की मे.कलेक्टर सो.बहादूर यांचेकडील हु.नं आर डब्ल्यू एस/1606/65दि.18/11/55अन्यवे यांचे परवानगी शिवाय वाटणी,गहाण, अगर तब्बदली न रकमेच्या शर्यतीवर(1591) तर हे कमी करण्यासाठी उपाय सांगा.
ज्या वेळेस अशा प्रकारचा शेरा सातबाराच्या इतर हक्क सदस्य असतो, याचा अर्थ ही जमीन आपणाला शासनाने कब्जे हक्काने दिलेली आहे. त्याच बरोबर ही जमीन आपणाला अविभाज्य सत्ता प्रकाराने दिलेली आहे. या मिळकतीवर आपणाला अमर्याद मालकी हक्क प्राप्त नाही. त्यामुळे हस्तांतरण अथवा गहाण ठेवणे यासाठी आपणाला शासनाची वेळोवेळी परवानगी घ्यावी लागेल.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या आजोबानी त्यांच्या मिळकती मध्ये सर्व मुलांचा उल्लेख केला आणि ७/१२ मध्ये नाव दाखल झाले. त्याच प्रमाणे आजोबा आणि आमचे मामा मार्फत त्यातील काही मिळकती खरेदी देण्यात आले आहेत व काही अजून शिल्लक आहेत. त्यांची वारस नोंद तपासली असता असे आढळले की '' मुली नाही '' असा खोटा तोंडी वारस नोंद झाला आहे. सत्य असे की त्यांना माझ्ने मूळ मालकाला (अजोबा) मुलगी होती, जि माझी आणि माझ्या २ बहिणींची सखी आई होती. ती मयत असून आम्ही तिघे वारस आहोत परंतु आमचे मामा आम्हाला वारस हक्क देण्यास म्हणजे आमचा नाव दाखल करण्यास तयार नाहीत. माझी आई अशीस्क्षित होती म्हणून तिचा शाळेचा दाखला नाही. त्यावेळेस ग्राम पंचायत नव्हती म्हणून जन्म दाखला आणि मृत्यू दाखला नाही. आज आम्ही आमच्या आई वारस असल्याचा सत्य दवा करू इच्छितो. त्या साठी कृपा करून या संदर्भात पूर्ण सहकार्य करावे हीच विनंती.
The Specific Relief Act 1934 च्या कलम 34 अन्वये आपल्या मातोश्री या आजोबांनंतर त्यांच्या वारस आहेत हे जाहीर करून मिळण्यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. त्याच दाव्यामध्ये आपल्या आईचा/ मातोश्रींचा हिस्सा निश्चित करून मिळावा याप्रमाणे मिळकतीचा ताबा मिळावा असाही दावा करा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सन 1976 मधे दगड खाण रॉयल्टीची रक्कम 630677/- रूपये थकीत राहील्याने, 7/12 वर बोजा नोंदविण्यात आला. त्यानंतर 1980 मध्ये सदरची जमीन शासन जमा करून, त्यावर सरकार व आकारीपड अशी नोंद घेण्यात आलेली आहे. परंतु सदर जमिनीचा लिलाव करून विक्री करून, रॉयल्टीची रक्कम अदयाप वसुल केलेली नाही. 2020 मध्ये सदर थकीत रक्कम भरण्यास संबधित कसूरदार तयार आहे. तेंव्हा सदर रक्क्म रूपये 630677/- वर कोणत्या दराने व्याज आकारता येईल. पी.एल.आर प्रमाणे व्याजाची आकारणी करता येईल का? तसेच कोणत्या कायदेशीर तरतुदीनुसार व्याजाची आकारणी करता येईल? व्याजाच्या रक्कमेला कांही मर्यादा आहेत काय ?
होय आपण याप्रमाणे करू शकता. PLR प्रमाणे रकमेवर व्याज आकारणी करून ती रक्कम भरून त्या वरील बोजा काढू शकता .
जमीन जर सरकारी आकारी पड केली असेल तर , पैसे जमा केल्यावर , त्याच्जे नावावर जमीन करता येईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.36 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3400
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3