जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Gajanan
16-05-2019
gajananp8910@gmail.com

सर मला शिवरस्ते विषयी माहिती हवी आहे
1) सर शिव रस्ते हे सर बांधावरून असतात का
2) शिव रस्त्या वर 3 डेपनी आहेत त्या डेपनी (मातीच्या मोठे बांध )मध्ये काही अंतर आहे ते अंतर किती असते
3)शिवरस्ते सर बांधावरून4 फूट -4फूट असा देता येतो का पण डेपनी असताना
4) पूर्वी ब्रिटीश काळात डेपनी मधून शिव रस्ते होते का
5) काही जन म्हणतात कि डेपनी मधून8 फूट रास्ता असतो ते बरोबर आहे का
आदरणीय सर/मॅडम
बक्षीसपत्र/दानपत्र केलेली शेती ची नोंद 7/12 मध्ये होऊ शकते का ? कृपया मार्गदर्शन करावे
दस्त नोंदणीकृत असल्यास , नोंद होऊ शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमच्या वडीलांची स्वतंत्र मिळकत आहे. सदर मिळकत एकूण क्षेत्र 3.29.0 हे.आर एवढी आहे. मिळकत अजूनही वडीलांच्या नावावर नाही
या मिळकतीची वारसाना वाटणीसाठी काही नियम आहे का?
मिळकत वडिलांची स्वकष्टर्जित असेल तर , वडिलांचे इच्छेनुसार , त्याची विक्री / विल्हेवाट ते लावू शकतात . वडील मयत झाल्यावर , व्ययक्तिक वारसा कायद्यानुसार वारसांची नावे दाखल होतील
मिळकत वडिलोपार्जित असेल व वडिलांचे हयातीत वाटप करायचे असल्यास , वडील व इतर वारस , अश्या सर्व वारसांना प्रत्येकी एक हिस्सा या प्रमाणे वाटप होईल
उदा
वडील व त्याना २ मुले व एक मुलगी आहे तर प्रत्येकी १/४ हिस्सा या प्रमाणे वाटप होईल . मात्र वडील मयत झाले तर , २ मुले , १ मुलगी व आई हयात असेल तर आईस या प्रमे प्रत्येकी १/४ हिस्सा मिळेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर, बिनशेती मोजणी करून कजाप.प्लॉट नुसार विभागणी करून भूमी अभिलेख कार्यालयाकडून प्राप्त.झाला आहे.जमिनीचे विनिश्चीतीकरण झाले असून त्यानुसार बिनशेती चलन भरले आहे.सदर ठिकाणी अंशतः विकास परवानगी मिळाली आहे.त्यामुळे बिनशेतीची इतर हक्कात नोंद घेता येत नाही असे मा.तलाठी यांचे म्हणणे आहे.तर ७/१२ सदरी कजाप.नुसार प्लॉटिंग नुसार वेगळे ७/१२ तयार करता येतील का?आकारणी केव्हा करता येईल?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.बिनशेती नोंद करण्या अगोदर कजाप.ची नोंद घेता येऊ शकेल का?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.....
आपणास आकार फोड पत्रक म्हणायचे आहे , कजाप नाही . जो पर्यंत आकारफोड पत्रक येत नाही तो तोपर्यंत बिनशेती नोंद व आकारणी ७/१२ वर करता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
माझ्या आजोबांना 1974-74 मध्ये धरणग्रस्त म्हणून 5000 चौ फूट प्लाॅट मिळाला होता. सिटी सर्वे 1987 ला झाला आहे. त्यानंतर 1994 मध्ये आजोबांनी 1200 चौ फूट जागा भावकीतल्या व्यक्तीला विकली. परंतू खरेदीखत जिल्हाधिकारी किंवा कोणत्याही सक्षम अधिकाय्राची पूर्वपरवानगी न घेता झाल होत. खरदीखतावर सिटी सर्वे चा नंबरही नाही व सिटी सर्वे चा किंवा ग्रामपंचायतीचा उताराही जोडला नव्हता. तसेच खरेदी घेणाराची सही किंवा अंगठासुद्धा नाही.
1994 पासून आजपर्यंत(2019) खरेदी घेणाराची सिटी सर्वे ला नोंद नाही.
आजोबा 2011 वारलेत व नंतर 2016 मध्ये वडिलांनी 5000 चौ फूट जागेवर वारस(4 वारस वडील, चुलते व दोन आत्या) नोंद करून घेतली.
जागा वारसाने मिळाल्यामुळे वारस त्यांचा हक्क सोडत नाहीत. तर वारसांची संमती नसताना खरेदी घेणाराची सिटी सर्वे ला नोंद होईल का? वारसांची संमती नसताना 25 वर्षापूर्वीच्या खरेदीखतावरून खरेदी घेणाराची नोंद करण्याचा अधिकार उप-अधीक्षक भूमि अभिलेख यांना आहे का?
पूर्वपरवानगी न घेता केलेलं खरेदीखत रद्द होत का? रद्द होत असेल तर ते कोणाकडे रद्द करून मागाव लागेल?
1994 ला खरेदीखतावरून खरेदी घेणाराची 1200 चौ फूट जागेची नोंद ग्रामपंचायत नमुना 8 ला झाली.
त्यानंतर 1998-2002 या काळात (खरेदी घेणाराने ) कोणत्याही दस्त, अर्ज किंवा ठराव याचा उल्लेख(शेरा) न करता 1200 चौ फूट नोंद 2500 चौ फूट अशी बोगस वाढवून घेतली. हे 2016 मध्ये आमच्या निदर्शनास आले. तर बोगस वाढवलेले क्षेत्र कमी करून मिळेल का?ते कमी करण्यासाठी कुणाकडे अपील कराव लागेल?
खरेदी खत रद्द करून मागितल्यावर धरणग्रस्ताने मिळालेला प्लाॅट सरकार गोठवेल का?
१. ज्या आदेशाने आपल्या आजोबांना भू खंड मिळाला , त्या आदेशामध्ये भूखंड विक्री बाबत काही निर्बंध आहेत का ? जर निर्भेड असतील तरच , जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे .
२. खरेदी खत नोंदणीकृत नाही , त्या वर सिटी सय्र्वेय नंबर नाही , तर त्याचा अंमल मिळकत पत्रिकेवर उप अधीक्षक तसेच ग्राम पंच्यात यांनाही घेता येणार नाही
३. ग्राम पंचायतचे आदेश विरुद्ध गट विकास अधिकारी यांचे कडे अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
माझ्या आजोबांना 1974-74 मध्ये धरणग्रस्त म्हणून 5000 चौ फूट प्लाॅट मिळाला होता. सिटी सर्वे 1987 ला झाला आहे. त्यानंतर 1994 मध्ये आजोबांनी 1200 चौ फूट जागा भावकीतल्या व्यक्तीला विकली. परंतू खरेदीखत जिल्हाधिकारी किंवा कोणत्याही सक्षम अधिकाय्राची पूर्वपरवानगी न घेता झाल होत. खरदीखतावर सिटी सर्वे चा नंबरही नाही व सिटी सर्वे चा किंवा ग्रामपंचायतीचा उताराही जोडला नव्हता. तसेच खरेदी घेणाराची सही किंवा अंगठासुद्धा नाही.
1994 पासून आजपर्यंत(2019) खरेदी घेणाराची सिटी सर्वे ला नोंद नाही.
आजोबा 2011 वारलेत व नंतर 2016 मध्ये वडिलांनी 5000 चौ फूट जागेवर वारस(4 वारस वडील, चुलते व दोन आत्या) नोंद करून घेतली.
जागा वारसाने मिळाल्यामुळे वारस त्यांचा हक्क सोडत नाहीत. तर वारसांची संमती नसताना खरेदी घेणाराची सिटी सर्वे ला नोंद होईल का? वारसांची संमती नसताना 25 वर्षापूर्वीच्या खरेदीखतावरून खरेदी घेणाराची नोंद करण्याचा अधिकार उप-अधीक्षक भूमि अभिलेख यांना आहे का?
पूर्वपरवानगी न घेता केलेलं खरेदीखत रद्द होत का? रद्द होत असेल तर ते कोणाकडे रद्द करून मागाव लागेल?
1994 ला खरेदीखतावरून खरेदी घेणाराची 1200 चौ फूट जागेची नोंद ग्रामपंचायत नमुना 8 ला झाली.
त्यानंतर 1998-2002 या काळात (खरेदी घेणाराने ) कोणत्याही दस्त, अर्ज किंवा ठराव याचा उल्लेख(शेरा) न करता 1200 चौ फूट नोंद 2500 चौ फूट अशी बोगस वाढवून घेतली. हे 2016 मध्ये आमच्या निदर्शनास आले. तर बोगस वाढवलेले क्षेत्र कमी करून मिळेल का?ते कमी करण्यासाठी कुणाकडे अपील कराव लागेल?
खरेदी खत रद्द करून मागितल्यावर धरणग्रस्ताने मिळालेला प्लाॅट सरकार गोठवेल का?
कोकणे साहेब
आपले आजोबांना भूखंड मिळाला होता त्याप्रमाणे त्यांनी तो आपल्या भावकीतील एका इसमास विक्री केला . ग्राम पंचायत अभिलेख सदरी घेणारच नाव लागले . तथपि अद्याप मिळकत पत्रीकेस नाव लागले नही . ताबा मात्र घेनारचेकडे आहे . ज्या आदेशाने भू खंड प्रदान करण्यात आला त्या मध्ये , हस्तांतर करण्यापूर्वी , जिल्हाधि यांची परवानगी आवश्यक आहे असा अट होती का ? जर अशी अट असेल तर , खरेदी खत रद्द होणार नाही मात्र , त्याचे नाव मिळकत पत्रीकेस लागणार नाही . मात्र जर अट नसेल , तर त्याचे नाव लागण्यास काही अडचण नसावी

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Gajanan
27-04-2019
gajananp8910@gmail.com

सर माझे शेत दोन गावच्या शिववर आहे शिवरस्त्याची मागणी आहे शिववर 3 डेपनी(मोठे मातीचे बांध)तिन्ही बाजूस आहेत 3डेपनी मध्ये अंतर आहे
1)डेपनी मध्ये किती अंतर असते त्यातुन रस्ता असतो का
2)डेपनी असताना शिववरुन रस्ता कुठून देता येतो
3)शिववरच्या बांधाला सरबांध म्हणतात का
4)डेपनी कस्यासाठी असतात त्याचे महत्व काय
5)शिववरुन 4-4 असा सरबंधाने डेपनी असताना रस्ता देता येतो का
6)प्रत्येक शिववरुन रस्ता पूर्वी पासून असतोच का
7)काही माणसे म्हणतात ब्रिटिश काळापासून डेपनी मधून शिव रस्ते असतात /मग प्रत्येक शिववर रस्ता असतो का व् तो किती असतो
8)तहसीलदार याना शिवरुन कसा रस्ता देता येतो
सर,
1980-82 साली खरेदी केलेली जमीन च खरेदी खत पुणे जिह्यातील कोणत्या कार्यलयात काढता येतील.

दुसरा प्रश्न

सातबारा मध्ये नावात बदल झाला असेल(म्हणजे आधी शेषराव होते की ते बरोबर आहे पण आता ऑनलाइन ते शेष असे झाले आहे.)आधी ऑनलाइन तसेच हस्तलिखित उतारा यावर शेषराव असे बरोबर लिहिलेले दोन्ही उतारे आहेत. यात दूरुस्ती कशी करायची

धन्यवाद!

१. एवढे जुने खरेदी खत मिळणे अवघड आहे . आपण संबंधित दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयात अर्ज करा
२. तहसीलदार यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
वडिलांच्या मृत्यूनंतर आई, मी व भावंडांची वारसनोंद केल्यानंतर तलाठी व ग्रामसेवक यांच्याकडून कोणकोणती कागदपत्रे, दाखले व उतारे घ्यावेत व त्यामधून कोणकोणत्या बाबींची खातरजमा करावी याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
धन्यवाद.
... अरुण जायकर.
नमस्कार सर ३२ ग चे सर्टिफिकेट आमच्याकडे नाही ७/१२ वर इतर हक्कात जमीन मालक यांना जमिनीची रक्कम ३३७८ तारीख १/१०/१९६३ पासून वार्षिक १० हप्त्यात मिळाली आहे असा शेरा इतर हककात आहे सदर त्याबाबतच्या पावत्या आहे तरी सदर भोगवटा वर्ग२ व इतर हक्कातील शेरा कमी करण्यासाठी काय करावे लागेल
आपले तहसील / शेत जमीन न्यायाधिकरण कार्यालयात जाऊन ३२ मी प्रमाणपत्र ( जमिनीचे हप्ते भरले बाबत ) घ्या . त्या आधारे तलाठी इतर हक्कातील हि नोंद कमी करतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

११ आर जागा २००६ मध्ये ११ जणांच्या नावे घेतली आहे सादर व्यवहार तुकडेबंदी विरुद्ध असा शेरा इतर अधिकारात आहे नवीन सुधारणेनुसार किमतीच्या २५ % रक्कम भरण्याबाबत काही परिपत्रक अथवा जि आर आहे का ते मिळावे हि विनंती
कायद्यात सुधारणा झाली आहे . महाराष्ट्र शासनाचे संकेत स्थळावर सुधारणा कायदा प्रत आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

खुल्या प्रवर्गातील लग्न झालेल्या महिलांसाठी NCL प्रमाणपत्र काढण्यासाठी तिच्या आई वडील कि नवरा यापैकी कोणाचे उत्पन्न धरण्यात येते? तसेच महिला स्वत: नोकरी करत असेल तर तिचे पगारापासून मिळणारे उत्पन्न कुटुंबातील उत्पन्नाच्या तपशील मध्ये पकडण्यात येते का ? कुटुंबातील उत्पन्नाच्या तपशीलामध्ये कशाकशाचा समावेश होतो याबद्दल मार्गदर्शन करावे,
१. आई व वडील
२. आई -वडील यांचे वेतन व शेती पोंसून मिळणारे उत्पन्न सोडून , सर्व बाबी उत्पन्नात येतात

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

उपजिल्हाधिकार्याची कार्य किंवा उपविभागीय अधिकाऱ्याची कार्य
मा.सर.....आमच्या 7/12 मध्ये तिन व्यक्तिंची नावे आहेत.
तिन्हीं व्यक्तींच्या नावे 2 हेक्टर समाईक क्षेत्र असुन त्याचा 8अ हा तिघांच्या नावे 2हेक्टर जमिनीचे क्षेत्र समाईक दाखवत आहे.....

मला व्यक्ती नं.ऐकाच्या नावे 80आर क्षेत्र...व्यक्ती नं.2 च्या नावे 80आर व व्यक्ती नं.3च्या नावे 40आर आशी वाटनी पत्र करायचे आहे...तिन्ही व्यक्ती एकाच घरातले आहेत.....वाटणीपत्र कसे...व कोठे करावे....कमी खर्चात....
तहसीलदार यांचेकडे कलम ८५ खाली अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sadik
13-04-2019
Sadik11m@rediffmail.com

सर crpc 133 अंतर्गत अर्जामध्ये स्वतःचे नाव नमूद न करता अर्ज sdm ला पाठविल्यास ते त्या public nuisance वर कारवाई करू शकतात का ते पण नगर पंचायतीच्या विरुद्ध

Question by RAMESH
12-04-2019
rameshpawar9049@gmail.com

नमस्कार सर, वीस (20) वषॉपुवी सदरील कब्जेदाराकडुन व त्याच्या मालकी हक्कामध्ये असलेली दोन(2) एकर जमिन खरेदी खत करुन विकत घेतली होती परंतु आता पुविच्या मुळ मालकाने महसुली विभागात अपिल करुन आमच्या नावे असलेला फेरफार कमी केला व त्याच्या नावे फेरफार मंजुर करुन घेतला व आता जमिनीवर हक्क मागतो तर त्याच्यावर काय कायॅवाही करावी, व न्याय कुठे मागावा ,याबद्दल सर योग्य मागॅदशॅन करावे .
प्रांत अधिकारी यांचे आदेश विरुद्ध , अप्पर जिल्हाधिकारी यांचेकडे अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, आमचे मुंबई हायकोर्टमध्ये 1951 ला अपिल होते तो निकाल आमुच्यासारखा झाला आहे व सर्वे नंबर ला तिघाची नाव समान क्षेत्राला आहेत प्रत्येकी एक चतुर्थ अंश 135 गुंठे प्रत्येकाला आहे परंतू सर्वे नंबर नंतर एकत्रीकरण ज्यावेळी झाले त्यावेळी ' ' एका भावाला182 आर दुसऱ्याला132 आणि तिसऱ्या भावाला99आर नुसते आहे, एकत्रीकरण मध्ये कोणतेही जाब जबाब नाहीत तीच चुक गट नंबर तीन पडले त्यातही झाले, परंतु भुमिअभिलेख मध्ये विचारले असता ते साहेब म्हणतात की ही पहिल्यावहिवाटीनुसार मोजणी झाली आहे, गट नकाशाही चुकीच्या क्षेत्रानुसार झाला आहे मग क्षेत्र परत सर्वे नंबर सारखे होन्यासाठी काय करावे लागेल साहेब मार्गदर्शन करा | प्लिज.6
एकत्रीकरण योजना झाल्यानंतर , आपण झालेल्या चुकीबाबत पुनरिक्षण अर्ज दाखल करू शकला असता . आता तो कालावधी संपलेला आहे . आता काही करता येणार .
समान क्षेत्र करण्यासाठी , क्षेत्राची विक्री आपापसात करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार.
आजोबांची शेतजमीन आहे,भुमिअभिलेख एकत्रीकरनाचा सन 1971 ला शेजारचा खातेदाराचा व आजोबांचा काही संबध नसतांना देखील एकत्रीकरणने दोघांचे सातबारे सामाईक करुन दिले आहेत,सातबारा वेगळे करणेकामी भुमिअभिलेख कार्यालय,तहसिलदार सो.तहसिल कार्यालयाला भरपुर अर्ज करुन देखील दाद मिळाली नाही,तरी यावर आत्ता पुढे काय पाऊल टाकावे याचे आपन योग्य मार्गदर्शन करावे हि विनंती...
धन्यवाद,,,
आता काही करता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर..
2015-16 मध्ये केळीगव्हाण (ता.बदनापूर) गावातील नदीमध्ये जलयुक्त शिवार, सामाजिक संस्थेच्या आणि लोकवर्गणी निधीतून खोलीकरण आणि रुंदीकरनाचे अर्धवट काम झाले होते
त्यामुळे आमचा नदीतीरावरील वडिलोपार्जित शेतरस्ता विस्थापित झाला तो नदीतीरावरुन पूर्ण करून देऊ अस आम्हाला सांगण्यात आलं पण आजपर्यंत 3 वर्षात तो बनवला नाही त्यासाठी तहसील ला नोव्हेंबर -2018 मध्ये ३५ शेतकऱ्यांच्या सातबारा नंबर आणि तलाठी पंचनामा प्रत सह त्रकार दिल्यावर आमचा अर्ज मजूर करून तहसील ने फक्त खाजगी सामाजिक संस्थांना रस्ता पुर्ववत करण्याची नोटीस दिली पण आजपर्यंत रस्ता तयार करण्यासाठी काही उपाययोजना झाली नाही..
लोकवर्गणीतून जमा झाालेल्या निधीतील जवळपास पाच लाख रुपयांची रक्कम कार्यकारी समितीकडे शेष आहे. नदीला जुलै ते जानेवारी पर्या्यं्त पाणी असते,आम्हाला पर्यायी रस्ताही नाही. दोन वर्षेपासून पाण्यातून अवजारे नेऊन शेती पिकावतो आहे..
बदनापूर तहसीलला जानेवारी पासून सतत पाठपुरावा करतोय पण काहीच कार्यवाही होत नाहीय.. आम्ही काय करावे कोणाकडे दाद मागावी??
कृपया मदत करावी,सल्ला दयावा.
लोकवर्गणीतून जल शिवार योजना राबवण्यात आली आहे . याबाबत कोणाकडे दादा मागण्याशिवाय आपण सावताच रस्ता तयार करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, माझ्या आजोबाच्या नावाने एकून १४ एकर पैकी ७ एकर इतकी जमीन पाझर तलावासाठी संपादन झाली आहे.ग्रामपंचायत आणि निवृत्ती बाबू पुदाले अशी संयुक्त पणे संपादन अहवालात नमूद आहे. तरी आमची पूर्ण जमीन वर्ग झाल्यामुळे आमची जमीन शिल्लक असून उर्वरित ७ एकर जमिनीचा ७/१२ तयार झाला नाही. संयुक्त जमीन मोजणी अहवालाची नक्कल मागणी केली असता ती भूमी अभिलेख आणि उपविभागीय अधिकारी यांच्याकडे उपलब्ध नाही असे सांगतात तरी यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणाकडे हि नक्कल मिळेल माहिती द्यावी.
जमीन ज्या भू संपादन अधिकारी कार्यालयाकडून संपादित झाली आहे , त्या कार्यालयाकडे मागणी करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर पाझर तलाव मध्ये गाळ पेरा करण्याचा हक्क कुणाला असतो मूळ मालकाला की लगतच्या/ गटातील शेतकर्‍याला?
नमस्कार सर...मी ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमातील वडीलोपार्जित जागा सूमारे 30ते35 वर्षे पासून वापरत आहे.नेहमी ग्रामपंचायतला कर भरणा चा आग्रह करूनही त्यानी गावपातळीवरील राजकारणामुळे कर घेतला नाही व जागा नावाने पण केली नाही.मी ती जागा शेती वापराच्या साहित्य व जनावर ठेवण्यासाठी मा.तहसिलदार साहेबांना शासनाने निर्धारीत रक्कम भरून जागा मिळण्यासाठी निवेदन सुद्धा दिले पण 2002च्या शासन निर्णयानूसार जागा देता येत नाही म्हणून मला नकार दिला तरी मी काय करू की जेनेकरून मला ती जागा मिळेल.2001पासून मी ती जागा वापरतो याचा स्टम्प पेपर पुरावा सुद्धा आहे.. व मी त्या जागेवर कच्चा स्वरुपात बांधकाम पण केलय व आता गावपातळीवरील राजकारणी विरोधक ग्रामपंचायतीच्या साहाय्याने अतिक्रमण हटाओ च्या नोटीस देऊन धमकावत आहे तरी मी काय करू साहेब मार्ग सांगावा ही विनंती...
अतिक्रमित जागा देता येत नाही असे तहसीलदार यांनी आपणास कळवले आहे . त्यामुळे आपणास ती जागा मिळणार नाही . आपण ती जागा खाली करणे योग्य

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर शेती साठी नदी मध्ये विहीर खोदण्यासाठी नियम,gr, मार्गदर्शक सूचना आहेत का?

Question by हेमंत
02-04-2019
He69mant@gmail.com

नमस्कार साहेब,
जर 'अ ' हा व्यक्ती शेतकरी नाही परंतु 'अ ' या व्यक्तीचे वडीलांच्या नावे थोडी शेतजमिन आहे आणि ते दुसरया ईसमांकरवी शेती करतात. तर ' अ ' हा व्यक्ती स्वतःच्या नावे शेतजमिन खरेदी करू शकतो का ?
वडिलांकडे असलेली जमीन जर त्यांची वडिलोपार्जित जमीन असेल तर , अ व्यक्तीचा त्या जमिनीत जन्मताच हक्क / मालकी निर्माण होते . त्यामुळे तो व्यक्ती शेतकरी आहे . जमीन खरेदी करू शकेल
मात्र जर वडिलांची जमीन स्वकष्टार्जित असेल तर , अ या व्यक्तीचा त्या जमीनीत जन्मताच अधिकार निर्माण होत नाही . त्यामुळे ती व्यक्ती शेतकरी होऊ शकत नाही . सबब त्यास जमीनखरेदी करता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

साहेब,आमच्या वडिलांना कुळकायद्याने जमीन मिळाली आहे.वडिलांच्या नंतर आम्हा भावंडांची नावे लागली आहेत. पण सादर जमिनीची अजून विक्री करून मिळालेली नाही . सादर कुळकायद्याची जमीन विक्री करून मिळण्यासाठी आम्हाला काय करावे लागेल?
कृपया या बाबतीत आम्हाला योग्य मार्गदर्शन करावे ही आपणास आमची विनंती आहे
आभार
आपले संबंधित तहसीलदार / शेत जमीन न्यायाधिकरण यांचेकडे ३२ ग किंमत निश्चित करून मिळण्यासाठी अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.34 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3