जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by संदिप
30-11-2017
sandeepwalunj6163@gmail.com
नमस्ते,
एखाद्याचे.,
जात प्रमाणपत्र ( kunbi/ OBC) काढण्यासाठी दिलेला अर्ज व त्या सोबतचे इ. दस्तऐवज RTI मधून मिळू शकतो का?
जर, त्यास ५ वर्षाचा काळ झालेला असेल?
त्या बाबत फक्त महिती आहे, प्रमाणपत्राची प्रत व दिंनाक नाही,
कोणाकडे RTI अर्ज करावा तहशिल, प्रांत.
Question by योगेश प्रभावळकर
30-11-2017
yogesh_prabhavalkar@rediffmail.com
नमस्कार सर,सहकारी गृहनिर्माण संस्थे अंतर्गत येणाऱ्या रहिवासा करिता देण्यात आलेल्या शासकीय भूखंडाचे सब डिव्हिजन करता येते का? येत असल्यास पूर्ण भूखंडाच्या किती प्रमाणात करता येते?
सहकारी गृहनिर्माण संस्थेतेतील एकूण सदस्यांची संख्या विचारात घेऊन , भूखंड प्रदान केलेला असतो . अश्या भू खंडाची विभागणी करण्यासाठी , ज्या विभागाने ( शासनाने / अन्य नियोजन प्राधिकरणाने ) भू खंड दिलेला आहे त्यांची परवानगी आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सागर माणिक पाटील
28-11-2017
sagar.brfl@gmail.com
सर माझी ६ ब इनामाची जमीन आहे .तर माझा प्रश्न असा आहे कि इनाम ६ ब ला कुल कायदा लागू होतो का ?
Question by जयवंत संपतारो पाटील
28-11-2017
sjay_patil@yahoo.co.in
महोदय किरण बानुगडे सर,
मी जयवंत संपतराव पाटील रा.गुढे ता-पाटण जिला-सातारा येतील रहिवाशी असून माझे वडील आणि चुलते (दोघेही मयत झाले आहेत ) यांनी ३० ते ३५ वर्षांपूर्वी आपली २० गुटे जमीन महाराष्ट्र शासन चा पाटबंधारे खाते ला नोकरी लावतो या तोंडी आसवासन वरती दिली आहे. आम्ही आजपर्यत कोणताही मोबदला घेतला नाही. खुप वेळ अर्ज आणि प्रत्यक्ष भेटून आणि विनंती करून आमचा कुटूंबातील कुणालाही महाराष्ट्र शासन मध्ये नोकरी लागलेली नाही.
जर आम्हाला आमची जमीन परत घायची असेल तर काय केले पायचे? नाही तर बाजारभावाप्रमाणे आम्हाला जमीनीचा मोबदला मिळेल काय? तो मिळवणासाठी काय करावयाला लागेल. याची माहिती मिळेल काय?
आपणास सध्या स्थित , जमीन परत मिळणार नाही . परंतु जमिनीचा मोबदला मिळू शकतो . ज्या वेळेस आपण जमीन , पाटबंधारे खात्यास जमीन दिली त्यावेळेस , आपल्या व पाटबंधारे खात्यात काही करार झाला होता का ? कि आपण जमीन स्वखुशीने दिली आहे . त्यावेळेसच्या , काही दस्त असतील , तर आपण जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी प्रयत्न करू शकता .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विनायक बुवाजी पाटील
27-11-2017
Vbpatil96@gmail.com
चारिटेबल ट्रस्ट ने नोंदणी करताना त्याची घटना जोडली नसेल तर नोंदणी क्रमांक मिळतो का व तो ट्रस्ट नोंदणीकृत samajava का.ट्रस्ट नोंदणीकृत आहे कि नाही हे कसे pahave. ट्रस्ट ला नोंदणी क्रमांक नसेल तर तो ट्रस्ट नोंदणीकृत असतो का ?
महाराष्ट्र धर्मादाय न्यास कायदा , कलम १८ नुसार , न्यासाचे ( trust ) ची नोंदणी केली जाते . व या कलमानुसार घटना देणे अनिवार्य आहे .
न्यास नोंदणीकृत आहे कि नाही , हे पाहण्यासाठी आपल्या विभागाचे , सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयात , चौकशी करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by santosh more
27-11-2017
santoshpmore9@gmail.com
सर,
माझ्या वडिलांनी व चुलत्यांनी संमतीने जमिनीचे वाटप करून आणेवारी नोंद केली परंतु प्रत्यक्ष वाटप अंदाजे केले होते सदर जमिनीची मोजणी केल्यानंतर आमचे वाटणीस १० गुंठे खेत्र कमी आहे.माझे वडील व चुलते दोघेही हयात नाहीत. सदर क्षेत्राची सरकारी मोजनी करून बाहेरील अतिक्रमण आहे का हे सुद्धा पाहिले व त्यानंतर सदर क्षेत्राची मागणी केली असता चुलत भावाने सदरचे क्षेत्र देण्यास नकार दिला . सदर गटामधील आमचा हिस्सा आनेवारीनुसार मिळणेसाठी काय करावे लागेल.
मिळकतीतील हिस्सा मिल्ने बाबत , The Specific Relief Act खाली दिवाणी दावा दाखल करावा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विक्रम YADAV
25-11-2017
vikram.vy11135@gmail.com
सर नमस्कार , तूमहिकेलेयल्या मार्ग दर्शन मुले मी दस्तनोंद थांबविण्यासाढी अप्पर जिला अधिकारी यांच्याकडे अपील ढकल केले आहे .त्याचप्रमाणे दिवाणी न्यालयात दस्तबेकादेशीर आहहे हे सिद्ध करण्यासाठी दावा दाखल करतो आहे ,पण त्या दस्ताची अग्रेमेन्ट रक्क्म सात लाख आहे ,तर दिवाणी दावा दाखल करण्या साठी मला दिवाणी न्यालयात स्टायपें रक्कम भरावी लागते का ? व किती ?तो दस्त बेकादेशीर कार्यनीसाठी मला ती रकम न्यालयात भरावी लागेल का ? त्या नंतर तो दस्त रद्ध होईल का ?कृपया मार्ग दर्शन कर्वे धन्यवाद .
आपण न्यायालयाचे अधीक्षक यांचेकडे दावा प्रत सादर करा . कोर्ट फी किती भरावी लागेल ते adjudicate करतील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शिवाजी राजेमहाडिक
25-11-2017
shivajirajetarale@gmail.com
श्री. किरण पाणबुडे साहेब,
नमस्कार,
सिटी सर्वे १९९५ साली झाला त्यावेळी आम्ही सदर जागेच्या शेजारची जागा ज्याला भाड्याने दिली त्याचे नाव आताच्या आमच्या जागेला ला लागले. त्यानंतर १९९७ साली ग्रामपंचायतीने सदर जागेला ग्रामपंचायत उतार्याला ग्रामपंचायतीची नोंद डायरेक्ट केली. मग आम्ही ग्रामपंचायतीकडे माहिती अधिकारात अर्ज देऊन नोंदी बाबत पुरावा मागितला त्यांना देता आला नाही . मग आम्ही आमच्या आजीनी सदर जागेवर हक्क सांगितलेला पुरावा दिला व आमची नोंद करून सिटी सर्वे सातारा यांच्याकडे अपील दाखल केले ते अपील चालू असताना ग्रामपंचायतीने पुन्हा आम्हे नाव कमी करून ग्रामपंचायतीचे नाव पूर्ववत केले ते नाव पूर्ववत करताना आम्ही त्यांना नोंदीत बदल करू नये म्हणून नोटीस दिली त्याचे उत्तर न देता व आम्हाला म्हणणं मांडण्याची संधी न देता त्यांनी नोंद पूर्ववत केली व थर्ड पार्टी म्हणून अर्ग्युमेण्ट वेळी हजर झाली त्याचा निकाल २०१६ मध्ये लागला व त्यानंतर सातारा भूमी अभिलेख न्यायालयाने तालुका भूमी अभिलेख न्यायालयाला जागेवर जाऊन प्रत्यक्ष्य पाहणी करून निकाल द्यावा त्यानुसार तिथे तारखा चालल्या त्यावेळी ग्रामपंचायत हजर होती ते जागेवर आले त्यावेळी ग्रामपंचायतीने आक्षेप घेतला नाही- त्यांनी २०१७ च्या मे महिन्यात निकाल दिला- मुदत संपल्यानंतर आम्ही रीतसर मोजणी मागवून हद्द फिक्स करून घेतली. त्यावेळी ग्रामपंचायतीने हरकत घेतली नाही. आणि मोजणी नुसार आम्ही सिमेंट पोल लावून घेतले मोजणी ३/११/२०१७ रोजी दुपारी २:३० वाजता संपली त्यानंतर सरपंच , उपसरपंच व ग्रामसेवक यांनी आम्हाला त्याच दिवशी ३:०० वाजता ग्रामपंचायतीची नोटीस दिली कि अतिक्रमण करू नये म्हणून चालेल का? त्या नोटीसला आम्ही उत्तर दिले आहे त्यात त्यांना रिप्लाय द्यायला १५ दिवसांची मुदत दिली परंतु त्यांनी रिप्लाय दिला नाही . आता आम्ही प्रॉपर्टी कार्ड नुसार दिनांक १४/११/२०१७ रोजी ती जागा विकली आहे- आता ग्रामपंचायत काय करू शकते का ? आम्ही काय करावे ?
भूमी अभिलेख खात्याने तुमच्या बाजूने निकाल दिला आहे व तुमचे नाव संबंधित भूखंडास लागल्यानंतर , आपण भू खंड विकला आहे .
ग्राम पंच्यात , मिळकत त्यांचेकडे मिळणेसाठी सर्व प्रयत्न करेल . मात्र त्यांना त्यात यश मिळेल असे नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विनायक बुवाजी पाटील
23-11-2017
Vbpatil96@gmail.com
Maze aajoba 1954 pasun sanrakshit kul ahet. Pan 1971 la mayat zale आहेत तेव्हापासून अजून आम्ही कुल म्हणून वारस नोंद केली नाही .फक्त पीक पाहणीला नाव आहे .वारस नोंद करण्यासाठी काय करावे
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ४० अन्वये , कुल वहिवाट वंशपरंपरागत आहे . आजोबा नंतर आपले वडिलांचे /.चुलत्यांचे नाव लागणे आवश्यक आहे . मामलतदार यांचेकडे अर्ज करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by ज्ञानेश्वर दत्तात्रय पगार, तलाठी.
22-11-2017
pagardd@gmail.com
आदिवासीची जमीन जी भोगवटदार वर्ग २ आहे, तसेच इतर अधिकारात “नवीन अटी शर्ती” असा शेराही आहे. अशी जमीन बिनशेती (अकृषिक) झाल्यानंतर व आदेशात काही उल्लेख नसेल तर त्या जमिनीचा भोगवटदार वर्ग काय राहील? तसेच इतर अधिकारातील “नवीन अटी शर्ती” व “आदिवासीची जमीन” या शेऱ्यांचे काय करावे?
जमिनीचा भोगवटादार वर्ग २ असाच राहणार .
जमीन जरी बिनशेती झाली तरी , भोगवटादार सादरी आदिवासी खातेदाराचेच नाव असल्यास इतर अधिकारी सदरी , आदिवासी खातेदार अशी नोंद राहणारच
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शंकर काकडे
22-11-2017
shankarbkakade@gmail.com
आदरणीय श्री किरण पाणबुडे सर
१) पीकपाहणीस नाव लावणे साठी अत्ता अर्ज करता येईल का ,पिकपाहणीस नाव कधी लावता येईल जमीन आम्हीच कसतो आहे,,
२) शेतात सध्या भाजीपाला लागवड केली आहे त्याकरिता पीकपाहणीस नाव दाखल करता येईल का?
कधी पिकपाहिनीस नाव लावता येईल त्याबद्दल मार्गदर्शन करावे नम्रविनंती..
पिकपाहणीस नाव लावणेसाठी , आपण जमीन कायदेशीररितीने कसत असाल तर , अर्ज करता येईल .
जमीन कायदेशीर रित्या कसणे म्हणजे , आपल्या कसवणूकीस , जमीन मालकाची तोंडी अथवा लेखी संमती असणे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दिनेश दाभोलकर
19-11-2017
dabholkar.dinesh@gmail.com
नमस्कार सर
आमची जमीन सामायिक आहे आणि या सामायिक जमिनीमध्ये आमचे घर आहे , घरपट्टी आमच्या नावाची आहे तसेच आमची वहिवाट आमची आहे , पूर्वीपासून जमीन आम्हीच कसत आहोत , जमिनीचा दस्त आम्हीच भरत आहोत आणि या सामायिक जमिनीमध्ये काही लोकांनी बेकायदेशीर नावे नोंद केली आहेत सदर गोष्टीला 5० वर्षे झाली आहेत , या लोकांची नावे इतर हक्कांमधून निघून गेली आहेत आणि तसा सरकारमान्य फेरफार आमच्या कडे जुने कागदपत्र काढल्यावर मिळाला त्या अनुषंगाने आम्ही महाराष्ट् जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १५५ अन्व्ये पोकळ नोंद केलेले फेरफार रद्ध करण्यासाठी तसेच त्यांची नावे सातबारातून रद्ध करण्यासाठी अपिलीय अर्ज तहसीलदार यांना करणार आहोत पण हे करताना आम्हाला खालील गोष्टीवर मार्गदर्शन करावे ही विनंती
1) या अपिलीय अर्जचा निर्णय लागेपर्यंत कमीत कमी समजा दोन वर्ष गेली आणि या दरमयान आमचे पडीक घर जर पडले तर त्या घरावर किंवा घर ज्या जमिनीमध्ये आहे त्या जमिनीवर प्रतिवादी अपिलीय अर्जचा निर्णय लागेपर्यंत स्टे आणू शकतात का
2) अपिलीय अर्जचा निर्णय लागेपर्यंत पडीक घर जर पडले तर आम्ही परत बंधू शकतो का
3) प्रतिवादी याच्या मुंबईमध्ये राहत असल्याला लोकांचे पत्ते आम्हाला माहित नसतील तर त्यांचे गावचे घराचा पत्ता दिला तर चालेल का
१. नवीन सुधारणेनुसार , अपील दाखल झाल्यानंतर , त्याचा निकाल १ वर्षात देण्याचे बंधन , अपिलाय अधिकारी यांचेवर आहे .
२. आपले नाव ७/१२ सदरी दाखल आहे काय ? आपले नाव ७/१२ सादरी असल्यास , घर जरी पडले तरी आपण ते बांधू शकता .
३. प्रतिवादी यांचे पट्टे उपलब्ध नसल्यास , त्यांना द्यावयाची नोटीस , म.ज .म .अ. च्या कलम १९६६ च्या कलम २३० प्रमाणे , जागेवर नोटीस बजावणी करण्याची तरतूद आहे . तसेच जमीन ज्या भागात आहे , तेथील जास्त circulation असलेल्या वृत्तपत्रात नतीस प्रसिद्ध करू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अजिंक्य देशमुख
19-11-2017
ajindes1@gmail.com
आमच्या जमिनीवर रस्त्यासाठी भुसंपादन झाले आहे ती जमीन आमची मोठे बंधु वहिवाट करतात आम्ही पण त्या जमिनीला वारस आहोत त्याचा मोबदला कसा मिळेल
जमीनजर संपादित झाली असेल तर , आपले बंधू जमीन कसे कसत आहेत ?
वारस असल्यास , आपणास मोबदला मिळेल . मात्र आपले नाव अधिकार अभिलेख सादरी दाखल आहे का ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
18-11-2017
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर मनपा. हददीत महार वतन जमीन ७/ ८ वर्षांपूर्वी बिनशेती प्रयोजनार्थ जुन्या शर्तीवर करण्यात आली होती. त्यावेळी चालू बाजारभावाच्या ५०% नजराणा भरण्यात आला होता. आज रोजी सदर जमिनीचा वापर बिनशेतीसाठीं करावयाचा असल्यास चालू बाजारभावानुसार फरकाची रक्कम भरावी लागते का? किंवा कसे? कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
Question by Mangesh prakash misal
17-11-2017
Mishalmangesh@gmail.com
आदरणीय सर, (अ) ने विकत घेतलेला प्लॉट र.जी. आधारे 1991 मध्ये विकत घेतला व त्याने (ब) ला 1993 मध्ये रजिस्टरी आधारे विकला, तोच प्लॉट (क) ने रजिस्टरी आधारे 1997 ला विकत घेतला, 'अ' आणि 'ब' ह्या दोघांचा फेर झाला नाही, आता 'क' ला फेर चढवायचा आहे या साठी काय करावे लागेल
Question by प्रकाश आनंदा हिरवे
16-11-2017
prakashhirve2@gmail.com
नमस्कार सर
माझ्या मालकीचे क्षेत्र आहे परंतु त्यावर भोगवटदार म्हणुन देवस्थानचे प्रथम नाव आहे तशेच त्या जमिनिला लागुन वनक्षेत्र आहे तरी मला माझ्या नावावर असलेल्या एकुण क्षेत्रापैकी काही आवश्यक क्षेत्र वनखात्याला देऊन वनखात्याची जागा मला शेती व शेती पुरक व्यवसाय व शेतामध्ये ये-जा करण्याकरिता शेत रस्त्याकरिता मिळेल का... त्याकरिता कोणती कार्यपध्द्त आहे काय करावे लागेल ..............
जमीन देवस्थानची आहे . आपण केवळ वहिवाटदार आहेत . त्यामुळे आपणास हि जमीन वन विभागास देता येणार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by योगेश जमदाडे
16-11-2017
yogeshjamdade@gmail.com
कृपया,तालुक्यातील mobile tower वसुली बाबत मार्गदर्शन करावे
Question by vikram
15-11-2017
vikram.vy11135@gmail.com
नमस्कार सर ,आपण करीत असलेल्या मार्गदर्शनासाठी खूपच धन्यवाद .मल्ल अशे विचारायचे आहे कि माझे आई आणि दौन बहिणींनी दिवाणी कोर्टात तडजोड होऊन हकासोडपत्र तिघींनि माझ्या नावे जमिनीतील सर्व हक्क सोडला आहे . तसा हुकूम नाव कोर्टात झाला आहे ,पण माझ्याकडून एक चूक झाली कि ती कागद पत्रे तलाठी ऑफिसला नोंदवाली नाही ,त्या मुळे ७/१२ वर त्या तिघींचीच नावे राहिली व आता ती जमीन त्यांनी एकाला विकली आहहे .त्याचा दस्त बनून तो तलाठी यांच्याकडे नोंद करण्या साठी अल्ला आहे .त्याला मी हरकत घेतली आहहे व तो दस्त बेकादेशीर आहहे त्यांची नोंद धरू नये म्हणून विनंती केली आहहे तर तलाठी माझे विनंती मान्य करील का ? मला प्रांत साहेबानी त्याचे आदेश माझ्या विरुद्व दिला आहहे .मी फुडें काय करू कृपया मार्गदर्शन करा हि नम्र विनंती. नोंद धरण्यासाठी किती कालावधी असतो ?ती चूक सुधारू शकतो का ?
१. कोर्टाचे तडजोडनाम्याप्रमाणे , हक्कसोड दस्त नोंदणीकृत केला का ? दस्त नोंदणीकृत केला असल्यास , आपले दस्त अगोदरचा असल्याने आपल्या जमिनीतील हक्कास कोणतीही बाधा येणार नाही .
२. मात्र केवळ कोर्टात तडजोड नामाझाला असेल व हक्क सोड दस्त नोंदणीकृत नसेल तर , आपणास प्रांत अधिकारी यांचेकडे अपील करून काही उपयोग होणार नाही .
३. उपरोक्त अनु क्र २ मधील स्थिती असल्यास , आपणास ज्या दस्तांनी आई व बहिणीने तिसऱ्या व्यक्तीस जमीन विकली आहे तो दस्त रद्द करण्यासाठी दिवाणी दाखल करणे आवश्यक आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गोरोबा दगडू पवार
15-11-2017
gorobap@gmail.com
एका महिलेने तिची जमीन एका संस्थेला 1975 साली विकली होती आणि काही कारणास्तव खरेदी खत करण्याचे राहून गेल्याने 1985 साली खरेदी खत नोंदणी करण्यासाठी दाखल करण्यात आले तद्नंतर ते खरेदी खत 2015 साली नोंदणीकृत केले पण या दरम्यान त्या महिलचा मृत्यू झाला आणि वारसाने सदरची मिळकत नवर्याच्या नावे झाली व त्याने ती तिसऱ्या व्यक्ती ला नोंदणी कृत खरेदी खताने विकली आणि तो खरेदी खत फेरफार नोंद घेण्यासाठी तलाठी यांचेकडे आलेला असुन त्या फेरफार नोंदी ला त्या मुळ संस्थेने हरकत घेतली आहे
१. २०१५ साली दस्त नोंदवण्यात आला .
२. मात्र त्या पूर्वी महिलेच्या नवऱ्याने ती जमीन , दुसऱ्या व्यक्तीस जमीन विकली आहे .
३. ज्या व्यक्तीने जमीन विकली आहे ती महिला मयत आहे . त्यामुळे फार काही उपयोग होईल असे वाटत नाही
४. मात्र जर जमिनीचा ताबा , संस्थेकडे असेल , व संस्थेने खरेदी किंमत अथवा त्याचा काही भाग , महिलेस दिला असल्यास , मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२ च्या कलम ५३ अ चा आधार घेऊन न्यायालयात दिवाणी दाखल करून , दुसऱ्या व्यक्तीस जमीन विकली आहे तो दस्त रद्द करून , संस्थेची मालकी जाहीर करून मिल्ने बाबत दावा दाखल करता येऊ शकेल .
५. चांगल्या वकिलाचा सल्ला घ्यावा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमोल चव्हाण
13-11-2017
amol.chavan25Qrediffmail.com
सर नमस्कार -माझा प्रश्न आहे की आम्हाला कुळकायद्याने ३२ ग वर्ग २ ची जमीन १९६५ मध्ये मिळाली आहे ,परंतु चारी बाजूच्या शेतकर्यांनी अतिक्रमण केले आहे ,आम्हाला मोजणी करायची आहे ,त्यासाठी तालुक्याला भूमी अभिलेख ऑफिसमध्ये अर्ज केला होता .परंतु जमिनीच्या गटाचा उतारा मिळाला ,परंतु सर जमिनीच्या फाळणीचे उतारा मिळणार नाहीत ,सापडत नाहीत ,रेकॉर्ड जीर्ण झाले आहे असे सांगण्यात आले ,तर साहेब फाळणीचे उतारे मिळण्यासाठी कुटे अर्ज करावा लागेल,व मोजणीसाठी काय करावे लागेल ,साहेब मार्गदर्शन करा
१. किंमत निश्चित झाली त्याचवेळेस , जमिनीची जोंनी करून घेणे आवश्यक होते .
२. हिस्सा मोजणी नकाशा उपलब्ध नसेल तर , वहिवाटीप्रमाणे , मोजणी केली जाते
३. आपले प्रकरणात , शेजारील खातेदारांनी , अतिक्रमण केले आहे , त्यामुळे ते त्यांनी अतिक्रमित केले क्षेत्र त्यांचे वहिवाटीखाली असल्याचे दाखवणार .
४. शेजारील खातेदार बरोबर चर्चा करून , प्रश्न सुटू शकतो
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by किशोर धनराज राठोड
13-11-2017
rathodkishor15@gmail.com
सर दुय्यम सेवा परीक्षा पास असल्यास महसूल अहर्ता परीक्षेला बसण्या करिता 3 वर्ष कनिष्ट लिपिक म्हणून सेवा आवश्यक आहे काय
Question by श्रेयस जोशी
12-11-2017
shreyasrjoshi26@gmail.com
"अ" नावाची व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला "ब, क, ड" इत्यादी तीन आपत्ये आहेत. "अ" ने मृत्युपत्र करुन सर्व मिळकत "ड" च्या नावे केली. मृत्युपत्राप्रमाणे संपूर्ण सातबारे "ड" च्या नावाने झाले.
"ब" नावाचा मुलगा मयत झाला, त्याचा मुलाला सदर जागेवर हिस्सा मिळूशकेल का ? त्यासाठी काय करावे लागेल ? सदर जागा ही वडिलोपार्जीत आहे. सदर जागा "ड" च्या ताब्यात आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
हो . ब च्या मुलाने दिवाणी न्यायालयात दावा दाखल करणे आवश्यक आहे .
अ ला केवळ त्याचे हिस्स्याला योनीच्या मिळकतीचे मृत्य पत्र करता येते . वरील उदाहरणात , अ त्याची तीन अपत्ये , म्हणजे अ हयात असताना वाटप झाले असे तर , मिळकतीचे ४ हिस्से झाले असते . अ स्वतः , व तीन अपत्यांचा प्रत्येकी १ हिस्सा . अ केवळ एकूण मिळकतीपैकी १/४ हिस्सायचे मृत्यपत्र करू शकला असता .
ब च्या मुलास , त्याचे वडिलांचे हिस्स्यास येणाऱ्या १/४ हिस्सा वेगळा करून मिल्ने व त्याचा ताबा मिल्ने करता , The Specific Relief Act खाली दिवाणी न्यायायालयात दावा दाखल करावा लागेल .
मात्र वरील उदाहरणात , अ कधी मयत झाला आहे ?
२००५ नंतर जर मयत झाला असेल व अ ला मुली असतील तर , मुलींनाही हिस्सा देवा लागेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by कुणाल जाधव
11-11-2017
mr.k1387@gmail.com
A गावातुन B गावचे विभाजन झाले. विभाजन मध्ये A गावा मध्ये पूर्वीचे गावठन समविश्ठ झाले. आणि B गावा मध्ये गावठन नाही. पण B गावात नकाशा मधे पाडे ची नोंद आहे तर त्याना गावठन समजुन या मध्ये इमारत चे बांधकाम करायचे आहे. तर B गावा मधील जे पाडे आहेत त्यांनाच गावठन समजुन त्या ठिकाणी बांधकाम परवानगी देणे बद्दल शासन निर्णय आहे का ?
जो पाडा त्यास गावठाण जाहीर करणे आवश्यक आहे .मग त्या नंतर बांधकाम परवानगी ग्राम पंचायत देऊ शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शंकर काकडे
09-11-2017
shankarbkakade@gmaiul.com
महोदय श्री किरण पाणबुडे सर
१) ए कु पुढारी फेरफार आव्हानात करताना सगळे ७/१२ अभिलेख पण अर्जासोबत जोडायचे का?
२) गावातील मुलांसाठी क्रिकेट व इतर खेळ खेळण्यासाठी मैदान हवा आहे तर मैदान मिळणेसाठी काय करावे लागेल?
३) गावातील तलाव दुरुस्त करायचा कारण बांध तुटला आहे, नीट बांधकाम करायचा आहे, तर जलशिवार योजनेअंतर्गत होऊ शकेल तर कुठे अर्ज करावा लागेल आपण योग्य ते मार्गदर्शन करावे विनंती .
1. हो
२. जिल्हाधिकारी यांचेकडे ग्राम पंचायतीने अर्ज करावा
३. आपण तहसीलदार यांना भेटून , तलाव दुरुस्त कातणे बाबाबत विंनती करा . सदरचे काम लेबर बजेट मध्ये समाविष्ट करावे लागेल . तसेच त्यास तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घ्यावी लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by किशोर पोपट पंडित
08-11-2017
pandit.kishor.06@gmail.com
माझ्या वडिलांनी वर्ष २००४ मध्ये इगतपुरी, जि. नाशिक येथे फ्लॅट विकत घेतला होेता. सदर इमारतीमध्ये एकूण १६ फ्लॅट होते. त्यापैकी फक्त ४ फ्लॅट विकले गेले. दोन वर्षानंतर सदर इमारतीच्या मालकाने इतर (१२ फ्लॅट) दुस-्या व्यक्तीस विकले. त्याने तिस-्या व्यक्तीस विकला. आम्ही जेव्हा सदर व्यक्तीस भेटून आमच्या फ्लॅटची घरपट्टी आमच्या नावावर करून देणेबाबात विचारले तेव्हा त्यांनी नकार दिला. नगरपालिकेत याबाबत विचारले असता तुम्ही त्यांची एन ओ.सी. आणा असे सांगितले. तसेच सर्व फ्लॅटवर सदर नविन मालकाच्या नावाची नोंद नगरपालिकेत झालेली आहे. आता घरपट्टी थकीत राहिल्याने नगरपालिकेतील कर्मचारी सील लावण्याबाबत सांगत आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
आपण आपले खरेदी खत नगरपालिकेत सादर करा . अर्ज द्या .
नगरपालिका आपली घर पती लावण्यासाठी तुम्ही ज्याच्याकडून घर घेतले त्याला नोटीस देईल . त्याने प्रतिसाद दिला ठीक . त्याने जर प्रतिसाद दिला नाही तर , घरपट्टी आपले नावावर करणे नगरपालिकेस बंनधन कारक आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3400 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
