जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by संतोष काशिनाथ पाटील
17-02-2018
skpatil@msn.com
नमस्कार साहेब,
मी एका गावात शेतजमीन खरेदी केली आहे. त्या जागेत जाणेंयेणेंसाठी लागतच्या शेतकऱ्याकडून मोबदला देऊन कायमस्वरूपी वाहीवाट करारनामा केला. सदर करारनामा स्टॅम्प ड्युटी भरून रजिस्टर केला. आता मला ह्याची नोंद त्या जागेच्या ७/१२ मधील इतर हक्कात "वहिवाईटीच्या रस्त्याचा हक्क" ह्या अधिकारात नोंद करायची आहे. तेथील तलाठी साहेबानी मला सांगितलं कि अशी नोंद होत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
तहसीलदार यांनी दिलेले उत्तर बरोबर आहे
जर ज्याचे शेतातून रस्ता घेतला आहे तो जर अडवणूक करत नसेल तर ७/१२ वर नोंद करण्याची गरज काय ?
अडवणूक केल्यास दिवाणी दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमोल चव्हाण
16-02-2018
amol.chavan25@rediffmail.com
साहेब नमस्कार
साहेब आमचे कौलारू मातीचे सामाईक मध्ये घर आहे ,घर मिळकती वरती आमच्या 3 जनाची नावे, त्यामधील १ नं चा मोठा भाऊ सन २००३ ला मयत झाले ,त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नीचे नाव लागले ,नंतर मोठ्या भावाची पत्नी १५.०२.२०१६ ला मयत झाली ,त्यानंतर ,माझ्या २ न भावाची मुले व माझे नाव लागले आहे ,परंतु माझ्या भावाच्या पत्नीच्या नावापुढे कंस आहे ,पण उतार्यावरील नाव कमी का झाले नाही ,व अजून ग्रामपंचायातीच कर ,त्यांच्या नावावर येतो ,ते नाव उतार्यावरून हटवण्यासाठी काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करा हि विनंती
मला वाटते या प्रश्नाचे उत्तर मी दिलेले आहे
नावापुढे कंस आहे म्हणजे भावाचेपत्नीचे नाव कमी झाले आहे
ग्राम पंच्यातीस घर पट्टी आपले नावावर पाठवण्यास अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रोहिदास हरिभाऊ काळे
16-02-2018
rohidaskale19@gmail.com
आदरणीय मोहदय,
गावी आमची काही २ एकर शेत जमीन आहे ती माझे चुलत बंधू यांच्या नवे म्हणजे ७/१२ त्यांच्या नवे आहे. आणि नंतर त्या चुलत बंधू मध्ये वाटणी होऊन १, १ एकर ची विभागणी झाली आहे. मात्र ती जमीन
आम्हा सर्वांची सामायिक असून त्या जमिनीत माझा हि हक्क आहे.
सध्या ७/१२ वर चुलत बंधूंची नावाची नोंद आहे व त्यांच्या मध्ये सामायिक क्षेत्राची विभागणी झाली आहे.
माझ्या नावे कोणतीही शेत जमीन नाही, मात्र माझ्या वडिलांच्या नावे आहे.
माझा असा प्रश्न आहे, मला त्या जमिनीतला अर्धा हिस्सा त्यांच्या कडून घेयचा आहे. माझा हक्क आहे तो त्यांना मान्य आहे व ते अर्धी जमिनीचा हिस्सा नावाने करून देण्यास हि तयार आहेत. तर मला कश्या प्रमाणे ती जमीन नवा वर करून घेता येईल या बद्दल मार्गदर्शन करावे हि विनंती.
कृपया पर्याय सांगावे हि विनंती.
Question by संतोष पाटील
15-02-2018
skpatil@msn.com
मी मौजे म्हसा ता. मुरबाड जी. ठाणे येथे शेत जमीन औद्योगिक वापरासाठी खरेदी केली आहे. ह्या जागेत जाण्यासाठी लगतच्या शेतकऱ्या कडून कायमस्वरूपी वहिवाट करारनामा केला. शेतकऱ्याला रीतसर मोबदला दिला नि करार स्टॅम्प ड्युटी भरून रजिस्टर केला आहे.
आता मला ह्या वहिवाट करारनाम्याची रीतसर नोंद त्या शेतकऱ्याच्या ७/१२ मधील इतर हक्कात करायची आहे.
अशी नोंद करण्यासाठी लागणारी प्रोसेस कृपया मला समजावा. तसेच अशी नोंद करण्यासाठी कुठला कायदा वापरावा लागेल.
माझ्या जमिनीसाठी औद्योगिक अकृषिक करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अर्जात वरील नोंदीची आवश्यकता आहे. तशी अटच आहे.
धन्यवाद.
महाराष्ट्र जमीन अधिनियम १९४८ च्या कलम १४८ मध्ये
अधिकार अभिलेख म्हणजे काय याचे वर्णन दिले आहे . त्यानुसार ज्या बाबीचा त्यात समाविष्ट होतात त्यांचीच ७/१२ वर नोंदी घेता येते. अन्य बाबीची नाही
रास्ता बाबतची नोंद ७/१२ वर घेता येत नाही . अर्ज समवेत करार पात्र सादर करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ashok virtual khaire
14-02-2018
ashokvkhaire42@gmail. com
नमस्कार माझा असा प्रश्न आहे की माझ्या शेजारी ल शेतकऱ्यांचे त्या नी विकले ले कमी झालेले नाही त्यामुळे त्याचे क्षेत्र वाढलेले आहे ते कमी करण्यासाठी काय करावे लागेल
Question by नरेंद्र पाटील
14-02-2018
ngpatil1311@gmail.com
सर माझं अलिबाग तालुक्यातील एका गावठाणांत राहतं घर आहे.सन 1975ला वडिलांनी ती जागा विकत घेतली होती तसा वकिलांमार्फत बॉंड पेपर केला होता.त्यावेळी सिटी सर्वे नसल्यानं रजिस्टरखत झाले नसावे.नंतर सदरील गावांत सन 1984ला सिटी सर्वे लागू झाला व गावठाणची मोजणी झाली.परंतु त्यावेळी वडील नोकरी निमित्त मुम्बईला होते व मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी घरपट्टी प्रमाणे नाव न लिहिता माझ्या आजीचे नाव व पुढे वडिलार्जित असा शेरा मारला.आता सन 2016ला शेजारील चूलत्याने वडिलार्जित या शब्दाचा अर्थ काढून आपलाही या मालमत्तेवर हक्क असलेचा दावा दाखल केला आहे.सदर दावा अनुषंगानं फेरचौकशी पण झाली.माझे वडील सन 2003मयत व ज्या चूलत्याने दावा दाखल केला त्याचे वडील सन 2000मयत माझा प्रश्न असाकी दोन्ही व्यक्ती जर फार पूर्वीच मयत असतील तरीही आताचे वारस कसा काय दावा दाखल करू शकतो.कृपया उत्तर मिळालं तर बरं होईल.
जरी असा शेरा असला तरी , बॉण्ड पेपर उप अधीक्षक भूमी अभिलेख यांना दाखवून कलम १५५ प्रमाणे दुरुस्ती करून घ्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
प्रॉपर्टी कार्ड वर वडिलोपार्जित असा शेरा आहे हे पटत नाही . प्रॉपर्टी कार्ड नीट पहा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by हरिभाऊ काशीद
12-02-2018
harishk4141@gmail.com
नमस्कार सर , माझे राहते घर गावठाण जातेगाव खुर्द , तालुका - शिरूर, जिल्हा - पुणे येथे आहे. माझ्या वडिलांनी हि मिळकत २००१ साली खरेदी केली आहे. शेजारील लोकांनी अतिक्रमण करून व मी obc कुटुंबातला असून जाणूनबुजून मला जाणे - येणे साठीचा कुठलाही रस्ता ठेवला नाही. जुन्या घर मालकास हि बाब सांगितली असता जुना घर मालक सांगतो कि हि जागा विकून खूप दिवस झाले माझा काहीही संबंध नाही व खरेदीखता मध्ये रस्ता नमूद केलेला नाही, माझ्या वडिलांना फसवून जुन्या घर मालकाने आमची शेतजमीन खरेदी करून भूमिहीन केले व त्याचे घर आम्हास विकले आहे त्यावेळी आम्ही लहान होतो त्यामुळे या गोष्टीची काही समाज नव्हती.
रस्ता मिळणेबाबत ग्रामपंचायत ग्रामसेवक/सरपंच यांना ७ महिन्या पूर्वी व आत्ता पुन्हा १ महिन्या पूर्वी अर्ज केला होता परंतु मला रस्ता मिळत नाही. ग्रामपंचायत मधून फक्त पाहणी करतात या व्यतिरिक्त कुठलीही कार्यवाही होत नाही, ग्रामपंचायत मधून कुठलीही माहिती वा कागदपत्र मला मिळत नाही .
माझ्या शेजारील व्यक्तीने बखळ जागा खरेदी केली व त्याचे मोजमाप चुकीच्या पद्धतीने नोंदविले आहे ज्या वक्तीने बखळ जागा विकली तो सांगतो कि मी जागा मोजून दिलेली नाही परंतु आता ज्या वक्तीने ती जागा खरेदी केली आहे तो सांगतो संपूर्ण जागा माझी आहे त्याने अतिक्रमण व गुंडगिरी करून रस्ता बंद केला आहे . व दुसऱ्या व्यक्तीने ग्रामपंचायत जागेत जनावरांसाठी गोठा बांधला आहे. या दोन व्यक्तीं कडून माझा रस्ता बंद झाला आहे . या दोन्ही वक्तींवर राजकीय व आर्थिक वरदहस्त असल्याने या वक्ती गरिबांना त्रास देत आहे .
कृपया आपण यासाठी योग्य तो उपाय सुचवावा आणि मला रस्ता कसा, किती फूट व किती दिवसात मिळेल याबद्दल माहिती मिळावी हि विनंती .
धन्यवाद
Question by rajesh kahare
11-02-2018
rajeshkahare@gmail.com
सर नमस्कार
शेत खरेदी च्या फेरफार वर आक्षेप प्राप्त झाला तो खालील प्रमाणे
1.मूळ शेत मालकाने पूर्ण शेत पैकी०.६१ आर शेतीचा सौदा अ बरोबर केला परंतु त्यामध्ये एकच अट होती कि तुकडा पडत असल्यामुले याबाबत वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घावी लागेल तशी परवानगी संबांधीत खातेदाराने घेतली परंतु त्या दरम्यान मूळ मालकाने सदर पूर्ण शेत ब ला खरेदी करून दिले
२.परंतु मूळ मालकाचे वारसाने त्यावर आक्षेप घेतला कि फेरफार मंजूर करू नये म्हणून
तेव्हा तलाठ्याने सादर फेरफार विवादग्रस्त मध्ये नोंदवून मंडळ अघिकारी यांचे कडे सादर केले .तलाठ्याने सादर विवादग्रस्त फेरफार १ वर्षाने सादर केले तेव्हा सर या मध्ये कसा निर्णय देणे अपेक्षित आहे
३.तत्पूर्वी याच शेत मालकाने या पूर्ण शेत पैकी०.६१ आर शेतीचा दुसऱ्या व्यक्ती ब बरोबर केला परंतु त्यामध्ये एकच अट होती कि याबाबत वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घावी लागेल तशी परवानगी संबांधीत खातेदाराने घेतली परंतु त्या दरम्यान मूळ मालकाने सादर पूर्ण शेत अ ला खरेदी करून दिले
तेव्हा तलाठ्याने सादर फेरफार विवादग्रस्त मध्ये नोंदवून मंडळ अघिकारी यांचे कडे सादर केले .तलाठ्याने सादर विवादग्रस्त फेरफार १ वर्षाने सादर केले या मध्ये निर्णय कसा देणे अपेक्षित आहे
जमीन मालकाने अ बरोबर केवळ सौदा केला आहे .विक्री केलेली नाही . ब ला विक्री केली आहे . ब चा फेरफार मंजूर करणे आवश्यक
वारसांचे आक्षेपाचे कारण काय आहे ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by rajesh kahare
11-02-2018
rajeshkahare@gmail.com
सर नमस्कार
शेत खरेदी च्या फेरफार वर आक्षेप प्राप्त झाला तो खालील प्रमाणे
1.मूळ शेत मालकाने पूर्ण शेत पैकी०.६१ आर शेतीचा सौदा अ बरोबर केला परंतु त्यामध्ये एकच अट होती कि तुकडा पडत असल्यामुले याबाबत वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घावी लागेल तशी परवानगी संबांधीत खातेदाराने घेतली परंतु त्या दरम्यान मूळ मालकाने सदर पूर्ण शेत ब ला खरेदी करून दिले
२.परंतु मूळ मालकाचे वारसाने त्यावर आक्षेप घेतला कि फेरफार मंजूर करू नये म्हणून
तेव्हा तलाठ्याने सादर फेरफार विवादग्रस्त मध्ये नोंदवून मंडळ अघिकारी यांचे कडे सादर केले .तलाठ्याने सादर विवादग्रस्त फेरफार १ वर्षाने सादर केले तेव्हा सर या मध्ये कसा निर्णय देणे अपेक्षित आहे
३.तत्पूर्वी याच शेत मालकाने या पूर्ण शेत पैकी०.६१ आर शेतीचा दुसऱ्या व्यक्ती ब बरोबर केला परंतु त्यामध्ये एकच अट होती कि याबाबत वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घावी लागेल तशी परवानगी संबांधीत खातेदाराने घेतली परंतु त्या दरम्यान मूळ मालकाने सादर पूर्ण शेत अ ला खरेदी करून दिले
तेव्हा तलाठ्याने सादर फेरफार विवादग्रस्त मध्ये नोंदवून मंडळ अघिकारी यांचे कडे सादर केले .तलाठ्याने सादर विवादग्रस्त फेरफार १ वर्षाने सादर केले या मध्ये निर्णय कसा देणे अपेक्षित आहे
Question by rajesh kahare
11-02-2018
rajeshkahare@gmail.com
सर नमस्कार
गट विकस अधिकारी यांचे कडून प्राप्त पत्रा नुसार मिळकत पत्रिका तयार झालेला मालकी हक्क असलेला भूखंड वाढीव गावठाण करीत देण्या यावा असे म्हटले सबब तलाठी व मंडलाधिकारी यांचे कडून चौकशी अहवाल मागितला असता सदर गावाला सरकारी शेत फ वर्ग लागून आहे असे म्हटले तेव्हा सर सदर खाजगी भूखंड वाढीव गावठाण करीत घेता येतो काय
Question by राजेंद्र शांताराम वर्तक
11-02-2018
rajendra.vartak2012@gmail.com
नमस्कार सर माझ्या मीञाने त्याच्या शेजारच्याला जायला रस्ता नाही म्हणून रस्ता दिला.मीञाचा सातबारा स्वतंञ आहे.पण अता तो माणूस त्या जागेवर हक्क दाखवतोय. माझ्या मीञाला शिवीगाळ करतोय. माझ्या मीञाने काय करावे.सर कृपया सल्ला दया. माझा मीञ साधा सरळ माणूस आहे.
रस्ता दिला म्हणजे नेमके काय केले ?
खरेदी खताने रस्ताखालील जागा दिली असल्यास त्या जागेवर त्याचा हक्क आहे . मात्र केवळ जाणे येणेसाठी रास्ता दिला असल्यास त्याला मालकी हक्क दाखवता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सचिन दळवी
10-02-2018
sachindalvi371994@gmail.com
नमस्कार सर,मला आपणास असे विचराययचे आहे कि माझे आजोबा व त्यांचे दोन भाऊ होते आमची गावातील जमीन होती व १९८८ साली माझ्या आजोंबानी फक्त ५ एकर जमीन विकली आहे परंतु बाकीची जमीन भावकीच्या नावाने गटवारीमध्ये गेली आहे व त्यानी ती विकली आहे .ह्या प्रकरण मध्ये पुढे काय करता येईल .
Question by अमित शिर्के
10-02-2018
amitkumar.shirke@gmail.com
मा. सर
माझे आजोबा व त्यांचे बंधु यांनी सन १९६५ रोजी एक जमीन खरेदीखताने विकत घेतली होती. त्या जमिनीच्या खरेदीखतामध्ये असा उल्लेख आहे की गणपत शिर्के व शिवराम शिर्के यांनी सदरहु जमीन विकत घेतली आहे. आणि खरेदि खताप्रमाणे फेरफार सुद्धा तसाच तयार झालेला आहे.
एकुण जमीन २० एकर असल्याने माझे आजोबा १० एकर व चुलत आजोबा १० एकर अशी सध्या वहिवाटत आहेत. परंतु कोणाच्या नावावर किती जमीन आहे याचा उल्लेख खरेदीखतात व फेरफारात नसल्यामुळे आम्हांला आज रोजी आणेवारी ठरविता येत नाही. चुलत आजोबा असे म्हणतात की, मला १५ एकर जमीन हवी आहे आणि तुम्हाला फक्त ५ एकर देतो.
१. तरी आम्हांला सध्या हि जमीन माझ्या आजोबांच्या नावे निम्मी दाखल होण्यासाठी काय करावे लागेल.
२. पूर्वी जरी खरेदीखतात क्षेत्राचा उल्लेख नसला तरी आणेवारी ठरविण्यासाठी काही नियम किंवा कायदा होता का ? असल्यास मार्गदर्शन करावे.
हि विनंती
आपण मालमत्ता हस्तांतरण कायदा कलम ४५ चा आधार घ्यावा .
या कलमानुसार खरेदी किंमत ज्या प्रमाणात , दोन्ही भावांनी दिली आहे त्या प्रमाणात , मिळकतीचे वाटप होईल . मात्र जर खरेदी किंमत कोणी किती दिली या बाबत माहिती ,पुरावा नसल्यास , सॅम प्रमाणात म्हणजे १० एकर प्रत्येकी नावावर राहील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by चिराग चौधरी
09-02-2018
chirag.chaudhari2@gmail.com
नमस्कार माझे चिराग चौधरी आहे पारोळा जिल्हा जळगाव तालुक्यात ७० चौ.मी. घर आणि ४ एकर शेती ७/१२ मध्ये मध्ये माझ्या आजोबा च्या नावावर आहे जी शेती आणि जमनी माझ्या आजोबाला वडिलोपार्जित हिस्सा द्वारा प्राप्त झाली असून जी स्वपार्जीत मिळकत असून माझ्या आजोबांनी खरेदी खत करून ७/१२ वर माझ्या काकांच्या नावावर करून दिले आम्हाला तक्रार टाकू शकता एणार का ?
आजोबांना जी जमीन त्याचे वडिलांकडून मिळाली , ती नंतर ( वाटपणानंतर ) त्या हिस्स्यापूर्ती स्वकष्टार्जित होते . त्याची विल्हेवाट लावण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुशांत भांडे
09-02-2018
sushantbhande@gmail.com
आम्ही राहत असलेली जमिनीचा खरेदी दस्त आहे पण ७/१२ ला नाव मूळ मालकाचेच आहे . सिटी सर्वे ला कुणाचेच नाव नाही . तरी उपाय काय
CTSO कडे दस्त सादर करा व नाव लावून घ्या .
CTSO city survey officer
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सागर माणिक पाटील
07-02-2018
sagar.brfl@gmail.com
किरण सर माझा प्रश्न असं आहे कि जर इनाम जमीन असेल व ती ६ ब ची इनाम (गाव सरकारी चाकरी इनाम ) असेल तर त्या जमिनीला कुल कायदा लागू होतो का ?
हा इनाम रद्द ( Abolish ) झालेला आहे .
केवळ देवस्थान , किरकोळ व सरंजाम इनाम अस्तित्वात आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रविंद्र सोनवणे
07-02-2018
Ravindravitthalrao@gmail.com
सर,
नमस्कार.
माझा प्रश्न असा आहे की, हैद्राबाद अतियात कायदा नुसार ईनाम जमिनीची विरासत कार्यवाहीसाठी विलंब नसल्यास कोणती कागदपञे देणे आवश्यक असते , क्रुपया कागदपञांची माहीती मिऴावी ही नम्र विनंती.
Question by अमित शिर्के
07-02-2018
amitkumar.shirke@gmail.com
मा. सर
जर शासनाने एखाद्या व्यक्तीस ९९ वर्षाच्या कराराने जमीन कसण्यास दिली असेल आणि ति व्यक्ती ९९ वर्षाचा करार संपण्यापूर्वी मयत झाली व त्याला कोणीही पत्नी किंवा मुलबाळ नसेल तर त्या जमिनीचे पुढे काय होते.
१. जमीन शासन जमा होते का ?
२. ति जमीन त्या व्यक्तीचे इतर कोणत्याही नातेवाईकाला कसता येते का ?
३. जमीन शासन जमा होण्यासाठी काय करावे लागेल ?
४. ति जमीन एखादी व्यक्ती खरेदी करण्यास इच्छुक असेल व त्याप्रमाणे त्याने त्या जमिनीचा मोबदला शासनाकडे जमा केला तर त्याला ति जमीन खरेदी करता येऊ शकते का ?
इतर वारसांचे नाव भाडेपट्टा धारक म्हणून परवानगीने लावू शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Chintaman Dhamale
06-02-2018
cdhamale77@hotmail.com
1)3/2 cha kharedi khat Dast bigar nond mahnje kay?
2)mazi Aaji ne 1950 Sali 1 hekter shet jamin amchya gavatlya eka manushala vikli. Pan maze vadil tevha sadnan navhte.ajobahi mayat zalele hote tar women rigth of the act 1936 nusar vidhva shtri vadloparjit jage madhe hissa gheu shakte pan ti property cell karu shakt nahi.vidhva shtrila to adhikar 1956 Dhila hota tar maza prashna asa ahe ki mazya ajine kelele kharidikhat yogya ahe ki nahi?
Question by Pratap
04-02-2018
pratap_bhargude@rediffmail.com
सर मी मौजे पळशी तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील रहिवाशी असून पळशी येथे एका सामायिक गटात माजी वडिलोपार्जित जमीन आहे तरी या गटातील इतर सहहिस्सेदारानी त्यांच्या हिस्साचे क्षेत्र विकले असून त्यास माजी कुठेही सहमती घेतली नाही तरी असे असताना सदर खरेदी घेणाऱ्या इसमाने भूमीअभीलेख कार्यालयातून चुकीच्या मार्गाने मोजणीची क प्रत मिळवून सदर गटातील त्याच्या हिस्सा उपविभागीय अधिकारी यांच्याकडून बिनशेती करून घेतला आहे मला हि बाब समजताच मी उपाधीक्षक खंडाळा यांच्याकडे लेखी तक्रार दिली त्यावर मला त्यांनी तुमची हरकत मान्य करून सदर गटाची मोजणी विणकार्यवाही निकाली काढली आहे व मला तसे लेखी कळवले आहे तरी मी या संधर्भात मा.जमाबंदी आयुक्त व संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांना या संधर्भात लेखी अर्ज केला त्यांनी सदर अर्ज चौकशी साठी खाली पाठवला त्यावर मला उपाधीक्षक यांनी तेच उत्तर पाठवले आहे जर मोजणी झाली नाही तर प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयातून मला माहितीच्या अधिकारातून त्याच मो.र.नंबर ची क प्रत मिळाली आहे जर मोजणी झाली नाही तर मग झालेली बिगरशेती व मंजूर झालेला रेखांकन रहिवाशी आराखडा रद्द करण्यासाठी काय करावे कृपया मार्गदर्शन मिळावे मला या मोजणी संधर्भात भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणीची कोणतीही नोटीस मला आजपर्यंत आली नाही तसेच मी प्रांत अधिकारी यांना या गटाची मोजणी झाली नाही हे मला भूमिअभिलेख कडून आलेले लेखी पत्र हि दिलेले आहे तरीदेखील त्यांनी या संधर्भात मला काहीही कळवले नाही जर मोजणी झाली नाही तर भूमिअभिलेख कार्यालयाकडून प्रांत अधिकारी यांना तसे लेखी कळवायला हवे ना भूमिअभिलेख कार्यालयाकडून मला फक्त कळवले आहे मोजणी झाली नाही त्यांनी त्यांचं काम केलं मग क प्रत बोगस किव्वा खोटी आहे हे कोण ठरवणार या संधर्भात मी काय करावे कृपया मार्गदर्शन मिळावे
ज्या अधिकाऱ्याने बीबी शेतीं परवानगी दिली आहे त्या अधिकाऱ्याकडे बिन शेती परवानगी रद्द करण्यासाठी अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राहुल Sawant
04-02-2018
sawantrahul1974@gmail.com
नमस्कार सर मी राहुल सावंत माझा ऐक प्रश्न आहे कि आपची गावी वडिलोपाजित जमीन आहेत त्या सर्व जमिनीच्या सातबारावर आमच्या मोठ्या काकांचे १९७१ मध्ये कुटुंब प्रमुक म्हणून त्यांचे नाव लागलेले होते आणि माझे वडील व लहान काका यांचे नाव गाव नमुना ६ क मध्ये त्यांचे वारस म्हणून नाव नोंद आहे
तरी आमचे मोठे काका २०१२ मध्ये निधन झालेले आहेत त्यांच्या मुलांनी वारस तपासणी करताना फक्त आपल्याच परिवाराची वारस तपासणी करून सातबारावर नावे लावून घेतली पण या दोन्ही चुलत्यांची नावे वारस म्हणून लावली नाही. तर आम्ही आता त्याच्या ( काकांच्या मुलांच्या )परवानगी किंवा सही शिवाय तलाठ्यांकडे अर्ज करून वडिलांची वारस तपासणी करू शकतो काय ? त्यासाठी काय काय पेपर जोडावे लागतील याचे मार्गदर्शन करावे हीच नम्र विनंती
ज्या फेरफरने केवळ मोठ्या काकांच्या मुलांची नवे लागली आहेत , तो फेरफार प्रांताधिकारी यांचे कडे आव्हानात करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by rajesh kahare
03-02-2018
rajeshkahare@gmail.com
सर नमस्कार
वडिलोपार्जित शेताच्या वाटणीकरिता किंवा सदर शेताच्या पोटहिस्सा( अलग-अलग सात बारा ) करीत कलाम ८५/२ चा आदेशाची भूमी अभिलेख कार्यालय कडून मागणी होते परंतु प्रकार निकाली निघत नाही कारण प्रत्यक्षात मोजणी करतेवेळी ताब्यात असलेले क्षेत्र व ७/१२ वरील क्षेत्रात फरक आढळून येतो
हा प्रकार सर्रास सगळीकडे आहे . ७/१२ वरील क्षेत्राप्रमाणे कोणीही वहिवाट करत नाही . जो वरचढ , तो स्वतःचे क्षेत्राहून अधिकचे क्षेत्र वहिवाट करत राहतो .
मात्र सरस निरस वाटप केल्यानंतर , तहसीलदार यांच्यासमोर सुनावणी होऊन , वाटप अंतिम केले जाते .
क्षेत्र तफावतीवरून , मोजणी अथवा सरस निरस प्रलंबित ठेवता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by VIKRAM
03-02-2018
vikram.vy11135@gmail.com
नमस्कार सर ,तुमि व्हीओवाळी दिलेल्या उत्तर मुले मी योगदिशेने जात आहे . सर माझे कोर्टातच हक्कसोड पात्र झाले आहे व तयबदल्यात ली रकम मी कोर्टातच भरली आहे व त्या नंतर कोर्टहूकूमनाम मध्ये मला सर्व जमिनीचे हक्क दिले गेलेले आहेत . व हक्क सोड पात्र देण्यार्याने ते कोर्टातच मान्य केले आहे. तर तो हुकूम नामा झाला आहे त्याची नोंदणी करावा लागेल का ?
Question by अभिजित कणसे
02-02-2018
abhijeetkns299@gmail.com
गाव नमुना ८ अ हा मालकी हक्काचा पुरावा होऊ शकते का आणि जर नसेल तर तसे शासनाचे परिपत्रक उपलब्ध असल्यास माझ्या मेल आय डी वर पाठविण्यात यावे हि विनंती
Question by सिध्दार्थ सकळे
01-02-2018
siddharthsakale@gmail.com
सर आमच्या वडील १९९८ साली मयत झाले आहेत नंतर काही कौंटुबीक मेतभेदा नंतर २००० साली आमची आई ,काका, आजोबा, ह्याच्या मध्ये रजिस्टर वाटणीपत्र झाले़ आहे पंरतु चावडीत नोंद केले नाही़ आता मी २१ वषाचा झालो आहे मला आता चावडीत वाठणीपत्र नोंदवायचे आहे परंतु काका व आजोबा यानी आज पयत सातबारा वर कज काढले आहे व ते कज नील केले नाहीत व आता मला ते सहकार्य करनात व7 आमच स्वताच काही कज नाही याकारणांमुळे मुळे तलाठी यांच्या कडुन वाटणी पत्र नोंद होइना कृपया मार्गदर्शन करावे
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3400 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
