जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by निखिल गायकवाड
21-04-2018
itsnikhilgaikwad@gmail.com
नमस्कार सर
मला आपली मदत हवी माझा प्रश्न असा आहे कि माझ्या आजोबानि १० एकर शेत घेतले होते शेतामधुन कॅनल गेले शेताचि वाटनि झालि वडिलांच्या नावे १:६१ जमीन आलि काकाच्या नावे १:४१ आलि काकाच्या नावचि जागा आजोबाच्या नावावर केलि होती आता आमच्या राहत्या घर माझे आजोबा आनि माझ्या काकाच्या नावावर आहे कारन कि माझे वडिल वारले काहि वर्षानी आजोबा वारले आजि वारली नंतर काकानि त्यांचे शेत स्वताच्या नावावर करून घेतले आमचे शेत आजोबानि आमच्या नावावर आधिच केले होते आता प्रश्न असा की (आता काका असा म्हनतोय कि तुमच्या कडे जि अधिक चि जमिन
आहे ति आमच्या नावे करा )आम्हि जे राहतो ते घर आईच्या नावे करायचि पन वारस म्हनुन काकाचे नाव यायले पन तो आमच्या घरचि जागा आईच्या नावे करन्यास परेशान करत आहे कृपया करून मदत करावि
Question by अभिजीत
19-04-2018
abhijitkadam55@ gmail.com
महोदय मी एक जमिन खरेदी केलेली अाहे नुकतीच खरेदी प्रक्रीया पुर्ण झालेली असुन तो दस्त नोंदणी साठी तलाठी कार्यालयाकडे दिला आहे परंतु जी जमिन खरेदी केली त्या जमिनीच्या७/१२ च्या् इतर हककात साधे कुळ ३(१) अशी नोंद आहे त्या मुळे भविष्यात अडचण येऊ शकते का कारण मी खरेदी जमिन मालका कडुन केलेली आहे कृपया मार्गदर्शन करा
जमीनखरेदीसाठी कुळाची सम्मती होती का ?
नसेल तर , पुढे अडचण होईल . कारण कुळाचे नवे ३२ ग किंमत निश्चित झाली कि , कुल मालक होणार . व आपले नाव ७/१२ वरून कमी होणार .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by भूषण
19-04-2018
bhushpawar89@gmail.com
नमस्कार साहेब , आम्हाला आमच्या जमिनीचे तिघांमध्ये खातेफोडे करणे आहे तरीपण यासाठी शासकीय निमानुसार काय काय करावे लागेन व खातेफोडे करण्यास अंदाजे किती खर्च येईन .
आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ८५ प्रमाणे वाटप दावा , तहसीलदार यांचे कडे दाखल करा .
या वाटपासाठी कोणतीही फी नाही . अर्ज समवेत जो कोर्ट फी स्टँमप लावावा लागेल तेवढाच खर्च अपेक्षित
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
16-04-2018
ravindra.golesar@rediffmail.com
आदरणीय सर , मृत्यूपत्रानुसार ग्रामसेवक घर नावावर करण्यास गेल्या आठ महिन्या पासून टाळाटाळ करीत आहे . तसेच काही उत्तर देखील देत नाही . त्याच प्रकारे मंडळ अधिकारी व तलाठी देखील जमीन नावावर करीत नाही. मृत्यूपत्र दिल्यानंतर घर व जमीन वर नांवे लावण्यास काय अडचण आहे याचे कारण सुद्धा सांगत नाही या बाबत कोणाकडे तक्रार करावी मार्गदर्शन करावे हि विनंती.
तलाठी / मंडळ अधिकारी यांचे बाबतीत , संबंधित तहसीलदार यांचेकडे तक्रार करू शकता
ग्रामसेवक बाबत आपण , गट विकास अधिकारी यांचेकडे अर्ज करू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Avinash Rasam
15-04-2018
Avinashrasm522@gmail.com
बाबत माझे प्रश्ना असे..55 वर्षापुर्वी दिलेले ताबे एवढया प्रदिर्घ कालावधीनंतर रदद करता येतात का. 2. आयुक्ता यानी कायम केलेले वाटप त्याची परवाणगी नसताना जिल्हाधिकारी अगर तहसिलदार याना रदद करता येते का. 3.वाटपात 50 पक्षकार असताना फक्ता 6 जणानी नोटीस देवून तहसिलदार यांनी चालविलेली केस रदद केलेले वाटप योग्या कि अयोग्या 4 लोकायुक्त याचे 1958 च्या निवाडयाची वैध्यता किती.
ताबा रद्द होत नाही . ताबा काढून घेतला जातो . ताबा योग्य कायद्याची प्रक्रिया राबवूनच काढून घेतला जातो . ( by following due process of law )
आपण म्हणत आहेत त्या प्रमाणे मा आयुक्त यांचे आदेश , तहसीलदार मानणार नाहीत असे होणार नाही . आयुक्त यांचे आदेश काय आहेत हे नीट वाचून पहा . कायदेशीर सल्ला घ्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मेघराज पाटील
14-04-2018
meghp@abpnews.in
गुंठेवारी कायद्यानुसार प्लॉटिंग करण्यात आलेल्या क्षेत्रात ओपन स्पेसची तरतूद आहे का? अशा प्लॉटिंगमध्ये ओपनस्पेस (सर्व प्लॉटधारकांच्या सोईसाठी खुला प्लॉट) ठेवली असेल आणि प्लॉटधारकांच्या खरेदी दस्तातील चतुःसीमेच्या वर्णनात खुला प्लॉट असा उल्लेख असेल तर असा ओपन स्पेस मूळ जागा मालकाला अन्य प्लॉटधारकांच्या परवानगीशिवाय विकता येईल का? गुंठेवारी प्लॉटिंगनुसार ठेवलेला ओपन स्पेस नगरपालिकेला हस्तांतरीत करणं अनिवार्य आहे का?
होय
गुंठेवारी कायद्यानुसार open space ठेवणे आवश्यक
अशी ओपन space विकता येत नाही
ओपन space नगर पालिकेस हस्तांतरित करणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by amjad shaikh
14-04-2018
amjadshaikh367@gmail.com
माझे वडील मयत झाले असून मी तलाठी साहेबांकडे ७/१२ वर नाव लागण्यासाठी वारस अर्ज आणि प्रतिज्ञापत्र दिले आहे वारस अर्ज व प्रतिज्ञापत्रात सहा नावे दिली आहेत मात्र तलाठी साहेबानी नोटीस सात नावाची काढली आहे आजोबांच्या मुत्यु नंतर यापूर्वीच काकांचे नाव लागले आहे .नोटीस मध्ये सातव्या नंबरला काकांचे नाव लिहिले आहे . तरीही नोटीस कायदेशीर आहे का बेकाययदेशीर ते सांगण्यात यावे .किंवा नोटीस दुरुस्त करून घ्यावी का ? तरी याबाबत कृपया मार्गदर्शन करण्यात यावे ?
नोटीस कायदेशीर आहे
काकांचा आपली नावे वारस म्हणून नाव दाखल करण्यास हरकत आहे का ? हे तपासण्यासाठी नोटीस दिलेली आहे . आपणास त्याबाबत काही हरकत असण्याचे कारण नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राघू धोंडू कंक
13-04-2018
bharatkank44@gmail.com
सर मी 16 एकर जमिनीवरील खातेदार आहे. माझी शेतजमीन निरा-देवघर भोर प्रकल्प मध्ये संपादन झाली आहे. तरी मी पुनर्वसनासाठी पाञ आहे का
भू संपादन होताना , १९९९ चा पुनर्वसन कायदा जर लागू केला असेल तर , आपण पुनर्वसनासाठी पात्र आहेत .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अभिजीत
12-04-2018
abhijitkadam55@ gmail.com
महोदय कालवा भुसंपादनासाठी एका एकञित आणेवारीत असणार्या् गटापैकी २ एकर जमिन भुसंपादीत झाली आहे परंतु त्या् गटाच्या जमिन मालकाबरोबरच ईतर हककात संरक्षित कुळ असणारयानाही ४(१)नोटीस आहे तर आता भुसंपादीत जमिनीचा मोबदला मिळत असताना मोबदल्यासाठी मालकाबराबर कुळही पाञ आहे कींवा नाही याबाबत मार्गदर्शन करा या भुसंपादनाबाबत मालक एकापेक्षा भरपुर आहेत तेव्हा् मोबदलयावरून मतभेद होण्याची शक्यता आहे तसेच सर्व मालकांच्या मतभेदात कुळ वारसांना कशाप्रकारे न्याय मिळतो कींवा तसांचा या मोबदल्यावर कोनताही अधिकार आहे कींवा नाही याचे मार्गदर्शन करावे ही विनंती
अभिजितदादा
आपली शंका रास्त आहे
कुळांना भू संपादन मोबदल्यात हक्क आहे . उलटपक्षी कुळांचा हक्क स्वरूप यावरून नुकसान भरपाई दिली जाते
कुल कायद्या नुसार , ज्या मिळकतीस कुल असतो , तो कुल जर १.४.५७ रोजी अथवा त्यापूर्वी कुलअसेल तर , अशी व्यक्ती मिळकतीची मानीव कुल मानली जाते . केवळ ३२ ग किंमत निश्चित झाली नाही म्हणून , कुळाचे नाव भोगवटादार सादरी लावे जात नाही . अश्या वेळी , अश्या कुलास ८० % नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे .
तथापि नवीन भू संपादन नियमामध्ये , कुल मालक ६०: ४० प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी असे निर्देश आहेत
मालक कुल वाटपाबाबत वाद असल्यास , रक्कम दिवाणू न्यायालयात जमा केली जाते व न्यायालय वाटपाबाबत निर्णय घेते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रविंद्र कासार
12-04-2018
kasar.exam@gmail.com
माननीय सर मला महाडचे घर मला माझ्या नावाने मिळाले आणि आता मला ते माझ्या व माझ्या पत्नीच्या नावे घ्यायचे आहे अजून म्हाडा कडून वाटप पत्र मिळाले नाही त्या साठी मला काय करावे लागेल .
Question by पंकज कागणे
11-04-2018
pankajkagane@gmail.com
आंतरजिल्हा बदलीने कर्मचारी रुजु झालेले आहेत त्यांनी दुय्यमसेवा व महसूल अर्हता परीक्षा बदली होण्याच्या आधी म्हणजे प्रथम नियुक्ती झालेल्या जिल्हामध्ये उत्तीर्ण केलेली होती, त्यांना पदोन्नती द्यावयाची असल्यास बदली झालेल्या जिल्हामध्ये किती वर्षाची सेवा पुर्ण झाल्यानंतर त्यांना पदोन्नती देता येईल.
Question by सचिन गुरनुले
10-04-2018
sachingurnule43@gmail.com
आदरणीय सर ,
माझ्या आजोबाने हयातीत असताना आपली स्वमिळकतीची जमीन आम्हा दोन नातवंडा ना अनोंदणीकृत मृत्युपत्र १०० रु.च्या स्टँम्प पेपरवर साक्षीदारा समोर मृत्युपत्र करून ठेवले आहे. मागील महिन्यात माझ्या आजोबाचे वृद्धपकाळाने निधन झाले त्यामुळे सदर मृत्युपत्र घेऊन तलाठी कार्यलयात गेले असता तलाठी साहेबांनी सदर मृत्युपत्र नोंदणीकृत नाही त्यामुळे फेरफार घेता येत नाही व सातबारा संगणीकरण झाल्यामुळे online e ferfar प्रणालीतून अनोंदणीकृत मृत्युपत्राचा फेरफार घेता येत नाही म्हणून सदर मृत्युपत्र अवैध आहे असे सांगून परत केला .
आदरणीय सर आपणास विनंती करतो कि वरील समस्येवर मार्गदर्शन करावे हि विनंती ....
आपल्या या उपक्रमास खूप खूप शुभेच्या !
तलाठी यांनी चुकीची माहिती दिली आहे
कायद्याने मृत्य पत्र नोंदणीकृत असणे आवश्यक नाही
त्यामुळे e ferfar प्रणालीमध्ये नोंदणीकृत , मृत्यपत्राची आवश्यकता नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sagar yedage
09-04-2018
yedagesagar@gmail.com
माझ्या वडिलांनी शाळा बांधकाम साठी 5आर जमिन बक्षिस करून दिली आहे.व शाळेचे पुर्ण बांधकाम 8आर जमिनीवर आहे.व शाळेच्या समोरून राज्य महामार्ग गेला असुन बक्षिसपत्रामधे किती अंतर सोडायचे हे लिहुन दिले नाही.व PWDचे कोनतेही नियम व अंतरेचा उल्लेख केलेला नाही.व शाळेचे बांधकाम रस्त्याच्या 30 फुट अंतर सोडुन आहे.व ते पुर्ण झाले आहे.तरी शाळेची 5आर जमिन कशी मोजुन द्यावी.व उर्वरित जागेवरिल अतिक्रमन कसे काडता येइल.व कोनाकडे दाद मागता येइल....कृपया मार्गदर्शन करावे.........माझा संर्पक yedagesagar@gmail.com मो.9561264162
शाळेने ८ गुंठ्यांवर बांधकाम पूर्ण केले आहे . त्यामुळे आता , कुठे अतिक्रमण काढत बसता
राज्य महामार्गापासून ठराविक अंतराच्या आत बांधकाम करता येत नाही. त्यास नियंत्रण रेषा असे संबोदतात
५ गुठ्यांपेक्षा जादा क्षेत्रावर असलेले बांधकाम काढायचे असल्यास आपणास दिवाणी न्यायालयात जावे लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by साहेबराव गायकवाड
09-04-2018
sjgaikward1979@gmail.com
सर,
माझ्या वडिलांनी २०१६ साली जमीन मोजणी केली होती. भूमी अभिलेख कार्यालय मालेगाव (नासिक) यांच्याकडून प्रकरण निकाली काढले गेले आणि वडिलांना पत्र दिले कि तुम्ही तुमचे क्षेत्र दुरुस्ती करून घ्यावे त्या प्रमाणे वडिलांनी पूर्वीचे ७/१२ १९३५ ते १९७६ पर्यंत काढले व फेरफार हि काढले आहे. वर्ष १९६२-६३ साली कमी जास्त पत्रकाची नोंद आहे त्या नोंदीप्रमाणे आमचे क्षेत्र कमी केले आहे परंतु भूमी अभिलेख कार्यालयातून १९६२ च्या पूर्वीच्या रेकॉर्ड प्रमाणे मोजणी करून दिली आहे.कमी जास्त पत्रकाप्रमाणे हल्लीच्या आणि पूर्वीच्या ७/१२ मध्ये ७६ घुंठ्या चा फरक आहे तरी सर कृपया मार्गदर्शन करावे कि क्षेत्र दुरुस्ती साठी कोणत्या कार्यालयात अर्ज करावा लागेल . कृपया मार्गदर्शन करावे .
धन्यवाद .
१९६२ च्या कमी जास्त पत्रकाने क्षेत्र कमी दाखवले आहे . त्यामुळे आपल्या क्षेत्रात तफावत येत आहे
आपण कमी जास्त पत्रक तयार झाले त्यावेळी अपील दाखल करणे आवश्यक होते .
आता आपण कमी जास्त पत्रक आव्हानात करा ( अधीक्षक भूमी अभिलेख ) . मात्र विलंब खूप झाला असल्याने , मुदतीच्या कायद्याच्या बाधा येऊ शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by साहेबराव गायकवाड
09-04-2018
sjgaikward1979@gmail.com
सर,
माझ्या वडिलांनी २०१६ साली जमीन मोजणी केली होती. भूमी अभिलेख कार्यालय मालेगाव (नासिक) यांच्याकडून प्रकरण निकाली काढले गेले आणि वडिलांना पत्र दिले कि तुम्ही तुमचे क्षेत्र दुरुस्ती करून घ्यावे त्या प्रमाणे वडिलांनी पूर्वीचे ७/१२ १९३५ ते १९७६ पर्यंत काढले व फेरफार हि काढले आहे. वर्ष १९६२-६३ साली कमी जास्त पत्रकाची नोंद आहे त्या नोंदीप्रमाणे आमचे क्षेत्र कमी केले आहे परंतु भूमी अभिलेख कार्यालयातून १९६२ च्या पूर्वीच्या रेकॉर्ड प्रमाणे मोजणी करून दिली आहे.कमी जास्त पत्रकाप्रमाणे हल्लीच्या आणि पूर्वीच्या ७/१२ मध्ये ७६ घुंठ्या चा फरक आहे तरी सर कृपया मार्गदर्शन करावे कि क्षेत्र दुरुस्ती साठी कोणत्या कार्यालयात अर्ज करावा लागेल . कृपया मार्गदर्शन करावे .
धन्यवाद .
Question by VIKRAM
07-04-2018
vikram.vy11135@gmail.com
नमस्कार सर , माझी १ विनंती आहे मला योगय मार्ग सांगाल . माझा व २ बहिणीने दिवाणी नायालयात जमिनीतील सर्व हक माझा नावे सोडून दिला आहे त्याची रक्कम मी कोर्टातच भरली आहे व हुकूमनामा झाला आहे 2 बहिणीनेही सर्व हक्क माझा नावे सोडून दिला आहे दिवाणी नायालयातच. पण ७/१२ वर नोंद करून घायचे राहहून गेले.फुडें मी तो हुकूमनामा मुद्रांक शुल्क (दंड ) भरून तहसिलकर्यलातून आदेश वरून ७/१२ माझे नावे झाला .पण त्या आधी २ बहिणींनी ती जमीन गावातील एका ला विकून दस्त नोंदींसंधीसाठी तलाठी यांच्याकडे आला पण तलाठी व मंडळ अधिकारी यांनी तो अर्ज फेटाळ ला त्यावर त्यांनी प्रांत यांच्याकडे अपील करून माझे नाव कमी करून दस्त वर आलेला व्क्तीचे नवा ७/१२ ला लावा असा आदेश दिला व माझे नवा ७/१२ वरून कमी करण्यात आले आहे तर मी त्या विरोधात मी दिवाणी न्यालयात दावा दाखल केला आहे. तो दस्त मला मान्य नाही व तो दस्त कॅन्सल करावा .मला तो दस्त चुकीचा आहे हे सिद्ध करण्यासाठी काय करावे लागेल
? माझे नावे ती जमीन पुन्हा होईल का ?कृपया मार्गदर्शन करा ?
दिवाणी न्यायालयात तुमची तडजोड होऊन तुमच्या बहिणींनी मिळकतीतील त्यांचा हक्क सोडला आहे . त्या प्रमाणे तुम्ही जमिनीचा मोबदला हि न्यायालयात जमा केला आहे . हे सर्व अभिलेखाच तुमचा पुरावा आहे तो तुम्ही बहिणींनी जमीन विकली तो दस्त रद्द करण्यासाठी पुरेसा आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमोल चव्हाण
07-04-2018
amol.chavan25@rediffmail.com
साहेब नमस्कार
माघील प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल आभारी आहे
साहेब माझा दुसरा प्रश्न आहे की
एका अशिक्षित ७२ वर्ष्याच्या स्त्री ला निराधार योजनेची पेन्शन चालू करतो म्हणून मृतुपत्र फसवणूक करून रजिस्टर करून केले आहे, आणि मृतुपत्राला मेडिकल फिजिकल फिट दाखला नाही ,आणि साक्षीदार म्हणून २ व्यक्ती आहेत,परंतु मृतुपत्रावर ज्या साक्षीदारांचा पत्ता व नाव आहे त्या गावा मध्ये आम्ही सरपंच व गावातील लोक यांच्याकडे चौकशी केली असता ते साक्षीदार आमाच्या गावामध्ये रहिवाशी नाहीत असे सांगण्यात आले, व मृतुपत्राला साक्षीदार यांची ओळखीसाठी कोणतीही कागदपत्रे जोडली नाहीत,जमीन आम्हीच वहिवाट करीत आहे,परंतु ज्याने मृतुपत्र करुन घेतले आहे ,तो व्यक्ती ७/१२ व नाव लावण्यासाठी धडपड करत आहे ,आम्हाला काय करावे लागेल ,कृपया माहिती द्यावी हि विनंती
त्या अशिक्षित महिलेने जर तिची फसवणूक झाली आहे असे तिला वाटत असेल तर तिने त्यांचे विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by आकाश शरद अंबावले
07-04-2018
akashambawale1999@gmail.com
नमस्कार सर,
सन 2000 मध्ये शासकीय गुरचरण जमिनीची मागणी माझे वैयक्तिक वापरासाठी जिल्हाधिकारी साहेबाकडे केलेली होती. त्यासंदर्भातील सर्व कागदपत्रे (7/12 ,फेरफार,गटबुक नकाशा ,ग्रामपंचयत ना हरकत दाखला, इत्यदी )जमा केलेली आहेत.आजरोजीपर्यंत या संदर्भातील माझ्या मागणीला उत्तर देण्यात आले नाही. तसेच सदरील जमिनीची ग्रामपंचयत माध्यमातून “विस्तारित गावठाण योजना” होण्यासाठी मागणी केली होती. तरी
प्रश्न 1) शासकीय गुरचरण जमिनीची मागणी केली असता प्रकरण किती दिवसामध्ये निकाली निघणे अपेक्षीत आहे ?
प्रश्न 2) या प्रकरणामध्ये मला आज रोजी ही जमीन मिळवण्यासाठी काय करावे लागेल?
यासंदर्भातील माहिती मिळावी ही विनंती.
गुरुचरण जागा , वैक्तिक कारणासाठी शासनाकडून दिली जात नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रोहिदास हरिभाऊ काळे
06-04-2018
rohidaskale19@gmail.com
माननिय मोहदय,
माझी ३७ गुंठे सध्या "जिरायत" शेत जमीन आहे. पुढे मला त्या जमिनी मध्ये कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता करून विविध प्रकारची फळ झाडे व फुल शेती करायची आहे. तर माझे असे प्रश्न आहेत :
१) शेत जमिनीचे ''जिरायत " असलेले क्षेत्र हे ''बागायत" मध्ये बदलता येते का?
२) तसे करण्यासाठी अधिकार कोणाला आहेत व त्याची काय कार्य पद्धत आहे.? व
३) पुढे ती शेती कायम स्वरूपी "बागायत" म्हणूनच राहील का?
रोहिदास हरिभाऊ काळे
७/१२ च्या , नमुना १२ मध्ये , घेण्यात आलेल्या पिंकाचा तपशील नमूद असतो . घेण्यात आलेल्या पिकाप्रमाणे व सिंचन तपशिलाप्रमाणे जमीन जिरायत आहे कि बागायत आहे हे निश्चित करण्यात येते
जिरायत जागेस १२ महिने शाश्वत पाणी पुरवठा असेल व ऊस , फळ पिके घेतली तर ती जमीन , बागायत समजण्यात येते
असे रूपांतर करणेसाठी कोणाची परवानगी लागत नाही
आपण जर कायम पाणी पुरवठा ठेवला व फुल शेती केली तर ती जमीन , बागायतच राहील मात्र आपण पाणी पुरवठा खंडित केला तर निश्चितच , फुल शेती येणार नाही . आपणाला पीक दुसरे , म्हणजे कमी पाण्यावर येणारे घ्यावे लागेल .
जमिनीचा प्रकार म्हणजे , बागायत , जिरायत , हि कश्या प्रकारे ठेवायची हे आपल्यावर अवलंबून आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kaunain shaikh
03-04-2018
kaunainshaikh1@gmail.com
Navin avibhajya shart ,, bhogwatdar 2 la juni shart karun bhogwatdar 1 karta yeto ka
Question by अमित शिर्के
01-04-2018
amitkumar.shirke@gmail.com
मा. किरण पाणबुडे सर
माझे आजोबा शिवराम तात्या शिर्के यांचा जन्म 1922 मध्ये झाला आहे.
माझे पणजोबा यांचे मित्र बापु खामगळ यांना मुले बाळे नसल्यामुळे माझ्या आजोबांना माझ्या पणजोबांनी त्यांना दिले व त्यांनी त्यांचे नाव संभु असे ठेवले.
त्यांच्यात दत्तक पत्र वगैरे काही झाले नाही.
पुढे बापु खामगळ हे मयत झाल्याने त्यांच्या नावावरील ५ एकर जमीन ही संभु बापु खामगळ यांचे नावे म्हणजे माझ्या आजोबांच्या नावे लागली गेली.
नंतर पुन्हा माझ्या पणजोबांनी माझ्या आजोबांना त्यांच्या घरी आणले व पुढे ते शिवराम तात्या शिर्के याच नावाने आजपर्यंत आहेत.
आज माझ्या आजोबांचे वय 95 च्या दरम्यान आहे आणि त्यांनी मला ही सर्व माहिती दिली आहे.
मी सन 1900 पासूनचे सर्व अभिलेख तहसील कार्यालयात स्वतः RTI खाली तपासले आहेत.
त्यामध्ये मला असे आढळून आले की, माझ्या आजोबांच्या जन्माची नोंद उपलब्ध नाही.
आजोबांचे दत्तक वडील बापु खामगळ यांची मृत्यूची नोंद उपलब्ध नाही.
फक्त सन 1930 पासून संभु बापु खामगळ यांचे नावाचा ७-१२ उतारा आजपर्यंतचा निघत आहे. त्यावरती जमीन कसणाराचे नाव संभु असेच आजपर्यंत निघत आहे.
परंतु प्रत्यक्षात मात्र माझ्या आजोबांनी ती जमीन कधीच वहिवाटली नाही.
ती जमीन अनेक वर्षांपासून पडीत जमीन आहे.
माझे वडील आणि चुलते यांना आजोबांनी कधीच माहिती दिलेली नव्हती, आणि आज त्यांनी मला हे सर्व सांगितले आहे.
तरी मला आपणाकडून अशी माहिती हवी आहे की,
वरील दोन्ही नावाची व्यक्ती एकच आहेत हे सिद्ध करण्यासाठी काय करावे लागेल.
ती जमीन माझे आजोबांचे नावे होण्यासाठी मला काय करावे लागेल.
आपण मला सल्ला द्यावा अशी विनंती मी आपणाकडे करत आहे.
सिद्ध करण्याची काय गरज आहे . आपण ज्या जमिनीचा उल्लेख करत आहेत , ती जमीन सध्या कोणाच्या ताब्यात आहे ?
ती जमिनीस सध्या कोणाचे नाव आहे ?
जर त्या जमिनीस आता दुसऱ्याचे नाव असेल व त्रयस्त व्यक्ती जमीन कस्त असेल तर , आता काही करता येणार नाही , म्हणजे आपण जरी हे सिद्ध केले कि शंभू शिर्के व संभू खंगत ह्या एकाच व्यक्ती आहेत तरी सुद्धा , आपणास जमीन परत मिलणार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Mahdev Dnyanoba Ipper
01-04-2018
ippermd11@gmail.com
अंतरविभागिय बदली झालेल्या ना पुर्वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या असल्यास पून्हा परीक्षा उत्तीर्ण करण्याची गरज नसल्याबाबतीत चे पत्र अथवा GR असेल तर क्रुपया पोस्ट करावा
Madhav ipper talathi pauni dist. bhandara
Question by हरिभाऊ काशीद
31-03-2018
harishk4141@gmail.com
नमस्कार सर, माझ्या वडिलांच्या नावे वारसाहक्काची १ एकर शेतजमीन होती ती शेतजमीन २००१ साली गावातीलच एका व्यक्तीने माझ्या वडिलांची फसवणूक करून विकत घेतली आहे. मी OBC कुटुंबातला आहे जमीन विकताना मी व माझी भावंडे लहान होतो त्यामुळे या गोष्टीची काहीही समज नव्हती, हि शेतजमीन माझ्या वडिलांनी विकल्यामुळे आम्ही भूमिहीन झालो आहोत. अशा प्रकारे कुणाला भूमिहीन करता येते का व या बाबत मी कुठे न्याय मागू शकतो का. कृपया माहिती मिळावी हि विनंती
वडिलांनी जमीन विकली २००१ मध्ये . या घटनेला १७ वर्षे झाले त्यामुळे फसवणूक करून जमीन खरेदी केली आहे , या कारणासाठी फौजदारी तक्रार न्यायायलायात दाखल करून , विक्री दस्त रद्द करून मागा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by हरिभाऊ काशीद
31-03-2018
harishk4141@gmail.com
१) ग्रामपंचायत मिळकतीच्या चतु:सीमेच्या एका दिशेस गावकोस आहे व त्या मिळकतीवर जर बांधकाम करावयाचे असेल तर गावकोसापासून किती अंतर सोडून बांधकाम करणे कायद्याने बंधनकारक आहे, गावकोस पाडण्याचा किंवा गावकोसाला बरोबर खेटून बांधकाम करण्याचा अधिकार संबंधीत व्यक्तीला आहे का ?,गावकोस पाडून किंवा गावकोसाला बरोबर खेटून बांधकाम करणे जर बेकायदेशीर असेल व संबंधीत व्यक्ती जर अशा प्रकारचे बेकायदेशीर बांधकाम करत असेल तर असे अनधिकृत/बेकायदेशीर बांधकाम थांबविण्याचे अधिकार हे कुणाला असतात ,त्या व्यक्तीवर कोणती कायदेशीर कार्यवाही करता येते. अशा प्रकारे झालेल्या बांधकामाची नोंद ग्रामपंचायत दप्तरी होते का
२) ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रम केलेले असेल व त्या अतिक्रमणामुळे जर इतर मिळकतीस जाणे-येणेचा रस्ता पुर्ण पणे बंद होत असेल तर ते अतिक्रम काढण्याचे/हटविण्याचे अधिकार हे कुणाला असतात ? जर संबंधीत व्यक्ती केलेले अतिक्रम काढत नसेल व त्या जागेवर ती व्यक्ती स्वतःचा अधिकार दाखवत असेल तर त्या व्यक्तीवर कोणती कायदेशीर कार्यवाही करता येते.
३) ग्रामपंचायतीच्या मासिक/इतर सभेत झालेला ठराव ग्रामसेवकाने किती दिवसाच्या आत Proceedings Register ला नोंदविणे कायदेशीर बंधनकारक आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक/इतर सभेत झालेला ठराव क्रमांक बदलण्याचे अधिकार ग्रामसेवकाला / सरपंचाला असतात का. जर असे बदल करणे, Proceedings Register वेळेवर न नोंदविणे चुकीचे असेल तर त्या वर कोणती कायदेशीर कार्यवाही होऊ शकते.
४) ग्रामपंचायत मिळकती संदर्भात मिळकतीच्या मालकाने तालुका न्यायालयात दावा दाखल केला होता व निर्णय मिळकत मालकाच्या बाजुने मिळाला , नंतर ज्या व्यक्तीच्या विरोधात दावा दाखल केला होता त्या व्यक्तीने जिल्हा न्यालयात दावा दाखल केला होता, जिल्हा न्यायालयाचा निर्णय हि मिळकत मालकाच्या बाजुने मिळाला आहे तर ग्रामपंचायतीत ठराव नोंदविताना कोणत्या न्यायालयाचा निर्णय ग्राह्य धरला जातो व ग्रामपंचायत ठरावामध्ये कोणत्या न्यायालयाच्या निर्णयानुसार व निर्णय क्रमांक नुसार नोंद करणे अपेक्षित आहे .
५) ग्रामपंचायत गावठाणातील बखळजागा एका व्यक्तीने खरेदी केली आहे व ती जागा खरेदी करताना खरेदीखतात मोज मापाची जी नोंद आहे ती खरेदीखतानुसार ग्रामपंचायत दप्तरी नोंदविली आहे परंतु ग्रामपंचायतीचे जुने सर्व रेकॉर्ड तपासले असता त्यात मोजमापाची कुठलीही नोंद आढळून येत नाही. त्या चुकीच्या मोजमापामुळे इतर मिळकतीस जाण्या-येण्याचा वहिवाटी रस्ता बंद होत आहे. या बाबत कोणती व कोणाकडून कार्यवाही करता येईल .
वरील गोष्टींची माहिती मिळावी हि नम्र विनंती .
Question by Meena Desai
31-03-2018
minty_1112@rediffmail.com
नमस्कार सर माझ्या आजी ने आपल्या जमा केलेल्या पैशातून माझ्या नावे 10 एकर जमीन खरेदी केली.आजी च्या अशिक्षितपणामुळे तिला माझे योग्य वय ठाउक नव्हते व वयाला 18 वर्ष पूर्ण होण्यास १वर्ष ८ महिने बाकी असताना सदर जमिन खरेदी खत व रजिस्टर्ड दस्तवेजाने माझ्या नावावर झाली.या गोष्टीला २५ वर्ष झाली. आता माझ्या लगतच्या जमिन मालकाशी जमिनीच्या क्षेत्रावरुन कोर्ट केस चालू आहे तरी सज्ञान नसताना जमिन खरेदी केली या गोष्टीचा कोर्ट केसच्या निकालावर काही परिणाम होईल का?
ज्यावेळी मिळकत आपले नाव मिळकतीस दाखल झाले त्यावेळी आजीचे नाव नाव अज्ञान पालन करता ( अ.पा.क) म्हणून दाखल करण्यात आले होते का ?
भारतीय करार कायद्यानुसार , अज्ञान हा करार करण्यास सक्षम नाही . त्यामुळे असा करार अवैध आहे . खरेदी खात हे विक्रेता व खरेदी घेणार यांचे मधील करार आहे .
खरेदी खतावर आजीचे नावाचा उलेख आहे ? आजीने तिची विक्री रक्कम त्यावेळीस दिली होती, असा काही पुरावा आहे का ? आजीने धनादेशाद्वारे रक्कम दिली असल्यास अडचण येण्याचे काही कारण नाही . तसेच रोखीने रक्कम दिली असल्यास , पावती असेल तरीही अडचण येण्याचे काही कारण नाही . न्यायायलायत सिद्ध करावे लागेल , जमिनीस जरी तुमचे नाव लागले असले तरी , रक्कम आजीने दिली आहे आजीने अज्ञान नातवाकरता जमीन घेतली आहे .
या घटनेस २५ वर्षे झाली आहेत , मुदतीच्या कायद्याच्या हि उपयोग करून घेता येईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3400 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
