जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

नमस्कार सर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यात नवीन घर बांधकाम करताना राज्यमार्ग पासून कमीत कमी किती अंतर सोडावे लागेल.. नवीन घर बांधकाम व राज्यमार्ग, राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, गाव रस्ता, यामधील सोडावे लागणारे अंतर व नियम याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.. धन्यवाद..

Question by VIKRAM
29-01-2018
vikram.vy11135@gmail.com

नमस्कार सर , कोर्टात जर हक्कसोड पत्र लहून दिले असेल व तास हुकूमनामा सुद्धा झाला असेल तर ते हक्कसोड पत्र नोंदणीकृत करावे लागते का ? व लागत असेल तर ते नोंदणी कृत कर्णयसाठी काही कालावधी उशीर झाला असेल १२ वर्ष नंतर तो नोंदणीकृत करता येईल का ?कृपया मार्गदर्शन करा .धन्यवाद
आदिवासी ते आदिवासी जमीन विक्रीचा व्यवहार विना परवानगीने झाल्यास तो नियमित करता येईल का?
कोणत्या नियमानुसार
परवानगी घेणे आवश्यक होते . नियमाकूळ करता येणार नाही
मूळ मालकास जमीन पुनर्स्थापित करावी लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय महोदय,

प्रथमतः आपण करत असलेल्या कार्य बद्दल आपले नम्र आभार!!

गावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित केलेली जमीनत जर काही त्रुटी राहून आणि चुकून वापर झाला नसेल तर वहिवाटदार/ जमीन मालकाला ती मिळू शकते का?

गावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित जमिनी विषयी काही ठळक बाबी:

१) सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि कुळ कायद्या अंतर्गत मिळालेली आहे (सन १९४५) व नंतर ती गावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित करण्यात आली (सन १९६६).

२) नंतर सदर प्रश्नाधीन जमिनीचे खुश खरेदी खत हि करण्यात आले आहे. (सन १९७४)

३) सदर प्रश्नाधीन जमीन गावठाण विस्तार योजनेत संपादन न करण्यासाठी जमीन मालक यांनी विरोध हि केला होता. (मात्र लेखी नाही)

४) सदर प्रश्नाधीन जमीन व इत्तर काही जमिनीही संपादित केल्या होत्या, व त्या जमिनी वर गावठाण विस्तार योजना प्रक्रिया हि सन १९८० ते ९० पर्येन्त चालू होती. एकूण ३३ प्लॉट हे नवीन गावठाण विस्तार योजनेत अंतिम मंजूर होऊन, त्यावर ३३ सदस्य यांना प्रत्यक्ष प्लॉट वाटप करण्यात आले.

५) मात्र वास्तविक सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि गावठाण विस्तार योजनेत वापरण्यात आली नाही, मात्र त्या जमिनीचे दोन वेगळे ७/१२ तयार करून एक ७/१२ - (२.५ गुंठे) हा जमीन मालकाच्या नवे ठेवून त्यांचे क्षेत्र विभाजन करण्यात आले. व दुसरा ७/१२ - (२०.५० गुंठे) हा ३३ सदस्यां पैकी ७ ज्या व्यक्तींना प्लॉट द्याचे होते त्यांचे नाव दाखल करण्यात आले आहे (मात्र प्रत्येक्षात त्यांचे प्लॉट/घरे त्या जागेवर नाहीत).

७) दुसरा ७/१२ - (२०.५० गुंठे) वर नवीन अविभाज्य शर्त असा हि उल्लेख आहे.

६) आजच्या वास्तविक परिस्थिनुसार सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि मोकळी आहे, व प्रत्येक्षात त्या जमिनीचा वापर झाला नसून कागदोपत्री (संपादन व ७/१२) यावर नोंद आहे. महत्वाचे म्हणजे गावठाण विस्तार योजनेत अंतिम मंजूर झालेले सर्व ३३ प्लॉट हे सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे) जमीन सोडून विकसित केले आहेत व प्लॉट वाटप झालेले आहे.

८) आजच्या वास्तविक परिस्थिनुसार सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे) हि जमीन मालक यांचे वारस यांचे ताब्यात असून वहिवाटीने कसत आहेत.

जमीन मालक (वारस) यांची नावे हि दुसरा ७/१२ - (२०.५० गुंठे) जमिनी वर लावण्या करिता व गावठाण विस्तार योजनेतील सदस्यांची नावे कमी कारण्या करिता (ज्यांना प्रत्येक्षात त्या जागेवर प्लॉट मिळाले नाही ते) मोलाचे व योग्य मार्गदर्शन मिळावे हि नम्र विनंती करत आहे.
सर
मी १९९९ सारी ४ एकर १२ आर जमीनचे खरेदीखत केले.
पण शेतकरी असल्याचे दाखला नसल्याने,२००५ पर्यत फेरनोंद झाली नाही.
२००५ मध्ये शेतकरी असल्याचे दाखला दाखल केला, तरी सुद्धा आजगायत नोंद झाली नाही.
दरम्यान सदर जमीन तील १ एकर जमीन मुळ मालकाने खरेदीखताने अन्य व्यक्तीस विकली आहे.
आता माझ्या जमीनचे खरेदीखत नोंद कशी करावी.
आपण अगोदर खरेदी केली आहे . त्यामुळे खरेदी केलेल्या पुर्न क्षेत्रास आपले नाव लागणे आवश्यक आहे .खरेदी खात रद्द करून घ्या ( दिवाणी न्यायायालयाकडून)

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Vasant
28-01-2018
kodag.vasant@rediffmail.com

नमस्ते सर,
१) तलावासाठी आमची जमीन ९ वर्षया पूर्वी संपादित झाली आहे. त्यानुसार तलावाचे काम अंतिम टप्पात आहे. त्याचा निवाडा झाला नसून, भरपाई आमचे वडिलांना मिळाली नाही. आता नवीन भू सांपादन-2013 कायदयाने वाटा घाटेने भरपाई मिल्नेसाठी वडिलांची संमती पत्र घेतली आहे.त्या दरम्यान
२) एवढे सर्व झाले असताना संपादित वडिलांचे ७/१२ वरती भू संपादन मंडळाचे नाव, व वारसाची नावे नसलायमुळे त्याचे कडून गावातील मंडळींनी जमीन दोन वर्षपूर्वी पक्क्या खरेदीने घेतली व फेरफार मंजूर केला आहे.
३) तरी वारसांना लढा देता येईल, काय करावे.
३) वडिलांचे हयातीत वारसा पत्रसाठी काय करावे.
कृपया लवकर मार्गदर्शन मीलावे हि विनंती.
प्रश्न समजून येत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by VIKRAM
27-01-2018
vikram.vy11135@gmail.com

नमस्कार सर, तुम्ही माझा प्रश्नयाचे योग उत्तर दिले त्या मुले मला योग दिशा मिळत आहे. माझे व बहिणीचे हक्क सोड पात्र हे कोर्टात झाले आहे .ते नोंदणी कृत आहहे कि नाही हे कसे ठरवायचे ,कारण मी मुद्रांक आधी नियम ३३ अन्व्ये मुद्रांकित करण्यासाठी जिलाअधिकारी यांच्याकडे गेल्यावर त्यांनी दंडात्मक रक्कम मला भरावयास सांगितली होती व तिमी भरली होती त्यांनी त्या तडजोड हुकूमनायमेवर आपला स्ट्याम्प देखील मारून दिला आहे .म्हणजे तो हुकूमनामा मुद्रांकित झाला का ?कि अजून काही प्रोसिजर असते .तडजोड नामा १७/०६/२००६ साली झाला आहे .त्यावर लेटफी भरली आहे.त्यानंतरच मी तलाठी यांच्याकडे ७/१२ नोंदी साठी तो दिला होता .त्यानंतर ७/१२ सादरी नोंद हि झाली .पूण त्या आधी ती जमीन बहिणीने विकली व तिचा दस्तही झाला . आपले नवा व फार्फार प्रांत अधिकारी यांनी रद्ध केला व जमीन जायना विकली त्यांचे ७/१२ सादरी नावं लावण्याचा हुकूम दिला.आता फुडें मी दिवाणी न्यालयात दावा देखील दखल केला आहे तो दस्त रद्ध करण्यासाठी .त्या साठी अजून काय कागत तो दावा मजबूत करण्यासाठी लागतील कृपया मार्गदर्शन कराल का ?

Question by rajesh kahare
27-01-2018
rajeshkahare@gmail.com

सर नमस्कार
खातेदाराने नोंदणीकृत मृत्यूपत्र करून ठेवले त्यानंतर खातेदार मरण पावला तलाठ्याने सदर मृत्यूपत्राचा फेरफार घेतला व त्यासंबधीत सर्व वारसांना फेरफाराची नोटीस दिली त्यावर आक्षेप दाखल झाला प्रकरण विवादग्रस्त मध्ये नोंदवून पुढील आदेश करीत तहसील कार्यालयात पाठविले .कार्यालयाने प्रकरण पंजीबध्द करून रीतसर सर्व वारसांना नोटीस दिली .प्रकार आदेशाकरिता असून कोणत्या कलम मध्ये आदेश पारित करावा? .नोंदणीकृत मृत्यूपत्राला सत्यता प्रमाणपत्र लागेल काय ? कि तलाठ्याने , ज्याचे नावे मृत्यूपत्र करून ठेवले आहे तो फेरफार नोंद कायम ठेवावा ?
मृत्य पत्रास कोणती हरकत आली .
हरकत असल्यास प्रोबेट करून आणण्यास सांगावे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय महोदय,

प्रथमतः आपण करत असलेल्या कार्य बद्दल आपले नम्र आभार!!

गावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित केलेली जमीन जर वापर झाला नसेल तर वहिवाटदार/ जमीन मालकाला ती मिळू शकते का?

गावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित जमिनी विषयी काही ठळक बाबी:

१) सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि कुळ कायद्या अंतर्गत मिळालेली आहे (१९४५) व नंतर ती गावठाण विस्तार योजने अंतर्गत संपादित करण्यात आली (१९६६).

२) नंतर सदर प्रश्नाधीन जमिनीचे खुश खरेदी खत हि करण्यात आले आहे. (१९७४)

३) सदर प्रश्नाधीन जमीन गावठाण विस्तार योजनेत संपादन न करण्यासाठी जमीन मालक यांनी विरोध हि केला होता. (मात्र लेखी नाही)

४) सदर प्रश्नाधीन जमीन व इत्तर काही जमिनीही संपादित केल्या होत्या, व त्या जमिनी वर गावठाण विस्तार योजना प्रक्रिया हि १९८० पर्येन्त चालू होती. एकूण ३३ प्लॉट हे नवीन गावठाण विस्तार योजनेत अंतिम मंजूर होऊन, त्यावर ३३ सदस्य यांना प्रत्यक्ष प्लॉट वाटप करण्यात आले.

५) मात्र वास्तविक सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि गावठाण विस्तार योजनेत वापरण्यात आली नाही, मात्र त्या जमिनीचे दोन वेगळे ७/१२ तयार करून एक ७/१२ - (२.५ गुंठे) हा जमीन मालकाच्या नवे ठेवून त्यांचे क्षेत्र विभाजन करण्यात आले. व दुसरा ७/१२ - (२०.५० गुंठे) हा ३३ सदस्यां पैकी ७ ज्या व्यक्तींना प्लॉट द्याचे होते त्यांचे नाव दाखल करण्यात आले आहे (मात्र प्रत्येक्षात त्यांचे प्लॉट/घरे त्या जागेवर नाहीत).

६) आजच्या वास्तविक परिस्थिनुसार सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे = २३ जिरायत + ५ पोट खराब) हि मोकळी आहे, व प्रत्येक्षात त्या जमिनीचा वापर झाला नसून कागदोपत्री (संपादन व ७/१२) यावर नोंद आहे. महत्वाचे म्हणजे गावठाण विस्तार योजनेत अंतिम मंजूर झालेले सर्व ३३ प्लॉट हे सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे) जमीन सोडून विकसित केले आहेत व प्लॉट वाटप झालेले आहे.

७) आजच्या वास्तविक परिस्थिनुसार सदर प्रश्नाधीन जमीन (२८ गुंठे) हि जमीन मालक यांचे वारस कसत आहेत.

कृपया आपल्याकडून जमीन मालक (वारस) यांना जमीन मिळवण्याच्या दृष्टीने मोलाचे योग्य मार्गदर्शन मिळेल हि नम्र विनंती करत आहे.
आम्ही कसत असलेला काही भाग सरकारी मोजणी मुळे बाजूचे गट नंबर मध्ये गेला असून आम्हाला आमचे गट नंबर मध्ये कसण्यास फारच कमी शेत जमीन शिल्लक राहिलेली आहे. कारण आमच्या गट नंबर मधील इतर सहधारकांनी सदर गट नंबर मध्ये अतिक्रमण केले आहे. ते त्यांचे नावे असलेल्या धारण क्षेत्रा पेक्षा जास्त जमिनीवर अनधिकृतपणे अतिक्रमण करून शेती करीत आहेत. अतिक्रमण केलेले लोक मोजणीकरिता सहमती देत नाहीत. आम्हाला आमची शेत जमीन परत मिळणेबाबतीत योग्य ते मार्गदर्शन करावे.
सह्धार्क संमती देत नसतील तर न्यायालयात जाने हाच एक पर्याय

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

१) एका शेत जमिनीत आमचा गेली ४० वर्ष ताबा होता व सरकारी मोजणी नंतर सदर शेत जमीन बाजूचे गट नंबर ची असलेचे समजले. त्या जमिनीचे ७/१२ वर आमचे नाव नाही त्यावर आम्ही हक्क सांगू शकतो का ?
२) आमचे मूळ गट नंबर मध्येही इतर सहधारक यांनी अतिक्रमण केले आहे आम्ही कसत असलेली जमीन हि शेजारील गट नंबर मध्ये जाते मग आम्ही आमचा हिस्सा इतर सहधारक यांचेकडून कसा मिळवू शकतो सदर लोक सरकारी मोजणी करीता सहमती देत नाही आहेत याबाबत मार्गदर्शन करावे .
३) सदर सहधारक लोक त्यांचे मालकी क्षेत्रा पेक्षा जादा जमीन ३०-४० वर्ष कसत असले तरी आम्ही गेली ४० वर्ष कसत असणारी जमीन मोजणी मुळे गेली आहे. सदर सहधारक यांचे नावे ते कसत असलेल्या क्षेत्रा पेक्षा खूपच कमी जमीन ७/१२ पत्रकी नावावर आहे पण ते लोक आमचा हिस्सा आम्हाला देत नाही आहेत. याबाबत मार्गदर्शन करावे .
माझा वडील मृत्यू आहेत वडिलांच्या दोन पत्नी त्याच्यातली पहिली मृत्यू झाली तिचा पंच्यात तिला ६ वारस आहेत त्याचा नंतर दुसरी पत्नी आहे तिला १ वारस आहे तर सादर ८० गुंठे मिळकतीत पहिल्या पत्नीच्या वारसांना व दुसऱ्या पत्नीच्या वारसांना किती हिंसा मिळेल
पहिल्या पत्नीचे ६ वारस व दुसर्या पत्नीचा १ वारस असे ७ हिस्से मिळकतीत होतील
दुसरी पत्नी हयात असली तरी तिला मिळकतीत हिस्सा नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. सर
माझे आजोबा यांचे नावे १६ एकर जमीन असून त्या जमिनीवर आम्ही २०१५ मध्ये ३ लाख रुपये एवढे बँकेचे कर्ज घेतले आहे.
सध्या आम्हांला माझ्या आजोबांच्या नावावरील सर्व जमीन माझे वडील आणि २ चुलते यांचे नावावर समान रुपात बक्षीस पत्राद्वारे घ्यायची आहे. त्यासाठी सर्वांची संमती आहे.
ज्यावेळेस आम्ही यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात गेलो होतो तेव्हा त्यांनी आम्हास बँकेचा बोजा कमी केल्याचे पत्र मागितले आहे. व असे सांगितले आहे की, बोजा कमी केला तरच बक्षीस पत्राची नोंदणी होईल अन्यथा नाही.
तरी माझी आपणांस अशी विनंती आहे की, जर जमिनीवर बोजा असेल तर नोंदणी करता येऊ शकते का ? याबाबत कोणते नियम आहेत.
आम्हांला जमिनीचे वाटप बक्षीस पत्रानेच करावयाचे आहे परंतु आम्ही सदर बोजा कमी ण करता वाटप करून घेऊ इच्छित आहोत, तरी ते कसे करता येईल.
याचे मार्गदर्शन करावे हि विनंती.
गावातील एका व्यक्तीने माझ्या आजोबाना १९६६ साली एका जमीन विक्रीचे संचकार पत्र केले होते पण त्याने खरेदी पत्र करून दिले नाही संचकार पत्र मध्ये kalavadhiche बंधन नाही .तसेच जमीन हि आजतागायत आमचेकडे ताब्यात आहे .पण मालक सादरी अजून त्याचे नाव ahe. जमिनीचा ताबा sanchkarptra नुसार आला आहे .तरी आम्ही या जमिनीच्या मालक सदरी येण्यासाठी Kay करावे.
संचकार पत्र काय आहे ? त्यातील नमूद तपशील पाहिल्याशिवाय मत नोंदवता येणार नाही . कृपया संचकारपत्रकाची प्रत मेल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार
ज्या तालुक्याला पुरवठा निरीक्षकांचे पद नसेल त्या ठिकाणी धान्य पास करणे व परमिट वर स्वाक्षरी कोण करतात
ज्यांचेकडे या कामाचा कार्यभार दिला असेल असा कर्मचारी

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,मला आपणास असे विचराययचे आहे कि माझे आजोबा व त्यांचे दोन भाऊ होते आमची गावातील जमीन होती त्याची वाटणी झाली नव्हती.माझे वडील लहान असताना माझी आजी वारली व माझे आजोबा दारूच्या आधीं गेलेत व त्यांचा ३ नंबरच भाऊ पेन वारला होता व ते दारूच्या आधीं झाले होते.त्या गोष्टीचा फायदा घेवोन .त्यांच्या २ नंबरच्या भावाने दारूच्या नशेत घरात त्याच्या कडून सिग्नेचर करून घेतले व वाटणी करू असे करत करत २ नंबरच भाऊ पेन वारला त्याच्या बायकोने मी तुमच्या मुलाला हिंसा देईल असे सांगून दिला नाही त्या बदल्यात बुलडाणा झिल्ला मदे जी ३ एकेरी जमीन होती त्यात १.५ जमीन फक्त दिली व साताऱ्यात १८ एकेरी मदे काहीच नाही २ घी बावची जमीन एकट्याने बळकावली आमी गरीब आहोत त्यामुळे त्याच्या विरुद्ध खटला टाकू शकले नाही आमचे आजोबा आणि वारले आज या गोष्टीला २५ वर्ष झाली आता आपण मला या बद्दल मार्ग सागा
वाटप फसवणूक करून घेतले , हि बाब आता २५ वर्षांनंतर आव्हानात करता येणार नाही . त्यात आपले आजोबा मयत झाले आहेत . त्यामुळे फसवणूक झाली आहे हे सिद्ध कसे करणार . कायद्यामध्ये Who is prior in time is prior in law .
सद्य स्थित , आपण वकिलाचे सल्ल्याने , देय हिस्स्याप्रमाणे , जमिनीचे सरस निरस वाटप करून , जमिनीचा ताबा मिल्ने बाबत The Specific Relief Act खाली दिवाणी दावा करता येईल का ? हे पहा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

शेत जमिनी/ बागायती जमीनी खालून आणि / किंवा बांधावरून जर ग्रामपंचायतिची पाण्याची लाईन गेली असेल तर जमीन मालकांवर कोणते निर्बंध असतात किंवा त्याचा काही मोबदला मिळतो का? आणि पुढे जर ती पाईप लाइन फुटली किंवा त्याचे काम निघाले तर त्यामुळे होणारे नुकसान भरपाई मिळते का?
जमिनीवरून pipe line नेण्यासाठी , जमीन संपादित करणे आवश्यक . आपण नुकसान भरपाई ग्राम पंचायतीकडे मागा . न दिल्यास आपण नुकसान भरपाई मिळणेसाठी दावा दाखल करू शकता .
आपण अश्या pipe line हानी न पोहचवणे हे आपले निर्बंध आहेत .
pipe line सुस्थित ठेवणे हे ग्राम पंचायतीचे काम आहे . pipe line फुटून , नुकसान झाल्यास , आपण Under law of Tort नुकसान भरपाई मिल्ने बाबत दावा दाखल करू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर तलाठी कार्यालयात रहिवासी दाखला तसेच इतर दाखले दिले जातात
त्यांना शासनाची शुल्क फि किती असते व दाखले दिलेल्याची नोंद असते का व कशी असते

Question by Chandu
16-01-2018
ChanduRameshShinde@gmail.com

किरण सर , जनपीठ माध्यमातून आपण लोकांच्या क्लिष्ट प्रश्नांना समर्पक उत्तरे देता , हे काम उल्लेखनीय आहे. धन्यवाद ह्या सेवेबद्दल.
माझे वडील१९९१ ला , वारल्यावर आमची वडिलोपार्जित शेत जमीन माझ्या आणि माझ्या आईच्या नावावर झाली. काही कारणांनी , माझ्या दोन विवाहित बहिणींची नावे टाकणे तेव्हा राहून गेले. आता माझी आणि आईची इच्छा आहे कि जमीन आम्हा सर्व चार जणांच्या (१. आई , २. मी , ३. बहीण-१, ४. बहीण-२ ) नावानी करायची. तर आम्ही तसे करू शकतो का ?
हो निश्चित . ज्या फेरफराने केवळ आई चे नाव लागले आहे त्यास आव्हानात , प्रांत अधिकारी यांचेकडे करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नामसकर
पूरग्रस्त गावाचे पुनर्वसन करण्या साठी जमीन संपादित करून उपविभागीय अधिकारी यांचे मंजुरीने लेआऊट करण्यात आले परंतु आज पावेतो पूरग्रस्त गावाचे न झाल्याने सदर मंजूर लेआऊट मधील प्लॉट वर गावकर्यांनी अतिक्रमण करून घरे बांधली त्यामुळे आज रोजी मंजूर लेआऊट प्रमाणे मोक्यावर प्लॉट दिसत नाही तेव्हा सर सदर लेआऊट ची शासकीय मोजणी करावी लागेल काय त्याचे पैसे कोण भरेल व सदर अतिक्रमण नियमित करता येईल काय
महोदय कृपया योग्य मार्गदर्शव करावे हि विनन्ती
ज्या लोकांना विस्थापित व्हावे लागले , अश्याच गावातील लोकांनी अतिक्रमण केले असेल व सध्याचे सिद्ध शीघ्र गणकानुसार , अतिक्रमित क्षेत्राचे पॆसे भरण्यास लोक तयार असतील तर , पात्रतेनुसार देय क्षेत्राचे मर्यादेत , अतिक्रमण नियमनकुल करता येईल .
मोजणी शासनाकडून करता येईल .
मात्र , विस्थापित लोकांशिवाय अतिक्रमण केले असल्यास , ते नियमनकुल करण्यासाठी शासनाचे आदेश आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार
आदरणीय सर ,माझा असा प्रशन आहेत माझे शेत तालुका नरखेड जिल्हा नागुपर या ठिकाणी आहेत मागील वर्षी मी माझ्या शेतावर विहीर खोदलेली आहेत ,माझ्या विहिरीला लागून दुसऱ्या च शेत आहेत ,आणि तो शेतकरी माझ्या विहिराला लागूनच 15 ते 20 फुटाच्या अंतरावर विहिरीचे खोदकाम लावत आहे ,त्या मुळे माज्या विहिरीला बोरिंग च्या हादरे मुळे नुकसान होण्याची भीती आहेत त्यांनी नियमांनी योग्य अंतर सोडून आपली विहीर करावी अशी आमची मागणी आहे परंतु तो काही ही आयकाला तयार नाहीत ,
सर दोन विहिरीच्या मध्ये किती मिटर अंतर असायला पाहिजे या बद्दल मला मार्गदर्शन दयावे ,आणि या वर उपाय सांगावा .
धन्यवाद
आपण The Maharashta Groundwater ( Regulation and Management ) Act 2009 व त्याखालील नियम वाचावे .
या कायद्या अंतर्गत आपले भाग जर noified area असेल तर , GSDA ग यांनी काही निर्बंध घातले आहेत का हे पहा
माझ्या माहितीप्रमाणे नसावेत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. सर
माझे आजोबा यांचे नावे एका गटात लागवडीलायक ३ एकर व पोटखराबा ५ एकर एवढे क्षेत्र आहे. सध्या आम्ही पोटखराबा ५ एकर मधील जवळजवळ ३ एकर एवढे क्षेत्र गाळ भरून लागवडीयोग्य करून घेतले आहे. तर हे क्षेत्र लागवडीलायक मध्ये सात बारा उताऱ्यावर समाविष्ट करून घेणेसाठी आम्हाला कोणाकडे व कोणत्या कायद्याच्या कोणत्या कलमाखाली अर्ज सादर करावा लागेल.
अधीक्षक भूमिअभिलेख यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by योगेश
08-01-2018
nirajhalkude@gmail.com

नमस्कार सर
आमच्या गावामध्ये १९८० साली वाढीव गावठाणा अंतर्गत राहण्यासाठी प्लॉट चे वाटप झाले आहे .
१)सदर गावठाण मध्ये अजून जे प्लॉट शिल्लक आहेत ते घेण्यासाठी काय करावे लागेल ?
२) त्या साठी काही अटी आहेत का ?
३)त्यासाठी तीन गुंठे साठी किती फी भरावी लागेल ?
४) कोणकोणती कागदपत्रे लागतील व ती कोठे जमा करावी लागतील ?
१. गावठाण विस्तार योजना हि प्रांत अधिकारी यांचे मार्फत राबवली जाते . काही भूखंड शिल्लक असतील तर ते मिळणेसाठी प्रांत कार्यालयाकडे अर्ज करा
२.आपण त्या गावातील रहिवासी असणे आवश्यक . आपल्या नावे गावठाणात जमीन शिल्लक नसणे
३.सध्याचे सिद्ध शीघ्र गणकाप्रमाणे जमीन मूल्य भरावे लागेल
४.आवश्यक कागदपत्रांची यादी प्रांत कार्यालय आपणास देईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर एखादा कर्मचारी विभागीय दुय्यमसेवा परीक्षा व महसूल अहर्ता परीक्षा शासन निर्णयामध्‍ये विहीत केलेल्‍या मुदतीत व संधीत परीक्षा उत्‍तीर्ण झालेले आहे. आणी सदर कर्मचारी यांची फक्‍त ३ वर्षे ७ महिण्‍याची सेवा पुर्ण झालेली आहे व सदर कर्मचारी सेवा जेष्‍ठतेनुसार पदोन्‍नत्‍तीसही पात्र आहेत. मग त्‍यांना पदोन्‍नत्‍ती देता येईल का सर. कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
आदरणीय सर ,एखाद्या जमिनीचे दिवाणी न्यायालयात declaration मागितले असेल तर व त्याच वेळी तहसीलदारांकडे त्याच जमिनीत कुल म्हणून नोंद व्हावी असा अर्ज करता येतो ka
दोन्ही बाबी भिन्न आहेत . तथापि , आपले प्रतिवाद्याने दिवाणी न्यायालयाचे निदर्शनास आणून दिल्यास , न्यायालय , तहसीलदार यांचेकडील दावा तहकूब कार्बे बाबत निर्देश देऊ शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.41 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3400
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3