जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by दिलीप वैद्य
03-08-2017
dileepvaidya@rediffmail.com
१० वर्षांपूर्वी मी ४.२८ गुंठे बिनशेती प्लॉट खरेदी करून त्यावर घर बांधले आहे.
एका मोठ्या प्लॉटचे १० तुकडे पडून मूळ प्लॉट विकण्यात आलेला आहे. संपूर्ण प्लॉटची बिनशेती परवानगी आहे व त्यातीलच १ प्लॉट मी खरेदी केलेला आहे. प्लॉट खरेदी केल्यावर हद्द समजून घेणेसाठी मी ५-६ वेळा भूमी अभिलेख खात्याकडून मोजणी करून घेतलेली आहे.
घर बांधणीसाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी आहे तसेच स्थानिक ग्रामपंचायतीचीसुद्धा परवानगी घेतलेली आहे. घर बांधून झाल्यावर ग्रामपंचायत यांनी कर आकारणी सुरु केली आहे.
माझ्या सदर ४.२८ गुंठेच्या प्लॉटच्या ७/१२ उताऱ्यामध्ये २००३-२००४ सालापासून क्षेत्र दाखविताना प्रथमपासून वरकस ००.०२.४८ व पोटखराबा ००.०१.८० असे क्षेत्र दाखविले आहे. व २००३-२००४ सालापासून जागेचे स्वरूप हे बिनशेती असे दाखविले होते. परंतु अचानक ह्या वर्षांपासून बिनशेती ऐवजी ओपन बिनशेती अशी नोंद टाकण्यात आलेली आहे.
चौकशी केली असता माझ्या जागेची बिनशेती मोजणी न झाल्याने पोटखराबा व ओपनबिनशेती उल्लेख टाकल्याचे सांगण्यात आले. हे उल्लेख काढण्यासाठी नक्की काय करावे लागेल ?
भूमी अभिलेख खात्याकडे बिनशेती मोजणी अर्ज दिला असता त्यांनी तो अर्ज प्रांत कार्यालयात देण्यास सांगितले. त्यानंतर प्रांत कार्यालयात सदर मोजणीसाठी ३-४ सरकारी खात्यांच्या परवानग्या (ग्रामपंचायत,जिल्हाधिकारी, इत्यादी) तलाठी यांच्याकडून काही नमुने, जागा नकाशे, लगतच्या हद्दीदारांच्या ७/१२ च्या १० प्रती इत्यादी लांबलचक यादीच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले आहे. खरोखरच बिनशेती मोजणीसाठी हे सर्व लागते काय व सादर मोजणी करणे आवश्यक असते काय याची माहिती मिळावी
आपण खरेदी केलेल्या जागेची रेखांकन परवानगी ( विकास परवानगी ) प्रमाणित प्रत भूमी अभिलेख खात्यास मोजणी करण्यासाठी आवश्यक आहे . ती देणे बंधन कारक आहे . त्या आधारे भूमी अभिलेख खाते मोजणी करू शकते .
मात्र एकदा विकास परवानगी दिल्या नंतर , प्रांत कार्यालयाने अन्य कागदपत्र आपल्या कडून मागण्याचे काहीही प्रयोजन नाही . प्रांत कार्यालयाने प्रमाणित प्रत देणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पंकज कागणे
18-07-2017
pankajkagane@gmail.com
शासकिय कर्मचारी आपले सरकार या पोर्टल वर आपली कार्यालयीन बाबींशी संबंधीत तक्रार दाखल करु शकतो का सर ?
आपल्या कार्यालयाचे प्रमुखांना आपला प्रश्न /अडचण सांगा ना .
आपले सरकार पोर्टल सर्व नागरिंकासाठी आहे . आपण हि नागरिक आहात . मात्र सेवा विषयक बाबी संदर्भात तक्रार असेल तर कार्यलय प्रमुखांचे निदर्शनास आणणे उचित
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पंकज कागणे
12-07-2017
pankajkagane@gmail.com
महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापन) नियम २००५ हा नियम पोलीस पाटील पदासाठी लागु आहे का सर ?
Question by sandip makhamal patil
11-07-2017
sandippatil92@rediffmail.com
Sir amachya gavat grampanchayatichaya gavthan jaget bharpur atikraman kele ahe, tyamule gavatalya lokanchi gairsoy hot ahe,ani ya gostila sarpanch ani gramsevak yanchi madat ahe, tari kuthalya prakarchi karvai karata yeu shakte? krupaya mahiti dyavi!
गावठाण जागेतील जागा ग्रामपंचायतीचे मालकीची आहि कि शासनाचे ? जर शासनाचे मालकीची असेल तर आपणास संबंधित तहसीलदार यांचेकडे अर्ज करावा लागेल . अन्यथा ग्रामपंचायतीचे मालकीची असल्यास . व ग्रामपंचायत तक्रारीची दाखल घेत नसेल तर , गटविकास अधिकारी यांचेकडे तक्रार दाखल करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमजद शेख
11-07-2017
amjadshaikh367@gmail.com
सब रजिस्टर कार्यालयामध्ये १९७५ रोजी नोंदवण्यात आलेल्या खरेदी खताची प्रमाणित प्रत (रजिस्टर शेरॉक्स) वर मिळाली आहे ...खरेदी विक्री करणारे व साक्षीदार यांच्या सह्या नाहीत. याबाबत कार्यालयामध्ये विचारले असता ३५ वर्षांपूर्वी नोंदणी दोन प्रति मध्ये केली जात नव्हती असे सांगण्यात आले . तरीपण सह्या अंगठे असलेले दस्त कुठे मिळेल .खरेदी खडाटाची नोंद आहे मात्र त्यामध्ये खरेदी घेणारे व विक्री करणारे आणि साक्षीदार यांच्या सह्या अंगठे नाहीत म्हणून ते नोंदणीकृत खरेदीखत न्यायालय रद्द करेल का ? मला न्यायालयात अपील करायचे आहे मार्गदर्शन करण्यात यावे .
साह्य असलेला दस्त देणार-घेणार यांच्यापैकी एकाकडे असणे शक्य . आपण निभांदक कार्यालयात जे अभिलेख उपलब्ध आहे त्याची प्रमाणित घेऊन , त्या आधारे आपले ईच्छिचे अनुषंगाने ते आव्हानित शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमजद शेख
10-07-2017
amjadshaikh367@gmail.com
नमस्कार सर , माझ्या आजोबाना कुल कायद्याने १९६३ मध्ये ६ एकर जमीन विकत मिळाली होती . मात्र आजोबानी १९७५ मध्ये त्यापैकी ४० गुंठे जागा एका शैक्षणिक संस्थेला दान दिली होती दान दिलेल्या जागेमध्ये संस्थेने शाळा बांधली आहे .बाकीच्या ५ एकर जागेत आम्ही शेती करतो आणि आजपर्यंत आमची कब्जा वहिवाट आहे . आजोबा वारल्यानंतर संस्थेने अचानक सर्वे आणून जागा सर्वे केली आणि संपूर्ण जागेवर कंपाऊंड टाकला . याबाबत संस्थेला विचारले असता १९७५ मध्ये तुमच्या आजोबानी संपूर्ण जागा विकली आहे असे सांगण्यात आले .तलाठी कार्यालयाकडून ७/१२ फेरफार संस्थेचा नावावर आहे हे पाहून आश्चर्याचा धक्का बसला . फेरफार वरून दुय्यम निबंधक कार्यालय कडून खरेदी खताची प्रमाणित प्रत घेतली मात्र त्यामध्ये आजोबांचा व साक्षिदारांच्या सह्या अंगठे नव्हते .याबाबत विचारले असता खरेदीखात ३५ वर्षांपूर्वी दोन प्रतीमध्ये रजिष्टर केले जात नव्हते म्हणून खरेदी खताच्या नोंदीमध्ये सही व अंगठे नाहीत असे सांगण्यात आले . मात्र खरेदी खतामध्ये जमीन विक्रीची परवानगी उपविभागीय अधिकारी भिवंडी यांचेकडून घेतली असल्याचा विक्री परवानगी बाबतचा सिरीयल नंबर नमूद करण्यात आला आहे .मा.उपविभागीय यांच्याकडे वरील सिरीयल नंबर नुसार जमीन विक्री परवानगीच्या प्रमाणित दस्ताची प्रत मिळावी म्हणून अर्ज केले. अर्जाला , कार्यालयात शोध घेतले असता आपण अर्ज केलेल्या जमीन विक्री परवानगी बाबतचा सिरीयल नंबर नुसार दस्त सापडत नाही .असे लेखी उत्तर देऊन अर्ज निकाली काढण्यात आला आहे .मी अर्जामध्ये जमिनीचे सर्वे नंबर पण नमूद केले होते .मला संस्थेने बनावट खरेदी खत व जमीन विक्री पॅरमिशन चा बनावट नंबर ने रजिस्टर करून जागा संस्थेने स्वतःचा नावावर करून घेतले आहे असे वाटते .प्रश्न (१) आजोबांची सही असलेला दस्त कुठे मिळेल / १९७५ रजिस्टर वर नोंदण्यात आलेल्या दस्तावर आजोबांची व साक्षीदारांच्या सह्या नाहीत ./स्टॅम्प पेपर लिहिलेला व सह्या असलेला रजिस्टरेड दस्त कुठे मिळेल (२) संस्थेवर कोणत्या स्वरूपाची कायदेशीर कारवाई करून जागा परत मिळविता येईल . आपल्या मार्गदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहे .
Question by अमजद शेख
10-07-2017
amjadshaikh367@gmail.com
बनावट खरेदीखत रजिस्टर करून फेरफार मंजूर करून ७/१२ नावावर करून घेतला असेल तर घारेदीखत आणि फेरफार रद्द करण्याचा अधिकार तहसीलदारानाकडे असतो का ?
बनावट खरेदी खत दिवाणी न्यायालयाकडून रद्द करून घ्यावे लागते . The Specific Relief Act खाली दावा दाखल करा व नोंदणीकृत दस्त बनावट असल्याने null and वोइड असल्याचे जाहीर करून मागा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अभिजीत
08-07-2017
abhijitkadam55@gmail.com
महोदय माहीतीचा अधिकार कायदा२००५ अन्वये तहसील कार्यालयातुन( मी ज्या ठिकाणी राहतो )जी माहीती मिळते (ऊदा जुने ७/१२ अभिलेख फेरफार )कींवा ईतर माहीती देतात यावर सहाय्यक जनमाहीती अधिकारी यांचा कींवा जनमाहीती अधिकारी यांचा शिकका कींवा सही न करता माहीती पुरवली जाते तसेच महसुल विभागाचा राजमुद्रा असलेला शिक्का तरी मारा अशी विचारणा केली तर असा शिक्का माहीती अधिकार २००५ अन्वये देण्यात येणार्या माहीतीवर मारता येत नाही असा कोनताही नियम कायद्यात नाही याबाबत तहसिलदार यांना भेटल्यानंतरही हेच ऊत्तर मिळाले (राजमुद्रा असलेला शिकका मारण्याचे कोणतेही आदेश या कार्यालयाला मिळाले नाहीत फार तर जनमाहीती अधिकारी सही देतील )माञ शिकका मिळनार नाही तेव्हा याबाबत सविस्तर माहीती असलेले यशदा मार्फत मिळालेले पुस्तकातही आपन वाचा याबात माहीती नाही असेही सांनणयात आले आहे तेव्हा आपण याबात सविस्तर मार्गदर्शन करावे व शासन निर्णय असलयास तो द्यावा
या ऍक्ट अंतर्गत फक्त Xerox प्रत मिळेल सत्य प्रत करीत वेगळा अर्ज Karun govt. फी भरावी
Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी
Question by अभिजीत
08-07-2017
abhijitkadam55@gmail.com
महोदय सन १९१९ साली गहाण खत झालेले आहे ते नजर गहाण खत आहे रजिस्टर करत असताना पैसे न दीलयास कोर्टामार्फत विक्री करून किमंत व्याजासहीत घ्यावी असा दस्त आहे गहाण वारस नोंद सुध्दा ७/१२ एकञिकरण योजनेस आजही आहे तर पुन्हा वारस नोंद होऊ शकते का (कलम ५९ )नुसार व ह्या जमिनीची विक्री करुन रक्कम घेऊ शकतो का कारण आजपर्यत गहाण खताचे पैसे दिलेले नाहीत व त्यावेळेची रक्कम आजच्या रक्कमेत कशी ठरवलि जाते मार्गदर्शन करा
Question by अभिजीत
08-07-2017
abhijitkadam55@gmail.com
महोदय रजिस्टर दस्त नोंदणी केलेल्या दस्तात जर चुकीच्या चतुसिमा आहेत व वहीवाट माझी आहे असे सांगुन दस्त केला असेल व प्रत्यक्षात ७/१२ अभिलेखात ती जमिन पड आहे मग असे असताना एकञित जमिनीतील वहीवाट नसताना व ७/१२ त आणेवारी नसताना आणेवारी घालुन दस्त करून दि्लेले आहेत याबाबत कायदेशीर कोनती कारवाई होऊ शकते का दस्त नोंद होऊन बराच कालावधि गेला आहे मार्गदर्शन करा(विना सुचि २ दस्त झेराँक्स प्रतीवर नोंद केला आहे )
Question by अभिजीत
08-07-2017
abhijitkadam55@gmail.com
महोदय शासनाच्या आदेशान्वये ७/१२ अभिलेख आँनलाईन तयार करण्याचे काम सुरू आहे परंतु यात अनेक चुका झाल्या आहेत विशेषता आणेवारीत असणारी जी क्षेञ आहेत याबाबत कारण संबंधित गटाची आणेवारी १६ आणे जर भरली नाही कींवा जास्त झाली तर ७/१२ आँनलाईन होत नाही परंतु आमच्या गावातील दप्तर नुकतेच नुतन करणयात आले आहे यामध्य जे खातेऊतारे तयार केले आहेत यात आणि पुर्वीचे ऊतारे यात बरीच तफावत झाली आहे ती एकञित गटातील क्षेञाबाब कारण सामान्य लोकांना आणेवारी काढता येत नाही तरीही पुर्वी जे खाते ऊतारे दिले यावरूनच माझ्या आजोबांनी मृत्युपञ केले आहे याची नोदं ७/१२ अभिलेखात होऊन २ वर्ष होऊन गेली आहेत पण आता तलाठ्याने जे नविन खाते ऊतारे केलेले आहेत यात जमिन कमी केलेली आह याचे कारण पुर्वीचे खाते ऊतारे आणेवारी नुसार नव्हते असे कारण तलाठी देत आहे माञ पुर्वीचे खाते ऊतारे सन १९६५ पासुन २०१६ पर्यत तेच होते यात बदल झाला व क्षेञ जास्त झाले त्यामुळे आंनलाईनला अडचन येत आहे मृत्युपञातील दुरूस्ती १५५ खाली दुरूस्त करता येईल यात तलाठी आम्हाला दोष देत आहे मार्गदर्शन करा
Question by SHAIELSH KARHALE
08-07-2017
karhaleshailesh226@gmail.com
प्रिय सर,
वरील विषयास अनुसरून विनंती अर्ज सादर करण्यात येतो कि मी शैलेश दत्तराव कऱ्हाळे वय २० वर्ष व्यवसाय शिक्षण रा. डिग्रस कऱ्हाळे ता. जि. येथील रहिवासी असून माझ्या वडिलाच्या नावाने या गावी एक गुंठा जमीन आहे. पण सर ती जमीन आमच्या ग्रामपंच्यायतने ग्रामपंचायतला दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने लावली आहे. पण सर त्या व्यक्तीजवळ ती जागा नावाने असल्याचा कोणत्याही प्रकारचा महसुली पुरावा नाहीये. तरी पण तो व्यक्ती म्हणतो कि ती जागा माझी आहे.
माझ्या वडिलाच्या म्हणजे दत्ता गंगाराम कऱ्हाळे या नावाचे पुरावे माझ्याजवळ १९८३ पासून आहेत. तरीपण खोट्या खरेदीपत्रा आधारे तो व्यक्ती आमची उर्वरित जागा बळकावण्याचा प्रयत्न करत आहे. तो मला म्हणतो माझ्या वडिलाने तुझ्या वडिलाच्या आजोबाकडून हि जागा विकत घेतली आहे व या जागेचा येणे सुद्धा केला आहे. सर मला सांगा ती जागा माझ्या वडिलाच्या नावाने १९८३ च्या ९(३) ९(४) च्या नक्कालेनुसार व नमुना नंबर १२ नुसार नावाने आहे. सध्या सातबारा माझ्या वडिलाच्या नावाने असतांना येणे कसा शक्य आहे सर रजिस्ट्री नाही काही नाही. NA Order no. 1980 NAA CR/1453 दि. 21/11/1989 चे अभिलेख पहावयास मिळाले नाही. तलाठी साहेबांनी नमुना नंबर २ कसा निर्गमित केला याची कृपया आपण चौकशी करावी. गट नं. 642 चा नमुना नं. २ माझे वडील दत्ता गंगाराम कऱ्हाळे यांच्या नावाने सुद्धा आहे. माझे वडीलाचा मृत्यू झाला आहे.
सर तो मला म्हणतो कि मी ताब्याच्या आधारे कोर्टात जाऊन भांडण करेन तुला जमीन देणार नाही. जी जागा माझे वडील दत्ता गंगाराम कऱ्हाळे याच्या नावाने होती ती जागा त्याने ११/१०/२०१३ मध्ये नमुना नंबर ८ ला लावली. ग्रामपंचायत मध्ये विचारणा केली असता त्यांनी सांगितले हे कोर्ट मॅटर आहे आम्ही काही करू शकत नाही. त्यांनी सुद्धा माहित असतांना त्या खोट्या कागदाच्या अधारे ती जमीन त्या व्यक्तीच्या नावाने लावली कारण त्या वेळेस सर त्या व्यक्तीची बायको ग्रामपंचायत ची सदस्य होती.. हि माझी नम्र विनंती आहे. मी या अर्जासोबत त्या व्यक्तीचे जे कागतपत्रे आहेत ते व माझ्या वडिलाचे कागतपत्रे pdf स्वरुपात पाठवत आहे कृपया आपण ते बघावे व चौकशी करावी ही नम्र विनंती.
आपले कथनावरून , जमिनीचा ७/१२ आपले वडिलांचे नावावर आहे . तसेच गाव नमुना नंबर २ ला हि वडिलांचे नाव आहे . त्यामुळे तसे घाबरण्याचे कारण नाही .
ग्राम पंचायत रेकॉर्ड ला , त्या व्यक्तीचे नाव आहे . त्या विरुद्ध आपण गट विकास अधिकारी यांचे कडे अपील करा .
जमिनीचा ताबा , त्या व्यक्तीकडे २० वर्षावून आधी काळ असेल तर तो आपण विरुद्ध adverse possession चा दावा दिवाणी न्यायालयात दाखल करू शकतो .तत्पूर्वी आपणच , त्यास आपले मिळकतीतून काढून टाकणे बाबत न्यायालयात दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Mahesh patil
08-07-2017
shingarei20@gmail.com
नमस्कार सर.
मा.ना.तहसिलदार साहेब यांनी रजिस्टर्ढ मुत्युपञचा प्रलंबित फेरफार निकाली काढले आहेत.आपिल कालावधी संपला आहे मा.तलाठी व मंडलआधिकारी साहेब 7/12 स नोंद घेतील का..नोंद घेण्यासाठी अर्ज करावे लागेल का सर..
मा.उपजिल्हाधिकारी साहेबांकडे आपिल दाखल झाली आहे.फ्कत अापिल केस चालु आहे जमिनीवर स्टे वगैर काही नाही.
Question by Swapnil Bharat bansode
07-07-2017
Swapnil bansode 033@.gmail
Mazya panjobachya nanter chulat ajobani ekm mahnun sarv jamin tynchya nave keli ani aamche ajoba gharatil thorle asun tynche nav aaj kutech nahi Sat barywar ani te laun hi det nahit tr plz suggestion dya me KY karu
जमीन अजूनही चुलत आजोबांचे नावावर असल्यास , ये .कु . मॅ. च्या पोटातील इतरांची नावे ७/१२ सादरी दाखल करणे बाबत तहसीलदार यांचे कडे अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पंकज कागणे
06-07-2017
pankajkagane@gmail.com
हक्कसोड पत्र आणि मृत्युपत्र या दोन्ही दस्तऐवजांची नोंदणी कोणत्या कार्यालयात केली जाते सर ?
हक्क सोड पत्रकाची व मृत्य पत्राची नोंदणी , दुय्यम निबंधक कार्यकाळात केली जाते
मृत्य पात्राची नोंदणी ऐच्छिक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रदीप बोरले
06-07-2017
pradip.borle6226@gmail.com
महोदय,
१.एका व्यक्तीचे जातीचे प्रमाण पत्र साठी जोडलेले आवश्यक कागदपत्र दुसऱ्या व्यक्तीला माहिती अधिकारात देता येईल काय ?
२. पोलीस पाटील पदाचे भरतीसाठी झालेल्या परीक्षेचे उत्तरपत्रिका एका उमेदवारांची दुसऱ्या उमेदवारास माहिती अधिकारात देता येईल काय?
कृपया मार्गदर्शन करावे.
Question by मुकुंद नागरगोजे बीड
06-07-2017
mukundnagargoje401@gmail.com
राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन संपादन करण्यासाठी एखाद्या दुकानदाराचे दुकान अथवा व्यवसाय गेल्यास त्याला कोणत्या पुराव्या आधारे संपादनाचा मोबदला दिला जातो? आणि ते पुरावे कोणकोणते ते सांगा?
राष्ट्रीय महामार्ग कायदा , कलम ३ आ ची अधिसूचना काढण्या पूर्वी , जागेची संयुक्त मोजणी केली जाते . या मोजणीत दुकानाचा / व्यवसाय जागेचा उल्लेख केला जातो . अश्या जागेचे मुल्याकंन , दुकानाचे मुल्याकंन करून नुकसान भरपाई दिली जाते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शेख फयाज अहेमद
05-07-2017
thisisfmshaikh@gmail.com
एका जमीन मालकाने स्वतची जमीन दस्त करून नियजित लि.कंपनीस खरेदी दिली व 7/12 वर, कंपनी व त्यातर्फे मुख्य प्रवर्तक महणून स्वताच्या नावाची नोंद केली आता तोच व्यक्ति कंपनी अस्तीत्वात आली नाही असे अर्ज देऊन 7/12 वरील कं.चे नाव कमी करून केवल त्याचेच नाव ठेवण बाबत विनंती केली आहे. असे करता येईल का? उपाय काय आहे
खरेदी दस्तात, काय नमूद आहे ?
केवळ कायदेशीर व्यक्तीच मिळकत खरेदी करू शकते . जसे , नैसर्गिक व्यक्ती - माणूस किंवा कायदेशीर व्यक्ती - कम्पनी , न्यास , महामंडळे इत्यादी .
जर कम्पनी incorporate झाली असेल तर , कम्पनीस कायदेशीर व्यक्तीचा दर्जा प्राप्त होतो व कंपनी जमीन खरेदी करू शकते व कम्पनीचे नावावर जमीन दाखल करता येते . या ठिकाणी कम्पनी प्रस्तावित / नियोजित आहे , म्हणजे कम्पनी incorporate झालेली नाही . त्यामुळे कम्पनी जमीन खरेदी करू शकत नाही . पर्यायाने कम्पनीचे नावावर जमीन दाखल होऊ शकत नाही .
खरेदी खतात कम्पनी तर्फे संचालक म्हणून व्यक्तीचे नाव नमूद असेल , तर प्रत्यक्षात जमीन कम्पनीसाठी खरेदी केलेली आहे . कम्पनी incorporate झालेली नसल्याने , जमीन कम्पनीचे व पर्यायाने व्यक्तीचे नावे दाखल होऊ शकत नाही / दाखल करता येणार नाही .
मिळकत शेती स्वरूपाची असेल , तर , कम्पनी शेती मिळकत खरेदी करू शकत नाही . कलम ६३ चा भंग होऊन , कलम ८४ की प्रमाणे कारवाई प्रस्तावित करणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रोहित जठार
05-07-2017
www.roraj8@gmail.com
आदरणीय सर,
ग्रामपंचायत हद्दीतील सिटी सर्वेच्या जाणे-येणेच्या बोलतील अतिक्रमण ग्रामपंचायने नोटीस देऊनही सदर व्यक्ती उत्तर देत नाही तर पुढील कार्यवाही काय करावी व या बाबत अधिकार कोणाचे आहेत.?
Question by शेख फयाज अहेमद
05-07-2017
thisisfmshaikh@gmail.com
एका जमीन मालकाने स्वतची जमीन दस्त करून नियजित लि.कंपनीस खरेदी दिली व 7/12 वर, कंपनी व त्यातर्फे मुख्य प्रवर्तक महणून स्वताच्या नावाची नोंद केली आता तोच व्यक्ति कंपनी अस्तीत्वात आली नाही असे अर्ज देऊन 7/12 वरील कं.चे नाव कमी करून केवल त्याचेच नाव ठेवण बाबत विनंती केली आहे. असे करता येईल का? उपाय काय आहे.
नियोजित कंपनी हि कायद्याचे दृष्टीने Legal Person नाही . त्यामुळे नियोजित कंपनीस जमीन खरेदी करता येत नाही .
सदरचा व्यवहार हा कुळकायद्याचे तरतुदी विरुद्ध आहे . त्याप्रमाणे कलम ८४ क प्रमाणे कार्यवाही होणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रतिभा संखे
05-07-2017
vishalpsankhe@rediffmail.com
माझ्या वडिलांच्या नावे जमीन आहे.मी त्याची मुलगी आहे. वडिलांचे 2010 रोजी मृत्यू झाले आहेत.सदर जमिनी वर वारस नोंद(फेरफार) साठी तलाठी जवळ अर्ज दिले सोबत१)वारस दाखला,2)मृत्यू दाखला 3)प्रतिद्यापत्र जोडले आहेत. तरीही तलाठीने वारस नोंद(फेरफार) केले नाही आहे.तलाठीचे असे म्हणणे आहे की तुमच्या भावांचा फेरफार करण्यास विरोध आहे.तरी मी काय करावे.
भावाचा विरोध आहे म्हणून म्हणून तलाठी नोंद करणे टाळू शकत नाही .
वडिलांना जे वारस असतील त्या सर्वांची नवे ७/१२ सादरी वारस म्हणून लावणे आवश्यक आहे .
तलाठी फार तर तक्रार नोंद म्हणून , तहसीलदार यांचेकडे सादर करणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राहुल जाधव
05-07-2017
rahuljadhav5200@gmail.com
नमस्कार सर ,
माझ्या मालकीची विकत घेतलेली भोगवटा वर्ग १ ची जमीन असून मी इतर मी म ज म अ १९६६ चे कलम ३६ क चा शेरा नोंदवलेला आहे. सध्या त्या जमिनीची अदलाबदल करावयाची असून बदली मिळणारी जमीन हि भोगवटादार वर्ग १ ची आहे संबधीत व्यक्ती हे खुल्या प्रवर्गातील आहे ? तरी जमीन अदलाबदलीची तरतूद कळनेस विनंती आहे .
३६ क चा शेरा म्हणजे शासनाचे पूर्व परवानगीशिवाय जमिनीचे हस्तांतनास (ज्यामध्ये अदलाबदलास) निर्बंध आहेत . आपण शासनाची परवानगी घ्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पंकज पाटील
04-07-2017
pankaj25782@gmail.com
सर्वे नंबर-३१६-१, २८१, २८० येथील जमीन मधील संरक्षित कुळ हक्क व न्याय परत मिळणे बाबत.
माझे आजोबा मयत कै. जोमा धाया पाटील हे संरक्षित कुळ म्हणून सन-१९५० हक्काचें पत्रक -६(अनु क्र. १२२०) मध्ये नोंद आहे. त्याच्या मृत्यूनंतर सदर जागा वारस ह्क्क्नुसार माझे वडील मयत कै. कृष्णा जोमा पाटील याचा नावे नोंद झाली आहे.
सदर काही कारणास्तव मी अज्ञान व माहिती नसल्यामुळे मला सदर जागे संदर्भात माहिती नव्हते आणि तसचे कधी सरकारी दाप्तर्मधून आमच्या नावे कधी पत्र व नोटीस देण्यात आली नाही.
तरीही सदर जागे मधील आमचे संरक्षित कुळ हक्क व अधिकार डावलण्यात व नष्ट करण्यात आले आहे. जागे मधील झालेले बेकायदेशीर विक्री वव्यहार कुळ कायदाचा उल्लंघन करून व अनधिकृत नोंदी याची चौकशी करून आम्हाला आमचे कुळ कायदेनुसार आमचे हक्क व अधिकार कसा मिलणार. आणि भूसंपादन अवॉर्ड मध्ये आमचा नावाचा व नोटीस पण देण्यात आली नाही
पंकजराव
आपले वडिलांचे नाव केंव्हा कमी झाले ? ज्या फेरफाराची नाव कमी झाले तो फेरफार पहा . फेरफार पहिल्या नंतर आपणास , कळेल कि आपले अथवा वडिलांचे नाव का कमी झाले . नाव कमी झाल्याचे कारण कळल्या नंतर पिढीला दिशा ठरवता येईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by वकील चौधरी
03-07-2017
vakilchaudhari123@gmail.com
नमस्कार सर
माझा प्रश्न
शेत जमिनीचा British कालीन रेकॉर्ड जमिनधारकाला पाहता येतो का? कसे
तालुका अभिलेख कक्षात उपलब्ध असेल तर आपणास ब्रिटिश कालावधीतील रेकॉर्ड पाहता येईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेशकुमार मिश्रा
29-06-2017
formattor@yahoo.com
नमस्कार सर, नोंदणी महनिरीक्षक कार्यालयाचे 3846/2005/710 दि .10/05/2006 हे परिपत्रक तसेच महसूल व वन विभागाचे परिपत्रक क्र .0/3092/प्र क्र 25/ल-6,दि.07/05/1992 हे परिपत्रक
कोठे मिळू शकतील याबाबत क्रुपया मार्गदर्शन करावे
सदर परिपत्रक mohsin7-12.blogspot.in वर महसूल कायदे या हेड खाली कलम 85 चा अधिक अर्थ स्पष्ट करणेबाबत या नावाने आहे प्राप्त करून घ्या
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3400 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
