जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Akshay patil
25-12-2020
ap6489095@gmail. com
नमस्कार सर
माझा सातबारा हा तलाठी ऑफिस आणि तहसिल ऑफीस दोन्ही ठिकाणी सापडत नाही... सातबारा उतारा नसल्यामुळे त्याचे फेरफार नंबर माहित नाहीत माझ्याकडे तलाठी यांनी 1970 साली दिलेला सातबारा आहे परंतु आत्ता हा सातबारा वरीलपैकी दोन्हीही ठिकाणी सापडत नाही यासाठी काय करावे?
1970 सालचा जो सातबारा आपणाकडे उपलब्ध आहे त्याच्या आधारे आपण 1970 पूर्वीचे सातबारा मिळकती संदर्भातून उपलब्ध आहेत का याची पडताळणी तहसील कार्यालय अभिलेख कक्षात करा. जर 1970 पूर्वीचे सातबारा तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षात उपलब्ध नसतील तर हा जमिनीचा सातबारा बनावट असल्याची निष्पन्न होईल. वझर पूर्वीचे सातबारा असतील तर आपण तहसीलदार यांच्याकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 155 अन्वये सातबारा पुनर्लेखन करताना सदर चा सातबारा व पर्यायाने सर्वे नंबर चे पुनर्लेखन करण्याचे राहिले असल्याचे दिसून आल्याने तो पुनर लिखित करणे बाबत अर्ज दाखल करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by श्री.आनंद अं. राऊळ
24-12-2020
and_raw@rediffmail.com
नमस्कार सर,
माझ्या आजोबांना दोन बायका होत्या. पहिल्या पत्नीस एक मुलगा व तो सर्वात मोठा एकलुता एक होता, ते आता हयात नाहीत. तर, दुसऱ्या पत्नीस दोन मुले व दोन मुली आहेत. पैकी आता केवळ दुसऱ्या पत्नीच्या दोन मुली व एक मुलगा हयात आहे. माझ्या आजोबांच्या नावे वडीलोपार्जित 14 एकर जमीन आहे. तसेच आजोबांच्या पहिल्या पत्नीस भाऊ नसल्याने तिच्या वडीलांची 28 एकर जमीनही आजोबांकडे आली. परंतु ही 28 एकर जमीन थेट (आजोबांच्या नावे झाल्याची कागदपत्रे नसल्याने) आजोबांच्या पहिल्या पत्नीच्या व तिच्या मुलाच्या नावावर झाली आहे व त्या पहिल्या पत्नीच्या मुलाने वडीलोपार्जित 14 एकर जमिनीमध्येही तिसरा हिस्सा घेतला आहे. मात्र दुसऱ्या पत्नीच्या मुलांना 28 एकर जमिनीमध्ये कोणताही हिस्सा दिलेला नाही. तर, आता आम्हाला (आजोबांच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलांना) 28 एकर मध्ये सर्वांना समान हिस्सा मिळण्याचा अधिकार आहे किंवा कसे (सदर कालावधी सन-1970 ते 85 च्या मधील आहे.), 28 एकर जमिनीमध्ये समान अधिकार मिळविण्यासाठी काय कायदेशीर प्रक्रिया करावी लागेल? कृपया सविस्तर मार्गदर्शन करावे, ही नम्र विनंती.
हिंदू वारसा कायदा 1956 च्या कलम 15 मध्ये हिंदू स्त्री मयत झाल्यानंतर तिच्या मिळकतीची विल्हेवाट कशी लावावी याबाबतच्या तरतुदी दिलेल्या आहे. या तरतुदीनुसार हिंदू स्त्री मयत झाल्यानंतर तिची मिळकत सर्वात प्रथम तिच्या मुलांना अथवा मुलींना व नवऱ्याला समान हिस्स्या मध्ये हस्तांतरित होते.
आपल्या प्रश्नांमध्ये पहिल्या पत्नीला तिच्या वडिलांना पासून जी 28 एकर जमीन प्राप्त झाली होती तिचे वाटप तिच्या मुलांमध्ये व व नवरा यामध्ये समान पद्धतीने वाटप होणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे 28 एकर क्षेत्राचे मुलगा 14 एकर व पती हयात असेल तर 14 एकर. अशा पद्धतीने मिळकतीचे वाटप होणे अपेक्षित आहे. जर आपले वडील आपल्या सावत्र आई मयत होण्यापूर्वीच जर मयत झाले असतील तर संपूर्ण 28 एकर जमीन ही केवळ आपल्या सावत्र भावाच्या नावानेच होणे अपेक्षित आहे.
जर आपली सावत्र आई मयत झाली त्यावेळेस वडील हयात असतील उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे तिच्या मुलाच्या नावावर 14 एकर व आपल्या वडिलांच्या नावावर 14 एकर अशी क्षेत्राची विभागणी होणे आवश्यक आहे.
वडिलांच्या मृत्यूपश्चात त्यांना त्यांच्या पहिल्या पत्नी पासून मिळालेल्या 14 एकर क्षेत्राची वाटणी त्या पहिल्या पत्नीचा मुलगा व तो जर मयत असेल तर त्याचे वारस यांना एकत्रित एक हिस्सा व आपण सर्वे भाऊ भावंडे यांना प्रत्येकी एक एक हिस्सा याप्रमाणे विभागणी आवश्यक. आपण नमूद केल्याप्रमाणे आपणाला एक भाऊ व दोन बहिणी आहेत व त्यातील एक भाऊ मयत आहे. भाऊ जर अविवाहित मयत झाला असेल तर उर्वरित 14 एकर क्षेत्र याचे चार हिस्से होतील व त्याप्रमाणे त्याचे वाटप होईल . मयत भाऊ यास मुले अथवा अन्य वारस असतील तर १४ एकर क्षेत्र ५ हिस्स्यात वाटप होईल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Nitin Jadhav
23-12-2020
nitin.jadhav1@gmail.com
आमची वडिलोपार्जित जमीन सातबारा उताऱ्यावर ८ हेक्टर २१ आर आहे. प्रत्याक्षात मोजली असता ७ हेक्टर ७६ आर भरते. आम्हा दोन भावांना आता ही जमीन वाटून घ्यायची आहे. भाऊ उताऱ्याप्रमाणे ४ हेक्टर १० आर मागत आहे व मला राहिलेली ३ हेक्टर ६६ आर घेण्यास सांगत आहे. ३ हेक्टर ६६ आर घेणं मला अन्याय कारक वाटत आहे. त्यापेक्षा भावाला मी दोघेही ३.८८ / ३.८८ हेक्टर घेऊ असं सांगत आहे. भाऊ ऐकण्यास तयार नाही. दोघांवरही अन्याय होणार नाही असे वाटपपत्र कसे करता येईल? कृपया मार्गदर्शन करावे.
सातबारा वर नमूद असलेल्या क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र आपल्या तांबे वहिवाटीत आहे. जे क्षेत्र कमी आहे त्या क्षेत्रावर नक्कीच अन्य कुणाचा तरी ताबा व वहिवाट आहे . आपण सातबारा प्रमाणे मोजणी करून घेण्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे अर्ज करून संपूर्ण क्षेत्राची मोजणी घ्यावी व त्याद्वारे आपणाला आपले कमी असलेले क्षेत्र कोणाच्या ताब्यात आहे याचा बोध होईल. व त्याप्रमाणे ज्याच्याकडे त्याचा ताबा आहे त्याच्याकडून ते क्षेत्रात कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्याचा ताबा मिळवता येईल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by आशीष जाधव
21-12-2020
jashish2020@gmail. com
नमस्कार साहेब,
आमचे वडलोपरजी 5 गुंठे नगरपालिका हद्दी मध्ये जागा आहे,त्यात माझे काका आणि माझे दोघांचे नाव आहे. पण माझे काका मला वाटणी पत्र करून देत नाहीत(काहीही तांत्रिक अडचण नसताना आणि माझी अट नसताना),आणि बांधकाम परवाना साठी संमती ही देत नाहीत.माझे घर पडले आहे आणि माझे नावे PMAY चे घर मंजूर झाले आहे. वाटणी पत्र करू मानले तर वाद घालतात, माझी कोर्ट कचेरीत पैसे खर्च करण्याची ऐपत नाही माझी. तर मी बांधकाम परवानगी कशी मिळू शकतो नगरपालिका मधून? नॉटरी किवा शपथ पत्र देऊ मिळू शकले का बांधकाम परवाना. कृपया सुचवावे.
नगरपालिका हद्दीमध्ये असलेले 5 गुंठे क्षेत्र आपण व आपले चुलते या दोघांच्या नावावर आहे. त्यामुळे त्या मिळकतीची विकास परवानगी मिळण्यासाठी आपणा दोघांच्या संयुक्त सहीचा अर्ज नगरपालिकेला आवश्यक आहे. जर आपले सन्माननीय काका नगरपालिकेमध्ये विकास परवानगीसाठी संमती देत नसतील व वाटप करण्यासाठीही तयार होत नसतील तर आपणाला कोर्टकचेरीच्या पर्याय शिवाय अन्य कोणताही मार्ग उपलब्ध नाही.
चार प्रतिष्ठित लोक व काही प्रामाणिक नातेवाईक यांची मदत घेऊन आदरणीय काकांचे मतपरिवर्तन होईल याचा प्रयत्न करून बघण्यास हरकत नसावी. सह धारक आपली काका असल्याने त्यांना योग्य तो मानसन्मान द्या नक्कीच त्यांचे मतपरिवर्तन होईल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by तेजस कर्डक
16-12-2020
Tejaskardak@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे की, वर्ग क्रमांक 3 ची जमीन ज्यांना ती सनद दिली आहे ते एखाद्या शैक्षणिक संस्था वा गैर सरकारी संस्थांना दान देऊ शकतात का? आणि हक्कभंग झाल्यास वर्ग क्रमांक 3 ची जमीन परत जमा करून शासन तीच जमीन पुन्हा वर्ग क्रमांक 7 अंतर्गत शैक्षणिक संस्था अथवा दवाखाना इत्यादी करीता गैर सरकारी संस्थांना देऊ शकते का?
जमीन सारा माफी कायदा 1863 च्या क्नडीका ३ , नियम ८ अन्वये , देवस्थान जमीन हस्तांतरण करता येत नाही . श्र्थ्भंग झाला आहे म्हणून ती जमीन शासन जमा होईल मात्र ती जागा शैक्षिणिक संस्थेस देणे अथवा न देणे हा शासनाचा स्वेच्छा अधिकार आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Siddhesh Pandit
16-12-2020
siddheshpandit5556@gmail.com
आमची जमीन धरण प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसनसाठी संपादित केली आहे.. आमच्या आजोबांनी त्याचा मोबदलाही घेतला होता. पण अनेक वर्ष होऊनही सदर जमिनीवर कोणीही हक्क सांगायला आले नाही.. ती जमीन सरकारला पूर्ण मोबदला देऊन आम्हाला परत मिळवता येईल का? कृपया मार्गदर्शन करावे
आपली जमीन जर नवीन भूसंपादन कायदा 2013 अन्वये जर संपादित झाली असेल व संपादन प्रयोजनासाठी तिचा वापर विहित वेळेमध्ये संपादन संस्थेने केला नसेल तर निश्चित सदर जमीन आपणाला परत मिळण्याचा हक्क आहे.
तथापि या जमिनीचे संपादन भूसंपादन कायदा 2013 नुसार न होता अन्य कायद्यानुसार संपादन झाले असेल तर संपादन प्रयोजनासाठी वापर न झाल्यामुळे पडून राहिलेली जमीन सर्वप्रथम सार्वजनिक उपयोगासाठी आवश्यक आहे का याची पडताळणी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी करावयाची आहे व जर भविष्यामध्ये सार्वजनिक प्रयोग करण्यासाठी अशा जागेची आवश्यकता नाही अशा निष्कर्षाप्रत जर मा. जिल्हाधिकारी आले तर जमीन लिलावाद्वारे विल्हेवाट लावण्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाचे केरळ शासन विरुध्द पिल्लाय या प्रकरणात निर्देश आहेत .असा जर लिलाव मा. जिल्हाधिकारी यांनी कधी काळी केला तर या लिलावामध्ये आपण सहभागी होऊ शकता.
मात्र अशी अत्यंत दुर्मिळ परिस्थिती आहे , की शासनाला सार्वजनिक प्रयोजनासाठी जागेची आवश्यकता नसते. बहुतांशी वेळी सार्वजनिक प्रयोजनासाठी जागेची आवश्यकता आहे किंवा नाही याचीही पडताळणी केली जात नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by तुषार चिमन कदम
15-12-2020
kadamtushar731@gmail.com
मी,आमची महार वतन जमिन आहे आणि ती जुन्या रेकोर्ड चा सातबारा रद्द केला आहे असे दाखवत आहे आणि सरकार नाव येते आहे तर ही जमीन मिळवण्यासाठी काय करावे लागेल?
सन्माननीय तुषार साहेब,
शर्तभंग झाल्यामुळे आपणाला जी शासनाने वतन जमीन जी दिली होती ती शासन जमा झालेली आहे व त्यामुळे आपल्या पूर्वजांचे व त्यानंतर आपले नाव लागण्याऐवजी या मिळकतीला महाराष्ट्र शासनाचे नाव लागलेले आहे.
आता प्रश्न असा आहे की ही सदर जमीन शासन जमा केव्हा झाली याची पडताळणी जुने फेरफार काढून घ्या व त्यावरून करा. शासन जमा आदेश या विरुद्ध अपील दाखल करा. मात्र जर शासन जमा करण्याचे आदेश फार पूर्वीचे असतील तर अपील करण्याची मुदत ही आता संपलेली आहे. झालेला विलंब जर अपिलीय प्राधिकरण यांनी मान्य केला तर आपले अपील दाखल केले जाऊ शकते व गुणवत्तेनुसार निर्णय होईल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sachin Baravkar
15-12-2020
baravkar.sachin19@gmail.com
आम्ही राहत असलेली घराची जागा सिटी सर्वे ला दुसऱ्याच्या नावावर आहे तरी संबधीत जागेच ताबा गेले ७० वर्षांपासून आमच्याकडे असून सादर घराची ग्रामपंचायत ला नोंद असून आम्ही घरपट्टी व पाणी पट्टी भारत आहे. तरी संबधीत जागा मालकाने नोव्हेंबर २०२० मध्ये मोजणी करून आत्ता जागेच ताबा मागत आहे. तरी मार्गदर्शन करावे !
या मिळकतीवर आपला ताबा गेले सत्तर वर्षाचा हून अधिक काळासाठी चा आहे. कायदेशीर प्रक्रिया शिवाय कोणताही इसम त्याच्या मालकीच्या जागेतून ज्याचा त्या मिळकतीवर ताबा आहे त्याला काढू शकत नाही. ज्या वेळेस जमिनीचा मालक आपल्याला मिळकतीतून काढून टाकण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करेल त्यावेळेस न्यायालयामध्ये आपण आपले म्हणणे दाखल करताना Adverse-possessiion या न्याय तत्त्वानुसार मिळकतीचे मालक झाल्याबाबत जाहीर करणे बाबतचा आदेश न्यायालयाने करणेबाबत मागणी करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ritesh tambat
10-12-2020
ritesh.tambat07@gmail.com
दोन महिन्यापुर्वी नोदंणी झालेल्या जमीन खरेदीखतास चुकुन ₹४०० इतका मुद्रांक शुल्क कमी भरण्यात आले. सदर बाब लक्षात घेता आता तो कमी ने भरण्यात आलेल्या मुद्रांक शुल्क भरायचा आहे.यासाठी काेणती कार्यवाही करावी.कृपया मार्गदर्शन करावे.
१) कमी भरलेला मुद्रांक शुल्क कोणत्या article खाली चलान द्वारे भरावे.
२) चलान deface कोणाकडे करावे.
३) सदर मुद्रांक शुल्क भरुन चलान defaced केल्यावर मुळदस्तावर तसा endorsment शिक्का मिळतो की तसे लेखी प्रमाणपत्र देण्यात येते. आणि ते कोण देते ?
४) सुची २ मध्ये त्यानंतर तो मुद्रांकशुल्क जोडले जाते का?
५) सदर प्रकरणी मुंद्राक शुल्क भरुन तसा उल्लेखीत चुक दुरुतीखत करण्याची आवश्यकता आहे का?
कृपया मार्गदर्शन करण्याची कृपा करावी .नम्रविनंती
Question by akshay shelar
10-12-2020
akshayshelar850@gmail.com
2013 sali tahshil. Order zali warsnond karnyababt Circle yani aardhwat ghatat nond keli chukacha ferfar banwala
Tyatil ek ha ghat no chi vikri zali aadhiekume aaslele yani keli talathi circle aamala n sangta vikri keli
Prant sahebana bhelto tyani 1966 madhi 247 kalam kali aaapil kara sangitle
2 ferfar challege kara aase sangitl
Aapn sanga aase kelyavar kay hoil
Talathi circle var karvai hoil. Ka
Question by गणेश पाटील
10-12-2020
ganeshpatil_phy@rediffmail.com
सर, 2 एकर जिरायत क्षेत्रातील कमीत कमी 10 गुंठे शेत जमीन खरेदी करता येईल का? किंवा 20 गुंठे शेतजमीन खरेदी करताना दोन खरेदीदार नावे एका उताऱ्यावर लागतील का? कृपया मार्गदर्शन करावे.
जिरायत क्षेत्रासाठी जे काही प्रमाणभूत क्षेत्र आपल्या जिल्ह्यासाठी किंवा तालुक्यासाठी किंवा भागासाठी सुनिश्चित केले असेल त्यानुसार जर विक्री करावयाचे क्षेत्र अथवा विक्री केल्यानंतर शिल्लक राहणारे क्षेत्र हे जर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी होत असेल तर त्याचा कोणताही व्यवहार अथवा विक्री कायदेशीर असणार नाही. आपल्या जिल्ह्यासाठी सध्या जिरायत स्वरूपाच्या जमिनीसाठी प्रमाणभूत क्षेत्र काय आहे याबाबत तहसीलदार कार्यालयात चौकशी करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Pradip Baviskar
08-12-2020
22kars@gmail.com
नमस्कार सर, आम्ही 2013-2014 मध्ये जागा खरेदी केली,तशी नोंदणी पण झाली आहे. पण 7/12 मध्ये आमचं नाव आज पर्यंत आलेले नाही.आमची गृप मीळून जागा ८+६ गुंठे इतकी आहे. स्थानिक पातळीवर सबंधित कार्यालयात वारंवार भेटून त्यांनी फक्त एकच उत्तर मिळाले, वरून नोंदणी झालेली नाही, आमच्या सोबत नोंदणी झालेली गृपची नावे ७/१२ नोंदणी झालेली आहे, पुढे काय करावे कृपया मार्गदर्शन करा .
आपण खरेदी केलेली जागा ही बिनशेती जर स्वरूपाची जागा आहे का की तिचे स्वरूप शेती या सदराखाली ला आहे? जर ही जागा शेती स्वरूपाची असेल व गावठाणा पासून दोनशे मीटरच्या आत मध्ये असेल तर सध्याचा जो मूळ मालक आहे त्याला त्याचा बिनशेती धारा भरून मानव बिनशेती झाल्याबाबत चे आदेश तहसीलदार साहेब यांच्या कडून प्राप्त करून घ्या.
जर खरेदी केलेली जागा ही मूळचाच बिनशेती असेल तर खरेदीचा दस्त गाव कामगार तलाठी यांच्याकडे सादर करा व त्यांना फेरफार टाकणी व मंजूर करण्याच्या दृष्टीने लेखी उत्तर देण्याबाबत आग्रह करा. जर तेथूनही आपणास दिली गेली नाही तर आपण त्या तालुक्याचे तहसीलदार यांना समक्ष भेटून आपली व्यथा कथन करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sanket Agrale
04-12-2020
agralesanket@gmail.com
नमस्कार सर.
माझा प्रश्न असा आहे की, माझा मामानी माझा आजोबांच्या नावे असलेली वडिलोपार्जित २ हेक्टर. ७० आर. जमीन वाटणी पत्रा द्वारे आजोबांच्या हयातीत फक्त २ भावांमधेच १९७६ ला वाटप करून घेतली व १९८१ ला त्याच दोघा भावांनीच ९०-९० आर.क्षेत्र असा वेगळा पोट हीस्सा केला. आजोबांच्या नावे ९० आर. मधेच २०१९ मधे नव्यानेच वारस नोंद केली त्यामधे ५ वारस आहे म्हणुन फेरफारात नोंद केली. तर यात आम्हाला आजोंबांच्या नावे असलेली २ हेक्टर. ७० आर. मधे त्यांच्या ३ मुलांना व २ मुलींना सम-समान वाटणी हवी आहे त्या साठी काय कराव लागणार.
सर मला मार्गदर्शन द्या हि विनंती.
संकेत कुमार
सन 2005 मध्ये हिंदू वारसा कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली व या सुधारणा कायद्यानुसार वडलोपार्जित मिळकतीमध्ये मुलांप्रमाणेच मुलींनाही जन्मताच मालकीहक्क प्रदान करण्यात आला. मात्र जर डिसेंबर 2004 पूर्वी या मिळकतीचे हस्तांतरण झाले असेल अथवा वाटप झालेले असेल तर अशा मिळकतीमध्ये मुलींना हक्क असणार नाही.
मात्र आजोबांचे 90 गुंठे क्षेत्र आजोबांच्या मृत्यूपश्चात आपले तीन मामा आपल्या मातोश्री व आपल्या मावशी यांच्या नावे वारस हक्काने होणे अत्यंत आवश्यक. मात्र आजोबांच्या वाटपा पूर्वीच्या एकत्रित ोन हेक्टर सत्तर आर क्षेत्रावर आपल्या मातोश्री व मावशींचे नाव , पूर्वीच वाटप पूर्ण झाले असल्याने .नाव लागणे अशक्य आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ajit
04-12-2020
ajitjadkar2550@gmail.com
धरणग्रस्त पुर्नवर्सनातुन जमीन मिळाली आहे. नवीन शर्त कमी करुन खातेवाटप करायचे आहे.जमीन मिळून २५ वर्षे झाली आहेत. कसे करावे.
पुनर्वसन कायद्याखाली प्राप्त झालेली जमीन ही त्याच धारणा अधिकाराची असते त्याच धारणा अधिकाराची जमीन संपादित झालेली असते. त्यामुळे आपली संपादित झालेली जमीन जर वर्ग प्रकाराची असेल तर खाते वाटप करण्यास कोणतीही अडचण नाही. मात्र जर ती वर्ग-2 या स्वरूपाची संपादित झालेली असेल आपणाला सक्षम प्राधिकारी याची परवानगी निश्चितपणे लागेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रघुनाथ जाधव
04-12-2020
raghunathk058@gmail.com
नमस्कार सर,
आमच्या शेताच्या सर्वात जुन्या १९४२, १९४३, च्या ७/१२ वर शेताचे "सर्वे नं ७४ नवादे बरड", "कबजेदर - आकारी पडीत (१०८)" अशी नोंद आहे.
या उताऱ्यावरील सर्वात जुनी नोंद १०८ क्रमांक तहसिल रेकॉर्ड रूम मधून काढली असता ती खालील प्रमाणे आहे.
मे. प्रांत यांचे कडील g. m.s. R 459/(27.6.1932) चे हुकमाने रे. कोड कलम १६३ प्रमाणे मारोती ......
(आजोबांचे नाव) यांच्या खात्यातील स. नं. ७४ ......
आवाचणीय मजकूर....... खालसा केले...........आवाचणीय मजकूर....
या जमीन संबंधित एक कागद घरात उपलब्द आहे. तो म्हणजे,
नमुना बाब (१), कानू ३७(४) दुमाल नाही अशा ....काराने जमिनीचे खातेदार होण्याचा ज्या मनुष्याचा इरादा असेल त्या मनुष्यांनी करून द्यावयाचा कबुलतीचा नमुना. हे प्रांताच्या आदेशाने 1964 मध्ये आजोबाच्या अंगठ्याच प्रतिज्ञापत्र आहे.
वरीलप्रमाणे कबूलातनामा माझ्या आजोबांकडून मामलेजददार जामनेर यांनी 1 ऑगस्ट 1964 ला लिहून घेतलेला कबुली जबाब माझाकडे आहे .त्या संबंधित 1964 चे प्रांताचे आदेश आज रोजी आमच्याकडे नाहीत, कदाचित घरातून गहाळ झालेले आहेत.
वरील जमीन आमच्या पूर्वजांना सरकारकडून मिळाल्याचे वडिलांकडून माहीत आहे, पण आज त्याबद्दल इतर माहिती आमच्याकडे काहीच नाही.
तरी, वरील 1964 च्या संदर्भात शासनाचे काही धोरण किंवा आदेश के असावेत?
कृपया मार्गदर्शन मिळावे
Question by Kiran
02-12-2020
Kiranshete1193@gmail.com
सर नमस्कार,
सर गावाला आमची साडेचार एकर जमीन आहे. माझे वडील व तीन चुलते अशी चौघांच्या नावे होती. माझ्या मोठ्या चुलत्यांनी त्या काळात १९६० च्या दरम्यान तगई कर्ज काढले होते..ते त्यांनी नंतरच्या काळात भरले नसलेने सातबारा वर सरकार नाव लागले. मात्र नंतर च्या काळात हे चौघे वारले..त्यानंतर माझ्या आईने 1998 साली काही रक्कम ट्रेजरी आँफीस ला भरलेची पावती आहे..त्यावर तसा शिक्का आहे...पण अंतर्गत कलहामुळे ह्या चौघांचे वारस एकत्र येत नाहीत. व जमीन सरकारच्या ताब्यातून सोडवत नाहीत.सध्या या जागेतील 26 गुंठे ही राष्ट्रीय महामार्गाकरीता गेली असून त्याबदल्यात मिळणारा मोबदला हा सरकारी तिजोरीत पडलेला आहे.सरकखरचे नोटीस आले होते,की तुम्ही सर्व सातबारा वगैरे proper घेऊन या.. पण सातबारा वर सरकार नाव असलेने पैसे अडकून पडले आहेत..व जमीन देखील सरकार नावे पडून आहे..ह्यांचे वारसदार एकत्र येत नाहीत.त्यामूळे आमचा चौथा हिस्सा अडकून पडला आहे.
सर काही उपाय सांगा जेणेकरून माझी चौथ्या हीस्स्याची जमिन व पैसे मला मिळू शकतील...
Question by Hemant B Bairagi
01-12-2020
hemantbairagi145@gmail.com
नमस्कार
मझ्या वडीलांचे सन २०१२ साली निधन झाले असुन आम्ही ४ बहिण व १ भाऊ आणि आई. तर वडिलांच्या नावे एक घर व वडिलोपार्जित जमिण आहे. वडिलांचे निधन झाल्या नंतर आम्ही फ्क्त ३ बहिणी १ भाऊ व आई यांचे नाव घराला व सातबाऱ्या मध्ये लावले आहे. वडिल हायात असताना माझ्या ३ नंबरच्या बहिणिने घरातुन पळूण जाऊन लग्ण केले असता आम्हाला तीचा पत्ता नसल्याने आम्ही तीचे नाव लावले न्वहते तर आता १३ वर्षा नंतर त्या बहिणीला तीचा वाटा हवा आहे तर तीचे म्हणने आहे की मला माझ्या सहाव्या हिश्या नुसार पैसे द्या . तर सर माझा प्रश्न असा आहे की तिचे नाव घराला व सातबाऱ्या न लावता तीचा हिस्सा देऊन तिचा हक्कसोड करून घेता येईन का...?
Question by गणेश शिंदे
01-12-2020
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,मनपा.हद्दीत बांधकाम परवानगी घेऊन इमारत बांधली आहे.मिळकत कर नियमितपणे भारत आहे.परंतु का.तलाठी यांचेकडून बिनशेती कराबाबत नोटीस प्राप्त झाली आहे.तो कर भरणे आवश्यक आहे का/किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती त्याबाबत शासन निर्णय असल्यास कृपया ई-मेल वर पाठविल्यास बरे होईल.
Question by Haresh
30-11-2020
hareshbhoir587@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे.की देवस्थानाच्या जमिनीवर माझे वडील कुल म्हणून लागलेले आहेत. व. त्या जमिनीत अतिक्रमण झालेले आहे. तर मला सरकारी मोजणी आणून आणून सादर जमिनीत हक्क कायम करता येऊ शकेल का.?मला मार्गदर्शन करा .
Question by Vikram Mane
30-11-2020
vikramane999@gmail.com
नमस्कार सर,
माझ्या शेताजवळील शेजाऱ्याने मूळ रस्तावर सुमारे १० फुट अतिक्रमण करून रस्ता बंद केला आहे. त्यास मी जुने दगड असल्याने शासकीय नकाशा दाखवून समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो कोणाचेच ऐकत नाही. तसेच याबाबत मिटिंग मध्ये चर्चा करण्यास मुद्दाम बायकोला पुढे करत असतो. त्यामुळे लोकांना काहीच चर्चा करता येत नाही. आणि बायको पण महिला असल्याने फायदा घेत सर्वाना शिव्या देणे, धमकावणे यासारखे प्रकार करते. याबाबत काय करावे.
Question by किरण पोपट जाधव
30-11-2020
kiran.jadhavs@gmail.com
माझी नाशिक महापालिका हद्दीत 4 गुंठे जागा असून तिथे मी कुठलेच बांधकाम केले नसून ,माला तुकडा बंदी कड्या नुसार नोटिस आली आहे,तरी दंडाची रक्कम खूप जास्त असून मी आता काय करू शकतो,आमचा 4 जन मिळून 20 गुंठायचा सातबारा आहे ,आणि जमीन नवीन आराखड्यात पिवळ्या पट्टीत आहे.तरी आलेल्या दंडाची नोटिस चे काय करावे या विषयी माहिती द्यावी ही विनंती
Question by Sujit Jagta
29-11-2020
spj100@rediffmail.com
राज्य महामार्गालगत असलेल्या शेतजमिनी मध्ये- शेती ना विकास झोन या क्षेत्रामध्ये बांधकाम करावयाचे असल्यास काय नियम आहेत याची माहिती मिळावी.
Question by Mangesh jangam
28-11-2020
Mangesh.Jangam15@gmail.com
Maza father chi dapoli madhe land ahe tenchi death zalavar mi and sister cha name 7/12 var lagala ahe but teacha madhe maze father ne teacha sathi 25% hissa Asa wheel madhe write kela ahe tila hee accept ahe Asa bolte division sathi samor yet nahi tar karava lagel
Question by sanyog ulhas gandhi
27-11-2020
sanyoggandhi@rediffmail.com
Namaskar sir,
Mazya chulat bhavachya vadilani(satbara malak)1975 sali 5rs bond paper var vatap yadi madhe gharachya west side cha gurancha vada tasech vadyachya west and north side jaga dili ahe ase namud kele ahe.1986 sali tethe mazya vadilani ghar bandhle.Ata ti jaga navavar karun ghenesathi kai karave lagel.
please,guide us.
Question by Suresh Thakre
26-11-2020
naresh.807@rediff mail.com
साहेब नमस्कार,
2012 मध्ये माझ्या भावाने ट्रॅक्टर खरेदी करिता बँकेचे लोन घेतले, तेव्हा भावाने स्वतःचा, माझा, व आईचा प्रत्येकी 2 एकराचा सातबारा जोडला, परंतु तेव्हा बँकेने आमच्या जमिनीवर कर्जाचा कोणताही बोजा चढविला नाही, नंतर 2017 मध्ये भावाची मृत्यू झाली, नंतर बँकेने तलाठ्याला नोटीस पाठवून आमच्या तिघांचा जमिनीवर कर्जाचा बोजा ची नोंद घेण्यास सांगितले, तेव्हा तलाठ्याने माझ्या भावाच्या जमिनीवर कर्जाचा बोजा चढविला, तर मला हे जाणून घायचे आहे की, इतक्या वर्षांनी बँक व तलाठी सातबारा वर बोजा ची नोंद घेऊ शकतो का, व आमच्या जमिनीवर सुद्धा त्यांना आता बोजा चढविण्याचा अधिकार आहे का, सद्या आमच्या जमिनीवर बोजा ची नोंद घेतली नाही
बँकेने आपणाला कर्ज दिले होते व त्यासाठी आपण तारण म्हणून आपली जमीन दाखवलेली आहे. ही वस्तुस्थिती केवळ पाच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर बदलते असा होत नाही. जर कर्जाची फेड झालेली नसेल तर बँकेला असा बोजा ठेवण्याचा हक्क आहे. आपल्या भावांनी जमीन गहाण ठेवताना अथवा तारण ठेवताना त्याबाबतचा दस्त केला होता का याची खातरजमा करा. जर दस्त केलेला नसेल तर दस्ता शिवाय इतर हक्कांमध्ये बँकेच्या विनंती प्रमाणे अथवा सूचनेप्रमाणे बोजा ठेवण्याचा अधिकार नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
