जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

श्री. किरण पानबुडे साहेब,

साहेब आपणास वयक्तिक भेटून सदर संपादित जमिनी बाबत सर्व फेरफार, कागद, उतारे, नकाशा व अहवाल पाहून आपण मार्गदर्शन करण्यास वेळ देऊ शकत असल्यास कृपया कळवावे.

आपण आपल्या कामाच्या व्यापातून हि सेवा करत आहात त्याबद्दल आपले नम्र आभार.

रोहिदास काळे
+९१-७६६६६८४६८५
जिल्हाधिकारी यांनी भूमिहीनांना वाटप केलेल्या जमिनीना वन खात्याने विक्री करण्यास बंदी घातली आहे परंतु सादर जमिनी ह्या १९०२ साली महसूल खात्याकडे हस्तांतरित झाल्या बाबतची नोंद वनखात्याकडे आहे तरी हि वन खाते अश्या जमिनींना विक्रीस परवानगी देत नाही त्या साठी काय करावे लागेल
सर माझा प्रश्न असा आहे कि जर , एखादी व्यक्ती ६ वर्षांपूर्वी मयत झालेली असेल आणि त्यांच्या शेतजमिनी ला कोणीही वारस म्हणून नाव लावले नसेल तर, आणि ६ वर्षांनंतर एखाद्या व्यक्तीने मयत व्यक्तीशी असलेले नाते पुरावे सादर करून सर्व शेतजमिनी ला नाव लावून घेतले तर ते योग्य आहे का ?कारण ६ वर्षांमध्ये कोणीच नाव लावत नसेल तर जमीन सुरक्षित करून घेण्यासाठी नाव लावणे योग्य कि अयीग्य ?
नमस्कार सर,
आम्ही एक किरायदार ठेवून 18 वर्षे झाले आहेत आमच्या चांगल्या संबधातील असल्यामुळे आम्ही त्याला इतके वर्षे राहू दिले पण आता तो भाडेवाढ करत नाही आणि घर खाली कर म्हणाल तर मला जेव्हा दुसरी जागा भेटेल तेव्हा करील म्हणतो आम्ही त्याच्या कडून 11 महिन्याचा 100 रस चा बॉंड नोटरी करून घेतला आहे त्याला कस काढव आणि तो कब्जा काही करू शकतो का सगळे डोकमेण्ट आहेत आमच्या कडे घराचे व मीटर व घर पट्टी नळ पट्टी माझ्या नावे असून मीच स्वत: जाऊन भरतो. कृपया सोयीस्कर मार्ग सुचवावा
माझी तालुका बदली होऊन ३ महिने झालेत पण माझे सेवा पुस्तक जुन्या तालुक्याने अजून नवीन तालुक्यास सुपूर्द केलेले नाही. नवीन तालुक्यातील अधिकारी सेवा पुस्तकासाठी माझ्याकडे तगादा लावत आहेत तर जुन्या तालुक्यातील अधिकारी सेवा पुस्तक माझ्या स्वाधीन करण्यास नकार देत आहेत. त्या संबधी माझे काही प्रश्न आहेत. बदली झालेल्या कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तक नवीन कार्यालयास सुपूर्द करण्याची कार्यपद्धती काय आहे? जुन्या कार्यालयाने किती दिवसात सेवा पुस्तक नवीन कार्यालयास सुपूर्द करायचे असते? बदलून गेलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तकाच्या हस्तांतरणात काय भूमिका असते, तो स्वतः जुन्या कार्यालयास सेवा पुस्तकाची मागणी करू शकतो का? जर सेवा पुस्तक बदली झालेल्या कर्मचाऱ्याच्या स्वाधीन केले जाऊ शकत नाही तर एका तालुक्यातून/जिल्ह्यातून दुसऱ्या तालुक्यात/जिल्ह्यात सेवा पुस्तक हस्तांतर कसे होते, ते जर पोस्टाने केले जात असेल तर सेवा पुस्तक गहाळ झाल्यास कोण जबाबदार असते?
कृपया मार्गदर्शन करावे.

Question by Avinash Rasam
26-03-2018
Avinashrasm522@gmail.com

सर,माझे आजोबांनी सन 1935 मध्ये जमीन वाटप दावा जावला होता.त्याचा निवाडा सन 1949 मध्ये लागुन प्रत्यक्ष ताबे देण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे सन 1950 मध्ये आला.त्यानंतर ताबे देणेची कार्यवाही सन 1954 मध्ये सुरु झाली.सर्व पक्षकारानी पैसे भरले. 75 टक्के लोकानी ताबे घेतले.12.50 टक्के लोकांनी वाटपास लेखी सहमती दिली.उर्वरीत 12.50 टक्के लोकानी वाटपास हरकत जिल्हाधिकारी यांचे कडे घेतली.त्याच्या हरकती केस चालवुन जिल्हाधिकारी यांनी फेटाळुन लावल्या.त्यावर त्यानी मा.लोकायुक्ता मुबई यांचे कडे सन 1958 मध्ये अपिल केले.हे अपिल त्यानी वकिला करवी चालवल्यानंतर लोकायुक्ता यानी हे अपिल1958मध्ये फेटाळत मा.जिल्हाधिकारी यानी केलेले वाटप कायम केले.यानतंर विराधकानी कुठेही अपील केलेले नाही.त्यांनतर ताबे घेतलेल्यानी आपली नावे 7 .12 सदरी लावुन घेतली.त्याच्या वहिवाटी सुरू झाल्या.असे असताना. काही पक्षकारानी पुन्हा वाटप मान्या नसले बाबत जिल्हाधिकारी यांचे कडे सन 1964मध्ये तक्रारी केल्यामात्र या तक्रारीत मा.लोकायुक्त यांचे कडे झालेल्या अपिलाचा त्यांनी उल्लेख केलेला नाही.असे असताना 1964 मध्ये जिल्हाधिकारी विरोधी पक्षकाराच्या तक्रारी अर्जावर जिल्हाधिकारी करीता यांनी आम्हाला नोटीसी न करता फेर वाटपाचा शेरा केला.याची कल्पना माझे आजोबा यांना समजल्यावर त्यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज करत व मा. आयुक्त यांचे कडे चाललेल्या अपिलाची कल्पना दिलेवर जिल्हाध्किारी यांनी माझे आजोबाना तुम्हाला दिलेले ताबे अबाधित असुन फेर वाटप करणे झाल्यास किरकोळ फेर बदल केले जातील असे कळविले. त्यानतंरही आम्हाला रितसर ताबे दिले आहेत.काही ताबे दिवानी कोर्टाने उत्पनासह आम्हाला दिले आहेत.आम्ही आमच्या जमीणीत लागवडी सुधारणा केल्या आहेत. गेली चाळीस वर्षे आमच्या वहीवाटी विनाकटकट सुरू असतानाच चाळीस वर्षानी सन 1990 मध्ये तहसिलदार यांनी जिल्हाधिकारी याच्या सन 1964 च्या फेर वाटपाचा आधार घेत आम्ही घेतलेले ताबे रदद करणेच्या आम्हाला नोटीसी दिल्या..या वाटपात एकुण 50 पक्षकार असताना फक्ता 5 जणाना नोटीसी बजावत तहसिलदार यानी केस चालवली.व आम्हाला दिलेले ताबे रदद केले. यावर आम्ही प्रांताधिकारी यांचे कडे अपिल केले.त्यांनी अपिल मान्या करत प्रकरण फेर चौकशी व उचित निर्णयाकरिता तहसिलदार यांचे कडे पाठविले .यावर विरोधी पार्टीने जिल्हाधकिारी यांचेकडे अपिल केले.त्यानी अपिल फेटाळत जुने झालेले वाटप कायम केले.यावर विराधी पार्टीने हायकोर्टात मध्ये सन 1994 मध्ये रिट दाखल केली.हायकोर्ट यांनी जितहसिलदार याना फेर वाटप करता येईल का अशी विचारणा केली आहे.याच दरम्यान सन 2005 मध्ये दिवाणी न्यायालयाने मुळ दरखास्ता मुबंई हायकोर्ट रुलिग A.I.R.2001 bombay 303 .21.3.2001 अन्नासाहेब नगाणे वि.राजाराम नगाणे या अन्वये निकाली काढली आहे.या बाबत माझे प्रश्ना असे..55 वर्षापुर्वी दिलेले ताबे एवढया प्रदिर्घ कालावधीनंतर रदद करता येतात का. 2. आयुक्ता यानी कायम केलेले वाटप त्याची परवाणगी नसताना जिल्हाधिकारी अगर तहसिलदार याना रदद करता येते का. 3.वाटपात 50 पक्षकार असताना फक्ता 6 जणानी नोटीस देवून तहसिलदार यांनी चालविलेली केस रदद केलेले वाटप योग्या कि अयोग्या 4 लोकायुक्त याचे 1958 च्या निवाडयाची वैध्यता किती.
सर ,

सध्या online ७/१२ उतारा मिळतो (काही app) आहे . माझा प्रश्न आसा होता कि जेव्हा मी या app मध्ये माझ्या आजोबांचे नाव सर्च करतो तर ते शिवा सहादु यादव . असे येते कि मुळात सातबारावर शिवराम सहादु असे नाव आहे तर हे असे असल्यामुळे भविष्यात काही प्रॉब्लेम येणार नाही का . आणि जर ऑनलाईन ७/१२ ची दुरुस्ती करायची असेल तर ती कशी करता येऊ शकते.


धन्यवाद ,

संदीप यादव
हे नाव दुरुस्त करता येईल . आपले तलाठी यांचेकडे संपर्क साधा .
ज्या गावात जमीन आहे , ते गावाचे ३ नम्बरचे declaration झाले नसेल तर , re edit या utilitychya माध्यमातून दुरुस्ती करता येते .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जर मूळ जागा मालकाने एका व्यक्तीशी रजिस्टर साठेखत सम्पूर्ण जागेचा(५५ गुंठे ) करार केला आहे .आणि त्या साठेखत कराराच्या आधारे त्याने दुसऱ्यास नोटरी करारच्या आधारे त्यातील काही जागा (२ गुंठे ) विकली आहे परंतु साठेखत धारक मालकाने त्याचे साठेखत रद्द करून संपूर्ण जागा (५५ गुंठे ) मूळ मालक व तिसरा यांच्यात व्यवहार घडवून नोटरी करार धारकाची २ गुंठे जागा कब्जा करून फसवणूक केली आहे तर नोटरी धारकास जागेचा ताबा मिळू शकतो का ?
साठे खताचे आधारे , मालकी प्राप्त होत नाही अथवा मालकी हस्तांतरण होत नाही .त्यामुळे वरील प्रश्नातील , २ गुंठे जागा खरेदी करणाऱ्यास , कोणतीही मालकी प्राप्त झालेली नाही .
साठे खत जर नोंदणीकृत असेल तर , ते नोंदणीकृत दस्ताद्वारेच व दोघांचे संमतीनेच रद्द करता येऊ शकते . एकतर्फी साठेखत रद्द करता येत नाही .
नोटरीधारक ज्याच्याकडून त्याने जमीन घेतली आहे त्या विरद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकतो मात्र त्यातून त्यास २ गुंठे जाडा मिळणार नाही मात्र खरेदी पोटी दिलेली रक्कम मिळू शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

शेतजमीन मोजणी करत असताना लगतचे शेतकरी अडथळा आणत असतील तर मोजणी कशी पूर्ण करता येईल?अतिक्रमण निघाल्यास कसे हटवता येईल? मोजणी साठी पोलीस बंदोबस्त मिळेल का? कृपया मार्गदर्शन करावे.
शेतकरी मोजणीस अडथळा आणत असतील तर , आपले मागणीप्रमाणे , पोलीस सौरक्षण मिळू शकेल . अतिक्रमण झाल्याचे सिद्ध झाल्यास आपण , The Speccific Relief Act खाली दिवाणी न्यायालयात दावा दाखल करू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय,
माझ्या गावामधे पाटबंधारे विभागाच्या् कालव्याच्या भुसंंपादनाचं काम २००८ साली पुर्ण होऊन कालवा खुदाईचं काम २०१२ ला पुर्ण झाले व प्रत्यक्ष कालव्यात पाणी २०१४ साली आले.दरवर्षी पाणी आवर्तनावेळी मा.जिल्हाधिकारी कालवा परीसरात कलम १४४ लागु करतात याचा अर्थ कालव्याचा मालकी शासनाकडे आहे हे सिद्ध होते.माञ काही तांञिक अडचणींमुळे भुसंपादनाचे प्रस्ताव व्यपगत झाले असल्यामुळे नुकसान भरपाई प्रलंबित आहे.परंतु आता मा.जिल्हाधिकारी यांनी नवीन भुसंपादन कायद्यान्वये वैयक्तिक वाटाघाटीतुन भुसंपादन करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार कलम ११ ची अधिसुचना नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे.त्यामुळे भुसंपादनाचा मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी सदरच्या रकमेवर पुर्वलक्षी प्रभावाने भुमी संपादन २०१३ कलम ८०नुसार सण २०१२ ते २०१८ पर्यंत सदर मोबदला व्याजासहित मागु शकतो का किंवा मी त्यास पाञ आहे का? याबाबत संविस्तर मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती....
कलम ८० खाली जाहीर निवाडा रकमेचेया प्रथम वर्षासाठी ९ % तर पुढी वर्षासाठी १५ % दराने व्याज देण्याची तरतूद आहे . वरील प्रश्नात , निवाडा व्यपगत झालेला आहे . व कलम २४(२) अन्वये राज्य शासनाने , नव्याने भू संपादनाची प्रक्रिया सुरु केलेली आहे . त्यामुळे कलम ८० खाली व्याज मिळणार नाही .
कलम ८१ खाली तात्पूत्या कालावधीसाठी जमीन ताब्यात घेण्याचे राज्य सरकारला अधिकार आहे . मात्र सदर जमीन केवळ ३ वर्ष कालावधीसाठी घेता येते . कलम ८१ खाली या प्रकरणाचा विचार केला जाऊ शकतो किंवा सानुग्रह अनुदान देणे हा एक पर्याय असू शकतो .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
मि राहनारा मुं आडिवली उर्फ किरवली पों तलोजा तां पनवेल जिं रायगड या गावात्ल्या जमिनिवर
सर्वे नंबर जुना 1/ब/ नवीन 90/ब/1/ या जमिनीवर
तारिख 26/09/1957 मध्ये साधे कुल दाखल आहे फेरफार
मध्ये नोंद आहे जुना सातबारा तलाठी कडे भेटत नाय
तहसील दार कडे आर्ज केले तीतही भेटत नाय त्यांच्याकडे नवीन 90/ब /भेटतो पन जुना 1/ब / हा सातबारा भेटत नाय आणी नवीन सातबारावर माझे आजोबा कै पांडु आंबो पाटिल यांचे नाव दिसत नाय त्या सातबारावर आर्विंद प्रों लीं अहमदाबाद असा नाव आहे परंतु मीझे आजोबांचे कुला मधले नाव दाखल नाय सातबारावर इत्तर हक्कात नाव लावन्यासाठी काय करावे लागेल सर मार्गदर्शन द्या



एकनाथजी
१. जुना ७/१२ मिळत नसेल , ज्या फेरफाराने आपले आजोबांचे नाव मिळकती ला कुल म्हणून दाखल करण्यात आले , तो फेरफार शोधा.
२. जर फेरफारही मिळत नसेल
अ. जमीन सध्या कोण कसत आहे ?
ब. ७/१२ चे कसणाराचे सदरी आपले आजोबा , त्या नंतर आपले वडील - आपण यांची नावे आहेत का
३. अनु क्र २ मधील सर्व उप प्रश्नांची उत्तरे होय असतील तर आपण सध्या हि महाराष्ट्र कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ च्या कलम ४ व ७० ब अन्वये , आपण या मिळकतीचे कुल आहेत म्हणून दावा दाखल करू शकता .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय,
श्री. किरण पानबुडे साहेब,

कृपया मी विचारलेल्या प्रश्नांची आपल्या कडून उत्तरांची वाट पाहत आहे. मागे ३-४ प्रश्न मी आपल्या जानपीठ माध्यमातून विचारले आहेत तरी आपल्याकडून त्याच्या वर मार्गदर्शन मिळेल अशी आशा ठेवून आपणास नम्र विनंती करत आहे.

रोहिदास हरिभाऊ काळे
नमस्कार सर,
माझे गावाकडे वडिलोपार्जित सर्वे नंबर ०१ हा आहे या सर्वे नंबरचे मुळरेकॉर्ड खासरा व पाहणी पत्रक तहसील कार्यालयात उपलब्ध नाहीत. तरी या सर्वे नंबर चे त्या काळातले इतर कोणते रेकॉर्ड तहसील किंवा लॅन्डरेकॉर्ड कार्यालयात मिळतील.मूळमालक व क्षेत्र माहित करावयाचे आहे तरी मार्गदर्शन करावे हि विनंती

Question by mahadev pawar
17-03-2018
002atul@gmail.com

नमस्कार सर
माझ्या वडिलांनी गावठाण जमीन रजिस्टर खरेदी खताने २०१५ मध्ये १ का व्यक्ती कडून खरेदी केली आहे,त्यावेळेस त्यांना सांगण्यात आले की ८ अ उतारा हा गावठाण चा उतारा असतो ,आणि आपले गावाचा सिटी सर्वे झालेला नाही म्हणून गावातील लोकांनी पण हेच सांगितले, त्यामुळे वडिलांनी ८ अ उताऱ्याच्या आधारे खरेदी केली, व वडिलांचे नाव पण 8अ उताऱ्यावर लागले आहे,जेव्हा मी बँकेत होम लोण साठी अर्ज केला तेव्हा 8अ उतारा चालत नाही हे समजलं,मी सिटी सुर्वे ला गेल्यावर कळलं की गावातील जागेची नोंद सिटी सर्वे ला खूप आधी पासून आहे व घेतलेली जमीन आहे ती त्याचा वडिलांच्या नवे आहे,,,,
१)आता मला सिटी सर्वे ला नाव लावायचं आहे परंतु सिटी सर्वेला त्या आधीच्या मालकाची पूर्ण वारस नोंद करून घ्यावी लागेल,पण ज्याच्याकडून खरेदी केली तो म्हणतो की त्याच्या बहिणी सही करनर नाहीत ,मी काय नाव लावून देऊ शकत नाही,
२)खरेदी खतावरून माझे वडिलांचे नाव सिटी सुर्वे ला लावलं जाऊ शकत ,नाही का? माझ्याकडे 8अ उताऱ्यावर वडिलांचे नाव आहे, 8अ उताऱ्याच्या आधारे काय करता येईल का सिटी सुर्वेला
कृपया मदत करावी


होय सर ८ अ चा उतारा म्हणजे ग्रामपंचाय घर पट्टी उतारा,
ग्रामपंचायत अजून पण म्हणत आहे की सिटी सर्वे झालेला नाही, जेव्हा होईल तेव्हा आम्ही माहिती सिटी सर्वे ला देऊ,
पण सिटी सर्वे तर १९८२ ला झालेला आहे
ग्रामपंचायत घरपट्टी ला नोंद खरेदी खताद्वारे केलेली आहे,
मी परत सिटी सर्वे ऑफिस ला चॉकशी केली ते म्हणत आहेत ८ अ उतारावरून काही होत नाही तुमचं नाव सिती सर्वे ला लागत नाही ,

सर प्लीज मदत,मार्गदर्शन करा
थोडक्यात आपण जमीन खरेदी करताना जी काळजी घेणे आवश्यक होते ती काळजी घेतलेली नाही . जमीन , मिळकत खरेदी करताना , जमिनीचा Title Search ( मालकी हक्क ) शोध घेणे व वर्तमान पत्रात जाहीर नोटीस देणे आवश्यक आहे . हे केले असते तर आपण Bonafide purchaser झाला असता व आपण त्या आधारे दिवाणी दावा दाखल करून , प्रॉपर्टी कार्डला नाव दाखल करू शकला असता .
या बरोबरच , विकणाऱ्यानेही , आपणास संपूर्ण माहिती देणे आवश्यक होते . आपणास जमिनीचे सिलेले पैसे हवे असतील तर आपण , फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकता मात्र आपणास जमीन मिळणार नाही
जमीन हवी असल्यास बहिणींशी तडजोड करावी लागेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर क्रुपया सहकार्य करावे.माझे नाव.विलास मिसाळ शेत मालकाने प्लॉटिंग करून रजेस्ट्रि खरेदीखत विकली व घेणारा .अ. ह्याने खरेदी खत केले पण फेर नावे घेतला नाही.व त्याने 3वर्षा नंतर .ब.ह्या व्यक्तीस विकले व त्याचाही नावे फेर झाला नाही.व 7/12 नाव आले नाही.व त्यानेही 5 वर्षा नंतर माझ्या वडलांना रजेस्ट्रि खरेदी खत करून विकले.व मला माझ्या वडलांच्या नावे 7/12 घायचा आहे.त्यास काय करावे लागेल.व माझ्या कडे सर्व झालेला व्यवहार खरेदी खत आहे.पण प्लॉटिंग करून (विकणारा)आणि (अ) ह्या दोघांचा खरेदी खत माझ्या कडे नाही.व मी त्यांचे खरेदीखत काढण्यास पात्रं ठरतो का व ते मला कश्या आधारे मिळेल.सहकार्य करावे धन्यवाद.
सर्व खरेदी खते गाव कामगार तलाठी यांचे कडे द्या . आपले नाव दाखल होईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,एखादा व्यक्ती /सोसायटी इमारतींबाबत म.न.पा.मध्ये कर भारत असेल तर आज रोजी शहरी भागात बिनशेती परवानगी आत शिथिल झाल्याने शासनाकडे बिनशेती कर भरणे गरजेचे आहे का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती...
माननिय मोहदय,

माझा प्रश्न आहे कि, कोणत्याही विषया संदर्भात ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावा विरोधात हरकत घेता येते का?

कळावे हि विनंती.
आदरणीय मोहदय,

१) माझा असा प्रश्न आहे कि, एखाद्या गावठाणातील किंवा शेत जमिनी वर तार-कुंपण किंवा वॉल-कंपाऊंड भिंत बांधायची असेल तर ग्रामपंचायत परवानगी ची आवश्यकता असते का?

२) अर्ज कश्या प्रकारे करता येईल व त्या सोबत काही उतारे द्यावे लागतील का?

३) जर परवानगी आवश्यक असेल तर किती दिवसात परवानगी देणे ग्रामपंचायत ला बंधन कारक आहे?

४) जर ग्रामपंचायत परवानगी देत नसेल तर काय करावे?

कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.
नमस्कार सर , माज्या काकांनी माज्या वडिलाना बक्षिसपत्राने जागा वडिलांच्या नावे करून दिलेली आहे. तर ती जागा आम्हाला विकता येते का? वडील ह्यात असताना आणि ह्यात नसताना याचे काही नियम आहेत का ? असतील तर सांगावे हि नम्र विनंती.
सर ' अडवलेला रस्ता मोकळा करण्यासाठी मी तहसीलदारांकडे विनंती अर्ज केला होता पण तो रस्ता मला मोकळा करून दिला नाही.स्थळ पाहणीत माञ असे लिहिले आहे की रस्ता मोकळा करून दिला आहे. सरळ पाहणी तहसिलदार यांनी स्वत: केली आहे.योग्य ते मार्गदर्शन करावे ही विनंती आहे.
कृपया
मला करमणुक कर विषक माहिती हवी होती
माझया कडे एका चित्रपटगृह चालकाने एक पडदा चित्रपटगृहास दोन पडदा चित्रपटगृह करणे बाबत परवानगी मागीतली आहे.
करिता मार्गदर्शन करावे

Question by Ajay kamble
09-03-2018
kambleajay4u@gmail.com

नमस्कार आदरणीय सर, मी 2010 मध्ये home loan घेऊन flat खरेदी केला. मी applicant आणि वडील coapplicant आहेत. Flat माझ्या च नावावर आहे. तेव्हा वडिलांनी आणि मी दोघांनी मिळून थोडी टोकण अमाऊण्ट भरली. आणि तेव्हा गरज लागली म्हणून personal loan काढला. पण 2010 ते आतापर्यंत मी एकटाच (home loan) emi and personal loan भरत आहे. 2014 मध्ये माझ्या job चा problem झालेला. तेव्हा मला 3 month payment मिळत नव्हता. त्या वेळेस मी बाहेर रात्रंदिवस काम करुन वणवण फिरुन आणि मित्रांकडून घेऊन emi and personal loan (emi) भरले. कारण दोन्ही रक्कम मोठी आहे. त्या वेळी वडिलांनी एकदाही विचारले नाही की loan कसे भरावे आणि मदत ही केली नाही. त्या नंतर मला job मिळाला. परंतु त्या office मधे पगार लेट मिळायचा. त्यामुळे emi तारीख निघून जायची. Emi amount bounce व्हायची. मी fine सहीत सगळी ammount भरायचो. वडील govt.servant (police) आहेत. Coapplicant ची जबाबदारी असते की applicant ला ammount (emi) वेळेवर भरता आली नाही तर त्यांनी भरावी. परंतु तेव्हा वडिलांनी मदत केली नाही. विचारले सुध्दा नाही. मी वडिलांना त्रास नको म्हणून मी माझ एकटाच home loan, personal loan भरुन घरात पण रूपये देत होतो. नंतर 6 महिन्यांनंतर मला चांगला job मिळाला. पण 2010 ते आता पर्यंत माझी स्वतः ची काही सेव्हिंग नाही, गाडी नाही काहीच नाही. सगळा पगार home loan, personal loan भरुन घरात खर्च करायला देण्यात जातो. मी 2016 मध्ये love marriage केले. आणि घरी न जाता रेन्ट वर रुम घेऊन राहतोय. लग्नानंतर 5 महिन्यांनी आई चांगले बोलायला लागली. माझ्या बायको बरोबर बोलु लागली. नंतर 7-8 महिन्यानी आई वडील बोलू लागले की वडिलांचे octomber 2018 मध्ये retiredment झाले नंतर reception करुन आम्हाला घरात घेतील आपण एकत्र छान राहूया. आणि जस retiredment झाली तस आई वडिलांनी विचार बदलला की 500000 देतो तु तुझ नवीन घर घे. आई बोलते flat माझ्या नावावर कर. आई बोलते वडिलांची retiredment व्हायची होती म्हणून आम्ही तुझा वापर केला. या घरात यायचे नाही. तु तुझ बघ आता. नवीन लोन घे. मला लहान भाऊ आहे. त्याच आता शिक्षण पूर्ण झाले. तो शांत बसलाय. मी घर आधी च घेतले त्यामुळे घर कमी किमतीत मिळाले. आणि माझ home loan and personal loan लवकर संपेल. आता घराच्या किमती फार वाढल्यामुळे आणि परत लोन चालू करणे मला आता अशक्य आहे. माझी स्वतः ची काहीच सेव्हिंग नाही. पगार home loan, personal loan, rent देण्यात जातो. मी आम्हाला घरात घेतो या आई वडीलांच्या शब्दावर विश्वास ठेवून home loan, personal loan, rent भरून आणि आईला ही रुपये देत राहिलो. माझी आतापर्यंत ची मेहनत रात्रंदिवस केलेले कष्ट मी फक्त घर आणि घरातले यांच्यावर खर्च खूप केला. माझ काम मला रांत्रदिवस करावे लागते. 10 वर्ष झाली मी काम करून सगळ घर सांभाळतोय. पण मी आता शून्यात आहे. मी हे वडिलांना सांगितले की माझी काही सेव्हिंग नाही आपण एकत्र राहूया तर वडील बोलतात आम्हाला जमणार नाही आणि की तुझ नाव बदल करून घे. म्हणजे वडिलांच आणि आडनाव बदल मग तु घरासाठी भरले तेवढे आणि आम्हाला जमेल तेवढे च रुपये आम्ही तुला देतो. नाव बदल तरच देतो नाहीतर काही च मिळणार नाही. नाव pan card, aadhar card वर दिसले तरच देणार. मी नावात बदल केला तर मला कधीच property वर आणि कुठेही हक्क मिळणार नाही त्यामुळे मी नावात बदल केला नाही. आता माझ्या flat ची किंमत तिपटीने मिळेल जर विकला तर. यामध्ये माझे कष्ट दिसत नाहीत. माझा भाव शांत राहिला आहे. भाऊ आईवडिलांच्या बाजूने आहे. मी आता शून्यात आहे. कारण आईवडिलांचा विचार करून सगळे रुपये मी home loan , personal loan rent आणि घरात आईला देऊन खर्च करत राहिलो. मी परत लोन नाही घेऊ शकत. मला माझे घर हवे आहे. कारण माझे कष्ट मेहनत त्यात आहे. माझे लोन कमी कमी होत आहे. घर देत नाहीत आई वडील. मी बोललो की तुमचे मला काही नको. तुमची सेव्हिंग तुम्हाला च ठेवा. तुम्ही सुरुवातीला दिले ते रुपये मी परत देतो. भावाला 150000 पगार आहे अस आई वडील बोलतात. मी काय करू. माझे घर मला कसे मिळेल. भांडण नको शांतपणे आणि प्रेमाने सगळ करु पण तस होत नाहीये. मी काय करू. Pls.help sir
नमस्कार सर माझ्या आजोबानी व त्याच्या भावाने सन १९५५ रोजी नोंदणीकृत खरेदीखताने जागा खरेदी केलेली आहे. सदर नोंदणीकृत खरेदिखतचा फेरफार नोंदवण्यात आलेला आहे. सदर नोंदणीकृत खरेदीखतामध्ये एकूण १८ ७/१२ होते . फेरफार देखील १८ ७/१२ साठी मजूर करण्यात आलेला आहे. परंतु तत्कालीन तलाठी यांनी फक्त ५ चा ७/१२ उतारावर खरेदीदारांची नावे नोंदवलेली आहेत. राहिलेल्या ७/१२ वर मूळ मालकाच्या वारसाची नावे आता ७/१२ सदरी दाखल आहेत. सर आता मला फेरफारच पूर्ण अंमल देण्यासाठी काय करावे लागेल.
नमस्कार सर,
माझ्या मालकीच्या काही ७/१२ उतारा सदरी महसूल अभिलेखा मध्ये कुठलाही फेरफार न होता परस्पर एका व्यक्तीचे नावं नोंदवण्यात आलेली आहेत. ७/१२ च्या मूळ बुकात हे नाव घुसवलेली दिसते. यासंदर्भात कुठे दाद मागता येईल.

Question by devendra tandel
06-03-2018
jyotitandel82@gmail.com

सर माझा प्रश्न आहे कि
१. १९३२ पासून संरक्षित कुल असूनही जमिनीस मालकाने १९६२ साली कुल नोंद कमी केली व ३ महिन्यांनी दुसऱ्या व्यक्तीस विकली परंतु मालकाचे वडील मयत असतानाही त्याची नोंद न करता मालकाच्या मुलाने कुलमुख्तियार करून विकली आता कुळाचे नातेवाईक त्या जमिनीवर दावा सानू शकतात का
२. तसेच संरक्षित कुल नोंद कमी करता येते का

This page was generated in 0.37 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3400
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3