जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by सागर
21-07-2018
sagar06731@gmail.com

नमस्कार साहेब!
मौजे लाखलगाव ,ता.जी.नाशिक माझ्या चुलत भावाच्या 5 एकर शेतीत ७/१२ इतर हक्कात सौरक्षित कुल म्हणून माझ्या आजोबा चे नाव आहे.आजोबा १९५०रोजी मयत झाले व सदर जमीन चुलत भावाने 1972 साली श्रीधर बर्वे नावाच्या व्यक्ती कडून खरेदी केली आहे. माझे वडील १९९४ ला मयत झाले.माझ्या कडे वडील व आजोबा चे मृत्यपत्र आहेत.तरीही आज रोजी वारस म्हणून माझे व माझ्या भावाचे नावे इतर हक्कात लागतील का?मार्गदर्शन करावे.ध्यन्यवाद!

आजोबा १९५० ला मयत झाले . आजोबा मयत झाल्यावर , वारस म्हणून , आपले वडील , चुलते यांची नावे ७/१२ सादरी लागली का ? आजोबांचंद वारसांची नावे न लागल्याने , चुलत भावाने ७२ साली ती जमीन खरेदी केली . आता या गोष्टीला ४६ वर्षे झाली आहे . एवढा प्रदीर्घ विलंब माफ होईल का ?
होणार नाही .
खरेदी खात रद्द करणेसाठी आपण दिवाणी न्यायालयात दावा दाखल करू शकता का ?हि श्यक्यता पडताळून पहा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by सागर
21-07-2018
sagar06731@gmail.com

प्रश्न - गट नं.238 ही जमीन नवीन अविभाज्य शर्तीची असून 'सक्षम अधिकाराच्या परवानगी शिवाय हस्तांतरणस बंदी' हा शेरा इत्तर हक्कात आहे.पूर्वी ही जमीन पुंजा नावाचं व्यक्तीची होती.पुंजा हा 1952 साली मयत झाला व त्याच्या दोन वारस मुलाचे नाव मोगल पुंजा आणि दादा पुंजा यांचे नाव 7 / 12 दिसू लागले.दादा पुंजा हा 1972 साली मयत होऊन त्याच्या 3 मुले ,2 मुली व पत्नी चे नाव वारस म्हणून लागले.2000 साली मोगल हा मयत होऊन त्याच्या 2 मुले व 2 मुली व पत्नी चे नाव वारस म्हणून लागले.आज मितील ह्या दोन्ही परिवारात कटुता असून त्याची वाटणी झालेली नाही व ही सर्व जमीन सामायिक क्षेत्र म्हणून 9 जणांचे नाव 7 / 12 ला आहे.माझा स्वतःचा गट 237 हा गट या 238 गट शेजारी असून मी हा गट विकत घेऊ इच्छितो व आज ती सर्व जमीन माझाकडे कासण्यासाठी असून कब्जा आमचाच आहे तर...
1.सामाईक वारसा पैकी दादा पुंजा चे 6 वारसा मला त्याचा 1/2 (अर्धा ) हिस्सा विकू इच्छिता तर मी ती जमीन खरेदी करू शकतो का?.
2.जिल्हाधिकारी 1/2 (अर्धा ) जमीन विक्री ची परवानगी देतील का?.
3.मागील 20 वर्षी पासून सदर जमीन कसतोय पण पिकपहानी मालकाची आहे तर मी पीक पाहनि कशी लावू अथवा सिद्ध करू शकतो.
4.आणेवारी करून घेण्या साठी काय करावे लागेल?
दादा पुंजयाची जमीन आपण परवानगीने खरेदी करी शकता ( तुकडे बंदी कायदा अधीन ) .
जिल्हाधिकारी परवानगी देतील
आपण पीक पाहणी लावली तर याचा अर्थ असा होतो कि मूळ मालक जमीन कसत नाही . त्यामुळे जमीन सरकार जमा होऊ शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

रयत इनाम जमीन असून ती जमीन बिनशेती करणे बाबत तरतूद अथवा नियम या बाबत मार्गदर्शन होणेस विनंती आहे
इनाम जमीन आपणास पुनर्प्रदान करण्यात आली असेल . पुनर्प्रदान आदेशात जमिनीचा वापर फक्त शेती करण्यासाठीच करणेच आहे अशी शर्थ आहे का ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by सागर
19-07-2018
sagar06731@gmail.com

प्रश्न - विश्राम , दामू ,नामदेव ,तुकाराम असे चार भावाचे एकत्र कुटुंब होते व विश्राम हा कर्ता पुरुष होता.विश्राम ने 1948 साली गट न.241/ब जो 4 एकर होता त्या पैकी 2 एकर जमीन खरेदी घेतली शंभू नावाच्या व्यक्तीकडून.व उरलेली 2 एकर चौघे भाऊच कसत.1948 साली चारही भाऊ विभक्त झाले व ही 2 एकर (विश्राम ने खरेदी केलेलीं) नामदेव च्या वाट्यास अली.आत्ता शंभू ची 2 एकर जमीन आहे त्या वर अशी नोंद आहे की - ता.24 /12/1958 रोजी शंभू बर्वे यांच्या जमीनस विश्राम पाटील हे 1955 /56 पासून कुळ असल्याने इतर हक्कात स.सा. कुळ म्हणून दाखला घेतला. ह्या गटाचे 7/12 1966 पासून अगोदरचे मिळत नाही.1966 - 1977 पासून मात्र पिकपहानी ही संपुर्ण गटावर (4 एकर ) नामदेव ची आहे व इतर हक्कात स.सा. कुळ विश्राम कायम आहे .1977 साली शंभू ची 2 एकर जमीन शंभू च्या वारसांनी बापू नावाच्या व्यक्ती ला विकली इतर हक्क कायम ठेवून.1977 ते 1992 पर्यंत पिकपहानी ही बापु चिंच होती.1988 साली विश्राम मयत होऊन त्याच्या 8 वारसांची नावे बिंन कब्जी वारसदार म्हणून लागले स.सा. कुळ म्हणून. 1992 साली माझ्या मोठा काकांनी बापू कडन खरेदी केली इतर हक्क कायम ठेवुन.1992 ते 2015 पिकपहानी काकांची होती.2015 साली ही 2 एकर जमीन 20 - 20 गुंठे प्रत्येकी अशी माझे वडील व त्याचे तीन भाऊ यांनी म. ज.म.अ.कलम 85, तहसीलदार याच्या आदेशा नुसार वाटून घेतली.
तर...
1.जर मागील 30 वर्षी पासुन पिकपहानी व कब्जा आमचा च आहे तर स.सा. कुळ चे नावे कमी होतील का.
2.आम्ही मा.तहसीलदार याच्या कडे अर्ज दिला आहे तर आम्हाला त्यात काही अडचणी येतील का?
मार्गदर्शन करावे.धन्यवाद!

Question by balaji sawant
18-07-2018
balaji.sawant44@gmail.com

नमस्कार सर
माझी जमीन 2003 साली साठवण तलावासाठी संपादित करण्यात आली होती त्या वेळी कमी मोबदला मिळाला म्हणून शेतकर्यानी वाढीव दराने मोबदला मिळावा म्हणून2008 साली दावा दाखल केला आहे 2013 साली 150000प्रती एकरचा निर्णय शेतकऱ्याचा बाजूने दिला आहे व 2017 साली पाटबंधारे विभागाच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती त्यास न्यायालयाने स्थगिती दिली आहे तरी रक्कम शेतकर्याना देण्यात आली नाही त्या वर शेतकरी नवीन कायद्याचा आधार घेऊन बाजार भावाच्या 4पट रक्कमेची मागणी करू शकतो का
नवीन भू संपादन कायद्याच्या कलम २४ (२) नुसार ,
जर भू संपादन निवड १ जेनेवारी २००९ पूर्वी झाला असेल मात्र जमिनीचा ताबा घेतला नसेल
अथवा नुकसान भरपाईची रक्कम , बहुतांशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नसेल तर , असा निवडा व्यपगत होतो
आपले प्रकरणात निवडा या जानेवारी २००९ पूर्वी जाहीर झाला आहे . मात्र नुकसान भरपाईची रक्कम आपण सवीकारण्यास नकार दिला आहे अथवा Under Protest स्वीकारली आले . त्यामुळे आपण २४ (२) च्या तरतुदीस पात्र होत नाही
न्यायालय जे वाढीव नुकसान भरपाईचा दार देईल , त्या आधारे आपणस जुन्या कायद्याच्या तरतुदी प्रमाणे मोबदला मिळेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,आम्ही लेआऊट प्लॅन मंजूर करून घेऊन बिनशेती मोजणी २०१० मध्ये ७/१२ वेगळे करून घेतले.परंतु त्यानुसार आम्ही पक्के बांधकाम कंपाऊंड केले नाही त्याचा गैरफायदा घेऊन शेजारील व्यक्तीने त्याच्या जागेत मोजणी न करता संरक्षित भिंत बांधली.व ओपन व अमिनिटी spaceमध्ये अतिक्रमण केले. आम्ही ७/१२
नुसार आमच्या क्षेत्रात बांधकाम करणेकामी सदर प्लॅन मंजूर करून सदर क्षेत्र बिनशेती करून घेतले त्यावेळी शेजारील व्यक्तीने अतिक्रमण केल्याचे दिसून आले.त्यामुळे आम्ही आमच्या क्षेत्रापुरते त्याचे अतिक्रमण काढून बांधकाम केले.त्यावेळी सदर व्यक्तीने बिनशेती आदेश रद्द करणेकामी sdo . यांचेकडे अर्ज दिला व आम्ही अतिक्रमण केले असे नमूद केले.परंतु त्याचा अर्ज फेटाळण्यात आला.आमचे बांधकाम पूर्ण झाले आहे.त्याने त्याचे जागेची आता हद्दकायम मोजणीकामी अर्ज दिलेनंतर आम्ही हरकत घेतली.त्याबाबत सुनावणी होऊन मा.उपअधीक्षक यांनी आमच्याविरुद्ध निकाल देऊन निकालपत्रात आम्ही पूर्वी केलेला मंजूर लेआऊट व बिनशेती मोजणी सदोष असल्याचे म्हटले आहे.व त्याची मोजणी योग्य असल्याचे म्हटले आहे.आम्ही निमताना मोजणीसाठी अर्ज देण्यासाठी गेलो त्यावेळी त्यांनी सांगितले. की त्याचा काहीही फायदा होणार नाही.तुम्ही तडजोड करा.वास्तविक आमच्या क्षेत्रात पूर्वी मोजणी न करता अतिक्रमण केले आहे.मा.जिल्हा अधीक्षक साहेब यांना भेटलो असता त्यांनी अपिलापुर्वी निमताना मोजणी करण्याचे सुचविले.त्यामुळे नक्की काय करावे?शेजारील व्यक्ती राजकीय असल्याने आम्ही रीतसर परवानगी घेऊन बांधकाम केले आहे.त्यास धोका निर्माण होऊ शकतो का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती...
फेर मोजणी होणे गैर नाही
आपण अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

साहेब नमस्कार
आमची उपविभागीय अधिकारी यांच्या कोर्टात आमची मुत्यूपत्राची केस चालू होती, हि केस चालू असताना आम्ही कोर्टात सुद्धा दावा दाखल केला आहे ,त्याची तारीख चालू आहे परंतु उपविभागीय अधिकारी यांच्या कोर्टातील केस १४ डिसेंबर २०१७ ला निकालावर ला पडली होती ,निकाल लागून सात महिने झाले परंतु आम्हाला अजून निकाल पोस्टाने आला नाही ,आम्ही निकाल मिळण्यासाठी अर्ज २६.०७.२०१८ ला केला आहे,परंतु निकाल मिळण्यास विलंब झाला आहे ,आणि आम्ही उपविभागीय कार्यालयात चौकशी केली असता आमचा अपील अर्ज फेटाळला आहे,असे दिसून आले ,तरी निकाल मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही काय करावी लागेल ,कृपया मार्गदर्शन करावे हि आपणास विनंती
निकालाची प्रत मिळाल्यावर ९० दिवसात अपील करता येऊ शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by shiva
16-07-2018
marathitech2@gmail.com

जमीन खरेदी केल्या नंतर नाव नोंदणी साठी नोटीस (तलाठी)बजावली कोणाचीच हरकत नसेल तर ७/१२ वर नवीन मालकाचे नाव नोंदणी साठी किती दिवस लागतील जर मंडल अधिकारी टाळा टाळ करीत असेल तर तक्रारार कोणाकडे करावी
१५ दिवस नोटीस अवधी आहे . हरकत नसेल तर , १५ दिवसानंतर नोंद मंजूर करणे , मंडळ अधिकारी यांना बंधन कारक आहे
तहसीलदार यांचेकडे आपण तक्रार करू शकतात

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Aaderniy sir,
Aamhi eka jaminimadhe sanrakshit kul aahot, pan tyach barobar etar adhikarat eka trust Che nav ahe jaminichi kharedi karatana dharmaday aayukt yanchi parvanagi ghene aavashak ahe ka
आमची रत्नागिरी जिल्ह्यात गावी वडिलोपार्जित जमीन आहे. आजमितीस ७/१२ उताऱ्यावर एकूण २० सह-हिस्सेदारांची नावे आहेत. गेले वर्षभर आम्ही सामंजस्यांने जमीन वाटप करण्याचा प्रयत्न करत आहोत. या क्षणाला २० पैकी १९ सह-हिस्सेदार जमीन वाटपाला तयार आहेत. केवळ १ सह-हिस्सेदार वेगवेगळ्या सबबी सांगून वाटप टाळत आहे.
माझा प्रश्न असा आहे कि या एका सह-हिस्सेदाराला बाजूला ठेवून आम्ही उरलेले १९ सह-हिस्सेदार आमच्या जमिनीचे वाटप करू शकतो का? आणि तसे शक्य असल्यास त्याकरिता काय प्रक्रिया आहे?
आपले मार्गदर्शन आमच्यासाठी बहुमोल आहे. कृपया योग्य मार्ग सुचवावा. धन्यवाद.
सर्वांची संमती असेल तरच वाटप होऊ शकते
आपण दिवाणी न्यायायालयात हिस्सा निश्चित करून , निश्चित केलेल्या क्षत्राप्रमाणे जमिनीचा ताबा मिळावा म्हणून दावा दाखल करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

शेती ploting करू विकणाऱ्या ने विकली व घेणारे जो जो व्यक्ती आहे.त्यांनी 20 वर्ष होऊन गेले पन त्यांनी त्यांच्या नावे फेर घेतला नाही.व त्यांच्या नवे फेर नसून त्यांनी दुसऱ्याला विकली. व त्या ने ही तिसऱ्या ला विकली व या मधे घेणार आम्ही आहे.आम्ही ज्याच्या कड्ने घेतली त्यांच्या कडे ploting करून विकणाऱ्या चा खरेदी खंत नाही. तरीही माननीय सर्व मान्य वरानी या सर्व प्रकरणात काय करता येईल.आपणास विनंती आहे सहकार्य करावे.तरी मला काही विचारायचे असेल तर.plz call mi 8956893934
आपण ज्याच्याकडून खरेदी घेतली त्याच्याकडे खरेदी खात नाही , मग तो मालक कसा ?
आपण खरेदी पूर्वी जमिनीचे सर्व अभिलेख , परवानग्या पाहणे आवश्यक होते
ज्याने प्लॉटटींग केले आहे तो जर , खरेदी करून देत असेल तर पहा . नोंदणीकृत दस्त करू दिल्यास , आपले नाव मिळकतीस लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सातबारा वरील पोट खराब कमी करणे बाबत माहिती द्यावी .आमचे गटामध्ये एकूण ९० आर पोट खराब दाखविले आहे परंतु गट मधून नाला किंवा रास्ता गेलेला नाही .अ वर्ग पोट खराब आहे
नमस्कार सर ,माझ्या चूलतया च्या नावे ६ आर जागा एकुमॅ अशी आहे एकट्याच नाव असल्याने
त्याने परस्पर ४आर व २आर अशी दोन जणांना खरेदी खताने जागा विकली पण ७/१२ सदरी त्यांची नोंद झाली नाही बऱ्याच वर्षांनंतर आम्ही
एकुमॅ च्या फेरफारनुसार आमची ५ जणांची वारसनोंद केली तर आता चुलतयाकडून खरेदी केलेल्यांची नोंद ७/१२सदरी होईल का ?कृपया मार्गदर्शन करावे
आपल्या चुलत्याने जमीन ज्यांना विकली , त्यांची नोंद तलाठी यांनी मंजुरीसाठी नोंद केल्यावर , आपण हरकत घ्या
मात्र आपण , ते खरेदी खत रद्द करण्यासाठी , दिवाणी न्यायायालयात दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

श्री. किरण पानबुडेसो ,
नमस्कार
१. ग्रामपंचायत विरोधात सिटी सेर्वेचा निकाल आमच्या बाजूने होऊन सदर गावठाण मधील आमच्या जागेत पिपर्णी चे झाड आहे , ते तोडण्यासाठी आम्ही फॉरेस्ट विभागाकडे चौकशी केली असता ते म्हणाले सदर झाडाची नोंद ८ अ उताऱ्याला लावून मग परवानगी मागा. परंतु ग्रामसेवक आमची नोंदच करत नाहीत. ते म्हणतात माझ्या हातात नाही.
२. सदर जागेची नोंद आमची सिटी सेर्वेला झाली त्या नंतर आम्ही ती जागा क्षीरसागर याना विकली त्यांनी सदर जागेची कर आकारणी साठी नोंद व्हावी म्हणून दिनांक १५/१/२०१८ रोजी अर्ज दिला त्या सोबत त्यांनी त्यांच्या नावाचे पॉपर्टी कार्ड व रजिस्टर खरेदी पात्राची नक्कल दिली होती.परंतु ग्रामसेवक म्हणतात मी नोंद करू शकत नाही माझ्या हातात काही नाही.त्यासाठी ग्रामपंचायत बॉडी परवानगी देत नाही. क्षीरसागर यांनी तसे आम्हाला लेखी द्या असे सांगितले परंतु त्यांनी लेखी न देता २८ फेब्रुवारी २०१८ चा ठराव झाला कि सदरची जागा सार्वजनिक असल्यामुळे सरपंच ग्रामपंचायत यांनी योग्य ती कागदपत्रे जमा करून वकिलाची नेमणूक करून कोर्टात दाद मागावी त्याची प्रत क्षीसागर याना दिली आहे.
३. वरील प्रमाणे पहिला नोव्हेंबर मध्ये असाच ठराव त्यांनी घेतला होता ज्यावेळी आमचा निकाल सिटी सर्वे ला झाला होता त्यावेळी परंतु आज पर्यंत त्यांनी काही कोटाची कार्यवाही केली नाही.
तसेच आम्ही बी.डी. ओ. व सी. इ. ओ .यांच्याकडे हि अर्ज दिला आहे परंतु काही कार्यवाही अजून त्यांनी केली नाही.
आमहाला झाडाची नोंद होऊन झाड तोडायचे आहे त्यासाठी दुसरा मार्ग आहे का ? आम्ही काय करावे ?
ग्रामपंचायत ऍक्ट नुसार दुसरा मार्ग असल्यास सुचवावा ?
कर आकारणी साठी ग्रामपंचायत ला नोंद होण्यासाठी सुद्धा मार्ग सुचवावा हि नम्र विनंती.
मिळकत पत्रिकेला , क्षीरसागर यांचे नावाची नोंद झाली आहे का ?
जर ग्रामसेवक , ग्राम पंचायत आकारणी पॅट्रिक्स नाव लावत नसेल तर , गट विकास अधिकारी यांचे कडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by VIKRAM
28-04-2018
vikram.vy11135@gmail.com

सर नमस्कार आपण मार्गदर्शन केलाय त्या
मुळे मी योग दिशेने जात आहे. माझ्या २ बहिणींनी कोर्टातच हक्कसोड करून दिले आहे त्यावर तोडजोड़ हुकूमनामा झाला आहे .मात्र केवळ कोर्टात तडजोड नामाझाल तो दस्त नोंदणीकृत करायचे माहित नसल्यामुले राहून गेले त्या मुले बहिणींनी ती जमीन माझा हक्कात सोडली होती ती दुसऱ्याला विकली आहे त्याची ७/१२ वर नोंद होण्यापुरवी मी मुद्रांक लेट फी भरून ताशिलदार व मंडळ अधिकारी यांच्या कडे तास अर्ज करून माझे म्हणेने मांडले त्यावर त्यांनी ७/१२ सादरी त्या हुकूम नामावरून माझे नावं लावले पण दस्त ज्या बहिणींनी दुसऱ्याला करून दिला होता त्यानी प्रांत अधिकारी यांच्याकडे अपील करून माझे नांव कमी करण्याचे आदेश मिळवला आता ७/१२ सादरी त्यांचे नांव लागले आहे.तर मला काळात नाही कि मुद्रांक शुल्क (दंड) भरून ,ताशिलदार ,मंडळ अधिकारी (आदेश ) असून सुद्धा प्रांत अधिकारी माझा विरुद्ध निर्णय कसा दिला.हुकूमनामा दस्त नोंदणी कृत करणे म्हणजे काय ? तो दस्त आता सुद्धा मी नोंदणी कृत करू शकतो काय ? त्याची प्रोसिजर कशी आहे,व तयामुळे च असे घडले का? कृपया मार्ग सांगा.मी बहिणींनी माझा विरुद्ध बनावट दस्त बनवला हाये ,व त्याचे पुरेसे रक्कम बहिणीला मिळाली सुदा नाही तरी केवळ तो दस्त नोदकरून मालकी हक्क सांगत आहे ,निशाणी ५ चा दावा त्याविरुद्ध दिवाणी दावा दाखल केला आहे.
आपण वेळीच हक्क सोड पत्र बहिणीनं कडून नोंदणीकृत करून घेतले असते तर हे वेळ आली नसती .
असोत बहिणींनी जमीन त्रयस्थ इसमास विकली आहे . तो दस्त रद्द करून मिळण्यासाठी , दिवाणी न्यायालयात अर्ज करा . त्रयस्थ इसमाने जमीन कझारेदी करताना , वर्तमान पत्रात नोटीस दिली होती का ? दिली नसल्यास आपली बाजू वरचढ आहे . आपण ते खरेदी खात रद्द करू शकता .
मात्र जर त्याने वर्तमान पत्रात नोटीस दिली असेल , तर आपणास जमीन मिळणार नाही मात्र , जमिनीची किंमत व्याजासह मिळेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

eक्लास जमिनीवरील आज रोजी असलेले घरांबाबत माहिती मिळावी
‌ नमस्कार सर आम्हला सरकारी जमीन पट्टा आधारित २.०० हे जमिन मिळाली आहे ति जमिन राष्ट्रीय महामार्ग ३६१ माझ्या नावे ०.८०आर जमिन संपादीत झाली आहे. त्या जामिनीचा मावेजा मला भेटु नाही म्हणून माझ्या विरूद्ध गट नंबर मधिल एकाने तक्रार केली आहे. की ति जमिन आमच्या वडिलाची आहे त्यामुळे त्या जामिनीचा मावेजा आम्हला भेटावा म्हणुन आर्ज केला आहे. त्यानंतर मा. उप जिल्हाआधिकारी साहेब म्हनाले की, ति जमिन पडीत आहे वहीती नाही म्हणून जामिनीचा मावेजा व जमिन शासनाास जमा करतो. त्या जामिनीची मि भूमि अभिलेख कार्यालया कडून मोजनि करून घेतली आहे माझ्या मोजनि च्या वेळी मा. तलाटी, वनरक्षक, ग्रामसेवक याच्या समक्ष मोजनि करून दिली आहे. त्यावेळी माझ्या विरोधकाचे सात/बारा वर देखील नव्हते. मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.
जमीनीचा मावेजा आपणास मिल्ने आवश्यक आहे . जस्मिन संपादन होताना , जर जमीन आपले नावावर असेल तर , आपणास compensation मिल्ने आवश्यक आहे .
जर जमीन पंडित होती तर , संपादन अधिसूचना निघण्यापूर्वीच , शासन जमा करणे आवश्यक होते .
मावेजा नाकारला असल्यास ( लेखी कळवले असल्यास ) , लवादाकडे , लवाद संदर्भ दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, तहसिलदार /जिल्‍हाधिकारी कार्यालयात कोणताही अर्ज सादर करताना 5 रु.कोर्ट फी स्‍टॅम्‍प लावणे आवश्‍यक आहे काय? असल्‍यास त्‍याबाबतचा शासन निर्णय/अधिनियम

Question by Avinash Rasam
24-04-2018
Avinashrasm522@gmail.com

सर,माझे आजोबांनी सन 1935 मध्ये जमीन वाटप दावा जावला होता.त्याचा निवाडा सन 1949 मध्ये लागुन प्रत्यक्ष ताबे देण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे सन 1950 मध्ये आला.त्यानंतर ताबे देणेची कार्यवाही सन 1954 मध्ये सुरु झाली.सर्व पक्षकारानी पैसे भरले. 75 टक्के लोकानी ताबे घेतले.12.50 टक्के लोकांनी वाटपास लेखी सहमती दिली.उर्वरीत 12.50 टक्के लोकानी वाटपास हरकत जिल्हाधिकारी यांचे कडे घेतली.त्याच्या हरकती केस चालवुन जिल्हाधिकारी यांनी फेटाळुन लावल्या.त्यावर त्यानी मा.लोकायुक्ता मुबई यांचे कडे सन 1958 मध्ये अपिल केले.हे अपिल त्यानी वकिला करवी चालवल्यानंतर लोकायुक्ता यानी हे अपिल1958मध्ये फेटाळत मा.जिल्हाधिकारी यानी केलेले वाटप कायम केले.यानतंर विराधकानी कुठेही अपील केलेले नाही.त्यांनतर ताबे घेतलेल्यानी आपली नावे 7 .12 सदरी लावुन घेतली.त्याच्या वहिवाटी सुरू झाल्या.असे असताना. काही पक्षकारानी पुन्हा वाटप मान्या नसले बाबत जिल्हाधिकारी यांचे कडे सन 1964मध्ये तक्रारी केल्या.मात्र या तक्रारीत मा.लोकायुक्त यांचे कडे झालेल्या अपिलाचा त्यांनी उल्लेख केलेला नाही.असे असताना 1964 मध्ये जिल्हाधिकारी विरोधी पक्षकाराच्या तक्रारी अर्जावर जिल्हाधिकारी करीता यांनी आम्हाला नोटीसी न करता फेर वाटपाचा शेरा केलायाची कल्पना माझे आजोबा यांना समजल्यावर त्यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज करत व मा. आयुक्त यांचे कडे चाललेल्या अपिलाची कल्पना दिलेवर जिल्हाध्किारी यांनी माझे आजोबाना तुम्हाला दिलेले ताबे अबाधित असुन फेर वाटप करणे झाल्यास किरकोळ फेर बदल केले जातील असे कळविले. त्यानतंरही आम्हाला रितसर ताबे दिले आहेत.काही ताबे दिवानी कोर्टाने उत्पनासह आम्हाला दिले आहेत.आम्ही आमच्या जमीणीत लागवडी सुधारणा केल्या आहेत. गेली चाळीस वर्षे आमच्या वहीवाटी विनाकटकट सुरू असतानाच चाळीस वर्षानी सन 1990 मध्ये तहसिलदार यांनी जिल्हाधिकारी याच्या सन 1964 च्या फेर वाटपाचा आधार घेत आम्ही घेतलेले ताबे रदद करणेच्या आम्हाला नोटीसी दिल्या.या वाटपात एकुण 50 पक्षकार असताना फक्ता 5 जणाना नोटीसी बजावत तहसिलदार यानी केस चालवली.व आम्हाला दिलेले ताबे रदद केले. यावर आम्ही प्रांताधिकारी यांचे कडे अपिल केले.त्यांनी अपिल मान्या करत प्रकरण फेर चौकशी व उचित निर्णयाकरिता तहसिलदार यांचे कडे पाठविले.यावर विरोधी पार्टीने जिल्हाधकिारी यांचेकडे अपिल केले.त्यानी अपिल फेटाळत जुने झालेले वाटप कायम केले.यावर विराधी पार्टीने हायकोर्टात मध्ये सन 1994 मध्ये रिट दाखल केली.हायकोर्ट यांनी जितहसिलदार याना फेर वाटप करता येईल का अशी विचारणा केली आहे.याच दरम्यान सन 2005 मध्ये दिवाणी न्यायालयाने मुळ दरखास्ता मुबंई हायकोर्ट रुलिग A.I.R.2001 bombay 303 .21.3.2001 अन्नासाहेब नगाणे वि.राजाराम नगाणे या अन्वये निकाली काढली आहे.या बाबत माझे प्रश्ना असे..55 वर्षापुर्वी दिलेले ताबे एवढया प्रदिर्घ कालावधीनंतर रदद करता येतात का. 2. आयुक्ता यानी कायम केलेले वाटप त्याची परवाणगी नसताना जिल्हाधिकारी अगर तहसिलदार याना रदद करता येते का. 3.वाटपात 50 पक्षकार असताना फक्ता 6 जणानी नोटीस देवून तहसिलदार यांनी चालविलेली केस रदद केलेले वाटप योग्या कि अयोग्या 4 लोकायुक्त याचे 1958 च्या निवाडयाची वैध्यता किती.
सेतू सूविधा केंद्रामधून ऑफलाईन निर्गमित केलेल्या सर्व प्रकारच्या नस्ती अभिलेख कक्षात अ ब क ड वर्गवारी प्रमाणे जमा करणेचे असल्याने सदर दाखल्यांच्या नस्तींचा जतन करावयाचा कालावधी,वर्गीकरण क्रमांक,,फेरीस्ा्त नमूना इत्यादी माहिती अधिकृत परिपत्रक/शासन निर्णयासह एकत्रित मिळणेस विनंती आहे.
कोकरे साहेब ,
असे Retention Schedule कार्यालय प्रमुखांनी तयार करावयाचे असून डायरेक्टर , पुराभिलेख संचानालया ची मान्यता घेण्याची आहे . आपले कार्यालयासाठी अशी सूची तयार करा .
Maharashtra Public Records Act २००५ - कृपया वाचा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझी गावी एकूण पावणे चार एकर जमीन होती .पण माझ्या वडील आणि काका यांनी मिळून त्यानीं त्यातील काही जमीन मुखतीयार पत्रावर विकून टाकली . आणि काही जमीन अजूनही शिल्लक आहे .माझे वडील आणि काका दोघेही आता जिवंत नाहीत . तर मला जमीन किती शिल्लक राहिली आहे ते सात बारा वर कसे समजेल .
सात बारा मी काढलं आहे परंतु मला त्यात काही समजत नाही .तर तुम्ही मला सांगा की मी माझे श्रेत्र कसं काढू .
आणि ह्या बाबतीत मी कोणच सल्ला घेऊ .
७/१२ वाचा आपणास , क्षेत्र किती आहे ते कळेल . ७/१२ चा डावी बाजू पहा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर,,, नवीन अविभाज्य शर्त, भोगवटदार वर्ग २ जमिनी चा बक्शिस पत्र करणेची परवानगी विषयी माहिती द्यावी़
आपणास जिल्हाधिकरी / आयुक्त यांची पूर्व परवानगी घ्यावी लागेल
जमीन शेती प्रयोजसाठी दिली असेल तर , विक्री किंमतीच्या ५० % व जमीन बिबशेती प्रयोजनासाठी दिली असेल तर विक्री किंमतीच्या ७५% रक्कम अनार्जित उत्पन्न म्हणून शासनाकडे जमा करावे लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या आजोबांनी त्यांच्या नावे असलेली जमीन ०.८१ आर जमीन मला स्वता च्या मरजीने २००रू च्या Bond वर मला वाटणीपत्रक करून दिले तर मी माझ्या नावावर शेती कशी करू शकतो. कृपया मला मार्गदर्शन करा.
आपण जे म्हणताय ते वाटप नसून , आजोबा आपणास बक्षीस म्हणून जमीन देत आहेत . मात्र सदर जमीन आजोबांची स्वकष्टार्जित आहे का ? असेल तरच ते आपल्याला बक्षीस पत्राने देऊ शकतील . मी,मात्र बक्षीस पत्र नोंदणीकृत असणे आवश्यक .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर एखादा कर्मचारी 7 ते 8 वर्षांपासून कार्यालयीन कामे खूपच हळूवारपणे करत आहे म्हणजे 1 पत्र टाईप करायला सांगितले तर 3 तास लावतो एवढ हळुवारपणे काम करतो मग सदर कर्मचारी यांच्यावर कामामध्ये वारंवार हलगर्जीपणा करीत आहे म्हणून त्यांना सेवेतून काढून टाकता येते का सर. कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
त्याला टपाल स्वीकारायला बसवा .
काम सुधारणेची संधी द्या . सुरवातीस करणे दाखवा नोटीस काढा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by शंकर
22-04-2018
shankarbkakade@gmail.com

महोदय श्री किरण पाणबुडे सर
१)आमच्या ताब्यात १९४६ पासून असलेली जमीन एक ७/१२ वर नाव असलेल्या व्यक्तीने विकली, विकत घेणार्यांचे नाव पण ७/१२ सादरी दाखल झाले ह्याबाबत कोणतीही नोटीस अली नाही ,
२)त्या इसमाने कधीच जमीन कसली नाही फेरफार मध्ये असा उल्लेख आहे कि ३२ग ने नावावर झाली, हा ३२ ग त्याच्या वडिलांनी केला होता आणि फेरफार वर खाडाखोड पण आहे दुसऱ्याचे नाव खोडून त्याच्या वडिलांनी स्वतःचे नाव लिहिले. आणि हा इसम कधी जमीन कसत नव्हता १९४६ पासून आमचाच ताबा आहे चतुर्सिमा असलेले जमीन मालक आमच्या बाजून साक्ष देण्यास तयार आहेत.
३) त्याने असेच २००७ साली काही जमीन विकली आणि आता परत उरलेली जमीन विकली आणि २ वेग-वेगळया बिल्डरांच्या नवी दोन्ही जमिनी झाल्या.
४) आमच्या कडे जमिनीचा ताबा कायदेशीर रित्या विकत घेतल्याचा पुरावा आहे व जमीन नावे झाल्याचा फेरफार सुद्धा आहे, पण त्याने कोणाच्या तरी मदतीने ७/१२ सादरी असलेले आमचे फेरफार गायब केले पण एक ७/१२ वर तो फेरफार दाखवतो आहे .
५) आमच्याकडे त्याच्या वडिलांनी स्टॅम्प पेपर वर लिहून दिले होते कि हि जमीन तुम्हीच कसत आहेत, हा पुरावा आहे हक्काच्या पत्रकावर ते सर्वे नंबर पण आहेत.
6) सामनेवाले ह्यांनी विकलेली जमीन लगेच बिनशेती पण करून घेतली आहे तरी आम्हाला जमीन परत मिळणेसाठी काय करावे लगेच कोर्टात केस दाखल करणार आहोत
शक्य असेल तर मला आपणास पेपर दाखवावे असे वाटते , आपण आम्हाला कायदेशीर सल्ला द्यावा ,,हि जमीन माझ्या पंजोबांपासून आम्हीच कसतो खूप वाईट वाटले आहे सगळ्या घरच्यांना, आपण मार्गदर्शन करावे अशी आपणास नम्र विनंती,,.
जमीन १९४६ पासून तुमचे ताब्यात होती . त्याचवेळी अथवा नंतर, ती व्यक्ती कुल नसून आपण कुल आहेत व आपला कुल हक्क जाहीर करून मिल्ने बाबत मामलतदार यांचेकडे दावा दाखल करणे आवश्यक होते .
त्याचे वडिलांचे नावावर ३२ ग किंमत निश्चित झाल्यावर , आपण त्या विरुद्ध अपील हि दाखल करू शकला असता .
तुमचे नाव ७/१२ वरून कमी झाल्यावर , संबंधित फेरफार आपण आव्हानित करणे आवश्यक होते .
त्याने स्टॅम्प पेपर वर लिहून दिले कि ताबा तुमचा आहे मात्र त्यास काही उद्धार नाही . ३२ ग किंमत निश्चित होण्यापूर्वी अथवा त्या यानंतर आपण अपील दाखल करणे आवश्यक होते .
तो इसम कुल नाही हे जाहीर करून मिळण्यासाठी आपण दावा केला असता , तर त्या शपथ पत्राचा काही उपयोग झाला असता .
सध्या आपण , दिवाणी न्यायालयात , adverse possession ने मालक म्हणून जाहीर करून मिल्ने साठी दावा दाखल करणे संयुक्तिक . मी,यात्रा आपण म्हणता जमीन दोन बिल्डरला विकली आहे व त्यांचे नावे झाली आहे . मग जमीन तुमच्या ताब्यात कशी आहे ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.34 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3400
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3