जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by महेंद्र पाटील
08-11-2017
mechmaster7@gmail.com
नमस्कार सर,
माझ्याकडे
भोगवटादार वर्ग - २ विविध कायद्या खालील नवीन शर्तीने, वतन खालसा कायद्या नुसार शर्तीस पात्र
इतर अधिकार :-नवीन अविभाज्य शर्त (शर्तीचा भंग -७००) आहे
१) ही जमीन मी विकू शकतो का ?
२) यातील शर्ती मला शासनाच्या कोणत्या निर्णयात मिळतील ?
३) भोगवटादार २ मधून भोगवटादार १ करण्यासाठी शासनास नजराणा भरावा लागेल काय ? असेल तर किती ?
आपल्याकडे कोणत्या वतन कायद्याखालील जमीन आहे त्याचा तपशील विगत करा . म्हणजे आपल्या प्रश्नाचे उत्तर देता येईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रफुल मोरे
07-11-2017
prafuldm@rediffmail.com
7/12 वर आदिवासी जमीन आहे की नाही हे कसे ओलखावे?
एका आदिवसी मित्राची60 एकर जमीन दुर्गम ठिकाणी आहे.
मुख्य रस्त्यापासून काही अंतर दुसऱ्या शेतकऱ्यांच्या मालकीची असून काही जमीन वन खात्याची आहे. त्या ठिकाणी एका देवीचे छोटे मंदिर असून आजु बाजुच्या 15 ते 20 गावच्या लोकांची खुप श्रद्धा आहे.
रस्ता नाही मला त्यातील 20 एकर जमीन कृषिपर्यत्न आणि पवन चक्की साठी हवी असल्यास विकत घेता येईल का?
त्या जागेत आधी 40 ते 45 परिवारची आदिवासी वस्ति होती रस्ता नसल्याने त्यांना स्तलान्तर करावे लागले त्यांना परत त्या जागी जायचे आहे.
मला त्या जमिनीत वाट मिळू शकते का?
१. वर्णनावरून जमीन हरित वापर विभागातील आहे . आपण जर शेतकरी असाल तर आपणास जमीन खरेदी करता येईल .
२.आदीवासी व्यक्तीच्या जमिनीच्या ७/१२ च्या इतर हक्कात ३६ अ नुसार शासनाचे परवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी असा शेरा असतो .
३. मात्र प्रस्तावित खरेदी करावयाची जागा व रस्ता या मध्ये वन विभागाची जमीन असल्यास , त्यामधून जाण्यासाठी वन विभागाची अडचण येऊ शकते . पक्का रस्ता आपण बंधू शकणार नाही . मात्र वन विभागाचे परवानगीने कच्चा रस्ता वापरू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमोल भिमा भवार
05-11-2017
amolbhawar123@gmail.com
नमस्कार सर
माझा गाव मु.देवपे,ता.पो.मुरबाड,जि.ठाणे या गावचा रहिवासी आहे.
सर मी गेले सन १९५५ सालापासुन एका जागेवर घरल बांधले आहे. त्याच जागेवर माझे भाईबद राहतात. पण 1982 साली माझ्या चुलत आजोबाने तिच जागा माझ्या आजोबाच्या भावाकडुन विकत घेतली. पण आज काही घरगुती वादामुळे मला ते धमकी देतात.कि तुझा घर अतिक्रमण आहे आणि तु ते खाली कर....हे कितपत योग्य आहे.
तर कृपया मला मार्गदर्शन करावे ही विंनती...
१९५५ पासून आपले घर आहे . आपण या जागेचे Adverse Possession तत्वानुसार , जमीन जरी आपल्या भावबंदची असली , अश्या स्थित आपण मालक जाहीर होऊ शकता .
आपले भाऊ बंद आपणास कायदेशीर पद्धतीचा अवलंब केल्या खेरीज जमिनीतून बेदखल करू शकत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शरदचंद्र वाणी
03-11-2017
sd_wani@rediffmail.com
पोट खराब (अ) वर्गाची शेत जमीन लागवडीच्या क्षेत्रात बदलण्या ची पद्धत काय? अर्ज कुणाकडे करावा लागेल.
Question by योगेश पाटील,अकोला
02-11-2017
yogeshdandale7@gmail.com
वडिलांचा मृत्यु १९७६ मध्ये व आईचा १९९६मध्ये झाला.त्यांना एक मुलगा व एक मुलगी असे दोन अपत्ये असून मुलीचे लग्न १९७५ मध्ये झाले आहे. वडिलांचे नावाने स्वकष्ठीत घर आहे जे त्यांनी १९३० मध्ये विकत घेतले होते. सदर घराची मालकी कुणाकडे जाईल.
घराची मालकी मुलगा व मुलगी या दोघांकडे जाईल .
या ठिकाणी वडील मयत आहे , त्यामुळे हिंदू वारसा कायद्या प्रमाणे , दोन्हीही अपत्यांना घरामध्ये हक्क आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राजेश काहरे
01-11-2017
rajeshkahare@gmail.com
सर शेतात जाण्यासाठी शेतकऱयाला जाण्यासाठी पायवाट रास्ता आहे परंतु सादर शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी बैलगाडीचा रास्ता पाहिजे तसा रस्ता देता येतो काय किंवा कोणत्या कलमा मध्ये देता येतो
धन्यवाद सर
म.ज.म.अ १९६६ चे कलम १४३
या कलमानुसार तहसीलदार , शेतीवर जाण्यासाठी किती वाजवी मार्गाची आवश्यकता आहे याची पडताळणी करून निर्णय घेणे अपेक्षित आहे .
शेती किफायतशीर कसण्यासाठी शेतीची मशागत करणे , पिकाची वाहतूक करणे या साठी बैलगाडी शेतात घेऊन जाणे आवश्यक आहे .
कलम १४३ वाचा . बैलगाडीचा रस्ता देता येईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by vishal eknath khairnar
30-10-2017
vishalkhairnar84@rediffmail.com
नगर भूमापन हद्दी मधील शेती मिळकती चे मोजणी काम नगर भूमापन अधिकारी कार्यालयांनी केले असल्यास हिस्सा फॉर्म नंबर १२ भरता येतो का? असल्यास कुठल्या नियम प्रमाणे
Question by शंकर काकडे
28-10-2017
shankarbkakade@gmail.com
महोदय श्री किरण पाणबुडे सर
१) वहिवाटदार जर कुळ बनला असेल तर त्याविरुद्ध अपील कुठे करावे ?
२) एक व्यक्तीने २००७ साली कुळकायदा घोटाळा करून म्हणजे फेरफार बघितला त्यावर ३२ग ची खरेदी उल्लेख असून दुसऱ्याचे नाव खोडून त्याच्या वडिलांचे नाव टाकले , मुळात त्याच्या वडिलांनी कधीच जमीन कसली नव्हती व घोटाळा करून कुळ दाखल केलेले व नंतर रोख पैसे घेऊन ७०ब चा स्टॅम्प पेपर वर
डिकलरेशन वर सही सुद्धा केली आहे पुरावा स्टॅम्प पेपर आहे आमच्याकडे पण २००७ ला परत त्याच्या मुलाने जमीन विकण्यासाठी पेपर मध्ये नोटीस दिली आम्ही त्याबद्दल कोर्टात हरकत सुद्धा घेतली पण २ सुनावणी नंतर त्याने आमच्याकडचे पुरावे बघितले व परस्पर जमीन विकली ह्याच प्रकरणात पिकपाहणी त्याच्या मुलाने लाच देऊन गायब केली पिकपाहणीच उपलब्ध नाही १९४६ पासून आमचेच ताब्यात जमीन आहे, तर त्यांनी ३२म चे प्रमाणपत्र पण नाही घेतले, कोणत्या अधिकाऱ्याची विक्रीसाठी परवानगी सुद्धा नाही घेतली विकलेली जमीन कशी परत मिळू शकते कुठे केस दाखल करावी लागेल, तो व्यक्ती कुळाच्या कोणत्याच व्याख्येत बसत नाही व आमच्या कुटुंबातील आहे आमचे १च कुलदैवत आहेत पण आम्हला वंशावळ नाही माहिती ?
३) कुळकायद्यात कुळाच्या व्याख्येत कोणताच कुळ बसत नाही व कुळ व पिकपाहणी ला नाव दाखल केल्यानंतर कधीच नोटीस दिली नाही अशा कुळवहिवाट विरुद्ध कुठे अपील करावे?
४) तलाठ्यांना कुळ दाखल करण्याचा हक्क असतो का?
५) सामनेवाले यांच्याकडे कुळ सिद्ध करणेसाठी कोणते पुरावे लागतील?
आपण योग्य ते मार्दर्शन करावे विनंती.,
आपणास प्रांताधिकारी यांचेकडे अपील करावे लागेल
खाडाखोड केली आहे असे आपले म्हणणे आहे .आपण फौजदारी कारवाई हि करू शकता .
तलाठ्यांना कुल दाखल करण्याचा अधिकार नाही
एखादी व्यक्ती कुल आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार मामलतदार म्हणजे तहसीलदार यांना कुल कायद्याअंतर्गत आहे
कुळकायद्याचे कलम २(१७) २(१८) व कलम ४ वाचा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शंकर काकडे
28-10-2017
shankarbkakade@gmail.com
महोदय सर
एक व्यक्तीने असा अर्ज केला कि ह्या सर्वे नंबर ची जमीन १२ वर्षांपासून माझ्या कब्जेवहिवाटीत आहे व ह्या जमिनीवर वेग-वेगळ्या प्रकारचे पीक घेत आहे फेरफारामध्ये कोणताही कायदेशीर दस्त नाही अशी नोंद मंजूर करून तलाठ्यांनी ७/१२ सादरी त्यांचे नाव दाखल केले ह्या बद्दल कुठे अपील करावे आपण मार्गदर्शन करावे .,
कब्जावहिवाटीखाली आहे म्हणून जमिनीस नाव लावण्याचा अधिकार ना तलाठी ना तहसीलदार यांना आहे . Adverse - Possession या तवाच आधार घेऊन एखादी व्यक्ती कब्जाहक्काने एखादी जमीन १२ वर्षाहून अधिक काळ कस्त असेल तर त्यास मालक म्हणून घोषित करण्याचा अधिकार दिवाणी न्यायालयास आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शंकर काकडे
28-10-2017
shankarbkakade@gmail.com
आदरणीय श्री किरण पाणबुडे सर
जर कोणतीही परवानगी ना घेता कुळकायदा जमिनीची विक्री झाली असेल तर कलम ८४ क क अन्वये तक्रार कुठे दाखल करावी न्यायालयात कि उपविभागीय अधिकारी यांकडे व कोणते पुरावे सादर करावे शर्तभंग झाली हे सिद्ध होण्यासाठी ?
२) ८४क क अन्वये २००७ साली झालेले शर्तभंग त्यामध्ये झालेली जमीन विक्री खरेदीखत रद्द करता येईल का? तर कुठे रद्द करण्यासाठी केस दाखल करावी?
३) ४३ च्या शर्तीस पात्र जमिनीची शर्तभंग झाल्याप्रकरणी? जमीन शासनजमा होईल का? कि मूळ मालकांना परत मिळेल., मार्गदर्शन करावे,;
आपण प्रत्येक वेळेस अनेक प्रश्नांची उत्तरे देतात त्यामुळे आम्हाला जमीन परत मिळवता येईल आदरणीय श्री किरण पाणबुडे सर आपणास व संजय कुडेटकर सर आपणास साष्टांग नमस्कार मनापासून आभारी ..
८४ k खाली कारवाई करण्याचे अधिकार तहसीलदार यांना आहेत . आपण तहसीलदार यांचेकडे अर्ज करा
८४ क क च्या नवीन सुधारणेनुसार , खरेदीदारास दंडाची रक्कम भरून , त्याचा अवैध व्यवहार नियमित करू शकतो
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by ज्ञानेश्वर मधुकर काटकर
27-10-2017
dnya2410@gmail.com
नमस्कार सर, मागील 8 वर्षापुर्वी जेष्ठता डावलून पदोन्नती करण्यात आले आहेत. त्यानंतर वरीष्ठांकडे वारंवार विनंती अर्ज करुन ही पदोन्नती केली जात नाही व बिंदू नामावली नोंदवही पुर्ण न झालेने पदोन्नती करता आली नसल्याचे कारणे दिली जात आहे. याबाबत दाद कुणाकडे मागता येईल.
Question by सागर माणिक पाटील
27-10-2017
sagar.brfl@gmail.com
सर मला कुळकायदा कलम ८८-आक बद्दल माहिते मिळावी
Question by शिवाजीराजे राजेमहाडिक
27-10-2017
shivajirajetarale@gmail.com
श्री. किरण पाणबुडे साहेब नमस्कार,
आमचा गावठाण जागेचे प्लॉट नंबर १८ व २२ चा भूमी अभिलेख यांचे निकाल झाले आहेत. सदर निकाल हे मे महिन्यात झाले कोणीही अपील केलेले नाही. मग आम्ही भूमी अभिलेख यांचेकडे अतितातडी मोजणीसाठी अर्ज केला त्यानुसार मोजणी तारीख ३ व ४ नोव्हेंबर मिळाली आहे. आता मोजणीनुसार आम्ही मोजमाप घेऊन ग्रामपंचायतीकडे आमचे नाव व मोजमाप टाकून मिळावे म्हणून अर्ज करावा का ? कारण ग्रामपंचायत आमचे विरोधात आहे त्याला दुसरा मार्ग आहे का ? आता आमचे नाव भूमी अभिलेख यांचे प्रॉपर्टी कार्डला, चौकशी उतार्याला लागले आहे व त्यानुसार नकाशात दुरुस्तीही झाली आहे व आता रजिस्टर कागद करताना भूमी अभिलेख यांचेकडील प्रॉपर्टी कार्ड नुसार रजिस्टरदस्त करावेत असा जीआर भूमी अभिलेख यांनी पाटण सब रजिस्टर ऑफिसाला दिला आहे त्यामुळे ग्रामपंचायत उतार्याला जर आमची नोंद नाही झाली तर चालेल का ? मार्गदर्शन करावे हि विनंती.
मिळकत पत्रिकेला आपले नाव लागले आहे .
ग्राम पंचायत कर आकारणी पत्रकास हि आपले नाव लागणे आवश्यक
अर्ज करा . आपल्या विरुद्ध ग्राम पंचायतीने , निर्णय घेतला तर गट विकास अधिकारी यांचेकडे अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by SUNIT
26-10-2017
sunit.nikam@adityabirla.com
सर, माझ्या पणजोबांना तीन अपत्य होती. त्यातील तिसऱ्या अपत्याला म्हणजे माझ्या आजोबाना माझी आई धरून ३ मुली व ३ मामा अशी ६ अपत्य होती. आजोबांच्या मृत्यू नंन्तर माझ्या मामानी त्यांच्या तीनही बहिणींना न सांगता आजोबांच्या वाट्याची जमीन तीनही भावांच्या नावावर करून घेतली. ते करताना त्यांनी प्रतिज्ञा पत्रक तीनच भाऊ असल्याचे बनवले होते जे चुकीचे आहे. तीनही भाऊ हे govt. employee आहेत, व त्यांना कायद्याचे ध्यान आहे. तरीही त्यांनी मुद्दामून असेल प्रतिज्ञा पत्रक बनवून. स्वतःची नावे लावून घेतली.
आमची जमीन हि मुंबई-गोआ महामार्गासाठी अधिग्रहण होत आहे. त्या संबंधित आम्हाला जेव्हा दुसऱ्या नातेवाइकांचा फोने आला आणि आम्ही ७/१२ पहिला. व हि तीनच नावे कशी लागली याचा खुलासा मागितला तेव्हा प्रतिज्ञा पात्र बद्दल कळले.
जेव्हा आम्ही आमची नवे लावायला गेलो तेव्हा आम्हाला उपविभागीय अधिकारी ( महसूल ) कुडाळ यांच्या कार्यालयात सादर फेरफार विरुद्ध अपील दाखल करण्यास सांगण्यात आले. तसे आम्ही केलेही आणि त्यांचा निकाल हि आमच्या बाजूने लावण्यात आला आहे.
पण या सर्व काळात. त्या तिघांच्या बँक खात्यात जमीन अधिग्रहणाची रक्कम त्यांनी पुन्हा प्राधिकरणाला तीन भाऊ असल्याचे सांगून व जुने ७/१२ दाखवू मिळवून घेतली आहे.
मला खालील बाबतित मध्ये आपला सल्ला हवा आहे.
१. तो अपील माझ्या बाजूने लागला आहे. व आता ७/१२ वॉर नावे लागण्या साठी फेरफार नोंद वहीत मला फेरफार करून घ्यावयाचा आहे. तर तो कसा करावा व त्या नंतर ७/१२ वॉर नाव लावण्या साठी कश्या पद्धतीने अर्ज करावे लागतील.
२. जी रक्कम प्राधिकरणाने त्या तीन भावांच्या खात्यात जमा केली आहे. त्यातील आम्हा तीन बहिणींचा हिस्सा आम्हाला मिळवण्या साठी काय कायदेशीर कारवाई करावी लागेल.
३. मला कायदेशीर कारवाई साठी न्यायालयातच जावे लागेल का? कि इतरही काही मार्ग आहेत?
४. असे खोटे प्रतिज्ञापात्र दिल्या बद्दल त्यानं वर काही कारवाई होऊ शकते का.
५. ज्या प्राधिकरणाने त्यांना जमीन अधिग्रहण संभंधित रक्कम दिली आहे. त्यांच्या निदर्शनास मी हा खोटे पण कसा आणू. आणि ते त्यानंवर काही कारवाई करतील का?
ज्या फेरफारानें केवळ तीन भावांची नवे लागली तो फेरफार आपण आव्हानात केला . त्याचा निकालही आपले बाजूने लागला आहे . मात्र दरम्यानचे कालावधीत जमीन अधिग्रहण होऊन , राष्ट्रीय महामार्गाचे नवे दाखल झाली आहे . त्यामुळे ७/१२ सदरी नाव लावण्याची आवश्यकता नाही उलटपक्षी आपली नावे हि ७/१२ सदरी लागणार नाहीत
नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यापूर्वी आपण जर उपविभागीय अधिकारी यांचे कडे अपील केले असते तर , आपले प्रकरण न्यायालयाकडे निर्णयासाठी गेले असते .
असोत अद्यावपही वेळ गेलेली नाही . आपण न्यायालयात दावा दाखल करा . आपल्या हिस्स्याची नुकसान भरपाई रक्कम आपले मामाकडून देणे बाबत न्यायालयास विंनती करा . आपणास रक्कम व्याजासह मिळेल . मात्र नुकसान भरपाईची रक्कम व न्यायालयीन लाढालीसाठी येणार खर्च याचे गुणोत्तर पहा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दिलीप प्रभाकर वैद्य
26-10-2017
dileepvaidya@rediffmail.com
मी गिम्हवणे,तालुका दापोली येथे १० वर्षांपूर्वी एकत्रित २२ भूखंडाच्यापैकी १ विभाजित भूखंड खरेदी केला आहे.
सदर जागेस उप विभागीय अधिकारी यांनी भूखंड विभाजनास व रेखांकनास तात्पुरती व अंतिम मंजुरी दिलेली आहे.व याची कागदपत्रे नकाशासहित उपलब्ध आहेत. सदरच्या तात्पुरत्या मंजुरीमध्ये असा उल्लेख आहे कि रेखांकनामधील सर्व भूखंडांचा
वापर करणेआधी सक्षम अधिकारी यांची अकृषिक परवानगी घेऊन वापर करणेच आहे
१. प्रत्येक विभाजित प्लॉटसाठी अकृषिक परवानगी घेणे आवश्यक असते का ? व सक्षम अधिकारी यांची परवानगी घ्यायची म्हणजे कोणत्या खात्याच्या अधिकाराची यांच्याकडून
परवानगी घ्यावयाची ?
सदर प्लॉटवर मूळ मालकाने घरबांधणीसाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घेतलेली होती व नंतर मी स्थानिक ग्रामपंचायतीच्या मंजुरी घेऊन त्यानुसार सदर प्लॉटवर घरबांधणी केलेली आहे, व प्रत्येक वर्षी घरपट्टी जमा करीत असतो.
२.माझ्या विभाजित प्लॉटसाठीची वेगळी अकृषिक परवानगी मी न घेतल्याने मी केलेले प्लॉटवरील इमारत बांधकाम बेकायदेशीर ठरते का ? व ते तसे असेल तर मी आता ते कायदेशीर करणेसाठी मी काय करावे लागेल ?
३. सदर जागेच्या ७/१२ उताऱ्यात भूखंडाचे वर्णन ओपन बिनशेती असे लिहिले आहे. मी प्लॉटची बऱ्याच वेळा भूमी अभिलेख खात्याकडून हद्दीची मोजणी करून घेतली, परंतु सदर जागेची बिनशेती मोजणीसुद्धा करायची असते हे मला माहितच न्हवते बिनशेती मोजणी झालेली नसल्याने ७/१२ उताऱ्यात ओपन बिनशेती असा उल्लेख येतो का ?
कृपया मार्गदर्शन करावे
वास्तविक रेखांकनास परवानगी देताना बिनशेती हि परवानगी दिली जाते . आपले प्रकरणात केवळ रेखांकनास परवानगी दिली आहे .
नवीन म. ज.म अ १९६६ च्या कलम ४२ क नुसार , रेखांकन परवानगी असेल तर , केवळ बिन शेती आकार भरणे बाबत , नियोजन प्राधिकाऱ्याने म्हणजे उपविभागीय अधिकारी यांनी आदेश देणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by AMIT RAJARAM JADHAV
25-10-2017
amit.jadhav3004@gmail.com
Dear Sir,
Please share the copy of " Maharashtra Civil Services (declaration of small family) rules 2005"
Regards
Question by shashank bamno
24-10-2017
bamnolkarshashank@gmail.com
नमस्कार आमची संस्था आहे जी सांस्कृतिक कार्यात कार्यरत आहे. मुंबई सार्वजनिक नियम अंतर्गत नोंदणीकृत संस्था आहे. नाटक , संगीत आणि नृत्य सारखे विविध कला आम्ही जोपासतो. आम्हाला तालमी करीत जागेचा त्रास होतो त्यासाठी काही उपाय आहे का ?
Question by विनायक बुवाजी पाटील
24-10-2017
vbpatil96@gmail.com
आदरणीय सर ,एखाद्या जमिनीचे न्यायालयातून declaration घेणे म्हणजे काय ? त्याची प्रक्रिया कशी असते
The Specific Relief Act खाली , न्यायालयाकडून मिळकतीचा मालकी हक्क जाहीर करून घेणे , मिळकत ताब्यात आहे असे जाहीर करून घेणे म्हणजे declaration घेणे . न्यायालयात दावा दाखल करणे .
Adverse possession ने जमीन मालकीची झाली हे जाहीर करून घेणे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विक्रम yadav
24-10-2017
vikram.vy11135@gmail.com
नमस्कार सर , माझे व बहिणींमध्ये हक्क सोड पत्र दिवाणी कोर्ट मध्ये झाले आहहे ,काहीकारनं मुले तलाठी व इतर अधीकार यांनी योग मार्गदर्शन न केल्या मुले माझे नवे ७/१२ मध्ये अली नाहीत बहिणांचीच नावे राहिली आहेत ,त्यांनी तिझामिन गावातील वक्तीला विकली आहे ,त्याचा दस्त नोदनिकात तलाठी यांच्याकडे अल्ला आहहे ,तेव्हा मी तलाठी सर्कल व तहसीलदार दार यांना दिवाणी कोर्ट चा हुकूमनामा व बहिणीचे हक्कसोड पत्र सादर केल्यावर त्यांनी माझे नावाची नोंद करण्याचा आदेश दिला व माझे नवे ७/१२ झाला आहहे ,त्या विरोधात जमीन विकत घेणारे लोकांनी प्रांत साहेब यांच्याकडे त्या विरोधात तक्रार केले व ती नोंद फेरफार राधा करून मागितलं व ते प्रांत अधिकारी याने मेनी केले आहहे.माझ्याकडे सर्व कागद पत्र असताना माझा विरोधात आदेश झाला आहहे ,ती मंडळी दस्त नोंद व्हावी म्हणून तलाठी यांच्याकडे दबाव अन्नात आहहे प्रात अधिकारी यांचा फेरफार रद्ध करावा हा आदेश झाला आहे हे सांगून त्यांचा नावाची नोंद करतील तर सर मी फुडें काय करू कृपया मार्ग दर्शन करा.
मा उपविभागीय अधिकारी यांचे आदेशाविरुद्ध , अप्पर जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by SANKET
24-10-2017
sanketkhose@gmail.com
सर.. कलेक्टर मंजूर NA प्लॉट वर महापालिकेच्या नगररचना विभागाला DEVELOPMENT PLAN मधे डीपी रोड (डेव्हलोपमेंट प्लॅन रोड ) टाकण्याचा अधिकार आहे का?
हो
MRTP Act खाली प्रारूप DP मंजूर झाल्यावर , आपण हरकत घेतली होती का ?
DP प्रारूप सध्या प्रसिद्ध झाला असेल तर हरकत घ्या .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शंकर काकडे
23-10-2017
shankarbkakade@gmail.com
श्री किरण पाणबुडे सर
१) मिळकत विक्रीसाठी साधारण कुलमुखत्यारपत्र पुरेसे नाही ( सर्वोच्च न्यायालय- सूरज लँप आणि प्रा. लि. विरुद्ध हरियाणा राज्य व इतर ) सर हे कुडतकर सरांच्या जमीन खरेदी ह्या लेखात वाचले.
२) कुळवहिवाट विरुद्ध अपील कुठे करावे ?
३) एकत्र कुटुंबाच्या मिळकतीत फेरफार आव्हानात केल्यावर किती दिवसात निकाल लागेल? व चुलत काकांनी हरकत घेतल्यावर पुढे काय होईल ?
योग्य ते मार्गदर्शन करावे विनंती,
२.उपविभागीय अधिकारी
३. तक्रार नोंद १ वर्षात निकाली काढण्याची तरतूद आहे . तथापि तीन महिन्यात अशी तक्रार नोंद निर्णीत करावी असेही निर्देश आहेत
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by चैतन्य कुलकर्णी
19-10-2017
cmkulkarni9@gmail.com
नमस्कार सर,
मी शेत जमीन खरेदी केली आहे त्या वरती सहकारी पत संस्थेचा बोजा आहे . सदर संस्थेचे मुळ मालकाडे थकित कर्ज आहे व मुळ मालकाची जमीन आहे (जो गट संस्थेकडे तारण आहे त्यापैकी मी खरेदी केला आहे ) पण कर्ज रक्कम जास्त आहे सहकारी संस्था मी खरीदी केलेली जमीन खरेदी रद्द कारू शकते का ?
खरेदी रद्द करू शकत नाही मात्र , कर्जाचे वसुलीसाठी जमिनीची जप्ती करू शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by SANKET JADHAV
18-10-2017
sj49175@gmail.com
माझ्या घराच्या शेजारी एक गृहनिर्माण सोसायटी आहे.त्यात एकूण तीन apartment आहे.आमच्या घराला लागूनच उजव्या बाजूला शेजारी सोसायटीचा मोठा रस्ता आहे.त्या रस्त्याला लागूनच शेजारी आमचे घर आहे. तो रस्ता मी वापरू शकतो का? काही सोसायटीचे लोक मला आणि माझ्या कुटुंबातील लोकांना तो रस्ता वापरू देण्यास मनाई करतात.आम्ही रस्ता वापरू नये म्हणून आम्ही आमच्या जागेत केलेल्या गेटसमोर वाळलेली झाडे टाकतात.तरी आम्ही काय करावे.आमच्या घराच्या डाव्या बाजूला आमचा वैयक्तिक रस्ता आहे पण त्या रस्त्यातून त्याच सोसायटीची ड्रेनेज पाईपलाईन गेलेली आहे आणि तिथे खूप चेंबर काढलेले आहेत तेही आमची परवानगी न घेता.अनेक चेंबरमूळे हा रस्ता वापरण्यालायक राहिलेला नाही. त्यामूळे आम्ही वर उल्लेख केल्याप्रमाणे आमच्या घरालाच लागूनच असलेला उजव्या बाजूचा त्याच सोसायटीचा रस्ता मी वापरू शकतो का? मला प्लीज उपाय सांगा.मी आपला आभारी राहील.
रस्ते हे सार्वजनिक आहेत . गृहनिर्माण संस्था आपणास रोखू शकत नाही .
मात्र आपले घराचे उजव्या बाजूस सहकारी संस्थेचा जो रस्ता आहे त्याचा वापर करा
डाव्या बाजूस जी जागा ती आपले मालकीची आहे का ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by hemant_donde@rediffmail.com
18-10-2017
hemant_donde@rediffmail.com
Dear Sir,
We have taken harkat regarding land case in march 2017.when I made enquiry at tahsil office, I came to know that hearing is in 23.10.17.But we still haven't received notice.Is it proper to attain hearing without notice.pls guide.thanks.regards hemant
By the time , i got your question , date fixed for your hearing has lapsed . I don''t know whether you have attended the hearing.
But there is no harm in attending the hearing , even if you don't receive the hearing notice . Hearings before quasi judicial authorities are public hearing . Any one can attend the hearing . You are party to the suit , you can attend such hearing even if you dont receive the notice .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शिंदे प व
16-10-2017
shrinivascyber@gmail.com
सर माझ्या आजोबाची खरेदी जमीन खासरा पत्रकाला असून वारसा हक्काने त्यांचे तीन मुले यांच्या
नावे न यता ती जमीन माझ्या चुलत चुलत्या ने सहाजणांच्या नावे कब्जेदार मध्ये लावली आहे
खरी ती जमीन आमच्या आजोबाची असून त्याचे वारस तीन चुलते आहेत तरी काय करता येईल सल्ला द्या .
ज्या फेरफाराने चुलत चुलत्यांची नावे लागली आहेत तो आव्हानात करा . मात्र मुदतीच्या कायद्याची त्यास बाधा येऊ शकते . अश्या स्थित आपण , न्यायालयात आपला हक्क मिल्ने बाबत दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3400 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
