जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by ज्ञानेश्वर मधुकर काटकर
27-10-2017
dnya2410@gmail.com
नमस्कार सर, मागील 8 वर्षापुर्वी जेष्ठता डावलून पदोन्नती करण्यात आले आहेत. त्यानंतर वरीष्ठांकडे वारंवार विनंती अर्ज करुन ही पदोन्नती केली जात नाही व बिंदू नामावली नोंदवही पुर्ण न झालेने पदोन्नती करता आली नसल्याचे कारणे दिली जात आहे. याबाबत दाद कुणाकडे मागता येईल.
Question by सागर माणिक पाटील
27-10-2017
sagar.brfl@gmail.com
सर मला कुळकायदा कलम ८८-आक बद्दल माहिते मिळावी
Question by शिवाजीराजे राजेमहाडिक
27-10-2017
shivajirajetarale@gmail.com
श्री. किरण पाणबुडे साहेब नमस्कार,
आमचा गावठाण जागेचे प्लॉट नंबर १८ व २२ चा भूमी अभिलेख यांचे निकाल झाले आहेत. सदर निकाल हे मे महिन्यात झाले कोणीही अपील केलेले नाही. मग आम्ही भूमी अभिलेख यांचेकडे अतितातडी मोजणीसाठी अर्ज केला त्यानुसार मोजणी तारीख ३ व ४ नोव्हेंबर मिळाली आहे. आता मोजणीनुसार आम्ही मोजमाप घेऊन ग्रामपंचायतीकडे आमचे नाव व मोजमाप टाकून मिळावे म्हणून अर्ज करावा का ? कारण ग्रामपंचायत आमचे विरोधात आहे त्याला दुसरा मार्ग आहे का ? आता आमचे नाव भूमी अभिलेख यांचे प्रॉपर्टी कार्डला, चौकशी उतार्याला लागले आहे व त्यानुसार नकाशात दुरुस्तीही झाली आहे व आता रजिस्टर कागद करताना भूमी अभिलेख यांचेकडील प्रॉपर्टी कार्ड नुसार रजिस्टरदस्त करावेत असा जीआर भूमी अभिलेख यांनी पाटण सब रजिस्टर ऑफिसाला दिला आहे त्यामुळे ग्रामपंचायत उतार्याला जर आमची नोंद नाही झाली तर चालेल का ? मार्गदर्शन करावे हि विनंती.
मिळकत पत्रिकेला आपले नाव लागले आहे .
ग्राम पंचायत कर आकारणी पत्रकास हि आपले नाव लागणे आवश्यक
अर्ज करा . आपल्या विरुद्ध ग्राम पंचायतीने , निर्णय घेतला तर गट विकास अधिकारी यांचेकडे अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by SUNIT
26-10-2017
sunit.nikam@adityabirla.com
सर, माझ्या पणजोबांना तीन अपत्य होती. त्यातील तिसऱ्या अपत्याला म्हणजे माझ्या आजोबाना माझी आई धरून ३ मुली व ३ मामा अशी ६ अपत्य होती. आजोबांच्या मृत्यू नंन्तर माझ्या मामानी त्यांच्या तीनही बहिणींना न सांगता आजोबांच्या वाट्याची जमीन तीनही भावांच्या नावावर करून घेतली. ते करताना त्यांनी प्रतिज्ञा पत्रक तीनच भाऊ असल्याचे बनवले होते जे चुकीचे आहे. तीनही भाऊ हे govt. employee आहेत, व त्यांना कायद्याचे ध्यान आहे. तरीही त्यांनी मुद्दामून असेल प्रतिज्ञा पत्रक बनवून. स्वतःची नावे लावून घेतली.
आमची जमीन हि मुंबई-गोआ महामार्गासाठी अधिग्रहण होत आहे. त्या संबंधित आम्हाला जेव्हा दुसऱ्या नातेवाइकांचा फोने आला आणि आम्ही ७/१२ पहिला. व हि तीनच नावे कशी लागली याचा खुलासा मागितला तेव्हा प्रतिज्ञा पात्र बद्दल कळले.
जेव्हा आम्ही आमची नवे लावायला गेलो तेव्हा आम्हाला उपविभागीय अधिकारी ( महसूल ) कुडाळ यांच्या कार्यालयात सादर फेरफार विरुद्ध अपील दाखल करण्यास सांगण्यात आले. तसे आम्ही केलेही आणि त्यांचा निकाल हि आमच्या बाजूने लावण्यात आला आहे.
पण या सर्व काळात. त्या तिघांच्या बँक खात्यात जमीन अधिग्रहणाची रक्कम त्यांनी पुन्हा प्राधिकरणाला तीन भाऊ असल्याचे सांगून व जुने ७/१२ दाखवू मिळवून घेतली आहे.
मला खालील बाबतित मध्ये आपला सल्ला हवा आहे.
१. तो अपील माझ्या बाजूने लागला आहे. व आता ७/१२ वॉर नावे लागण्या साठी फेरफार नोंद वहीत मला फेरफार करून घ्यावयाचा आहे. तर तो कसा करावा व त्या नंतर ७/१२ वॉर नाव लावण्या साठी कश्या पद्धतीने अर्ज करावे लागतील.
२. जी रक्कम प्राधिकरणाने त्या तीन भावांच्या खात्यात जमा केली आहे. त्यातील आम्हा तीन बहिणींचा हिस्सा आम्हाला मिळवण्या साठी काय कायदेशीर कारवाई करावी लागेल.
३. मला कायदेशीर कारवाई साठी न्यायालयातच जावे लागेल का? कि इतरही काही मार्ग आहेत?
४. असे खोटे प्रतिज्ञापात्र दिल्या बद्दल त्यानं वर काही कारवाई होऊ शकते का.
५. ज्या प्राधिकरणाने त्यांना जमीन अधिग्रहण संभंधित रक्कम दिली आहे. त्यांच्या निदर्शनास मी हा खोटे पण कसा आणू. आणि ते त्यानंवर काही कारवाई करतील का?
ज्या फेरफारानें केवळ तीन भावांची नवे लागली तो फेरफार आपण आव्हानात केला . त्याचा निकालही आपले बाजूने लागला आहे . मात्र दरम्यानचे कालावधीत जमीन अधिग्रहण होऊन , राष्ट्रीय महामार्गाचे नवे दाखल झाली आहे . त्यामुळे ७/१२ सदरी नाव लावण्याची आवश्यकता नाही उलटपक्षी आपली नावे हि ७/१२ सदरी लागणार नाहीत
नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यापूर्वी आपण जर उपविभागीय अधिकारी यांचे कडे अपील केले असते तर , आपले प्रकरण न्यायालयाकडे निर्णयासाठी गेले असते .
असोत अद्यावपही वेळ गेलेली नाही . आपण न्यायालयात दावा दाखल करा . आपल्या हिस्स्याची नुकसान भरपाई रक्कम आपले मामाकडून देणे बाबत न्यायालयास विंनती करा . आपणास रक्कम व्याजासह मिळेल . मात्र नुकसान भरपाईची रक्कम व न्यायालयीन लाढालीसाठी येणार खर्च याचे गुणोत्तर पहा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दिलीप प्रभाकर वैद्य
26-10-2017
dileepvaidya@rediffmail.com
मी गिम्हवणे,तालुका दापोली येथे १० वर्षांपूर्वी एकत्रित २२ भूखंडाच्यापैकी १ विभाजित भूखंड खरेदी केला आहे.
सदर जागेस उप विभागीय अधिकारी यांनी भूखंड विभाजनास व रेखांकनास तात्पुरती व अंतिम मंजुरी दिलेली आहे.व याची कागदपत्रे नकाशासहित उपलब्ध आहेत. सदरच्या तात्पुरत्या मंजुरीमध्ये असा उल्लेख आहे कि रेखांकनामधील सर्व भूखंडांचा
वापर करणेआधी सक्षम अधिकारी यांची अकृषिक परवानगी घेऊन वापर करणेच आहे
१. प्रत्येक विभाजित प्लॉटसाठी अकृषिक परवानगी घेणे आवश्यक असते का ? व सक्षम अधिकारी यांची परवानगी घ्यायची म्हणजे कोणत्या खात्याच्या अधिकाराची यांच्याकडून
परवानगी घ्यावयाची ?
सदर प्लॉटवर मूळ मालकाने घरबांधणीसाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घेतलेली होती व नंतर मी स्थानिक ग्रामपंचायतीच्या मंजुरी घेऊन त्यानुसार सदर प्लॉटवर घरबांधणी केलेली आहे, व प्रत्येक वर्षी घरपट्टी जमा करीत असतो.
२.माझ्या विभाजित प्लॉटसाठीची वेगळी अकृषिक परवानगी मी न घेतल्याने मी केलेले प्लॉटवरील इमारत बांधकाम बेकायदेशीर ठरते का ? व ते तसे असेल तर मी आता ते कायदेशीर करणेसाठी मी काय करावे लागेल ?
३. सदर जागेच्या ७/१२ उताऱ्यात भूखंडाचे वर्णन ओपन बिनशेती असे लिहिले आहे. मी प्लॉटची बऱ्याच वेळा भूमी अभिलेख खात्याकडून हद्दीची मोजणी करून घेतली, परंतु सदर जागेची बिनशेती मोजणीसुद्धा करायची असते हे मला माहितच न्हवते बिनशेती मोजणी झालेली नसल्याने ७/१२ उताऱ्यात ओपन बिनशेती असा उल्लेख येतो का ?
कृपया मार्गदर्शन करावे
वास्तविक रेखांकनास परवानगी देताना बिनशेती हि परवानगी दिली जाते . आपले प्रकरणात केवळ रेखांकनास परवानगी दिली आहे .
नवीन म. ज.म अ १९६६ च्या कलम ४२ क नुसार , रेखांकन परवानगी असेल तर , केवळ बिन शेती आकार भरणे बाबत , नियोजन प्राधिकाऱ्याने म्हणजे उपविभागीय अधिकारी यांनी आदेश देणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by AMIT RAJARAM JADHAV
25-10-2017
amit.jadhav3004@gmail.com
Dear Sir,
Please share the copy of " Maharashtra Civil Services (declaration of small family) rules 2005"
Regards
Question by shashank bamno
24-10-2017
bamnolkarshashank@gmail.com
नमस्कार आमची संस्था आहे जी सांस्कृतिक कार्यात कार्यरत आहे. मुंबई सार्वजनिक नियम अंतर्गत नोंदणीकृत संस्था आहे. नाटक , संगीत आणि नृत्य सारखे विविध कला आम्ही जोपासतो. आम्हाला तालमी करीत जागेचा त्रास होतो त्यासाठी काही उपाय आहे का ?
Question by विनायक बुवाजी पाटील
24-10-2017
vbpatil96@gmail.com
आदरणीय सर ,एखाद्या जमिनीचे न्यायालयातून declaration घेणे म्हणजे काय ? त्याची प्रक्रिया कशी असते
The Specific Relief Act खाली , न्यायालयाकडून मिळकतीचा मालकी हक्क जाहीर करून घेणे , मिळकत ताब्यात आहे असे जाहीर करून घेणे म्हणजे declaration घेणे . न्यायालयात दावा दाखल करणे .
Adverse possession ने जमीन मालकीची झाली हे जाहीर करून घेणे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विक्रम yadav
24-10-2017
vikram.vy11135@gmail.com
नमस्कार सर , माझे व बहिणींमध्ये हक्क सोड पत्र दिवाणी कोर्ट मध्ये झाले आहहे ,काहीकारनं मुले तलाठी व इतर अधीकार यांनी योग मार्गदर्शन न केल्या मुले माझे नवे ७/१२ मध्ये अली नाहीत बहिणांचीच नावे राहिली आहेत ,त्यांनी तिझामिन गावातील वक्तीला विकली आहे ,त्याचा दस्त नोदनिकात तलाठी यांच्याकडे अल्ला आहहे ,तेव्हा मी तलाठी सर्कल व तहसीलदार दार यांना दिवाणी कोर्ट चा हुकूमनामा व बहिणीचे हक्कसोड पत्र सादर केल्यावर त्यांनी माझे नावाची नोंद करण्याचा आदेश दिला व माझे नवे ७/१२ झाला आहहे ,त्या विरोधात जमीन विकत घेणारे लोकांनी प्रांत साहेब यांच्याकडे त्या विरोधात तक्रार केले व ती नोंद फेरफार राधा करून मागितलं व ते प्रांत अधिकारी याने मेनी केले आहहे.माझ्याकडे सर्व कागद पत्र असताना माझा विरोधात आदेश झाला आहहे ,ती मंडळी दस्त नोंद व्हावी म्हणून तलाठी यांच्याकडे दबाव अन्नात आहहे प्रात अधिकारी यांचा फेरफार रद्ध करावा हा आदेश झाला आहे हे सांगून त्यांचा नावाची नोंद करतील तर सर मी फुडें काय करू कृपया मार्ग दर्शन करा.
मा उपविभागीय अधिकारी यांचे आदेशाविरुद्ध , अप्पर जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by SANKET
24-10-2017
sanketkhose@gmail.com
सर.. कलेक्टर मंजूर NA प्लॉट वर महापालिकेच्या नगररचना विभागाला DEVELOPMENT PLAN मधे डीपी रोड (डेव्हलोपमेंट प्लॅन रोड ) टाकण्याचा अधिकार आहे का?
हो
MRTP Act खाली प्रारूप DP मंजूर झाल्यावर , आपण हरकत घेतली होती का ?
DP प्रारूप सध्या प्रसिद्ध झाला असेल तर हरकत घ्या .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शंकर काकडे
23-10-2017
shankarbkakade@gmail.com
श्री किरण पाणबुडे सर
१) मिळकत विक्रीसाठी साधारण कुलमुखत्यारपत्र पुरेसे नाही ( सर्वोच्च न्यायालय- सूरज लँप आणि प्रा. लि. विरुद्ध हरियाणा राज्य व इतर ) सर हे कुडतकर सरांच्या जमीन खरेदी ह्या लेखात वाचले.
२) कुळवहिवाट विरुद्ध अपील कुठे करावे ?
३) एकत्र कुटुंबाच्या मिळकतीत फेरफार आव्हानात केल्यावर किती दिवसात निकाल लागेल? व चुलत काकांनी हरकत घेतल्यावर पुढे काय होईल ?
योग्य ते मार्गदर्शन करावे विनंती,
२.उपविभागीय अधिकारी
३. तक्रार नोंद १ वर्षात निकाली काढण्याची तरतूद आहे . तथापि तीन महिन्यात अशी तक्रार नोंद निर्णीत करावी असेही निर्देश आहेत
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by चैतन्य कुलकर्णी
19-10-2017
cmkulkarni9@gmail.com
नमस्कार सर,
मी शेत जमीन खरेदी केली आहे त्या वरती सहकारी पत संस्थेचा बोजा आहे . सदर संस्थेचे मुळ मालकाडे थकित कर्ज आहे व मुळ मालकाची जमीन आहे (जो गट संस्थेकडे तारण आहे त्यापैकी मी खरेदी केला आहे ) पण कर्ज रक्कम जास्त आहे सहकारी संस्था मी खरीदी केलेली जमीन खरेदी रद्द कारू शकते का ?
खरेदी रद्द करू शकत नाही मात्र , कर्जाचे वसुलीसाठी जमिनीची जप्ती करू शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by SANKET JADHAV
18-10-2017
sj49175@gmail.com
माझ्या घराच्या शेजारी एक गृहनिर्माण सोसायटी आहे.त्यात एकूण तीन apartment आहे.आमच्या घराला लागूनच उजव्या बाजूला शेजारी सोसायटीचा मोठा रस्ता आहे.त्या रस्त्याला लागूनच शेजारी आमचे घर आहे. तो रस्ता मी वापरू शकतो का? काही सोसायटीचे लोक मला आणि माझ्या कुटुंबातील लोकांना तो रस्ता वापरू देण्यास मनाई करतात.आम्ही रस्ता वापरू नये म्हणून आम्ही आमच्या जागेत केलेल्या गेटसमोर वाळलेली झाडे टाकतात.तरी आम्ही काय करावे.आमच्या घराच्या डाव्या बाजूला आमचा वैयक्तिक रस्ता आहे पण त्या रस्त्यातून त्याच सोसायटीची ड्रेनेज पाईपलाईन गेलेली आहे आणि तिथे खूप चेंबर काढलेले आहेत तेही आमची परवानगी न घेता.अनेक चेंबरमूळे हा रस्ता वापरण्यालायक राहिलेला नाही. त्यामूळे आम्ही वर उल्लेख केल्याप्रमाणे आमच्या घरालाच लागूनच असलेला उजव्या बाजूचा त्याच सोसायटीचा रस्ता मी वापरू शकतो का? मला प्लीज उपाय सांगा.मी आपला आभारी राहील.
रस्ते हे सार्वजनिक आहेत . गृहनिर्माण संस्था आपणास रोखू शकत नाही .
मात्र आपले घराचे उजव्या बाजूस सहकारी संस्थेचा जो रस्ता आहे त्याचा वापर करा
डाव्या बाजूस जी जागा ती आपले मालकीची आहे का ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by hemant_donde@rediffmail.com
18-10-2017
hemant_donde@rediffmail.com
Dear Sir,
We have taken harkat regarding land case in march 2017.when I made enquiry at tahsil office, I came to know that hearing is in 23.10.17.But we still haven't received notice.Is it proper to attain hearing without notice.pls guide.thanks.regards hemant
By the time , i got your question , date fixed for your hearing has lapsed . I don''t know whether you have attended the hearing.
But there is no harm in attending the hearing , even if you don't receive the hearing notice . Hearings before quasi judicial authorities are public hearing . Any one can attend the hearing . You are party to the suit , you can attend such hearing even if you dont receive the notice .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शिंदे प व
16-10-2017
shrinivascyber@gmail.com
सर माझ्या आजोबाची खरेदी जमीन खासरा पत्रकाला असून वारसा हक्काने त्यांचे तीन मुले यांच्या
नावे न यता ती जमीन माझ्या चुलत चुलत्या ने सहाजणांच्या नावे कब्जेदार मध्ये लावली आहे
खरी ती जमीन आमच्या आजोबाची असून त्याचे वारस तीन चुलते आहेत तरी काय करता येईल सल्ला द्या .
ज्या फेरफाराने चुलत चुलत्यांची नावे लागली आहेत तो आव्हानात करा . मात्र मुदतीच्या कायद्याची त्यास बाधा येऊ शकते . अश्या स्थित आपण , न्यायालयात आपला हक्क मिल्ने बाबत दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विक्रम yadav
15-10-2017
vikram.vy11135@gmail.com
नमस्कार सर , आपण केलेल्या मार्गदर्शनामुळे नेहेमीच होणार मानसीक त्रास कमी झाला आहे. माझ्या वडिलोपार्गिट गावी शेती आहहे मी दत्तक पुत्र आहहे ,वडील जिवंत असताना तयांनी माझ्या नवे काही जमीन केले त्या नंतर ते मयत झाले माझ्या आई ने व मुलींनी वडिलांचा नवे असलेल्या जमिनीवर माझे नवा ना लावता मला ना विचारता ती पुतीन जमीन विकून याकाळी मी दिवाणी नाय्यलात अपील करून त्या वर स्टे आणला पुढे ताडझोड होऊन हुकूमनामा झाला माझ्या आई ने व बाहीने ती जमीन विकून घेतलेले रुपया खर्च केले त्या मुले जमीन विकत घेतलेले विक्तिश ते रुपये मी परत दिले व त्या बदल्यात आई व बहिणिचाकडून कोर्टातच हाक सोड पत्रं हिऊन घेतले व दिवाणी न्यालयात हुकूमनामा झाला कि ती विकलेली जमिनीवर केवळ माझ्याच हाक राहील . पुढे वारंवार तलाठीच्या बदली मुले माझेनावे ७/१२ वर नोंद होऊ शकली नाही त्या कालावधीत ती जमीन पुन्हा विकली गेली व दस्त नोंदणी साठी तलाठी यांच्याकडे अल्ला मी त्याला विरोध केला ,व त्या विऱोयुद्ध तलाठी ,सर्कल,ताशिलदार यांच्याकडे माझा नोंदणी साठी अराझकेला व खूप परतनाने माझी नोंद झाली ७/१२ वर पण झणी ती जमीन पुन्हा विकत घेतली त्यांनी उपविबकीय मॅडम कडे त्या विरुद्व ती नोंद रद्ध करण्या साठी अपील केले व त्यांनी ते मान्य हि केले कागदी पुरावा नसताना आता पुढे मी काय करू माझी नोंद रद्ध करा तो फेरफार रद्ध झाला आहहे असा निकाल दिला आहहे.कृपया मायेंग्दर्शन करावे.मी दुसऱ्या कोणाची जमीन घेत नाही माझी जमीन मलाच परत मिळत नाही असा कसा न्याय होऊ शकतो.फुडें काय करावे लागेल कृपया सांगा माझे नाव कमी करून ते फेरफार रद्ध करून दस्त झालेल्या विक्तिचे नाव लगेच लावतील.
उपवि भागीय अधिकारी मॅडम यांचे आदेशाविरुद्ध , अप्पर जिल्हाधिकारी यांचेकडे अपील करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संकेत
14-10-2017
Sanketgujar@gmail.com
नमस्कार सर, ना.ज.क.धा. १९७६ अंतर्गत जमीन शासनाने ताब्यात घेतलेली आहे, सादर बाबतीत शासनाने पेमेंट साठी नोटीस काढलेली आहे व मालकाने नोटीस स्वीकारलेली नाही परंतु त्या नंतर मालकाने आजतागायत संपादित मिळकतीचा मोबदला स्वीकारलेला नसून नियमाप्रमाणे सदर मोबदला युएलसी ने कोषागारात अथवा कोर्टात देखील जमा केला नसल्याचे दिसून येते तरी याबाबत नवीन २०१३ कायद्यातील तरतुदीप्रमाणे मोबदला मागता येणे शक्य आहे का??? कृपया मार्गदर्शन करावे.
LARR कायद्याच्या कलम २४ प्रमाणे , केवळ जुन्या भू संपादन कायद्याप्रमाणे अवॉर्ड जाहीर झाले नसेल अथवा निवडा ५ वर्षापेक्षा जादा कालावधीपूर्वी , नवीन कायदा अस्तित्वात अळ्यापूर्वीपासून जाहीर झाला आहे पण जमीनच ताबा घेतला नसेल अथवा नुकसान भरपाईची रकम वाटप केली नसेल तरच , नवीन कायद्याप्रमाणे , नुकसान भरपाई मिळू शकते
आपली जमीन Urban Ceiling Act संपादन झाली आहे त्यामुळे कलम २४ च्या तरतुदी लागू शकणार नाहीत
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमित शिर्के
13-10-2017
amitkumar.shirke@gmail.com
मा. किरण पाणबुडेसाहेब
माझी बहिण FYBSc ला असताना तिचे नाव सारिका असे होते, नंतर तिने तिचे नाव बदलुन रुपाली असे केले आहे. व तसे राजपत्र सुद्धा तिने प्राप्त केले आहे. FYBSc च्या परीक्षा शासनाने कॉलेजकडे स्थानांतर केल्या असल्यामुळे तिचे गुणपत्रक सुद्धा सारिका नावाचेच म्हणजे पहिल्या नावाचे आले. नंतर SYBSc ला प्रवेश घेताना तिने तिचे नवीन नावानुसार प्रवेश घेतला आहे. व SYBSc चे तिचे सर्व गुणपत्रक सुद्धा नवीन नावानुसार आले आहेत. चालु वर्षी म्हणजे TYBSc ला प्रवेश घेताना FYBSc व SYBSc चे गुणपत्रकाची गरज असल्याने आम्ही ते दाखल केली होती. FYBSc च्या गुणपत्रीकावर सारिका असे नाव व SYBSc च्या गुणपत्रिकेवर रुपाली असे नाव असल्याने विद्यापिठाने तिला चालु वर्षी TYBSc ला प्रवेश देण्यास नकार दिला आहे. राजपत्र दाखल करून सुद्धा विद्यापीठ ते मानण्यास तयार नाही आणि नाव बदलाबाबत कवरिंग लेटर मागत आहे. कवरिंग लेटरबाबत आम्हाला काहीच कल्पना नाही. विद्यापीठाच्या परीक्षा चालु होण्यास १ महिना कालावधी आहे आणि तोपर्यंत माझ्या बहिणीचे एडमिशन होणे अतिशय गरजेचे आहे परंतु विद्यापीठ राजपत्र मानत नाही व तशी लेखी पण देण्यास तयार नाही. तरी आम्ही सध्या काय करावे.
१. विद्यापीठाचे उत्तर योग्य आहे का ?
२. विद्यापीठ शासनाचे राजपत्र मानण्यास नकार देऊ शकते का ?
३. आम्हांला मा. उच्च न्यायालयात गेल्यास लवकरात लवकर न्याय मिळेल का ?
४. अन्य काही उपाय असल्यास माहिती देण्यात यावी.
Question by रोहिदास सखाराम पाबळे
13-10-2017
rohidaspable@yahoo.in
निवासी झोन मध्ये तुकडेबंदी कायदा लागू नाही उत्तर दिल्याबद्दल आपले धन्यवाद सर त्यामधील नवीन कायदेदुरुस्तीची प्रत मिळेल का
Question by सुनीत NIKAM
13-10-2017
sunit.nikam@adityabirla.com
सर, माझ्या पणजोबांना तीन अपत्य होती. त्यातील तिसऱ्या अपत्याला म्हणजे माझ्या आजोबाना माझी आई धरून ३ मुली व ३ मामा अशी ६ अपत्य होती. आजोबांच्या मृत्यू नंन्तर माझ्या मामानी त्यांच्या तीनही बहिणींना न सांगता आजोबांच्या वाट्याची जमीन तीनही भावांच्या नावावर करून घेतली. ते करताना त्यांनी प्रतिज्ञा पत्रक तीनच भाऊ असल्याचे बनवले होते जे चुकीचे आहे. तीनही भाऊ हे govt. employee आहेत, व त्यांना कायद्याचे ध्यान आहे. तरीही त्यांनी मुद्दामून असेल प्रतिज्ञा पत्रक बनवून. स्वतःची नावे लावून घेतली.
आमची जमीन हि मुंबई-गोआ महामार्गासाठी अधिग्रहण होत आहे. त्या संबंधित आम्हाला जेव्हा दुसऱ्या नातेवाइकांचा फोने आला आणि आम्ही ७/१२ पहिला. व हि तीनच नावे कशी लागली याचा खुलासा मागितला तेव्हा प्रतिज्ञा पात्र बद्दल कळले.
जेव्हा आम्ही आमची नवे लावायला गेलो तेव्हा आम्हाला उपविभागीय अधिकारी ( महसूल ) कुडाळ यांच्या कार्यालयात सादर फेरफार विरुद्ध अपील दाखल करण्यास सांगण्यात आले. तसे आम्ही केलेही आणि त्यांचा निकाल हि आमच्या बाजूने लावण्यात आला आहे.
पण या सर्व काळात. त्या तिघांच्या बँक खात्यात जमीन अधिग्रहणाची रक्कम त्यांनी पुन्हा प्राधिकरणाला तीन भाऊ असल्याचे सांगून व जुने ७/१२ दाखवू मिळवून घेतली आहे.
मला खालील बाबतित मध्ये आपला सल्ला हवा आहे.
१. तो अपील माझ्या बाजूने लागला आहे. व आता ७/१२ वॉर नावे लागण्या साठी फेरफार नोंद वहीत मला फेरफार करून घ्यावयाचा आहे. तर तो कसा करावा व त्या नंतर ७/१२ वॉर नाव लावण्या साठी कश्या पद्धतीने अर्ज करावे लागतील.
२. जी रक्कम प्राधिकरणाने त्या तीन भावांच्या खात्यात जमा केली आहे. त्यातील आम्हा तीन बहिणींचा हिस्सा आम्हाला मिळवण्या साठी काय कायदेशीर कारवाई करावी लागेल.
३. मला कायदेशीर कारवाई साठी न्यायालयातच जावे लागेल का? कि इतरही काही मार्ग आहेत?
४. असे खोटे प्रतिज्ञापात्र दिल्या बद्दल त्यानं वर काही कारवाई होऊ शकते का.
५. ज्या प्राधिकरणाने त्यांना जमीन अधिग्रहण संभंधित रक्कम दिली आहे. त्यांच्या निदर्शनास मी हा खोटे पण कसा आणू. आणि ते त्यानंवर काही कारवाई करतील का?
१. जमीन संपादन संस्थेचे नवे ७/१२ सदरी दाखल असेल , त्यामुळे आपले नाव्७/१२ सदरी लावता येणार नाही
२. आपणास भावांकडून रक्कम ( बहिणीचे हिस्स्याची ) परत मिल्ने बाबत न्यायालयात दावा दाखल करावा लागेल
३.वरील दोन प्रमाणे . अन्य मार्ग नाही
४.हो . त्य्नाचे विरुद्ध आपण गुम्हा दाखल करू शकता . मात्र तीन बहिणीही वारस असले बाबत , न्यायालयाचा legal heirship प्रमाणपत्र काढून घ्या
५. त्यांचे मार्फत आता कारवाई साठी विलंब झालेला आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by HEMANT दोंदे
12-10-2017
hemant_donde@rediffmail.com
Respected Panbude Saheb,
Thanks for earnest reply to my previous querry regarding wrong name being wriiten on sale deed for the year 1988. Sir,let me bring to your kind notice that this land was incidentally found while searching on mahabulekh website. In our family nobody was ever aware that we might own piece land.
In late Nov’2016 ,my uncle came asking for signature for waras nond for land which initially was 8Hectare and now only 2241 m2 remaining which is reserved for school..
That is when we started searching. Otherwise we all brothers by GODS GRACE are educated and earning bread and butter.
Sir ,My question is for this piece of land which is 1acre (Now 2054 m2 still remaining ) .This land comes under NA JA KA MA dharna KAYDA.Perhaps it is Land ceiling act .If for this NA JA KA MA dharna kayda ,permission has to be taken from collector prior to selling of land , then how come these kind of irregularities happen which for a lay man like me( in land matters) though engineer by profession make feel disappointed . If 32 years is a big span, but what about procedures being followed in old days. Just because everything has gone online and I am getting information with 3G speed which my father never got . we have done waras nond in march 2017 for this 2054 m2 land .Seeing those sale of 1988 ,I found that somebody else surname is also wrongly written which is duly corrected with signature on side.
With all due respect and full faith in judiciary ,I kindly ask Sir, How do I find out that Mr Baban of sale deed was only Mr Bhagwan and nobody else.
Thanks
Regards,
Hemant
Question by प्रदीप बोरले
12-10-2017
pradip.borle6226@gmail.com
महोदय,
नवीन भूसंपादन कायदा २०१३ नुसार शासनाचे दि १२ मे २०१५ चे आपसी वाटाघाटीने थेट खरेदीचे परिपत्रकानुसार संपादन संस्थेने जमीन खरेदी केल्यास भूसंपादन अधिकाऱ्यास दि १९ मार्च २०१४ चे राजपत्रानुसार ३% आस्थापना शुल्क सदर संपादन संस्थेकडून घेता येईल काय?
कृपया मार्गदर्शन करावे.
थेट खरेदीसाठी ३ % आस्थापना व ३ % सेवासुविधा अनुज्ञेय नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शंकर काकडे
12-10-2017
shankarbkakade@gmail.com
आदरणीय सर
1) तलाठी यांना ७/१२ वर कूळ दाखल करण्याचा अधिकार ,३२ग ची किंमत निश्चित करण्याचा व पिकपाहणीस नाव लावण्याचा अधिकार आहे का? असेल तर ते कायदेशीर आहे का?
२) एका sarve nanbar cha ७/१२ ओंलीने उपलब्ध नाही व तसेच तहसील मधेही त्याचा रेकॉर्ड नाही पण नकाशा मध्ये ते क्षेत्र व सर्वे नंबर नमूद आहे तरी नवीन ७/१२ ऑनलाईन यावा ह्यासाठी काय करावे लागेल ?
३) नोटीस नाही आली हा विलंब माफीसाठी कारण होऊ शकतो का?
4) जमीन मालकास नोटीस न पाठवता कुळ दाखल करता येतो का व ३२ग किंमत निश्चित करता येते का?
5) एखाद्या व्यक्तीच्या पूर्वजांनी जमीन विकली असेल तर त्याच्याच वारसांच्या ताब्यात ती जमीन असेल तर कुळ दाखल करता येते का?
मागील प्रश्नांची उत्तरे दिल्याबद्दल धन्यवाद,,
१. नाही
२.आकारबंद मध्ये उल्लेख आहे का ?
३.हो .मात्र आपणास नोटीस मिळाली नाही हे सिद्ध करावे लागेल
४.नाही
५.नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शंकर काकडे
12-10-2017
shankarbkakade@gmail.com
आदरणीय श्री किरण पाणबुडे सर
१) भोगवटादार वर्ग २ च्या जमिनी ,४३ च्या शर्तीस पात्र असलेल्या जमिनी kulkaydyat milalelya जमिनी कोणतीही शासकीय अथवा प्रांत यांचेकडून परवानगी ना घेता खरेदी विक्री झालेला व्यवहार रद्द करणे साठी काय करावे लागेल?
२) तसेच परवानगी ना घेता केलेले खरेदीखत कायद्यात मान्य आहरे का?
३) कोणतीही परवानगी ना घेतलेल्या कुलकायद्याच्या जमिनीची विक्री झालेली आहे तर आता परवानगी घेता येईल का ? कि झालेल्या व्यवहाराला कायद्यात काहीच किंमत उरलेली नाही ?
१. ३२ ग अन्वये विक्री किंमत निश्चित होऊन १० वर्षे झाले असतील तर , विक्री परवानगी घेण्याची आवश्यकता नाही .
२.जर १० वर्षापेक्षा कालावधी कमी असेल व विना परवानगी विक्री केली असेल तर , महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ८४ क क अन्वये कारवाई करणे आवश्यक
३.परवानगी न घेता विक्री झाली असल्यास अनु क्र २ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कारवाई करणे आवश्यक .
मात्र सुधारणा कायद्यानुसार , दंडात्मक कारवाई करून , व्यवहार नियमानुकूल करणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गजानन भोंबे
11-10-2017
gajanan.bhombe@rediffmail.com
सर मला माझ्या काकाच्या नावावरील ०.५(अर्धा गुंठा) जमीन माझ्या नावे करायची आहे परंतु तलाठी म्हणतात कि, हयातीत व्यक्तीच्या नावावरील जमीन वारसा हक्काने वाटप करता येत नाही. ती नोंदणी कार्यालयातून नोंदणी करावी लागते. खरे काय आहे सांगावे?
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
