जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by राजेश मेचकर
02-11-2020
rajeshmechakar69556@gmail.com
आमची २१ जणांची सामुदायिक जमिन आहे,परंतु बँकेने फक्त दोघांचे गहाणखत बनवुन कर्ज दिले व याची नोंद ७/१२ ला केली.इतरांची सहमती नसताना कर्ज मिळते का?
दोघांनी गहाणखत केलेले आहे म्हणजे केवळ दोघांच्याही त्याचे क्षेत्र गहाण ठेवले आहे असा अर्थ कायद्यामध्ये अभिप्रेत आहे. त्यामुळे आपली जमीन जर आपली कडून गहाणखत केलेले नसेल तर ती घाण ठेवलेली नाही.
आपण चिंतामुक्त राहावे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रणित ठाकरे
02-11-2020
pranitthakarep@gmail.com
आम्ही ज्या जागेवर राहतो ती जागा बी अँड सी ची आहे... आम्हाला 50 वर्ष होत आहे तिथे राहून ....रोड च्या साईड ची जमीन म्हणजेच बी अँड सी ची जमीन नावावर होऊ शकते का?
प्रनित राव ठाकरे,
अहो ती रस्त्याच्या बाजूची जागा आहे व ती जर बांधकाम विभागाच्या मालकीची असेल, आपण न्यायालयात गेला तरीही फारसा फायदा होईल असे मला वाटत नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Amit pawar
01-11-2020
amitpawar21@Gmail.com
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की जमिनीची नोंद करताना चुकीने नावात बदल झाला आहे त्या मुळे जमिन दुसऱ्या व्यक्तीच्या नावे लागली आहे तर ती जमिन मुख्य वारसदाराचे नावे करण्यासाठी काय करावे लागेल जर ती व्यक्ती जमिनीवर हक्क सांगत असेल तर पिढी जात वारसाने जमिनीची मालकी कशी मिळवावी
जोपर्यंत आपण जो दस्त केलेला आहे आणि त्यामध्ये चुकीने इतर इसमाचे नाव लागलेला आहे असा जास्त दिवाणी न्यायालयाकडून रद्दबादल केल्याशिवाय काहीही उपयोग होणार नाही. आपणाला महसूल न्यायालय मध्ये दावा दाखल करून काही फायदा होणार नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सागर गोरे
01-11-2020
sagargore34@gmail.com
सर ,
वडिलांचे 7 12 सदरी नाव लग्न पूर्वी वाटण्या करून झाल्या आहेत. त्यांचे नाव शिवाजी संभु माळी असे आहे.परंतु त्याचे स्वतः शैक्षणिक कागदपत्रे व इतर शिवाजी संभाजी गोरे या नावाने असून मुलांचे नावे गोरे या आडनाव चे आहेत .7/12 ला शिवाजी संभाजी गोरे असे करायचे आहे जेणेकरून मुलांना सुध्दा पुढे अडचणी निर्माण होणार नाहीत . त्या वेळी शाळेत सवलत मिळते मानून अडणावप्रमाणे लावले पण 7 12 सदरी जाती प्रमाणे उल्लेख आहे . काय करावे उपाय सुचवा
कागदोपत्री आपल्या वडिलांचे आडनाव जर गोरे असेल तरीही कागदपत्राच्या आधारे आपण मेहरबान तहसीलदारांना अर्ज केला, तर ते अर्जावर निर्णय घेयू शकतील .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Bhushan wadhi mo.8275343431
31-10-2020
bhushanwadhi4@gmail.com
काका अविवाहीत होते त्यांनी मुत्य पत्र पुत्न्याचा नावाने केले आहे व सध्या त्यांना वरून 1 वर्ष झाली मी नोंद करण्यासाठी गेलो असता माझा अत्याचे नाव नोटीस मध्ये टाकले पण सातबारा व फेरफार मध्ये याचे नाव नाही त्याचे मग हे नाव कसे आले मी पटवारी यांना विचारले असता ते कोणी अनहोलकवक्ती चे नाव घेऊन नाव टाकले असे बोलत आहे व माझा काका नी जे मत्यू पत्र बनू न ठेवले ते काय?
भूषण भाऊ आपण घाबरण्याचे काही कारण नाहीये.आपल्या काकांची जर ही स्वकष्टार्जित मिळकत असेल, तर ती मिळकत वृत्तपत्राच्या द्वारे ती कोणाच्याही नावे करू शकतात. आपलेच नाव मिकातीच्या सातबारा सदरी लागणे क्रमप्राप्त आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kale Rajesh Ramdas
31-10-2020
Kalerajesh962@gmail.com
सर माझा असा प्रश्न आहे मी बारा वर्षे पूर्वी प्लॉट घेतला होता चुकीने तलाठी यांच्या कडून फेरफार केला गेला नाही पाहिली रजेष्ट्री माझी आहे. समोरच्या व्यक्तीने आमच्या मांगे तो प्लॉट ए ला विकला ए तो बी ला विकला बी ने तो सी ला विकला. त्यांचे फेरफार झालेले आहे.ते फेरफार रद्द करण्यासाठी काय करावे लागेल सर प्लीज सर माहिती सांगा.
Who is prior in time , is prior in Law . आपल्या नावे प्रथम जर खरेदीखत असेल तर आपण त्या मिळकतीचे मालक आहात. आपल्या नंतरच्या दस्तनोंदणी द्वारे, त्या इसमाचे नाव सातबारा सदरी दाखल झाले असेल तर आपणाला त्या नोंदी विरुद्ध अपील करावे लागेल.
व दस्त आधारे त्या इसमाचे नाव सातबारा लागलेले नसेल तर केवळ आपणाला तहसीलदार यांच्याकडे अर्ज करावा लागणार आहे आणि आपल्या नावाची नोंद करण्याची विनंती करायची आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sandip
31-10-2020
sandeep.kadam545@gmail.com
Hello sir, My question is if one gat no divided by small river (odha) and on one side there is one farmer and for other side there is another farmer but other side there is already a route(rasta) for all the farmers around 70 years .so still that another farmer can ask for the new route to first farmer? Kindly help on this
The route you are referring to is called Easement Right. An easement right, unless it is necessary, cannot be demanded. The other farmer cannot claim or demand an alternate right of way.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ramdas kundlik landge
31-10-2020
ramdaslandge07@gmail.com
सर माझ्या वडिलांच्या आजोबांना दोन पत्नी होत्या त्यातील एका पत्नीला 3 मुले व एकीला एक मुलगा होता संतू नावाचा त्याच्या नावावर त्यांच्या आईकडून वारस हक्काने आलेली जमीन होती त्याला सक्की बहीण नव्हती, तो एकटाच होता तसेच संतू याच्या पत्नी फसाबाई ह्या वारस होत्या व फसाबाई यांना सुद्धा त्यांच्या आईकडून वारस हक्काने जमीन मिळालेली जमीन त्यांच्या नावे आहे , त्यांना वारस हक्काने येणाऱ्या जमिनीच्या फेरफार वर संतू व फासाबाई यांच्या नावावर करावी असा स्पष्ट उल्लेख आहे , तरी आम्ही त्यावर वारस नोंद करू शकतो काय. कृपया माहिती द्यावी.
रामदास भाई,
आपल्या प्रश्नावरून आपण संतु चे वारस आहात का की संतु चे सावत्र भाऊ याचा बोध होत नाही. असोत .
सध्या संतु व फसा बाई हयात नसतील v संतुलाही कोणते अन्य वारस नसतील तर आपले नाते संतुशी भावाचे आहे . त्यामुळे आपण वर्ग २ मधील IV वारस आहात . आपले नाव लाडू शकते .
मात्र तसा बाई किंवा संतु जर हातात असेल तर आपले नाव लागणार नाही आपण प्रयत्नही करण्याच्या फंदात पडू नये.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by बालाजी देशमुख
30-10-2020
balajitech50@gmail.com
माझे पणजोबा यांची१८८५ पुर्वी कॅनालसाठी जमीन सरकारने घेतली व मोबदला म्हनुन पुनर्वसनात दुसऱ्या गावात जमीन दिली. आमचे त्या गावी जास्त येणे जाणे नव्हते याचा फायदा घेऊन मिळालेल्या जमीनीचे मालक सदर जमीनीला कुळ म्हनुन लागले. आजरोजी आमची नावे ७-१२ वर आहेत व कुळांची नावे सुद्धा मालक सदरी आहेत.
१) पुनर्वसन मध्ये मिळालेल्या जमीनीला कुळ लागु शकते का?
२) कुळ म्हणुन लागलेली नावे कमी होऊ शकतात का? त्यासाठी काय करावे लागेल?
असा आहे की महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 हा कायदा पुनर्वसन कायदा अंतर्गत मिळालेल्या जमिनीलाही लागू शकतो.
आता प्रश्न असा आहे की 1985 झाली तुमची जमीन पुनर्वसन ना मध्ये तुम्हाला मिळालेली आहे त्यामुळे जो काही पूर्वीचा मालक आहे त्याची कुळवहिवाट हे कृषक दिनानंतर म्हणजे एक ०१. 04:57 नं तर निर्माण झालेले आहे त्यामुळे त्याच्या नावे जी काही किंमत निश्चितीकरण करणे व त्याचे नाव मिळते ती लागणे ही सगळी प्रक्रिया कुल म्हणून जाहीर झाल्यानंतर एक वर्षाच्या आत होणे अभिप्रेत होते. पुर्वीचा जो जमीन मालक होता तो ज्या वेळेस कूळ म्हणून त्याला जाहीर केले त्याच्या नावे जमिनीची विक्री किंमत निश्चित करण्याची कार्यवाही एक वर्षाच्या झालेले आहे का याची सगळी पडताळणी आपण जुने फेरफार पाहून करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश Shinde
29-10-2020
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,एखाद्या अध्यात्मिक संस्थेने पूर्वी ६३ ची परवानगी घेऊन शेतजमीन क्षेत्र ०हे.५० आर इमारत बांधणेकामी बक्षिसपत्राने घेतली.व बिनशेती व रेखांकन मंजूर करून घेतले.परंतु शेजारी असलेला ०-१० आर चा गट नंबर रस्त्यात जात असल्याने तीही जमीन संस्थेस बक्षीसपत्राने मिळाली .परंत ०-१० आर बाबत ६३ ची परवानगी न घेतल्याने मंडळ अधिकारी यांनी सदर बक्षीसपत्राची गावी घेण्यात आलेली नोंद रद्द केली.तर त्याबाबत कोणत्या सक्षम अधिकाऱ्याकडे अपील करून शर्तभंग नियमित करता येईल? सदर जमिनीचा वापर शैक्षणिक कारणासाठी होणार असल्याने नजराणा भरावा लागेल का?किंवा कसे? भरावा लागल्यास किती टक्के भरावा लागेल.?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती...
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 च्या कलम 63 परवानगी न घेतल्याने मंडळाधिकारी यांनी ज्या दस्ता द्वारे तुम्ही ती जमीन खरेदी केली होती त्या दस्ताच्या आधार याची नोंद टाकण्यात आली होती तो दस्त मंजूर करण्यास नकार दिलेला आहे व त्याप्रमाणे फेरफार रद्द करण्यात आलेला आहे.
या बाबतीमध्ये मंडळाधिकारी यांनी केवळ फेरफार मंजूर करण्यास नकार देण्याइतपत ही बाब थांबत नाही तर त्यांच्या मार्फत जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे अहवाल गे ला असेल व जिल्हाधिकारी महोदयांनी यांनी , सुनावणी घेयून घेऊन जमीन सरकारजमा केली तरच त्या ठिकाणी शासनाचे नाव लागू शकते.
सध्या स्थित तुमच्या माल्कीला कोण हात लाऊ शकणार नाही अथवा कोणी बाधा अनु शकत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sunil Randive
27-10-2020
rsunil12587@gmail.com
नमस्कार सर, आमच्या आजोबांच्या नावे 5 एकर15 गुंठे जमीन होती. नंतर भावहिस्साने माझे वडील व चुलते यांना वाटप करण्यात आले. अर्धी-अर्धी वाटप न करता शेतामध्ये एका झाडाची खूण ठरवून (अंदाजे) पूर्वस चुलते ३एकर१५गुंठे (मोजणी केली तेव्हा भरली) पश्चिमेला माझे वडील २एकर आहे. पण माझ्या वडिलांच्या नावे असणारी जमीन मोजणी केली तर २एकर १०गुंठे भरत आहे. याविषयी मार्गदर्शन करावे. प्रश्न वाढीव १०गुंठ्याचा..
नमस्कार सुनील रणदिवे साहेब
आपले कब्जे वहिवाटीत दहा गुंठे क्षेत्र हे सातबारा वर नमूद क्षेत्रापेक्षा जास्तीचे आहे. मात्र कब्जा प्रमाणे सातबारा ची क्षेत्र दुरुस्त करण्याची तशी तरतूद नाही जोपर्यंत लगतचे शेतकरी यासंबंधी देत नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दीपक सातपुते
27-10-2020
deepakstpt10@gmail.com
पुणे ग्रामीण भागात 7/12 काढण्यासाठी एकूण किती खर्च येतो? तसेच सामूहिक नोंदणी खर्च आणि एकट्याने नाव नोंदणीच्या खर्चात काही तफावत येते का ?
Question by सोहेल बागवान
26-10-2020
sbagwan786786@gmail.com
साहेब माझं प्रशन असा आहे की। जमीन नावाने आहे त्याचा 7/12व स्टॅम्प ड्युटी सगळी होतीये पण गाव सरपंच म्हणतात के ते जागा गावठाणात गेली आहे आणि तुमची जमीन नाहीच हित। ते मला कस घेता येईल मार्ग दर्शन करा।
Question by रविंद्र भोईर
25-10-2020
harshent29@gmail.com
माझ्या वडिलांचे नावे शेतकरी दाखला आहे, पण ते हयात नाहीत. माझ्या जमिनीची एका खाजगी मालकास विक्री केली आहे. त्यामुळे आता ७/१२ वर ही माझे नाव नाही. *मग मी दुसरीकडे जमीन विकत घेण्यासाठी शेतकरी म्हणून पात्र आहे का?*
Question by Sunil
24-10-2020
emails.landge@gmail.com
सर, नमस्कार 27 वर्ष पूर्वी आईने जमीन खरेदी केली( रजिस्ट्री आफिस मध्ये जाऊन मूळ मालकासोबत)पण फेरफार वर तीचे नाव नाही कृपया तिचे नाव येण्यासाठी मार्गदर्शन करावे. आई निरक्षर आहे
Question by Amit
24-10-2020
amitparshurami567@gmail.com
माझ्या आजोबांच्या काळातली खंडकरी जमीन सरकारने दिली आहे .७/१२वर आईचे व मावशीच्या वारसदार यांचे नाव होती . आता ही जमीन सरकारने ताबा मामा लोकं ना दिला आहे . पण आताच्या ७/१२ वर आईचे नाव व मावशी चा वारसदार यांचे नाव नाही.
हक सोड पत्र आईने दिले नाही तरीही नाव का काढली . ही नाव परत लावता येईल का. सांगा
Question by Milind Choudhury
23-10-2020
milanchaudhary546@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे कि 2009 मधे झालेला आपसी वाटणि पत्रात बहनीचा वाट नाही होता का होता तर ताचा माहितीचा अधिकार कूटून मागवाचा
वडिलोपार्जित मिळकतीमध्ये मुलींना हिस्सा हा हिंदू वारसा कायदा 1956 अस्तित्वात आल्यापासून आहे. फरक एवढाच आहे की, वडलोपार्जित मिळकतीमध्ये, 2005 पर्यंत मुलींना स्वतःचा हिस्सा वाटप करून मागता येत नव्हता.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Gajanan garuc
21-10-2020
gajagarud@gmail.com
A महिला तिला Y नावाची मुलगी Y या महिलेला P व Q नावाचे दोन मुले तर
1)Y महिला हयात असताना A या महिलेच्या संपत्तीचे कायदेशीर वारस P व Q हे होऊ शकतात का? वारस हक्क कायद्याप्रमाणे
2)Y या महिलेचे T या व्यक्ती सोबत लग्न झालेले असेल तर अशा वेळी Y ,P, Q हे तीन व्यक्ती A या महिलेच्या कुटुंबाचे सदस्य होऊ शकतात का?
गजानन भाऊ नमस्कार
एखाद्या व्यक्तीची स्वकष्टार्जित मिळकत म्हणजे
1. तिने स्वतःच्या या पैशांतून खरेदी केलेली मिळकत
2. वारसाहक्काने तिला प्राप्त झालेली मिळकत
3. बक्षीस पत्राने त्या व्यक्तीला मिळालेली मिळकत
4. सामायिक मिळकतीचे वाटप झाल्यानंतर अशा व्यक्तीला मिळालेली मिळतात
वडिलोपार्जित मिळकत म्हणजे, चार पिढ्या ची सामायिक मिळकत.
थोडक्यात वडिलोपार्जित मिळकत म्हणजे, खापर पंजोबा ची अविभक्त स्वकष्टार्जित मिळकत.
आपल्या प्रश्न नुसार, Y या महिलेला वारसाने, A या नावाच्या तिच्या आईकडून मिळकत प्राप्त झालेली आहे. उपरोक्त स्वकष्टार्जित मिळकतीच्या व्याख्या दिल्या प्रमाणे, Y या व्यक्तीची तिला मिळालेली मिळकत ही स्वकष्टार्जित मिळकत आहे. त्यामुळे Y हयात असताना तिची दोन मुले P व Q यांना कोणताही अधिकार नाही. तसेच तिचे पती देव T यांनाही कोणताही हक्क नाही. ही
हिंदू वारसा कायदा 1955 च्या कलम 14 अन्वये, हिंदू स्त्रीला मिळालेली मिळकत ही तिची स्वकष्टार्जित मिळकत मानली जाते. या मिळकतीवर ती हयात असताना इतर कोणालाही अधिकार नाही.
मात्र तिच्या पश्चात तिची दोन्ही मुले P वQ तसेच पतीदेव T यांचे नाव तिचे वारस म्हणून हिंदू वारसा कायदा 1956 च्या कलम 15 अन्वये लागणार.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Atul Rautrao
21-10-2020
rautraoatul@gmail.com
सर तहसील कार्यालयातील जुने म्हणजे १९५९ ~ २०२० पर्यंत च्या सातबारा आणि खासारापणी च्या रेकॉर्ड साठी प्रती कॉपी किती खर्च येऊ शकतो.
नमस्कार अतुल साहेब
ज्या तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षांमधून आपल्याला दस्त/ कागदपत्र हवे आहेत, त्या अभिलेख कक्षाच्या बाहेर, प्रती पृष्ठ/ प्रति सातबारा, नकले साठी शासकीय शुल्क किती आहे याचा तपशील दर्शनी भागावर लावणे बंधनकारक आहे. आपण ज्या अभिलेख कक्षात कडे उपरोक्त दस्तांची मागणी केलेली आहे. त्या कक्षाच्या बाहेर जर हे दरपत्रक लावलेले नसेल, तर मेहेरबान तहसीलदार महोदयांना भेटून असे दरपत्रक लावण्या बाबत त्यांना विनंती करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मनोज रघुनाथ ढाणे
20-10-2020
manojrdhane@gmail.com
नमस्कार सर,
मी मनोज रघुनाथ ढाणे
रहिमतपूर, नगर पालिका क्षेत्रातील ता. कोरेगाव येथील सर्वे नंबर 808/7 (14 गुंठे) बद्दल माहिती खालीलप्रमाणे -
1) मूळ मालक व माझे आजोबा नाना महादू ढाणे यांनी सन 1940 ला जमी न मारुती देवस्थान ला गहाण दिली.
2) सन 1943 ला तीच जमीन गहाण न सोडवता वामन बळी कदम यांनी कोणतीही परवानगी न घेता खरेदी घेतली. (फेरफार मध्ये वामन बळी कदम यांना ताबा नाही असा उल्लेख केला आहे)
3) सन 1949 ला तीच जमीन वामन बळी कदम यांनी दादू श्रीपती गायकवाड यांना खरेदी दिली.
4) फेरफार मध्ये सदर झालेले व्यवहार कुळ कायदा कलम 63 अगर 64 नुसार विसंगत असल्याने गायकवाड यांची इतर हक्कमध्ये नोंद झाली.
5) त्यानंतर नाना महादू ढाणे यांचे नाव संरक्षित कुळ कलम 3 अ प्रमाणे इतर हक्कमध्ये नोंद झाले.
6) वामन बळी कदम यांनी 1950 साली गहाण दस्त भरपाई केले.
7) दादू श्रीपती गायकवाड यांचे नाव पुन्हा कबजेदार सदरी लागले.
8) सन1955 साली 2-3 वर्षे कुळे जमीन कसत नसल्याचे कारण नमूद करून तहसीलदार यांनी हुकुमावरून नाना महादू ढाणे यांची संरक्षित कुळाची नोंद कमी केली...
महत्वाचे - सन 1940 पासून आजपर्यंत नाना महादू ढाणे हे त्यांच्या मृत्यूनंतर यांचे वारस सदरची जमीन कसत आहेत, पण 7-12 उतारा गायकवाड यांच्या वारसांच्या नावे निघत आहे.. त्यामुळे ते आता जमिनीचा कब्जा मागत आहेत..
प्रश्न -- 1) सदर जमिनीचे 1943 चे व त्यानंतर झालेले खरेदी दस्त कुळ कायद्यानुसार बेकायदेशीर ठरविता येतील का?
2) मा. तहसीलदार यांना 2-3वर्ष कसत नसल्याचे कारण देऊन 7-12 वरील नोंदी कमी करण्याचा हक्क आहे का?
3) इतक्या वर्षानंतर आत्ता याबाबत न्यायालयामध्ये अथवा इतर अन्य ठिकाणी दावा दाखल करून दाद मागता येईल का?
कृपया आपणांस नम्र विनंती की, सदर बाबतीत योग्य ते मार्गदर्शन मिळावे.
आपला विश्वासू,
मनोज रघुनाथ ढाणे
9011097766
नमस्कार मनोज रघुनाथ ढाणे साहेब,
मूळ मालक व आपले आजोबा/ पूर्वज यांनी ही जमीन जी मारुती देवस्थानाकडे लहान ठेवलेली आहे, ते गहाणखत आपणाकडे आहे काय? गहाण खतातील अटी व शर्ती यावर खालील गोष्टी अवलंबून आहेत.
१. वामन कदम यांना ही जमीन जी गहाण ठेवलेली आहे ती खरेदी करता येईल काय?
२.आपण दिलेल्या घटना क्रमानुसार मारुती देवस्थान कडून वामन बळी कदम यांनी खरेदी केल्याचे नमूद केले आहे. मात्र त्याबाबतची खरेदी किंमत ही काही कालावधीनंतर कदम यांनी मारुती देवस्थान कडे जमा केलेले आहे. त्यामुळे सुरुवातीला केवळ देवस्थान ही जमीन वामन बळी कदम यांना केवळ करमणुकीसाठी दिली होती काय?
३. नाना महादेव ढाणे यांचे नाव संरक्षित कुळ म्हणून दाखल होते? त्यानंतर नाना महादेव ढाणे हे जमीन कसात नसल्यामुळे कलम १४ अन्वये कमी केलेले आहे.
नाव कमी करून तब्बल 70 ते 75 वर्षे झालेले आहेत. त्याच्यानंतर बरेच त्यामध्ये बदल झालेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 अन्वये यामध्ये सध्यातरी आपल्या हातात काही लागेल हे वाटत नाही.
मात्र 1955 पासून आपले पूर्वज व तदनंतर आपण जमीन कसे आहात व ही बाब श्रीपतराव गायकवाड साहेब यांना अवगत असेल तर, शांततापूर्ण ताबा या तत्त्वाचा आधार घेऊन आपणाला , न्यायालयात आपण मालक झाला आहे अशा प्रकारचे डिक्लेरेशन करून मिळेल का ?याचा वकिलांचा सल्ला घेऊन आपण दावा दाखल करू शकता.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vivek
20-10-2020
vivekdusane@gmail.com
नमस्कार, माझा एक प्रश्न खालीलप्रमाणे आहेः
मी जमिनीचा तुकडा (3 आर) विकत घेतला आहे. विक्रेत्याने फक्त कधिही रद्द न होनारे कुलमुखत्यार पत्र आनी ताबा साठेखत, केली आहे परंतू, 7/12 वर नाव लगले नाही ... तर ते करिता काय करावे लागेल?
विवेक दुसाने साहेब नमस्कार
एक तर आपण तीन गुंठे क्षेत्राचे ताबा साठेखत व कुलमुखत्यारपत्र आपल्याला लाभात घेतलेले आहे. परंतु या दोन्ही दस्तान मुळे आपणाला मालकीहक्क बिलकुल प्राप्त होत नाही.
त्याच्याशिवाय तीन गुंठे क्षेत्र हे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असल्याने, त्याचे खरेदीखत आता होऊ शकणार नाही. कारण आपल्या खरेदीमुळे तुकडे बंदी तुकडे जोड कायद्यान्वये तुकडा पडत आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by उमेश
20-10-2020
umeshdangare@gmail.com
महोदय माझ्या आजोबाने घराची काही जागा दुसऱ्या परिवारातील लोकांना (no blood relationship) सहमती ने जाणे -येणे साठी दिली आहे जेव्हा कि यांच्या घराला या व्यतिरिक्त रस्ता आहे, आता समस्या अशी झाली कि त्या परिवारातील दबंग व्यक्तीने स्वतःचा वैयक्तिक रस्ता आहे असे दाखवतो आणि आम्हांला पण त्या जागेच्या पलीकडे असलेल्या जागेवर जाणे धोकाच झाले आहे कृपया मार्गदर्शन करा सर कि ही जमीन मला आता परत मिळवता येईल का?
आपण शेजारच्या व्यक्तीला वहिवाटीची साठी जागा दिली आहे त्यामुळे आता ती परत घेता येणार नाही नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती ही आपणाला रस्ता वापर देणार नाही . तो जर ऐकत नसेल तर आपणाला जर रस्त्याचा वापर शेती या कारणासाठी होत असेल तर आपण मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 अन्वये मेहरबान तहसीलदार साहेब यांच्याकडे दावा दाखल करू शकता. जर रस्त्याचा वापर हा शेती करण्यासाठी नसेल तर आपणाला दिवाणी न्यायालय मध्ये आपण दावा दाखल करू शकतात. त्यामध्ये त्या व्यक्तीने आपणाला वहिवाटीचा रस्ता वापरण्यासाठी प्रतिबंध करू नये म्हणून त्याच्याविरुद्ध मनाईहुकूम मिळवता येईल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमोल अनंत पोवार
20-10-2020
powaramol10@gmail.com
नमस्कार सर,
मी अमोल पोवार कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज चा रहिवासी आहे. मी आर्थिक दृष्टया मागास प्रवर्गातील (EWS) प्रमाणपत्र काडू इच्छित आहे. त्यासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंट मध्ये १९६७ पूर्वीचा शेतीचा उतारा किंवा दुसरा पूरावा गरजेचा आहे पण आम्ही महाराष्ट्रामध्ये १९९० पासून राहता पण त्यापूर्वी आम्ही म्हणजे माझे आजोबा व वडील हे कर्नाटकचे रहिवासी होते त्यामुळे जी काही डॉक्युमेंट्स आहेत ती कर्नाटक मधील आहेत.१९९० नंतर माझे वडील कामानिमत्ताने महाराष्ट्र मध्ये आले आणि त्यानंतर आम्ही महाराष्ट्राचे रहिवासी झालो.आता सर्व काही डॉक्युमेंट्स महाराष्ट्र मधील आहेत तर आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील प्रमाणपत्र काढण्यासाठी मी काय करावे???
Question by Shridhar Dange
20-10-2020
rusopari74@gmail.com
माझी पत्नीकडून तिचा वडिलांचा घराचे तिचा भाऊने ऑक्टोबर2009 साली हक्कसोड करवून घेतले , माझा पत्नीचे वडील 1994 साली वारले आणि आई मे 2009 साली वारली आहे.
1) हक्कसोडपत्र इतक्या घाईघाईत करण्यात आले की त्यात ह्या चूका झाल्यात घर हे 72 चौ. मी. असतांना 90 चौ. मी. टाईप केले आणि आईचे नाव कमी केले नाही.
म्हणून हक्कसोडपत्र हे नवीन दुरुस्ती करून परत करावे लागेल आसे सांगण्यात आले म्हणून 2 महिन्यांनी माझा पत्नीस तिचा भावाने परत बोलावले सह्या करण्यासाठी परंतु माझा पत्नीने नकार दिला आणि सह्या करण्यास गेली नाही.
2) जानेवारी2013 साली सूची2 तयार करण्यात आली ज्यात वरील दोन्ही चुका सूची2 मध्ये आल्यात. मार्च 2013 माझा पत्नीचा भावाने स्टॅम्पवर एफिडेव्हीट वर लिहून दिले की माझी आई यापूर्वीच मयत असून तसेच माझा बहिणींनी हक्कसोड करून दिल्याने त्यांची नावे कमी करावी.
आणि उतारा बनवून घेतला.
3) मागचा महिन्यात सप्टेंबर2020 मध्ये आम्ही सर्वे कागदपत्रे काढली तेव्हा ह्या गोष्टी दिसून आल्यात.
मग प्रश्न असा आहे की हे सर्व कसे घडले चुकीची दुरुस्ती न करता?
आता आम्ही त्याना ct सर्वे ऑफिसात तर ते म्हणतात तेव्हाचा साहेबानी करून दिले.
काही कागदपत्रे रेकॉर्ड नाही पण तरी ते म्हणतात की जे आहे ते बरोबर आहे.
4) कृपया हे चुकलेले हक्कसोड कसे कॅन्सल करता येईल ह्याची प्रोसेस सांगा किंवा काय आणि कसे करता येईल?
Question by Charudatta khadtare
19-10-2020
charudatt2@gmail.com
तडजोड हुकुमनाम्याने वाटणी झाली आहे. 41 आर, 15 आर असे 6 ,6 हिस्से आहेत. कोर्ट आदेश आहे की सात बारा वेगळे करुन घेणे. माझा प्रश्न - सातबारा वेगळे होतिल का ??
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3400 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
