जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

धर्मादाय प्र्योजनासठि कोण कोणत्या जमिनी शासनाकडुन देण्यात येतात
धर्मदाय प्रयोजनासाठी जमीन देण्यात येत नाही .
पूर्वी देवस्थान चे पूजे अर्चा , दिवाबत्ती या साठी जमीन देण्याची प्रथा होती . आता या कारणासाठी जमीन दिली जात नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by HEMANT DONDE
01-10-2017
hemant_donde@rediffmail.com

Dear Sir,
My father died in year 1999. while searching old records of kharedi khat of year 1985 , we found that his name is baban instead of bhagwan. can we as his legal heir take objection in this regard of sale deed carried in the year 1985. At present I have found 2 plots sold in this manner.
Thanks
Regards
Hemant
It is almost 32 years since the sale deed has been executed . You will have to challenge the sale deed in civil court . But explaining 32 years delay is difficult task . Beside your father is dead , it is difficult to prove about the real name .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की मी एक अल्पभूधारक शेतकरी असून मला माझ्या मुलीच्या शिक्षनकामी तहसील कार्यालयाकडून अल्पभूधारक चा दाखला हवा आहे परंतु तहसीलदार मला यासंबंधी शासन निर्णय नाही असे कळवितात तरी कृपया मला आपल्याकडून सदरील विषयी मार्गदर्शन व शासन निर्णय असल्यास सांगा.
तहसीलदार यांनी दिलेले उत्तर बरोबर आहे . आपला गाव नमुना ८ अ व शपथ पत्र दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

अ ब क ड यादी चौथी आवृत्‍ती याबाबत थोडक्‍यात मार्गदर्शन करावे व सदर पुस्‍तक PDF स्‍वरुपात उपलब्‍ध असल्‍यास कृपया माझे इ-मेल आयडीवर पाठविण्‍याची कृपा करावी.
सर माझे आजोबा यांचे मूळ गावी त्यांची वडिलोपार्जीत जमीन व घर होते.परंतु आजोबा २ ते ३ वर्षाचे असताना त्यांचे आई-वडील मयत झाल्याने आजोबाचे पालन त्यांचे आत्याने केले.परंतु आजोबाचे नावावर त्यांचे नावावर कोणतीही मिळकत झाली नाही.त्याबाबत मार्गदर्शन मिळावे.कालावधी (१९५०-१९६०)
कोणतीही गोष्ट विहित वेळेत होणे / करणे आवश्यक असते . कायद्यात law ऑफ limitation ला महतव आहे . ५० वर्षाहून अधिक विलंबाबत कोणते कारण आपण देणार .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Jayant Mutha
29-09-2017
jayantmutha@yahoo.com

नमस्कार सर,

आचारसंहिता लागू असताना ग्रामपंचायतची मासिक मिटींग घेणे आचारसंहितेचा भंग होतो काय ?
मतदारावर प्रभाव पडेल असे कोणतेही निर्णय मासिक बैठकीत घेता येत नाहीत .
बैठक न घेणे हितावह

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Pawan
29-09-2017
Pawanrodge@gmail.com

सर
Maza garala lagun shezaril garcha darwaja ha javalpas 2 foot amacha haddit yeto tyamole amhi amche bandhkam kartani 3foot he atikramnit manjech sarkari jagevar kele ahe pan ata roj vad hotat tya karnastav kortamede case taklyas tyacha fayada hoile ka sir those margdarshan kara
आपापसात चर्चेने प्रश्न सुटतो का पहा ?
न्यायालय कालावधी खूप जाईल . आर्थिक / मानसिक त्रास आहेच .
या अपरोक्ष न्यायायालयत गेल्यास , आपला प्रश्न कायमचाही सुटू शकतो.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
प्रश्न असा आहे की, XXX ह्या व्यक्तीचे ६ मुले होती
A,B,C,D,E,F त्याप्रमाणे ‘’A’’ ह्या मोठ्या मुलाचे नाव (ए.कु.मॅ.) म्हणून लागले असेल जुना फेरफार नाही बघितला,
त्यावरून १९५३ साली A हा मयत झाला, परत फेरफार वर ‘’P’’ ए कु पू म्हणून त्याच्या मुलाचे नाव दाखल झाले,फेरफार बघितला,
त्यांनातर असाच त्याच्या ३ मुलांची नाव दाखल झाले आता ह्या प्रकरणात बाकी C ह्या मुलास कुठेच हिस्सा मिळाला नाही , फक्त एका ६ गुंठे जमिनीवर B,C,D,E,F च्या वारसांची नावे आहेत . पण P चे नाव नाही त्या जमिनीवर, P चे वारस म्हणतात की तुमचं काहीही हिस्सा नाही जमिनीत आणि C हा लवकर मयत झाला होता म्हणून वारसा हक्क डावलला गेला, सगळ्या जमिनीवर P च्या वरसांची नावे आहेत तर अत्ता C च्या व अन्य वारसाना त्यांचा हक्क मिळू शकतो का? कोणता पुरावा लागेल वारसा सिद्ध करण्यासाठी? कृपया
ज्या फेरफाराने केवळ A च्या वारसांची नवे लागली तो फेरफार व नंतरचे फेरफार उपविभागीय अधिकारी यांचेकडे आव्हानात करा . अन्य पुराव्याची गरज नाही . फेरफारवरून चित्र स्पष्ट होत आहे हि कि मिळकत XXX ची होती . पर्यायावे त्यांचे सर्व वारसांची नवे लागणे आवश्यक आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर मी जानेवारी २०१६ मध्ये नांदेड शहराला लागून असलेल्या वाडी बु.ग्रामपंचायत हद्दीत प्लॉट घेतला आहे .मला आता बांधकाम करावायचे आहे पण जानेवारी २०१६ पासून ग्रामपंचायतचे बांधकाम परवानगी अधिकार बंद झालेत आहेत .ते नगररचना ला गेले आहेत असे समजले पण नगररचना म्हणत आहे कि तुमचे ले आउट ग्रामपंचायतचे असल्यामुळे आम्ही परवानगी देऊ शकत नाही .आतावर्ग २ ग्रामपंचायतिचे परवानगीचे अधिकार तहसीलदार यांना देण्यात आहे आहेत असे समजले . म्हणून आता प्रस्ताव तहसील कार्यालय येथे जमा केला आहे .पण अद्याप कार्यवाही काहीही झालेली नाही .सर मला परवानगी कधी व कशी मिळेल एवढे सांगा.
ज्या क्षेत्रासाठी प्रादेशिक योजना अस्तित्वात आहे किव्वा अस्तित्वात आली आहे , त्या क्षेत्राचे नियोजन प्राधिकारी जिल्हाधिकारी आहेत . म्हणजे बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी व्यांना आहेत . जिल्हाधिकारी त्य्नाचे अधिकार तहसीलदार अथवा प्रांत अधिकारी यांना प्रदान करू शकतात . त्या प्रमाणे नांदेड येथे , तहसीलदार यांचेकडे विकास परवानगी अधिकारी देण्यात आलेले असतील . तहसीलदार यांचेकडून परवानगी देण्यास विलंब झालेला असेल तर त्यांना हि बाब निदर्शनास आणून द्या , अन्यथा जल्हाधिकारी यांचेकडे विचारणा करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय माझा प्रश्‍न असा आहे महाराष्‍ट्र जमीन महसूल नियमपुस्‍तीका खंड - ३ मध्‍ये विहीत केलेले नोंदहवीचे नमुने जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या कार्यपध्‍दतीची नियमपुस्‍तीकाशी मिळतेजुळते आहेत पण त्‍यामध्‍ये प्रकरणाचा प्रकरण क्रमांक व परीच्‍छेद क्रमांक वेगळा दिलेला आहे. मग कार्यालयीन कामे करतांना वापरण्‍यात येणारी नोंदवही MLRC खंड - ३ प्रमाणे ठेवावी क‍ि जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या कार्यपध्‍दतीची नियमपुस्‍तीका मध्‍ये विहित केलेल्‍या नमुन्‍यानुसार ठेवावी. याबाबत योग्‍य मार्गदर्शन करावे.
आपणास ज्या कार्यालयाचे नमुने ठेवायचे आहेत त्या कार्यालयाचे नमुने खंड ३ प्रमाणे ठेवणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, मी व माझी पत्नी दोघेही शासकीय सेवेत आहोत. आम्ही शासकीय निवासस्थानात राहतो. नियमानुसार आमचा दोघांचाही घरभाडे भत्ता कापला जातो. निवासस्थान माझ्या नावावर असल्यानं माझ्या वेतनातून सेवा व अनुज्ञप्ती शुल्क कापले जाते. आता माझी बदली झाल्याने ते निवासस्थान माझ्या पत्नीच्या नावे व्हावे यासाठी मी साप्रवी कडे अर्ज केला. साप्रविने 6 महिन्यानंतर सादर निवासस्थान पत्नीच्या नावे केले. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग दंड भरणाबाबत सांगतात. कृपया मार्गदर्शन करावे.
आपण घरभाडे दोंघांचे कट करण्याचा प्रश्न उद्भवत नाही आपण वेळीच हि बाब आपले कार्याचे निदर्शनास आणून देणे आवश्यक होते .
आपली बदली ते पतिणीचे नवे घर होई पर्यंत आपण अनधिकृतपणे घरात राहत होता असा निष्कर्ष आपले विभागाने काढला आहे . सार्वजनिक बांधकाम विभागाचे निदर्शनास हि बाब आणून द्या . घरभाडे भारत असले बाबाबत त्यांना पुरावा द्या . कदाचित ते दंड माफ करतीलही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by rajesh kahare
24-09-2017
rajeshkahare@gmail.com

सर गावातील वाहून जाण्याऱ्या सांडपाण्यान्यावरून खातेदाराने शेती ओलीत करण्या करीत परवानगी मागितली आहे तशी परवानगी देता येते का, कोणत्या कलमाखाली देता येईल
शासनाचे मालकीच्या स्रोतावरून पाणी घेण्याचे असल्यास कलम ७० व जमीन महसूल नियम अंतर्गत परवानगी देता येते . गावातील सांडपाणी , हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीचे आहे . त्यामुळे त्याची परवानगी देण्याचे अधिकारी ना. तहसीलदार यांना नाहीत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर ,
आपण खुप छान माहीत देता त्या बद्दल आपला आभारीं मजा प्रश्न डॉ.संजय कुंडेटकर सर यान आहे .सर माझ्या आजोंबांची २२ गुंठे जामीन ही पाटील इनाम ची होती. परंतु ते मानसिक रोगी व वेसनी असलाय मुळे १९४० साली माझे मोठे चुलते धोंडीराम पाटील वय 1 वर्ष व तायला आज्जी आ.प .का . अशे बक्षीस पात्र केले. नंतर त्या जमिनीला २८/४/४९ रोजी धोंडीराम पाटील आ .प .का .ला कुल केशव व आनंद पाटील संरक्षित कुल कलाम ३ अ प्रमाणे नोंद झाली असा फेरफार सापडतो. नंतर दिनांक १९/३/१९५५ रोजी कुल कायदाय मुळे धोंडीराम पाटील आ .प .का( आज्जी ) .ला इतर हक्कात आनंद पाटील साधें कुल १/२ हिस्सा फक्त अशी नोंदीचा फेरफार आहे .नंतर १९/९/१९६१ रोजी कोर्ट वाटणी पत्रक करून ती जमीन आमच्या वडील माणिक पाटील वय ७ वर्ष याना कोर्ट वाटणीपत्रक तुन मिळाली पुढे ती कुल असलेली व्यक्ती मरण पावली . पण माझे वडील माणिक पाटील आ. प .का (आज्जी ) अशी नोंद झाली वडील आ प का होते.व नंतर काही दिवसांनी माजी आज्जी पण मरण पावली . त्या मुळे त्यांना ती जमिनी बद्दल जास्त माहिती नव्हती तर आज रोजी ७/१२ वरती भोगवटादार माझे वडील माणिक पाटील आ प का (आज्जी ) व इतर अधिकार मध्ये आनंद पाटील (मयत आहेत ) साधें कुल ३ प्रमाणे अशी नोंद आहे परंतु त्यांच्या वारसांनी नोंद वडील आ प का असलाय मुळे झाली नाही किंवा त्यांनी केली नाही ही माहित नाही परंतु गाव नमुना १२ मध्ये आज पर्यन्त जमीन कसणाराचे नाव पीक पाहणी सादरी आनंद पाटील ह्यांचं वारसांची नवे लागली आहेत . तर मला काही प्रश्नांची उत्तर मिळतील काय
१) माझे वडील आ प का असलाय मुळे त्यांना कुल लागू होते काय .
२)त्यांनी ३२ ग केले नाही . तर त्यांचे ३२ ग होणार काय .
३) जमीन पाटील इनाम असली मुळे त्याची वरती सरकार नाव पडले आहे आमाला माहित नसली मुळे व कुळ च्या वारस साने सरकार नाव कमी करण्य साठी कोणतीही रक्कम कोषागारात भरली नाही. तर ती जी रक्कम मी भरू शकतो का .
४) कुळाने आज पर्यंत कोणतयाही प्रकारचा खंड किंवा काही सुद्धा दिलेले नाही तर तो इतर अधिकारात जे कुल आहे ते मयत असून ते नाव कमी करता येईल का ?
५) सर कायदीशीर प्रकारे मला ती जमीन कशी परत मिळेल . आणि मिळत असेल तर कशी कृपया कळवा .
६)आत वहिवाटीला कुळाचा मुलाचे नाव आहे पण इतर अधिकारात तीळ कुल ही मयत आहे व त्याला वारस नोंद झाली नाही कारण माझे वडील अजून कागदोपत्री आ प का आहेत तर ते कायदेशे वहिवाट दार आहेत का ?
सर कृपया मार्गदर्शन कर जर हवे असतील तर सर्व जुने ७/१२ व फेरफार मी तुमाला मेल करिन कृपया मार्गदर्शन करा.
.
आपले प्रश्नावरून सामुर्ण माहिती मिळत नाही .
१. एकूण क्षेत्र किती होते ?
उत्तर :- २२ गुंठे
२. सरकारचे नाव मिळकतीस केव्न्हा लागले ?
उत्तर :- १९६२ साली पाटील इनाम खालसा कायदाय मुळे
३. एकूण क्षेत्रापैकी , अर्ध्या क्षेत्रास आपले वडिलांचे लांब का लागले ? पूर्ण क्षेत्रास नाव का लागले नाही ?
उत्तर :- भोगवटा दार सादरी माझ्य वडिलांचे नाव आहे . माणिक पांडुरंग पाटील .आ.प .का अनुबाई प. पाटील (आज्जी ) जी मयत आहे . व इतर अधिकारात साधे कुल आनंद पाटील हे पण मयत आहेत .वारस नोंद झालेली नाही . फक्त पिकपाहणी ला वारस ची नवे आहेत .
४. ७/१२ सादरी सरकारचे नाव लागलेले असताना , आपले व कुळाचे नाव मिळकतीस सध्या आहे का?
उत्तर :- हो आहे .

उपरोक्त प्रश्नांचे अनुषंगाने खुलासा व्हावा . तथपि उपलब्ध माहितीवरून
पाटील साहेब , सध्या मिळकतील सरकार असे नाव आहे . जमीन पाटील इनाम होती . पाटील इनाम नष्ट करणे कायद्यान्वये , जमीन सरकारने परत घेतली असा त्याचा अर्थ होतो . त्यामुळे सध्या ना तुम्हाला ना कुळांना कोणताही हक्क सांगता येणार नाही .
जमीन regrant करून घ्यायची जरी म्हटले , विलंब खूप दिवसांचा झालेले आहे .
सध्या स्थित जमीन सरकारचे नावे आहे का ?
सरकारचे नाव असल्यास ती या पूर्वी उत्तर दिल्याप्रमाणे , आता आपणास मिल्ने अशक्य आहे .
इनाम जमीन पूर्वी , कब्जेदारना नजरांना भरून घेऊन शासनाने पुनर्प्रदान केल्या आहेत . आता तो हक्क आपलेकडे उरला नाही .

मात्र जर सध्या ७/१२ सदरी , आपले वडिलांचे नाव असेल व इतर अधिकारात कुळांचे वर्षांची असतील , तर कुल हे सौरक्षित कुल असल्याने कृषक दिनी मालक झाले आहे . केवळ ३२ ग अन्वये किंमत होणे हि तांत्रिक बाब झालेली नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय श्री किरण पाणबुडे सर
एका जमिनीवर साधे कुल लागले आहे आता त्या जमिनीवर पुन्हा कुल होता येईल का?,,होत असेल तर संरक्षित कुल होण्यासाठी कायदेशीर काय करावे लागेल, कुठे अर्ज करावा लागेल कुल होण्यासाठी?
२) पूर्वीपासून कसत असलेल्या जमिनीला सावकाराचे नाव असल्यामुळे आता कुल होता येईल का?
जर लागलेल्या कुळाकडे खंडाच्या पावत्या नसतील व कधी तोंडी करार सुद्धा झाला नसेल, व कधी कुल लागल्याची नोटीस सुद्धा आली नाही तर ते कायदेशीर कुल मानण्यात येईल का?
३)आपला जमिनीवरचा ताबा सिद्ध करण्यासाठी पिकपाहणी हा पुरावा कोर्टात मान्य होईल का?
पिकपाहणी ला कायदेशीर महत्व आहे कि नाही ?
४) कुळाकडून जमीन मालकाला ३२ ग ची किमात निश्चित झाल्यावर
जमीन विकत किंवा अन्य मार्गाने घेता येईल का?
कृपया आपण मार्गदर्शन करावे जेणे करून कोणाला तरी त्याचा हक्क मिळावा सर आपणास नम्रविनंती,,,
१. सध्या ज्या कुळाचे नाव लागले आहे तो जमीन कोण कसत आहे का ? जर या कुळाचे नाव १९५७ नंतर दाखल असेल तर , १ वर्षाचे आत कुळाचे नवे किंमत ठरणे बंधनकारक आहे . जर किंमत ठरली नसेल व कुल जमीन कसत नसेल तर , जमीन मालक अश्या कुळाचे नाव कमी करण्यासाठी न्यायाधिकरणाकडे अर्ज करू शकतो .
२.जर कुल जमीनकास्ट असेल तर , नव्याने कुळवहिवाट निर्माण होऊ शकत नाही .
३.होय . बऱ्याच प्रकरणात , जर पिकपाहणीस कायदेशीर प्रक्रिया पार पडून नाव लागले असेल ( म.ज.म.अधिकार अभिलेख तयार करणे नियम ३१ ) तर , पिकपाहणी नोंदीचा आधार ताब्यासाठी घेतलेला आहे .
४.कुळाचे नवे किंमत ठरल्यावर , कुळाकडून कलम ४३ खाली परवानगीने खरेदी करता येईल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर
आमच्या गावाने १९८२ पासून नगरपालिका वर बहिष्कार टाकला होता व आजही बहिष्कार आहे ,सध्या निवडणूक झाल्या पण आमच्या एकजुटीने बहिष्कार आहे ,आम्हाला नगरपालिका नको आहे, कायमस्वरूपी ग्रामपंचायत हवी आहे सगळ्या लोकांचे हेच मत आहे , तर पुन्हा
ग्रामपंचायत राहण्यासाठी काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करावे विनंती ...
१. आपले ग्रामपंचायतीचा समावेश नगरपालिकेत झाला आहे . कायदेशीर प्रक्रिया पार पडून ग्रामपंचायतीचा समावेश नगरपालिकेत झाला आहे . त्यामुळे आता आपले ग्राम पंचायतीने नागरपालिकेतून स्वतंर होणे अवगढ आहे .
२. ज्या अधिसूचनेद्वारे आपली ग्राम पंचायत नगरपालिकेत समाविष्ट केली आहे , ती अधिसूचना बदल करावी लागेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

कुल कायदा काय असतो
कुळाचे किती प्रकार असतात
कोणत्या कुळाच्या आधारे त्या शेतीवर त्यांच्या वर्सानंच अधिकार असतो
कुल नावाने लागायला साधारणतः किती वर्ष वहिती करावी लागत hoti
१.कुल व जमीन मालक यांचे संबंध , त्यांच्यातील वाद , कुळाने द्यावयाचा खंड , कुळाचे अधिकार , शेतजमिनीचा किफायतशीर वापर व इतर उद्देश या कायद्याचे preamble मध्ये आहेत .
२. सौरक्षित कुल
कायम कुल
कृषक दीना नंतरचा कुल
३.कलम ४० अन्वये कुळवहिवाट हक्क वंश परंपरागत आहे
४. कुल व मालक यांच्यातील कुळवहिवाट हक्क निर्माण होणे आवश्यक . त्यासाठी वहिवाटीची कालमर्यादा नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

श्री किरण पाणबुडे सर
१९४६ ला पंजोबांनी जमीन विकत घेतली आहे कोर्टाच्या आदेशाने विकत घेतली आहे तरी ती अजून पर्यंत नावे झाली नाही फेरफार मध्ये त्या जमिनीचा सर्वे नंबर आहे पण त्या ७/१२ वर फेरफार दाखवत नाही,दाखल झाला नाही जुना ७/१२ हि तहसीलदार मध्ये उपलब्ध नाही, आज रोजी त्या ७/१२ वर सावकाराचे नाव आहे व इतर हक्कात साधे कुल लागले आहे, जमीन हि आमच्याच लागवड करत असलेल्या शेता जवळ आहे ,, कायदेशीर दस्त म्हणून खरेदी केल्याचा १९४६ चा पुरावा आहे , जमीन कायदेशीर रित्या मिळण्यासाठी काय करावे लागेल,,, सर आपण मार्गदर्शन करावे ,,
न्यायालयीन आदेशास ७१ वर्षे झाले आहे . विलंब खूप झाला आहे . विलंबाबाबत सबळ कारण दिल्यास , नाव दाखल होऊ शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय सर
अर्जावरून नोंद करणे हे अवैध चुकीचे आहे तर एखाद्या व्यक्तीने तलाठी यांस कुल होण्यासाठी कायदेशीर दस्त सादर न करता अर्ज केला असता तो मान्य करणे चुकीचे असेल कि योग्य ?
आणि ह्याच अर्जदाराला अर्जामध्ये नमूद केलेल्या सर्वे नंबर पैकी काही जमीन च जर तो कसत असेल तर, तसेच बाकी सर्वे नंबर ची जमीन कुठे आहे हेही त्याला माहित नसेल तर, त्याने कुल होण्यासाठी केलेला अर्ज बेकायदेशीर ठरेल का? ह्याच प्रकरणात जमीन मालकाला कधीच नोटीस अली नाही जर अली असती तर तेव्हाच अडचण सुटली असती. तुम्ही माहिती द्यावी विनंती...
एखाद्या जमिनीस कुल म्हणून नाव दाखल करण्यासाठी मामलतदार म्हणजे तहसीलदार यांचेकडे कलम ७० ब अन्वये अर्ज करावा लागतो . तलाठी यांना अधिकार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय सर
कुळकायद्यानुसार जेव्हा कुल १९७२ साली जमीन मालकाच्या नावे ३२ग ची किंमत २५७ रुपये निश्चित करतो आणि ७/१२ च्या इतर हक्कात ठेवतो, तेव्हा त्याने काही दिवसांची मुदत घेतलेली असते ती मुदत संपली असता त्याने कोणतीही कायदेशीर गोष्ट नाही केली तर काही वर्षानंतर तो मरण पावला असता,इतर हक्कात असलेल्या बोजा ची रक्कम भरण्याचा अधिकार त्याच्या वारसांना असतो का? १९७२ साली जमीन मालक हा एकच व्यक्ती आहे तसेच त्याला कुल व अन्य ह्या संदर्भातील काहीच गोष्टी माहित नव्हत्या, जमीन मालक हा ज्याचा
कुल लागला त्याचा ओळखीचाच होता,कधीच त्याने जमीन मालकाला खंड दिला नाही ह्याबद्दल जर कल्पना असती तर प्रॉब्लेम तेव्हाच सॉल्व झाला, असता, २५७ रुपये हि किंमत १९७२ साली दहा ठिकाणी असलेल्या जमिनींना सगळे सर्वे नंबर एकूण १० आहेत योग्य आहे का?
३२ ग किंमत रक्कम जरी निश्चित करून दिलेल्या हाओट्यात भरलेली नसली , तरी कुळांना अथवा त्याचे वारसांना किंमत भरण्याचा हक्क आहे . ३२ ग किंमत मात्र व्याजासह कुळास भरावी लागते .
एखदा ३२ ग किंमत ठरलीकी , कुलाछा हक्क डावलता येत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नवीन अति शर्तीची जमीन असेल आणि अशा जमिनीची पॉट हिस्सा मोजणी करायची असेल तर शासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे का?
पोटहिस्सा जर मूळ प्रदात्याच्या मृत्यूमुळे त्याचे वारसांचे नावावर मिळकटीमुळे निर्माण झाला असेल तर , मोजणीसाठी परवानगीची आवश्यकता नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय माझा फक्‍त एकच प्रश्‍न आहे की, विभागीय दुय्यमसेवा परीक्षा लिपीक संवर्ग ही परीक्षा सुट मीळालेल्‍या विषयाचा लाभ घेवून (दुसरी संधी) जर परीक्षा दिली तर ज्‍या ज्‍या विषयाची परीक्षा दिली त्‍या त्‍या विषयामध्‍ये ६० टक्‍के च्‍या वरच गुण घ्‍यावे लागतील म्‍हणजे सुटच घ्‍यावी लागेल तरच संपुर्ण परीक्षा उत्‍तीर्ण करता येते का सर. योग्‍य मार्गदर्शन व्‍हावे.
नमस्कार सर माझ्यया आजोबानी १९५९ साली खरेदीने जमीन घेतली होती त्यान्चाय मृत्यूनंतर वारस दोन मुले व पाचमुली होतया परंतु ७/१२ वर एका मुलाचे नाव ए कु मेनेजर होते आजोबा १९६४ साली मयत झाले ए कु मे चाय फेरफार नुसार सगळ्या वारसांची नावे ७/१२ सदरी लावली
दोन मुलांपैकी एक माझे वडील १९९३ साली मयत झाले आम्ही तीन भाऊ व एक भहीन अशी नोंद झाली आम्ही तिघांपैकी दोघांनी तया पाच मुली कडून म्हणजे आमचया आत्याचे सामान हिश्याय प्रमाणी तयाचे हिशय खरेदीखताने घेतले असून माझ्हाय एका भावाने कोर्टात वाटणी पत्राचा दावा दाखल केला असून हिंदू वारसा कायदा १९५६ नुसार तया पाचमुली म्हणजे आमचया आत्या याना सामान हिस्सा येत नाही तर आम्ही केलेले खरेदीखत बाद होईल कि आत्या चाय हिशयपूर्ती नोंद ग्राहय धरली जाईल कृपया मार्गदर्शन करावे

हिंदू वारसा कायदा अन्वये मुलींनाही वडिलांचे मिळकतीत हक्क आहे . २००५ पूर्वी मुलींना copracenary मिळकतीत वाटप करून मिळण्याचा हक्क नव्हता . आपल्या तिन्ही अत्याचा मिळकतीत हक्क होता. त्यामुळे खरेदी खत रद्द होण्याचा प्रश्न उद्भवत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय
किरण पाणबुडे सर
१) सर एका व्यक्तीचे गवत उगवणाऱ्या पडीक जागेला टेनन्सी ऍक्ट प्रमाणे कुल दाखल झाले आहे, पण तो व्यक्ती कोणाचा तरी पूर्वज असेल जमीन मालकाने १९४६ ला कोर्टातून जाहीर लिलावाने हि जमीन विकत घेतली आहे, त्याचा पुरावा देखील आहे व फेरफार पण आहे , पण त्या ७/१२ वर अजून सावकाराचा नाव आहे व ७/१२ वर फेरफार नोंद झाली नाही विकत घेतल्याची, ज्याकडून कोर्टाच्या आदेशाने विकत घेतली त्याचेच अजून ७/१२ वर नाव आहे . पण कुल जुन्या काळात लागला आहे, लागल्यामुळे जमीन मालकाला जमीन मिळण्यासाठी काय करावा लागेल,,
2) सर कुल लागण्यासाठी कोणता पुरावा असतो, नि कुल तो कुल आहे असा कोणत्या प्रकारे सिद्ध करू शकतो ,,कधी खंड नाही दिला, तोंडी करार सुद्धा नाही झाला,, कुळकायद्याचा गैरवापर करून जमीन मिळवली आहे अशा प्रसंगात काय करावं,,ह्या परकरणात शेतकरी असलेला व्यक्ती अडाणी आहे त्याला सगळ्या लोकांनी सगळ्या बाजूंनी फसवलं आहे त्याची जागा बेकायदेशीर त्यांच्या नावी केली आहे ,,पंजोबांनी विकत घेतलेल्या २७ सर्वे नंबर च्या जमिनीपैकी त्याला १च सर्व्हे नंबर ची जमीन त्याच्याकडे कसण्यासाठी शिल्लक आहे,
३) १९७५ नंतर कुळकायदा लागू होतो का ,,
४) २०१० पर्यंत जमीन मालकाचे ७/१२ वर नाव होते जमीन कसणाऱ्या ने डायरेक्ट ३२ग ने त्याच्या नावी केली अत्ता बेकायदेशीर पाने केली असावी अशावेळेस कोणत्या मार्गाने जमीन मिळवता येईल?
४) कुळाकडून जमीन मालकाला जमीन विकत घेता येईल का ?
शंकरजी ,
मिळकतीस लागलेल्या कुळाचे नवे ३२ ग किंमत ठरलेली आहे . त्यामुळे आता त्याचा हितसंबंध दूर करता येणारनाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माननीय सर,
कुल कायदा काय असतो कुळाचे किती प्रकार असतात.
कोणत्या कुळाच्या आधारे त्याचे वारसांना अधिकार केव्हाही मिळू शकते.
आणि ३८ ई प्रमाणे जमीन डेकलेअर म्हणजे काय. शेवटचा प्रश्न ७ १२ वर चढलेले नाव कमी करता येते काय, व कोणत्या आधारे हा ऑनला अधिकार असतो.कृपया मार्गदर्शन करावे..
The ABCD List 4 th edition

This page was generated in 0.65 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3400
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3